लातूर – काय खायचं ते खाऊन घ्या, काय प्यायचं ते पिऊन घ्या. हरामाचा माल गरिबांकडे येण्याची हीच वेळ आहे. लक्ष्मीपूजनाअगोदरच लक्ष्मीदर्शनाचा योग आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने भ्रष्टाचारातून पैसा कमवला व जमवला असल्याने ते धन जरूर घ्या; पण मतदान भाजपच्या उमेदवारांना करा, असे वक्तव्य केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी निलंगा येथील सभेत केले. सोनिया गांधींवर टीका करताना त्यांची भाषा मात्र घसरली.
गडकरी म्हणाले, शेतक-यांच्या आत्महत्या ही राज्याची ओळख झाली आहे. राज्यावर ३ लाख कोटींचे कर्ज आहे. ७० हजार कोटींचा खर्च होऊन सिंचनाऐवजी मंत्र्यांचे खिसे ओले झाले.सोनिया आयी हे, रोशनी लायी है, असा नारा देणारी सोनियाही गेली व रोशनीही गेली आहे, अशी टीका नितीन गडकरी यांनी या वेळी केली सरकार आणा, राज्य लोडशेडिंगमुक्त करू २४ तास वीज देऊ. खताच्या किमती ५० टक्क्यांनी कमी करू. २५ लाख बेकारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊ, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.
काय खायचं ते खाऊन घ्या, काय प्यायचं ते पिऊन घ्या- नितीन गडकरी
अमेरिका – चीन -जपान भारतात गुंतवणूक करणार –मोदी दौऱ्याचा प्रचार
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच पार पडलेला अमेरिका दौरा अपयशी ठरल्याचे रान विरोधी पक्षांनी उठवले असले, तरी . या दौऱ्यातील अधिकृत सूत्रांनी मात्र मोदी अमेरिकेतील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात कमालीचे यशस्वी ठरले आहेत. या दौऱ्याचे फलित म्हणजे आगामी तीन वर्षात देशात ४१ अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार आहे.असा दावा केला आहे
साधारणतः नऊ वर्षांपूर्वी (२००५मध्ये) अमेरिकेने मोदी यांचा व्हिसा नाकारला होता. या मुद्यावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि मोदी यांच्यात एका शब्दाचीही चर्चा झाली नाही. किंबहुना कोणत्याही चर्चेत हा विषय पुढेही आला नाही,’ अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. शिवाय मोदी यांची ही भेट दोन्ही देशांतील सर्व समीकरणे बदलवणारी ठरल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. ‘हा दौरा दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध वेगळ्या आणि वरच्या पातळीवर नेऊन ठेवणारा राहिला,’ असेही सूत्रांनी नमूद केले.
मोदींचा हा दौर पार पडल्यानंतर ‘यूएस इंडिया बिझनेस कौन्सिल’ने (यूएसआयबीसी) आगामी तीन वर्षांत अमेरिका भारतात ४१ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. ‘यूएसआयबीसी’च्या या घोषणेचे ‘फिक्की’नेही स्वागत केले असून, त्यामुळे देशाच्या विकासाला गती आणि प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच, भारत मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून विकसित होण्याकडे हे पहिले पाऊल असल्याचेही ‘फिक्की’ने म्हटले आहे.
अमेरिकेकडून झालेली गुंतवणुकीची घोषणा त्यांच्याकडून अपेक्षित असणाऱ्या गुंतवणुकीच्या केवळ २० टक्केच आहे. केंद्रातील स्थिर सरकार आणि गुजरातप्रमाणेच देशाचा कायापालट घडविण्याची मोदींची असलेली क्षमता अमेरिका जाणून आहे. त्याचमुळे मोदींचे अमेरिकेत जोरदार स्वागत झाले. अनेक उद्योगपती आणि गुंतवणूकदारांनी मोदींची भेट घेतली आणि भारतात गुंतवणुकीची इच्छाही प्रदर्शित केली. ‘यूएसआयबीसी’च्या सदस्यांशी झालेल्या चर्चेत त्यांनी आगामी तीन वर्षांमध्ये ४१ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची मोदींना ग्वाही दिली.
मोदी आणि ओबामा यांच्यात झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये केवळ तंत्रज्ञानावर आधारीत विषय आणि निवडणूक मोहिमांविषयीच चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दोन्ही दे
गुजरात हा महाराष्ट्राचा छोटा भाऊ! नरेंद्र मोदी
सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लुटारू टोळीने राज्याला व देशाला अनेक वर्षांपासून लुटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीच्या योजना न राबवणार्या राज्य शासनाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले. गुजरात हा महाराष्ट्राचा छोटा भाऊ असून देशाच्या अखंडता, एकतेसाठी राज्या-राज्यांत फूट पाडणार्यांना हद्दपार करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी भाजपा उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.महाराष्ट्रात ही पहिलीच निवडणूक भाजपा स्वतंत्रपणे लढत आहे. त्यामुळे आमची भाजपा-शिवसेना युती तुटली आहे; पण स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मला अतिशय आदर, श्रद्धा आहे. बाळासाहेबांनी अतिशय कष्टाने सेनेची स्थापना केली आहे. त्या वेळी अनेकांच्या टीकाही त्यांनी सहन केल्या आहेत. त्यांनी आपले आयुष्य शिवसेनेसाठी सर्मपित केले आहे. त्यांच्या संकल्प शक्तीचा मी आदर करतो. त्यामुळे मी निर्णय घेतला आहे की या निवडणुकीत शिवसेनेवर टीका करणार नाही. त्यांच्यावर टीका न करणे हीच माझी त्यांना आदरांजली ठरेल. मी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत नाही. काही तत्त्वे असतात. त्यामुळेच मी शिवसेनेवर टीका करत नाही, असे स्पष्टीकरण या वेळी नरेंद्र मोदी यांनी तासगाव येथील सभेत दिले.
