·कंपनीला 6500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या अंतिम बोली मिळाल्या, ज्यावरून 4100 कोटी रुपयांच्या बेस इश्यूवर 60% जास्त सबस्क्रिप्शन दिसले.
·जास्त मागणी लक्षात घेता, कंपनीने 900 कोटी रुपयांच्या ग्रीनशू पर्यायाचा पूर्णपणे वापर करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे 5,000 कोटी आले.
·आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएफ, आदित्य बिर्ला सन लाईफ एमएफ, कोटक महिंद्रा एमएफ, स्टार हेल्थ इन्शुरन्स, रिलायन्स इन्शुरन्स, असीम इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स आणि लार्सन अँड टुब्रो हे प्रमुख गुंतवणूकदार आहेत.
· 3,400कोटी रुपयांच्या मोठ्या-किमतीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनी खासगी क्रेडिट सुविधेच्या माध्यमातून एनसीडी रकमेचा वापर करेल. तर उर्वरित रक्कम कॅपेक्स आणि अन्य कॉर्पोरेट गरजांसाठी ठेवली जाईल : स्रोत
मायनिंग क्षेत्रातील कंपनी वेदांत लिमिटेड त्यांच्या असुरक्षित नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (एनसीडी) इश्यूद्वारे उभारलेल्या ₹5000 कोटी रुपयांच्या निधीचा वापर ₹3,400 कोटींचे मोठ्या रकमेचे कर्ज फेडण्यासाठी करण्याच्या विचारात आहे. ज्यामुळे त्यांचा वार्षिक व्याजाचा भार किमान ₹350 कोटींनी कमी होईल, असे या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीचे म्हणणे आहे. उर्वरित निधी अन्य कॅपेक्स गरजा, कॉर्पोरेट उद्देश आणि विद्यमान कर्जांची परतफेड किंवा प्रीपेमेंटसाठी वापरला जाईल, असे त्या व्यक्तीने सांगितले.
4 जून रोजी पूर्ण झालेल्या एनसीडी ऑफरला प्रचंड प्रतिसाद मिळून त्यात ₹6,555 कोटींच्या जास्त बोली आल्या, ज्यामुळे त्यांच्या बेस इश्यूच्या ₹4100 कोटींपेक्षा 60% जास्त सबस्क्रिप्शन झाले. यामुळे कंपनीने ₹900 कोटींच्या ग्रीनशू पर्यायाचा वापर केला, ज्यामुळे एकूण ₹5000 कोटी उभे राहिले.
या इश्यूला म्युच्युअल फंड, विमा कंपन्या, वित्त कंपन्या, कॉर्पोरेट्स आणि एनबीएफसीसह सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांकडून मोठी मागणी आली. प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएफ, आदित्य बिर्ला सन लाईफ एमएफ, कोटक महिंद्रा एमएफ, एचएसबीसी एमएफ, अॅक्सिस एमएफ, स्टार हेल्थ इन्शुरन्स, रिलायन्स इन्शुरन्स, असीम इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स, अल्फा अल्टरनेटिव्ह्ज आणि लार्सन अँड टुब्रो यांचा समावेश असल्याचे, वर उल्लेख केलेल्या व्यक्तीने सांगितले. असुरक्षित एनसीडीचा कूपन दर 2.5 वर्षांच्या सीरिजसाठी 9.31%, 3 वर्षांच्या मालिकेसाठी 9.45% आणि 2 वर्षांच्या मालिकेसाठी 8.95% आहे.
वेदांतने त्यांच्या संभाव्य गुंतवणूकदारांना मजबूत कमाई, मोफत रोख प्रवाह आणि चालू वाढीचे प्रकल्प, मजबूत बॅलन्स शीटसह उद्धृत केले.
2025 मध्ये कंपनीने जारी केलेले हे दुसरे अनसिक्युअर्ड एनसीडी आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये, कंपनीने 9.40-9.50 टक्के कूपन दराने अनसिक्युअर्ड नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्सद्वारे 2,600 कोटी रुपये उभारले, ज्यामुळे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, कोटक, निप्पॉन, आदित्य बिर्ला सन लाईफ आणि अॅक्सिससह संस्थात्मक गुंतवणूकदार आकर्षित झाले.
या एनसीडीला क्रिसिलकडून ‘एए’ रेटिंग मिळाले असून त्याने ते ‘रेटिंग वॉच विथ डेव्हलपिंग इम्प्लिकेशन्स’ वर ठेवले आहे. असे करताना, रेटिंग एजन्सीने वेदांताच्या आर्थिक वर्ष 26 च्या EBITDA मध्ये अपेक्षित सुधारणा, डिलीव्हरेजिंगसाठी प्रमोटर्सची वचनबद्धता, वेदांत रिसोर्सेसमधील पुनर्वित्त जोखमीत लक्षणीय घट, विविध कमोडिटीजमध्ये कंपनीची उपस्थिती आणि कंपनीची आर्थिक लवचिकता यांचा उल्लेख केला आहे.
रेटिंग एजन्सीने आपल्या निष्कर्षात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2026 मध्ये वेदांताचा EBITDA आणखी सुधारण्याची अपेक्षा आहे, जरी किंमतींमध्ये 5-10% घट झाली असली तरी, अल्युमिनियम व्यवसायात क्षमता वाढ आणि ऑपरेटिंग कार्यक्षमता सुधारण्यासाठी चालू भांडवली खर्च (कॅपेक्स) पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. “Ebitda मधील ही अपेक्षित वाढ मध्यम कालावधीत चालू भांडवली खर्च तसेच नियोजित कर्ज परतफेडीला समर्थन देईल,” असे रेटिंग एजन्सीने म्हटले आहे.
बहुराज्यीय कारवाईत 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बनावट कृषी रसायने जप्त
मुंबई-बनावट कीटकनाशकांच्या रॅकेटमधील प्रमुख आरोपींपैकी राजू चेचानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र चेचानी याला तेलंगणा पोलिसांनी एका कारवाईदरम्यान अटक केली. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने केलेल्या या कारवाईत पोलिसांनी 2 मे 2025 रोजी राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्यातील बस्सी गावातील फार्महाऊसवरून राजू याला अटक केली.
या कारवाईमुळे भारतातील कृषी क्षेत्राला असलेला बनावट कीटकनाशकांचा वाढता धोका उघडकीस आला आहे. या अशा लोकांकडून बनावट कीटकनाशकांच्या माध्यमातून निष्पाप शेतकऱ्यांना वारंवार फसवले जाते. एकदम खऱ्या ब्रँडसारखी पॅक केलेली ही बनावट रसायने शेतीसाठी अत्यंत हानिकारक असतात. त्यांच्या वापरामुळे तसेच त्यातील घातक घटकांमुळे अनेकदा पिकांचे नुकसान होते आणि उत्पादनात घट होते. नुकत्याच झालेल्या या अटकेमुळे अशा प्रकाराला आळा बसेल अशी आशा व्यक्त होते आहे. अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या बनावट कृषी रसायनांची ही पुरवठा साखळी तुटेल, अशी अपेक्षा आहे.
चेचानीवर आरोप आहे की, तो सात वर्षांहून अधिक काळ असा अवैध व्यवसाय आणि बेकायदेशीर नेटवर्क चालवत होता. 11 हून अधिक राज्यांमध्ये असलेल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्याने संपूर्ण भारतात बनावट कीटकनाशके तयार आणि वितरित केली. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथे कार्यरत असलेल्या सहकाऱ्यांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे प्रतिष्ठित कृषी रसायन कंपन्यांचे लेबल लावलेली बनावट उत्पादने त्याने पुरवली.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बस्सी येथे चेचानीचे महेश्वरी सीड्स अँड पेस्टिसाइड्स नावाने एक दुकान आहे. नियमांचे उल्लंघन करत पॅकेजिंग मटेरियल आणि तयार बनावट उत्पादनांचा तो कथितरित्या प्रमुख पुरवठादार असल्याचे समजते.
हैदराबादमधील नियमबाह्य काम करणाऱ्या ई राजेशच्या गोदामात जुलै 2024 मध्ये बनावट कीटकनाशके सापडल्यानंतर कीटकनाशक कायद्यांतर्गत एलबी नगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआर क्रमांक 831/2024 च्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.
अधिक तपासात अन्य राज्यांमध्ये चेचानीविरुद्ध दाखल केलेले अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. यामुळे त्याच्या कारभाराची व्याप्ती आणि तसेच नियमबाह्य कामांमध्ये असलेला त्याचा समावेश अधोरेखित होतो आहे.
