Home Blog Page 492

बसचे अपघात कमी करण्यासोबतच बस स्थानकातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई: राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात कमी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात यावीत तसेच राज्यातील बस स्थानका व परिसर स्वच्छ व उत्तम सोई सुविधांनी युक्त असावा बस स्थानकातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यावे असे निर्देश राज्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरीताई यांनी दिले

आज परिवहन विभागाची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी श्री गिरीश देशमुख महाव्यवस्थापक श्री नंदकुमार कोळकर व इतर अधिकारी उपस्थित होते यावेळी महामंडळात च्या बसचे होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या
सोबतच बसचे वाहक व चालक यांच्या मुक्कामी असणार्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या सोबतच यांच्या निवासस्थानाच्या प्रकल्प लवकरत लवकर मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या याबरोबरच बस स्थानकावर तृतीयपंथांना राखीव स्वच्छता ग्रह उपलब्ध करून देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बस स्थानक व लोकांना उत्तम सुविधा व सुरक्षित प्रवासासाठी पुढील काळात अनेक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत अशी माहिती राज्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी दिली.

लाडक्या बहिणींच्या पैशाची रिकव्हरी आणि शरद पवारांच्या शेजारी का बसलो नाही ? अजितदादांनी दिले उत्तर

पुणे- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींचा पैसा रिकव्हर करण्याचा अजिबात विचार नसल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेनिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या तेळी ते बोलत होते.

वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट ४८ वी वार्षिक सर्व साधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर आले.सुरुवातीला अजित पवार आणि शरद पवार यांची बंद दार आड चर्चाही झाली , व्यासपीठावर ते शेजारी बसणार होते मात्र आयत्या वेळी अजित दादांनी आसनव्यवस्था बदलली.सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना शरद पवारां शेजारी बसविले ,त्यांना साहेबांशी बोलायचं असल्यानं जागा बदलल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न आपल्या देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये उपस्थित झाला आहे. मुंबई, पुणे, कलकत्ता अशा मोठ्या शहरांमध्ये देखील तेथील नागरिक येत आहेत. त्यांना शोधण्याची मोहीम राबवली जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. सैफ अली खानवरील हल्ला देखील बांगलादेशी व्यक्तीने केला असल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. लाडकी बहीण योजना ही आम्हाला आधार कार्डशी लिंक करायची होती. मात्र वेळ कमी असल्यामुळे ते शक्य झाले नाही. मात्र आता खरोखरच लाडक्या बहिणींना लाभ द्यायचा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही हळूहळू पावले उचलत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांकडून सरकारने दिलेले पैसे परत घेऊ, असे वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी केले होते. मात्र टीकेची झोड उठताच त्यांनी अपात्र महिलांकडून सरकार पैसे परत घेणार नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. तटकरे यांच्या वक्तव्यावर शिवसेना आणि भाजप मंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. दावोस येथूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी तटकरेंची कानउघाडणी केल्याचे समजते.

‘एसएफए फुटबॉल टूर्नामेंट’ मध्ये ध्रुव ग्लोबल स्कूल ३र्‍या स्थानावर

पुणे, दि.23 जानेवारी : एसएफए फुटबॉल टुर्नामेंटमध्ये नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या फुटबॉल खेळाडूंनी विजयाने सुरुवात केली.   शिवछञपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे झालेल्या एकतर्फी सामन्यात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी लॉयोला हायस्कूलवर २-० च्या विजयासह तिसर्‍या स्थानासाठी सामना जिंकला. खेळाडू आरव चौधरी व श्रीजन वर्मा यांनी गोल केला. ध्रुवच्या खेळाडूंनी प्रेक्षकांना ही विजयाची भेट देऊन टाळ्यांचा कडकडाट केला. खेळाडूंचा जोश आणि चिकाटी पाहून ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्रिन्सिपल संगीता राऊतजी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.
सामन्यातील पहिल्या हाफ च्या २५’ व्या मिनिटाला ध्रुव ग्लोबल स्कूलचा खेळाडू आरव चौधरी याने गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात ध्रुव स्कूलच्या खेळाडूंनी ही आघाडी कायम ठेवली. दुसर्‍या सत्रातही ध्रुव च्या खेळाडूंनी उत्कृृष्ट कामगिरी सुरू ठेवली. २९’ व्या मिनिटाला श्रीजन वर्मा याने गोल करत संघाची आघाडी २-० अशी वाढवली व विजय निश्चित केला.  
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या फुटबॉल टीम मध्ये समनमय गुप्ता, आरव चौधरी, कबीर बिजूर, आयुष गाडवे, अर्जुन विजयेंद्रन, नमिष सिंह, श्रीजन वर्मा आणि नरेन प्रसाद यांचा समावेश होता. या खेळाडूंनी आपल्या चिकाटीच्या जोरावर यश मिळविले. या खेळाडूना समर्पित प्रशिक्षक अमेय कलाटे आणि पार्थ सायकिया यांचे मार्गदर्शन लाभले.

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी CCTV मधील व्यक्ती व अटक केलेला एकच आहे का? मुंबई पोलिसांनी खुलासा करावा: नाना पटोले

सैफ अली खान हल्ला प्रकरण हिंदू-मुस्लीम नाही तर कायदा सुव्यवस्थेचे, सत्ताधारी भाजपाकडून मात्र धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न.

‘लाडकी बहीण’चा फायदा घेणारे बांग्लादेशी भारतात आले कसे? नरेंद्र मोदी सरकार कमजोर आहे का?