महाराष्ट्रात भाजपची सारी भिस्त मोदिंवरच – पृथ्वीराज चव्हाण
नाशिक / नांदगाव : राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना काँग्रेसनेही मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडे चेहरा नसून, मोदींच्या करिष्म्यावरच राज्यातील भाजप अवलंबून असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करत मोदींच्या कितीही सभा घ्या, तरीही काही फरक पडणार नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. स्वबळावर येणार नसल्याने भाजपने युतीची भाषा सुरू केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
काँग्रेसच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या आज (दि.५) जिल्ह्यात हरसूल आणि नांदगाव येथे सभा झाल्या. इगतपुरी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार निर्मला गावित यांच्या प्रचारार्थ हरसूल येथे झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते. मोदींच्या आडून नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बघत आहे. यांना काय आदिवासी, शेतकर्यांचे दु:ख कळणार, असा सवाल उपस्थित करीत मोदींच्या सभा होतील, ते भुरळ पाडतील, यावर राज्यातील भाजप अवंलबून आहे; मात्र मोदींच्या सभांना भुलायला जनता खुळी नाही. स्वबळावर येणार नसल्याची जाणीव झाल्याने गडकरींनी युतीची भाषा सुरू केली आहे. मुंबईचे उद्योग अहमदाबाद येथे नेऊन मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा मोदींचा डाव असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला. निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीने राज्यात राष्ट्रपती राजवट लावून भाजपला अप्रत्यक्ष सत्ता दिली आहे, याचा जाब जनतेने राष्ट्रवादीला विचारावा, असेही चव्हाण यांनी सांगितले. खिचडी सरकार येण्यापेक्षा काँग्रेसला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सभेला प्रदेश सरचिटणीस रमेश श्रीखंडे, माजी आ. निर्मला गावित, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे आदी उपस्थित होते.
व्रतस्थ दाम्पत्याची जीवनगाथा रूपेरी पडद्यावर
डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो
गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा हा अतिदुर्गम जंगलातील भाग. जिथे शहरातील माणूसच काय पण सूर्यकिरणंही पोहचणं अवघड होतं. जगाची गोष्ट तर दूरच पण महाराष्ट्राच्या नकाशावरही अशा गावाचे पुरावे मिळणं कधी काळी अशक्य होतं. अशा ठिकाणी जाऊन शहराचे सुखवस्तू जीवन नाकारून आयुष्याची एक नवी सुरुवात करणं ही कल्पनाही अशक्यच. पण ही कल्पनाच नव्हे तर ते स्वप्न उराशी बाळगून एक अवलिया आपल्या पत्नी आणि सहका-यांसह तिथे जातो…. आपल्या निस्सीम, निःस्वार्थ सेवेने आदिवासींच्या जीवनात नंदनवन फुलवतो आणि हेमलकसाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवतो. हा अवलिया म्हणजे ज्येष्ठ समाजसेवी डॉ. प्रकाश बाबा आमटे. समर्पण या शब्दाला जागणारे नव्हे तर जगणा-या डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटेंची ही कथा आता चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे , “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” या मराठी चित्रपटामधून. अॅड. समृद्धी पोरे यांचे निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात डॉ. प्रकाश आमटेंची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर साकारत असून डॉ. मंदाकिनीं आमटेंच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी असणार आहे. यावर्षी ‘टाइमपास’, ‘फॅंड्री’ आणि ‘लय भारी’ सारखे सुपरहिट चित्रपट देणा-या झी टॉकीज आणि एस्सेल व्हिजनची प्रस्तुती असलेला हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
हेमलकसाला १९७३ साली लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला तेव्हा तिथले माडिया गोंड आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. त्या जंगलापलिकडचं जग त्यांना माहीत नव्हतं. शिक्षणाअभावी असलेलं अज्ञान, नक्षलवादी भाग, पोलिसी अत्याचार, शहरीकरणाचा वाराही जिथे पोहचलेला नाही असं जीवन तेथील आदिवासी जगत होते. त्यांना आरोग्याचं, शिक्षणाचं महत्त्व पटवून देत मुख्य प्रवाहात आणणं हे काम जेवढं जिकिरीचं तेवढंच आव्हानात्मकही होतं. हे आव्हान पेलत डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या आदिवासीपाड्यांमध्ये ज्ञानाचं नंदनवन फुलवलं. या ‘अंधाराकडून उजेडाकडे’ झालेल्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय लोकबिरादरी प्रकल्पाच्या विलक्षण प्रयत्नांना आहे. व्रतस्थ समाजसेवी बाबा आमटेंचं समाजसेवेचं व्रत स्वीकारलेल्या डॉ. प्रकाश आमटे दाम्पत्याने, त्यांच्या सहका-यांनी आणि आमटेंच्या तिस-या पिढीनेही आचरलेल्या एका विलक्षण जीवनप्रवासाची, या सा-यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची, दुर्दम्य जिद्दीची कहाणी म्हणजे “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” हा मराठी चित्रपट.
बाबा आमटे यांनी अभिनते नाना पाटेकर यांना आपला मानसपुत्र मानलं होतं. विकास आणि प्रकाश सोबत नाना हा आपला तिसरा मुलगा आहे असं ते कायम म्हणत. नाना पाटेकरांनीही हे नातं बाबांच्या हयातीत आणि त्यानंतरही जपलं. प्रकाश आमटेंचं कार्य, आयुष्य नानांनी अगदी जवळून बघितलं आहे. त्यामुळे ही भूमिका त्यांच्यासाठी जेवढी सोपी तेवढीच आव्हानात्मक आणि जबाबदारीचीही होती. नानांनी ती जबाबदारी प्रेमाने स्वीकारत ही भूमिका साकारली आणि आज जगभरातील विविध चित्रपट महोत्सवामंध्ये त्यांचं कौतुक होत आहे. सोनाली कुलकर्णीनेही मंदाकिनी आमटेंच्या भूमिकेत जीव ओतला आहे. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांचा कसदार अभिनय आणि डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचं प्रेरणादायी कार्य याची उत्तम सांगड असलेला “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” हा चित्रपट १० ऑक्टोबरपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. चित्रपटात डॉ. मोहन आगाशे यांनी बाबा आमटेंची भूमिका साकारली आहे. महेश अणे यांचे छायाचित्रण तर अभिषेक रेडकर यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. गुरू ठाकूर यांच्या गीतांना राहुल रानडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. “मला आई व्हायचंय” या चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका अॅड. समृद्धी पोरे यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे, गोल्डन ग्लोबच्या रेणूका हावरे यांची सहनिर्मिती आहे तर प्रस्तुती झी टॉकीज आणि एस्सेल व्हिजनची आहे.