आज उद्घाटन करण्यात आलेले भव्य पायाभूत सुविधा प्रकल्प जम्मू आणि काश्मीरच्या विकास प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल – पंतप्रधान
आपण भारत मातेचे वर्णन नेहमीच श्रद्धापूर्वक काश्मीर ते कन्याकुमारी असे केले, आज आपल्या रेल्वे नेटवर्कमध्येही हे वास्तव बनले आहे: पंतप्रधान
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग प्रकल्प हा नवीन, सक्षम जम्मू-काश्मीरचे प्रतीक असून ही भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा जयघोष आहे – पंतप्रधान
चिनाब आणि अंजी पूल जम्मू-काश्मीरच्या समृद्धीचे प्रवेशद्वार म्हणून काम करतील: पंतप्रधान
जम्मू आणि काश्मीर हे भारताच्या मुकुटातील मौल्यवान रत्न आहे : पंतप्रधान
दहशतवादापुढे भारत झुकणार नाही, जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांनी आता दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला आहे: पंतप्रधान
पाकिस्तान जेव्हा ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकेल, तेव्हा त्याला आपल्या लज्जास्पद पराभवाचे स्मरण होईल : पंतप्रधान
https://www.youtube.com/watch?v=7a5ikKw5Nvo&t=4s
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे 46,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. शूर वीर जोरावर सिंग यांच्या भूमीला अभिवादन करताना ते म्हणाले की आजचा कार्यक्रम हा भारताची एकता आणि दृढनिश्चयाचा भव्य उत्सव आहे. माता वैष्णो देवीच्या आशीर्वादाने, काश्मीर खोरे आता भारताच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडले गेले आहे, असे मोदी म्हणाले. “आपण नेहमीच काश्मीर ते कन्याकुमारी, असे भारत मातेचे वर्णन केले आहे, आपल्या रेल्वे नेटवर्कमध्येही हे वास्तव बनले आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लाईन प्रकल्प हे केवळ एक नाव नसून, जम्मू आणि काश्मीरच्या नवीन सामर्थ्याचे प्रतीक आहे आणि भारताच्या वाढत्या क्षमतेचा पुरावा आहे, यावर त्यांनी भर दिला. या भागात रेल्वे पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, त्यांनी चिनाब आणि अंजी रेल्वे पुलांचे उद्घाटन केले आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला, ज्यामुळे जम्मू-काश्मीरमधील कनेक्टिव्हिटी वाढेल.
याव्यतिरिक्त, मोदी यांनी जम्मूमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी देखील केली, ज्यामुळे या प्रदेशातील आरोग्य सुविधा मजबूत करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला पुष्टी मिळाली. 46,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये विकासाला गती मिळेल, प्रगती आणि समृद्धी वाढेल असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी विकास आणि परिवर्तनाच्या या नवीन युगासाठी शुभेच्छा दिल्या आणि जनतेचे अभिनंदन केले.
जम्मू-काश्मीरमधील अनेक पिढ्यांनी रेल्वे कनेक्टिव्हिटीचे स्वप्न पाहिले होते, हे अधोरेखित करताना मोदी म्हणाले की, आज ते स्वप्न खरे झाले आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, सातवी-आठवीतील विद्यार्थी असल्यापासून अब्दुल्ला हा प्रकल्प पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत होते. . या बहुप्रतिक्षित आकांक्षेची पूर्तता जम्मू आणि काश्मीरमधील लाखो लोकांसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे, जो कनेक्टिव्हिटी मधील सुधारणा आणि प्रगतीचा मार्ग प्रशस्त करतो, असे मोदी यांनी नमूद केले.
आपल्या सरकारसाठी ही सन्मानाची गोष्ट आहे, कारण त्यांच्या कार्यकाळात या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली आणि आता तो यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे, असे सांगून, कठीण भूप्रदेश, अत्यंत प्रतिकूल हवामानाची स्थिती आणि पर्वतांमध्ये कोसळणाऱ्या दरडी, यासारख्या संकटांमुळे हा प्रकल्प अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक बनल्याचे ते म्हणाले. मात्र, आपल्या सरकारने सातत्याने आव्हानांना तोंड देणे आणि त्यावर निर्धाराने मात करणे पसंत केल्याचे त्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेले सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करू शकतील असे असंख्य पायाभूत सुविधा प्रकल्प या वचनबद्धतेचे उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी नुकतेच उद्घाटन केलेला सोनमर्ग बोगदा आणि चिनाब पूल आणि अंजी पुलावरून प्रवास करण्याचा आपला अनुभव उल्लेखनीय टप्पा होता, असे त्यांनी नमूद केले. मोदी यांनी भारतातील अभियंते आणि कामगारांच्या अभियांत्रिकी कौशल्याचे आणि अढळ समर्पणाची प्रशंसा केली, आणि जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज, चिनाब ब्रिज, भारताच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक असल्याचे नमूद केले . आयफेल टॉवर पाहण्यासाठी लोक पॅरिसला जात असले तरी चिनाब पुलाच्या उंचीने त्याला मागे टाकले आहे, त्यामुळे हे केवळ पायाभूत सुविधांचे मोठे यश नसून, पर्यटनाचे नवे आकर्षण केंद्र देखील बनले आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. त्याचप्रमाणे, पंतप्रधानांनी अंजी पुलाचे वर्णन अभियांत्रिकी चमत्कार म्हणून केले, जो भारतातील पहिला केबल-समर्थित रेल्वे पूल आहे. या वास्तू केवळ स्टील आणि काँक्रीट नसून, खडकाळ पीर पंजाल पर्वतांमध्ये उभे असलेले भारताच्या सामर्थ्याचे जिवंत प्रतीक आहेत, असे त्यांनी सांगितले.
हे यश भारताच्या विकसित देशासाठीच्या दूरदृष्टीचे प्रतिनिधित्व करते असे घोषित करून पंतप्रधान मोदी म्हणाले की यातून हेच सिद्ध होते की भारताचे प्रगतीचे स्वप्न जेवढे भव्य आहे तेवढीच त्याची लवचिकता, कर्तुत्व आणि निर्धार देखील भव्य आहे. इतर सर्वांसह, शुद्ध हेतू आणि अथक समर्पण हीच भारताच्या परिवर्तनामागील प्रेरक शक्ती आहे यावर त्यांनी अधिक भर दिला.
चिनाब पूल आणि अंजी पूल हे दोन्ही जम्मू आणि काश्मीरच्या भरभराटीसाठीचे उत्प्रेरक म्हणून काम करतील यावर अधिक भर देत पंतप्रधान म्हणाले, “हे महत्त्वपूर्ण प्रकल्प येथील पर्यटनाला चालना देण्यासोबतच व्यवसाय आणि उद्योगांसाठी नव्या संधी निर्माण करून अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांसाठी देखील लाभदायक ठरतील.” जम्मू आणि काश्मीर यांच्यातील सुधारित रेल्वे सुविधेमुळे स्थानिक उद्योजकांसाठी नवी कवाडे खुली होऊन आर्थिक वृद्धीला चालना मिळेल ही बाब त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की आता काश्मीरची सफरचंदे भारतभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कमी खर्चात पोहोचू शकतील आणि त्यातून व्यापार उदीम अधिक कार्यक्षम होईल. तसेच, सुका मेवा आणि काश्मीरच्या सुप्रसिध्द पश्मिना शाली आणि इतर पारंपरिक हस्तकलेच्या वस्तू आता देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सहजपणे पाठवता येतील आणि त्यायोगे या भागातील कारागीरांच्या उद्योगाला अधिक बळकटी मिळेल. पंतप्रधान म्हणाले की सुधारलेल्या संपर्क सुविधांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील जनतेसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि त्यांना भारताच्या विविध भागांमध्ये पोहोचण्यासाठी अधिक सुलभतेने प्रवास करता येईल.
पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी संगल्दनमधील विद्यार्थ्याने केलेली एक हृदयस्पर्शी टिप्पणी सामायिक केली. या विद्यार्थ्याने सांगितले की आतापर्यंत फक्त जे लोक त्यांच्या गावाबाहेर प्रवास करून आले होते त्यांनीच खऱ्या आयुष्यात रेल्वे गाडी पाहिली होती. बहुतांश गावकऱ्यांनी व्हिडिओमध्येच रेल्वे पाहिली असून आता लवकरच खरी रेल्वेगाडी त्यांच्या डोळ्यांसमोरून धावणार यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. येथील अनेक रहिवासी नवीन कनेक्टीव्हीटीबद्दल उत्सुक असून त्यांनी गाडीचे वेळापत्रक पाठ करायला सुरुवात केली आहे हे देखील पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. आता यापुढे रस्ते खुले असतील की बंद राहतील याचा निर्णय हवामानावर अवलंबून नसेल असे सांगणाऱ्या तरुणीची मार्मिक टिप्पणी त्यांनी अधोरेखित केली. ही नवी रेल्वे सेवा लोकांना सर्व मोसमांमध्ये मदत करेल. “भारतमातेचा मुकुट असलेला जम्मू आणि काश्मीर हा भाग या प्रदेशाची प्रचंड ताकद आणि सौंदर्य यांचे प्रतीक ठरणाऱ्या लखलखत्या हिऱ्यांनी सजला आहे असे वर्णन करत पंतप्रधान मोदी यांनी तेथील प्राचीन संस्कृती, परंपरा, अध्यात्मिक जाणीव, रोमहर्षक निसर्गदृश्ये, औषधी वनस्पती, फुललेल्या बागा आणि चैतन्यमय तरुण प्रतिभा यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की हे सर्व घटक भारताच्या मुकुटातील मौल्यवान हिऱ्यांसारखे चमकत आहेत. गेली अनेक दशके जम्मू आणि काश्मीरला भेट देत असलेल्या पंतप्रधानांनी या प्रदेशाच्या क्षमतेविषयी त्यांना असलेल्या सखोल ज्ञानाला दुजोरा दिला आणि जम्मू आणि काश्मीरच्या जनतेची भरभराट सुनिश्चित करत या भागाच्या सातत्यपूर्ण विकासासाठी आणि उत्थानाप्रति त्यांच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.
