Home Blog Page 509

डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांची फोग्सी अध्यक्षपदी नियुक्ती

पुणे : जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या वंध्यत्व, एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया तज्ज्ञ तसेच रुबी हॉलक्लिनिकच्या हॉस्पिटलच्या विभाग प्रमुख स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांची ‘फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकोलॉजिकल सोसाईटीज ऑफ इंडिया’ (FOGSI) च्या ६३ व्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या अखिल भारतीय स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र परिषदे मध्ये त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

आपल्या निवयक्तीविषयी डॉ. तांदुळवाडकर म्हणाल्या, “भारतातील २७७ सोसायट्यांमधील ४६,००० हून अधिक प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फोग्सी सारख्या महत्त्वपूर्ण संस्थेचं नेतृत्व करणे ही एक खूप मोठी गोष्ट आहे. या अध्यक्षपदी असताना मी महिला आरोग्याच्याक्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्यासाठी पाऊल उचलणार आहे. ‘सम्पूर्ण: स्वस्थ जन्म अभियान’, ‘Know Your Numbers’, आणि ‘दो तिके जिंदगी के’ यासारख्या उपक्रमांद्वारे महिला आरोग्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदलघडविण्याचा आमचा उद्देश आहे.”

मातृत्व आणि मृत्यू दर,असंसर्गजन्य रोग,गर्भाशयाचा कर्करोग,आरोग्य सेवांची उपलब्धता आणि प्रजनन आरोग्य जागरूकता अशा भारतातील महिलांच्या आरोग्यावर प्रभाव टाकणाऱ्या मुख्य समस्यांवर डॉ. तांदुळवाडकर यांच्या पुढाकाराने त्वरित आणि ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत, ज्यामुळेसंपूर्ण भारतातील महिलांना केवळ अत्यावश्यक आरोग्य सेवाच नाही तर त्यांना त्यांच्या स्वत:च्या आरोग्याचीजबाबदारी घेण्यास सक्षम केले जाईल.

मोक्क्यातील गुन्हेगाराची जेलमधून होताच सुटका दहशत पसरविणारा जल्लोष करत रॅली गुन्हेगार गुड्या गणेश कसबेसह ४० जणांवर गुन्हा दाखल – अद्याप अटक नाही

पहा व्हिडीओ-व्हायरल झाल्यावर, २ दिवसांनी गुन्हा दाखल

पुणे-मोक्कामध्ये येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे हा २ दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे ५०-६० समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली. रॅलीचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर Viral होत आहे. परिसरातील नागरिकांना रॅलीमधील युवकांनी धमकावले होते असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे. आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली. व्हिडिओ आणि घडलेल्या प्रकाराबाबत नागरिकांनी Laxmi नगर (शास्त्रीनगर) पोलीस चौकीमध्ये माहिती दिली पण कारवाई झाली नाही असे नागरिकांचे म्हणणे होते पण आज पोलीस शिपाई लहू एकनाथ गडमवाड येरवडा पोलीस स्टेशन यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. आणि 1)प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे राहणार भीम ज्योत सर्वे नंबर 12 लक्ष्मी नगर येरवडा पुणे, 2) दीपक मदने, 3) करण सोनवणे, 4)अनिकेत कसबे, 5) अंश पुंडे, 6) अजय कसबे, 7) सागर कसबे, 8) अभिजीत ढवळे, 9) राहुल रसाळ, 10) नन्या कांबळे, 11) रोशन पाटील, 12) तुषार पेठे आणि अन्य ३५ ते ४० जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे .07/01/2025 रोजी रात्री १० वाजता चे सुमारास गुंजन चौक येरवडा पुणे 6 येथून हि रॅली गेल्याचे फिर्यादीने पहिले .फिर्यादी हे पर्णकुटी मार्शल ड्युटी हजर असताना व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग फिरत असताना येरवडा पोलीस स्टेशन कडील अभिलेखा वरील दिनांक 07/01/25 रोजी गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आलेला प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे, त्याच्या स्वागतासाठी त्याचे 11 साथीदार व इतर 35 ते 40 इसम यांनी त्यांच्याकडील 04 चार चाकी गाड्या व 20 ते 30 दुचाकी गाड्या वरून येऊन गैर कायद्याची मंडळीचा जमाव जमवून त्यांच्याकडील चार चाकी व दुचाकी वाहने बेदरकारपणे चालवून आरडा ओरडा करून व घोषणा देऊन येरवडा परिसरामध्ये दहशत निर्माण केली आहे म्हणून त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

जीएसटीच्या जाचातून छोटे, लघू, मध्यम व्यापारी व सर्वसामान्य करदात्यांची सुटका करा: सचिन पायलट

जाचक जीएसटीत बदल करण्याची वेळ, आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात GST 2.0 आणा.

