Home Blog Page 3825

उद्धव ठाकरे ६३ आमदारांसह उद्या एकवीरा देवीच्या दर्शनाला

0

पुणे- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या घराण्याची कुलदैवत कार्ल्यातील एकवीरा देवीच्या दर्शनाला मंगळवारी येत आहेत. त्यांच्यासमवेत विधानसभेत निवडून आलेले सर्व ६३ आमदारही एकवीरा देवीचे दर्शन घेतील, अशी माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी येथे दिली.
उद्धव ठाकरे यांनी रविवारीच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन नवस फेडला. विधानसभेत चांगले यश मिळू दे, निवडून आलेल्या सर्व आमदारांना तुझ्या दर्शनाला घेऊन येईन असे उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई व कार्ल्यातील एकवीरा देवीला नवस केला होता. विधानसभेत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नसले तरी एकट्याच्या बळावर चांगलेच यश मिळाले असे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचे १८खासदार निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्या सर्वांना एकवीरा देवीच्या दर्शनाला आणले होते.
विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी कोल्हापूरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला ठाकरे यांनी साकडे घातले होते. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी६ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. त्या सर्व आमदारांना घेऊन ठाकरे यांनी रविवारी सपत्नीक अंबाबाईचे दर्शन घेतले.

डेंग्यू मुक्त अभियान-२६८जणांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

0

पुणे-

डेंग्यू मुक्त अभियान अंतर्गत पुणे कॅम्प मधील कुरेश नगरमध्ये कुरेश मेडिकल अन्ड एज्युकेशनल फ़ाउडेशनतर्फे २६८जणांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले क़ुरेशी मस्जिदच्या सभागृहात झालेल्या या शिबीराचे उद्घाटन अप्पर पोलिस आयुक्त अब्दुल रेहमान यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . यावेळी झेड.व्हि . एम. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचेप्रमुख डॉ युसुफ तळवी ,कुरेश मेडिकल अन्ड एज्युकेशनल फ़ाउडेशनचे अध्यक्ष हाजी सलाम कुरेशी ,उप्पाध्य्क्षआरिफ चौधरी ,सरचिटणीस हाजी अब्बास कुरेशी ,सहसचिव हाजी शकील कुरेशी ,खजिनदार असिफ शेख ,सदस्य हाजी झुल्फिकार कुरेशी ,अनिश कुरेशी ,अंजुम कुरेशी ,हारून रशीद कुरेशी ,हाजी कदिर कुरेशी ,हाजी फकीर मोहम्मद चौधरी ,झाकीर कुरेशी ,अझिम गुडाकुवाला आदी मान्यवर उपस्थित होते .
या आरोग्य शिबिरासाठी झेड.व्हि . एम. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलनेविशेष सहकार्य केले.

नाशिक मनसे मध्ये राजीनामे सुरु

0

मनसेला धक्क्यावर धक्के बसत असून मनसेच्या नाशिकच्या गडातले खंदे शिलेदार वंसत गीते आणि सचिन ठाकरे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. नाशिक महापालिकेत सत्ता असतानाही विधानसभा निवडणुकीत मनसेचा झालेला पराभव, हेच या दोघांच्या राजीनाम्याचे कारण असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्यावेळी १३ आमदार निवडून आणणाऱ्या राज यांच्या झोळीत केवळ एका आमदाराचे दान यावेळी पडले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या राज ठाकरे यांनी पराभवाच्या कारणांची शोधाशोध सध्या सुरू केली आहे. . राज ५ नोव्हेंबरला नाशकात येणार आहेत. त्याआधीच आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस वसंत गीते आणि जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. त्यांच्यापाठोपाठ मनसेचे नाशिकमधील आणखीही प्रमुख पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
द रम्यान, ‘मी पक्ष सोडणार नाही. पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहणार आहे’, असे गीते यांनी सांगितले.

