Home Blog Page 450

98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधानच्या हस्ते उद्घाटन

0

छावा चित्रपटाचा बोलबाला सुरू आहे, त्याची सुरुवातही शिवाजी सावंतांनीच केली – पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली-राजधानी दिल्लीत आजपासून 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला थाटात सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनात आयोजित एका सोहळ्यात या संमेलनाचे उद्घाटन झाले. हे संमेलन रविवारपर्यंत चालेल. आज दिल्लीत ग्रंथ दिंडी काढून या संमेलनाची शोभा वाढवण्यात आली. यावेळी विविध प्रकारे सजवण्यात आलेले चित्ररथ सर्वांचेच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा राजधानी दिल्ली येथे पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधताना मराठी भाषेतून संवाद साधला. यावेळी मराठी भाषेवरील आपले प्रेम देखील मोदींनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कार्यक्रमाला उपस्थित वरिष्ठ नेता शरद पावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तारा भवाळकर व समस्त मराठी भाषेचे विद्वान, ताराबाईंचे भाषण ऐकल्यावर मी म्हंटले ‘फार छान’ त्यावर त्यांनी पण मला गुजराती भाषेत उत्तर दिले.

देशाच्या आर्थिक राजधानी आणि राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी साहित्यिकांना माझा नमस्कार, असे मोदी यांनी मराठीमध्ये म्हटले. आज दिल्लीच्या धर्तीवर मराठी भाषेच्या या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एक भाषेपूर्ते मर्यादित नाही. संत तुकारामांच्या मराठीला दिल्ली अतिशय मनापासून नमन करते.

देशातील तसेच जगातील सर्व मराठी प्रेमिकांना या कार्यक्रमाचे शुभेच्छा देतो आणि आज तर जागतिक मातृभाषा दिवस आहे तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला, असे मोदी मराठीमध्ये म्हणाले. यावेळी मोदींनी संत ज्ञानेश्वरांच्या मराठी भाषेवरील ओळी देखील म्हणून दाखवल्या. मराठी भाषा अमृतापेक्षा जास्त गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेवर माझे जे प्रेम आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मी नेहमी मराठीमधील नवीन नवीन शब्दांना शिकण्याचा प्रयत्न करत असतो.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे माझे सौभाग्य

महाराष्ट्राच्या जमिनीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बी पेरले गेले होते आज ते शताब्दी साजरी करत आहे. संस्कृती जपण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या शंभर वर्षांपासून करत आहे. आरएसएसने जगण्याची प्रेरणा दिली आहे आणि संघांमुळेच मी मराठी भाषेशी जोडलो गेलो आहे. देशात तसेच पूर्ण जगात 12 कोटीपेक्षा जास्त मराठी लोक आहेत. त्यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम मला करता आले हे मी माझे सौभाग्य मानतो. भाषा केवळ संवादासाठी नाही तर संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजात जन्म घेते पण भाषा समाजाच्या निर्माणासाठी महत्त्वाची असते. यावेळी मोदी यांनी समर्थ रामदास यांचे मराठा तितुका मेळावा, याचे वाक्य म्हणून दाखवले.

संतांनी मराठी भाषेतून समाजाला नवी दिशा दिली

मराठी एक संपूर्ण भाषा आहे. मराठीमध्ये शूरता आहे, वीरता आहे, सौन्दर्य आहे, संवेदना आहे, समानता आहे, समरसता आहे, अध्यात्माचे स्वर आहे आणि आधुनिकतेची लहर पण आहे, मराठी भाषेत शक्ती पण आहे युक्ती पण आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, गोरा कुंभार, बहिणाबाई अशा अनेक संतांनी मराठी भाषेतून समाजाला नवी दिशा दिली आहे. सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने देखील मोठा बदल घडवला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवा सारख्या वीर मराठ्यांनी शत्रूंना मजबूर केले. स्वातंत्र्याच्या लढाईत वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या सैनिकांनी इंग्रजांची झोप उडवली होती. केसरी आणि मराठा सारखे वृत्तपत्र, राम गणेश गडकरी यांचे नाटक, यातून स्वातंत्र्याचे काम केले.

छावा चित्रपटाचा बोलबाला

मराठी भाषेने वंचित लोकांना पुढे आणण्यासाठी देखील मोठे कार्य केले आहे. ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे महान कार्य केले आहे. मराठीने आपल्याला अनेक दलित साहित्यिक पण दिले. मराठी साहित्यात विज्ञान कथा देखील आहेत. महाराष्ट्राने किती प्रगती केली आपली मुंबई महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाची राजधानी म्हणून वर आली. मुंबई म्हटले की चित्रपटांचा विषय येतो. याच मुंबईने हिंदी चित्रपटांना देखील स्थान दिले. आज तर छावा चित्रपटाचा बोलबाला सुरू आहे. याची सुरुवात देखील मराठी लेखक शिवाजी सावंत यांनीच केले आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस – शरद पवार

शरद पवार म्हणाले, मराठी माणूस केवळ महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार फडकावला आहे. दिल्ली मध्ये दिसतो, हरियाणामध्ये दिसतो, गुजरातमध्ये दिसतो. देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस दिसून येतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. यावेळी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले याचा मला फार आनंद झाला आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे रसिक, साहित्यिक या सर्वांनी पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदींनी मिळवून दिले. 1954 साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावेळी देशाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी याचे उद्घाटन केले होते. मी जेव्हा याचे निमंत्रण देण्यासाठी गेलो तेव्हा मोदींनी एक मिनिट सुद्धा लावला नाही आणि महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आहे तर माझी उपस्थिती असणार आहे असे त्यांनी सांगून टाकले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनला महिला अध्यक्ष लाभल्या याचा मला आनंद आहे.

अंजली दमानियांच्या खात्यावर 25 कोटींचा बॅलन्स,NCP चा आरोप : तर दमानिया म्हणाल्या,लढणाऱ्यांचा हा मानसिक छळ, ताबडतोब चौकशी करा अन दोषीला शिक्षा करा

दमानिया म्हणाल्या,स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार ? CM/DCM माझ्या सगळ्या खात्यांची,मी भ्रष्ट असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे आणि नसेल तर मग ह्या सूरज चव्हाणला योग्य ती शिक्षा द्या

मुंबई-राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान पेटवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या खात्यावर 25 कोटींचा बॅलन्स टाकण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधीची माहिती पुराव्यांसकट उघड करण्याचा इशाराही दमानिया यांना दिला आहे. दरम्यान, अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाण यांचे आरोप धूडकावून लावत सरकारला थेट आपले बँक अकाउंट तपासण्याचे आव्हान दिले आहे.