मुठभर श्रीमंतांवर भाजपा सरकारचा कर सवलतींचा वर्षाव तर मध्यमवर्गीय व सर्वसामान्यांवर प्रचंड भार.

काँग्रेस सरकारच्या योजनांना विरोध करणाऱ्या भाजपाने त्याच योजना राबवल्या.

मुंबई, दि. ९ जानेवारी २०२५
भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कर दशहतवादाचा सामना लघु, छोटे, मध्यम व्यापारी यांना करावा लागत आहे. जीएसटी स्लॅबची रचना अत्यंत किचकट असल्याने व्यापाऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. तसेच देशातील नोकरदार, मध्यमवर्ग व सर्वसामान्य जनतेकडून सर्वात जास्त जीएसटी कर संकलन होत असून मुठभर श्रीमंतांवर मात्र कर सवलतींचा वर्षाव केला जात आहे, हे चित्र बदलण्यासाठी केंद्र सरकारने येत्या अर्थसंकल्पात जीएसटीमध्ये बदल करत जीएसटी २.० आणावा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी केली आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना सचिन पायलट म्हणाले की, १ फेब्रुवारी २०२५ रोजी भाजपा सरकार केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात जनतेच्या हिताकडे लक्ष देऊन जीएसटी या अत्यंत किचकट, दहशत निर्माण करणाऱ्या कर रचनेत बदल केला पाहिजे. २०२१-२२ या वर्षात एकूण जीएसटीपैकी जवळपास दोन तृतीयांश किंवा ६४% लोकसंख्येच्या तळातील ५०% लोकांकडून आले तर फक्त ३% GST वरच्या १०% मधून आला. हा गरिबांवरचा कर आहे जो सतत वाढत जातो. आरोग्य विमा सारख्या अत्यावश्यक सेवांवर जीएसटी दर हा लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी १८% आहे. पॉपकॉर्नवर सुद्धा तीन प्रकारचा जीएसटी लावला जात आहे.
मोदी सरकार दरवर्षी रेकॉर्डब्रेक कलेक्शनचा दावा करते पण जेव्हा श्रीमंतांचा विचार केला जातो, तेव्हा २०१९ मध्ये कॉर्पोरेट करात २ लाख कोटी रुपयांची कपात केली. पंतप्रधान मोदी अरबपतींसाठी मोठी कर कपात देतात आणि गरीब आणि मध्यमवर्गांवर मात्र करांचा भार टाकतात. जीएसटीची विक्रमी वसुली होत असून देशातील सर्वात जास्त जीएसटी मध्यमवर्ग व सर्वसामान्य जनतेकडून जमा होतो. या घटकावरचा जीएसटीचा भार कमी करण्याची वेळ आली आहे त्यादृष्टीने सरकारने निर्णय घ्यावा व आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात GST 2.0 आणावा.

जीएसटीचा प्रस्ताव सर्वात प्रथम डॉ. मनमोहनसिंग यांनी आणला होता, त्याला भाजपाने तीव्र विरोध केला होता, आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विरोध केला होता. आधार कार्ड, डीबीटी, किरकोळ क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक या सर्वांना भाजपा व मोदींनी विरोध केला होता पण सत्तेत येताच काँग्रेसच्याच या योजना भाजपाने राबवल्या. जीएसटी लागू करण्यासाठी मध्यरात्री १२ वाजता मोठा गाजावाजा करून काहीतरी विक्रमी करत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. गुंतवणूकीला काँग्रेसचा विरोध नाही पण ती मनमानी पद्धतीने केली जाऊ नये अशी काँग्रेसची भूमिका आहे.

भाजपा सरकार अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे चित्र निर्माण करत आहे पण वास्तविकता वेगळी आहे. जीडीपीमध्ये मोठी घसरण होत आहे. भारताला १० टक्के जीडीपीचे लक्ष्य ठेवून वाटचाल करावी लागेल पण भाजपा सरकार कोणतेच खरे आकडे जाहीर करत नाही. भाजपा सरकारमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. सरकारला योग्य वाटतील तेच आकडे जाहीर केले जात आहेत. उलट काँग्रेस सरकार असताना जी वस्तुस्थिती आहे ती मांडली जात होती. दरडोई उत्पन्नाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. रोजगार निर्मिती होत नाही देशात प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे, तसेच महागाईसुद्धा वाढलेली आहे, असेही पायलट म्हणाले.

इंडिया आघाडी मजबूतच आहे..
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सचिन पायलट म्हणाले की, लोकशाही, संविधान व देश हित लक्षात घेऊन काँग्रेससह अनेक पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे, ही आघाडी आजही मजबूत आहे. प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी असते त्यानुसार काही निर्णय घ्यावे लागतात याचा अर्थ इंडिया आघाडी कमजोर झाली, असे म्हणता येणार नाही असेही पायलट यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला CWC सदस्य व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार अमिन पटेल, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते भरतसिंह, झिशान सय्यद आदी उपस्थित होते.