भाजप सोडण्यासाठी हुसेन यांना दुबई मधून धमकी

0

नवी दिल्ली-‘भाजप सोड, नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा. नरेंद्र मोदीही तुला वाचवू शकणार नाहीत’, अशा धमकीचा फोन भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांना दुबईहून आल्यानं त्यांचे कुटुंबीय, समर्थक हादरले असून पक्षनेत्यांमध्येही काळजीचा सूर ऐकू येतोय. या फोनसंदर्भात हुसेन यांनी संसद मार्ग पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली आहे.
दुबईतील एका नंबरवरून शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्याला दोन फोन आले. तेव्हा आपण पाटण्याहून दिल्लीत पोहोचलो होतो आणि विमानतळावरून घरी जात होतो. पलीकडची व्यक्ती अत्यंत अर्वाच्य भाषेत बोलत होती. विविध वाहिन्यांवरून मोदी सरकारचं समर्थन केल्याबद्दल त्यानं शिवीगाळ केली आणि भाजप सोडण्याची धमकी दिली, असं शाहनवाज हुसेन यांनी तक्रारीत म्हटलं आहे. पक्षातून बाहेर न पडल्यास मोदीही वाचवू शकणार नाहीत, असंही त्यांना बजावण्यात आलंय.
या तक्रारीची गंभीर दखल घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. हा फोन नेमका कुणी केला असावा, यावरून वेगवेगळे कयास बांधले जात आहेत.

ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर काळाच्या पडद्याआड

0

मुंबई-ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे आज पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या ६४ व्या वर्षी फुफ्फुसाच्या संसर्गाने निधन झाले. गेले अनेक दिवस अमरापूरकर यांची प्रकृती चिंताजनक होती. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ११ वाजता मुंबईतील भाईदास हॉलमध्ये अंत्यदर्शनसाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे.
चतुरस्त्र अभिनेता ओळख असणाऱ्या अमरापूरकर यांनी कायमच विविध भूमिकांमधून आपला खास ठसा उमटविला होता. उत्तम चरित्र, खलनायक, विनोदी अभिनेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. आजवर त्यांनी ३०० सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. ‘आमरस’ या मराठी सिनेमातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र बॉलिवूडमध्ये ‘खलनायक’ म्हणून अमरापूरकर यांनी आपल्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली होती.
हँड्स अप’ हे त्यांचं गाजलेलं नाटक होतं. अर्धसत्य, सडक चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही अमरापूरकर यांची विशेष ओळख होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल’ मागणीच्या आंदोलनाला त्यांनी जाहिर पाठिंबा दर्शविला होता. तसेच डॉ. नरेद्र दाभोळकर यांची हत्या म्हणजे हे राज्य अराजकतेकडे चालले आहे, असेच समजावे लागेल. आता तरी सरकारने जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करून त्यांना श्रद्धांजली वाहावी, अशी भूमिका अमरापूरकर यांनी मांडली होती.
सदाशिव अमरापूरकर यांना पंतप्रधान मोदी यांनी भावपूर्ण शब्दांत श्रद्धांजली वाहिली. ‘या चतुरस्त्र अभिनेत्याच्या आठवणी सदैव आमच्या मनात राहतील. जुन्या आणि नव्या पीढीचे ते लोकप्रिय अभिनेते होते. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे’, असे ट्विट मोदी यांनी केले आहे. कोलकात्यात असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनीही ट्विटरच्या माध्यमातून अमरापूरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ‘जेव्हा तुमचा जवळचा सहकारी तुम्हाला कायमचा सोडून जातो तेव्हा एकप्रकारची पोकळी निर्माण होते. काहीशी अशीच अवस्था अमरापूरकर यांच्या जाण्याने झाली आहे. अमरापूरकर यांच्यासोबत घालवलेले अनेक क्षण आज डोळ्यासमोर तरळत आहेत. उपजत गुणवत्ता असलेला एक गुणी कलावंत आपण गमावलाय. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो’, अशा भावना अमिताभ यांनी व्यक्त केल्या.
खासदार सुप्रिया सुळे – चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे निधन झाल्याचे पहाटे समजले आणि अत्यंत वाईट वाटले.
अर्धसत्य ते सडक अशा अनेक चित्रपटांत अत्यंत चोख खलनायक वठवणारे, ऑंखे, इश्क आशा अनेक चित्रटांत कॉमेडीतून आपला ठसा उमटवणारे तात्या अर्थात सदाशिव अमरापूरकर यांचे निधन हे चटका लावणारे आहे. त्यांचे कुटुंबिय आप्त आणि मित्रमंडळी यांच्या दुःखात मी सहभागी आहे. चित्रपटसृष्टी एका हरहुन्नरी, चतुरस्त्र कलाकाराला मुकली आहे…
भावपूर्ण श्रद्धांजली.
शरद पवार – सशक्त अभिनय परंपरेशी नाळ असलेले कलावंत सदाशिव अमरापूरकर यांचे निधन ही दुःखद घटना असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. दिवंगत अमरापूरकर यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. चतुरस्र अभिनयाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणं हासुद्धा सदाशिव अमरापूरकर यांचा पिंड होता. विविध चळवळी आणि सामाजिक आंदोलनांशी एक कलावंत आणि व्यक्ती म्हणूनही त्यांनी बंध टिकवून ठेवला होता. या मनस्वी कलावांताला भावपूर्ण श्रद्धांजली…