अंजली दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख हत्याकांड व कृषि घोटाळ्यावरून मंत्री धनंजय मुंडे यांची पुरती कोंडी केली आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिमंडळाची मंजुरी नसताना खोटा शासन आदेश काढून कृषि खात्याची शेकडो कोटींची रक्कम लाटल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण यांनी उपरोक्त इशारा दिला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईच्या खात्यावर 25 खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला 15 देश फिरणाऱ्या आणि अडीच कोटी रुपयांचा टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई, कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला हे आम्ही पुराव्यांसह लवकरच बाहेर काढू, असा इशारा सूरज चव्हाण यांनी आपल्या एका पोस्टद्वारे दिला आहे.

दुसरीकडे, अंजली दमानिया यांनी या प्रकरणी सरकारला आपले खाते तपासण्याचे खुले आव्हान दिले आहे. त्या या प्रकरणी आपला संताप व्यक्त करताना म्हणाल्या, खूप राग आला आहे, तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना माझा थेट आव्हान. ताबडतोब माझी सगळीच्या सगळ्या खाती सरकारने तपासावी. कुठेही एक दमडी देखील unaccounted आहे का ते पाहावे.

इतका अमाप भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये? स्वतःच्या जिवाची पर्वा न करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार? राजकारणात पुढे जाण्यासाठी, नेत्याला खुश करण्यासाठी खालच्या पातळीला जाऊन हे बोलतात ना? योग्य आहे हे?

महाराष्ट्राच्या मीडियाला माझ्या लढ्याबद्दल जरा पण आदर असेल, तर अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्यावर आजच्या आज प्रतिक्रिया घ्यावी. दोघांनाही माझी विनंती, माझी ताबडतोब चौकशी करावी, माझ्या सगळ्या खात्यांची ताबडतोब चौकशी करावी. होऊन जाऊ दे. मी भ्रष्ट असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे आणि नसेल तर मग ह्या सूरज चव्हाणला योग्य ती शिक्षा द्यावी, असे दमानिया यांनी म्हटले आहे.

विक्रम गायकवाड खून प्रकरणी मोर्चानंतर पोलीस अधीक्षकांकडून एसआयटी ची स्थापना

  • केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार पीडित कुटुंबियांची भेट

पुणे : भोर येथील बौद्ध युवक विक्रम गायकवाड यांच्या आंतरजातीय विवाहतून झालेल्या हत्ये  नंतर आंबेडकरी चळवळीमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.  या पार्श्वभूमीवर दिनांक 18 फेब्रुवारी रोजी भोर तहसील कार्यालयावर जवळपास हजारो लोकांच्या उपस्थितीत निषेध मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाद्वारे पोलीस अधीक्षक यांना सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने आज पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची परशुराम वाडेकर, डॉ.  सिद्धार्थ धेंडे, राहुल डंबाळे यांचे सह प्रवीण ओव्हाळ, बाळासाहेब अडसूळ,  नवनाथ गायकवाड इत्यादींच्या प्रतिनिधी मंडळांनी भेट घेतली असता सदर प्रकरणी राज्य सरकार व जिल्हा पोलीस प्रशासन गंभीर असून आंदोलकांच्या मागणीच्या नुसार या प्रकरणी आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा  समावेश असलेले विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती  शिष्टमंडळाला पोलिस आधीक्षकांनी दिली.  या प्रकरणात फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर  कोणताही दबाव येऊ नये व त्यांना कोणतीही भीतीचे वातावरण वाटू नये यासाठी ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीनुसार फिर्यादीला व त्यांच्या कुटुंबीयांना 24 तास पोलीस संरक्षण पुरवण्याचे आदेश काढण्यात आल्याचे पंकज देशमुख यांनी सांगितले. तसेच  आजच जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडून सुमारे चार लाख 25 हजार रुपयांचा सहायता निधी पीडित मातेच्या नावावर वर्ग करण्यात आलेला आहे. केवळ पुनर्वसन नव्हे तर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होणे आवश्यक आहे तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही घटना होऊ नये यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करण्यात येणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर यांनी सांगितले यावेळी ते बोलताना म्हणाले की 22 फेब्रुवारी रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे देखील पीडित कुटुंबीयांची भेट घेणार असून ते याप्रकरणी योग्य तो न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याशी देखील बोलणार आहेत. 

अशा प्रकारच्या घटना समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी अत्यंत जबाबदारीने प्रकरणाला सामोरे जायला हवे व यातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्राथमिक तपास योग्य करण्यासाठी पोलिसांच्या सोबत काम केले पाहिजे अशी भूमिका डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मांडली. 
दरम्यान, अलीकडच्या काळात वाढत असलेल्या ऑनर किलिंग च्या घटनांमुळे तरुणांमध्ये मोठी भीती व संतापाची भावना असून सरकारने ऑनर किलिंग विरोधी कायदा तात्काळ करावा अशी मागणी राहुल डंबाळे  यांनी केली.

बांधकाम क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनासाठी स्टार्टअप्सची भूमिका महत्वपूर्ण-आयआयटी मुंबईचे प्रा. वेंकट कुमार

  ;  सॉफ्टटेक ग्लोबल आणि अँप्लिनेक्स्टच्या वतीने एआय-पावर्ड एईसीओ इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेचे आयोजन
पुणे: कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेपेक्षा मोठी नाही, परंतु योग्य वापर केल्यास ती मोठे बदल घडवू शकते. भविष्यात बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना आणि स्टार्टअप्सची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आयआयटी मुंबईचे प्रा. वेंकट कुमार यांनी केले.

सॉफ्टटेक ग्लोबल आणि अँप्लिनेक्स्ट यांच्या वतीने आयोजित एआय-पावर्ड एईसीओ इनोव्हेशन चॅलेंज २०२५ या स्पर्धेत देशभरातील एआय स्टार्टअप्सनी सहभाग घेतला. बालेवाडी येथील द ऑर्चिड हॉटेल मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत स्टार्टअप्सनी एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एईसीओ म्हणजेच आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, कंस्ट्रक्शन आणि ऑपरेशन्स क्षेत्रासाठी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण उपायांची प्रस्तुती केली. 
कार्यक्रमाला नॅसकॉमचे एआय प्रोग्राम डायरेक्टर माधव बिस्सा, सॉफ्ट टेक ग्लोबलचे संस्थापक विजय गुप्ता, ऑटोडेस्क एपीएसीचे संचालक निखिल बागलकोटकर आणि अँप्लिनेक्स्ट एईसीओ इनक्यूबेटरच्या सीईओ वर्षाराणी भगतपाटील उपस्थित होते.

