कसबा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार दीपक मानकर यांच्या पाठीशी सर्व बहुजनवादी आणि मराठा संघटना ठाम पाने उभ्या आहेत आणि मानकर यांनाच विजयी करण्याचे अव्वाहन त्या करीत आहेत असे आज येथे विकास अन्न पासलकर , राजेंद्र कोंढरे , नामदेव मानकर अनिल मारणे , बाळासाहेब मोहोळ , संजय ढगे ,प्रभाकर बर्गे , विराज तावरे आदी बहुजन मराठा संघटना च्या नेत्यांनी स्पष्ट केले शिवाजी व्यायाम मंडळ येथे बहुजन मराठा संघटना च्या कार्यकर्त्यांची बैठक झाली यावेळी या सर्वांनी मानकर यांना एकमुखी पाठींबा जाहीर केला रवींद्र माळवदकर नगरसेवक प्रशांत जगताप , शांतीलाल मिसाळ ,शबीर खान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
कसब्यातील बागा फुलाविणार – दीपक मानकर
कसबा विधानसभा मतदार संघात अनेक बागा आहेत पण सर्व ठिकाणी दुरवस्था झाली आहे
या सर्व बागा फुलविण्याची गरज आहे शहरातील या बागांमध्ये बालकांसाठी खेळण्या बसविणे – लाल मातीचे जॉगिंग मार्ग करणे , नैसर्गिक धबधबे तयार करणे , बसण्यासाठी बाके टाकणे एकंदरीत बागांचे सुशोभीकरण करणे अत्यावश्यक आहे ते आपण करणार असल्याचे आज दीपक मानकर यांनी सांगितले
बहुजन मराठी संघटना दीपक मानकरांच्या पाठीशी
मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर राहणार-रमेश बागवे
पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचाराचा झंझावात गुरुवारी कोरेगाव पार्क भागात पोहोचला . पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघातील मतदारांनी आतापर्यंत विकासालाच कौल दिला आहे . या निवडणुकीतही जागरूक मतदार शहराचा विकास साधणारया कॉंग्रेसलाच बहुमतांनी निवडून देतील , असा विश्वास रमेश बागवे यांनी व्यक्त केला .
त्यांच्या प्रचाराची सुरुवात कोरेगाव पार्क मधील हॉटेल चंद्रमापासून झाली . हि पदयात्रा बर्निंग घाट , चंचल तरुण मंडळ , संत गाडगे महाराज वसाहत , दरवडे मळा, कवडेवाडी , विद्युत नगर , मदारी वस्ती , मीरा नगर , भैरोबा पंपिंग स्टेशन येथे समारोप झाला . ठिकठिकाणी मतदारांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले . महिलांनी त्यांचे औक्षण केले . या सर्व भागामध्ये रमेश बागवे यांना विजयासाठी शुभेछा देण्यात आल्या . रमेश बागवे यांनी आपल्या आमदार निधीतून कोरेगाव पार्क मधील खाजगी सोसायटीमध्ये विकास कामे केली आहेत . त्यामध्ये रागविलास सोसायटीमध्ये नाल्याचे सीमाभिंतीचे काम , जॉगिंग ट्रेकचे काम , अग्रसेन सोसायटीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम इंटरलॉक ब्लॉक टाकण्याचे काम , ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम , गाडगे महाराज वसाहत येथे समाजमंदिराचे काम करण्यात आली आहेत . पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघात विकासाची गंगा आणल्यामुळे ” आमचे मत रमेश बागवे यांनाच ” अशा प्रतिक्रिया या प्रचारादरम्यान मतदारांनी व्यक्त केल्या .भविष्यातहि मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर राहणार असल्याचे रमेश बागवे यांनी सांगितले.
या पदयात्रेत शिक्षण मंडळ माजी अध्यक्षा संगीता तिवारी , विजय जगताप , प्रकाश बर्गे , अशोक वाघचौरे , अड. अनुपमा जोशी , डॉ. सलोनी नाईक , रमाकांत म्हस्के , योगेश वाघेला , उमाकांत म्हस्के , संतोष आल्हाट ,सुर्यकांत पुजारी , परशुराम मुल्ला , रवींद्र लोंढे , सुर्यकांत म्हस्के , बापू उजागरे , देवेंद्रसिंग चावला , बापू पवार , इब्राहीम शेख , हरीश चव्हाण , भगवान सरोदे , माणिक डोमणे , हेमचंद्र चौधरी , उमेश तोडकर , संतोष माटे , प्रदीप कांबळे , राजकुमार पाचपिंडे , समीर लोंढे , जनार्दन बोथा , सुनिता शिंदे , सोनिया जाधव , पुष्पा कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .
रमेश बागवे यांच्या प्रचारासाठी माजी केंद्रीय मंत्री खासदार गुलाबनबी आझाद यांच्या बैठकीचे आयोजन शुक्रवार दिनांक १० ऑक्टोंबर २०१४ रोजी दुपारी ३ वाजता भवानी पेठ येथील निशात टाकीज समोरील दिनशा हॉल येथे होणार आहे .