पुण्यातील वाढती गुन्हेगारी अन मस्साजोग: धनंजय मुंडे प्रकरणी अजित पवारांनी घेतली रोखठोक भूमिका

पुणे- सरकार पोलिसांना इतक्या चांगल्या सुविधा देत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण व्हावा. शहराच्या पोलीस प्रमुखाचे हे अपयश आहे.पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य करत थेट .. तुम्हाला जमत नसेल तर सांगा .. आमच्याकडे आणखी चांगले अधिकारी आहेत असा थेट पोलीस आयुक्तांना इशारा देत या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांशी संवाद करू असेही म्हटले आहे .

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे अधिकाऱ्यांची बैठक घेत पुण्यातील विकासकामांचा आढावा घेतला आहे. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील मुद्यांवर भाष्य केले आहे. याचसोबत त्यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी देखील काही प्रश्न विचारण्यात आले. यावर देखील त्यांनी उत्तर दिले आहेत.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहेत. अशात अनेक राजकीय नेत्यांसह समाजिक कार्यकर्त्यांनी या हत्येतील आरोपींचा धनंजय मुंडे यांच्याशी कथित संबंध असल्याचा आरोप करत, मुंडे यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “पक्ष वगैरे न बघता दोषी आढळणाऱ्यावर कडक कारवाई करणार आहे.”या हत्या प्रकरणाचा विविध तपास यंत्रणा तपास करत आहेत. त्याच्यबरोबर मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे, या प्रकरणात कोणी दोषी असल्याचे सिद्ध झाले तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. मी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगितले आहे की, पक्ष वगैरे न बघता यामध्ये वरिष्ठ पातळीवर काम करणारे कोणी दोषी असतील तर त्यांची गय करण्याचे कारण नाही. ही निर्घून पद्धतीने झालेली हत्या आहे. अशा प्रकारच्या घटना आम्ही खपवून घेणार नाही.”बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनं सुरू केली आहेत. या हत्याप्रकरणामुळे धनंजय मुंडे वादाच्या केंद्रस्थानी सापडले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धनंजय मुंडे यांचे कथित निकटवर्तीय वाल्मिक कराड यानेच देशमुख यांच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप केला जात आहे.
अजित पवार यांना विचारण्यात आले की, सुरेश धस यांनी बडी मुन्नी म्हणून काही आरोप केले आहेत. त्यावर बोलताना संतापून अजित पवार हे म्हणाले की, ते त्यांना विचारा…हे असल्या फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावे घेऊन बोलणार आहे. त्याच्यामुळे त्याला विचारा…कोण आहे ते…सुरेश धस यांच्यावर अजित पवार हे संतापलेले दिसले. राष्ट्रवादीमध्ये एक बडी मुन्नी आहे आणि तिने समोर यावे, असे सुरेश धस यांनी म्हटले होते.

वर्दळीच्या ठिकाणी तरुणाने कोयत्याने केले सपासप वार-पुण्यातील खुनाचा VIDEO व्हायरल

पुणे- येरवडा परिसरात मंगळवारी एका 28 वर्षीय तरुणीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या झाली होती. आता या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात सदर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडल्याचे दिसून येत असून, तिथे बघ्यांची तोबा गर्दी असल्याचेही दिसत आहे. दुर्दैव म्हणजे या गर्दीपैकी कुणीही तिच्या मदतीला धावून गेले नाही.आरोपी आपल्या हातातील कोयता खाली टाकतो आणि त्यानंतर नागरिक त्याला मारण्यासाठी धावून जातात.असे व्हिडीओत दिसते आहे.

कृष्णा सत्यनारायण कनोजिया (30) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तर शुभदा शंकर कोदारे असे मृत तरुणीचे नाव आहे. हे दोघेही येरवडा परिसरातील एका नामांकित कंपनीत नोकरीस होते. कृष्णाने आर्थिक व्यवहारातून शुभदाची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मयत शुभदाने वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून कृष्णाकडून वेळोवेळी पैसे घेतले होते. पण हे पैसे ती वेळेवर परत करू शकली नाही. त्यामुळे कृष्णाने मंगळवारी तिच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे व्हिडिओत?

या घटनेचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात आरोपी कनोजिया हातात कोयता घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. तर मृत शुभदा कोदारे जखमी अवस्थेत खाली पडल्याचे दिसून येत आहे. याशिवाय घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी असल्याचेही व्हिडिओत दिसून येत आहे. आरोपी जखमी शुभदाच्या आसपास मोबाईल घेऊन फिरतोय. शुभदा गंभीर जखमी असतानाही मोबाईलवरून झाल्या प्रकाराची माहिती कुणालाही तरी देत असते. पण आरोपी तिच्याजवळील फोन हिसकावून घेताना व्हिडिओत दिसतो.उल्लेखनीय बाब म्हणजे घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. पण कुणीही आरोपी कृष्णाला अडवताना दिसून येत आहे. शेवटी आरोपी आपल्या हातातील कोयता खाली टाकतो आणि त्यानंतर नागरिक त्याला मारण्यासाठी धावून जातात. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

वाल्मीक कराडवर ED ची कारवाई का नाही?पोलिसांना चुकीचे काम करायला लावणारे वाईट- सुप्रिया सुळे केंद्राला विचारणार जाब

मुंबई-वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर त्याच्यावर ईडी आणि पीएमएलए नुसार कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु आठ महिने झाल्यानंतरही त्याच्यावर कारवाई का झाली नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला केला आहे. अनिल देशमुख, संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली, तर मग वाल्मीक कराडवर कारवाई का झाली नाही? असाही सवाल केला. वाल्मीक कराडवर ईडीची कारवाई करावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.

वाल्मिक कराडच्या नावाने 2022 मध्ये नोटीस काढली होती. तसेच आठ महिन्यांपूर्वी अवधा कंपनीकडून एफआयआर झाला असताना वाल्मिक कराडवर कारवाई का नाही? अशीच खंडणीची प्रकरणे होणार असतील, तर महाराष्ट्रात कोण गुंतवणूक करेल, असेही त्या म्हणाल्या. आम्ही राज्यकर्ते असल्यामुळे आम्हाला न्याय देऊ नका, पण कंपनीने वाल्मीक कराडवर खंडणीची केस दाखल केलेली असल्यामुळे कंपनीला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

6 महिन्यांपूर्वी कराडाविरोधात तक्रार दाखल झाली होती. मग त्याच्यावर ईडीची कारवाई का झाली नाही? अनिल देशमुख, संजय राऊत आणि नवाब मलिक यांना एक कायदा आणि वाल्मीक कराडला वेगळा कायदा का? याचे उत्तर सरकारने द्यावे. हा विषय मी आणि बजरंग सोनवणे 30 तारखेला संसदेच्या अधिवेशनात मांडणार असून याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनाही याबाबत विचारणा करणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

लाडकी बहीण योजनेच्या परळीचे तालुकाध्यक्ष वाल्मीक कराड आहेत. ही योजना लोकसभा निवडणुकीनंतर आली. वाल्मीक कराडवर लोकसभेच्या आधीच खंडणीचा गुन्हा दाखल होता. खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या माणसाला महिलांसाठीच्या लाडकी बहीण योजनेच्या कमिटीचा अध्यक्ष करता, हे असंवेदनशील आणि धक्कादायक आहे.

अशोक चव्हाण यांनी नैतिकतेने राजीनामा दिला होता. अशी देशात किती तरी उदाहरणे देशात झालेली आहे. एक काळा असा होता, की एखादा रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे मंत्री राजीनामा द्यायचे. त्यामुळे नैतिकतेच्या आणि लोकांच्या भावनांचा आदर ठेवून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येला आज 30 दिवस पूर्ण झालेत. संतोष देशमुख यांच्या मुलीचे अश्रू बघून अस्वस्थ वाटते. माणुसकी राहिली की नाही? सरकारमध्ये काही संवदेनशीलता राहिली का नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. भाजप आणि त्यांच्या काही मित्रपक्षात आजही संवेदनशील नेतृत्व आहे. सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांनी हे प्रकरण लावून धरले आहे, हा आशेचा किरण आहे, असेही त्या म्हणाल्या.

ठाकरेंना सोडून भाजपात आलेल्या नगरसेवकांनी भाजपांतर्गत धुसफुसिला दिले खणखणीत उत्तर

धनवडे म्हणाले, जरी शिवसैनिक होतो तरी मी स्वर्गीय गिरीश बापटांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता

आमचा काल पुण्यात ४ हजार भाजपा कार्यकर्त्यांच्या,प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्कार हेच मोठे स्वागत

पुणे-

दिल्लीत गांधींना नाही तर उद्धव ठाकरेंचा केजरीवालांना पाठींबा

दिल्ली-दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय पातळीवर ‘I.N.D.I.A.’ आघाडी एकत्र नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या आधी देखील उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील केजरीवाल यांच्या विरोधातील भूमिकेला विरोध दर्शवला होता. तसेच दैनिक सामनाच्या माध्यमातून देखील काँग्रेसचे कान टोचण्यात आले होते.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 जागांसाठी एकाच टप्प्यात पाच फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या वेळी दिल्लीमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्या तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दिल्लीमध्ये एकही जागा मिळाली नव्हती. तर केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पूर्ण बहुमत मिळवले होते. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या संदर्भातील माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. दिल्लीच्या निवडणुकीत सपा देखील आम आदमी पक्षाचा प्रचार करणार आहे. त्या पाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने देखील असाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीत एकही खाते उघडू न शकणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत देखील याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस आणि आपमध्ये युती झाली असती तर बरे झाले असते, पण कदाचित तसे होताना दिसत नाही. दिल्लीत काय चालले आहे. ते महाराष्ट्रात बसून सांगणे कठीण आहे, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील म्हटले आहे. या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘दिल्लीची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. काँग्रेसही निवडणूक लढवत आहे. मला वाटते कदाचित तिथे केजरीवाल जिंकतील. महाराष्ट्रात तीन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. कराड दक्षिणमधून ते निवडणूक रिंगणात उतरले होते. या जागेवरून भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला होता.