माधव बिस्सा म्हणाले, स्पर्धेचे आयोजन एईसीओ क्षेत्राच्या सध्याच्या गरजेची पूर्तता करणारे आहे. अम्प्लिनेक्स्टने एक ओपन-इनोव्हेशन इकोसिस्टम कनेक्ट इव्हेंट यशस्वीरित्या आयोजित केला. यात सहभागी स्टार्टअप्स त्यांच्या एआय आधारित नाविन्यपूर्ण उपायांद्वारे बांधकाम क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तन प्रवासात महत्वपूर्ण योगदान देतील.

विजय गुप्ता म्हणाले, तंत्रज्ञानात मोठे सामर्थ्य आहे, परंतु त्याचा परिणाम त्याच्या उपयोगावर अवलंबून असतो. दुर्दैवाने, ऑटो आणि बांधकाम क्षेत्र तंत्रज्ञानाच्या संधींचा अद्याप पुरेपूर लाभ घेत नाही. त्यामुळे, या क्षेत्रातील एआय स्टार्टअप्ससाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

निखिल बागलकोटकर म्हणाले, डिजिटल परिवर्तनामुळे उत्पादकतेत मोठी वाढ झाली आहे. जे उद्योग डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करतात, ते अधिक व्यावसायिक यश मिळवतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव जागतिक स्तरावर विविध स्वरूपात जाणवतो, परंतु त्याचा स्वीकार करणाऱ्या कंपन्यांना त्याचा मोठा फायदा होतो.

या स्पर्धेत योको स्टाईल्सचे संस्थापक कासी विश्वनाथन यांनी प्रथम क्रमांक पटकावित १.५ लाखाचे पारितोषिक पटकाविले. विस्नेट एआय चे संस्थापक साई कृष्णा आणि लाॅजिक लेन्सचे संस्थापक अजय सतपथी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला तर  ओथोर एआय चे संस्थापक उन्नी कोरोथ आणि नेकेंद्र शेखावत, डेटारिन्यू चे संस्थापक तन्मय चक्रवर्ती यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

वर्षाराणी भगत पाटील म्हणाल्या, अँप्लिनेक्स्ट नव्याने उदयोन्मुख होणाऱ्या स्टार्टअप्सना तांत्रिक सहाय्य, वित्तपुरवठा आणि बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत करत आहे. एआय आणि नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने, स्टार्टअप्ससाठी धोरणात्मक भागीदारी उपलब्ध करून दिली जाते. या स्पर्धेमुळे नवउद्योजकांना त्यांची उत्पादने व्यावसायिकरित्या विकसित करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जनता बँकेचा अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारोह शनिवारी


पुणे : जनता सहकारी बैंक लि., पुणे या बँकेची स्थापना १८ ऑक्टोबर १९४९ रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर रा.स्व. संघाच्या प्रेरणेतून आणि श्रध्येय मोरोपंत पिंगळे यांच्या संकल्पनेतून झाली. बँकेचे हे ७५ वे वर्ष असून अमृत महोत्सवी वर्ष असून अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभ, शनिवार, दि. २२ फेब्रुवारी, २०२५  दुपारी ०२.०० वाजता स्व. विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह, माळवाडी, हडपसरयेथे आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमितभाई शहा असणार आहेत, अशी माहिती बँकेचे  अध्यक्ष रवींद्र हेजीब यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
पत्रकार परिषदेला बँकेच्या उपाध्यक्ष अलका पेटकर, संचालक मकरंद अभ्यंकर, मंदार फाटक, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप, उपमहाव्यवस्थापक निलेश देशपांडे आदी उपस्थित होते. 
सांगता समारोह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. 
अमृत महोत्सवी शुभारंभ कार्यक्रम दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र‌ फडणवीस, उच्च तंत्रज्ञान व शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व सज्जनगड पूज्यनीय भुषण स्वामीजी यांच्या उपस्थित संपन्न झाला होता. 

महाराष्ट्रातील १३ जिल्हे व गुजरात मधील जिल्हा येथे आजमितीस बँकेच्या एकूण ७१ शाखा व २ विस्तारीत कक्ष कार्यरत आहेत. बँकेच्या एकूण ठेवी रु. ९६२६ कोटी व कर्जे रु. ५६६४ कोटी एवढी असून एकूण मिश्र व्यवसाय १५,२९० कोटी एवढ़ा झालेला आहे. बँकेचा सीआरएआर १४.२७% एवढा आहे तसेच अग्रक्रम व दुर्बल क्षेत्रातील कर्ज पुरवठा अनुक्रमे ६६.८८% व ७.०४% एवढा आहे.

बँकेच्या संचालक मंडळावर १७ संचालक असून त्यामध्ये चार्टर्ड अकाऊंटंट, निवृत्त बैंकर, कायदेतज्ञ, शेती, सहकार इ. विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. संचालक मंडळात ९४% पेक्षा जास्त प्रोफेशनल डायरेक्टर्स कार्यरत आहेत. नागरी सहकारी बँक क्षेत्रात १९७८ साली बँकेने देशात सर्वप्रथम रत्नागिरी अर्बन कॉ. ऑपरेटीव्ह बँक या नागरी बँकेचे विलीनीकरण करून रत्नागिरी जिल्ह्यातील ठेवीदारांचा सहकारी बँकिंग वरील विश्वास कायम ठेवण्यात यश मिळवले, यानंतर बँकेने अनेक बँकांचे विलीनीकरण समाधानकारकरित्या पूर्ण केले.

सन १९८८ मध्ये रु. १०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करून बँकेला शेड्युल्ड दर्जा प्राप्त झाला. संपूर्ण देशामध्ये नागरी सहकारी बँक म्हणून सन १९९८ पासून डीपॉजीटरी सेवा देण्यास सर्व प्रथम प्रारंभकेला. आजमितीस सीडीएसल आणि एनएसडीएल या दोन्ही डीपी संदर्भात डीपॉजीटरी सेवा बँक देत आहे. बँकेने सन २००३ पासून स्वतःचे अद्‌यावत डेटा सैंटर सुरु केले आहे. त्यास आय.एस.ओ. २००१ व २५००१ ही मानांकने प्राप्त केलेली आहेत.
त्यांनतर सन २०१२ मध्ये बँकेने गुजरात राज्याच्या साबरकांठा जिल्ह्‌यातील खेडब्रम्हा नागरी सहकारी बँकेचे विलीनीकरण करून जनता बँकेने मल्टीस्टेट बँकेचा दर्जा प्राप्त केला. पारंपारिक बैंकिंग सेवांबरोबरच बैंक सर्व प्रकारच्या टेक्नो बेस सव्हींसेस ग्राहकांना देत आहे. यामध्ये इंटरनेट बैंकिंग, मोबाईल बैंकिंग, भौम जेट पे, डी-मॅट, मुच्युअल फंड, ट्रेजरी, डीजीटल बँकिंग, विदेश विनिमय व्यवहार, इन्शुरन्स सेवा, अटल पेन्शन योजना व प्रधान मंत्री सुरक्षा व जीवनज्योती विमा योजना इ. विविध सरकारी योजना सेवांचा समावेश आहे.