या बैठकित मुस्लिम समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आ
पर्वती मतदारसंघ झोपडपट्टी मुक्त करणार –अभय छाजेड
पुणे-पर्वती मतदार संघ हा झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी आपले प्रथम प्राधान्य असेल असे सांगून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेद्वारे (एसआरए) आहे त्याच जागेवर झोपडपट्टी धारकांना त्यांच्या मालकीची पक्की घरे मिळवून देवू असा निर्धार पर्वती विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस-पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गटाचे उमेदवार अॅड. अभय छाजेड यांनी व्यक्त केला.
छाजेड यांनी गुरुवारी सकाळी सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाला भेट देवून फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या व त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच त्या भागातील नवश्या मारुती येथील झोपडपट्टी, शाहीर अण्णा भाऊ साठे झोपडपट्टी येथेही घराघरात जावून मतदारांच्या भेटी घेतल्या, त्यांचे प्रश्न समजावून घेवून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासमवेत माजी उपमहापौर प्रसन्ना जगताप, शंकर पवार, हरिदास चरवड, आबा जगताप आदी उपस्थित होते. झोपडपट्टी धारकांचे आहे त्याच जागेवर पुनर्वसन करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले. पर्वती मतदारसंघ हा पर्वती टेकडीच्या नावाने असून पर्यावरणाचे महत्व लक्षात घेवून ही टेकडी हिरवीगार करण्यासाठी तसेच तिच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही छाजेड यांनी नमूद केले.
बुधवारी संध्याकाळी छाजेड यांनी एस. टी. कॉलनी, स,नं. ३५ व ३८, बालवीर चौक, गोलघर, जवाहर मित्र मंडळ, लक्ष्मीनारायण चित्रपट गृहामागील बाजू, राहाटीची विहीर, आदर्श मित्र मंडळ, प्रियदर्शनी चौक, सदाबहार चौक, लोकमान्य हाउसिंग सोसायटी, पर्वती दर्शन, वेलणकर नगर असा मार्गक्रमण करीत मॅरेथॉन भवन येथे समाप्त झाली. छाजेड यांच्या समवेत दीपक ओव्हाळ, मामा परदेशी, सादिक कुरेशी, दीपक घोलप, बेबी नाझ खान, कांबळे ताई, सुरेखा भोसले, मिसाळ गुरुजी आदी शेकडो कार्यकर्ते व महिला सहभागी झाले होते.
कोपरा सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद
अभय छाजेड यांनी विविध माध्यमातून मतदारांशी संपर्क सुरु केला असून कोपरा सभांच्या माध्यमातून युपीएच्या काळात केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामांचा व घेतलेल्या निर्णयांची माहिती मतदारांपर्यंत पोहचवली जात आहे. बुधवारी संध्याकाळी तळजाई लुंकड गेट, दाते स्टॉप व संत नगर, पद्मावती येथे कोपरा सभा घेण्यात आल्या. मुकेश धीवार, जयराम भोसले, निलेश खंडाळे, महेश वाबळे, प्रकाश आरणे, अमित बागुल यांनी या कोपरा सभा घेतल्या.
मोहसीन शेख खून प्रकरण; उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
पुणे – मोहसीन मोहंमद सादीक शेख (वय 28, रा. हडपसर, मूळ रा. सोलापूर) या संगणक अभियंत्याच्या खूनप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील आरोपी धनंजय देसाईसह 22 जणांनी पुणे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती ऍड. मिलिंद पवार यांनी दिली. या खटल्याची सुनावणी शुक्रवारी (ता. 10) होणार आहे.
फेसबुकवर महापुरुषांची बदनामी करणारी छायाचित्रे अनोळखी व्यक्तीने टाकल्यानंतर मोहसीन शेख याला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय जयराम देसाई (वय 34, रा. पौड, ता. मुळशी) याच्यासह 22 जणांना शेख याचा कट रचून खून केल्याप्रकरणी अटक केली होती. या गुन्ह्यात नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. तत्पूर्वी देसाई याने उच्च न्यायालयातही जामिनासाठी धाव घेतली होती; परंतु तेथे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. परंतु आता आरोपपत्र दाखल झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. उत्पात यांच्या न्यायालयात देसाई याने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
अमित शहा महाराष्ट्रात आल्यानेच महाराष्ट्र असुरक्षित
लोणी काळभोर :भाजप पक्ष ही अदीलशहाची टोळी आहे. त्यातले अमित शहा महाराष्ट्रात येत असल्यानेच महाराष्ट्र असुरक्षित आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
लोणी काळभोर(ता. हवेली) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ झालेल्या महिला मेळाव्यात सुळे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक काळभोर हे होते.
