Home Blog Page 3590

गणेशोत्सव दणक्यात साजरा करा, विघ्नांना घाबरू नका, शिवसेना पाठिशी आहे–उद्धव ठाकरे

0

मुंबई-‘गणेशोत्सव दणक्यात साजरा करा, विघ्नांना घाबरू नका, शिवसेना पाठिशी आहे,’अशी  स्फूर्ती आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिली वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज महापालिका अधिकारी व गणेशोत्सव समन्वय समितीची संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव यांनी गणेशोत्सव मंडळांच्या मागे ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले.यावेळी गणेशोत्सवातील जल्लोषाला विरोध करणाऱ्यांवर आणि त्याविरोधात न्यायालयात जाणाऱ्यांवर  उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. ‘गणेशोत्सव भारतात नाही तर काय पाकिस्तानात साजरा होणार? या उत्सवाला ब्रिटिशांनी विरोध केला नाही, मग तुम्ही का विरोध करता? अशा प्रश्नांची सरबत्ती करतानाच, ‘हा मुर्दाडांचा उत्सव नाही, जिवंत माणसांचा उत्सव आहे तो दणक्यातच साजरा होणार,’ असे उद्धव यांनी विरोधकांना ठणकावले.
प्रत्येक गणेशोत्सवाच्या वेळी काही-ना-काही अडथळे आणणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. ‘गणेशोत्सवाला विरोध करणाऱ्यांनी मंडळांच्या सामाजिक कार्याकडेही लक्ष द्यावे, असं उद्धव म्हणाले. ‘शहरात बॉम्बस्फोट झाले, त्यातील आरोपींविरोधात अद्याप खटले सुरू आहेत. या विरोधात कोणाला न्यायालयात जावेसे वाटत नाही. पण आपलेच लोक आपल्याच उत्सवांच्या विरोधात जातात. नमाजाच्या भोंग्याच्या विरोधात त्यांच्यातला कुणी न्यायालयात गेल्याचे दिसत नाही. मग आमच्याच उत्सवात विघ्न का,’ असा संताप व्यक्त करून, ‘विघ्नांना घाबरू नका, शिवसेना पाठिशी आहे,’ असे आश्वासन उद्धव यांनी यावेळी समन्वय समितीला दिले. गणेशोत्सव समितीसाठी कार्यालय उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

भारतात सर्वात जास्त गरीब आणि दलितांनाच फासावर लटकवलं जातं- न्यायमूर्ती ए. पी. शाह

0

नवी दिल्ली ‘भारतात सर्वात जास्त गरीब आणि दलितांनाच फासावर लटकवलं जातं. त्यामुळं कायद्यातील मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या तरतुदीवर गंभीरपणे फेरविचार होण्याची गरज आहे.’
हे खळबळजनक मत  विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. पी. शाह यांनी स्वत: तसं निरीक्षण करून  नोंदवलं आहे. ‘युनिव्हर्सल अॅबॉलिशन ऑफ डेथ पॅनल्टी: अ ह्युमन राइट्स इम्परेटिव्ह’ या विषयावर व्याख्यान देताना शाह यांनी हे वक्तव्य केलंय. दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असलेल्या शाह यांनी आपलं मत मांडताना व्यवस्थेतील विसंगतींवर बोट ठेवले. ‘आपल्या देशात सर्वसाधारणपणे गरीब आणि दलितच मृत्यूदंडाचे बळी ठरतात, असं दिसतं. कारण आपल्या व्यवस्थेत अनेक विसंगती आहेत. त्या दूर करण्याची गरज आहे. एखाद्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी पर्यायी मॉडेलची आवश्यकता आहे,’ असं ते म्हणाले.

पुण्याचा पाहुणचार घेवून संत निघाले पंढरीला ….

0
माऊलींची पालखी दिवे घाटात पोहोचली तेव्हा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा सेल्फी
माऊलींची पालखी दिवे घाटात पोहोचली तेव्हा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा सेल्फी
हडपसर मध्ये पालख्यांचे उत्स्फूर्त भव्य स्वागत झाले
हडपसर मध्ये पालख्यांचे उत्स्फूर्त भव्य स्वागत झाले
माजी महापौर चंचला कोद्रे यांनी वारीचे केलेलं स्वागत आणि पाहुणचार
माजी महापौर चंचला कोद्रे यांनी वारीचे केलेलं स्वागत आणि पाहुणचार

11059593_469482763227775_5502936524559712558_n 11693809_469483676561017_6103613437059397359_n