क्षणभर इथे फुलल्या …बऱ्याच आशा, बऱ्याच अपेक्षा
भाऊ तुमच्याच सोबत राहू … देवदासींचा मानकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
अरे चल तिकडे , ये अबे निकल जल्दी, तुझे मिलनेका नही क्या? भाऊ आलाय आमचा ।दिपक भाऊ । । आणि पाहता पाहता सारे दीपक मानकर यांच्या प्रचार फेरीत सामील झाल्या . म्हणाल्या , भाऊ तुम चिंता मत करना … तुम हीच आयेगा चुनके … हम आपके पिछे नही ,साथ रहेंगे । ये दत्ता है ना आपका, बडा खयाल रखता है हमारा …भाऊ । तुम भी खयाल रखना, हमारे बाल बच्चे यहा ना रहे ,आगे जाये, पढे -लिख्खे -कुछ बने … भाऊ. ये तो अब आपही करोगे? वरना हमारी फिकीर है किसीको भाऊ ? तुम चुन् के आवोगे तो दिवाळी धुम् धाम् से मनायेंगे भाऊ।
मोठ्ठ्या , आशेने , जिव्हाळ्याने एक ना अनेक संवाद चक्क बुधवारपेठेत ऐकायला येत होते , इज्जतदार -प्रतिष्ठित म्हणविणारे जिथे जायला नको म्हणतात पण ज्यांच्यामुळे शहरे आणि कुटुंबे यांच्या प्रतिष्ठा जपल्या जातात … त्यांना दीपक मानकर यांच्याशी खूप काही बोलायचे होते …काहींनी लगेचच आपल्या मागण्या एका निवेदनाद्वारे भावूंकडे सोपविल्याही … प्रचाराच्या धामधुमीत हि मानकर यांनी त्यांच्याशी इथे संवाद साधला . काळजी करू नका , स्वप्ने जरूर पहा आपण ती साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू , गुंडगिरीला घाबरू नका , पुढच्या पिढीला तरी चांगले जीवनमान देण्याचा मनोदय ठेवता आहात, निश्चितच मी मदत करेल … असे सांगून दीपक भाऊ निघाले … दत्ता सागरे , बालाजी तेलकर त्यांच्या मागे निघाले पण भावूंची चर्चा सुरूच होती … एक हि तो है … हमारी सुनेगा , हमे आगे ले जायेगा । नही तो यहा कौन किसीका होता है ? बऱ्याच अपेक्षा ,बऱ्याच आशा क्षणभर इथे फुलल्या … कोण जाणो पुन्हा त्या उमलतील कि उमटणारच नाही ?
(फोटो साभार -सुशील राठोड )
पूरग्रस्तांची वाढीव बांधकामे नियमित करून देऊ-विनायक निम्हण
गोखलेनगरमधील पूरग्रस्तांना मालकी हक्काची घरे शासनाने दिली. मात्र, या घरांभोवती असलेली वाढीव बांधकामांचा प्रश्न प्रलंबित आहे. ही वाढीव बांधकामेही नियमित करून देऊ. तसेच शासनाने म्हाडासाठी सध्या अडीच एफएसआय दिलेला आहे. आपण तीन एफएसआय मिळण्यासाठी प्रयत्न करीत आलेलो आहे. आणि त्याचा इथून पुढेही पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार काँग्रेस-पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे उमेदवार विनायक निम्हण यांनी बोलून दाखविला. याबरोबरच कस्तुरबा गांधी वसाहत, इंदिरा वसाहतीतील नागरीकांना त्यांच्या सध्याच्या घराच्या जागेवरच दुमजली घरे शासनातर्फे बांधून देऊ, असेही निम्हण यांनी सांगितले.
निम्हण म्हणाले, गोखलेनगरमधील पूरग‘स्तांना शासनाने मालकी हक्काची घरे दिली. परंतु, या घराभोवतीच वाढीव बांधकामेही झाली. ती पाडून टाकण्याला आपला विरोध असून अशी बांधकामे नियमित करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. तसेच म्हाडाच्या घरांसाठी तीन एफएसआय मिळविण्यासाठीही प्रयत्न करु. सुशिक्षित युवा वर्गाच्या हाताला काम मिळवून देण्यासाठीही कसोशिने प्रयत्न करणार आहे. जेणेकरून कुणी बेरोजगार राहणार नाही. तसेच आरोग्याच्या समस्या, स्वच्छता, वीज, पाणी या स्थानिक समस्या सोडविण्यासाठीही प्राधान्य देणार असल्याचे निम्हण यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आजपर्यंत निवडून येऊन अनेकांनी पदे मिळविली. मान, सन्मान मिळवला. मात्र, तेच लोक आज केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी काँग्रेस पक्षाशी गद्दारी करीत आहेत. जनता त्यांना माफ करणार नाही, असे खडे बोलही आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना निम्हण यांनी सुनावले. निम्हण यांचा जोरदार प्रचार सुरु असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. रविवारी सकाळी त्यांनी गोखलेनगर परिसर पिंजून काढला. पदयात्रेनंतर झालेल्या छोटेखानी सभेत ते बोलत होते. यावेळी हजारो युवा कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते. एस. के. कुसाळकर शेठ यांच्या अर्धाकृती पुतळ्यापासून महिलांनी औंक्षण करून पदयात्रेस प्रारंभ झाला. ही पदयात्रा गोलघर, लाल चाळ, पीएमसी कॉलनी, जनवाडी, जनता वसाहत, निलज्योती, पाचपांडव सोसायटी, वैदवाडी आदी भागातून मार्गस्थ झाली.