मुंबई, दि. २३ जानेवारी २०२५
अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहिर केले आहे परंतु CCTV मध्ये दिसलेला हल्लेखोर व अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे, या प्रश्नी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा व सत्य जनतेसमोर मांडावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुंबईतील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या वांद्रे भागात अभिनेत्याच्या घरात हल्ला झाल्याने सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत तसेच गावातील सरपंचही सुरक्षित नाहीत तर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय? हा कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न असून निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदावर बसवून सरकार काम करत आहे त्याचासुद्धा हा परिणाम आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याने बॉलिवूडमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सैफवरील हल्ला हा हिंदू मुस्लीम नसून तो सुरक्षेचा व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, परंतु सत्ताधारी भाजपातील काही लोक त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी भाजपा सरकारनेच सीबीआय चौकशी केली होती, आजपर्यंत सीबीआयने त्यांचा अहवाल दिला नाही. भाजपा सरकार हिंदू सुशांतला न्याय देऊ शकले नाही असेच म्हणावे लागले. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीतही सत्ताधारी भाजपा धार्मिक अजेंडा राबवत असेल तर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे पटोले म्हणाले.

विधानसभा निवडणुकीवेळी भाजपा युतीने लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करत सर्व भगिणींना प्रति महिना १५०० हजार रुपये दिले पण आता या योजनेचा लाभ चुकीच्या लोकांनी घेतला, या योजनेत त्रुटी आहेत. बांग्लादेशींनीही लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याचा साक्षात्कार सरकारला झाला आहे. योजना सुरु करताना सरकारला त्रुटी दिसल्या नाहीत का? बांग्लादेशींनी या योजनेचा लाभ घेतला तर हे बांग्लादेश भारतात, महाराष्ट्र आले कसे? केंद्रात मागील ११ वर्षांपासून ५६ इंच छातीवाल्या मोदींचे सरकार आहे. मग मोदी सरकार कमजोर आहे, असे भाजपाला म्हणायचे आहे का? असा प्रश्न विचारून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या सरकारवरच गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.

दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रूरल एन्हान्सर्सचा १० हजार कोटी गुंतवणुकीचा करार

आरोग्य, पायाभूत सुविधा व बंदरांच्या सक्षमीकरणाला चालना मिळणार; अंबर आयदे यांची माहिती 
पुणे: दावोसमधील (स्वित्झर्लंड) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने पुण्यातील रूरल एन्हान्सर्स संस्थेशी १० हजार कोटींच्या गुंतवणुकीचा क्रेडिट लाईन सामंजस्य करार केला. आरोग्यसेवा, रुग्णालय, पायाभूत सुविधा, बंदरे व सामाजिक क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी हा सामंजस्य करार महत्वपूर्ण असून, मुख्यमंत्री फडणवीस व संस्थेचे प्रमुख अंबर आयदे यांनी करार आदानप्रदान केला. महाराष्ट्रातील स्टार्टअपसाठी, तसेच पुण्यासाठी ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट असल्याचे केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन करताना म्हटले आहे.
राज्य शासनाच्या वतीने परकीय गुंतवणूक विभागाचे सचिव कौस्तुभ धावसे यांच्या पुढाकारातून नेदरलँड येथील शासकीय संस्थांचा त्रिपक्षीय करार झालेला आहे. यावेळी कौस्तुभ धावसे, राज्य शासनाचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन, एमआयडीसी विभागाचे सचिव पी. वेलारसू, नेदरलँड शासनामार्फत एडविन सीएसवरदा, रुरल एन्हान्सर्स समूहाचे चेअरमन इन डेस्क सुब्रह्मण्यम येडावली, मुख्यमंत्र्यांचे सहायक जयंत येरवडेकर उपस्थित होते. अंबर आयदे यांच्या संस्थेला राज्य शासनामार्फत दावोस येथे उपस्थित राहण्याचे विशेष आमंत्रण देण्यात आलेले होते.
अंबर आयदे म्हणाले, “ही गुंतवणूक पुढच्या दोन वर्षांमध्ये राज्यातील आरोग्य व्यवस्था, राज्य शासनासाठी लागणारी ॲम्बुलन्स व्यवस्था, पुण्यातील लोहगाव येथील पोलीस बांधवांचा रखडलेला गृहप्रकल्प, पायाभूत सुविधांची उभारणी आणि महाराष्ट्र राज्य शासनाची बंदरे, शिपिंग इन्फ्रास्ट्रक्चर बळकट करण्याच्या दृष्टीने उपयोगात आणण्यात येणार आहे. यापूर्वी संस्थेच्या माध्यमातून भारतातील पहिली ईसीए आधारित गुंतवणूक पुणे महापालिकेसोबत वारजे येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी २०२३ करण्यात आलेली आहे. हे हॉस्पिटल २०२७ मध्ये पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. मार्चमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे ईसीए आधारित भारतातील पहिली आर्थिक परिषद घेण्यात येणार आहे.”
कौस्तुभ धावसे म्हणाले, रुरल एन्हान्सर्स संस्थेचे अंबर आयदे हे मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वकांक्षी ‘कंट्री डेस्क’ या परकीय गुंतवणूक बघणाऱ्या टीमचे सदस्य आहेत. २०२१ पासून महाराष्ट्रात ईसीए गुंतवणूक कशी आणता येईल यावर ते काम करत आहेत. दावोसमध्ये झालेल्या १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारामुळे राज्याला मोठा फायदा होणार आहे.