पुणे –  साधु संत येती घरा, तोची दिवाळी दसरा अशा आनंदी वातावरणात ज्ञानोबा -तुकाराम आणि अन्य संतांच्या पालख्यांचा पुणेकरांनी उत्कट भावनेने पाहुणचार केला.आज सकाळी  ज्ञानोबा माउली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांना  भक्तिभावाने पंढरपूरकडे मार्गस्थ हि केले   आज सकाळी दोन्ही पालख्या पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.
शनिवारी माऊलींनी पुण्यामध्ये मुक्काम केल्यानंतर रविवारी सर्व संत मंडळींच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या. नाना पेठेत मुक्कामी असलेली संत तुकाराम महाराजांची पालखी सकाळी साडे सहा वाजता पुढील मार्गक्रमणासाठी रवाना झाली. तर भवानी पेठेत मुक्कामी असलेली संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सकाळी सहा वाजता मार्गस्थ झाली.
आज सकाळी संत ज्ञानेश्‍वरांच्या पालखीची शिंदे छत्रीजवळ परंपरागत आरती झाली. त्यानंतर हडपसरमध्ये अल्पविश्रांती घेण्यात आली  आज सकाळी संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमधील अल्पविश्रांतीनंतर सोलापूर रस्त्याने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली संत ज्ञानेश्वरांची पालखी आज दुपारी अडीच वाजता दिवेघाटापर्यंत पोचली आज ती सासवड यथे मुक्कामी असेल .
विठ्ठलनामाच्या गजरातील उत्साही वातावरणात पालखी आगेकूच करत आहे. पालखीच्या पुण्यातील वास्तव्यात पुणेकरांनी प्रचंड उत्साहात पालखीचे स्वागत केले होते.  आजही  पालखी सोहळ्यात पुणेकरांनी गर्दी केली आहे. विशेषत: तरुणांची उपस्थिती लक्षणीय आहे. आज अधिकमासातील कमला एकादशी असल्याने वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालख्या हडपसरपर्यंत एकत्र होत्या . तेथून पुढे वेगळ्या वाटेने दोन्हीही पालख्या पांडुरंगाकडे धावघेतली . संत तुकारामांची पालखी सकाळी पावणे दहा वाजता हडपसरमध्ये पोचली. तर अल्पशा विश्रांतीनंतर सोलापूर रोडने पुढील प्रवासासाठी रवाना झाली. तर संत ज्ञानेश्वरांची पालखी सकाळी पावणे दहाच्या सुमारास सासवड मार्गे निघाली.
दोन्हीही पालख्यांनी हडपसरमध्ये अल्पविश्रांतीसह अल्पोपहार घेतला. एकादशीच्या निमित्ताने बहुतेक वारकऱ्यांना उपवास असल्याचे ठिकठिकाणी विविध संघटना, संस्थांच्यावतीने उपवासाच्या अल्पोपाहराचे वितरण करण्यात आले. दिवेघाटातील 33 किलोमीटरचा विनाथांबा प्रवास असल्याने संत ज्ञानेश्वरांच्या पालखीतील आजचा दिवस वारकऱ्यांसाठी सत्वपरीक्षा असल्याचे मानले जाते. तर शनिवारी आपला नगर जिल्ह्यातील डोंगलगाव येथील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पुढे मार्गस्थ झाली आहे.

शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी पालखी पुण्यात असताना वारकऱ्यांना उपयोगी वस्तूंचे वाटप केले
शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी पालखी पुण्यात असताना वारकऱ्यांना उपयोगी वस्तूंचे वाटप केले

1505621_1079354738759846_4714969544735843777_n

महेश वाबळे यांनी वारकऱ्यांसाठी  भोजन समारंभ ठेवला होता
महेश वाबळे यांनी वारकऱ्यांसाठी भोजन समारंभ ठेवला होता
नगरसेवक सुभाष जगताप  यांनी वारकऱ्यांसाठी  भोजन समारंभ ठेवला होता
नगरसेवक सुभाष जगताप यांनी वारकऱ्यांसाठी भोजन समारंभ ठेवला होता

11705247_593577144078431_3656149707244299837_n

माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी वारकऱ्यांसाठी  भोजन समारंभ ठेवला होता
माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी वारकऱ्यांसाठी भोजन समारंभ ठेवला होता