नगरसेवक मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक विनोद ओरसे, मनोहर नांदे, शिवाजीनगर ब्लॉक अध्यक्ष उमेश वाघ, शिरीष धोत्रे, प्रविण डोंगरे, सनद शेख आदी उपस्थित होते. शनिवारी सायंकाळी कस्तुरबा वसाहत येथे भव्य पदयात्रा काढून निम्हण यांनी मतदारांना मत देण्याचे आवाहन करतानाच सांगितले की, कस्तुरबा गांधी वसाहत व इंदिरा गांधी वसाहतीतील नागरीकांना ते सध्या राहत असलेल्या घरांच्या जागेवरच शासनाकडून दुमजली घरे बांधून देऊ. एसआरए ही बिल्डरांच्या फायद्याची स्किम आहे. त्यामुळे नागरीकांनी बिल्डरांच्या पैशाला तसेच दबावाला बळी पडू नका. आपली घरे कदापिही बिल्डरांच्या घशात जाऊ देऊ नका, असे आवाहनही नागरीकांना केले. याबरोबरच आपण केलेल्या कामाच्या माध्यमातून मी आपल्याला मत मागत आहे. तुमच्या आजपर्यंतच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तसेच तुमची मान शरमेने खाली जाईल, असे कोणतेही काम मी आजपर्यंत केले नाही, इथून पुढेही करणार नाही. त्यामुळे काँग्रेसलाच मतदान करण्याचे आवाहनही निम्हण यांनी मतदारांना केले.
शनिवारी सायंकाळी कस्तुरबा वसाहत येथे भव्य पदयात्रा काढून निम्हण यांनी मिळाला. पदयात्रेत हजारो पुरुष व महिला कार्यकर्त्यांसह नगरसेविका शशीकला गायकवाड, सचिन खंदारे, अक्षय मकासरे, विजय चौधरी, दिनेश चौधरी, अक्षय अडागळे, गणेश शिंदे, अमर गायकवाड, सुनंदा मकासरे, शारदा पुनावळे, धनंजय बिराजदार, विलास निम्हण, तात्या नलावडे, संजय तारडे, सुभद्रा कुंभार, प्रमोद कांबळे, अलका गडशी, नीना खंडाळे, संगीता घोगरे, सुधीर जोगदंड, दीपक धस आदी उपस्थित होते.
रेल्वे वसाहतीचे प्रलंबित प्रश्न सोडवू- ताडीवाला रोड परिसर झोपडीमुक्त करू-रमेश बागवे
पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांची आज प्रभाग क्रंमांक २२ मधील ताडीवाला परिसरात पदयात्रा काढण्यात आली होती . ताई लक्षात ठेवा पंजा , दादा लक्षात ठेवा पंजा, आले रे आले पंजावाले असे नारे देत पदयात्रेमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात कार्यकर्ते सहभागी झाले होते . फटाक्यांच्या आतिषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात येत होते .
हि पदयात्रा डॉ. नायडू रुग्णालय वसाहत , काची वस्ती , प्रायव्हेट रोड , लुंबिनीनगर , पत्र्याची चाळ , आर. बी. तीन , इमारत , सिद्धार्थ नगर झोपडपट्टी , इंदिराविकास नगर, पानमळा झोपडपट्टी , स्वीपर चाळ , नदीकाठची झोपडपट्टी , खड्डा झोपडपट्टी , रेल्वे के टाईप चाळ , उल्हास नगर झोपडपट्टी , डिझेल कॉलनी , महात्मा फुले वसाहत , संगीता झोपडपट्टी , भाजी मार्केट , जगताप मळा , चव्हाण चाळ , लडकतवाडी येथे समारोप करण्यात आला .
या पदयात्रेच्या समारोप प्रसंगी उमेदवार रमेश बागवे यांनी सांगितले कि , ताडीवाला रोड परिसरात आपल्या आमदार निधीतून विविध विकासकामे करण्यात आली आहेत , नदीकिनारी पुरापासून बचावासाठी सीमा संरक्षण भिंत बांधण्यात आली , संजनाबाई भंडारी विद्यालयात विकासकामे , हिंदू – मुस्लिम – लिंगायत- ख्रिचन स्मशान भूमीमधील विकास कामे , मोफत रुग्णवाहिका , शववाहिका , डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाची पुनरबांधणी , युवकासाठी व्यायामशाळा , महिला बचत गटासाठी समाजमंदिर , खाजगी सोसायटीसाठी विकासनिधी आदी विकास कामे केल्याने आपण सर्वांनी कॉंग्रेस पक्षाला मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले , तसेच येथील रेल्वे वसाहतीचे प्रलंबित प्रश्न सोडवून ताडीवाला रोड परिसर झोपडपट्टी मुक्त करण्याचे आश्वाशन दिले .
या पदयात्रेत स्थानिक नगरसेविका लता राजगुरू , माजी महापौर रजनी त्रिभुवन , माजी नगरसेविका चांदबी नदाफ , सुजित यादव , मेहबूब नदाफ , संतोष हंगारगी , जमसू शेख , पापा परदेशी , संदीप कांबळे , शंकर स्वामी , मगन चौधरी , संजय परदेशी , नागेश कामठे , अविनाश पुजारी , उत्तम कांबळे , कोसिबीन डिसोझा , मीरा शिंदे , अंजू सोळंकी , सुनंदा पाटोळे , प्रगती कांबळे , रफिक शेख , असिफ खान , गोकुळ धेंडे , शंकर म्हेत्रे , सुनील चव्हाण आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते
अराजकता, ढासळलेली नितीमत्ता, अंधश्रध्दा,व्यसनाधिनता, गुंडगिरीचा नायनाट व्हावा-विनायक निम्हण

समाजातील वाढती अराजकता, ढासळलेली नितीमत्ता, अंधश्रध्दा, रुढी परंपरा, चालिरीती यांना बळी पडून नागरीकांची होणारी फसगत व त्यातून वाढलेली व्यसनाधिनता, गुंडगिरी या सर्वांचा समुळ नायनाट व्हावा, अशी अपेक्षा काँग्रेस-आरपीआय (कवाडे गट)चे उमेदवार विनायक निम्हण यांनी व्यक्त केली.