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, अमित शहा गुजरातचे गृहमंत्री असताना तेथील न्यायालयाने अमित शहांना हद्दपार केले. त्या अमित शहांना महाराष्ट्रात महिला असुरक्षित नाहीत, असे म्हणण्याचा व राष्ट्रवादीवर टीका करण्याचा काहीही अधिकार नाही. राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असताना, राष्ट्रवादी पक्षाच्या धोरणामुळेच महाराष्ट्रात बलात्कार करणार्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली. भाजप खोटा प्रचार करून जनतेची फसवणूक करत आहे. त्यांना खोटा प्रचार करून एकदा सत्ता मिळाली, मात्र महाराष्ट्राची जनता हुशार आहे.
भाजपचा खोटारडेपणा जनतेच्या ध्यानात आला आहे. हे सरकार शेतकरीविरोधी सरकार आहे. गेल्या काही महिन्यांत शेतकर्यांवर जे वाईट दिवस आले, ते केवळ भाजप सरकारमुळे आले आहेत. त्यामुळे जनता भाजपला हद्दपार करणार आहे, अशी आशा यावेळी सुळे यांनी व्यक्त केली. तसेच भाजपने महाराष्ट्रात साठ उमेदवार आयात केले आहेत. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांच्यावर महाराष्ट्रात पंचवीस सभा घेण्याची नामुष्की आली आहे.
अमित शहा शिवसेनेला उंदीर म्हणाले ?
सिल्लोड – आम्ही बाळासाहेबांचा आदर करतो म्हणून मोदींनी शिवसेनेविरोधात बोलणार नाही, असे स्पष्ट केले. असतानाही भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सेनेचे नाव न घेता सेनेला उंदीर म्हटल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे पाहू यात काय म्हणाले अमित सहा – ते म्हणाले “ज्या उंदराला वाघ बनवले, तोच आज आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे; त्यामुळे या वाघाला पुन्हा उंदीर करा,‘ असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज सिल्लोड येथील सभेत मतदारांना केले.
हे आवाहन करताना शहा यांनी उंदीर आणि वाघाची गोष्ट सांगितली. कुणाचेही, कुठल्याही पक्षाचे नाव न घेता या गोष्टीतून त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला. दरम्यान, सभेस सुरवात होण्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्याच्या पद्धतीलाही शहा यांनी फाटा दिला. सभा संपल्यावर मात्र जाता जाता त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, प्रचारात अफजल खानाची फौज उतरल्याचे सांगून भाजपवर टीकास्त्र सोडले होते. या पार्श्वभूमीवर येथील सभेत शहा काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. भाषणात त्यांनी कुणाचेही, कुठल्याही पक्षाचे नाव न घेता वाघ आणि उंदराची गोष्ट सांगितली. ती अशी ः एका आश्रमातील उंदराला मांजराची कायम भीती वाटायची. त्यामुळे मला मांजर कर, असे वरदान उंदराने आश्रमातील ऋषींकडे मागितले. ते पूर्ण झाले. आता मांजराला कुत्र्याचा धाक वाटायला लागला. पुन्हा त्याने ऋषींकडे कुत्रा बनविण्याचे वरदान मागितले. तेही ऋषींनी पूर्ण केले. कुत्र्याला नंतर परिसरात असलेल्या वाघाची भीती वाटायला लागली. मग त्याने वाघ करावे, अशी विनंती केली. तीही पूर्ण झाले. कालांतराने मनोकामना पूर्ण करणाऱ्या ऋषीमुनींपुढे वाघ उभा ठाकला आणि मी आता तुला खाणार असे म्हणाला. “तू मला खा; पण त्याआधी तुझ्या अंगावर पाणी शिंपडून व मंत्र म्हणून तुला पवित्र करतो,‘ असे म्हणत ऋषीमुनींनी वाघाच्या अंगावर पाणी शिंपडले. पाणी शिंपडल्याने वाघाचा पुन्हा उंदीर झाला. निवडणुकीत वाघाचा उंदीर करा, असे अप्रत्यक्ष आवाहन त्यांनी मतदारांना केले.
कोण मुख्यमंत्री हवाय? धरणे भरणारा, की दिल्लीपुढे शेपूट हलवणारा ?
नगर- भारतीय जनता पक्षासह काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपदासाठी एकही लायक चेहरा नाही. तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवाय? धरणे भरणारा, की दिल्लीपुढे शेपूट हलवणारा, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी येथे केला.
नगरशहर व जिल्ह्यातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी गांधी मैदानात घेण्यात आलेल्या सभेत ठाकरे बोलत होते. याप्रसंगी सुहास सामंत, अनिल राठोड, विजय औटी, साहेबराव घाडगे, लहू कानडे, शशिकांत गाडे, खासदार सदाशिव लोखंडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर व शीला शिंदे, शहरप्रमुख संभाजी कदम आदी उपस्थित होते. करे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही. काँग्रेस व भाजपकडे दिल्लीपुढे शेपूट हलवणारेच लोक आहेत. आता तर त्यांना शेपूट हलवण्यासाठीदेखील परवानगी घ्यावी लागते, अशा खिल्ली ठाकरे यांनी उडवली.