स्थानिक स्वराज्य संस्थांवरील ‘प्रशासकीय राज’ हटवा-डॉ.हुलगेश चलवादी 

पुणे:-देशाच्या लोकशाहीचा मुलगाभा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (स्थास्वसं) खोळंबल्या आहेत. गेल्या दोन ते चार वर्षांपासून राज्यातील अनेक महानगर पालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका न झाल्याने येथे ‘पंचायती राज’ ऐवजी ‘प्रशासन राज’ सुरू आहे.स्थानिक जनक्षोभ त्यामुळे वाढत असून प्रशासकीय राज हटवण्याचे आवाहन करीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहिर करण्याची मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी आज, गुरूवारी (ता.९) केली आहे.

वस्ती, गल्लीबोळासह महानगराच्या विकासाचा मुख्य आराखडा अंमलात आणण्याची जबाबदारी ‘स्थास्वसं’वर असते. ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ या विचारानूसार बहुजनांसह सर्वजनांना सुखी करण्यासाठी त्यांच्या स्थानिक समस्यांची सोडवणूक तात्काळ होण्याची गरज असते.पंरतु,निवडणूका रखडल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार जनतेकडून हिरावून घेतला असल्याचे चित्र उभे झाले असल्याची खंत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली.

प्रशासनाला लोकप्रतिनिधींची जोड मिळाल्यावरच विकासाला वेग मिळता.सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागाशिवाय शक्य नाही. नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य खऱ्या अर्थाने लोकभावना प्रशासनापर्यंत पोहचवत असतात. अशात लोकप्रतिनिधीच नसल्याने लोकभावना, त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहचत नाहीत. नागरिकांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

विविध कारणांमुळे आणि कायदेशीर अडचणींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विलंब होत आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार, अशा निवडणुका सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ पुढे ढकलता येऊ शकत नसल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.सर्वोच्च न्यायालयात २२ जानेवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी आहे. ओबीसी आरक्षण अंमलबजावणीसंदर्भात सध्या अनेक अडचणी आहेत. राज्य सरकारने त्यामुळे न्यायालयात योग्य बाजू मांडून निवडणुकीचा मार्ग सुकर करावा,अशी मागणी डॉ.चलवादी यांनी केली आहे. 

आपल्या माणसांनी भरलेल्या घराची, दाभाडे कुटुंबाची इरसाल गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला!

‘फसक्लास दाभाडे’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभात धमाल केल्यानंतर आता दाभाडे कुटुंब ट्रेलर लाँचच्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटीला आले. हा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला असून यावेळी दाभाडे कुटुंबियांकडून मीडियासह सगळ्या प्रेक्षकांना आग्रहाचे निमंत्रण होते. या दिमाखदार सोहळ्यात दाभाडेंनी ट्रॅक्टरमधून जबरदस्त एंट्री करत सर्वांसोबत धमाल केली. या सोहळ्याला क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे, तृप्ती शेडगे, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यासह दाभाडे कुटुंबाचा भाग असलेले अनेक जण उपस्थित होते.

हेमंत ढोमेचा चित्रपट म्हंटला की त्यात धमाल ही असतेच. कौटुंबिक विषय अतिशय हलक्याफुलक्या, मजेदार आणि तितक्याच प्रभावीपणे मांडण्यात त्याचा हातखंडा आहे. हा चित्रपटही त्यापैकीच एक आहे. ‘फसक्लास दाभाडे’च्या घोषणेपासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. त्यात आता ट्रेलरने भर टाकली आहे. ट्रेलरमध्ये दाभाडे कुटुंबातील सदस्यांची आंबट गोड केमिस्ट्री पाहायला मिळत असून तायडी, सोनू आणि पप्पू यांच्यातील मजेदार नोकझोक दिसत असतानाच त्यांच्यातील भावनिक नातंही उलगडत आहे. विनोदासह हृदयस्पर्शी भावनांचा संगम असलेली दाभाडे कुटुंबाची कहाणी पाहाण्यासाठी प्रेक्षक आता खूप उत्सुक आहेत.

