पुणे : सरहद, पुणेच्या माध्यमातून काश्मीरमधील अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात मुख्यत्वे करून पुण्यात राहात आहेत. महाराष्ट्रातील जनतेशी आमचे स्नेहबंध जोडले गेले आहेत. महाराष्ट्राविषयी आम्हाला आपुलकी आहे. महाराष्ट्रातून काश्मीरमध्ये परतलेल्या विद्यार्थ्यांनी पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्या मराठी पर्यटकांना मानसिक आधार देत त्यांची काळजी घेतली. महाराष्ट्रात शिकलेला काश्मिरी युवकवर्ग आपल्या ज्ञानाचा उपयोग काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी करू इच्छित आहे. ज्या योगे त्यांना काश्मीर पलिकडील भारताची मुख्यत्वे करून महाराष्ट्राची माहिती होईल. त्यांना प्रमुख प्रवाहाशी जोडण्याची चळवळ उभी केली जाईल. दहशवादी हल्ल्यानंतर या युवकांमध्ये अस्वस्थता आहे. भारतातील काही ठिकाणी काश्मीरमधून शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ले झाले आहेत या पार्श्वभूमीवर आज (दि. 27) काश्मीरमधील पुण्यात शिकलेल्या विद्यार्थ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अर्हम संस्थेचे प्रमुख डॉ. शैलेश पगारिया, सरहद, पुणेचे समन्वयक लेशपाल जवळगे तसेच अकीब भट (आरागाम), मंझूर बशीर (बांदिपोरा) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी महम्मद शफी (बडगाम), गुलशन काद्री, दिलबर खोजा (कुपवाडा), मारिया गुलजार (गंदेरबल), असिफ डर हे काश्मिरी युवक उपस्थित होते. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेध करीत मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहून काश्मिरी युवकांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशाच्या विविध भागात शिक्षण-व्यवसायानिमित्त असलेल्या काश्मिरी तरुणांना धमकावले गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातही असे किरकोळ प्रकार झाल्यानंतर उद्या (दि. 28) पोलीस आयुक्तांची भेट घेऊन परिस्थितीविषयी अवगत केले जाणार आहे. मात्र आमची कोणाविरुद्ध तक्रार नाही. पोलिसांनी आम्हाला सदैव मदत केली आहे. त्या बद्दल त्यांचे आभारही मानणार आहे, अशी माहिती देऊन अकीब भट म्हणाले, सरहद संस्थेशी आम्ही जोडले गेलो असून याच माध्यमातून पुण्यातून शिक्षण घेऊन परत काश्मीरमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांनी दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांची काळजी घेतली. या मागचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील जनता आणि काश्मिरी युवक यांच्यात भावबंध जुळलेले आहेत. पुण्यात घेतलेल्या शिक्षणाचा वसा आम्हाला काश्मीरमधील पुढच्या पिढीकडे पोहोचवायची इच्छा आहे.
मंझूर बशीर म्हणाले, महाराष्ट्रातील वास्तव्यामुळे मला मराठी भाषा समजते आणि बोलताही येते. मी काही मराठी चित्रपटांमध्येही काम केले असून नृत्य दिग्दर्शनही करत आहे. यातून माझा पुण्या-मुंबईतील मराठी माणसांशी स्नेहबंध जुळला आहे. सरहद, पुणेच्या माध्यमातून मला मिळालेल्या शिक्षणाने माझ्यातील आत्मविश्वास व सकारात्मकता वाढीस लागली आहे. मी स्वत: काश्मीरमधील दहशतवादाने पिडीत आहे. आम काश्मिरी जनता दहशतवाद्यांचा नेहमीच विरोध करत आली आहे. काश्मीरमधील पर्यटन बंद पाडून तेथील आर्थिक व्यवहार ठप्प होणे आम्हाला योग्य वाटत नाही. तसेच आम्ही घेतलेले शिक्षण सरदह संस्थेच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील आमच्या मूळ गावातील विद्यार्थ्यांना देऊन त्यांनाही आत्मविश्वासू व स्वयंपूर्ण बनविण्याचा आमचा मानस आहे. या करीता काश्मीर व महाराष्ट्रातील एकात्मता, प्रेम, जिव्हाळा अखंडित रहावा, अशी आम्हा काश्मिरी युवकांची इच्छा आहे. महाराष्ट्रातून काश्मीरला येणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र दूत म्हणून आम्ही काम करणार आहोत.