महाराष्ट्रातील जनता आमच्या बरोबर आहे. त्यामुळे युती तुटल्याचे दु:ख नाही. शिवसेनेच्या तिन्ही पिढ्यांनी कधीच विचार सोडले नाहीत. भाजपच्या नव्या पिढीने मात्र स्वार्थासाठी २५ वर्षांची युती तोडली. युती तोडली म्हणजे त्यांनी हिंदुत्वाशी नाते तोडले आहे. पूर्वीचे भगवे कमळ आता भगवे राहिले नसून ते आता पांढरे झाले आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. पंधरा वर्षे सत्तेत राहिलेले दोन्ही काँग्रेस व शिवसेनेच्याच बळावर केंंद्रात सत्तेवर असलेले भाजपवाले आता महाराष्ट्रावर राज्य करण्यासाठी फौज घेऊन येत आहेत. अफजल खानाच्या नावाची टोपी मी भिरकावली, परंतु त्यात भाजपने डोकं घातले, यात माझी काय चूक आहे? असे ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र हे शिवरायांचे राज्य आहे. त्यामुळे दिल्लीत कितीही शहा असले, तरी त्यांच्यापुढे झुकणार नाही. भाजपच्या अटी मान्य केल्या असत्या, तर दिल्लीपुढे हुजरेगिरी करावी लागली असती. हे जनतेला मान्य झाले असते का? सत्तेच्या लालसेपोटी सेनेची कत्तल होऊ देणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.
लडाख मध्ये चीनी घुसखोरी करताना -चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत झोपाळ्यावर झुलत होते नरेंद्र मोदी
लातूर / रायगड – चीनी सैनिक लडाखमध्ये घुसखोरी करत होते, तेव्हा देशाचे पंतप्रधान चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत झोपाळ्यावर झुलत होते, देशाच्या इतिहासात प्रथमच असे चित्र पाहायला मिळाले, असा प्रहार काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केला आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात आमची सत्ता आली तर चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवू अशी भाषा करणारे मोदी आता का शांत आहेत, आता का चीन आणि पाक च्या झोपाळ्यावर झुलतआहेत? असा सवाल त्यांनी केला. कोकणात महाड आणि लातूर जिल्ह्यातील औसा येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराला राहुल गांधी यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथून सुरवात केली. त्यानंतर ते काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूरमध्ये आले. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते. राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीला आठ दिवस उरले असताना काँग्रेस उपाध्यक्षांनी प्रचाराला सुरवात केली. राज्यातील प्रचाराचा हा त्यांचा पहिला दिवस होता.
राहुल गांधी यांच्या भाषणाचा रोख मोदी सरकारवर टीका आणि यूपीएच्या काळात केलेल्या कामाची उजळणी असा होता. भाजप सत्तेच्या जोरावर गोरगरीबांच्या हिताचे कायदे बंद खोलीत बदलत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. देश स्वतंत्र झाल्यापासून कोणतीच विकासाची कामे झाली नाही, असा प्रचार भाजप करत आहे. व्यक्ती केंद्रीत राजकारण भाजप करत असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले, ‘त्यांचे म्हणणे आहे की फक्त एक माणूस देश घडवत आहे. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लाभभाई पटेल यांच्या कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहेत. तुमच्या माझ्या आणि आमच्या माता-पित्यांच्या कर्तृत्वावर प्रश्न चिन्ह लावत आहेत.’ सर्वकाही यांनीच केले का? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
केंद्रातील भाजप सरकार गरीबांच्या विरोधात असल्याचे राहुल म्हणाले. भाजप सरकारने कँसर, ह्लदयरोग, मधुमेह यासारख्या आजारांवरील औषधी महाग केली असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे श्रीमंतांना काही फरक पडणार नाही, मात्र देशातील सर्वसामान्य नागरिकाचे आरोग्य धोक्यात येणार आहे. काँग्रेसच्या काळात मोफत औषधांची योजना सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
खडकवासला मतदार संघाला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनवेन
मनसेचे खडकवासल्याचे उमेदवार नगरसेवक राजाभाऊ लायगुड़े यांनी आज ८ ऑक्टोबरला माळवाडी, न्यू अहिरे, शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंडवे – धावडे, एन. डी. ए या भागात प्रचार केला. पदयात्रा काढून त्यांनी या भागातून शेकडो मनसे सैनिकांच्या सोबत शक्ती प्रदर्शन केले. त्यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
राजाभाऊ म्हणाले, “मी नगरसेवक म्हणून जनतेच्या कामांना व त्यांच्या स्मस्यां सोडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहे आणि आज देखिल घेतोय. आपन मला संधी द्या. जनतेचीच कामे करायची आहेत, असे भावनिक आवहान त्यांनी केले. या भागातील रस्ते, वाहतूक, पाणी, कचरा, या समस्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या समस्यांना मी पहिल्यांदा प्राधान्य देईन. व त्या सोडवण्यासाठी मी प्रयेत्न करेन. हा मतदारसंघ निसर्ग, पाणी, हवामान याने समृध्द आहे. आमच्याकडे सिंहगड, खडकवासला धरण असे बऱ्याच गोष्टी आमच्याकडे असल्याने मी या ठिकाणी पर्यटन केंद्र उभारणी करून मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्द करून देईन.