रुग्णालय, आरोग्यसेवा व अन्य सामाजिक क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी नेदरलँड व रूरल एन्हान्सर्स संस्थेशी झालेला १० हजार कोटी गुंतवणुकीचा करार महत्वाचा ठरेल. यातून रुग्णालयांची उभारणी, ऍम्ब्युलन्स व्यवस्था, पायाभूत सुविधांची उभारणे करणे शक्य होईल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र 

सचिन तेंडुलकर फाउंडेशनचा पाच वर्षांचा परिवर्तनशील प्रभाव

मुंबई: वंचित आणि गरजू लोकांना विश्वास वाटेल असे वातावरण निर्माण करून त्यांना पुढाकार घेण्यास सक्षम बनवण्यासाठी समर्पित कार्याचा पाच वर्षांचा टप्पा गाठत सचिन तेंडुलकर फाउंडेशनने (STF) 22 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील द बॉम्बे क्लब येथे एक स्नेहसोहळा आयोजित केला. मित्र, कुटुंबीय, शुभचिंतक आणि ना-नफा तत्वावर काम करणाऱ्या सहयोगींकडून मिळालेल्या कौतुक आणि प्रोत्साहनाने सजलेल्या या कार्यक्रमात STF ने मुलांसाठी आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा यांसारख्या मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी चांगले जीवनमान सुनिश्चित करण्याच्या आपल्या बांधिलकीची पुन्हा पुष्टी केली.

या कार्यक्रमाची संकल्पना होती “शाइन ब्राइटर टुगेदर.” खेळ, आरोग्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून प्रामुख्याने मुलांचे जीवन समृद्ध करण्याच्या फाउंडेशनच्या मुख्य कल्पनेवर यातून प्रकाश टाकण्यात आला.

सारा तेंडुलकर यांनी अलीकडेच फाउंडेशनच्या संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली असून त्यांचा हा पहिलाच अधिकृत कार्यक्रम होता. आपल्या आई-वडिलांनी दाखवलेल्या मार्गावर इतक्या लहान वयात पाऊल ठेवून सारा तरुणाईशी जोडणारी नवी दृष्टी घेऊन येत असून त्यांना त्यांची स्वप्नं, आकांक्षा पूर्ण करून भरारी घेण्यासाठी मदत करत आहे.

लोकांचे जीवन अधिक सुकर करणे आणि फाउंडेशनच्या उपक्रमांद्वारे त्यांच्या आयुष्यात परिवर्तनीय सकारात्मक प्रभाव पाडणे याबाबत बोलताना सारा तेंडुलकर म्हणाल्या, “लहानपणापासून नेहमीच मला माझ्या कुटुंबापासून प्रेरणा मिळत आली आहे. त्यांनी कायम मला देण्याच्या, दातृत्वाच्या सामर्थ्याचे महत्त्व समजावून दिले आहे. मला फाउंडेशनच्या कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली आणि केवळ मुलांच्याच नव्हे तर संपूर्ण कुटुंबांच्या जीवनात आशेची ज्योत कशी प्रज्वलित होते हे पाहायला मिळाले. गेल्या पाच वर्षांत सचिन तेंडुलकर फाउंडेशनने एक लाखाहून अधिक मुलांचे जीवन बदलले आहे. पुढे वाटचाल करण्यासाठी आम्हाला अशी लाखो कारणे मिळाली आहेत. आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या आणि हा प्रवास शक्य करण्यासाठी आमच्याबरोबर उभे राहणाऱ्या प्रत्येकाची मी अत्यंत ऋणी आहे.”

“संचालक म्हणून, मी माझ्या पालकांनी सुरू केलेल्या कार्यावर पुढे काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. प्रत्येक छोट्या स्वप्नाला ओळख मिळावी आणि ते स्वप्न पूर्ण व्हावे याची मी काळजी घेईन. उद्याचे उज्ज्वल भविष्य असलेल्या मुलांसाठी शक्यतांचे नवे जग, नवी आशा निर्माण करणाऱ्या वाटेवर मार्गक्रमण करण्यास मी उत्सुक आहे.”

कार्यक्रमात दाखवलेल्या लघुपटाने उपस्थितांना फाउंडेशनच्या कार्याची झलक दाखवली. स्वप्नं पाहणाऱ्या तरुण पिढीला त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सक्षम बनविण्यात धोरणात्मक भागीदारीद्वारे तेंडुलकर कुटुंब आणि सचिन तेंडुलकर फाउंडेशन (STF) यांची समर्पित वृत्ती किती मोलाची ठरली हे यातून उपस्थितांना जाणवले. STF सोबत काम करणाऱ्या 15 हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या कार्याची प्रशंसा आणि गौरवही यावेळी करण्यात आला.

कोल्डप्लेचे क्रिस मार्टिनही यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत व्यासपीठावर संवाद साधला. फाउंडेशनच्या प्रवासाबाबत बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाले, “मी जेव्हा शेवटच्या वेळेस पॅव्हेलियनमध्ये परतलो, तेव्हा माझ्या मनात एक भावना होती की माझी इनिंग संपलेली नाही. अंजली आणि मी असे काही करण्याचे स्वप्न पाहिले जे वंचितांसाठी जीवन सुसह्य करेल आणि स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना स्वत:वर विश्वास ठेवण्यास आणि उंच भरारी घेण्यास मदत करेल. या कल्पनेची सुरुवात करणे सोपे होते, पण त्याची अंमलबजावणी कठीण होती. अखेरीस STF अस्तित्वात आले आणि आता आम्ही पाच वर्षांचा टप्पा पार केला आहे. प्रवास जोरात सुरू आहे आणि आता सारा नेतृत्व करत असल्याने, STF लाखो स्वप्नांना वास्तवात बदलण्यासाठी आणि नवी भरारी घेण्यासाठी पुढे जाईल याचा मला विश्वास आहे.”