मुख्यमंत्र्याकडे राज ठाकरे यांच्या मागण्यांचे पहिले निवेदन सादर

0

मुंबई-आज मनसे अध्यक्ष .राज ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृह येथे भेट घेतली… कालच मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी अहमदनगर जिल्ह्या पाथर्डी तालुक्यातील जावखेड खालसा ह्या गावात जाऊन तिहेरी हत्याकांड झालेल्या जाधव कुटुंबियांची भेट घेतली…जाधव कुटुंबियांना भेटल्यावर राज यांनी त्यांचा दौरा अर्ध्यावर सोडून तत्काळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेतला. या भेटी दरम्यान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून पुढील गोष्टी निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे, जाधव कुटुंबियांच्या हत्याकांडात असलेल्या दोषींना कठोर शासन झाले पाहिजे, तसेच अश्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी द्रुतगती न्यायालये- विशेष न्यायालये उभारायला हवीत, पोलिस यंत्रणेमध्ये सुधारणा यायला हवी असून पोलिसांना अधिक अधिकार द्यायला हवेत, समाजातील द्रुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना कायमचा धाक कसा बसवता येईल याचा विचार करायला पाहिजे. या निवेदनाबरोबर राज ठाकरे यांनी उस उत्पादक शेतक-यांना प्रतीटन पहिला हप्ता रु.२५००/- आणि अंतिम दर रु..३०००/- मिळाला पाहिजे या मागणीचे निवेदनसुद्धा दिले आहे… मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महाराष्ट्रातील विविध विषयासंदर्भात सुमारे २०-२५ मिनिटे चर्चा झाली, सुरवातीला राज ठाकरे यांनी गुलाबांचा पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले… या चर्चे दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, आमदार शरद सोनावणे, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर आदी उपस्थित होते…
rajj

राजेश दर्शले खून प्रकरणाचा सूत्रधार पकडला- मारेकरी लवकरच जाळ्यात

0

पुणे-शिवसेनेचे ताथवडे-पुनावळे विभागप्रमुख राजेश ऊर्फ राजू सखाराम दर्शले यांचा खून प्रकरणी मुख्य आरोपी सचिन कुदळे याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना कर्नाटकातील गुलबर्गा येथे अटक करण्यात आली आहे . त्यांच्याकडून दोन पिस्तूल ताब्यात घेण्यात आले आहेत. पूर्वीच्या प्रेमसंबंधास विरोध केल्याने कुदळे याने दर्शले यांचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. असे हिंजेवाडी पोलिसांचे म्हणणे आहे
सचिन सुदाम कुदळे (वय ३१, रा. माळवाडी-पुनावळे), शाहरूख ऊर्फ पाप्या रशिद शेख (वय २०, रा. भेलकेवाडी, भोर) आणि गौतम श्रीराम मोरे (वय ३३, रा. नेहरूनगर, विठ्ठलगनर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. दर्शले यांच्या खुनामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेले मोहन ऊर्फ बाबु जनार्दन मुजुमले (रा. जमदाडे चाळ, भुजबळवस्ती, वाकड) आणि प्रकाश डोंगरे (रा. डिलक्स टॉकिजजवळ, पिंपरी) या दोन आरोपींना लवकरच पकडण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
शिवसेनेचे ताथवडे-पुनावळे विभागप्रमुख राजेश दर्शले यांचा १८ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास पुनावळे-जांबे रस्त्यावरील ईस्टेरा या बांधकाम साईटवर गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमधील फुटेज तपासले होते. त्यामध्ये भोर येथील गुन्हेगारी प्रवृत्तीचा शाहरूख ऊर्फ पाप्या शेखला पोलिसांच्या खबऱ्याने ओळखले. त्यानंतर पोलिसांना शाहरूखबद्दल अधिक माहिती घेतली असता तो , सचिन कुदळे आणि त्याचा मित्र आदर्श खुनाच्या घटनेच्या अगोदर व घटनेच्या दिवशी पुनावळे परिसरात आले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तसेच सचिन कुदळे हा एका खुनाच्या गुन्ह्यांमध्ये जेलमध्ये असताना मित्र आदर्शमुळे आरोपी शाहरूखबरोबर त्याची ओळख झाल्याचे पोलिसांच्या तापासात निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी भोरमध्ये जाऊन आरोपी शाहरूखची माहिती घेतली असता तो तेथे नसल्याचे व काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा बीड, उस्मानाबाद, सातारा, वाई, पंढरपूर व सोलापूर येथे शोध घेतला. मात्र तो कर्नाटकातील गुलबर्गा येथे गेल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुलबर्गा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सापळा रचून सचिन कुदळे, शाहरूख ऊर्फ पाप्या शेख आणि गौतम मोरे या तिघांना पकडले. या तिघांचीही झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्तुल मिळाले.
या आरोपींच्याकडे अधिक चौकशी केली असता सचिन कुदळे याच्या सांगण्यावरून शाहरूख ऊर्फ पाप्या शेख, प्रकाश डोंगरे, बाबु मुजुमले या तिघांनी कट रचून शिवसेनेचे विभागप्रमुख राजेश दर्शले यांचा गोळ्या झाडून खून केल्याची कबुली दिली आहे. राजेश दर्शले यांनी पूर्वीच्या प्रेमसंबंधास विरोध केल्याने तसेच गावातील जमिनी बांधकाम व्यावसायिकांना विकसित करण्यास दिल्यामुळे व माथाडी कामगारांची कामे मिळू दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धरून कुदळे यांनी त्यांचा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी कुदळे याच्यासह शाहरूख शेख, मोहन मुजुमले व प्रकाश डोंगरे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विश्वजित खुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दर्शले यांच्या खुनातील आरोपींना पकडले.