चित्रपटाबद्दल निर्माते भूषण कुमार म्हणतात, “ हेमंत ढोमेने यापूर्वी मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार, सुपरहिट चित्रपट दिले आहेत. प्रेक्षकांची कथेसोबत नाळ जोडणारे चित्रपट तो बनवतो. त्यामुळेच त्याचे चित्रपट प्रेक्षकांना जवळचे वाटतात. ‘फसक्लास दाभाडे’मधील प्रत्येक व्यक्तिरेखा अनेकांना आपल्या घरातील, आजूबाजूची वाटेल. या टीमसोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता. ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सोहळाही अतिशय कमाल झाला असून ‘फसक्लास दाभाडे’ची धमाकेदार एंट्री पाहून चित्रपट देखील फर्स्टक्लास असेल याचा अंदाज प्रेक्षकांना आला असेलच. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाभाडे कुटुंबाच्या प्रवासाची झलक पाहायला मिळतेय. हा कौटुंबिक प्रवास सर्वांना आपलासा वाटेल याची खात्री आहे.”

निर्माते आनंद एल राय म्हणतात, “या चित्रपटात नात्यांची गुंफण आणि संघर्ष अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने सादर केला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला असून हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचे मन जिंकेल. एखादा चित्रपट तेव्हाच यशस्वी होतो, जेव्हा सगळे कलाकार एकत्र मनापासून आणि आपले समजून काम करतात. असाच प्रत्यय ‘फसक्लास दाभाडे’च्या दरम्यान आम्हाला आला. पडद्यावर हे एक कुटुंब दिसत असले तरी पडद्यामागेही त्यांची केमिस्ट्री तितकीच छान होती. त्याचाच सकारात्मक परिणाम तुम्हाला पडद्यावर दिसणार आहे. नवीन वर्षात एक जबरदस्त चित्रपट पाहिल्याचा आनंद प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर चित्रपटगृहातून बाहेर पडताना असेल.”

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “ हा चित्रपट माझ्या गावात माझ्या मातीत शुट झाला असल्याने माझ्या खूप जवळचा आहे. आपल्या गावात आपला चित्रपट शुट करावा, असे खूप मनात होते आणि अखेर हे स्वप्न ‘फसक्लास दाभाडे’च्या निमित्ताने पूर्ण झाले. या माझ्या कुटुंबात भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय हे सुद्धा सहभागी झाल्याचा मला आनंद आहे. सगळ्यांचेच मनापासून आभार. या चित्रपटात भावंडांची मस्ती आणि त्यांच्या कुटुंबाचं प्रेम पाहायला मिळेल तसेच दाभाडे कुटुंबाची ही कथा प्रेक्षकांना त्यांच्या रोजच्या जीवनाशी कनेक्ट होईल. हा चित्रपट प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारा आहे तर कधी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक करणारा सुद्धा आहे.”

‘फसक्लास दाभाडें’चे हे कुटुंब २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.

महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन

मुंबई  : कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत आज कांदिवली पूर्व येथे महिलांसाठी भारतातील पहिल्या अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन करण्यात आले. कांदिवली पूर्व येथील हनुमान नगर येथे स्नानगृह उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

मंत्री श्री. लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्नानगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. झोपडपट्टीमधील भगिनींना स्नानगृहांचा अतिशय फायदा होणार असून, यामुळे स्वच्छ भारत घडवण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे जात आहोत, असे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले. कांदिवली विधानसभा क्षेत्रात १२ तासांसाठी हे फिरते स्नानगृह महिलांना वापरासाठी सुरू राहील.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, “झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी स्नानगृहाची समस्या अतिशय त्रासदायक ठरते, हे आम्ही जाणतो. तो त्रास कमी करण्यासाठीच आम्ही जिल्हा नियोजन समितीमार्फत भारतात फिरत्या स्नानगृहाचा पहिला प्रकल्प राबवला आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मंगल प्रभात लोढा यांनी महिलांसाठी फिरते स्नानगृह असावे यासाठी कार्य सुरू केले होते. त्यांच्या संकल्पनेप्रमाणे एका बसमध्ये अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले स्नानगृह उभारण्यात आले. या बसमध्ये एकूण ५ स्नानगृहे आहेत, शॉवर आहेत, २१०० लिटर इतकी पाण्याची क्षमता आहे, बेसिन आणि इतर आवश्यक सुविधा आहेत. विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना आपले कपडे वाळवण्यासाठी २ ड्रायर मशीन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्युत पुरवठ्यासाठी येथे जनरेटर्सचा वापर करण्यात येणार आहे.

पाण्याचा आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच योग्य नियोजनातून सर्वांना स्नानगृहाचा वापर करण्याची संधी मिळावी यासाठी या स्नानगृहात महिला कर्मचारी सुद्धा नियुक्त करण्यात येणार आहेत.