“जम्मू आणि काश्मीर हा दीर्घकाळापासून भारताच्या शैक्षणिक तसेच सांस्कृतिक वारशाचा आधारस्तंभ आहे,” असे पंतप्रधान ठामपणे म्हणाले. भारत स्वतःला जागतिक पातळीवरील ज्ञानाचे केंद्र म्हणून प्रस्थापित करत असताना, या परिवर्तनात जम्मू आणि काश्मीरच्या वाढत्या योगदानाला मोठे महत्त्व आहे असे ते पुढे म्हणाले. केंद्रीय विद्यापीठांसह, या भागातील शैक्षणिक उत्कृष्टतेला मजबूत करणाऱ्या आयआयटी, आयआयएमएस, एम्स आणि एनआयटी सारख्या प्रमुख संस्थांच्या जम्मू आणि श्रीनगरमधील उपस्थितीकडे त्यांनी निर्देश केला. तसेच तेथील नवोन्मेष आणि शिक्षणाच्या संधींमध्ये भर घालणाऱ्या संशोधन परिसंस्थेचा विस्तार देखील त्यांनी लक्षात घेतला.
पंतप्रधानांनी या भागात आरोग्य सुविधा क्षेत्रात झालेल्या उल्लेखनीय प्रगतीवर अधिक भर देत अलीकडच्या वर्षांमध्ये स्थापन झालेल्या दोन राज्यस्तरीय कर्करोग उपचार संस्थांचा उल्लेख केला. गेल्या 5 वर्षांत जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक नवी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झाली असून रुग्ण तसेच वैद्यकीय क्षेत्रातील होतकरू विद्यार्थी अशा दोन्हींना त्यांचा मोठा फायदा झाला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा 500 वरुन वाढवून 1,300 करण्यात आल्या असून वैद्यकीय शिक्षण अधिक सुलभतेने उपलब्ध होण्याची खात्री झाली आहे. त्याबरोबरच, रियासी जिल्ह्यात आता एक नवे वैद्यकीय महाविद्यालय सुरु होत असून त्यामुळे त्या भागातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ होणार आहे असे ते म्हणाले. श्री माता वैष्णोदेवी वैद्यकीय उत्कृष्टता संस्था हे केवळ एक आधुनिक रुग्णालय नसून लोककल्याणाच्या समृध्द भारतीय परंपरेचे मूर्त रूप आहे अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी या संस्थेचे कौतुक केले. भारतभरातील भाविकांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा करत ते म्हणाले की त्यांच्या देणग्यांमुळे ही संस्था स्थापन करणे शक्य झाले. या उदात्त उपक्रमासाठी समर्पित पद्धतीने केलेल्या प्रयत्नाबद्दल मोदी यांनी श्री माता वैष्णोदेवी देवस्थान मंडळाचे अभिनंदन केले. सदर रुग्णालयाची सध्याची 300 खाटांची क्षमता वाढवून 500 खाटांची व्यवस्था करून वैद्यकीय सेवेत सुधारणा घडवली जाईल अशी घोषणा देखील पंतप्रधानांनी यावेळी केली. या घडामोडीमुळे कटरा येथे माता वैष्णोदेवी देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांची अधिक सोय होईल याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
त्यांच्या सरकारने 11 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे हे अधोरेखित करत आणि हा कालावधी गरिबांच्या उत्थानासाठी तसेच नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित करत पंतप्रधानांनी या काळात लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या महत्त्वाच्या कल्याणकारी उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा उल्लेख केला, ज्यामुळे 4 कोटी गरीब कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. उज्ज्वला योजनेमुळे 10 कोटी घरांची चुलीच्या धुरापासून सुटका झाली आणि महिला, लहान मुलांचे आरोग्य सुरक्षित झाले. आयुष्मान भारत योजनेमुळे 50 कोटी गरीब नागरिकांना रु.5 लाखांपर्यंत मोफत आरोग्यसेवा मिळाली. ते पुढे म्हणाले, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमुळे प्रत्येक ताटात पोषणयुक्त अन्न वाढणे शक्य झाले व अन्नसुरक्षा सुनिश्चित झाली; तर जनधन योजनेमुळे 50 कोटींहून अधिक गरीब नागरिकांना बँकिंग सेवेशी जोडून घेत त्यांचा आर्थिक व्यवस्थेत समावेश करणे शक्य झाले. पंतप्रधानांनी सौभाग्य योजनेचा उल्लेख केला, या योजनेमुळे अंधारात राहणाऱ्या 2.5 कोटी कुटुंबांना वीज मिळाली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12 कोटी शौचालये बांधून उघड्यावर शौचाची समस्या दूर करण्यात आली. जल जीवन मिशनमुळे 12कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचले, त्यामुळे महिलांवरील ताण कमी झाला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे 10 कोटी लहान शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळून ग्रामीण भारत मजबूत झाला.
मोदी म्हणाले की गेल्या 11 वर्षांत 25 कोटींहून अधिक लोकांनी गरिबीवर मात करत नव-मध्यमवर्गात प्रवेश केला आहे. सरकार गरीब आणि नवोदित मध्यमवर्गाला आर्थिक व सामाजिक सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधानांनी ‘वन रँक, वन पेन्शन’, रु.12 लाखांपर्यंतच्या पगारावर करसवलत, गृहखरेदीसाठी आर्थिक सहाय्य, तसेच परवडणाऱ्या हवाई प्रवासासाठी मदत आदी उपक्रमांचा उल्लेख करत सांगितले की सरकार लोकांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे असून सर्वांचा विकास साधण्यास वचनबद्ध आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच प्रामाणिक करदाता मध्यमवर्गासाठी सरकारने काम केल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकार तरुणांसाठी सातत्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत असल्याचे सांगत पंतप्रधानांनी पर्यटनाला आर्थिक वाढीचे व दळणवळणाचे महत्त्वपूर्ण साधन म्हणून अधोरेखित केले. पर्यटन रोजगार निर्मिती करत असून लोकांमध्ये ऐक्य वाढवते, असे ते म्हणाले. पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या विघातक प्रयत्नांचा निषेध करत पंतप्रधान म्हणाले की हे मानवतेच्या, सामाजिक सलोख्याच्या व आर्थिक समृद्धीच्या विरोधात आहे. 22एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या घटनेचा उल्लेख करत मोदी यांनी सांगितले की पाकिस्तानने काश्मिरियत आणि मानवतेवर हल्ला केला, भारतात हिंसाचार भडकवण्याचा व कश्मिरी लोकांची उपजीविका उद्ध्वस्त करण्याचा हेतू त्यामागे होता. गेल्या काही वर्षांत विक्रमी पर्यटक संख्या अनुभवत असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील प्रगतीशील पर्यटन क्षेत्राला खीळ घालण्यासाठी हा पर्यटकांवर केलेला हेतुपुरस्सर हल्ला होता. पाकिस्तानच्या या विघातक कृतीमुळे स्थानिक घोडेस्वार, पोर्टर, गाईड, गेस्ट हाऊस मालक व दुकानदार यांच्यावर प्रत्यक्ष परिणाम झाला, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या कुटुंबासाठी प्रामाणिक श्रम करणाऱ्या आणि दहशतवाद्यांशी झुंज देतानाप्राण गमावलेल्या तरुण आदिलच्या शौर्याची त्यांनी स्तुती केली. मोदींनी सांगितले की सरकार जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि या प्रदेशाच्या प्रगतीत दहशतवाद कधीही अडथळा निर्माण करू शकणार नाही.
पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरच्या जनतेच्या धैर्याची प्रशंसा केली आणि सांगितले की पाकिस्तानच्या कटकारस्थानांविरोधात त्यांची ठाम भूमिका हा एक मजबूत संदेश आहे. आज जम्मू आणि काश्मीरचे तरुण दहशतवादाचा थेट सामना करण्यासाठी सज्ज आहेत, असे ते म्हणाले. मोदींनी दहशतवादाच्या विध्वंसक परिणामांचा निषेध केला. यामुळे शाळा जळाल्या, रुग्णालये उद्ध्वस्त झाली, अनेक पिढ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दहशतवादामुळे मुक्त व पारदर्शक निवडणुका हे देखील मोठे आव्हान बनले, लोकांचे प्रतिनिधी निवडण्याचे अधिकार हिरावले गेले, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी सांगितले की जम्मू आणि काश्मीरच्या जनतेने दाखवलेले सामर्थ्य व निर्धार हे महत्त्वाचे वळण आहे, हे शांतता, प्रगती व उज्ज्वल भविष्याच्या दिशेने जाण्याच्या त्यांच्या निश्चयाचे द्योतक आहे.