शिवसेनेच्या जीवावरच राज्यातले भाजप सरकार – अजित पवार

0

पुणे-उद्धव ठाकरे ठरवतील तो फडणवीस सरकारचा अखेरचा दिवस असेल असे स्पष्ट प्रतिपादन करीत राज्यातले सरकार तरी शिवसेनेनच्याच कृपेवर चालले असल्याचा गर्भित इशारा  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी येथे दिला
अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप-शिवसेनेत सुरू असलेल्या कुरबुरींबाबत थेट भाष्य करताना, सांगितले कि ‘राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडे पूर्ण बहुमत नसून, शिवसेनेने अनेक मुद्द्यांबाबत विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेतला, तर फडणवीस सरकारचा तो अखेरचा दिवस असेल,’ असे नमूद करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकारच्या अस्थितरतेवर बोट ठेवले. भाजप-शिवसेनेतील दरी वाढत चालली असल्याने मुदतपूर्व निवडणुकीसाठी तयार राहण्याचा संदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला असतानाच, अजित पवार यांनीही त्याचीच री ओढत फडणवीस सरकारच्या भवितव्याची दोरी शिवसेनेच्या हाती असल्याची टिपण्णी केली.
पवार म्हणाले, राज्यातील नव्या सरकारमधील मतभेद मात्र अवघ्या सात महिन्यांतच चव्हाट्यावर आले असून, शिवसेनेच्या मुखपत्रातूनच सरकारच्या अनेक निर्णयांवर जाहीर टीका केली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला, तर भाजपच्या अल्पमतातील सरकारचे दिवस भरले.’
‘नुसताच लाल दिवा मिळाला; पण अधिकार मिळाले नाहीत, निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले जात नाही, अशी तक्रार सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या मित्रपक्षाकडूनच केली जात आहे. भारत-पाक संबंधांविषयी देखील शिवसेनेकडून वेगळा विचार व्यक्त केला जात असल्याने हे सरकार किती काळ तग धरेल, याबद्दल शंका आहे,’ असेही पवार म्हणाले.

अंधशाळेतील विद्यार्थींनीना ‘अंकनाद अ‍ॅप’ची भेट

0
mail.google.com
पुणे :
पावकी – निमकी पाढे ‘अंकनाद अ‍ॅप’द्वारे पुन्हा भेटीस आले असून, ‘निर्मिती इपिक’ या संस्थेद्वारे त्याचे पुनरूज्जीवन करण्यात आलेले अंकनाद अ‍ॅप कोथरूड येथील अंधशाळेतील विद्यार्थींनीना देण्यात आले. आज दिनांक 11 जुलै रोजी ‘अग्रज फूड प्रॉडक्टस’चे संचालक बाळासाहेब थत्ते यांच्या वतीने हे अ‍ॅप भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी राष्ट्रपती विजेत्या शिक्षीका मॉर्डन शाळा सौ. मृगजा कुलकर्णी, टेलिव्हीजन मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री संयोगिता भावे, मंदार नामजोशी व निर्मिती नामजोशी उपस्थित होते.
मंदार नामजोशी व निर्मिती नामजोशी यांनी या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या अंकनाद अ‍ॅपमध्ये नादबद्ध अंकलिपी, पावकी, निमकी, पाऊणकी, कवायती, दिडकी, अडीचकी, औटकी (साडेतीन), एकोत्री, 1 ते 30 पाढे, अशा वेगवेगळ्या पाढ्यांमुळे बीजगणितात अंध विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे.
यावेळी बोलताना बाळासाहेब थत्ते म्हणाले, ‘बदलत्या तंत्रज्ञानचा वापर करून ‘अंकनाद’ या अ‍ॅप्लिकेशनद्वारे पाढे पाठांतर विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरत आहे. अंध विद्यार्थ्यांना संगीताच्या तालात पाढे पाठांतर करता येणार आहे.’
अ‍ॅप सुरू करताच अंध विद्यार्थिनींनी पाढे आनंदाने म्हणण्यास सुरूवात केली. ‘आम्हाला या अ‍ॅपद्वारे पाढे म्हणण्यास अतिशय आवडत आहे’ अशी प्रतिक्रिया विद्यार्थींनीची होती. बालवाडीपासून ते दहावीपर्यंत उपयुक्त या अ‍ॅप्लीकेशनद्वारे या विद्यार्थीनी पाठांतर करणार आहेत. अशी माहिती मंदार नामजोशी यांनी दिली.

पुणे शहर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’तर्फे कृतज्ञता पर्वामुळे मान्यवर भारावले ; अजित पवार यांनी मान्यवरांच्या घरी जाऊन केला सत्कार