विकास बापू दांगट खडकवासला मतदारसंघाचे मनसेचे अध्यक्ष या वेळी म्हणाले, आमच्याकडे केंद्रीय जल आणि पॉवर संशोधन केंद्र, एन. डी. ए, आय. आय. टी, व खडकवासला धरण असे मोठ – मोठे प्रकल्प झाल्याने मोठ्या प्रमाणात आमच्याकडील शेती यात गेली. त्यामुळे आमचा पिढ्यानपिढ्या असणारा शेती व्यवसायावर गदा आली आणि येतील भूमिपुत्र शेती व्यवसायापासून पोरका झाला. तसेच आमच्या खडकवासलासला धरणाचे पाणी संपूर्ण पुणे शहर, बारामती या भागाला पाणी दिले जाते. आमची जमीन आमची घरे धरणामध्ये गेली. पण आम्हालाच पिण्यासाठी, शेतीसाठी आता पाणी नाही. या समस्या आम्हाला सोडवायच्या आहेत. त्यामुळे राजाभाऊ यांना निवडून द्यावे. आम्ही हे सर्व प्रश्न मार्गी लावू.
या पदयात्रेला प्रकाश ढोरे, महेश महाले, अरुण दांगट, विकास बापू दांगट, प्रविण बापू दांगट, जगदिश वाल्हेकर, संजय पायगुडे,विजय मते, सुर्यकांत कोडीतकर, रमेश करंजावणे, प्रजोत लगड , प्रविण दांगट, भरत लायगुडे, रुपेश घुले, राहुल वाळूंजकर, गणेश धुमाळ, असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
पूरग्रस्तांच्या वसाहतीतील वाढीव बांधकामाचा प्रश्न मार्गी लावणार –अभय छाजेड
पानशेत पूरग्रस्तांना ते राहत असलेल्या घराच्या मालकी हक्काचा प्रश्न कॉंग्रेस पक्षाने यापूर्वीच मार्गीलावला असून लक्ष्मी नगरच्या पूरग्रस्तांनाही त्यांचे ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळालेआहे. आता येथील रहिवाशांचावाढीव बांधकामाचा प्रश्न प्रलंबित असून तो सोडविण्यासाठी आपण प्रथम प्राधान्य देवूअसेपर्वती
विधानसभा मतदार संघाचेकॉंग्रेस-पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडेगटाचेउमेदवार अॅड. अभय छाजेड यांनीसांगितले. छाजेड यांनी बुधवारी सकाळी संपूर्ण लक्ष्मीनगरचा व शाहूवसाहतीचा परिसर पदयात्रेद्वारेपिंजूनकाढला.
अभय छाजेड यांनी विविध माध्यमातून मतदारांशी संपर्क मोहीम सकाळी सहा वाजल्यापासून सुरु केली आज सकाळी मित्रमंडळ सोसायटीच्या मैदानावर फिरायला येणाऱ्यानागरिकांच्या भेठीगाठी घेतल्या. तसेच गंगाधाम सोसायटीच्या मागील केंद्रीय विद्यालयाच्या प्रांगणातफिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांना मतदान करण्याचेआवाहन केले. त्यानंतर त्यांनीअप्पर इंदिरा नगरमधील कामगारांशी चर्चा करून त्यांचेप्रश्न जाणून घेतलेव त्यांचेप्रश्न मार्गी लावण्याचेआश्वासन दिले. त्यांच्यासमवेत इंटकचेसुनील शिंदे, कॉंग्रेसच्या व्यापारी सेलचेअध्यक्ष नेमीचंद सोळंकी,
महावीर बोगावत, भरत काळे, सुनील मोरेआदि उपस्थित होते. त्यानंतर अभय छाजेड यांच्या पदयात्रेला लक्ष्मीनगर चौकीपासून प्रारंभ झाला. सह्याद्री हाउसिंग सोसायटी, शाहूवसाहत, लक्ष्मीनगर, सारंग चौक, अरण्येश्वर शाळा, अजय मंगल कार्यालय असा मार्गक्रमण करीत सारंग सोसायटी येथेपदयात्रा समाप्त झाली..
त्यांच्यासमवेत उपमहापौर आबा बागुल, राजाभाऊ तेलंगे, अमित बागुल, सुधीर शिंदे, मंगेश भोसले, प्रशांतधुमाळ, सचिन दसवडकर, विशाल ढमाल, सोनूकाटे,नंदकुमार बानगुडे आदी प्रमुख कार्यकर्ते पदयात्रेतसहभागी झालेहोते.