वर्षानुवर्षे जम्मू आणि काश्मीरने दहशतवाद सहन केला, अनेकांनी आपली स्वप्ने सोडून दिली आणि हिंसेला आपले नशिब मानले. पण आपल्या सरकारने ही परिस्थिती बदलली असून, आज काश्मीरचा तरुण पुन्हा स्वप्ने पाहू लागला आहे आणि ती पूर्णही करू लागला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आज काश्मीरच्या तरुणांना गजबजलेली बाजारपेठ, झगमगणारे मॉल आणि गर्दीने फुललेली सिनेमागृहे पाहून आनंद होतो, असे सांगून ते म्हणाले की स्थानिक लोक जम्मू आणि काश्मीरला चित्रपटांच्या शूटिंगसाठी प्रमुख स्थळ बनविण्यासाठी आणि क्रीडाक्षेत्राचे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी इच्छुक आहेत.
पंतप्रधान मोदींनी माता खीर भवानी यात्रेचा उल्लेख केला. या यात्रेसाठी जमलेले हजारो भाविक जम्मू आणि काश्मीरचा नवीन, आशावादी चेहरा प्रतिबिंबित करत होते, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी आगामी अमरनाथ यात्रेबाबतचा उत्साह तसेच ईदच्या उल्हासावरही प्रकाश टाकला. हा उत्सवाचा उत्साह या प्रदेशाची पून्हा उठून उभे राहण्याची क्षमता आणि प्रगती दर्शवितो, असे पंतप्रधान म्हणाले. पहलगाम हल्ल्यासारख्या घटनांमुळे जम्मू आणि काश्मीरच्या विकासाची गती डळमळीत होणार नाही असे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले. या प्रदेशाच्या विकासात कसलाही अडथळा येणार नाही, असे आश्वासन पंतप्रधानांनी जनतेला दिले. जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांच्या स्वप्नांना धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही अडथळ्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
एक महिन्यापूर्वी, आजच्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या छावण्या ध्वस्त केल्या होत्या, यांचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले, “ भविष्यात जेव्हा जेव्हा पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरचे नाव ऐकेल तेव्हा त्याला त्याच्या अपमानास्पद पराभवाची आठवण येईल”. भारत काही धाडसी निर्णय घेईल अशी पाकिस्तानच्या लष्करी आणि दहशतवादी नेटवर्कला कधीच अपेक्षा नव्हती. मात्र पाकिस्ताननं अनेक दशकांच्या कालावधीत उभारलेल्या दहशतवादी पायाभूत सुविधा भारताने केवळ काही मिनिटांतच जमीनदोस्त केल्या, असे पंतप्रधान म्हणाले. पाकिस्तानला याचा धक्का बसला आणि त्याचा राग त्यांनी जम्मू, पूंछ आणि इतर जिल्ह्यांमध्ये निष्पाप नागरिकांना लक्ष्य करून काढला असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या क्रूर हल्ल्यांचा निषेध केला. आणि पाकिस्तानने घरे कशी उद्ध्वस्त केली, शाळा आणि रुग्णालयांवर कसे बॉम्ब हल्ले केले तसेच मंदिरे, मशिदी आणि गुरुद्वाऱ्यांवर कसा गोळीबार केला, हे संपूर्ण जगाने पाहिले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमधील जनतेच्या सहनशीलतेचे कौतुक केले. पाकिस्तानच्या आक्रमकतेचा सामना करण्याचे येथील जनतेचे धाडस प्रत्येक भारतीयाने पाहिले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. सरकार पूर्ण ताकदीने प्रत्येक पीडित नागरिकाच्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहिल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी देशवासीयांना दिला जाणारा निरंतर सहयोग आणि एकता याबाबतच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांना सरकारी मदतीची नियुक्ती पत्रे आधीच मिळाली आहेत अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या 2000 हून अधिक कुटुंबांना झालेल्या त्रासाची जाणीव असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या लोकांचे दुःख हे देशाचे दुःख आहे, असे त्यांनी सांगितले. पूर्वी घरांच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत दिली जात होती, ज्यामुळे गोळीबारामुळे प्रभावित झालेल्यांना दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने आता ही मदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे प्रभावित कुटुंबांना अधिक मदत दिली जाईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारामुळे ज्या कुटुंबांच्या घरांची पडझड झाली आहे त्यांच्यासाठी पंतप्रधानांनी अतिरिक्त आर्थिक मदत जाहीर केली. गंभीर नुकसान झालेल्या कुटुंबांना आता आधी देण्यात आलेल्या मदतीव्यतिरिक्त 2 लाख रुपये तर अंशतः नुकसान झालेल्या घरांना 1 लाख रुपये अतिरिक्त मदत दिली जाईल, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. पंतप्रधान मोदी यांनी बाधित कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याची, निरंतर मदत मिळत राहील याची खात्री करण्याची तसेच या लोकांची घरे पून्हा बांधण्यासाठी आणि जीवन सुरळीत करण्यास मदत करण्याची त्यांच्या सरकारची वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.
“सरकार सीमावर्ती भागात राहणाऱ्या रहिवाशांना देशाचे आघाडीचे रक्षक म्हणून संबोधते”, असे पंतप्रधानांनी सांगितले. सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये विकास आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी गेल्या दशकात अभूतपूर्व प्रयत्न केले गेले आहेत असे ते म्हणाले. यातील प्रमुख उपक्रमांवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की ऑपरेशन सिंदूर नंतर सुमारे10,000 नवीन बंकर बांधण्यात आले आहेत.या बंकर्सनी नागरिकांचे जीव वाचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीर विभागासाठी दोन नवीन बॉर्डर बटालियनची स्थापना करण्याची घोषणा केली. या बटालियनमुळे या प्रदेशाची सुरक्षा आणखी मजबूत होईल, असेही ते म्हणाले. याव्यतिरिक्त, दोन समर्पित महिला बटालियनची देखील यशस्वीरित्या स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे देशाची संरक्षण क्षमता बळकट झाली आहेत आणि सशस्त्र दलात महिला सक्षम बनल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात, विशेषतः आव्हानात्मक भूभागांमध्ये होत असलेल्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या विकासावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. या भागात संपर्क सुविधा आणि सुरक्षा सुधारण्यासाठी शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. कठुआ-जम्मू महामार्ग सहा पदरी द्रुतगती महामार्गात रुपांतरीत केला जात आहे, तर सुखकर प्रवास व्हावा यासाठी अखनूर-पूंछ महामार्गाचे रुंदीकरण केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले. व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमा अंतर्गत, सीमावर्ती गावांमध्ये विकास उपक्रमांना गती देण्यात आल्याने रहिवाशांसाठी चांगले राहणीमान आणि संधी सुनिश्चित झाल्या आहेत, असे उद्गार त्यांनी काढले. मोदी यांनी नमूद केले की जम्मू आणि काश्मीरमधील 400 गावे ज्यांच्याशी पूर्वी सर्व ऋतुत संपर्क साधणे कठीण होते आता ती गावे 1,800 किलोमीटर लांबीच्या नव्याने बांधलेल्या रस्त्यांनी जोडली जात आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले. सरकार या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी 4,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वाटप करत आहे, जेणेकरून सीमावर्ती भागात आर्थिक वाढ आणि प्रादेशिक विकासाला चालना मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांना विशेष आवाहन केले, की त्यांनी भारताच्या उत्पादन क्रांतीमध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे. ऑपरेशन सिंदूरने आत्मनिर्भर भारताची ताकद जगाला दाखवली आणि आज जगभरात भारताच्या संरक्षण परिसंस्थेची चर्चा होत आहे, असेही ते म्हणाले.
या यशाचे श्रेय सशस्त्र दलांच्या ‘मेक इन इंडिया’वरील विश्वासाला देत, प्रत्येक भारतीयाने आता त्यांच्या वचनबद्धतेचे अनुकरण केले पाहिजे असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘मिशन मॅन्युफॅक्चरिंग’ उपक्रमाचा उल्लेख केला. या उपक्रमाचा उद्देश भारताच्या उत्पादन क्षेत्राला गती देणे हा आहे.
त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील तरुण नवोन्मेषक आणि उद्योजकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक विकास वाढविण्यासाठी भारताला तरुणांच्या आधुनिक विचारसरणी, नवोन्मेष, कल्पना आणि कौशल्यांची आवश्यकता आहे. गेल्या दशकात भारत एक आघाडीचा संरक्षण निर्यातदार म्हणून उदयास आला आहे आणि पुढील ध्येय म्हणजे भारताला जगातील आघाडीच्या संरक्षण निर्यातदारांमध्ये स्थान मिळवून देणे हे आहे, असे मोदी यांनी नमूद केले. भारत जितक्या वेगाने या उद्दिष्टाकडे वाटचाल करेल तितक्या जास्त रोजगाराच्या संधी देशभर निर्माण होतील आणि लाखो लोकांना त्याचा फायदा होईल असे ते म्हणाले .