0
दादा वासवानींचे अजित पवार यांना आशीर्वाद 
mail.google.com
पुणे:
‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’तर्फे समाजाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राबविण्यात येणार्‍या ‘कृतज्ञता गौरव’ उपक्रमाला आज दिनांक 11 जुलै रोजी सकाळी प्रारंभ करण्यात आला. उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आज अजित पवार यांच्या हस्ते पद्मविभुषण डॉ.के.एच.संचेती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शं.ना.नवलगुंदकर, ज्येष्ठ शिल्पकार बी.आर.खेडकर, ज्येष्ठ उद्योजक हुकूमचंद चोरडिया, दादा जे.पी.वासवानी या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
 राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी 75 वर्षपूर्तीनिमित्ताने हे वर्ष कृतज्ञता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत येत्या डिसेंबरपर्यंत 75 ज्येष्ठ / श्रेष्ठ नागरिकांचा त्यांच्या घरी जाऊन गौरव करण्यात येणार आहे. या सत्काराचे स्वरूप पुणेरी पगडी, मोत्याची माळ , पेशवाई उपरणे आणि सन्मानचिन्ह असे आहे.
 नगरसेवक विजय (अप्पा) रेणूसे, विशाल तांबे, अभय मांढरे यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.
 यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘घरोघरी जाऊन गौरव करण्यात आपुलकी आणि जिव्हाळा असतो. सत्कारार्थींच्या कुटुंबियांना देखिल अभिमानास्पद वाटते.पत्रकारसंघाच्या अध्यक्षांचा सत्कार वैयक्तिक नसून प्रातिनिधीक आहे. हा सत्कार प्रत्येक पत्रकाराचा आहे. कला, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकिय, वैज्ञानिक अशा क्षेत्रात विशेष योगदान देणार्‍या वीभूतींचा गौरव या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहेत. सत्कारप्रसंगी सत्कारमूर्तींच्या दारापुढे रांगोळी काढण्यात आली तसेच सनई चौघडे वाजवून कृतज्ञता गुढी उभारण्यात आली. सत्कार मूर्तींचे कुटुंबिय अजित पवार स्वत: घरी येउन सत्कार केल्याने अतिशय भारावलेेले होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ.संचेती म्हणाले, ‘शरद पवार यांनी माणसे जोडण्याचे मोठे काम केले आहे. स्वत:च्या आरोग्याकडे जास्त लक्ष न देता सामाजिक कार्यात स्वत: ला झोकून दिले, तोच वारसा आणि पंरपरा अजित पवार पुढे नेत आहेत, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. अजित पवार यांचे वैक्तिमत्व अधिक तडफदार आणि आक्रमक आहे. त्यांची निर्णयक्षमता गतीशिल आहे. हा उपक्रम स्तुत्य असून या गौरवाने मला अतिशय आनंद वाटत आहे. 
 नवलगुंदकर म्हणाले, ‘स्वत:ची कामे बाजूला ठेवून पवार घराणे समाजाची सेवा करीत आहे. हे स्तुत्य आहे. शरद पवारांची सर्व क्षेत्रातील मैत्री जपणे, लोकसंग्रह वाढविण्याची हातोटी वाखाण्याजोगी आहे.’
 दादा वासवानी म्हणाले,‘आपल्याकडे किती सेवक आहेत यावर मोठेपण ठरत नाही, तर आपण किती जणांची सेवा केली यावरून ठरते. सेवेशिवाय जीवन निरर्थक आहे. मी आजपर्यंत एकही पुरस्कार स्विकारला नाही परंतु हा सत्कार स्विकारताना मला विशेष आनंद होत आहे.’ 
यावेळी खासदार अ‍ॅड. वंदना चवहाण, महापौर दत्तात्रय धनकवडे, अ‍ॅड. जयदेव गायकवाड, माजी उपमहापौर दिपक मानकर, माजी आमदार मोहन जोशी तसेच पक्षाचे पदाधिकारी, आमदार उपस्थित होते.
 पुढील टप्प्यातील गौरवार्थीमध्ये संगणकतज्ज्ञ डॉ.विजय भटकर, कामगार नेते बाबा आढाव, साहित्यिक आनंद यादव, डी.एस.खटावकर, सुधीर गाडगीळ, पखवाजवादक तुकाराम भूमकर, निरंजन पंड्या, आशा काळे तसेच दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, कसबा गणपती आणि मंडई गणपती मंडळाच्या अध्यक्षांचाही समावेश आहे.
 

 

पालख्यांचे स्वागत झाले लई भारी …

0

पुणे- महापालिकेतील अधिकाऱ्यांनी आणि तमाम पुणेकरांनी काळ पुण्यात आलेल्या संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे आणि वारकऱ्यांचे स्वागत लई भारी केले . पालिका आयुक्त कुणाल कुमार , सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, विलास कानडे , जनसंपर्क अधिकारी संजय मोरे यांच्यासह कित्येक अधिकारी आणि कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने वारीत दिसले . महापौर दत्ता धनकवडे , उपमहापौर आबा बागुल  तसेच काही आमदार माजी आमदार , नगरसेवक , असा राजकीय नेते कार्यकर्त्यांचा  ताफा हि नेहमीप्रमाणे स्वागताला सज्ज होताच . पुणे बार असोसिअशन चे पदाधिकारी प्रसिध्द वकील शिरीष शिंदे , राणी कांबळे इत्यादी असंख्य मान्यवरांसह  अनेक नागरिक हि त्यासाठी आणि वारकऱ्यांना सहाय्य- मदतीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे आले होते यापूर्वीच्या बातम्या प्रसिध्द करताना हीअर्थात काही फोटो प्रसिध्द केले आहेतच पाहू यात उर्वरित काही फोटो