नरेंद्र मोदी कामगार विरोधी ; भांडवलदार धार्जिणे -विनायक निम्हण
जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेले भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्णत: भांडवलदारधार्जिणे असून त्यांची सर्व धोरणे ही
कामगारविरोधी आहेत. अदाणी, अंबानी यांसारख्या उद्योगपतींचा बेसुमार विकास म्हणजे देशातील जनतेचा विकास असे मानून कामगार विरोधी धोरणे अवलंबणारे मोदी आणि त्यांचा भाजप पक्ष त्यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी प्रत्येक कामगाराने सज्ज व्हायला हवे. अशा परखड शब्दात टीका शिवाजीनगर मतदारसंघातील काँग‘ेस-पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे उमेदवार विनायक निम्हण यांनी कामगारांशी बोलताना केली. खडकी येथील कामगारांची भेट घेऊन प्रचार करताना ते बोलत होते.निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने खडकी येथील अॅमिनेशन फॅक्टरी येथील कामगारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जमीर शेख, खडकी कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष मनीष आनंद, किशोर निमल, नगरसेवक कमलेश चासकर, धर्मपाल यादव आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निम्हण म्हणाले की, गुजरातमध्ये कोट्यवधी नागरीक विविध समस्यांनी ग्रासलेले असूनही स्वत:चे ढोल स्वत:च वाजवत नरेंद्र मोदींनी गुजरातचा विकास झाल्याचे भासवले. वास्तविक गुजरातपेक्षा महाराष्टृा कितीतरी पटीने आघाडीवर आहे. गुजरातमध्ये त्यांनी अदानी, अंबानींना अब्जावधी रुपयांचा फायदा व्हावा, यासाठी विविध सवलतींची खैरात केली. तेच धोरण ते आता देशात राबवू पाहत आहेत. असे सांगून निम्हण म्हणाले की,काँग्रेसने केलेल्या व कामगारांच्या हक्काचे संरक्षण करणाऱ्या कामगार कायद्यात बदल भांडवलदारधार्जिणे आणि कामगारविरोधी कायदे नरेंद्र मोदी आणत आहेत. त्यांच्या या कामगारविरोधी धोरणाविरुद्ध देशातील कामगार संघर्ष केल्याशिवाय राहणार नाहीत, असे ते म्हणाले. नर्मदा धरणाची उंची 15 मीटरने वाढवून अडीच लाख गरीब कष्टकरी लोकांना त्यांनी देशोधडीला लावले. लाखो आदीवासिंचे जीवन उद्ध्वस्त करून भांडवलदारांना उद्योगासाठी पर्यावरण परवानगी देण्याचा त्यांनी सपाटाच लावला. तसेच देशातील रेल्वे व्यवस्था सुधारून सर्वसामान्य कष्टकरी जनतेला चांगली रेल्वे सेवा देण्याऐवजी अदानी, अंबानींसार‘या बड्या भांडवलदारांचे खिसे गरम राहावेत यासाठी 70 हजार कोटींचा बुलेट ट्रेन प्रकल्प राबविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. या भांडवलदारांच्या हितासाठी कामगारविरोधी निर्णय घेतील, यासाठी त्यांना कडाडून विरोध करीत भाजपला पराभूत करा, असे आवाहन निम्हण यांनी केले.
निम्हण म्हणाले की, कामगारांना 8.33 टक्के बोनस, प्रोव्हिडंड फंड, मॅच्युरिटी, पेन्शन आदी फायदे मिळवून देणारे कायदे कॉंग्रेसने केले. मोदी सरकार मात्र कामगारांना मिळणारे कायदेशीर संरक्षण कमी करण्याचे प्रयत्न करीत आहे. कंत्राटी कामगार, भांडवलदार यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत व्यवस्थापनाने अंगिकारलेली कामगार निती ही कामगारविरोधी असून कामगारांवर अन्याय करणाऱ्या व्यवस्थापनाविरुद्ध मी संघर्ष करेन. असेही ते म्हणाले. दरम्यान, चाफेकर वस्ती, ओमसुपर मार्केट येथे काढलेल्या पदयात्रेला नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निवडून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी अनिकेत कपोते, संतोष लोंढे, हेमंत डाबी आदी उपस्थिता होते. खैरेवाडी येथे काढलेल्या पदयात्रेदरम्यानही विनायक निम्हण यांचे जंगी स्वागत करण्यात
आले. पदयात्रेत हजारो कार्यकर्ते सहभागी झाली होते. यावेळी संजय बालवडकर, सुभाष परदेशी, भूषण आतिक, सूर्यकांत बिश्नोई, संजय मोरे, सचिन हांडे, राहुल वंजारी, अविनाश बेलवडे, महेश पवार आदी उपस्थित होते.
केलेल्या विकास कामांमुळे रमेश बागवे यांच्या पदयात्रेस प्रतिसाद
पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचाराची पदयात्रेची सुरुवात पुणे कॅंटोन्मेंट भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील कोहिनूर हॉटेल चौकापासून झाली . हि पदयात्रा जाफरीन लेन , कुरेशी नगर , सेंटर स्ट्रीट , भीमपुरा लेन , कामाठीपुरा , भोपळे चौक , बाबाजान चौक , बाबाजान नगर , कडबा फडई , कुंभारबावडी, ट्रायलक चौक , नवा मोदीखाना , गवळी गोठा येथे समारोप करण्यात आला.