प्रियदर्शनी मित्र मंडळ व मनिष आनंद यांच्यावतीने शुक्रवारी रात्री खडकी येथे आयोजित करण्यात आलेल्या रावणदहन कार्यक्रमप्रसंगी निम्हण बोलत होते. निम्हण यांच्या हस्ते रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. यावेळी कर्नल पांडे, संजय खडसे, दादा कचरे, पूजा आनंद, अजय निम्हण, समीर धुमाळ आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
निम्हण म्हणाले, समाजातील वाईट प्रवृत्ती वाढतच चालल्या आहेत. त्यांचे त्यांना वेळीच लगाम घालण्याची आवश्यकता आहे. रावणदहनच्या निमित्ताने समाजातील अशा सर्व वाईट प्रवृत्ती नाहीशा करण्याची सर्वांनी प्रतिज्ञा करावी. यावेळी खडकी परिसरातील तब्बल ७ ते ८ हजार नागरीकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
दरम्यान, शनिवारी सकाळी राजभवन परिसरात काढलेल्या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘पारधी समाजाचे अध्यक्ष सुनिल काळे पदयात्रेत सहभागी झाले होते. कॉंग्रेसला मत म्हणजे विकासाला मत, विनायक निम्हण आगे बढो’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ही पदयात्रा पडाळ वस्ती, भाऊ पाटील रोड, कांबळे वस्ती मार्गे चंद्रमणी संघ येथे विसावली. यावेळी रमाताई भोसले, मीरा माने, राहूल गायकवाड, भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष राजू पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
जो दिल्लीचे ऐकेल आणि दिल्ली ज्याचे ऐकेल असे सरकार द्या – मोदी
मुंबई – दिल्ली ज्याचे ऐकेल आणि दिल्लीचे ऐकेल असे सरकार दिले तरच महाराष्ट्राचा विकास येईल महाराष्ट्राच्या विकासासाठी दिल्लीत ज्यांचे सरकार आहे, त्या भाजपचेच राज्यातही सरकार निवडून देणे आवश्यक आहे. स्पष्ट बहुमत जनतेने द्यावे. यावेळी थोडेसे चुकलात तर `त्यांना’ जी नशा चढेल त्यात संपूर्ण देश बरबाद होईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीमुंबईतील सभेतून महाराष्ट्राला दिला.
ज बरदस्तीने घर रिकामे करणे, प्लॉट खाली करणे, गरीबांच्या झोपड्यांवर कब्जा करणे अशा प्रवृत्तींपासून मुंबईकरांना मुक्तता देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. काँग्रेसचे मित्र केवळ आपल्यावर टीका करण्यात धन्यता मानतात. कदाचित पाच महिन्यांपूर्वीचा अनुभव ते विसरले असावेत. माझ्यावर जेवढी टीका कराल तेवढे सणसणीत उत्तर जनता तुम्हाला देईल, असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी टीकाकारांना दिला.
या राज्यात दरवर्षी ३ हजार ७०० शेतकरी आत्महत्या करीत असताना, गेल्या सरकारमधील कृषी मंत्री काय करीत होते, अशी टीका त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जातीय दंगे होणारे राज्य असल्याची टीकाही त्यांनी केली. १५ वर्षांत सर्वात जास्त दहशतवादी घटना या राज्यात घडल्या. सर्वात अधिक जीवितहानी येथे झाली. मात्र किती गुन्हेगारांना शिक्षा मिळाली. कधी मुख्यमंत्री तर कधी गृहमंत्री बदलून जनतेला न्याय कसा मिळणार, असा सवाल त्यांनी केला.
६० वर्षे राज्य करणारे आपल्याकडे ६० दिवसांचा हिशेब मागत आहेत. मी छोटा माणूस आहे. मी छोट्या माणसांसाठी छोटी-छोटी कामे करीन, असे सांगून देशातील प्रत्येक गरीब नागरिकांसाठी बँकेत खाते उघडण्याच्या कामाचा त्यांनी उल्लेख केला. शून्य पैशात खाते उघडता येणार असून, माझ्या इमानदार पाच कोटी गरीब कुटुंबांनी तीन हजार कोटी रुपये जमा केल्याचे मोदी यांनी सांगितले. कैलास मानसरोवर यात्रेसाठी अत्यंत अवघड मार्गाने जावे लागत असे. चीनच्या राष्ट्रपतींशी बोलून सर्व वयोगटातील यात्रेकरूंना मोटारीने जाता येईल असा मार्ग उपलब्ध करून घेतल्याचे मोदी म्हणाले. देशाला मलेरिया, डेंग्यू आणि टीबीपासून मुक्त करण्यासाठी अमेरिकेबरोबर औैषध संशोधनाचा करार केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
झोपडीधारकांच्या आयुष्याचे कायापालट करण्याचे आपले स्वप्न आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात १५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रत्येक झोपडीधारकाला हक्काचे, राहण्यायोग्य व सर्व नागरी सुविधा असलेले निवास देण्याचा संकल्प मोदी यांनी सोडला. मुंबईत चांगल्या दर्जाची मेट्रो आमचे सरकार आणेल, नवी मुंबईतील एअरपोर्टचे काम मार्गी लावून त्याचे उद्घाटन आमच्या कार्यकाळात होईल. सागरी सेतू पूर्ण करू. खासगीकरणाद्वारे मुंबईतील उपनगरी लोकल सेवा उच्च दर्जाची करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली. व्यासपीठावर मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार होते.
नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या बाबतीत सुडाचे राजकारण करीत आहे–नारायण राणे
पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस, आर. पी. आय (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारानिमित सोमवार पेठमधील नरपतगीर चौकाजवळ कोपरा सभा संपन्न झाली . या सभेस कॉंग्रेस पक्षाचे प्रचारप्रमुख नारायण राणे , अखिल भारतीय कार्यकारीणीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी शोराज वाल्मिकी , प्रसिद्ध सिनेअभिनेत्री नगमा , महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कमल व्यवहारे , पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय बालगुडे , उमेदवार रमेश बागवे , आमदार अनंतराव गाडगीळ , विरोधी पक्षनेते व स्थानिक नगरसेवक अरविंद शिंदे , नगरसेविका लक्ष्मी घोडके , नगरसेवक सुधीर जानजोत , नगरसेविका लता राजगुरू , नगरसेवक अविनाश बागवे , माजी महापौर रजनी त्रिभुवन , स्थायी समिती माजी अध्यक्ष अनिस सुंडके , सदानंद शेट्टी , रशीद शेख , हाजी नदाफ , भगवान धुमाळ , शुक्ला महाराज , पुणे कॅंटोन्मेंट कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष असिफ शेख , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे सर्व माजी उपाध्यक्ष व नगरसेवक , कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी कॉंग्रेस पक्षाचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी सांगितले कि , नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या बाबतीत सुडाचे राजकारण करीत आहे , त्यांनी मुंबई मधील भारतीय रिसर्व्ह बँकेचे मुख्यालय गुजरात मध्ये हलविण्याचा प्रयत्न असून देशाची आर्थिक राजधानी म्हणून असणारी मुंबईचे महत्व कमी करण्याचे काम होत आहे . मुंबई मध्ये समुद्रकिनारी असणारी गोदी मधून मालवाहतुकीचे काम चालते , हि गोदी स्थलांतर करून या गोदीतील असंख्य कामगारांना बेरोजगार होणार आहेत . त्यातून त्यांनी महाराष्ट्राला तोडण्याचा प्रयत्न तसेच वेगळा विदर्भ करण्याचा प्रयत्न करण्याचा डाव त्यांनी रचला आहे . भारतीय जनता पार्टीच्या जाहिरातीमध्ये शिवछत्रपतीचा आशीर्वाद मागता परंतु महाराज उत्तम प्रशिक्षक होते , त्यांनी जनतेला फसविण्याचे काम केले नाही . नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात बारा मंत्र्यांवर गुन्हे आहेत . त्यामुळे भाजपला सत्ता मिळवायची आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्याला बळी पडू नका उद्धव ठाकरे कधी आमदार झाले नाही त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे , कॉंग्रेसने नेहमीच विकासकामांच्या जोरावर प्रचार केला , जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना कॉंग्रेसने राबविल्या . या विकासकामांवरच महाराष्ट्राला नंबर वनचे राज्य आहे . अजित पवार यांनी देखील सत्तेमध्ये असताना मुख्यमंत्रीबरोबर काम केले , तेव्हा अजित पवारांनी का विरोध केला नाही असा सवाल त्यांनी व्यक्त केला , पुण्याचे विकास पुरुष म्हणजे रमेश बागवे , त्यासाठी जनतेने रमेश बागवे यांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले .
यावेळी पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस, आर. पी. आय (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांनी सांगितले कि , कॉंग्रेसने विकासकामांच्या जोरावरच जनतेला मते मागत आहे त्यामुळे विकासकामे केल्यामुळेच मागील वेळी मतदारांनी मला भरघोस मतांनी निवडून दिले . पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघ झोपडपट्टी मुक्त करून मतदार संघाचा विकास करण्यसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले .
यावेळी संगीता तिवारी , विठ्ठल थोरात , रशीद खिजर , भगवान धुमाळ , शुक्ला महाराज , करण मकवानी , नगरसेवक अविनाश बागवे आदींनी मनोगते व्यक्त केली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाल्मिक जगताप यांनी केले .
संघप्रमुखांचे भाषण थेट प्रक्षेपित; धम्मप्रवर्तनाचे प्रक्षेपण का नाही-शरद पवार
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुखांचे भाषण थेट प्रक्षेपित करून या सरकारने खरा चेहरा दाखविण्यास सुरवात केली आहे. संघप्रमुखांचा कार्यक्रम ज्या दिवशी नागपुरात झाला. त्याच दिवशी नागपूरमध्ये धम्मप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो आंबेडकरी जनता एकत्र आली होती. संघप्रमुखांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या केंद्र सरकारला धम्मप्रवर्तन दिनाचे प्रक्षेपण करता आले नाही, यावरून हे सरकार कोणत्या दिशेने आणि विचाराने पुढे जाणार हे वेगळे सांगायला नको. या परिस्थितीत आता अधिक जागृत राहण्याची गरज आहे. समतेच्या विचाराला बांधील राहून महिला व दलितांना शक्ती देणारा पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस बांधील आहे.‘‘ असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले
पुणे शहर, पिंपरी व जिल्ह्यातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ आज पवार यांच्या हस्ते झाला. या वेळी पवार बोलत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण, महापौर दत्ता धनकवडे, पिंपरीच्या महापौर शकुंतला धराडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी व भाजपच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. शेतमालाच्या निर्यातीला बंदी घालून या सरकारने शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. याच कारणाने उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत तेथील ग्रामीण जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली.
‘भाजपच्या विजयात उत्तर प्रदेशचा वाटा मोठा होता. मात्र, लगेचच झालेल्या पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशातील नऊपैकी आठ ठिकाणी भाजपला पराभव पत्करावा लागला. एक राजकीय अभ्यासक म्हणून उत्तर प्रदेशचा दौरा केला. या दौऱ्यात तेथील शेतकऱ्यांत या सरकारच्या विरोधातील चीड दिसली. शेतमाल निर्यातीला बंदी घालून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. त्यातून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले.‘‘
शिवसेनेविषयी बोलताना ते म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेसारखी स्वाभिमानी संघटना उभी केली. त्यामुळे शिवसेना भाजपपासून वेगळे झाल्याचे समाधान आहे. बाळासाहेब ठाकरे यांचाही भाजपवर कधीही विश्वास नव्हता. “कमळाबाई‘ या नावानेच ते भाजपचा नेहमी उल्लेख करीत होते. युती एका बरोबर नजर दुसऱ्या पक्षावर अशी भाजपची कायमची नीती आहे. केंद्रात सत्ता आल्यानंतर या पक्षाकडून लोकांच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र अल्पावधीतच त्यास ओहोटी लागली आहे.‘‘ कोणताही पक्ष मोठा होण्यासाठी वेळोवेळी पक्षात नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. 47 वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण यांनी माझ्यासारख्या नवख्या तरुणाला संधी दिली. त्याचप्रमाणे या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, असे पवार यांनी सांगितले.