11667266_916732871717863_2165715242415752113_n 11692480_1039725029379772_1154867536583870120_n 11694980_667880006644840_8897398387984953068_n 11695409_1164504720232528_2902272244174536602_n 11698630_1039719299380345_3791054058962026258_n 11698740_916731538384663_373560581599736725_n 11700905_916732605051223_7128406152516584942_n 11702896_916731815051302_6379624499976683839_n 11709826_1039719182713690_1401883779014932670_n 11737916_1039724866046455_7844171839195139183_n 11742704_667875953311912_4354115578882317779_n 11742752_1039724919379783_4417803756383397330_n

 

कात्रज तलावाच्या परिसरात २६ फुट उंचीचा विठूराया अवतरणार

0

पुणे-कात्रज येथे २६ फुट उंचीची विठ्ठलाची मूर्ती नगरसेवक वसंत मोरे बसविणार आहेत  जागतिक मराठी भाषा दिना दिवशी  आषाढ़ी एकादशीला हि मूर्ती स्थानापन्न करण्याचा त्यांचा मानस आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी फायबरची  26 फूटी मूर्ति कात्रज तलावावर स्वखर्चाने बसवनार असे वचन श्री वसंत मोरे यांनी भाविकांना दिले होते ते  5 महिन्यामधे पूर्ण होत आहै येत्या 27 तारखेला ला ही भव्य मूर्ति तलावावर बसणार आहे  नुकतीच माउली जंगले यांनी मूर्तिला भेट दिली आणि त्यांचे कौतुक केले

10981738_851360504949863_3139154749555725460_n 11692623_851360361616544_6843630395320065320_n

शरद पवार यांच्या अमृत महोत्सवनिमित्त गौरव समारंभाला सुरुवात

0

पुणे- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या अमृत महोत्सवनिमित्त ७५ विविध मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे त्याची सुरवात आज श्री अजित पवार यांचे हस्ते झाली.आज डॉ के एच संचेती प्रा शं ना नवलगुंदकर बी आर खेडकर हुकुमचंद चोरडिया दादा वासवानी आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर यांचा गौरव करण्यात आला.

ओळख…टीमचा सिंबॉयसिसच्या विद्यार्थ्यांशी सवांद…

0

 पुणे येथील सिंबॉयसिस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत ‘ओळख माय आयडेंटिटी’ या मराठी चित्रपटाच्या टीमने नुकताच सवांद साधला.

जमील खान दिग्दर्शित आणि भूषण पाटील, खुशबु तावडे, अलका कुबल-आठल्ये, अरुण नलावडे अभिनित ओळख माय आयडेंटिटी हा मराठी चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ओळख…टीम या महाविद्यालयात दाखल झाली होती. बिजनेस मैनेजमेंट आणि फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांना ओळख टीमने चित्रपटाविषयी आणि आपल्या भूमिकेबबत माहिती दिली. तर विद्यार्थ्यांनी, निर्माते आणि दिग्दर्शकांकडून चित्रपटाच्या तांत्रिक बाबीवर आणि निर्मीतीव्यवस्थेवर खोलवर चर्चा केली. यावेळी निर्माते हर्षादीप सासन आणि सह निर्मात्या शीतल राजवीर देखील उपस्थित होत्या.

mail.google.com

संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसमवेत मुस्लिम बांधवांनी सोडला रमजान चा उपवास

0

 

पुणे-

मुस्लिम बांधवांच्या रमजानच्या उपवासनिमित आणि संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पालखी सोहळ्यातील आलेल्या वारकरी बांधवासमवेत मुस्लिम बांधवांनी उपवास सोडला . मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट व श्री समर्थ स्टोलधारंक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वारीतील वारकरी आणि रमजानच्या उपवास करणारे मुस्लिम बांधवासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी करण्यात आले होते . सोमवार पेठेतील समर्थ व्यायाम मंदिरात हा कार्यक्रम झाला . या कार्यक्रमास मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मुस्ताक पटेल ,पत्रकार सुनिल माळी , विघ्नहर्ता न्यायसचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई , बाबाजान दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष अड. ए. रेहमान , समर्थ व्यायाम मंदिराचे सचिव कांता येलवंडे , रफिक काझी , अड . नूरमोहम्मद तांबे , मेहबूब शेख , दीपक वनारसे , मरियम पटेल , फारुख बखला , आनंददास बाणे , मोहन डवरी , पांडुरंग चिकणे , शंकर खोपडे आदी मुस्लिम आणि वारकरी बांधव उपस्थित होते . यावेळी मुस्लिम बांधवानी दुआ म्हणली तर वारकरी बांधवांनी अभंगातून वारीचे महत्व पटवून दिले . आपण सर्व धर्म समभाव हा संदेश समाजाला देऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले . अशा भावना व्यक्त करण्यात आल्या . यावेळी वारकरी बांधवानी शिरकुर्मा आणि फलाआहार देण्यात आला . तर मुस्लिम बांधवाना खजूर आणि फलाआहार देण्यात आला .