या पदयात्रेत पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक प्रसाद केदारी , करण मकवानी , गौतम महाजन , विनोद मथुरावाला , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष असिफ शेख , अझिम गुडाकूवाला , प्रविण जाधव , विकास कांबळे , रशीद खिजर, राजू राऊत ,मनिष सोनिग्रा ,किशोर संघेलिया , क्लेमंट लाझरस , एडविन रॉबर्ट , हितेश मकवानी , विनोद सोलंकी , चांद शेख , रसूल शेख , अच्युत निखळ , सुरेंद्र परदेशी , मुन्ना केदारी , कादर सौदागर, अनिल जगताप , विठ्ठल केदारी, मंदाकिनी गायकवाड , शमशाद बेल्लीम ,स्वाती पत्ती , नीता पत्ती , चंद्रशेखर पत्ती , रतन गाडेकर , अमृता पाटेकर , मंगला भिसे , शारदा जाधव , अनामिका गायकवाड , मल्लिका सय्यद , ज्यू मदुरम , शारदा जाधव , मीनाक्षी कडू , भारती मांढरे , रजनी वस्ते आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .
यावेळी रमेश बागवे यांनी सांगितले कि , पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघ गेले अनेक वर्षापासून विकासापासून वंचित होता परंतु या मतदारसंघामध्ये आपल्या आमदार निधीतून केलेल्या विकास कामांमुळे मला जनतेने पदयात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला , या भागात पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत , मुक्तिधाम स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीचे काम , ईदगाह मैदानावरील इंटरलॉक ब्लॉकची कामे करण्यात आली आहेत . जनतेने या विकास कामांची दखल घेतली आहे , त्याची पावती ते नक्किच निवडणुकीत देतील ,राहिलेली विकासकामे आपण आगामी काळात पूर्ण करू , असा विश्वास व्यक्त केला .
भाऊ माझा कामाचा …
बाबारे होऊ देत काहीही … कधी अडचण आली ,कोणाचा त्रास झाला , कुठे मदत हवी ?अशा वेळेला कोण नाही येत कामाला …. भाऊ कडे गेलो तर भाऊ च घेतो आम्हाला समजावून … तोच आमच्या कामाचा … नाही तर काय । खूप ऐकायला येतात , बडी बडी बाते , भाषणे , टी व्ही वरच्या गप्पा … पण घर सावरायला अगदी घरातल्यासारखा हक्काने येतो तो भाऊ च … मृगजळाला फसणार नाही आम्ही … अशी वक्तव्ये खुद्द आज कसब्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक मानकर यांना प्रचारफेरीत ऐकायला मिळाली … आणि म्हणाले … या साठीच तर केला मी अट्टाहास आणखी काय हवे? मानकर यांच्यासमवेतचे कार्यकर्ते जेव्हा प्रचार करताना दीपक भाउंना मते द्या ,घड्याळाचे बटन दाबा दुसरीकडे बटन दाबू नका असे सांगत होते तेव्हा बुजुर्गांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना अशी वाक्ये ऐकायला मिळाली . भावूंकडे गेलेल्या तरुणाई ला रोजगारासाठी मदत केलेली उदाहरणे ऐकायला आली , राजकारण जावू देत तरुणांना संसाराचा -कुटुंबाचा गाडा हाकायला सुरुवात करून देतो भाऊ त्यालाच मते देणार …. अशा वाक्ये कानावर आदळल्याने नवखे बुचकळ्यात पडत होते तर भावुंना निवडणुकीचा प्रचार म्हणजे आपल्या जीवनाची वाटचाल योग्य कि अयोग्य याची प्रचीती येत होती
आज मानकर यांनी मनपा प्र . क्रमांक ५२ दत्तवाडी तसेच गुरुवार , शुक्रवार , रविवार , गणेश पेठ आदी प्रचार फेरी काढली होती यावेळी पूरग्रस्तांचे प्रश्न , सराफी व्यावसायिक आणि कामगार यांच्या समस्या याबाबत वेळोवेळी लक्ष घालून त्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले
गडकरींची नार्को करा- गरजले भुजबळ
श्रीगोंदे -गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी संपूर्ण राज्याला संशय आहे. प्रकाश शेंडगे यांनी याबाबत सीबीआय चौकशीची मागणी केली अन् त्यांचे तिकीट भाजपने कापले. दरवाजा सुरक्षित असताना मुंडे कसे काय, मृत्युमुखी पडले याबद्दल संभ्रम आहे. नितीन गडकरी यांच्यासह मुंडेंचा वाहनचालक व अपघात करणारा यांची नार्को चाचणी केली जावी. त्यातून काय घडले ते कळेल.”असे सांगत , माजी मंत्री. छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे स्वबळावर सरकार आले, तर शरद पवारच पुन्हा मुख्यमंत्री होतील. असे संकेतले. “अबकी बार शरद पवार’ हाच राष्ट्रवादीचा नारा आहे, असे यांनी जाहीर सभेत सांगितले.