दिलीप कांबळे आदिवासी विकास, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री

0

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह,-नगर विकास, गृहनिर्माण आणि आरोग्य खाती स्वतःकडे ठेवली आहेत. ज्या खात्यांची जबाबदारी कुणावरही सोपवण्यात आलेली नाहीत, अशी खातेही फडणवीस यांच्याकडेच राहणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

आज झालेले खातेवाटप –

एकनाथ खडसे – महसूल, अल्पसंख्याक आणि वफ्त, कृषी, पशु संवर्धन, दुग्ध, मत्स व्यवसाय, उत्पादन शुल्क.

सुधीर मुनगंटीवार – अर्थ आणि नियोजन, वन खात्याची जबाबदारी

विनोद तावडे – शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक खाते, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकिय शिक्षण, मराठी भाषा.

पंकजा मुंडे – ग्रामविकास, जलसंवर्धन, महिला आणि बालकल्याण.

प्रकाश मेहता- उद्योग, खाण आणि संसदीय कामकाजमंत्री.

चंद्रकांत पाटील – सहकार, विपणन, टेक्सटाईल आणि सार्वजनिक बांधकाम.

विष्णू सवरा – आदिवासी विकास, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य.

दिलीप कांबळे – आदिवासी विकास, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री.

विद्या ठाकूर – ग्रामविकास विभागाच्या राज्यमंत्री.