महावितरणकडून पालखी सोहळ्यात वीजसुरक्षेचे जनजागरण

0

mail.google.com

पुणे : श्रीक्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. 10) महावितरणकडून

नाशिक फाटा येथे स्वागत करण्यात आले. यावेळी वीजसुरक्षा व बचतीबाबत जनजागरण करण्यात आले.

पिंपरी विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रभारी मुख्य अभियंता श्री. भालचंद्ग खंडाईत, कार्यकारी अभियंता

श्री. धनंजय औंढेकर, शरद रिनके यांची प्रमुख उपस्थिती होती. महावितरणचे अभियंता व कर्मचार्‍यांच्या वर्गणीतून

पालखीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना पिण्याचे पाणी व न्याहरीच्या पदाथार्ंची कापडी पिशवी देण्यात आली. या

पिशवीवर वीजबचतीचा संदेश छापण्यात आला आहे. तसेच पुणे लघु प्रशिक्षण केंद्गाने तयार केलेल्या वीजसुरक्षेच्या

माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक भाविकांनी महावितरणच्या अधिकार्‍यांशी संवाद साधला व

वीजसुरक्षा व बचतीबाबतच्या उपक्रमाचे स्वागत केले. आयोजनासाठी महावितरणचे रवींद्ग खडक्कर, एम. आर. साळुंके,

भाऊसाहेब सावंत, मनोहर कोलते, हरिविजय नाझरकर, मनोज पुरोहित, अनिल गावडा, एस.पी. शिवनेचरी आदींनी

पुढाकार घेतला.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यनगरीत …

0
(पहा वारीतले फोटो )
पुणे- विठ्ठल विठ्ठल … माऊली माऊली… ग्यानबा -तुकाराम ‘ चा जयघोष … टाळ मृदुंग व हरी नामाच्या गजरात लाखो वारकरी व पुणेकरांच्या जनसागरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोहोंच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले. मोठ्या उत्साही वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी आज सायंकाळी पुण्यात प्रवेश केला. पुणेकरांनी दोन्ही पालख्यांचे भव्य पद्धतीने स्वागत केले.
हजारो भाविक , अनेक राजकीय पुढारी कार्यकर्ते ,पत्रकार यांनी या पालख्यांचे वारीत सहभागी होत दर्शन घेत भक्ती भावाने स्वागत केले मात्र राज्याचे राज्यपाल के. विद्यासागर राव हे पालखी दर्शनासाठी पुण्यात आले असता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना दर्शन न घेताच मुंबईत परतावे लागले. पुणे पोलिसांनी नकारात्मक अहवाल दिल्यानंतर राज्यपाल राव यांनी दर्शन न घेता परत जाण्याचा निर्णय घेतला. दिंडी मालक संघटना आज पुण्यात आंदोलन करणार आहे. यामागे पंढरपूर शहरातील स्वच्छतेबाबत हायकोर्टाने बजावलेल्या आदेशाने दिंडी मालक संघटना व सरकार यांच्यात छुपा संघर्ष सुरु आहेअसे सांगितले जाते .
देहूहून पंढरपुरला निघालेली तुकाराम महाजारांची पालखी आपला आकुर्डी येथील दुसरा मुक्काम हलवून पुण्यामध्ये दाखल झाली.  तुकाराम महाराजांच्या पालखीपाठोपाठ आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी  पुण्यनगरीत दाखल जाली.
संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी-चिंचवडकरांचा पाहुणचार घेऊन दापोडी-खडकीत पोहचली. त्यानंतर सायंकाळी ती पुण्यात दाखल झाली. तिकडे आळंदीहून भोसरी, दिघी विश्रांतवाडी मार्गाने संत ज्ञानेश्वरांची पालखी पुण्यात दाखल झाली. पुणे महानगरपालिकेच्या वतीने या दोन्ही पालख्याचे भव्य स्वागत करण्यात आले. दोन्ही पालख्यांचा आज व उद्या असा दोन दिवस पुण्यात मुक्काम राहील. या काळात पुणेकर वारक-यांना मोठया प्रमाणात अन्नदान करणार आहेत.