लोकांशी सहजपणे जोडून घेणे आणि त्यांच्या क्षमतांचा विस्तार करून त्यांच्या आकांक्षापूर्ती  साठी त्यांना मदत करणे या साध्या सरळ दृष्टिकोनातून सुरू झालेल्या STF च्या प्रवासाला आता क्रीडा-विकास उपक्रमांचे क्षेत्र विस्तृत करण्यासाठी नवीन उभारी मिळाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो मुलांना आणि तरुणांना त्याचा लाभ होईल. ग्रामीण भागात प्रगत पायाभूत सुविधा निर्माण करणे, स्थानिक रुग्णालये आणि प्राधिकरणांसोबत सहयोग करून मुलांसाठी आरोग्य सेवा अधिक मजबूत करणे आणि कौशल्य विकासासाठी संधी उपलब्ध करून देणारे नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रम सादर करणे या उद्दिष्टांवर आगामी काळात काम केले जाईल. मूलभूत दृष्टिकोनाला नव्या उत्साहासह जोडून STF च्या पुढच्या दशकाचे उद्दिष्ट ‘अब्जावधी स्वप्नं पूर्ण करण्याचे’ आहे.

मुलाला खुर्चीवर बसवलं, कात्रीने गळा चिरुन पत्नीची क्रूर हत्या! व्हिडीओ व्हॉट्स अ‍ॅपवर शेअर केला

पुणे- पुण्यातील कोर्टात काम करणाऱ्या एका पतीने पत्नीची शिलाई मशिनच्या कात्रीने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील खराडी परिसरात ही घटना घडली. ज्योती शिवदास गिते असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. बुधवारी (22 जानेवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी शिवदास गिते हा मुळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो पुण्याच्या खराडी परिसरातील तुळजाभवानी नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. तो पुणे जिल्हा सत्र न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं, अशी माहिती देखील समोर आली आहे. दारूच्या व्यसनामुळे आरोपी शिवदास गिते सतत पत्नीसोबत वाद घातल होता.पहाटे पत्नीने उठवल्याचा रागातून आरोपीने ही हत्या केल्याची माहिती आहे. मुलाला खूर्चीवर बसवून पतीने पत्नीचा गळा चिरला. त्यानंतर त्याने आपण ही हत्या सेल्फ डिफेन्समध्ये केल्याचं म्हटलं. त्याचा व्हिडीओ काढून त्याने व्हॉट्स अॅप ग्रुपवर शेअर देखील केला होता. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने ज्योती यांना ससून रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात जाता डॉक्टरांनी ज्योती यांना मृत घोषित केलं.

दरम्यान, आरोपी शिवदास गिते हा सस्पेंड होता, त्यामुळे त्याची पत्नी त्याला सकाळी चार वाजता अभ्यासाला उठवायची. परंतू पत्नीने उठवल्याचा राग आल्याने त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस या प्रकरणात अधिकची माहिती घेत आहेत.

कर्वेनगर मधील बेकायदा बांधकामावर धडक कारवाईबाबत खर्डेकरांनी महापालिकेचे केले अभिनंदन

साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन, पार्किंग स्पेस मधील संपूर्ण शहरातील अनधिकृत बांधकामे काढण्याची मागणी

पुणे- भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता ,संदीप खर्डेकर यांनी कर्वेनगर मधील बेकायदा बांधकामावर धडक कारवाईबाबत महापालिकेचे अभिनंदन केले आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त या दोहोंच्या नावे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,’

आज सकाळी कर्वेनगर मधील पाणंद रस्त्यावरील धडक कारवाई बघून सुखद धक्का बसला.जगप्रसिद्ध कर्वे स्त्री शिक्षण संस्था,
सिद्धिविनायक महाविद्यालय, कमीन्स इंजिनियरिंग कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज,यांच्या समोरील ह्या रस्त्यावर bottle neck झाले होते.ह्या रस्त्यावर मोठ्या वाहनांची, पी एमपी एल बसची वाहतूक सुरु असते,अरुंद रस्त्यावरील अतिक्रमाणामुळे तेथे पादचारी, वाहनचालक विद्यार्थीनी, सामान्य नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात.
अनेक वर्ष माझ्यासह ह्या भागातील नागरिक रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी करत होते,अखेर आज त्याचा मुहूर्त लागला .
स्थानिक लोकप्रतिनिधी, पथ विभाग प्रमुख, अतिक्रमण विभाग प्रमुख व टीम मनपा चे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
ह्या अनुषंगाने आणखी काही मागण्या खर्डेकर यांनी केल्या आहेत.

त्या पुढीलप्रमाणे ..
1) शहरात सर्वत्र साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन, पार्किंग स्पेस अश्या ठिकाणी सर्रास अनधिकृत व्यवसाय सुरु असून त्यामुळे वाहने रस्त्यावर पार्क होतात व त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. तरी वरील विभागांप्रमाणेच बांधकाम विभागाला देखील सक्रिय करून त्यांच्या कडून देखील कडक व सातत्यापूर्ण कारवाई ची पुणेकरांची अपेक्षा आहे.
2) अश्याच पद्धतीने ( कर्वेनगर ) पुण्यनगरीत सार्वत्रिक कारवाई केल्यास प्रशासनास पुणेकर दुवा देतील आणि निश्चितच शनिवारवाड्यावर आपला जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित केला जाईल.
3) पथारी व्यवसायिकांचा व्यवसायिक हक्क अबाधित राखण्यासाठी आणि त्यांना वैधरित्या व्यवसाय करता यावा यासाठी अनेक वर्ष प्रलंबित असलेला हॉकर्स झोन चा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी करत आहे.