जान्हवी रसिकलाल धारीवाल यांनी केले दीपक मानकारांचे औक्षण

पुणे : ऐतिहासिक पार्श्वभूमी असणार्या व बारा बलुतेदारांच्या कसबा मतदार संघावर कायमच अन्याय झाला असून, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी कसब्याचा विकास खुंटला आहे, अशी कडवी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक मानकर यांनी केली. प्रचार फेरीदरम्यान स्थानिक व्यापारी वर्गाकडून दीपक मानकर यांना चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती रसिक धारीवाल यांची कन्या जान्हवी धारीवाल यांनी मानकर यांचे औक्षण करून त्यांना निवडणुकीकरीता शुभेच्छा दिल्या.
गेले अनेक वर्षे प्रस्थापितांनी कसब्याचा विकास केला नसून, जुन्या वाड्यांना एफएसआय देणे असो वा वाहतुकीचा प्रश्न असो ते अद्याप कायम आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेले सीसीटीव्ही कॅमेरे अजुनही बसविण्यात आलेले नाहीत. शनिवारवाडा, महात्मा फुले वाड्याच्या आजुबाजूचा परिसराचा विकास अजुनही झालेला नाही. १९८७ च्या विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अजुनही कायम आहे. मंडईतील अनेक व्यापार्यांचा, पुलावरील बुरुड समाजाचे पुनर्वसन किंवा गंज पेठेतील भोई समाज, चांभार गल्लीतील चटई कामगारांच्या स्टॉलचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. घोरपडी पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, गंज पेठ येथील भांडी व्यापार्यांचे स्थलांतराच्या प्रश्नांना आश्वासनापलीकडे काहीच पदरात पडले नसून, त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. मतदार संघातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांच्या बाबतीतही अत्यंत दुर्लक्षीत दृष्टीकोन दिसून येत आहेत. यामुळेच कसबा मतदारसंघ हा म्हणावा तसा विकसित झालेला नाही.
पुण्यातील या सर्वांत जुन्या व ऐतिहासिक मतदार संघात नियोजनपूर्वक काम केल्यास पुण्याचा ऐतिहासिक वारसा जपत त्याला आधुनिकतेची झळाळी आणता येणे सहज शक्य आहे. मात्र, गरज आहे ती बदलाची. मतदार संघाच्या फेर रचनेत मुस्लिम समाज मोठय़ा प्रमाणावर या मतदार संघात आले आहेत.
मात्र, त्यांचा विकास अजुनही योग्य पद्धतीने झालेला नाही. जो प्रश्न येथील नागरिकांचा तोच प्रश्न येथील झोपडपट्टय़ांचा. मतदार संघातील असलेल्या पाचही झोपडपट्टय़ांच्यापुनर्वसनाच्या प्रश्नांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. झोपडपट्टय़ांचे पुनर्वसन या मतदार संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, माझा प्रय▪प्राधान्याने या दृष्टीने असणार आहे.
प्रचारफेरी दरम्यान दीपक मानकर यांना मतदार संघात लक्षणीय प्रतिसाद लाभला. दीपक मानकर यांच्या प्रचार फेरीचे आयोजन त्रिशुंड्या गणपतीपासून ते नानापेठ येथील बारेनिवासपर्यंत करण्यात आले होते. या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये राजेश सोनवणे, राजेंद्र जाधव, प्रकाश लांडगे, रवी कावणेकर, सोहम हंबीर, प्रशांत सोनवणे, जीवन मोकाशी, हिमांशु कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवदर्शन भागात अभय छाजेड यांची पदयात्रा

पर्वती विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस-पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे) उमेदवार अँड़ अभय छाजेड यांच्या पदयात्रेला शिवदर्शन भागात मतदारांचा भरपावसात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंजाला मत म्हणजे विकासाला मत, एकच मत पर्वती मतदारसंघाच्या विकासा साठी असे आवाहन करत निघालेल्या या पदयात्रेला महिलांसह अबालवृद्धांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
शिवदर्शन भागातील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलपासून या पदयात्रेला प्रारंभ झाला. या पदयात्रेत अँड़ अभय छाजेड यांच्या समवेत उपमहापौर आबा बागुल, अमित बागुल, महेश वाबळे, हरीश जाधव, गणेश लगट, स्वप्निल नाईक, विजय बिबवे, अनिकेत निकाळजे, राजाभाऊ पोळ, दिलीप गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या.
राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलपासून सुरु झालेली पदयात्रा पुढे शिवदर्शन वसाहत, निर्मल बाग सोसायटी, चौगुले शोरूम, तुरे निवास, तावरे कॉलनी, तावरे बेकरी, अरण्येश्वर मंदिर, शिंदे हायस्कूल रस्ता, संजयनगर, गवळी वाडा, सारंग सोसायटी असा मार्गक्रमण करीत रूपा हॉटेल येथे समाप्त झाली.
पदयात्रा अरण्येश्वर भागात असताना वरुनराजाने हजेरी लावली. मात्र, भरपावसातही हातात पंजाचे चित्र असलेले झेंडे घेवून नाचणारे कार्यकर्ते, ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजी करीत व औक्षणाने छाजेड यांचे स्वागत केले जात होते. या भागातील सर्व व्यापार्यांचा तसेच रहिवाशांच्या घराघरात जावून छाजेड यांनी त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले
मुंबई कोणाची ? भाजपाची कि शिवसेनेची… कि …. ?
आमची मुंबई – शिवसेनेची मुंबई अशा ब्रीदावल्या शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीतील ;पण ज्या आजतागायत संस्मरणीय मानल्या जात आहेत अशी मुंबई आता कोणाची ? शिवसेनेची कि भाजपाची ? कि अन्य सर्वपक्षीयांची ? असे प्रश्न राजकीय समीक्षकांच्या मनात घोंगावू लागले आहेत .