संत ज्ञानेश्‍वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात व संत तुकाराम महाराज महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामास असून, रविवारी(12 जुलै) पुढील मार्गाकडे प्रस्थान ठेवणार आहे. चांदीच्या रथात विराजमान झालेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात करण्यात आले.
वाकडेवाडी जवळील पाटील इस्टेट येथे महानगरपालिकेच्या वतीने पालख्यांचे स्वागत करण्यात आले.ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी रथापुढे 27 व मागे 201 दिंड्या असून, तुकाराम महाराजांच्या पालखी रथापुढे 25 व मागे 304 दिंड्या आहेत.विविध राजकीय पक्ष,सामाजिक संस्था,संघटनां,सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे तसेच सर्वधर्मिय नागरिकांच्या वतीने वारकऱ्यांना पिण्याच्या पाणी आणि खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे वापट करण्यात येत होते.पालखी दर्शनाकरीता रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.माऊली व तुकोबांच्या पालखी समोरून डौलाने चालणाऱ्या अश्‍वांचेही दर्शन नागरिक मोठ्या भक्तीभावाने घेत होते.
दरम्यान संगमवाडी येथे पालखी  थांबविण्यात आली होती , ज्याप्रमाणे आळंदीतून उशिरा पालखी निघाली  – आणि वेळोवेळी आंदोलनाचा इशारा देत गेली वारकरी संघटनेने आपली भूमिका मांडली या भुमिकेबद्दलचा वाद मिटल्याने संगमवाडी येथे थांबविण्यात आलेली ज्ञानेश्वर माउलींची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली . सरकारने वारक-यांच्या मागण्या उच्च न्यायलयासमोर योग्यरित्या मांडाव्यात. तसेच तसे निवेदन जिल्हाधिका-यांनी वारकरी-फडकरी दिंडी मालक संघटनेला आणून द्यावे. त्यानंतरच पालखीचे पुढे मार्गस्थ होईल, अशी भूमिका संघटनेने घेतली होती.
आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे होणा-या वारीदरम्यान मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरते. तसेच तेथे शौचालयांची व्यवस्था नसल्याने वारीनंतर हाताने मैला साफ करण्याची कुप्रथा कायम असल्याची बाब एका स्वयंसेवी संस्थेने याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेत ही कुप्रथा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात सुरू असल्याबाबत राज्य सरकारला धारेवर धरले होते.
वारक-यांसाठी आवश्यक स्वच्छतागृहे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याचबरोबर पंढरपूरच्या वाळवंटात तंबू उभारण्यासही बंदी घालण्यात आली होती. राज्य सरकारने या संदर्भात आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे वारक-यांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे वारकरी-फडकरी दिंडी समाजामध्ये नाराजीची भावना आहे.

 

a1
पालखी पुण्यात दाखल होताच पत्रकार अर्चना माने हिने मोबाईल वर काढलेले हे छायाचित्र

a2 a3

vari 1
पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी विलास कानडे आणि अन्य मनपा अधिकारीवर्ग वारीत सहभागी झाला
vari 5
माजी मंत्री माजी आमदार चंद्रकांत छाजेड आणि त्यांचे कार्यकर्ते भुतडा आदींनी वारकऱ्यांचे स्वागत केले

vari 6

vari 7
पुणे शहर काँग्रेस चे अध्यक्ष अभय छाजेड यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले

vari 11

vari2
पुण्याचे महापौर -उपमहापौर आयुक्त -सह आयुक्त आदी सर्वांनी वारकऱ्यांचे शहरात स्वागत केले

vari3 vari4 vari9

11700814_10204552631476883_1041020960477136315_n
पुण्यातील पत्रकार शैलेश काळे यांनी आळंदी ते पुणे अशी वारी सहभाग नोंदविला
vari 1
चित्रपट सृष्टीत काम करणारी भावंडे – अमोल कांगणे आणि प्रीतम कांगणे आणि त्यांचे सहकारी मित्र यांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घालून वारीचे स्वागत केले
vari 5
अभिनेत्री प्रीतम कांगणे वारीत … रांगोळ्या काढताना

vari 6vari2vari3

vari4
चित्रपट सृष्टीत विविधांगी कामे करणारा अमोल कांगणे
11223916_485038971650670_7024184685272535535_n
वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि मदतीसाठी नगरसेविका रेखा टिंगरे
11698703_10206257849478265_6617318307359353315_n
भाजपचे सरचिटणीस संदीप खर्डेकर आणि नगरसेवक दिलीप उंबरकर यांचा वारीत सहभाग
11666160_914915691915080_6631768562768736934_n
वैभव कडलग ,विलास कानडे आदी अधिकारी , कर्मचारी काही काळ प्रत्यक्ष वारीत सहभागी झाले

vari711201821_10206257846478190_777889607891113519_n11701232_10206257846798198_4277966309510865984_nvari 1011694980_914912148582101_5881670519173408376_n