दहा वर्षात बदलणार विमानांची दुनिया

0

windowless-airplane-oled-touchscreen-walls-cpi-3

windowless-airplane-oled-touchscreen-walls-cpi-1

windowless-airplane-oled-touchscreen-walls-cpi-2
जगातील पहिले खिडकीविरहित पारदर्शक विमान उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. एक ब्रिटिश विकसक लवकरच त्याची चाचणी घेणार आहे. आजूबाजूचे दृश्य पाहण्याची संधी या विमानातून प्रवाशांना मिळणार आहे. हे विमान पारदर्शक स्क्रीन बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आकाश आणि आजूबाजूच्या अवकाशातील दृश्य प्रवाशांना पाहणे शक्य होणार आहे. अशी माहिती सीपीआय च्या सूत्रांनी प्रसिध्द केली आहे येत्या दहा वर्षात जगात अशी विमाने अवकाशात उडताना दिसतील असाही दावा त्यांनी केला आहे गेल्या पाच दिवसांपूर्वी याबाबतची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे अधिक माहिती uk-cpi.com (h/t: mashable) यावर मिळू शकेल असे हि म्हटले आहे
UK-based tech innovation company Center for Process Innovation (CPI)
या सूत्रांच्या म्हणण्यानुसार प्रवाशांच्या सीटजवळ एक स्विच देण्यात येणार आहे. त्याद्वारे ते आजूबाजूचे दृश्य पाहायचे किंवा स्क्रीन ऑफ ठेवायचा याचा निर्णय घेऊ शकतील. स्क्रीनवर इंटरनेट सर्फिंगही करता येणार आहे.
सेंटर फॉर प्रोसेस इनोव्हेशन (सीपीआय) संस्थेतील संशोधक आणि इंजिनीअर यांनी या पृष्ठभागाचे नाव ‘द विंडोलेस केबिन विथ अ व्ह्यू’ असे ठेवले आहे.
विमानात बसून एका छोट्याशा प्लास्टिकच्या खिडकीतून जगाकडे पाहण्याचे दिवस लवकरच इतिहासमा होतील. भविष्यातील विमानांमध्ये संपूर्ण पारदर्शी काचा बसविलेले पृष्ठभाग असतील. अतिलवचिक, उच्च दृश्यमानता असलेले तंत्रज्ञान विकसित करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. या स्क्रीनवर एक्सटर्नल कॅमेऱ्यांतून प्रत्यक्ष दृश्ये दाखविण्यात येतील,’ असे या संस्थेच्या संशोधकांनी सांगितले.
या स्क्रीनमध्ये ओएलईडी तंत्रज्ञान बसविण्यात येणार आहे. या पारदर्शक वजनाने हलक्या पृष्ठभागामुळे विमानाचे एकूण वजनही कमी होण्यास मदत होणार आहे.
विमानाचे वजन हा इंधन बचतीच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असतो. विमानाचे वजन एक टक्क्याने कमी झाल्यास इंधन ०.७५ टक्के कमी लागते. वजन कमी झाल्यास, इंधन कमी लागते आणि परिणामी कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जनाचे प्रमाणही कमी होते. त्याच प्रमाणे वाहतूक खर्चही कमी होतो.
सध्याच्या खिडक्या तयार करण्याचा खर्च जास्त आहे.;ओएलईडी डिस्प्लेसारखे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान संकल्पनेतून प्रत्यक्ष उत्पादनात आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
अन्य छायाचित्रे –
airbus-2050-concept-600x307

‘जात, पैसा आणि गुन्हेगारी हेच राजकारण- नितीन गडकरी

0

पुणे – ‘जात, पैसा आणि गुन्हेगारी हेच राजकारण झाले आहे. लोकांना हे बदलायचे आहे, जातीपातीचे बंध तोडायचे आहेत. परंतु, राजकारण्यांना हा बदल घडू द्यायचा नाही. गरिबांसाठी काम करणे हेच खरे राजकारण. आपल्या संस्कृतीचे ते तत्त्वज्ञान आहे, तेच जैन समाज करीत आहे,‘‘ असे गौरवोद्‌गार काढताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण्यांवर टीका केली.
बालेवाडी- म्हाळुंगे येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात आयोजित “भारतीय जैन संघठन‘च्या राष्ट्रीय अधिवेशात ते बोलत होते. संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा, खासदार अनिल शिरोळे, दिलीप गांधी, संजय काका पाटील, आमदार चैनसुख संचेती, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख आदी या वेळी उपस्थित होते. पुणे व अन्य जिल्ह्यांतील नवनिर्वाचित आमदारांचा या वेळी गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गडकरी म्हणाले, “”शरीरावर शस्त्रक्रिया करायची तेव्हा चांगला डॉक्‍टर लागतो. निवडणूक आली की मात्र जातीचाच कोणी पाहिजे; परंतु कोणताही राजकारणी त्याच्या जातीचा उद्धार करीत नाही, असे माझे ठाम मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी अशा राजकारणाला छेद दिला आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकांमध्ये आम्हाला सवर्णांच्या जातीचे “कार्ड‘ही वापरता आले असते; परंतु आम्ही तसे केले नाही, कारण आम्ही जातपात मानत नाही.‘आपल्याकडे गरिबी, कुपोषण या समस्या अजूनही आहेत. देश “धनवान‘; पण जनता गरीब आहे, कारण चांगले काम करणाऱ्यांची संख्या कमी आहे. राजकारणीही समाजकारणाकडे दुर्लक्ष करतात. संघटनेच्या माध्यमातून तुम्ही केवळ जैनांसाठी नव्हे; तर अन्यही शोषित, पीडित समाजासाठी काम करीत आहात. धर्माची शिकवण सत्यात आणत आहात, या भावनेतून काम करीत राहिलात, तर समाज आणि देश बदलेल.‘‘
मुथा म्हणाले, ‘देशात चांगला बदल घडविण्याची क्षमता जैन समाजात आहे. आम्ही सेवा करण्यासाठी नेहमी पुढे असतो. गुजरात, किल्लारी, अंदमान यांसह विविध ठिकाणी उद्‌ध्वस्त झालेला प्रदेश पुन्हा उभा करण्याचे, शाळा उभारणीचे काम संघटनेने केले. मेळघाट, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी पुण्यात आणून त्यांना पदवीपर्यंत शिक्षण देण्याचे काम केले. सरकारकडून शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असल्याने मूल्य शिक्षण आणि शाळा दर्जा सुधार कार्यक्रम संघटनेने सुरू केला आहे, ते “मोड्यूल‘ राष्ट्रनिर्माणासाठी देशातील सर्व राज्यांना देणार आहे.‘‘