भिमतर्फे विश्वासार्ह युजर्सना सुरक्षितपणे पेमेंट करता यावे यासाठी पार्शियल डेलिगेशनसह युपीआय सर्कल लाँच
युजर्सना पाच विश्वासार्ह कॉन्टॅक्ट्सना रियल- टाइम अप्रुवलसह युपीआय अॅक्सेस देता येणार
मुंबई – एनपीसीआय भिम सर्व्हिसेस लिमिटेड (एनबीएसएल) या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ
इंडियाच्या (एनपीसीआय) संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने आज युपीआय सर्कल विथ पार्शियल डेलिगेशन ही सेवा भिम
अॅपवर लाँच केली आहे. या सेवेमुळे युजर्सना सुनिश्चित मर्यादा व संपूर्ण पारदर्शकता राखत विश्वासार्ह व्यक्तींना युपीआय
व्यवहार करण्याचे अधिकार देता येतील.
युपीआय सर्कलमुळे प्रायमरी युजर, युपीआय खातेधारकाला पाच सेकंडरी युजर्सना त्यांच्या खात्यातून युपीआय पेमेंट
करण्याचे अधिकार देता येणार आहेत. सेकंडरी युजरला प्रत्येक व्यवहार करण्यासाठी त्यांच्या प्रायमरी युजरकडून खास
अप्रुवल त्यांच्या युपीआय पिनद्वारे नव्या भिम अॅपवर घ्यावी लागणार आहे. सेकंडरी युजर्सद्वारे केले जाणारे सर्व व्यवहार
प्रायमरी युजरला त्यांच्या नव्या भिम अॅपवर रियल टाइम पाहाता येतील आणि पर्यायाने पारदर्शकता कायम ठेवत
देखरेख करता येईल.
या सुविधेच्या लाँचविषयी एनबीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ललिता नटराज
म्हणाल्या, ‘भिमवरील युपीआय सर्कल ही केवळ एक सुविधा नाही, तर ते सर्वसमावेशक आणि कनेक्टेड आर्थिक यंत्रणा
उभारण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. आर्थिक जबाबदारी दुसऱ्याकडे देण्याचा सुरक्षित व लवचिक मार्ग उपलब्ध
करत युपीआय सर्कलने आपल्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करून एकमेकांशी जोडलेला समाज उभारणीचा मार्ग खुला
केला आहे. अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण सुविधेसह आम्ही डिजिटल पेमेंट्स यंत्रणा प्रत्येकासाठी अधिक उपयुक्त व
सहजपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टासाठी महत्त्वाचे योगदान देत आहोत.’
त्याशिवाय युपीआय सर्कलद्वारे युपीआय- लिंक्ड बँक खाती नसलेल्या लोकांमध्ये आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना
मिळावी यासाठी विश्वासार्ह युजरकडून पेमेंट रिक्वेस्ट करता येणार आहे. त्या युजरला नव्या भिम अॅपवर रियल टाइम हे
व्यवहार अप्रुव करता येईल.
महत्त्वाचे लाभ
ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर – ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याद्वारे अधिकृतता देऊन त्यांच्या वतीने
प्रत्येक पेमेंटला अप्रुवल देता येईल. बरेचसे ज्येष्ठ नागरिक डिजिटल पेमेंट सुविधा वापरताना कचरतात आणि यामुळे
त्यांना विश्वासार्ह व सुरक्षितपणे व्यवहार करता येतील.