बेलवंडी (जि. नगर) येथे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांच्या प्रचारसभेतते बोलत होते. माजी आमदार शिवाजीराव नागवडे अध्यक्षस्थानी होते. भुजबळ म्हणाले, गुजरातमधून येऊन काही जण आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. महाराष्ट्राने गुजरातला सयाजीराव गायकवाड यांच्या रुपाने राजा दिला होता.भाजपमध्ये आज कोणाची चलती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात कोण आहेत. बहुजन समाज ९७ टक्के आहेत. मंत्रिमंडळात मराठा, माळी, वंजारी, धनगर का नाहीत. शेटजी भटजींचे राज्य आले आहे. आमदार बबनराव पाचपुतेंना लक्ष्य करताना भुजबळ म्हणाले, जे भाजपवाले पाचपुतेंना चोर – दरोडेखोर म्हणत हाेते. त्यांच्यात प्रवेश घेतल्यावर ते साधूसंत कसे झाले. अशा माणसांवर न बोलणेच बरे. या वेळी शिवाजीराव नागवडे, घनश्याम शेलार, प्रा. तुकाराम दरेकर, अण्णासाहेब शेलार, उमेदवार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, विलास दिवटे, हरिदास शिर्के, बाळासाहेब गिरमकर, अनिल ठवाळ यांची भाषणे झाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार जगताप यांच्या प्रचारािनमित्त व्यासपीठावर तालुक्यातील सर्व प्रमुख काँग्रेस नेते एकत्र आल्याचे चित्र होते. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल वीर हे देखील व्यासपीठावर होते. वीर व जगताप यांच्यातील वैर तालुक्यात सर्वश्रुत आहे.
भाजपचा मूळ चेहरा उघड : भाजप शेटजी, भटजींचा पक्ष अशी प्रतिमा गोपीनाथ मुंडेंनी पुसून टाकली. मात्र, त्यांच्या निधनानंतर भाजपने मूळ चेहरा उघड करत ओबीसी नेत्यांची तिकिटे कापल्याचा आराेप भुजबळांनी केला.
गुजरातच्या पुढे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात येऊन पाहा, कळसुबाईच्या शिखरावर जाऊन पाहा महाराष्ट्राची उंची, छत्रपतींचे नाव घेऊन कुठे मत मागता, कधी जेजुरीला गेलात का, कधी रायगड पाहिले का? खमंग ढोकळा खाऊन हे दिसणार नाही, तर त्याला महाराष्ट्राची पुरणपोळी खाऊन पाहावे लागते, असे भुजबळ म्हणाले.
पुण्याची मंडई भव्य दिव्य करणार -डॉ. रोहित टिळक
मंडईच्या परिसराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित अनेक आठवणी
या मंडई परिसराच्या आहेत. ऐतिहासिक मंडई परिसरात लोकमान्य टिळकांचेस्मारक असल्याने
या परिसराशी टिळक परिवाराचे भावनिक नातं तयार झालेआहे. त्यामुळेच मंडई आणि परिसरातील
सर्व समस्यांसोडवण्यासाठी एकत्रित आऱाखडा तयार करावा. नव्या मंडईच्या इमारतीच्या
विस्तारीकरणाला राज्य शासनामार्फत गती देईन, असेकसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस –
पिपल्स रिपब्लीकन पार्टी (कवाडे) आघाडीचेउमेदवार डॉ. रोहित टिळक यांनी सांगितले.
मंडई आणि परिसरातील मतदारांच्या भेटी घेण्यासाठी सकाळी डॉ. रोहित टिळक यांनी तुळशीबागेतील
श्रीरामाचेआणि शारदा गजाननाचेदर्शन घेऊन सुरूवात केली. यावेळी त्यांच्या समावेत डॉ. सतीश
देसाई, नितीन गुजराथी, नाना मारणे, बाळासाहेब मारणे, अनिल सोंडकर, उल्हास भट, बाबूनवले,
भोला वांजळे, मकरंद माणकीकर, शिवराज भोकरे, चंदन मारणे, गणेश टामकर आदी होते. ढोलीबाजाचा
दणदणाट, फटाक्यांचा कडकडाटात गणरायाची आरती करून मतदारांशी संवाद साधण्यास सुरूवात
केली. अनेक गणपती मंडळांनी डॉ. रोहित टिळक यांचेउत्स्फूर्त स्वागत केले. प्रत्येक चौकाचौकात
काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची त्यांनी आवर्जून भेट घेतली.
मंडईतील व्यापा-यांच्या भेटीगाठी घेतल्यावर बुरूड आळीत जाऊन तेथील बांबूपासून वस्तूतयार करणा-
या या बुरूड कुटुंबांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तेथून शिंदेआळी, भाऊ महाराज
बोळ, जिलब्या मारूती मंडळ, शनीपार, फडतरेचौक, खालकर तालीम, राजाराम मंडळ, गाडगीळ स्ट्रीट,
गायआळी, रहाळकर राम मंदीर, नागनाथपार, निंबाळकर तालीम, बाजीराव रोड, भरतनाट्यमंदीर, शेडगे
आळी, खजिना विहीर येथेपदयात्रेचा समारोप झाला.