प्रत्येक भारतीयाने भारतात बनवलेल्या उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आवाहन करताना, मोदी यांनी या वस्तू देशबांधवांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे खरे प्रतिबिंब आहेत यावर भर दिला. भारतीय बनावटीची उत्पादने निवडणे हीच देशाची खरी सेवा आहे. यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते आणि कामगारांना सक्षम करता येते असे ते म्हणाले. ज्याप्रमाणे देश आपल्या सशस्त्र दलांचा सीमेवर सन्मान करतो, त्याचप्रमाणे बाजारपेठेत ‘मेड इन इंडिया’चा अभिमानही कायम ठेवला पाहिजे, जेणेकरून संरक्षण आणि व्यापार या दोन्ही क्षेत्रात भारताची ताकद प्रतिबिंबित होईल असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार विकासासाठी एकत्र काम करत असल्याने जम्मू आणि काश्मीरचे भविष्य उज्ज्वल आणि समृद्ध आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. शांतता आणि समृद्धी या प्रवासाचा पाया राहील याची खात्री देत त्यांनी सहकार्य आणि प्रगतीच्या भावनेवर भर दिला. माता वैष्णोदेवींच्या आशीर्वादाने प्रेरित विकासाच्या मार्गाला बळकटी देण्याचा अढळ निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला. विकसित भारत आणि विकसित जम्मू-काश्मीरप्रति वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. दृढनिश्चय आणि एकतेने हे स्वप्न साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे ते म्हणाले. प्रगतीच्या भावनेचा उत्सव साजरा करत या उल्लेखनीय प्रकल्पांसाठी जनतेचे मनापासून अभिनंदन करून मोदी यांनी भाषणाचा समारोप केला.
या कार्यक्रमात जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, व्ही. सोमन्ना आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
चिनाब आणि अंजी रेल्वे पूल
नदीपासून 359 मीटर उंचीवर वास्तुशिल्पाची अद्भुत रचना असलेला चिनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. हा 1,315 मीटर लांबीचा स्टील आर्च ब्रिज आहे जो भूकंप आणि सोसाट्याचा वारा या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार केला गेला आहे. या पुलाचा एक महत्त्वाचा लाभ जम्मू आणि श्रीनगरमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यात होईल. पुलावरून जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनद्वारे, कटरा आणि श्रीनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी फक्त 3 तास लागतील, ज्यामुळे सध्याचा प्रवास वेळ 2-3 तासांनी कमी होईल.
अंजी ब्रिज हा भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे ब्रिज आहे जो आव्हानात्मक प्रदेशात देशाची सेवा करेल.
कनेक्टिव्हिटी प्रकल्प आणि इतर विकास उपक्रम
पंतप्रधानांनी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL ) प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. सुमारे 43,780 कोटी रुपये खर्चाच्या या 272 किमी लांबीच्या USBRL प्रकल्पात 36 बोगदे (119 किमी लांबीचे) आणि 943 पूल समाविष्ट आहेत. हा प्रकल्प काश्मीर खोरे आणि देशाच्या उर्वरित भागांमध्ये सर्व हवामानात, अखंड रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण करतो. याचा उद्देश प्रादेशिक गतिशीलतेत परिवर्तन घडवणे आणि सामाजिक-आर्थिक एकात्मता वाढवणे हा आहे.
पंतप्रधानांनी श्री माता वैष्णोदेवी कटरा ते श्रीनगर आणि परत येण्यासाठी दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वे सेवा रहिवासी, पर्यटक, यात्रेकरू आणि इतरांसाठी जलद, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवास पर्याय प्रदान करतील.
सीमावर्ती भागात शेवटच्या मैलापर्यंत दळण वळणाला मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधानांनी विविध रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग-701 वरील रफियाबाद ते कुपवाडा पर्यंतच्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पाची आणि राष्ट्रीय महामार्ग-444 वरील शोपियान बायपास रस्त्याच्या बांधकामाची पायाभरणी केली. याचा खर्च 1,952 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
त्यांनी श्रीनगरमधील राष्ट्रीय महामार्ग-1 वरील संग्राम जंक्शन आणि राष्ट्रीय महामार्ग-44 वरील बेमिना जंक्शन येथे दोन उड्डाणपूल प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांसाठी वाहतूक सुरळीत होईल.
पंतप्रधानांनी कटरा येथे 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या श्री माता वैष्णोदेवी वैद्यकीय उत्कृष्टता संस्थेची पायाभरणी देखील केली. हे रियासी जिल्ह्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय असेल जे या प्रदेशातील आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठे योगदान देईल.
पाकिस्तान विरोधात जिंकत असतांना माघार का घेतली ? तुम्ही माघार घेतली म्हणजे गांडुगिरी केली!
पुणे : भारत – पाकिस्तान संघर्षा दरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवायची संधी का दवडली ? पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली ? याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.ॲड. आंबेडकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय राजकारणात नेतृत्व हे महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे गल्लीतील भांडणात जो आक्रमक असतो तो जिंकतो. जो आक्रमक राहत नाही, त्याला गांडू म्हणतात. त्यावेळी म्हणतात की, काय गांडुगिरी करतोय? गांडुगिरी केली म्हणूनच हारला. गल्लीतील लढाईत जे होते ते मोठ्या लढाईत सुद्धा तेच होते. तुम्ही पाकिस्तान विरोधात जिंकत असतांना माघार का घेतली ? तुम्ही माघार घेतली म्हणजे गांडुगिरी केली! असा घणाघात त्यांनी केला.
राजकीय पक्षांनी भारत पाकिस्तान संघर्षावर उघडपणे बोलले पाहिजे. सरकारच्या कुचकामी भूमिकेला प्रश्न केला पाहिजे. देशाची सुरक्षा फक्त राजकीय पक्ष आणि निवडून गेलेले लोकप्रतिनिधी एवढ्यापुरते मर्यादित नाही, तर जनतेची आहे. जनतेने यात सहभाग घ्यावा आणि यावर सरकारला प्रश्न विचारला पाहिजे.
पंतप्रधान मोदी जगभर फिरले पण, भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान एकही देश उघडपणे भारताच्या बाजूने उभा राहिला नाही. याची कारणे पहिल्यांदा सरकारने मांडली पाहिजेत.रशिया हा भारताचा जुना मित्र आहे. भारताकडे रशियाची अनेक संरक्षण साहित्य आहेत. भारत – पाकिस्तान संघर्ष संपल्यावर रशियाने पाकिस्तानला मदत केली आहे. ज्याप्रमाणे १९७१च्या युद्धा दरम्यान रशिया उघडपणे भारताच्या बाजूने उभा राहिला होता, तसा आताच्या भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान तो उभा राहिला नाही. ज्या फ्रांस देशाकडून आपण राफेलसारखी एवढी विमाने घेतली, तोही भारताच्या बाजूने उभा राहिला नाही.
पाकिस्तानकडे १० दिवस पुरेल एवढाच दारुगोळा होता. तो दारुगोळा संपला असता, तर भारताला पाकिस्तानवर पाहिजे ती अट घालता आली असती. आपल्या नेतृत्वाने कच खाल्ली आणि आपण जिंकलेली लढाई हरलो. आरएसएसवाल्यांना आम्ही विचारतोय की, तुम्ही प्रत्येकवेळी पाकिस्तान विरोधात का हारताय ?अग्निवीर जवानांचा एक गंभीर प्रश्न समोर आलंय. मुंबईतील रहिवासी असलेले मुरली नाईक या अग्निवीर जवानाला भारत पाकिस्तान संघर्षा दरम्यान वीरमरण आले. परंतु, अग्निवीर जवानांना शहिद दर्जा दिला जात नाहीये. त्यामुळे त्यांना शासकीय सुविधा मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची परवड होतीये. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लवकरच हा प्रश्न उचलू.
पुणे- पुण्यासाठी ऑनलाइन टीडीआर पोर्टल सुरु करू,७० फूट उंचीवरील इमारतींना परवानगी देण्यासाठी कार्यवाही सुरु करू अशा पद्धतीच्या घोषणा आज येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या. क्रेडाई – पुणे मेट्रो २०२५ च्या नवनिर्वाचित समितीची सर्वसाधारण सभा आणि पदस्थापना समारंभ आज संपन्न झाला. या नवनियुक्त समितीकडून अधिक चांगले, पारदर्शक व पथदर्शी काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नवनियुक्त समितीस शुभेच्छा दिल्या.यावेळी क्रेडाई पुणे संस्थेचे अध्यक्ष मनीष जैन, उपाध्यक्ष नितीन ख्याती, अरविंद जैन, सतीश मगर, शांतीलाल कटारिया, बांधकाम क्षेत्रातील सर्व व्यावसायिक आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम, महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे आणि नगरविकास खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बांधकाम क्षेत्रातील सर्व मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.यावेळी शिंदे म्हणाले,’ ‘नो रीझन, ऑन द स्पॉट डिसीजन’ ही माझी कामाची पद्धत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाच्या माझ्या कार्यकाळात मुंबई-पुणे मिसिंग लिंक असेल, पुणे रिंग रोड असेल, मुंबई आणि पुण्यातील मेट्रो मार्ग असतील, कोस्टल रोड, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग असेल, अशा सर्वच विकास प्रकल्पांमधले अडथळे दूर करून या प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला. आमचे सरकार हे स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे. कालच आम्ही समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा सुरू केल्याचे सांगितले.