शरद पवारआणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा

पुणे- आज अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याने दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आले.यावेळी घाईघाईत आलेल्या अजित पवारांनी आपल्या स्वीय सहायकाला विचारले कुठे बसायचे आहे, यावर त्यांच्या स्वीय सहायकाने ‘साहेब इकडे आत बसलेत असे म्हणताच अजित पवार हे अध्यक्ष असा बोर्ड लावलेल्या दालनात गेले. यावेळी त्यांची शरद पवारांशी जवळपास अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली. अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने सपाटून मार खाल्ला. त्यानंतर अजित पवार-शरद पवार एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या. 1 जानेवारी रोजी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्या वेळी त्यांनी पवार कुटुंब एकत्र येऊ दे, अशी प्रार्थना विठ्ठलाकडे केल्याची बातमी यापूर्वीच प्रसारित झालेली आहे.. तर . मला वाटतं की पांडुरंग माझं नक्की ऐकणार. वर्षभरात हे दोघे एकत्र येतील, असा दावाही आशाताई यांनी केलेला आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाच्या काही आमदारांनी केंद्रात आणि राज्यातही सत्ता नसेल तर विकास कामे होणे कठीण आहे, याची जाणीव झाल्याने आता अजित पवारांकडे चला, असा आग्रह धरला होता. तर नरहरी झिरवाळ यांनीही पवार कुटुंब एकत्र यावे, असा सूर लावला. ते म्हणाले की, हनुमानाची छाती फाडल्यानंतर जसा त्यात राम दिसला होता तशी माझी छाती फाडली तर त्यात शरद पवार दिसतील. शरद पवारांची भेट घेऊन त्यांना लोटांगण घालेन.अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार व अजित पवार एकत्र आले तर आम्हाला आनंदच वाटेल, असे म्हटले आहे.

पवार कुटुंब एकत्रित रहावे, ही माझी व्यक्तिगत इच्छा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. मात्र, राजकीय भूमिका घेणे माझ्या अधिकारात नाही.

शरद पवार यांच्या कुटुंबीयांपैकी एका लोकप्रतिनिधीचाही सत्तेसोबत जाण्याचा आग्रह सुरू असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. सुप्रिया सुळे यांनीही जाहीरपणे अनुकूलता दाखवली तर सत्तेसोबत जाण्याचा आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याचा मार्ग सुकर होईल, असे सांगण्यात येते आहे. जर बहुमताने सत्तेसोबत जाण्याचा निर्णय झाला तर शरद पवार संघटनेपासून दूर होण्याचा निर्णयही घेऊ शकतात, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान बच्चू कडू यांनी असे म्हटले आहे की, देशात गत काही दिवसांपासून मोठ्या राजकीय उलथापालथी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. ही चर्चा शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याविषयी आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजपसोबत जाताना दिसून येतील. या दोन्ही पक्षांकडे भाजपला आवश्यक असणाऱ्या जागा उपलब्ध आहेत. संजय राऊत यांच्या विधानातूनही हे अधोरेखित होते. आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्यामुळे कुणीही पक्ष सोडून जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे.

श्रीकृष्ण संगीत महोत्सवात सुषीर वाद्यांच्या त्रिवेणी संगमात रसिक रममाण

पंडित प्रमोद गायकवाड यांच्या एकसष्टीपूर्तीनिमित्त विशेष सत्कार
गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि स्वर ताल अकॅडमीतर्फे आयोजन

पुणे : गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि स्वर ताल म्युझिक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी आयोजित श्रीकृष्ण संगीत महोत्सवात गायन-वादनाची सुरेल मैफल अनुभवायला मिळाली. शहनाई, बासरी आणि संवादिनी या सुषीर वाद्यांच्या त्रिवेणी संगमात रसिक रममाण झाले.
संगीत साधक, गुरू डॉ. पंडित प्रमोद गायकवाड यांच्या एकसष्ठीपूर्ती निमित्ताने गांधर्व महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पंडित गायकवाड यांचा डॉ. विकास कशाळकर यांच्या हस्ते या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. पंडित प्रमोद मराठे, पंडित राजेंद्र कुलकर्णी, पंडित रामदास पळसुले, विदुषी सानिया पाटणकर, डॉ. शुभांगी बहुलीकर, विनायक गुरव, संतोष घंटे, पंडित सुरेश पतकी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वर ताल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या तबला सहवादनाने झाली. ताल तीनतालमध्ये पेशकार, कायदे, रेले, तोडे-तुकडे सादर केले. विद्यार्थ्यांना मयुरेश गाडगीळ याने लहेरा साथ केली. विदुषी सानिया पाटणकर यांनी आपल्या गायन मैफलीची सुरुवात राग बसंत केदारमधील विलंबित तीनतालात ‌‘अतर सुगंध‌’ या पारंपरिक बंदिशीने केली. यानंतर मोगुबाई कुर्डिकर यांची द्रुत एकतालातील ‌‘खेल न आयी नवेली नार‌’ ही बंदिश सादर केली. बसंत रागातील सरगमने त्यांनी मैफलीची सांगता केली. सुरेल आवाज, दमदार ताना, आवाजाची फिरत या वैशिष्ट्यांनी मैफल रंगली. विनायक गुरव (तबला), संतोष घंटे (संवादिनी), वेदवती परांजपे, प्रशिका सहारे (सहगायन) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित राजेंद्र कुलकर्णी (बासरी), पंडित प्रमोद मराठे (संवादिनी) आणि डॉ. प्रमोद गायकवाड (शहनाई) यांच्या सहभागातून सुषीर वाद्यांचा संगम साधला गेला. या दिग्गज कलाकारांना आपल्या वादन मैफलीची सुरुवात राग मारुबिहागने केली. पंडित डॉक्टर प्रमोद गायकवाड यांच्या शहनाईचे सुमधुर स्वर, पंडित प्रमोद मराठे यांच्या संवादिनीचे सुरेल वादन तर पंडित राजेंद्र कुलकर्णी यांच्या बासरीचे आसमंतात भरून राहणारे सूर यांनी मैफलीत रंगत आणली. बनारसी धुन ऐकविल्यानंतर कलाकारांनी मैफलीची सांगता भैरवीतील धुन ऐकवून केली. या सर्व दिग्गज कलाकारांना जगविख्यात तबलावादक पंडित रामदास पळसुले यांच्या तबल्याची अजोड साथ लाभल्याने ही वादन मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. उपस्थित कलाकार, संगीत प्रेमी रसिकांसाठी ही अनोखी मैफल हृदयात जपून ठेवण्यासाठी अनमोल ठरली. कलाकारांचा सत्कार डॉ. विकास कशाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी बोलताना डॉ. कशाळकर म्हणाले, डॉ. प्रमोद गायकवाड हे उत्तम गायक असून कलाकारात आवश्यक व्यापकता आणि मनाचा मोठापणा त्यांच्याकडे भरभरून आहे. सहकलाकारांना सामावून घेत मैफलीत रंग भरणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी शहनाई या वाद्याचे शास्त्रोक्त संशोधन करून संगीत जगताला मोठी देणगी दिली आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रमोद गायकवाड म्हणाले, मी आजपर्यंत सांगीतिक क्षेत्रात केलेल्या कामाचे गुरूंकडून कौतुक होत आहे. या पवीत्र वास्तूत माझा सन्मान होत आहे, हा माझ्यासाठी सुवर्णक्षणच आहे. डॉ. शुभांगी बहुलकीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन अबोली सेवेकर यांनी केले तर आभार विनायक गुरव यांनी मानले.