काकांचे 7 खासदार फोडून केंद्रात मंत्रिपद घेण्याचा अजित पवारांचा प्रयत्न, चर्चेने सुप्रिया संतापल्या अन् थेट तटकरेंना झापले ?

मुंबई – शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राज्यात आठ खासदार आहेत. त्यापैकी ७ खासदारांना फोडून केंद्रात कॅबिनेट पद मिळवण्यासाठी अजित पवारांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. थेट बाप-लेकींना सोडून दादांच्या राष्ट्रवादीत सामील होण्याचे प्रलोभन देण्यात आल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. दिल्लीत खासदारांच्या भेटी होतात, पण असा कोणताही प्रयत्न केला गेला नसल्याचे स्पष्टीकरण खा. सुनील तटकरे यांनी दिले आहे. आजपर्यंत बाप-लेकी हा शब्द उच्चारला नसल्याचेही तटकरे यांनी सांगितले. दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार अमर काळे यांनी सातही खासदारांशी सोनिया दुहान यांनी संपर्क केल्याचा गौप्यस्फोट केल्याने पुन्हा अनेक चर्चांना उधाण आले आहे.सात खासदारांना फोडण्याच्या चर्चेमुळे सुप्रिया सुळे यांनी संतापून थेट प्रफुल्ल पटेल यांना फोन केला. सुनील तटकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली. पुन्हा तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहात का, असा जाबच सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तिरुपतीमध्ये वैकुंठद्वार दर्शनमचे टोकन घेण्यासाठी चेंगराचेंगरी:6 भक्तांचा मृत्यू

आंध्र मधील ख्यातनाम, जगप्रसिद्ध अशा
तिरुपती मंदिरापासून २२ किमीवरील विष्णू निवासम येथे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर ४० वर भाविक जखमी झाले, मृतांत ५ महिला आहेत. यातील एका महिलेची ओळख पटली असून ती तामिळनाडूची रहिवासी असून मल्लिका असे नाव आहे.वैकुंठ एकादशी आणि वैकुंठद्वार दर्शनाचे टोकन घेण्यासाठी सुमारे चार हजार भाविक येथे जमले होते. हे टोकन दरवर्षी चालणाऱ्या भगवान तिरुपतीच्या नऊ दिवसांच्या विशेष उत्सवासाठी दिले जातात, जेणेकरून दर्शन व्यवस्थेत अडथळा येऊ नये. हा महोत्सव १० जानेवारीला पहाटे ४.३० वाजता सुरू होणार असून १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. सध्या दर्शनापूर्वीच या दुर्घटनेने तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या (टीटीडी) व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जखमींना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती टीटीडीचे प्रमुख बी.आर. नायडू यांनी दिली.

रांग लावण्यासाठी धावले, एकमेकांना चिरडत गेले

टीटीडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोकनसाठी वैकुंठ गेटवर गर्दी जमलेली होती. दरम्यान, पोलिसांनी तिरुपतीमध्ये वैकुंठद्वार दर्शनमचे टोकन घेण्यासाठी चेंगराचेंगरी:6 भक्तांचा मृत्यू, बालाजी मंदिरापासून 22 किमी दूर दुर्घटना, 4 हजार भाविकांची गर्दी

तिरुपती2 तासांपूर्वी

आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरापासून २२ किमीवरील विष्णू निवासम येथे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर ४० वर भाविक जखमी झाले, मृतांत ५ महिला आहेत. यातील एका महिलेची ओळख पटली असून ती तामिळनाडूची रहिवासी असून मल्लिका असे नाव आहे.

वैकुंठ एकादशी आणि वैकुंठद्वार दर्शनाचे टोकन घेण्यासाठी सुमारे चार हजार भाविक येथे जमले होते. हे टोकन दरवर्षी चालणाऱ्या भगवान तिरुपतीच्या नऊ दिवसांच्या विशेष उत्सवासाठी दिले जातात, जेणेकरून दर्शन व्यवस्थेत अडथळा येऊ नये. हा महोत्सव १० जानेवारीला पहाटे ४.३० वाजता सुरू होणार असून १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. सध्या दर्शनापूर्वीच या दुर्घटनेने तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या (टीटीडी) व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जखमींना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती टीटीडीचे प्रमुख बी.आर. नायडू यांनी दिली.