बांधकाम क्षेत्र हे कृषीनंतर सगळ्यात जास्त रोजगार देणारे क्षेत्र असून राज्याच्या जीडीपी मध्ये या क्षेत्राचा वाटा मोठा आहे. पिंपरी चिंचवडची प्रारूप योजनाही लवकरच आपण मंजूर करू, पीएमआरडीए डेव्हलपमेंट प्लॅनचा विषय कोर्टात प्रलंबित असून तोही लवकरात लवकर सोडवू, पीसीएमसी मध्येही युनिफाईड डीसीपीआर प्रमाणे नियमावली तयार करण्याचा निर्णय घेऊ, मुंबईप्रमाणे पुण्यासाठीही ऑनलाइन टीडीआर पोर्टल सुरु करू, हरित इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे स्थापन केली जाणारी त्रिसदस्यीय समिती देखील लवकरच स्थापन करू, ७० फूट उंचीवरील इमारतींना परवानगी देणाऱ्या समितीबाबत मुंबईच्या धर्तीवर निर्णय घेऊ असे याप्रसंगी सांगितले.
नगरविकास विभागाने एसआरए क्लस्टरची नियमावली तयार केली असून त्यातही सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी केले. तसेच समृद्धी महामार्गावर विकसित असलेल्या नोड्स मध्येही आपण सहभागी व्हावे अशी विनंती केली. वाढत्या पुण्याचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, वाहतूक कोंडी, शहर नियोजन, पूर नियंत्रण रेषेतील बांधकामांचा प्रश्न सोडवायला नक्की प्राधान्य देऊ आणि मुंबईच्या धर्तीवर पुण्यातील पायाभूत सुविधांचा विकासाला प्राधान्य देऊ असे याप्रसंगी शिंदे यांनी नमूद केले.
शिवजयंती महोत्सव समितीचा अभिनव उपक्रम : सलग १३ व्या वर्षी शिवराज्याभिषेक तथा सार्वजनिक शिवस्वराज्य दिन सोहळा साजरा
पुणे : शिवस्वराज्य दिन चिरायू होवो.. शिवराज्याभिषेक दिन चिरायू होवो… जय भवानी जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा गगनभेदी जयघोषात, रणशिंगाच्या ललकारीत, मर्दानी खेळाच्या चित्तथरारात आणि ढोल ताशाच्या गजरात एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकाचा आणि विश्वातील पहिल्या शिवराज्याभिषेक शिल्पाचा परिसर हजारो शिवभक्तांनी दणाणून सोडला. यावेळी शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे रयतेच्या “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” सोहळ्या निमित्त भगव्या स्वराज्यध्वजा सह ५१ फूट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.
सोहळ्याचे हे सलग १३ वे वर्षे होते. यावेळी रिंकल अमित गायकवाड, ललिता रवींद्र कंक, अश्विनी शंकर कडू, वृषाली सुनील जगताप, शोभा भोई, दिपाली विशाल गव्हाणे, जोस्ना निलेश जगताप, अश्विनी दरेकर तसेच उपस्थित महिलांच्या व शिवांश सुभाष जागडे यांच्या हस्ते भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे विधीवत पूजन करुन ५१ फूट स्वराज्यगुढी उभारण्यात आली. शिवकालीन सरदारांचे वंशज, सार्वजनिक शिवस्वराज्य दिनाचे प्रवर्तक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, समितीचे सचिव सचिन पायगुडे, उपाध्यक्ष रवींद्र कंक, सदस्य शंकर कडू, नाना निवंगुणे, प्रवीण गायकवाड, सुनील जगताप, विवेक तुपे, अजित शिंदे, मोहन पासलकर सर्व स्वराज्यघराणी, स्वराज्यबांधव, महिलावर्ग उपस्थित होते.
सोहळ्याची सुरुवात शिवरायांच्या विश्वातील पहिल्या शिवराज्याभिषेक शिल्पाचे पूजन करुन झाली. त्यानंतर शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी स्पर्धा परीक्षेत देशात २६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या शिवांश सुभाष जागडे यांचा शिवरायांच्या जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला.
अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. शिवजयंती प्रमाणे शिवराज्याभिषेक दिन ६ जून हा सार्वजनिक शिवस्वराज्य दिन वैश्विक साजरा व्हावा ह्या प्रेरणेतून ६ जून २०१३ ला शिवरायांच्या जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंच स्वराज्य चिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सर्वप्रथम दुर्गदुर्गेश्वर रायगड, लालमहाल, राजगड यासह असंख्य ठिकाणी उभारुन “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
अमित गायकवाड यांनी सात्यत्याने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत २०२१ सालापासुन ग्रामविकास खात्याने तसेच उच्च व तंत्र खात्याने शासकीय परिपत्रक काढून महाराष्ट्रातील ३३ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या आणि सुमारे ४३,००० गावांत त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील सर्व अकृषीक, अभिमत, स्वयंअर्थसाहाय्यिक विद्यापीठ, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतने आणि तत्सम शिक्षण संस्थामंध्ये हा दिवस “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” स्वराज्यगुढी उभारुन साजरा करण्यास सुरुवात केली. सोहळ्याच्या १३ व्या वर्षात आता प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, शहरात, महाविद्यालयात, राज्यात तसेच देशविदेशात “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” स्वराज्य गुढी उभारुन साजरा केला जात आहे. ३५२ व्या शिवराज्याभिषेक वर्षात हा दिवस भारत सरकारने “राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन” म्हणून जाहीर करुन शिवरायांना देशस्तरीय मानवंदना द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पुण्यामध्ये दरवर्षी एसएसपीएमएस लालमहाल, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन,चंद्रमौलेश्वर मंदिर यासह अनेक ठिकाणी स्वराज्य गुढी उभारली जाते. त्याचबरोबरीने यावर्षी शिवकालीन सरदारांच्या वंशजांकडून शिवनेरी, राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड, संग्रामदुर्ग यासह ३५१ गडांवर तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तुळशीबाग मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ, लक्ष्मीबाई दत्त मंदिर यासह ३६० गणेशोत्सव मंडळानी देखील स्वराज्यगुढी उभारुन सार्वजनिक शिवस्वराज्य दिन साजरा केला.
कार्यक्रमाचे आयोजन सोहळयाचे प्रवर्तक अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, प्रवीण गायकवाड, गोपी पवार, मोहन पासलकर, महेंद्र भोईटे यांसह असंख्य स्वराज बांधवांनी केले आहे.
पुणे दि.६ जून : आंतरधार्मिक समाज, धार्मिक स्वातंत्र्य आणि शांततेसाठी समर्थन केल्याबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांना या वर्षी अमेरिकेतील वॉश्गिटन डीसी येथे आयआरएफ बिल्डर्स फोरम आणि रॉजर विल्यम्स आयआरएफ पुरस्कारांमध्ये प्रतिष्ठित २०२५ चा ‘ग्लोबल बिझनेस अँड इंटरफेथ पीस गोल्ड मेडल’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. अमेरिकेतील रिलिजस लिबर्टी अँड बिझनेस फाउंडेशनच्या वतिने नुकतेच अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रूबियो यांच्या हस्ते डॉ.राहुल कराड यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रिलिजस लिबर्टी अँड बिझनेस फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रायन जे ग्रिम उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले “ सकारात्मक शांततेच्या तत्वांवर बांधलेला समाज लोकांना आधार देतो आणि भविष्यातील संकटांविरूद्ध लढण्याची ताकद देतो.अशा वेळेस उज्ज्वल भविष्याच्या शोधात शांती, ज्ञानाच्या देवाणघेवाण आणि मानव कल्याणासाठी सर्वांनी मिळून कार्य करावे. हा पुरस्कार स्विकारतांना खूप मोठी जबाबदारी पडली आहे.” “विद्यार्थ्यांना वैश्विक नागरिक बनविण्यासाठी डब्ल्यूपीयूत पीस स्टडीचा समावेश केला आहे. यातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक अनुभव प्रदान करणे, संवाद साधणे, रचनात्मक, शांततापूर्ण उपयांसाठी कार्य करणे आणि ज्ञान व कौशल्यांनी सुसज्य आहे. तसेच डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी जगातील सर्वात मोठ्या वैश्विक शांतता डोम ची निर्मिती करून यातून विश्वशांतीचा संदेश दिला जात आहे.” यावेळी देश विदेशातील नावाजलेल्या प्रतिष्ठित नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
पुणे, दि. ६ जून २०२५ : सह्याद्री प्रकाशन, पुणे यांच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या “शिकणारे पालक घडणारी मुलं” या अस्मिता जोशी-राजे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, ८ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता मोंडकर सभागृह, एस. एम. जोशी फाउंडेशन, नवी पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती मा. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची विशेष उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे आणि मासिक ‘जडण-घडण’चे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे हे देखील उपस्थित राहणार आहेत.
या पुस्तकात आधुनिक पालकत्व, मानसिक आरोग्य, व मुलांच्या सर्वांगीण विकासावर सखोल विचार मांडण्यात आले आहेत. शिक्षण, आधुनिक पालकत्व आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन करणारे हे पुस्तक पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असा विश्वास सह्याद्री प्रकाशनच्या संचालक सौ. स्मिता देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून वाचनप्रेमी, पालक आणि शिक्षकांनी या प्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अशा योजनांच्या अंमलबजावणीत महावितरणने देशात नावलौकिक मिळवला असून ऊर्जा परिवर्तनाचे महावितरणचे मॉडेल जगासाठी मोठे उदाहरण ठरणार आहे. महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हे शक्य झाले आहे. परंतु महावितरणला आर्थिकदृष्टया अधिक सक्षम करणे गरजेचे असून त्यासाठी सर्वानीच कटिबद्ध होऊन मिशन मोडवर काम करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र यांनी केले.