तरुण मुलांना सक्षम करणारे : पालकांना त्यांच्या तरुण मुलांना त्यांचे दैनंदिन किंवा शैक्षणिक खर्च नियंत्रित,
मर्यादित अक्सेससह आणि सुरक्षेबाबत तडजोड न करता रियल टाइम अप्रुवलसह करण्याची सोय देता येईल.
लहान व्यवसायांसाठी सुरक्षित डेलिगेशन – व्यवसाय मालकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना रोजच्या खर्चाची पेमेंट्स
करण्याचे अधिकार देता येतील. उदा. इंधन, टोल किंवा व्हेंडर पेमेंट्स, रोख पैसे न हाताळता त्यांना जबाबदारी देणे
मालकांना शक्य होईल.
डिजिटल सुविधांचा अनुभव नसलेल्यांसाठी मदतीचे – नोकरदार व्यावसायिकांना त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना
किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्सची पुरेशी माहिती नसलेल्यांना रियल- टाइम मॉनटरिंग व अप्रुवलद्वारे पेमेंट करण्याची
सोय देता येईल.
युपीआय सर्कल नव्या भिम पेमेंट्स अॅपच्या अद्ययावत व्हर्जनवर (४.०.२ व्हर्जन) अपग्रेडमध्ये समाविष्ट करण्यात आले
आहे. त्याशिवाय यामध्ये स्पिल्ट एक्सपेन्सेस, फॅमिली मोड, स्पेंड्स डॅशबोर्ड, मल्टीलिंग्वल सपोर्ट आणि युजरसाठी नवीन
अनुभव यांचा समावेश आहे. भारत का अपना पेमेंट्स अॅप ही भूमिका निभावण्यासाठी आणि भारताच्या डिजिटल
स्थित्यंतरासाठी सुरक्षित, व्यापक, सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज आहे.
भिमवर युपीआय सर्कल कसे वापरावे
- भिम अॅपओपन करा आणि होम स्क्रीन किंवा मेन्यूमध्ये युपीआय सर्कल सेक्शनमध्ये जा.
- ‘अॅड सेकंडरी युजर’वर टॅप करा आणि त्यांचा युपीआय आयडी द्या किंवा क्यूआर कोड स्कॅन करा.
- डेलिगेशन टाइपमध्ये ‘अप्रुव एव्हरी पेमेंट’ (पार्शियल डेलिगेशन) निवडा.
- सेकंडरी युजरला रिक्वेस्ट येईल. इन्व्हाइट स्वीकारल्यानंतर त्यांना प्रायमरी युजरच्या खात्याचा वापर करून पेमेंट्स
करता येतील व भिम अॅपद्वारे प्रायमरीला रियल- टाइममध्ये पेमेंट अप्रुव करण्याची रिक्वेस्ट पाठवता येईल.
सीयूई 120 नावाचे व्हेअरीएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह सादर
पुणे,: पंपिंग सुविधा पुरवणारी एक जागतिक पुरवठादार कंपनी गृन्डफॉसने भारतीय बाजारपेठेसाठी भारतात विकसित केलेले सीयूई 120 नावाचे व्हेअरीएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह सादर केले आहे. या नव्या उत्पादनाचा उद्देश पंपच्या कार्यक्षमतेवर अधिक अचूक नियंत्रण ठेवणे आणि ऊर्जा कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे आहे.
संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की सध्या सुमारे 70% व्हेअरीएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह्ज (VFDs) फॅक्टरीच्या डीफॉल्ट सेटिंग्सवर कार्यरत आहेत. त्या बर्याचदा त्यांच्या विशिष्ट अनुप्रयोगांसाठी अनुकूल नसतात. अशा प्रकारच्या अनुकूल नसण्याच्या अभावामुळे ऊर्जा कार्यक्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे अनावश्यक ऊर्जा वापर आणि कामकाज खर्च वाढतो. परिणामी, अनेक प्रणाली कार्बन उत्सर्जन कमी करण्यात आणि कार्यक्षमता वाढविण्यात त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यात अपयशी ठरतात.