राज्यातील टोल माफियांच्या हाती – मुख्यमंत्री

0

मुंबई – महाराष्ट्रातील टोल माफियांच्या हाती असल्याचे वक्तव्य आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे
ते म्हणाले , टोल बाबत , भारतभरातील आणि जगभरातील स्थितीचा अभ्यास करून आणि अनेकांशी चर्चा करून आम्ही टोल बाबत धोरण ठरविलेले आहे , टोल ला वेगळा पर्याय नाही हे वास्तव आहे , सगळीकडे टोल असताना महाराष्ट्रातच टोल विषयी एवढी का ओरड होते तर , महाराष्ट्रातील टोल हा माफियांच्या हाती गेला आहे , पारदर्शकता ठेवून , करार तपासून अन्यायकारक टोल शोधून ते घोषित करून आम्ही ते बंद करू
मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यावर फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे याची पदोपदी जाणीव होते आहे ११ कोटी जनतेच्या आशा आकांक्षा पूर्तीचे आव्हान पेलायचे आहे याची जाणीव आहे त्यामुळे सर्वप्रथम सेवा हमी कायदा आणला माहिती अधिकाराप्रमाणे सेवा अधिकार हि जनतेचा आहे असेही ते म्हणाले

शिवसेनेशी भाजपची चर्चा केंद्रीय स्तरावर …मुख्यमंत्री फडणवीस

0

मुंबई – भाजपा सरकारमध्ये शिवसेना सहभागी होण्याबाबत सकारात्मक चर्चा चालू असून हि चर्चा राज्य पातळीवर नाही तर केंद्रीय स्तरावर सुरु असल्याचे वक्तव्य नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने खरी सूत्रे भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती असल्याचे स्पष्ट झाले आहे . भाजपमध्ये महाराष्ट्राचा निर्णय राज्यापातळीवरच घेईल असा नेता आता गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर कोणी उरला नसल्याची भावना राजकीय वर्तुळात पसरली आहे
दरम्यान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा आकार छोटाच राहणार असून, आमदारांच्या संख्येच्या प्रमाणात 10 टक्के आमदारांचेच मंत्रिमंडळ असणार आहे. याचबरोबर आपले सरकार स्थिर व भक्कम राहावे यासाठी फडणवीस शिवसेनेसोबतच व घटकमित्रपक्षांना सोबत घेणार आहेत. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची संख्या 30-32 च्या आसपास असणार आहे. यात भाजपकडे 18, शिवसेनेकडे 8 तर चार घटकपक्षांना 2 कॅबिनेट व 3 राज्यमंत्रीपद अशी एकून 5 मंत्रिपदे दिले जाण्याची शक्यता भाजपमधील सूत्रांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र विधानसभेची संख्या 288 आहे त्यानुसार 10 टक्के मंत्रिपदाचे मंत्रिमंडळ बनवायचे झाल्यास 29 जणांचा समावेश होऊ शकतो. त्यानुसारच भाजप पावले टाकत असून आपल्या सरकारची मंत्रिपदाची संख्या 30-32 च्या वर जाणार नाही याची काळजी घेताना दिसणार आहे.