महावितरण कंपनीचा २० वा वर्धापन दिन महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड मुंबई येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.लोकेश चंद्र बोलत होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून म.रा.वि.मं.सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक उपस्थित होते. तसेच महावितरणचे संचालक (संचालन तथा प्रकल्प) श्री. सचिन तालेवार, संचालक (वित्त ) श्री. अनुदीप दिघे, संचालक (मानव संसाधन ) श्री. राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणने ऊर्जा परिवर्तनाचा आराखडा तयार केला असून त्याची यशस्वी अंमलबाजवणी करण्यात येत आहे. या ऊर्जा परिवर्तनामुळे महावितरणचा वीज खरेदीवरील खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना स्वस्त दरांत वीज उपलब्ध होईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. आगामी काळात विजेची मागणी ४५,००० मेगावॅट पर्यंत पोहचणार असून त्यासाठी महावितरणकडून यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. महावितरणच्या ऊर्जेची स्थापित क्षमता ८२,००० मेगावॅट पर्यंत वाढणार असून वापरात न येणारी ऊर्जा साठवून ठेवण्याची यंत्रणा महावितरणकडून उभारण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठविण्याचे महावितरणचे नियोजन जगासाठी मॉडेल ठरणारे आहे. महावितरण मध्ये काम करणाऱ्या सर्वांसाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. परंतु माहिती तंत्रज्ञाच्या आधारे ग्राहकांना तत्पर सेवा द्यावी व तक्रार निवारणामध्ये सुधारणा करावी. स्मार्ट मीटर ग्राहकांच्या हितासाठी असून त्यामुळे ग्राहकांच्या बिलिंगच्या तक्रारी राहणार नाहीत. ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या फायद्याबाबत माहिती देऊन जनजागृती करण्याचे आवाहन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र यांनी केले. महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त संचालक श्री. राजेंद्र पवार यांच्या पुढाकारातून संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या सुरक्षा अभियानाचे श्री.लोकेश चंद्र यांनी कौतुक केले.
या प्रसंगी स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक म्हणाले की, मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने केलेली प्रगती उल्लेखनीय असून स्पर्धेच्या युगात सक्षम होण्यासाठी महावितरणने अधिक जोमाने काम करणे काळाची गरज आहे.
प्रास्ताविक संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी केले. तसेच महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेली विद्युत सुरक्षा मोहीम अशीच प्रभावीपणे अंमलात आणावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारदर्शन सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. ललित गायकवाड यांनी केले. यावेळी प्रा.गणेश शिंदे यांचे ‘जीवन सुंदर आहे’ विषयावर व्याख्यान झाले. वर्धापन दिन कार्यक्रमात सर्वांनी सुरक्षा शपथ घेतली. कार्यक्रमाला महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना भाजपा सरकारकडून सुरक्षा व पुरस्कार, सोलापूरकर, कुलकर्णी, कोरटकरची हिम्मत होतेच कशी?
मुंबई, दि. ६ जून २०२५ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सर्वच जाती धर्मांच्या लोकांना समान स्थान होते. सर्वधर्मसमभावाची हीच संकल्पना संविधानात आहे, शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटले जाते. पण महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचा आज महाराष्ट्रात नंगानाच सुरु आहे. भाजपाचे सरकार असतानाच या प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. या प्रवृत्तीचा आतापर्यंत समूळ नायनाट केला नाही पण आता मात्र या प्रवृत्तींचा कडलोट करा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. गांधी भवन यथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, पुण्यातील शिवसृष्टीवर कुलकर्णी नावाच्या एका विकृताने लघुशंका केली. त्यावेळी त्याची पत्नी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती. हा कुलकर्णी अफलज खानाचा वकील भास्कर कुलकर्णीची औलाद आहे. सावित्रीबाई फुले यांना विरोध करणारे, तुकारामाची गाथा बुडवणारे, काळाराम मंदिरातील प्रवेशाला विरोध करणाऱ्या ह्याच प्रवृत्ती आहेत आणि ते महाराष्ट्र नासवण्याचे काम करत आहेत. पण दुर्देवाने त्यांच्यावर काहीच कारवाई होतं नाही. भाजप सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल गरळ ओकण्याचे काम सुरु आहे. महाराजांचा अवमान करणारे कोरटकर, सोलापूरकर, कुलकर्णी यांच्यावर कठोर कारवाई का केली जात नाही? भाजपाच्या राज्यात या प्रवृत्तींना पाठबळ दिले जाते, सुरक्षा पुरवली जाते व पुरस्कार देऊन सन्मानही केला जातो हे संताप आणणारे आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर तोफ डागत सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास स्वामी होते असा खोटा इतिहास योगी सांगत आहेत. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते पण जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. ह्याच योगी आदित्यनाथ यांनी महाराजांचा जिरेटोप घालून शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. या जिरेटोपाला अनन्यसाधारण महत्व आहे पण भाजपाचे नेते सातत्याने जिरे टोप घालून महाराजांचा अपमान करत आहेत, याआधी पंतप्रधान मोदी यांनीही जिरेटोप घातला होता. जिरेटोप घालून छत्रपती शिवाजी महाराज व शिवप्रेमींचा अपमान करणाऱ्या योगींनी व मोदींनी जाहीर माफी मागावी असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ब्राह्मण समाजासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान एकांगी आहे. फक्त ब्राह्मण समाजच साखरेचे काम करत नाही तर समाजातील सर्व जाती महाराष्ट्र धर्मात अमृत ओतण्याचे काम करतात, महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत सर्व जाती धर्मांच्या लोकांनी योगदान दिलेले आहे. ही कोणत्या एका जातीची ठेकेदारी नाही तर अठरापगड जातींचे योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरु, लाल बहाद्दुर शास्त्री, इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंहराव यांची जात सांगण्याची वेळ आली नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सत्यजित धांडेकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
पुणे : स्पर्धेच्या युगात शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्वत:चे भवितव्य घडविण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. शालेय शिक्षण घेत असताना पर्यावरण संवर्धनासाठीही प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी केले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या 25व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत नाट्यनिर्माते सत्यजित धांडेकर यांच्यावतीने विविध शाळांमधील गरजू, होतकरू शालेय विद्यार्थ्यांना आज (दि. ६) शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील व्हिआयपी कक्षात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संकर्षण कऱ्हाडे बोलत होते. याप्रसंगी मनसे प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, नाट्य परिषद कार्यकारणी सदस्य गिरीश महाजन, नाट्यनिर्माते सत्यजित धांडेकर, समीर हंपी उपस्थित होते. प्रस्ताविकात सत्यजित धांडेकर यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पडद्यामागील कलाकार अक्षय जगताप, गणेश भोसले, केदार भालशंकर, बाळासाहेब धांडेकर, मदन गायधने यांनी मदत केली.
पुणे -शहरातील वाढती वाहतूक काेंडी हा ज्वलंत प्रश्न असून याबाबत वेळीच उपाययाेजना हाेणे गरजेचे अाहे. पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडीची ज्वलंत समस्या लक्षात घेता, मेट्रोचा अतिरिक्त एफएसआय व बाहेरील टीडीआर (विकतचे चटई क्षेत्र)ची उधळण मोठ्या प्रमाणात सुरू असून, पुणे शहरातील वर्षानु वर्षांच्या पुर्वीच्याच रस्त्यांवरील प्लॉटवर सुद्धा २० ते ३० मजली इमारतींना आवश्यक वाहतूक सोईविना परवानग्या दिल्या जात आहेत हे भयावह आहे. सदर इमारती मधील किमान १० ते १५ % नागरिक वा त्यांचे व्हिजिटर्स जरी एक ठिकाणाहून दुसरीकडे जावयाचे झाल्यास, रस्ते अत्यंत तोकडे पडत आहेत ही वास्तवता नाकारु शकत नाही.पुणे शहराचा “रुंदावणारा(होरीझोंटल )व समतोल विकास” होण्याऐवजी, “(व्हर्टीकल)उंचावणारा विकास” होत असल्याने, गर्दीयुक्त वाहतुकीच्या खाईत पुणे शहर ढकलले जात आहे. त्यामुळे ‘वाहतूक नियोजन’ ही समस्या नसून, इमारतींचे अयोग्य नियोजन व अवास्तव बांधकाम परवानगी या समस्या आहेत असे मत काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांच्या शिष्टमंडळाने व्यक्त केले आहे.
या शिष्टमंडळात लिगल सेलचे अँड फैयाज शेख, अँड श्रीकांत पाटील, धनंजय भिलारे, गणेश शिंदे, संजय अभंग, गणेश मोरे, योगेश भोकरे, आशिष गुंजाळ उपस्थित होते.
