Home Blog Page 330

‘यशोगाथा संघर्षाची‌’ : डॉ. टी. टी. पाटील यांच्या आयुष्याची शिदोरी : डॉ. सुहास दिवसे

पुणे : ‌‘यशोगाथा संघर्षाची‌’ हे डॉ. टी. टी. पाटील यांचे आत्मकथनपर पुस्तक म्हणजे त्यांच्या आयुष्याची शिदोरी असून सफलतेची यशोगाथा आहे. पुस्तक वाचनातून उर्मी मिळते. ‌‘माणसात गुंतवणूक करा‌’, ‌‘जे कराल त्यावर नितांत प्रेम करा‌’ आणि ‌‘तुम्ही स्वत:च एक ब्रँड आहात‌’ हे त्यांचे विचार आयुष्यातील वाटचालीत प्रत्येकाला उपयोगी ठरणार आहेत, असे प्रतिपादन जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख (नि.) डॉ. सुहास दिवसे यांनी केले.
खान्देश सुपुत्र डॉ. टी. टी. पाटील लिखित ‌‘यशोगाथा संघर्षाची‌’ या आत्मकथनपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा साफा बँक्वेट हॉल, बालेवाडी हायस्ट्रीट येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी डॉ. दिवसे अध्यक्षपदावरून बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, बीव्हीजी उद्योग समूहाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, जे. एल. आर. उद्योग समूहाचे संचालक गोविंद पाटील, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्राचार्य (नि.) डॉ. सुरेश सावंत, रिचफिल्ड फर्टीलायझर्स प्रा. लि.चे अध्यक्ष व कार्यकारी संचालक डॉ. स्वप्नील बच्छाव, प्रकाशिका सिंधूबाई टी. पाटील, डॉ. पद्मश्री पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
डॉ. दिवसे पुढे म्हणाले, आदिवासी भागातील एक हुशार विद्यार्थी ते यशस्वी व्यावसायिक हा डॉ. टी. टी. पाटील यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. ज्या ज्या व्यक्ती हे पुस्तक वाचतील त्यांचे आयुष्य निश्चित बदलेल.
विजय बाविस्कर म्हणाले, माणसे उगीचच मोठी होत नाहीत. प्रत्येकाचे आयुष्य संघर्षमय असते; पण आयुष्य सुंदरही असते हे डॉ. टी. टी. पाटील यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. सिंधूताई पाटील आणि कुटुंबियांनी डॉ. टी. टी. पाटील यांचे स्वप्न पूर्ण केल्याचे आवर्जून नमूद करून बाविस्कर पुढे म्हणाले, ‌‘यशोगाथा संघर्षाची‌’ हे पुस्तक वाचून शेकडो उद्योजक तयार झाले तर ती डॉ. पाटील यांना खरी भावांजली असणार आहे.
डॉ. टी. टी. पाटील यांच्या पत्नी सिंधूताई पाटील प्रकाशक या नात्याने बोलताना म्हणाल्या डॉ. पाटील यांनी आयुष्यभर कष्ट केले. त्यांच्या हयातीत पुस्तकाचे प्रकाशन करायचे होते, पण तसे काही झाले नाही. त्यांची पुस्तक प्रकाशन करण्याची इच्छा मात्र पूर्ण केली आहे.
हणमंतराव गायकवाड म्हणाले, पुस्तक वाचताना असे वाटते की, पुस्तक आपल्याशी बोलतेच आहे. वेगळ्या वाटेने जाऊन दीपस्तंभासारखी कामे करणाऱ्या काही व्यक्ती असतात. डॉ. पाटील यांची आत्मकथा वाचल्यास दीपस्तंभासारख्या अनेक व्यक्ती निर्माण होतील.
सचिन ईटकर म्हणाले, डॉ. पाटील यांचा संघर्ष प्रेरणादायी असून त्यांनी उद्यमशीलता विकसित केली आहे. ग्रामीण भागात उद्योजकांची संख्या वाढेल तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकणार आहे.
ग्रामीण भागातही गुणवत्ता असते हा मुद्दा अधोरेखित करून योगेंद्र नेरकर म्हणाले, डॉ. पाटील यांनी विद्यार्थीदशेपासून लढा दिला असून जिंकलाही आहे. उद्योग क्षेत्रात येऊ पाहण्याऱ्यांसाठी हे पुस्तक गुरुकिल्ली आहे.
सुरेश सावंत म्हणाले, डॉ. टी. टी. पाटील यांची आत्मकथा एकलव्याची आठवण करून देणारी आहे. ही एका व्यक्तीची आत्मकथा नाही तर खान्देशी लोकजीवनाचे दर्शन यातून घडत आहे. त्यांना चाकोरीबद्ध जगणे मान्य नव्हते. त्यांच्या कार्यातून समृद्ध, बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचे दर्शन घडते. डॉ. पाटील यांची जीवनगाथा अभ्यासक्रमामध्ये असावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. संदीप बच्छाव यांनी डॉ. टी. टी. पाटील यांचा जीवनप्रवास कथन केला तर डॉ. पद्मश्री पाटील यांनी पुस्तकाचा प्रवास उलगडला.
मान्यवरांचे स्वागत डॉ. संदीप बच्छाव, पंकज पाटील, प्रतिभा बच्छाव, संदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