सध्याच्या परिस्थितीत जनता बँकेच्या एकूण व्यवहारापैकी ५०% व्यवहार है डिजीटल व्यवहारातून होत आहेत. बँकेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात, अर्थमंत्रालय‌द्वारा अटल पेन्शन योजना अंतर्गत संपूर्ण भारतात (in Urban Co-operative Bank Category) सर्वाधिक खाते उघडण्यासाठी बँकेच्या CEO ना वित्त मंत्रालयाने जनता बँकेला केंद्र सरकारच्या पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅन्ड डेवलपमेंट ऑथोरिटी (PFRDA) द्वारे उत्कृष्ट नेतृत्वाचा (Excellent Leadership) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आणि त्यासोबतच, जजता मध्ये Beat the Best and Be the Best पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच जनता बँकेला CIBIL (क्रेडीट इन्फोर्मेशन कंपनी) कडून सर्वोत्कृष्ट डेटा गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

बँकेच्या भविष्यकालीन पथ मार्गक्रमणामध्ये मुख्यता AI चा उपयोग करून तंत्रज्ञानाची सुधारणा करणे, वित्तीय सामावेशनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या “हर घर विकास” या स्वप्नाचा साकार होण्यात योगदान देणे, अप्रयुक्त बैंकिंग क्षेत्रांमध्ये बँकिंग सेवा उपलब्ध करणे, सुलभ बैंकिंग, सामाजिक जबाबदारीची भावना जपून, तसेच उच्चत्तम पारदर्शकता आणि उत्कृष्ट व्यावसायिक वाढ सुनिश्चित करणे याचा समावेश आहे.

“आपली पीएमपीएमएल” या मोबाईल अॅपच्या बनावट अॅप पासूनसावध रहाः पीएमपीएमएल चे प्रवाशांना आवाहन

पुणे-पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या “Apli PMPML” या मोबाईल अॅपच्या बनावट अॅप ची जाहिरात यु-
ट्युब वरील काही चॅनल्स, टेलिग्राम, फेसबुक, इन्स्टा या समाजमाध्यमांवर काही अपप्रवृत्तीच्या व्यक्तींकडून
पीएमपीएमएल प्रवाशांची दिशाभूल व आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न केला जात आहे.त्यांच्या पासून प्रवाशांनी सावध राहावे असे आवाहन PMPMLने केले आहे. या संदर्भात PMPML असे सांगितले कि,’ “Apli PMPML” या मोबाईल
अॅपच्या बनावट अॅप ची जाहिरात करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरूद्ध पोलीस प्रशासनाच्या सायबर सिक्युरिटी सेल
विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. सायबर सिक्युरिटी सेल व पीएमपीएमएल ची तांत्रिक विश्लेषण टीम
बनावट अॅपच्या जाहिरातींवर बारीक लक्ष ठेवत असून यामध्ये दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर आय.टी. अॅक्टनुसार कडक
कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.यु-ट्युब, टेलिग्राम, फेसबुक, इन्स्टा या समाजमाध्यमांवर बनावट अॅप ची जाहिरात करणाऱ्या अपप्रवृत्तीच्या
व्यक्ती, आम्ही तुम्हाला “Apli PMPML” चे बनावट अॅप देतो त्यावरून तुम्ही पैसे न देता पास काढू शकता अशा
भूलथापा देवून बनावट अॅप ची विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे पीएमपीएमएल प्रवाशांची आर्थिक
फसवणूक होण्याची शक्यता आहे. तरी प्रवाशी नागरिकांनी समाजमाध्यमांवरील “Apli PMPML” या मोबाईल
अॅपच्या बनावट अॅपच्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.
तसेच पीएमपीएमएल चे बनावट अॅप वापरताना कोणी आढळल्यास अशा व्यक्तींविरूद्ध देखील कडक कायदेशीर
कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.

भाषिक नाट्य महोत्सवांची गरज – दिग्दर्शक वामन केंद्रे

१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात

पुणे-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. दीप प्रज्वलनानंतर श्रीफळ वाढवून नटराजाच्या चरणी नतमस्तक होत या महोत्सवाचा शुभारंभ झाल्याची  घोषणा करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक.वामन केंद्रे, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांसोबत नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे तसेच कार्यकारिणी सदस्य आणि नियामक मंडळ सदस्य उपस्थित होती. नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे, शशी प्रभू यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देत सन्मान करण्यात आला.‘मराठी व्यतिरिक्त इतर भाषेत वावर असणारे दिग्दर्शक वामन केंद्रे, अभिनेते मोहन आगाशे,अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांसारख्या मान्यवरांचा वावर या नाट्य महोत्सवात असणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी यावेळी सांगितले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून त्याला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, असा आशावाद अजित भुरे यांनी व्यक्त केला. 

‘या नाट्यमहोत्सवाचा भाग होता आल्याचा आनंद नक्कीच आहे. मराठी नाटकाशी असलेल्या नात्याचा मला अभिमान आहेच. इतरत्र काम करताना मराठी नाटकाच्या समृद्ध वारसाकडे आदराने पहिले जाते तेव्हा मन खऱ्या अर्थाने सुखावते, अशी भावना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली. मंचावर असलेली मान्यवर मंडळी प्रेरणास्त्रोत आहेत, त्यांच्यासोबत आज मला येथे उपस्थित राहायला मिळतंय हे खरंच भारावून टाकणार आहे. मी यापुढेही कायम रंगभूमीची सेवा करत राहणार, असं प्रतिपादनही सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी केलं.

याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे म्हणाले की, ‘आज एवढ्या वर्षानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या प्रयत्नांमुळे मराठी भाषेव्यतिरिक्त एवढा मोठ्या नाट्यमहोत्सवाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले हे खरंच कौतुकास्पद आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आपल्या ध्येयाच्या दिशने ज्या पद्धतीने एक एक पाऊल पुढे टाकते आहे, त्यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजॆ. जग झपाट्याने बदलत चाललं आहे  त्यासाठी नाटकाच्या माध्यमातून मराठीच्या बाहेर जाऊन बघण्याचा प्रयत्न तितक्या गांभीर्याने आजवर झाला नाही. वेगवेगळ्या भाषेच्या नाटकाच्या माध्यमातून दृष्टिकोन बदलण्याची सुरवात करता येऊ शकते. त्यासाठी अशा नाट्यमहोत्सवाची अत्यंत गरज होती, ही सुरुवात आहे. संघटनेत वेगवेगळ्या विचारधारेची माणसं एकत्र आली की  बदल घडायला  सुरुवात होते.  हे बदल आज एवढ्या वर्षाने प्रकर्षाने दिसू लागले आहेत त्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित होणाऱ्या प्रत्येक उपक्रमाचं कौतुक झालं पाहिजे.

कार्यक्रमाच्या अखेरीस नाट्य परिषदेचे सहकार्यवाह दिलीप कोरके यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि रसिकांचे आभार मानले. अक्षरिक (बंगला) अनीक  थिएटर, कोलकता या नाटकाने या महोत्सवाची सुरुवात झाली. २० फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत भारतीय भाषांमधील हा नाट्य महोत्सव यशवंत नाट्य मंदिर, जयश्री आणि जयंत साळगांवकर प्रायोगिक रंगमंच, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह  या ठिकाणी रंगणार आहे. बंगाली, तामिळ, इंग्रजी, मराठी अशा वेगवगळ्या भाषांमधल्या नाटकांचं सादरीकरण या विशेष नाट्य महोत्सवात होणार आहे.

मुंढव्यातील महात्मा फुले चौकात उड्डाण पुलासाठी तरतूद करा …आयुक्तांना साकडे

पुणे-महात्मा फुले चौक, मुंढवा येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पूर्णतः तरतूद करावी अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे,तसेच समीर तुपे,दिलीप व्यवहारे,गिरीष गायकवाड यांनी केली आहे.
महात्मा फुले चौक, मुंढवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सतत वाहतूक कोंडी होत असते. यामुळे वारंवार अपघात होउन शेकडो लोक जखमी झाले, आणि अनेक लोक मुत्युमुखी पडले आहेत. तसेच सदर महात्मा फुले चौक, मुंढवा येथून १०० मी अंतरावर लोणकर माध्यमिक विद्यालय व १५० मी अंतरावर राजर्षी शाहू महाराज विद्यालय आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला तेथील विद्यार्थ्यांना महात्मा फुले चौक पार करण्यासाठी जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. पालकही मुले घरी येईपर्यंत तणावाखाली असतात. त्याचप्रमाणे केशवनगर मधील रहिवाशी किंवा खराडी येथील रहिवासी यांची अडचण तसेच नगर रोडवरील वाहतूक सोलापूर रोडकडे जाण्यासाठी याच चौकामधून जात असल्याने येथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यांना अर्धा तास महात्मा फुले चौकातील सिग्नलला थांबणे अनिवार्य आहे.यासर्व समस्यांवर उपाय म्हणजे याठिकाणी वाहनांसाठी उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. तसेच पादचाऱ्यांसाठी व्यवस्थित रित्या मार्गक्रमण होण्यास तशी सोय यामधे उपलब्ध असणे अतिशय गरजेचे आहे. महापालिकेच्या सन 2025 -26 च्या अंदाजपत्रकामधे जनतेच्या आग्रहास्तव तरतूद करण्यात यावी. अशी मागणी करीत आहोत. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीतून पुणे महानगरपालिकेला वेळेवर मिळकतकर भरणार्‍या नागरिकांची सुटका करावी हि विनंती. अन्यथा वर्षानुवर्ष त्रास सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसेल याची नोंद घ्यावी.

ओवी, अभंग, आर्या आणि तरुणाईचे रॅप.. महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये सुरू आहे मराठी साहित्ययात्री संमेलन