डेंग्यू उत्पत्ती प्रकरणी ससून रुग्णालयालाच महापालिकेची नोटीस

0

(फाईल फोटो )
पुण्याच्या ससून रुग्णालयातच आणि परिसरातील अस्वच्छता पाहून डेंग्यूच्या डासांची उत्पततेची येथे होवू शकते असा निष्कर्ष काढून पुणे महापालिकेने ससून रुग्णालयाला नोटीस बजावली आहे . हि नोटीस बजावल्याने येथील रुग्णांसह , डॉक्टर , कर्मचारी आदींचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त , वुत्तवाहिन्यांनी दिले आहे दरम्यान यावर ससून रुग्णालयाचे प्रशासन आणि अधिष्ठाता यांचे म्हणणे समजू शकले नाही

पुणे रेल्वे स्थानकाच्या छताला भीषण आग

0

78
पुणे रेल्वे स्थानकाच्या पहिल्या मजल्यावरील एमसीएच्या कार्यालयाला शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास आग लागल्याने कार्यालयातील साहित्य जळून खाक झाले. स्थानकाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर बाहेरील बाजूस ही आग लागली होती. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. बाहेरील आग आत पोहोचण्यापूर्वीच अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे एक तासात ती आटोक्यात आणली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
पुणे रेल्वे स्थानकाची इमारत ऐतिहासिक असून, ब्रिटिश काळात २७ जुलै १९२५ रोजी बांधून पूर्ण झाली होती. एमसीएच्या कार्यालयात लष्करी अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी विश्रामगृहासह कागदपत्रांची पूर्तता करण्याची कामेही येथे केली जातात. इमारतीचे छत पूर्णत: सागवानी लाकडे आणि कौलारू आहे. अचानक लागलेली आग या लाकडांमुळे जास्तच भडकत गेली. एका बाजूने वारा सुटल्यामुळे आग जास्तच भडकत जाऊन सुमारे शंभर ते दीडशे फुटापर्यंत गेली होती. लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरील बाजूसपहिल्या मजल्यावरील पोलिसांचे रेकॉर्ड सीसीटीव्ही नियंत्रण कक्षही जळाला
जीवितहानी नाहीया आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंग यांनी दिली.लागलेली ही आग पूर्वेकडून पश्‍चिमेकडे पसरत मुख्य प्रवेशद्वाराच्या वरपर्यंत आली होती. या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही, असे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले. महापालिकेच्या सात आणि कॅन्टोन्मेंटची एक अशा आठ गाड्या आणि तीन टँकरच्या साहाय्याने सुमारे एक तासात ही आग आटोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर प्रवासातील लष्करी अधिकार्‍यांसाठी विश्रांती कक्ष बनविण्यात आला आहे. या कक्षापासून सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी आगीला सुरुवात झाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ७ वाजून ३५ मिनिटांनी आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळविले. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील अर्धा ते एक तास गाड्या त्याच ठिकाणी थांबविण्यात आल्या होत्या. या आगीत रेल्वे पोलिसांच्या रेकॉर्डरूममधील कागदपत्रे जळून खाक झाली. स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा नियंत्रण कक्षही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेची बहुतांशी कागदपत्रे आणि फाइल्स या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या, असे सांगण्यात आले. रेल्वेचे मंडल प्रबंधक सुनीत शर्मा यांनीरेल्वे वाहतूक दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर वळवली स्थानकाच्या मुख्य इमारतीलाच आग लागल्याने एक क्रमांकाच्या फलाटावर भीतीचे वातावरण होते. त्यामुळे तेथील प्रवाशांना बाजूला करण्यात आले. या फलाटावर येणार्‍या सगळ्या गाड्या तीन क्रमांकाच्या फलाटावर वळवून वाहतूक सुरळीतपणे चालूच ठेवण्यात आल्याचे वाय. के. सिंग यांनी सांगितले.