सैफ अली खानवर खरंच चाकू हल्ला? आणि GB सिंड्रोम बाबत अजित पवार काय म्हणाले….

कोरोना आला तेव्हा रेमडीसिव्हर घ्या हा सल्ला चुकीचा होता …

GB सिंड्रोम च्या रुग्णांची संख्या पुण्यात वाढली ,पाणी उकळून पिण्याचा दादांचा सल्ला

पुणे- सैफ अली खानवर खरंच चाकू हल्ला करण्यात आला की तो फक्त अभिनय करत होता? असा सवाल भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी कधीही हिंदू कलाकारांची पर्वा केली नाही, त्यांना फक्त खान कलाकारांची काळजी आहे असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात प्रतिक्रिया दिली आहे, याबद्दल मी राणेंशी बोलेन, पण हल्लेखोर सापडल्यामुळे शंकेला वाव नसल्याचं अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.माध्यमांनी राणे यांनी व्यक्त केलेल्या संशयाबाबत माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मी राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा एक पालकमंत्री या नात्याने बोलत असतो. वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असतं, त्यावर मी काय बोलणार. कालच नितेश राणे बंदर आणि इतर दोन विभागांच्या आढाव्यासाठी आले होते. पण, मला याबाबत आधिक माहिती नाही, जर त्यांच्या मनात काही असेल तर त्यांनी त्या विभागाला सांगावं, मला त्यांनी सैफ अली खानविषयी केलेल्या वक्तव्यावर काही माहिती नाही. मी त्यांना विचारेन, असं अजित पवार म्हणालेत.

पुढे बोलताना ते म्हणाले, समजा, एखाद्या पत्रकाराच्या मनात काही आलं, तर त्याचं तो बोलतो ना.. नितेश राणेंच्या मनात काही शंका असेल, तर डिपार्टमेंटला सांगावं, मीही फार तर सांगेन की असं कुणाच्या मनात शंका- कुशंका आहे, असंही पुढे अजित पवार म्हणाले. वास्तविक ती व्यक्ती सापडलेली आहे. तो बांगलादेशवरुन आला होता. मुंबईबद्दल आकर्षण बहुतेक सगळ्यांना असतं, आजूबाजूच्या देशातील लोकांनाही आहे. त्यामुळे तो आला, पण मुंबई पाहून त्याला बांगलादेशला परत जावंसं वाटलं, त्यासाठी त्याला ५० हजार रुपये हवे होते, पण मागताना त्याने एक कोटी मागितले, हे सगळं मीडियाला पोलिस खात्याने सांगितलं आहे,आतापर्यंतच्या माहितीत तसं काही क्लू मिळालेलं नाहीये, कदाचित सैफ आपल्या घरी जात असताना त्यांची तब्येत किंवा त्यांचं एकंदरीत कपडे पाहता, यांच्यावर काही दिवसांपूर्वी असा हल्ला झाला होता, असं वाटलं नसेल, पण त्यांची तब्येत चांगली आहे, ते घडलंयच ना. नंतर पहाटे आमचे डिपार्टमेंट वाले त्याला तिकडे पहाटे घेऊन गेले, तू कसा वर गेलास, कुठला जिना वापरला, तिथे कुठून तू आत गेला, आतमध्ये शिरताना हे घर कोणाचं आहे माहिती होतं का, तर तो म्हणाला की मला हे घर कुणाचं माहिती नव्हतं, माला फक्त इतकंच माहिती होतं इथे श्रीमंत वर्ग राहतो हे माहिती होतं, अनेक अभिनेते-अभिनेत्री, निर्माते येथे राहतात एवढंच माहिती होतं, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे

मुंबई-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत लाभार्थ्यांमध्ये बराच गोंधळ उडाला आहे. अर्ज छानणीमध्ये अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार असल्याचे विरोधकांकडून म्हटले जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबात मोठे भाकीत केले आहे. महापालिका निवडणुकीनंतर भाजप सरकार अपात्र बहिणींची यादी वाढवून त्यांच्याकडून पैसे परत घेतील आणि ही योजना बंद करतील, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

विधानसभा सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. ही योजना निवडणुकीपुरती आहे, नंतर बंद होईल, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. मात्र, ही योजना चालूच राहिली, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. योजनेसंदर्भात अलिकडे अनेक संभ्रम निर्माण झाले आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना उपरोक्त दावा केला. तसेच एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यावरही निशाणा साधला आहे.