सीयूई 120 हे उत्पादन या समस्यांवर उपाय म्हणून डिझाइन करण्यात आले असून, हे भारतीय बाजारपेठेसाठी विशिष्ट सानुकूलित उपाय सादर करते. त्यामुळे अधिक अचूक नियंत्रण व स्थानिक गरजांनुसार ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारणा शक्य होते.
गृन्डफॉस सीयूई 120 सादर करताना कंट्री प्रेसिडेंट इंडिया उषा सुब्रम्हण्यम् म्हणाल्या, “गृन्डफॉस सीयूई 120 हे केवळ एक उत्पादन नाही तर नवकल्पना आणि शाश्वततेसाठी असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. भारतासाठी डिझाइन केलेले हे उत्पादन उद्योग, इमारती आणि समुदायांना अधिक स्मार्ट, ऊर्जा कार्यक्षम पंपिंग सोल्यूशन्स देऊन एक हरित भविष्य शक्य करत आहे. आंतरविभागीय सहकार्याच्या माध्यमातून साध्य झालेले आमचे हे स्थानिक पातळीवर विकसित केलेले पहिले उत्पादन असल्यामुळे हे सादरीकरण गृन्डफॉस इंडियासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे.”
22 kW पर्यंतच्या मोटर्ससाठी ऑप्टिमाइझ केलेले सीयूई 120 कोणत्याही गृन्डफॉस पंप रेंजसोबत सहजपणे एकत्रित होते आणि उत्कृष्ट कार्यक्षमता व परिणामकारकता देते. हे ऊर्जा वापर सुधारण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी आणि विश्वसनीयता वाढवण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. त्यायोगे भारतातील उद्योग, महापालिका आणि व्यवसायांना अधिक सुसंगत आणि शाश्वत कार्यप्रणाली प्राप्त होते.
इंडो विभागाचे विक्री विभाग प्रमुख शंकर राजाराम म्हणाले, “भारतीय बाजारपेठेसाठी एक परवडणारे आणि सहज उपलब्ध ड्राइव्ह तयार करणे याकरता गृन्डफॉस सीयूई 120 ही एक स्पष्ट दृष्टिकोनातून तयार झालेली कल्पना आहे. सखोल बाजार विश्लेषणाद्वारे आम्ही जोडणी करायला सोपा, वापरायला आणि नियंत्रण ठेवायला सहज सुलभ असा ड्राइव्ह तयार करण्याची गरज ओळखली. कार्यक्षमता आणि किफायतशीरपणा हा केंद्रबिंदू ठेवून डिझाइन केलेले सीयूई 120 ग्राहकांना अखंड कार्यक्षमतेसह सक्षम करते. त्यायोगे शाश्वत पंपिंग शक्य होते.”
अस्तित्वात असलेल्या पंप्स आणि प्रणालींच्या कार्यक्षमतेत अधिकतम सुधारणा करून, सीयूई 120 अधिक स्मार्ट कामगिरी घडवून आणतो आणि पर्यावरणावरील प्रभाव कमी करतो. भविष्यात kW क्षमतेत वाढ करण्याच्या योजनांसह, गृन्डफॉस कार्यक्षमतेच्या मर्यादा अधिक विस्तारित करत आहे. त्यामुळे भविष्यातील गरजांसाठी अधिक लवचिकता व विस्तार सुनिश्चित होतो.
गृन्डफॉस सर्वांना या पंप तंत्रज्ञानातील परिवर्तनशील झेप अनुभवण्याचे आणि शाश्वत भविष्यासाठी त्यांच्यासोबत वाटचाल करण्याचे आवाहन करत आहे.
मुंबई विमानतळावरून हँड- कॅरेज दागिन्यांच्या निर्यातीचे १ मे रोजी लाँच – जीजेईपीसी
मुंबई – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ मे २०२५ रोजी हँड- कॅरेज दागिन्यांच्या
निर्यातीची सोय सुरू केली जाणार असून हा भारताच्या जेम अँड ज्वेलरी क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. सेंट्रल बोर्ड
ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्सने (सीबीआयसी) परिपत्रक क्रमांक 09/2025- कस्टम्सच्या माध्यमातून, २८
मार्च २०२५ रोजी या प्रक्रियेचे फॉर्मलायझेशन केले आहे. पर्यायाने आयात/निर्यात वैयक्तिक कॅरेजद्वारे शक्य होणार
आहे.