0


महादजी शिंदे एक्सप्रेसमधून (पुणे ते दिल्ली साहित्ययात्रा) : संत ज्ञानेश्वर महाराज यांची ओवी, संत तुकाराम महाराज यांचे अभंग, मोरोपंतांची आर्या, आणि तरुणाईची आधुनिक मराठी गीते, मराठी रॅप अशा विविधांगी कार्यक्रमांनी महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये उल्हासित वातावरण आहे.
98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निघालेल्या पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून संमेलनाचा आजचा दुसरा दिवस आहे.
देवा चांगभलं रं…, जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीतापासून गण, गवळण, अभंग, भक्तीगीते, भावगीते, लावणी, हिंदी चित्रपट गीते आणि अगदी मंगलाष्टकांपर्यंत विविध प्रकारांचे सादरीकरण सुरू आहेे. मोठ्या उत्साहात साहित्यिक आणि साहित्य रसिक या फिरत्या चाकांवरील संमेलनात सहभागी झाले आहेत. साहित्य संमेलनात महाराष्ट्र आणि साहित्य या संदर्भात घ्यायच्या प्रश्नमंजुषेची तयारी देखील उत्साहात सुरू आहेत.
ओळख अहिल्याबाईंची..
साताऱ्याहून खास संमेलनासाठी आलेल्या जयश्री माजगावकर यांनी अहिल्याबाई होळकर यांची वेशभूषा साकारली आहे. येणाऱ्या पिढीला अहिल्याबाईं होळकर यांच्या कार्याची ओळख व्हावी या उद्देशाने ही वेशभूषा साकारली असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेत साहित्यिक आणि साहित्य रसिक विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करत आहेत; ज्यामुळे प्रवास सुकर होत असल्याची भावना प्रवासी व्यक्त करीत आहेत.
हवामानाचा ठोसा
अंघोळीची गोळी आणि खिळे मुक्त झाडे या अभियानाचे प्रमुख माधव पाटील यांच्या ‌‘हवामानाचा ठोसा‌’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण विविध साहित्यिक आणि रसिकांच्या हस्ते या प्रवासात करण्यात येत आहे. हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी आपण छोट्या-छोट्या कृती स्वत: करून सुधारणा करू शकतो या भावनेने हवामान बदलावर करता येणारे उपाय या विषयी ‌‘हवामानाचा ठोसा‌’ हा उपक्रम राबविला जात असल्याचे माधव पाटील यांनी यावेळी सांगितले.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा…
महादजी शिंदे एक्स्प्रेसमध्ये नव साहित्यिकांचा उत्साह आणि ज्येष्ठ साहित्यिकांचे अनुभवविश्व यांचा सुरेख मेळ साधला गेला आहे. चारोळी ते कीर्तन आणि अभिजात ते संस्कृतीरक्षण अशा विविध विषयांना हात घालत होता. फिरत्या चाकांवरचे संमेलन दिल्लीच्या दिशेने पुढे चालले आहे. 16 डब्यांच्या रेल्वेत प्रत्येक डब्यात छोट्या-मोठ्या समुहांद्वारे स्वतंत्र उपक्रम सुरू आहेत. पुण्याच्या अनुबंध प्रकाशनच्या अस्मिता कुलकण, साहित्य प्रेमी भार्गवी कुलकण, डॉ. हनुमंत जाधवर, वसंतराव जाधवर आदींनी स्वरचित कवितांची मैफल रंगविली. औदुंबर येथील 8-9 भावंडांच्या जोशी कुटुंबांचे सदानंद साहित्य मंडळ प्रकाशन संस्थेत कार्यरत आहे. त्यातील चार-पाच भावंडांनी सहकुटुंब या संमेलनाच्या प्रवासात सहभाग घेत कथा-कथन, कविता वाचन आदींचा जागर केला आहे.
लोगो साकारणारे प्रसाद गवळी यांचा कुटुंबियांसह संमेलनात
लोणी काळभोरहून निघालेल्या प्रसाद गवळी यांनी साहित्य संमेलनाचा लोगो डिझाईन केला आहे. त्यांचा विशेष सन्मान या संमेलनाच्या निमित्ताने होणार आहे. हा सन्मान स्वीकारायला गवळी यांच्या कुटुंबियांसह त्यांचे 14 महिन्यांंचे बाळही आहे. तबला-पेटीच्या संगतीने वामनदादा कर्डकांच्या पोवाड्यापासून अगदी हिंदी चित्रपट गीतांच्या गाण्यांपर्यंत येऊन रंगतो आहे. महाराष्ट्राच्या विविध गावातून सहभागी झालेल्यांमध्ये लेखक, प्रकाशकांसह, युवा साहित्य प्रेमींचा उत्साह दांडगा आहे.
उत्साह आणि उत्सुकता
दिल्लीतील संमेलनाच्या उद्घाटन सत्रात नृत्य सादरीकरणासाठी पुण्याच्या मराठी भाषा संवर्धन समुहाच्या 18 ते 22 वर्षे वयोगटातील 30 मुलांचा सहभाग आहे. त्यांनाही सादरीकरणाची उत्सुकता आणि उत्साह असल्याचे जाणवले. नाशिकच्या ‌‘गोदावरी‌’ समुहाच्या पाचवी ते आठवीतील आठ मुली नृत्य सादरीकरणासाठी रेल्वेमध्येच हातांवर मेहंदीची नक्षी काढण्याचा गर्क आहेत.
सोयी-सुविधांबाबत संजय नहार यांच्याविषयी कृतज्ञता
महादजी शिंदे रेल्वेने पुणे ते दिल्ली प्रवास करणाऱ्या साहित्यिकांनी व साहित्य रसिकांनी रेल्वेत ठेवलेल्या बडदास्तीविषयी समाधान व्यक्त केले आहे. संमेलनाचे आयोजन सरहदचे संस्थेचे संजय नहार आणि त्यांच्या सर्व मदतनीसांची सर्वांनीच मुक्तकंठाने स्तुती करत त्यांच्या विशेषी कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.

माणिकराव कोकाटे व धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा: हर्षवर्धन सपकाळ.

मुंबई, दि. २० फेब्रुवारी २५
भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार करताना सर्व मर्यादा सोडल्याचे उघड झाले आहे. आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांना मंत्रीमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

संदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना केलेल्या घोटाळ्याचा दररोज पर्दाफाश होत आहे. मुंडे यांच्या भ्रष्ट कारभाराने महाराष्टाच्या नावाला कलंक लागला आहे. आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. यातून काही बोध घेऊन तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंना बरखास्त करायला हवे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची धमक नाही.

भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्टाचार करुन जनतेच्या पैशाची लुट करत आहे. एकीकडे राज्यातील शेतकरी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या करत असताना राज्यातील मंत्री मात्र कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोभणारे नाही. मुंडे व कोकोटे हे दोन्ही मंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत पण उपमुख्यमंत्री अजित पवार या भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी हिम्मत दाखवून भ्रष्ट मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना एका बोगस प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा झाली होती तेव्हा वायुवेगाने चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द केली व घर काढून घेतले होते त्याच वेगाने कोकाटे यांच्यावर कारवाई कधी होणार असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

आता न्यायालयाऐवजी रस्त्यावरची लढाई लढू ; आमदार सतेज पाटील…

कोल्हापूर-शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून, हा महामार्ग रद्द व्हावा या मागणी करिता12 मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केलं. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकित ते बोलत होते..

शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाली. यावेळी बोलताना त्यांनी, शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
राज्यात सत्तेत असणाऱ्या लोकांना कोल्हापूरची मोठी धास्ती होती, म्हणून कोल्हापुर पूर्ता महामार्ग रद्दचा निर्णय सत्तेतील काही मंत्र्यांनी जाहीर केला. मात्र याला कायदेशीर आधार नाही. सरकार मध्ये राहायचं, आणि त्यांच्याच मंत्र्यांनी आणि आमदारानी
वेगवेगळी स्टेटमेंट करायचं हे सरकारच षडयंत्र असल्याची टिकाही आमदार सतेज पाटील यांनी केली.
गोव्याकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्या असताना सुद्धा शक्तीपिठ का लादला जातं आहे.. 86 हजार कोटीचा हा प्रकल्प असल्याचं सांगण्यात येत आहे. एवढी मोठी रक्कम पाहता
एका किलो मीटरला, 110 कोटींचा खर्च येणार आहे…शक्तिपीठ मध्ये कोण फित्तुर होऊ नये यासाठी काळजी घेऊया..न्यायालयात जाण्याऐवजी ही लढाई रस्त्यावर करुया.. असंही त्यांनी सांगितलं. येणाऱ्या अधिवेशनात महाविकास आघाडी म्हणुन आम्ही सर्व जण ताकतीने प्रश्न मांडू.. आपापल्या जिल्हयातील आमदारांचे शक्तीविरोधाबाबत पत्र घ्या. शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा हा प्रकल्प असुन अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात 12 मार्चला
भव्य मोर्चा काढण्याचही आम. सतेज पाटील यांनी जाहिर केल. शेतकऱ्यांची ताकत सरकारला दाखऊन देऊ.. मोठया संख्येने या मोर्चात सहभागी व्हा. असं आवाहनही त्यांनी केलं.
ठाकरे गटाचे कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी, शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्याच्या भावना तीव्र आहेत. आता या लढ्याला कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे.
कोणत्याही अधिकाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत राज्य, महायुती सरकारला चालवायचं होतं. मात्र शेतकऱ्यावर अन्याय सुरू आहे. हे सरकार गोरगरीब लोकांना मदत करणारे नाही. कधीही पोट न भरलेली, माणस मंत्री मंडळात आहेत. त्यांना सर्व सामान्यांशी देणंघेणं नाही. अशी टिकाही त्यांनी केली.शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी, सामाजिक न्यायासाठी कोल्हापूर भूमी ओळखले जाते..शक्तीपीठालां होणारा विरोध पाहून सत्ताधिस हादरले आहेत.
राज्यातील दहा जिल्हातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे.एकाही आमदार बरोबर बैठक झाले नसताना बैठक झाल्याचे मुख्यमंत्री खोटे सांगत असून शेतकर्यांचे शेतजमिनी काढून घेण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप केला. भाजपचे कोण कंत्राटदार आहेत त्यांच्या नावा निशी त्यांचा भांडा फोड करण्याचा इशाराही गिरीश फोंडे यांनी दिला. लातूर जिल्हयातील गजेंद्र यळकर यांनी, शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या जात आहेत. नदीजोड सारखे प्रकल्प द्या बागायती जमिनीवर आरक्षण टाकणारे प्रकल्प नको. अशी मागणी केली.
सोलापूर येथील शेतकरी विजयकुमार पाटील यांनी, कोल्हापूर जिल्हा सोडुन इतर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध नसल्याच भासवण्यात येत आहे. मात्र सोलापूर जिल्हातूनही आमचा शक्ती पिठाला विरोध आहे. त्यामुळं सरकारनं दिशाभूल करू नये. असं सांगीतल.
आमच्या जमिनी आमदारांच्या बापाच्या आहेत काय. असा परखड सवालही त्यांनी केला..परभणी येथिल शेतकरी शांतिभूषण कचवे यांनी, शक्तिपीठ लादू नका अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल. असा इशारा दिला. सांगली येथिल घनशाम नलवडे यांनी, शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा हा महामार्ग असल्याचं सांगितलं.हिंगोली येथिल सूरज माळवाड यांनी, देखिल हिंगोली जिल्ह्यातून आमचा विरोध असल्याच सांगीतल. नांदेड येथील कचरू मुढळ यांनी, शक्तिपीठ महामार्ग लादल्यास आम्हीं प्राणाचं बलिदान देऊ. असा इशारा दिला. धाराशिवनगर येथिल संभाजी फडतारे यांनी, आम्ही आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नाही. शक्तिपीठ रद्द करा. अशी मागणी केली. यावेळी धाराशिवनगर येथिल सुदर्शन पडवळ, कणेरीवाडी येथील आनंदराव भोसले या शेतकऱ्यांनीही मनोगत व्यक्त केल. या बैठकीला, आमदार जयंत आसगावकर, कॉम्रेड शिवाजी मगदूम,शेतकरी संघाचे संचालक सर्जेराव देसाई, बीडचे शेतकरी लालासाहेब शिंदे, हिंगोलीचे बापूराव ढेरे , नांदेडचे सुभाष मारेलवर, विक्रांत पाटील किणीकर, गोकुळ संचालक प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, बिद्री कारखान्याचे संचालक आर एस कांबळे, उत्तम सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

डॉ. कुमार सप्तर्षी यांना बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार.

२३ फेब्रुवारी  रोजी  गांधी भवन येथे पुरस्कार वितरण सोहळा 

पुणे:बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे दिला  जाणारा ‘बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना जाहीर झाला असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव डॉ.अशोक बेलखोडे, समन्वयक डॉ.सोमनाथ रोडे यांनी पत्रकाद्वारे दिली.हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार,दि.२३ फेब्रुवारी  रोजी  सायंकाळी  ४ वाजता गांधी भवन (कोथरूड, पुणे) येथे होणार आहे. 
जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक जी.जी.पारीख आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुहिता थत्ते, रुकय्या जोशी यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक डॉ.अच्युत गोडबोले यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे. महारोगी सेवा समिती, आनंद वन चे अध्यक्ष डॉ विकास आमटे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
याच  कार्यक्रमात ‘बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार’ देवून ओरिसा येथील सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन दास आणि कोल्हापूर येथील हसन फत्तेखान देसाई यांना संयुक्तपणे गौरविण्यात येणार आहे.  देसाई हे बाबा आमटे यांच्या दोन्ही भारत जोडो सायकल अभियानातील सायकल यात्री आहेत.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,विचारवंत, युवक क्रांती दलाचे संस्थापक  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सप्तर्षी यांनी अनेक दशके महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य केले आहे.  ते ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ या संस्थेचे अध्यक्ष असून ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे ते संपादक आहेत. तसेच दास हे प्रसिद्ध गांधीवादी ‘एस. एन. सुब्बाराव’ यांच्या पासून प्रेरित ‘राष्ट्रीय युवा योजना’ या संघटनेचे संचालक आहेत तर देसाई हे राष्ट्र सेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते आणि समाजसेवक आहेत.

पुण्यात गोदरेज एडन इस्टेट येथे भारतातील पहिला 3D-प्रिंटेड G+1 व्हिला सादर

पुणे-भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (GPL) ने  त्वस्ता इंजिनिअरिंगच्या सहकार्याने पुण्यातील माण हिंजवडी येथील गोदरेज एडन इस्टेटमध्ये भारतातील पहिला 3D-प्रिंटेड G+1 व्हिला सादर केला आहे. अत्याधुनिक 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा लाभ घेत, कंपनीने डिझाइन, कार्यक्षमता आणि शाश्वततेमध्ये नवीन मापदंड प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक मोठे यश संपादन केले असून रिअल इस्टेट उद्योगासाठी परिवर्तनात्मक पाऊल ठरले आहे.

अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्राचा वापर करून उभारलेले हे व्हिला 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून गृहनिर्माणामध्ये क्रांती घडविण्याची क्षमता दर्शवते. जून 2024 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाची पूर्णता केवळ चार महिन्यांत झाली. यावरून बांधकामात 3D प्रिंटिंगच्या गती आणि कार्यक्षमतेचा प्रत्यय येतो. संगणक-निर्मित डिझाइनचा वापर करून विशेष साहित्याद्वारे संरचना स्तरानुसार उभारण्यात आली. त्यामुळे अचूकता आणि टिकाऊपणा सुनिश्चित करत बांधकामाचा कालावधी, साहित्याचा अपव्यय आणि श्रमखर्च मोठ्या प्रमाणावर कमी झाला. या वास्तुशास्त्रीय नवकल्पनेने आधुनिक सौंदर्यशास्त्र आणि शाश्वत डिझाइन यांचा मिलाफ साधत समकालीन निवासी जागांची पुर्नभाषा करणारे घटक सादर केले आहेत.