नवनिर्वाचित पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन त्यांनीं शहराचा नवीन डीपी व टीपी प्लॅन करण्याची मागणी केली आहे.याबाबत तिवारी म्हणाले,पुणे शहराचे डीपी (विकास आराखडा) वा टीपी (नगर रचना) हे मात्र कागदांवर पूर्वीचेच असून,मेट्रो’च्या आगमना नंतर वास्तविक डीपी व टीपी मध्ये धोरणात्मक आमूलाग्र बदल होणे गरजेचे होते.मात्र ,ते वेळीच न झाल्याने पुणे शहर आज वाहतुकीच्या कोंडीत अडकले आहे.मेट्रोचा पुरेपूर उपयोग होण्याच्या दृष्टीने प्रत्येक मेट्रो स्टेशन जवळ मुबलक दोनचाकी व चारचाकी पार्किंग व्यवस्था अत्यावश्यक होती.मात्र, ती दुर्दैवाने उभी राहू शकली नाही. त्यामुळेही या समस्येचा तातडीने बोध घेऊन, नगररचना संचालक यांचे समवेत चर्चा करून पुणे शहरासाठी आवश्यक रुंदीच्या रस्त्यांची व पार्किंगची व्यवस्था होई पर्यंत तसेच मेट्रो-सिटी’साठीचा “डीपी व टीपी” होई पर्यंत, मुक्त व अतिरिक्त चटई क्षेत्र मंजूरी (रद्द न करता) तूर्त स्थगित वा नियंत्रित करावी, जेणेकरून पुणेकरांची नित्य व जीवघेण्या वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच प्रशासकीय काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून प्रशासनाचे पुणेकर जनतेस अपेक्षीत ऊत्तर दाखल गेल्या ३ वर्षांचे ऑडीट अहवाल प्रकाशीत करून कार्यवाही बाबत नविन आयुक्तांनी माहीती देण्याची मागणी देखील केली आहे.
मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या संभाव्य आघाडीवर मोठे विधान केले. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल. या प्रकरणी आमच्या व त्यांच्या (राज ठाकरे) मनात कोणताही संभ्रम नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गट व मनसे लवकरच एकत्र येतील, असा दावा केला जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकारी सुजाता शिंगाडे यांनी शुक्रवारी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर उपरोक्त भाष्य केले. ते म्हणाले, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. मी हे एका वाक्यात सांगितले आहे. याविषयी बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहत आहोत. मी या प्रकरणी कोणताही संदेश देणार नाही. थेट बातमी देईल. माझ्या व शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. त्यांचेही मनसैनिक एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याही मनात कोणता संभ्रम नाही. माझ्या मते, संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्हाला जी काही बातमी द्यायची आहे, ती देऊ.
शिंदे गटात गेलेल्यांना पश्चाताप-उद्धव ठाकरे यांनी यावेळी सुजाता शिंगाडे यांचा दाखला देत शिंदे गटात गेलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना मोठा पश्चाताप होत असल्याचाही दावा केला. सुजाता शिंगाडे यांनी आपल्या भावना नेमक्या शब्दांत मांडल्या आहेत. त्या शिवसेना सोडत असल्याची बातमी कळली, तेव्हा आम्हाला धक्का बसला होता. वाईटही वाटले होते. आपली एवढी जुनी कार्यकर्ती का व कशासाठी शिवसेना सोडू शकते? असा प्रश्न आम्हाला पडला होता. ठीक आहे, आता हा विषय संपला आहे.सुजाता शिंगाडे यांनी शिंदे गटात जी काही बेबंदशाही सुरू आहे याचा जवळून अनुभव घेतला आहे. त्यांना तेथील विचित्र वातावराचा अनुभव आला. त्यांना तिथे कुणाशीही जुळवून घेता आले नाही. त्या बैचैन व अस्वस्थ होत्या. तिकडे गेल्यानंतर अनेकांना पश्चाताप होतोय. पण तुमच्या सारखा निर्णय घेण्याचे धाडस फार कमी लोकांमध्ये असते. ही हिंमत व धाडस केवळ शिवसैनिकांमध्येच असू शकते. लाचारीसाठी तिकडे गेलेल्या लोकांमध्ये असे धाडस असू शकत नाही. आज संपूर्ण शिवसेना कुटुंब आनंदी आहे. त्यांचा आमच्या पक्षातील प्रवेश हा शिंदे गटात गेलेल्या कार्यकर्त्यांसाठी एक संदेश आहे, असे ते म्हणाले.
शिंदे गटात कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही – शिंगाडेसुजाता शिंगाडे यांनीही यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी 30 जानेवारी रोजी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता जवळपास 5 महिने झाले. ती माझी फार मोठी चूक होती. ओरिजनल शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची व मातोश्रीचीच आहे हे सर्वांनीच लक्षात ठेवावे. मागील 4-5 महिन्यांत मला फार वाईट अनुभव आले. मला त्यांनी कोणतेही आमिष दिले नाही. त्यामुळे मी त्यांची मिंधी नाही. वयाच्या 10 व्या वर्षापासून मी शिवसेनेचे काम करते. मला विभागात गटप्रमुखापासून ते विभाग संघटकापर्यंतची सर्वच पदे मला मातोश्रीमु्ळे मिळाली.जवळपास 35 वर्षे मी संघटनेचे काम केले. इतर लोक कोणत्या आमिषाला बळी पडून शिंदे गटात जात आहेत हे मला माहिती नाही. मला 4 महिन्यांतच तिथे राहणे शक्यच नसल्याचा अनुभव आला. मला 4 महिने झोप लागली नाही. शिंदे गटात सर्वकाही देखावा आहे. ते नगरसेवकांना 2-3 कोटी देऊन पक्षात घेत आहेत. या सर्वांना तिथे पश्चाताप होत आहे. तिथे कुणाचाच कुणाशी ताळमेळ नाही, असे शिंगाडे म्हणाल्या.
मुंबई, दि.५:- चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मार्गाच्या कामातील अडथळे दूर करण्यात येतील, असे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले. विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रमकुमार, कोकण महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, प्रदीप कांबळे, शशी प्रभू, बुद्ध धर्मगुरू ,बुधिष्ट सेवा सोसायटी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, एम एम आर डी ए व विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भव्य वास्तू उभे राहत आहे. पुढील वर्षीपर्यंत हे काम पूर्ण होईल. चैत्यभूमी येथे येणारे अनुयायी या स्मारकास देखील भेट देतील. या अनुषंगाने सदर मार्ग होणे गरजेचे आहे. चैत्यभूमीचे ठिकाण समुद्रकिनारी असल्याने पर्यावरण विषयक मान्यता, तसेच हा रुंद मार्ग बनविण्यासाठी आवश्यक जागा या दृष्टीने संबंधित शासकीय विभागांकडून नियोजन करण्यात येईल, यासाठी माहिती घेण्यात यावी. उपाध्यक्ष श्री. बनसोडे म्हणाले, या दृष्टीने पर्यावरण विभाग व बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांचेकडून माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल. यावेळी बुद्ध धर्मगुरू, बुद्धीष्ट सेवा सोसायटी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी यांनी चैत्यभूमी व तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील सुविधांबाबत मागण्यांची बैठकीत माहिती दिली. अनेक वर्षांपासून चैत्यभूमीच्या विकासासाठी काम केले जात असल्याचे सांगितले.
यंदाची स्पर्धा जिंकण्याचा निर्धार – बाप्पाला साकडे
पुणे : महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या (एमपीएल) तिसऱ्या हंगामातील चषकावर नाव कोरण्याच्या निर्धाराने ‘पुनीत बालन ग्रुप’चा ‘कोल्हापुर टस्कर’ संघ मैदानात उतरला असून या संघाने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दर्शन आणि आरती करून जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.
‘इंडीयन प्रिमीयर लीग’च्या धर्तीवर राज्यात ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’ने (एमसीए) महाराष्ट्र प्रिमीयर लीग (एमपीएल) सुरू केली आहे. यंदाचा या लीगचा तिसरा हंगाम सुरु झाला असून या लीगमध्ये उतरलेल्या कोल्हापूर टस्कर संघाची मालकी पुण्यातील युवा उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी घेतली आहे. या संघाने सलग दोन हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली असून पहिल्यावर्षी उपविजेते पदाचा मानही पटकवाला आहे. यावर्षीच्या स्पर्धेसाठी हा संघ पुन्हा एकदा सज्ज झाला असून नव्या जोमाने मैदानात उतरला आहे. या संघाचा लीगमधील पहिला सामना उद्या (शनिवार) होणार आहे. त्यापूर्वी या संघातील खेळाडुंनी हिंदूस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ची आरती करुन दर्शन आणि आशिर्वाद घेतले. यावेळी कोल्हापुर टस्कर्स संघाचा कर्णधार राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, श्रीकांत मुंढे यासह सर्व खेळाडू उपस्थित होते.
*‘‘यंदा आमचा कोल्हापूर टस्कर संघ हा एकदम संतुलित असून आम्ही पूर्ण आत्मविश्वासाने खेळणार आहोत. या संघातील सर्वच खेळाडूंबाबत मी अत्यंत समाधानी आहे. यावर्षी स्पर्धेचे विजेतेपद आम्ही निश्चितपणे पटकविणार असाच आमचा निर्धार आहे. त्यासाठी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे आशिर्वाद घेतले.’’ राहुल त्रिपाठी, कर्णधार,