२४ एप्रिल २०२५ रोजी मॉक ड्रिलचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यासाठी भारत डायमंड बोर्स (बीडीबी),
बीव्हीसी, प्रेशियस कार्गो कस्टम्स क्लियरन्स सेंटर (पीसीसीसीसी), एयरपोर्ट कस्टम्स आणि जीजेईपीसी यांचे
सहकार्य लाभले. श्री. रूपेश सुकुरामन, अतिरिक्त आयुक्त, कस्टम्स, पीसीसीसीसी यांनी मॉड ड्रिलवर देखरेख करत
प्रवासी निर्यातीचा प्रसंग तयार केला, ज्यामध्ये जीजेईपीसी सचिवांनी निर्यातदाराची भूमिका केली.
‘१ मे २०२५ रोजी मुंबई विमानतळावरून हँड -कॅरेज दागिन्यांची निर्यात सुरू करत आम्ही भारताच्या जेम अँड
ज्वेलरी व्यापाराच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहोत,’ असे जीजेईपीसीचे अध्यक्ष डॉ. किरीट भन्साळी म्हणाले. ‘या
उपक्रमामुळे आमच्या सदस्यांसाठी – विशेषतः उदयोन्मुख निर्यातदारांसाठी लॉजिस्टिक्स सोपे होईल. त्याचप्रमाणे
भारताचे आघाडीच्या जागतिक दागिने केंद्राचे स्थान आणखी बळकट होण्यास मदत होईल. आमच्या क्षेत्रात विकास
घडवून आणण्यासाठी विशेषतः एमएसएमईजच्या विकासाला हातभार लावण्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण सुविधा
तयार करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.’
जीजेईपीसीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे मोठे पाऊल उचलले गेले आहे. डीजी यंत्रणांद्वारे आगामी
अडव्हायजरीमुळे मुंबई कस्टम्सला हँड कॅरी निर्यातीसाठी स्डँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) वितरित करण्याचा
मार्ग खुला होईल.
या उपक्रमामुळे उद्योन्मुख निर्यातदारांना विशेष मदत होईल व त्यांना स्वतःच दागिने जागतिक बाजारपेठांमध्ये
घेऊन जाता येतील. जीजेईपीसीने हँड कॅरी प्रक्रियेत सदस्यांना सहकार्य करण्यासाठी विमानतळावर ऑफिस सुरू केले
आहे.
ED चे कार्यालय असलेल्या इमारतीला मध्यरात्री २ वाजता आग
मुंबई-दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील बलार्ड इस्टेटमधील कैसर-ए-हिंद इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मध्यरात्री दोन अडीचच्या सुमारास भीषण आग लागली. सक्तवसुली संचालनालयाचे कार्यालय या इमारतीत आहे.आग विझवण्याचे काम मुंबई अग्निशमन दलाकडून सकाळी देखील सुरु आहे.फोर्ट परिसरात बेलार्ड इस्टेट परिसरात असलेल्या या इमारतीत शनिवारी मध्यरात्री २ वाजल्यानंतर ही आग लागली. आग लागल्यावर अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीचे गांभीर्य वाढल्यामुळे आग दोन आणि तीन स्तराची असल्याचे घोषित करण्यात आले.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी ८ अग्निशमन इंजिन, ६ जंबो टँकर, १ एरियल वॉटर टॉवर टेंडर, १ ब्रीदिंग अॅपरेटस व्हॅन,१ वॉटर क्विक रिस्पॉन्स वाहन आणि १०८ रुग्णवाहिका असा मोठा ताफा तैनात आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत.आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू आहे.