महापालिका निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींची संख्या भाजप वाढवेल आणि कालांतराने योजना बंद होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. लाडकी बहीण योजनेवर माझे आकलन आहे त्यानुसार, ज्यांना अपात्र ठरवायचे आहेत किंवा ज्यांचे पैसे कमी करायचे आहेत किंवा ज्यांच्या खात्यातून परत पैसे काढून घ्यायचे आहेत, अशांची यादी मुंबई महापालिका निवडणुकीनंतर वाढेल. हे भाजप सरकार अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढवेल. त्यांच्या खात्यातून पैसे परत घेतील आणि नंतर ही योजना बंद करून टाकतील, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 आमदार, 3 खासदार आणि काँग्रेसचे 5 आमदारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आहेत. कोणत्याही क्षणी महायुतीत येऊ शकतात, असा दावा उदय सामंत यांनी केला होता. या दाव्यावरही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या, पण जनतेची सेवा करा. ईव्हीएम ने तुम्हाला संख्याबळ दिले तर काम करा. भाजप आणि महाराष्ट्रात आणलेले राजकारण हे विषाचे फोडाफोडीचे आहे. उदय सामंत शिंदे गटाचे आमदार सुद्धा फोडायच्या विचारात आहेत, असा टोला आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांना लगावला.

आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या शिवोत्सव मेळावा आणि पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंना टोला लगावला. शिंदे गटाचे मेळाव्यात संगीताचा कार्यक्रम ठेवला आहे, असे कळले. मात्र त्यांच्या मेळाव्यात गायक आहेत आणि आमच्या मेळाव्यात नायक असल्याचे ते म्हणाले. त्यांना पालकमंत्री नाही, तर त्या जिल्ह्याचे मालक मंत्री व्हायचे आहे. दादागिरीसमोर मुख्यमंत्री झुकत आहेत, असेही ते म्हणाले.

सैफ अली हल्ल्याची केंद्राने घेतली गंभीर दखल-बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाईचे अमित शहांचे आदेश

मुंबई-अभिनेता सैफ अलीवर हल्ला करणारा बांगलादेशी निघाल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव व पोलिस महासंचालकांना पत्र पाठवले.बांगलादेशी आणि म्यानमारच्या रोहिंग्या घुसखोरांची संख्या मुंबईत झपाट्याने वाढल्याचा दावा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अहवालात केला आहे. याआधारे शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये शाह यांना पत्र लिहिले होते.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अहवालानुसार १९६१ मध्ये मुंबईतील एकूण लोकसंख्येपैकी ८८% हिंदू होते, २०११ मध्ये ते कमी होऊन ६६% झाले. हीच परिस्थिती कायम राहिल्यास सन २०५१ पर्यंत मुंबईत फक्त ५४% हिंदू राहतील.

बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैध रीतीने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येणाऱ्या घुसखोरांविरोधात त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि अन्य संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. शिवसेना उपनेते माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केलेल्या मागणीची दखल घेत, केंद्रीय गृहमंत्र्यालयाने वरील निर्देश दिले आहेत. अभिनेता सैफ अली खानवर बांगलादेशी घुसखोरांकडून झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या आदेशाने घुसखोरांच्या विरोधातील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.आपल्या पत्रात शेवाळे यांनी घुसखोरांमुळे होणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे. ‘1961 च्या जनगणनेनुसार मुंबईत हिंदूंची लोकसंख्या ही 88% होती. 2011 च्या जनगणनेत हिंदूंची लोकसंख्या 66% पर्यंत घसरली. हीच टक्केवारी 2051 पर्यंत 54% वर पोहोचेल, अशी भीती राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. तसेच काही नोंदणीकृत नसलेल्या अवैध सामाजिक संस्था या घुसखोरांना रसद पुरवत असल्याचा थेट आरोप देखील शेवाळे यांनी केला आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर सामाजिक संस्थांवर देखील कारवाई करण्याची मागणी शेवाळे यांनी केली आहे.

सैफ अली खानवर हल्ला झाला खरे होते की अभिनय होता?:मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली शंका; टुन-टुन उड्या मारत घरी परतल्याचा उल्लेख

पुणे/आळंदी -अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याचा भाजप नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची खिल्ली उडवत नितेश राणे म्हणाले की, हा खरोखर चाकू हल्ला होता की, अभिनय होता. ते म्हणाले की, बघा हे घुसखोर बांगलादेशी मुंबईत काय करत आहेत. त्यांची हिम्मत बघा. पूर्वी ते रस्त्यावर राहायचे, आता ते लोकांच्या घरात घुसत आहेत. सैफ अली खानच्या घरातही त्यांनी प्रवेश केला. त्याच्यावर चाकूने हल्ला झाला हे खरे होते की अभिनय होता? असा संशय व्यक्त केला जात आहे. सैफ रुग्णालयातून निघाल्यावर कसा टुन-टुन उड्या मारत घरात जात होता, अशा शब्दात त्यांनी या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे.आळंदी येथे सभेत त्यांनी याबाबत उल्लेख केला .

याआधी शिवसेना नेते संजय निरुपम यांनीही सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. त्याने सोशल मीडिया साइट ‘X’ वर पोस्ट करत लिहिले की, “डॉक्टरांनी सांगितले की , चाकू सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच खोलवर घुसला होता. बहुधा तो आत अडकला असावा. ऑपरेशन सतत 6 तास चालले. हे सर्व 16 जानेवारीला 21 जानेवारी आहे, फक्त 5 दिवसात फिट? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी एका ट्विटद्वारे याविषयी शंका उपस्थित केली. डॉक्टरांनी सांगितले होते की, सैफ अली खानच्या पाठीत चाकू 2.5 इंचापर्यंत खोलवर घुसला होता. सामान्यतः तो आतमध्ये अडकला होता. सलग 6 तास शस्त्रक्रिया झाली. ही सर्व 16 जानेवारीची गोष्ट आहे. आज 21 जानेवारी आहे. रुग्णालयातून बाहेर येताच एवढा फिट? केवळ 5 दिवसांत? कमाल आहे, असे निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये सैफचा घरी आल्याचा व्हिडिओही जोडला आहे.