व्ही. के. असोसिएट’ च्या वडगामासह तिघांना अटक;दुर्घटनाग्रस्तांची अवस्था हलाखीची

0

पुणे- पुण्यातील न-हे-आंबेगाव येथे इमारत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी बिल्डर आणि जागामालकासह तिघांना शनिवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
किशोर पितांबर वडगामा (वय 48, रा. नऱ्हे गाव), रणजित संभाजी देसाई (वय 40, रा. सहकारनगर) आणि कैलास कृष्णा कंक (वय 48, रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
नऱ्हे ग्रामपंचायतीच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास “पिताराम कॉम्प्लेक्‍स‘ ही इमारत कोसळून संगणक अभियंता संदीप दिलीप मोहिते (वय 29) यांचा मृत्यू झाला. शिवाय इमारतीत राहणाऱ्या नऊ कुटुंबांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. या घटनेनंतर सिंहगड पोलिसांनी काल चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नऱ्हे ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेल्या “पिताराम कॉम्प्लेक्‍स‘ची जागा रणजित देसाई आणि सीताबाई ज्ञानोबा रानवडे यांची आहे. त्या जागेवर व्ही. के. असोसिएट्‌सचे मालक किशोर वडगामा आणि प्रकाश रामचंद्र कंधारे यांनी इमारत बांधली. त्यांच्यासह आरसीसी डिझायनर डेलकॉन कंपनीचे बाळ कुलकर्णी आणि पिताराम कॉम्प्लेक्‍सचे आर्किटेक्‍ट, आरसीसी कन्सल्टंट, कंत्राटदार, बांधकाम साहित्य पुरवठादार आणि त्यांच्या सहाय्यकांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीनंतर या दुर्घटनेस जबाबदार प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधितांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
पिताराम कॉम्प्लेक्‍समधील रहिवासी इमारत कोसळण्यापूर्वी वेळीच घराबाहेर पडल्याने एक तरुण वगळता सर्वांचे जीव वाचले. केवळ अंगावरील कपड्यानिशी बाहेर पडलेल्या रहिवाशांचे संसार उपयोगी साहित्य ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
इमारतीमधील काही रहिवाशी नातेवाइकांच्या घरी आणि इतरत्र राहण्यास गेले आहेत. परंतु त्यांचे सोन्याचे दागिने, रोख रक्‍कम, मोबाईल, बॅंक पासबुक, एटीएम कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्या वस्तू आणि कागदपत्रे ढिगाऱ्यातून सापडतील या आशेने काही जण त्याचा शोध घेत आहेत. दुर्घटनेच्या दिवशी ढिगारा उपसताना सापडलेले काही दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स आणि पासपोर्ट पंचनामा करून पोलिसांनी संबंधितांना सुपूर्त केला आहे. सर्व काही जमीनदोस्त झाल्यामुळे साधा चहा प्यायचा तरी खिशात पैसे नाहीत. काही रहिवाशांनी शुक्रवारी रात्री बाजूच्या इमारतीत आसरा घेतला. शनिवार उजाडताच ढिगारा उपसताना आपले सामान मिळेल, या अपेक्षेने तेथील रहिवाशी दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या परिसरात आले. महत्त्वाच्या वस्तू मिळाव्यात यासाठी त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.सहाव्या मजल्यावर राहणारे प्रकाश यादव यांना पासपोर्ट आणि पत्नीची पर्स मिळाली. पार्किंगमध्ये मोटारीत महत्त्वाची कागदपत्रे अडकली आहेत; परंतु संपूर्ण ढिगारा उपसल्यानंतरच काही वस्तू हाती लागण्याची शक्‍यता आहे.
महापालिका हद्दीलगतच्या गावांमधील अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी तलाठ्यांची पथके नियुक्त करण्यात येतील. येत्या सोमवारपासून ही पाहणी केली जाईल. महापालिकेने मदत केल्यास, अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई केली जाईल, असे प्रभारी जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी शनिवारी सांगितले.
दुर्घटना घडल्यानंतर, कारवाईसंदर्भात पाटील म्हणाले, ‘त्या इमारतीच्या पहिल्या दोन मजल्यावर वाहनतळ आणि त्यावर चार मजले बांधण्यास परवानगी देण्यात आली होती. बांधकाम व्यावसायिकाने त्यावर आणखी एक अनधिकृत मजला बांधला होता. तेरा गुंठे जागेवर ही इमारत बांधली होती. त्याला अकृषी प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्या इमारतीचे प्लिंथ चेकिंग नगररचना विभागामार्फत झाले होते. मात्र, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नव्हता. संबंधित बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘‘
‘प्रांत अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, नगर रचना विभागाचे व महापालिकेचे अधिकारी यांची बैठक सोमवारी घेण्यात येईल. त्यामध्ये अनधिकृत बांधकामाच्या पाहणीबाबतचा तपशील ठरविला जाईल. त्यानुसार, अशा बांधकामांची पाहणी करून अहवाल तयार केला जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ती बांधकामे पाडण्यासाठी कर्मचारीवर्ग आणि यंत्रसामग्री नाही. महापालिकेने ती उपलब्ध करून दिल्यास, अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई केली जाईल. यापूर्वीच्या मोहिमेत 22 इमारतींविरुद्ध कारवाई करण्यात आली होती,‘‘ असे त्यांनी सांगितले.पाटील म्हणाले, ‘नोंदणी विभागाच्या दुय्यम सहनिबंधकांनाही अशा इमारतीच्या खरेदी विक्रीची नोंदणी न करण्याची सूचना देण्यात येईल. नोंदणी महानिरीक्षक यांना आम्ही त्यासंदर्भात कळविणार आहोत.‘‘