मुंबईतील 36 पैकी 13 विधानसभा मतदारसंघात गुजराती मतदारांचे वर्चस्व आहे, मुंबईतील सुमारे ३५ लाख गुजराती समाजाच्या लोकसंख्येत १५ लाख मतदार आहेत . भाजप पक्ष आता गुजरातचे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या हाती गेल्याचे मानले जाते . आणि भाजप आता शिवसेनेसोबत राहिलेला नाही या पार्श्वभूमीवर या मतदारांना आता भाजप – सेना – मनसे – काँग्रेस – राष्ट्रवादी असे पर्याय खुले आहेत हे सारे एकगठ्ठा मतदान असेल कि यातही विभागणी असेल याकडे आता राजकीय समीक्षकांचे लक्ष लागून राहणार आहे त्यामुळे मुंबई आता बहुमताने कोणी एकटाच राजकीय पक्ष जिंकणार कि मुंबईच विविध पक्षांना सामावून घेणार ?हे आता निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे . अर्थात कोणत्याही एका किंवा अनेक पक्षाच्या नेतृत्वाखाली मुंबई त विधानसभेचे चित्र झळकले तरी ते संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिबिंब असेल असे मानले जात आहे .
मुंबईत एकून विधानसभेचे 36 मतदारसंघ आहेत. 36 जागांवर एकून 520 उमेदवार उभे राहिले आहेत. यात मुंबई शहरात मोडणा-या 10 विधानसभा मतदारसंघात एकून 139 उमेदवार उभे आहेत. तर, मुंबई पश्चिम व पूर्व उपनगरातील 26 जागांवर 381 उमेदवार रिंगणात आहेत. दहिसर, बोरीवली, कांदिवली, चारकोप, मालाड-पश्चिम, गोरेगाव, विलेपार्ले, मुलुंड, घाटकोपर-पूर्व, घाटकोपर-पश्चिम, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या 13 मतदारसंघात गुजराती मतदार निर्णायंक भूमिका बजावतील
बोरीवलीतून विनोद तावडे (भाजपा), अशोक सूत्राले (काँग्रेस), बलबीर सिंह (राष्ट्रवादी), उत्तमप्रकाश अग्रवाल (शिवसेना) आणि नयन कदम (मनसे) उभे आहेत.
विलेपार्लेमधून काँग्रेसचे आमदार कृष्णा हेगडे, माजी नगरसेवक पराग आळवणी (भाजपा), शशिकांत पाटकर (शिवसेना) आणि सुहास शिंदे (मनसे) हे नशिब अजमावत आहेत.
घाटकोपर-पूर्व मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश मेहता (भाजपा), प्रविण छेड़ा (काँग्रेस), राखी जाधव (राष्ट्रवादी), जगदीश चौधरी (शिवसेना) आणि सतिश नारकर (मनसे) आदी उमेदवार आहेत.
घाटकोपर-पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार राम कदम (भाजपा), सुधीर मोरे (शिवसेना), दिलीप लांडे (मनसे), हारुन खान (राष्ट्रवादी) आणि रामगोविंद यादव (काँग्रेस) मैदानात आहेत.दहिसरमध्ये विद्यमान आमदार विनोद घोसाळकर (शिवसेना), नगरसेविका शीतल म्हात्रे (काँग्रेस), नगरसेविका मनीषा चौधरी (भाजपा), पूर्व महापौर डॉ. शुभा राऊळ (मनसे) आणि हरिश शेट्टी (राष्ट्रवादी) निवडणूक लढवित आहेत.
मुंबईतील मराठी मतदारांमध्ये सुरुवातीच्या काळात शिवसेनेबद्दल मोठ्या प्रमाणावर सहानुभूती तयार झाली होती. आजही ही सहानुभूती मोठ्या प्रमाणावर टिकून असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर काही प्रमाणात तरी मराठी मतदार भाजपकडे वळतील, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास मराठी मतदार किती मोठ्या संख्येने भाजपकडे वळतात, यावर बरेच गणित अवलंबून असेल. तसेच मराठी मतांमध्ये मनसेचा वाटा राहणारच असल्यामुळे शिवसेनेला एक गठ्ठा मराठी मते पडतील का, असा सवाल भाजपचे नेते करत आहेत. याउलट गुजराती मतदार मात्र एकसंधपणे भाजपच्या बाजूने उभा असल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे.
प्रत्येक मतदारसंघात ३० ते ४० टक्के मराठी मतांचा वाटा असल्याने मुंबईतील सर्वत्रच शिवसेना विरुद्ध इतर असाच सामना पाहण्यास मिळू शकतो, असे ज्येष्ठ सेना नेत्यांचे म्हणणे आहे. मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम मोदींचे उजवे हात समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांनीच केल्यामुळे त्यांच्या आवाहनालाही मराठी मतदार भूलणार नाहीत, असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान युती तुटल्याने मराठी-अमराठी मतांचे विभाजन होईल, असे चित्र उभे केले जात आहे. पण मुंबईसह राज्यातील अमराठीही मोठ्या संख्येने शिवसेनेसोबत आहेत. . महाराष्ट्राचे सरकार दिल्लीतून नाही राज्यातून चालेल, असे शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी रत्नागिरी मध्ये म्हटले आहे . रत्नागिरीमध्ये झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते, भाजपने महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न बाळगून युती तोडली आहे. पण त्यांचे हे स्वप्न शिवसेना कधीही पूर्ण होऊ देणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.
भाजपने युती का तोडली, कोणासाठी तोडली याची उत्तरे महाराष्ट्राला मिळायलाच हवीत. ती जो पर्यंत मिळणार नाहीत, तोपर्यंत पुन्हा युती होणार नाही. २५ वर्षाची जुनी युती तोडणा-यांना आम्ही भांडी घासायला लावू, अशा शब्दात शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला धारेवर धरले.