3D-प्रिंटेड व्हिलाची मुख्य वैशिष्ट्ये:

• प्रगत अल्गोरिदमचा वापर करून व्हिलाची ऑर्गनिक आणि प्रवाही रचना तयार करण्यात आली असून त्यामुळे रचनात्मक अखंडता आणि दृश्यात्मक आकर्षण वाढते.

• नैसर्गिक प्रकाश अधिकाधिक वापरण्यासाठी तयार केलेले वैशिष्ट्य. त्यामुळे ऊर्जा वापर कमी होतो आणि मोकळेपणा व विस्ताराची अनुभूती मिळते.

• पारंपरिक सरळ जिन्यांना पर्याय म्हणून हे शिल्पाकृती घटक घराच्या अंतर्गत सजावटीत कलात्मक आणि प्रभावी छाप सोडतात.

• निसर्गाने प्रेरित व्हीलाच्या प्रवाही रचना आपल्या आजूबाजूच्या परिसरासोबत सहज एकरूप होऊन सौहार्द आणि कल्याणाची भावना निर्माण करतात.

• 3D प्रिंटेड आर्किटेक्चरची खासियत असलेला स्तरीय बाह्य नमुना तंत्रज्ञानाच्या अचूकतेचे प्रदर्शन करतो आणि संरचनेस अनोखा वैशिष्ट्यपूर्ण आणि भविष्यकालीन लुक प्रदान करतो.

हे यश भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात 3D प्रिंटिंगच्या व्यापक स्वीकृतीसाठीचा मार्ग मोकळा करते आणि अधिक स्मार्ट, अधिक शाश्वत शहरांच्या विकासाला गती देते. प्रगत डिझाइन तत्वे आणि पर्यावरणपूरक बांधकाम तंत्र यांचे एकत्रीकरण करून गोदरेज प्रॉपर्टीज आधुनिक जीवनशैलीच्या संकल्पना पुन्हा परिभाषित करत आहे आणि भारतातील गृहनिर्माण क्षेत्राचे भविष्य घडवत आहे.

या ऐतिहासिक टप्प्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना गोदरेज प्रॉपर्टीजचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर विकास सिंघल म्हणाले, “गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये आम्ही रिअल इस्टेटमध्ये नाविन्यपूर्णता  आणि शाश्वततेच्या सीमा सतत पुढे नेण्यास वचनबद्ध आहोत. गोदरेज एडन इस्टेट येथे भारतातील पहिले 3D-प्रिंटेड व्हिला सादर करणे हे भविष्यकालीन, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींच्या दिशेने असलेल्या आमच्या दृष्टीकोनाची पावती आहे. 3D प्रिंटिंग मध्ये गृहनिर्माण क्षेत्रात वेगवान, अधिक अचूक, लक्षणीयरित्या अधिक शाश्वत आणि ऊर्जा कार्यक्षम वैशिष्ट्यांचा समावेश करून प्रकल्पाचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्याची क्षमता आहे. भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात या तंत्रज्ञानाची ओळख करून देताना आम्हाला अभिमान वाटतो आणि भविष्यात त्याच्या आणखी उपयोजनांचा शोध घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांना मातृशोक

 बीव्हीजी परिवार हळहळला

पुणे (प्रतिनिधी) : बीव्हीजी इंडियाचे चेअरमन हणमंतराव गायकवाड व त्यांना साथ देणारे बंधु डॉ. दत्तात्रेय गाकवाड यांच्या मातोश्री सिताबाई रामदास गायकवाड (वय ७०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने गायकवाड परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उद्या दि. २१ रोजी सकाळी ८:३० वा. पिंपळे गुरव स्मशान भुमी येथे त्यांचा तिसरा विधी संपन्न होणार आहे.

गायकवाड परिवारासाठी मोठा धक्का

सिताबाई गायकवाड यांचे निधन हे गायकवाड परिवारासाठी मोठा  भावनिक धक्का आहे. पुणे महानगर पालिकेच्या शिक्षण मंडाळामध्ये सिताबाईंनी प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवा बजावली होती. पती रामदास यांच्या निधनानंतर अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी मोठा मुलगा हणमंतराव यांना अभियांत्रिकी विभागाचे शिक्षण दिले. धाकटा मुलगा दत्तात्रेय  यांना डॉक्टर बनवले होते. आईच्या मार्गदर्शनामुळे भारत विकास गृप (बीव्हीजी) हा १ लाख नागरिकांना रोजगार देण्यात यशस्वी ठरल्याचे हणमंतराव गायकवाड नेहमी त्यांच्या भाषणाद्वारे सांगत असतात. आईच्या निधनानंतर बीव्हीजी परिवाराने हळहळ व्यक्त केली आहे.

सांप्रदायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य

सेवा निवृत्तीनंतर पिंपळे गुरव परिसरात सिताबाई या सांप्रदायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत होत्या. महिला भजन  मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सुधारणावादी उपक्रम राबवले. सांगवी परिसरातील बहुसंख्य नागरिकांना अयोध्येतील प्रभू श्री राम मंदीराचे दर्शन स्व:खर्चाने घडवले होते.

विविध क्षेत्रातून श्रद्धांजली

देश विदेशातील उद्योग, आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी गायकवाड कुटूंबीयांना आधार देण्यासाठी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

वीजदर निश्चितीकरणासाठी पुण्यात दि. २७ ला जाहीर ई-सुनावणी

पुणे, दि. २० फेब्रुवारी २०२५:एकूण महसूली गरज व प्रस्तावित वीजदराच्या निश्चितीकरणासाठी महावितरण कंपनीने दाखल केलेल्या बहुवर्षीय वीजदर याचिकेवर मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वतीने गुरूवारी, दि. २७ फेब्रुवारीला पुणे येथील महाराष्ट्र शासकीय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (सीओइपी) मुख्य सभागृहात (ई-सुविधा केंद्रात) जाहीर ई-सुनावणी होणार आहे. या सुनावणीला सकाळी १०.३० वाजता प्रारंभ होईल.

       महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण कंपनी) आर्थिक वर्ष २०२२-२३ व आर्थिक वर्ष २०२३-२४ चे अंतिम अचूक समायोजन, आर्थिक वर्ष २०२४-२५ चे तात्पुरते समायोजन व आर्थिक वर्ष २०२५-२६ ते आर्थिक वर्ष २०२९-३० या पाचव्या नियंत्रण कालावधीसाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर दाखल केलेल्या बहुवर्षीय वीजदर याचिकेवर ही जाहीर ई-सुनावणी होणार आहे.