सैफ अली खानच्या घरी झालेल्या हल्ल्यात जखमी झालेला अभिनेता सैफ अली खान याला सहा दिवसांनंतर मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अभिनेत्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सैफची पत्नी-अभिनेत्री करीना कपूर खान त्याला घरी आणण्यासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. डॉक्टरांनी अभिनेत्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.सैफ अली खान थोडा अशक्त दिसत होता, पण हसतच घरी परतला. अभिनेत्याने पाठीच्या दुखापतींवर उपचार करण्यासाठी न्यूरोसर्जरी आणि त्याच्या मानेवर आणि हातावरील जखमा दुरुस्त करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली. पांढरा शर्ट, निळी जीन्स आणि गडद चष्मा घातलेला, 54 वर्षीय अभिनेता हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मीडिया आणि चाहत्यांना अभिवादन करताना दिसला. सैफच्या हाताला पट्टी बांधलेली होती. उपचारादरम्यान मिळालेल्या पाठिंब्याबद्दल त्याने जनतेचे मनापासून आभार व्यक्त केले.

मुंबई पोलिसांनी मंगळवारी पहाटे अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा ‘सीन रिक्रियेट’ केला. यामध्ये आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने हल्ला कसा केला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अली सैफ अली खानच्या घरात कसा घुसला? धाकटा मुलगा जहांगीरच्या बेडरूममध्ये पोहोचला कसा? मग तिथून कसा निघाला? या सर्व प्रश्नांची उत्तरे यातून समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. 19 जानेवारी रोजी अटक करण्यात आलेल्या आरोपी शरीफुलला पोलिसांनी सोमवारी रात्री 1.15 वाजता प्रथम लॉकअपमधून बाहेर काढले आणि प्रथम वांद्रे स्थानक गाठले. पहाटे 3-4 च्या दरम्यान त्याला सैफच्या सोसायटीत नेण्यात आले. आरोपीलाही त्याने घटनेच्या वेळी घातलेल्या बॅगप्रमाणेच बॅग घातली होती. सीन रिक्रिएट करण्यासोबतच तपासासाठी स्वतंत्र फॉरेन्सिक टीमही सैफच्या घरी पोहोचली. टीमने सैफच्या घराच्या बाथरूमच्या खिडकी, शाफ्ट आणि पायऱ्यांवरून एकूण 19 बोटांचे ठसे गोळा केले. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सैफच्या घरात बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश केला होता आणि हल्ल्यानंतर ते येथून परत निघाला होता.

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जीबी सिंड्रोम आजाराच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा

पुणे, दि. २२ : पुणे शहर व परिसरात गुलेन बारी सिंड्रोम जीबी या आजाराचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात, विभागीय व जिल्ह्याच्या सर्व आरोग्य यंत्रणांचा या आजारा संदर्भात करण्यात येणाऱ्या उपचार व उपायोजनाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी डॉ.पुलकुंडवार म्हणाले, ज्या भागामध्ये,कॉलनी मध्ये पेशंट आढळून येत आहेत त्या भागातील पाण्याचे स्त्रोत महानगरपालिकेने तपासावेत आणि नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी.

दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा अभ्यास करावा जेणेकरून हा आजार नेमका कशामुळे होतोय याची माहिती समोर येईल आणि नागरिकांना त्याबाबत सजग करता येईल.

सहसंचालक आरोग्य सेवा यांनी तांत्रिक अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन त्यानंतर नागरिकांच्या माहितीसाठी एक मार्गदर्शक माहिती प्रसिद्ध करावी.

आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग यांनी आपसात समन्वय ठेवून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार म्हणाले,गुलेन बारी सिंड्रोम हा मज्जातंतूचा आजार असून या आजारामध्ये सुरुवातीला पोटाचे आजार जसे, जुलाब, उलटी, पोटदुखी किंवा श्वसन आजार जसे, की खोकला,सर्दी इत्यादी होते. आजार झाल्यानंतर पाच ते सात दिवसानंतर रुग्णालयाच्या हात पायाची ताकद कमी होते व रुग्णास चालता येत नाही व हात हलवता येत नाही आजार वाढल्यास श्वास घेण्यास त्रास होतो व रुग्णास व्हेंटिलेटर लावण्याची गरज भासू शकते या आजाराचे निदान नर्वे कंडक्शन स्टडी व ( सी एस एफ तपासणीद्वारे) पाठीच्या मणक्यावरील पाणी तपासून केले जाते.या आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर उपचार घ्यावेत या आजारातून बहुतांश रुग्ने बरे होतात असे त्यांनी सांगितले . ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये या आजाराचे सध्या १० प्रौढ रुग्ण व दोन लहान मुलं दाखल झाले आहेत. यामध्ये आठ पुरुष व चार स्त्रिया यांचा समावेश आहेत. सर्व रुग्णांना योग्य उपचार देण्यात येत आहेत. अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली.
बैठकीस,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. आर बी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. मीरा बोराडे,
बीजे मेडिकल विद्यालयाचे मायक्रोलॉजी विभाग प्रमुख राजेश कार्यकर्ते महाविद्यालयाचे मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. एच.डी. प्रसाद उपस्थित होते तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, साथरोग विभागाच्या सहसंचालक बबिता कमलापूरकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त, मनपा पाणी पुरवठा विभागाचे नंदकुमार जगताप दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.