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची प्रातिनिधीक स्वरुपाची होळी करून दिला तंबाखूमुक्तीचा संदेश

0
 
पुणे:
    ‘ज्ञानेश्‍वरी प्रतिष्ठान’ आणि ‘जाणीव सामाजिक संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आगमन झालेल्या तुकाराम आणि ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्यात जनजागृती करण्यासाठी ‘तंबाखू मुक्त महाराष्ट्राची दिंडी- पालखी सोहळा’ चे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री भार्गवी चिरमुले दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या. ‘ज्ञानेश्‍वरी प्रतिष्ठान’च्या वतीने डॉ. सायली कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी आणि जाणीव सामाजिक संस्थेच्या वतीने मधूकर बिबवे, राजेंद्र शेलार, प्रमोद पाटील यांचा सहभाग होंता.
दिंडीमध्ये 300 ते 350 विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक  आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. या पालखी सोहळ्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची प्रातिनिधीक स्वरुपाची होळी करण्यात आली. तंबाखूमक्तीची ही पताका आपल्या महाराष्ट्रात उंचविण्यासाठी आणि तंबाखूमुक्त महाराष्ट्रासाठी या उपक्रमात नागरिकांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता.
आज शुक्रवारी 10 जुलै 2015 रोजी दुपारी वाकडेवाडी येथून ही दिंडी माउलींच्या पालख्यांच्या आगमनापूर्वी काढण्यात आली होती. दिंडीची सांगता अलका टॉकीज चौकात झाली. महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष अश्‍विनी कदम, खासदार अनिल शिरोेळे, आयुक्त कुणाल कुमार, नगरसेवक योगेश टिळेकर, सुनंदा गडाळे यांनी दिंडीचे स्वागत केले. अलका टॉकीज चौकात गोल रिंगण करून तंबाखूमुक्तीचा संदेश देणार्‍या घोषणा देण्यात आल्या व ‘होय, मला तंबाखू मुक्त महाराष्ट्र हवा’ याविषयी जनजागृतीसाठी पत्रके वाटण्यात आली.
यावर्षी ज्ञानेश्‍वरी प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू सेवनामुळे होणार्‍या जीवनहानी बद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी ‘होय, मला तंबाखू मुक्त महाराष्ट्र हवा’ या अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच अभियानाच्या पुढील टप्यात ‘तंबाखू मुक्त महाराष्ट्राची दिंडी- पालखी सोहळा’ या जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘होय, मला तंबाखू मुक्त महाराष्ट्र हवा’ या अभियानाचे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर’ म्हणून झी मराठी वरील प्रसिद्ध मालिका ‘जय मल्हार’ मधील खंडोबाची भूमिका करणारे कलाकार देवदत्त नागे आणि स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ मालिकेतील कल्याणी ची भूमिका करणारी कलाकार जुई गडकरी हे या अभियानाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

ऋषी कपूर चा सल्ला ही धुडकावला (एफटीआयआय चा तिढा )

0
मुंबई, – अभिनेता रणबीर कपूरकने एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता त्याचे वडील व अभिनेता ऋषी कपूर यांनीही आता . ‘आत्तापर्यंत झालेले सर्व वाद आणि आंदोलनांनंतर एफटीआयआयचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी स्वेच्छेने पद सोडावे’ असा सल्ला ऋषी कपूर यांनी दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.तर दुसरीकडे कितीही टीका झाली तरी त्याचा माझ्यावर विपरीत परिणाम होणार नसून फिल्म इन्स्टिट्युटचं अध्यक्षपद सोडणार नसल्याचे गजेंद्र चौहान यांनी स्पष्ट केले आहे.तर अनुपमखेरयांनीआपणगजेंद्रप्रकरणातकाहीचबोलणारनसल्याचेम्हटलेआहे
ऋषी कपूर यांनी म्हटले आहे कि , ‘सध्या सुरू असलेली आंदोलने व एकूण वाद पाहता गजेंद्र चौहान यांनी स्वत:हून पदाचा राजीनामा द्यावा, असा सल्ला मला द्यावासा वाटतो.  जर विद्यार्थी तुम्हाला  नको म्हणत  असतील  तर राजीनामा देऊन पद सोडणेच संयुक्तिक ठरेल. अध्यक्षपदासाठी तुमच्याच नावाचा आग्रह कायम ठेवून काहीच होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही स्वाभिमानाने पद सोडावे’ असे ऋषी कपूर यांनी म्हटले आहे.
यापूर्वी अभिनेता रणबीर कपूरने एफटीआयआय्या विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला होता. ‘विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशीच व्यक्ती अध्यक्षपदी नेमावी’ असे मत त्याने व्यक्त केले होते.