रांग लावण्यासाठी धावले, एकमेकांना चिरडत गेले

टीटीडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोकनसाठी वैकुंठ गेटवर गर्दी जमलेली होती. दरम्यान, पोलिसांनी भाविकांना बैरागी पट्टिडा पार्कवर रांगा लावण्यास सांगितले. वैकुंठ गेटबाहेरून जमाव उद्यानाकडे धावला. त्यामुळे एकच धावपळ सुरू झाली. लोक एकमेकांवर पडले. यामुळे अनेकांचा श्वास गुदमरला. मल्लिका नावाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

वैकुंठ एकादशी आणि वैकुंठद्वार दर्शनाचे टोकन घेण्यासाठी सुमारे चार हजार भाविक येथे जमले होते. हे टोकन दरवर्षी चालणाऱ्या भगवान तिरुपतीच्या नऊ दिवसांच्या विशेष उत्सवासाठी दिले जातात, जेणेकरून दर्शन व्यवस्थेत अडथळा येऊ नये. हा महोत्सव १० जानेवारीला पहाटे ४.३० वाजता सुरू होणार असून १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. सध्या दर्शनापूर्वीच या दुर्घटनेने तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या (टीटीडी) व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जखमींना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती टीटीडीचे प्रमुख बी.आर. नायडू यांनी दिली.

आय टी कंपन्यांतील महिला नोकरदारांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घ्या

पुणे:- पुणे शहरातील विविध IT कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी काम करत आहेत. नुकतीच खराडी येथील आय टी कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याचा तिच्या सोबत काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांनेच अत्यंत निर्घृणपणे खुन केल्याची घटना घडली आहे. ह्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शिष्टमंडळाच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त श्री.अमितेशकुमार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या

1) आपण शहरातील सर्व IT कंपन्यांना तातडीने स्वतंत्र महिला कर्मचारी सुरक्षा विषयक धोरण तयार करण्याबाबत निर्देश द्यावेत.

2) या कंपन्यांमधील कर्मचारी सुटण्याच्या वेळी संबंधित परिसरात महिला पोलीसांची गस्त सुरु करावी.

3) सर्व कंपन्यांच्या आवारातील CCTV यंत्रणेचे ॲाडीट करण्यात यावे व हे कॅमेरे चालू स्थितीत आहेत का? त्यांची संख्या पुरेशी आहे का? ते योग्य ठिकाणी लावले गेले आहेत का? याचा तपास करण्यात यावा.

4) या सर्व कंपन्यांना त्यांच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेमध्ये पूर्ण वेळ महिला सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे निर्देश द्यावेत.

तरी आमची आपणांस या निवेदनाद्वारे नम्र विनंती आहे की आपण वरील मागण्यांबाबत सकारात्मक विचार करुन याबाबत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी
या बाबत ठोस पावले उचलण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले या शिष्टमंडळात महिला शहराध्यक्ष हर्षदा फरांदे, प्रियंका शेंडगे शिंदे स्वाती मोहोळ, गायत्री खडके नेहा गोरे अश्विनी कोसरीकर,मनीषा मोरे आणि खुशी लाटे यांचा समावेश होता

राज्यातील लोककलाकारांचे सर्व्हेक्षण व्हावे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी.


मुंबई (प्रतिनिधी )- शासन दरबारी कुठे नोंद नसलेल्या राज्यातील दुर्लक्षित आणि उपेक्षित लोककलाकारांचे सर्व्हेक्षण व्हावे. अशी जोरदार मागणी लोककला क्षेत्रातील तज्ञानी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे.

सध्या महाराष्ट्रात अंदाजे पंधरा हजार कलावंत आपल्या कलाच्या उपजिविकेवर जगत आहेत. मात्र शासन दरबारी त्याची कुठेच नोंद नाही. तमाशा -लावणी,भारूड दशावतार, कीर्तन, खडीगंमत,शाहिरी, झाडीपट्टी, वासुदेव,जागरण गोंधळ, वही गायन,जाखडी नृत्य, दंडार, सर्कस,अशा विविध प्रमुख असणाऱ्या कला क्षेत्रातील काम करणारे कलाकार आज ही विविध योजनेपासून उपेक्षित आहेत. त्यांच्याकडे शासनाच्या योजना वेळेत पोहचत नाही. म्हणूनच सांस्कृतिक कार्य विभागाने या लोककलाकारांचे सर्व्हेक्षण करावे. अन त्यांना ओळखपत्र दयावे. अशी जोरदार मागणी सध्या कला क्षेत्रातून होत आहे.
त्यानुसार राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना एका लेखी पत्राच्या माध्यमातून सदर मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने लाखो रुपये खर्च करून राज्यातील लोककलेचे सर्व्हेक्षण केले आहे. परंतु हे काम समाधानकारक झाले नाही.आता पर्यत संपूर्ण राज्यातील सुमारे 85लोककला प्रकाराचे सर्व्हेक्षण झाले आहे. अशी माहिती लोककलेचे अभ्यासक खंडूराज गायकवाड यांनी दिली.
राज्य सरकारने जर लोककलाकारांचे सर्व्हेक्षण केले तर निश्चितच सांस्कृतिक कार्य विभागाला कलाकारांसाठी नवीन योजना अंमलात आणायला सोपे जाईल. असे त्यांचे मत आहे.
सध्या मानधन योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 37 हजार जेष्ठ कलावंतांची अधिकृत नोंद सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे असल्याचे कळते.