२ हजार कोटीची गुंतवणूक: गोदरेजसिटी,पनवेल येथे चित्रपट, दूरदर्शन आणि मीडिया कॅम्पस उभारणार

गोदरेज फंड मॅनेजमेंट आणि शासनातर्फे WAVES मध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी

2,000 कोटी रु. च्या प्रस्तावित गुंतवणुकीसह अंदाजे 2500 रोजगारनिर्मितीची क्षमता
 साधारण 10 एकर भूखंडावर सुमारे 500 कोटी रु. ची फेज 1 गुंतवणूक
मुंबई, 02 मे 2025:
गोदरेज फंड मॅनेजमेंटने WAVES समिट 2025, मुंबई येथे महाराष्ट्र
शासनासोबत एक सामंजस्य करार (MoU) केला. या धोरणात्मक भागीदारीचा उद्देश
जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि शाश्वततेच्या मानकांनुसार अत्याधुनिक चित्रपट
आणि मीडिया कॅम्पस विकसीत करून महाराष्ट्रात कला, माध्यम आणि दूरचित्रवाणी क्षेत्राच्या
वाढीस चालना देणे हा आहे.
या सामंजस्य कराराअंतर्गत, महाराष्ट्र शासन गोदरेज फंड मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट
अ‍ॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडला कॅम्पस विकासासाठी राज्य शासनाच्या विद्यमान धोरणे,
नियम आणि कायद्यांनुसार संबंधित राज्य विभागांकडून आवश्यक परवानग्या, नोंदणी,
मान्यता आणि वित्तीय सवलती मिळवण्यासाठी सहाय्य करेल.
गोदरेज सिटी, पनवेल या एकात्मिक गोल्फ टाउनशिपमध्ये असलेल्या या कॅम्पसमध्ये AA
स्टुडिओज असतील. अत्याधुनिक सोयीसुविधा व जागतिक दर्जाच्या निर्मिती सुविधा पुरवत हे
कलाकार, संगीतकार आणि चित्रपट निर्मात्यांसाठी महत्वाचे केंद्र ठरेल. या केंद्राच्या
डिझाइनसाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून ते नवीनतम तंत्रज्ञान, AI
यांसारख्या प्रणालींनी सुसज्ज आहे. कुशल मनुष्यबळासह जगातील सर्वात मोठा आशय
निर्मिती देश म्हणून भारताला या स्टुडिओद्वारे स्थानिक प्रतिभेचा उपयोग करून
कथाकथनातील उत्कृष्टतेकडे वाटचाल करता येईल. या सुविधेमुळे आशय निर्मिती,
हॉस्पिटॅलिटी आणि तांत्रिक सेवा क्षेत्रांमध्ये रोजगारनिर्मिती होऊन लक्षणीय आर्थिक प्रभाव
निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तसेच पर्यटन आणि परकीय चलन यांना चालना मिळेल.
यामुळे भारत सरकारच्या परदेशी चित्रपट निर्मितीसाठीच्या प्रागतिक प्रोत्साहन धोरणाचा लाभ
घेता येईल.या विकासामुळे पूरक उद्योगांनाही चालना मिळेल आणि पनवेल हे सर्जनशील उद्योजकता
आणि नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी एक सक्षम केंद्र म्हणून उदयास येईल. हे विकासकार्य मुंबई
3.0 या पुढारलेल्या नागरीकरण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहे
आणि राज्यभर आर्थिक विकासाला गती देण्याच्या दिशेने आहे.
गोदरेज फंड मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करण
बोलारिया म्हणाले, “हा उपक्रम म्हणजे नवकल्पना, सर्जनशीलता आणि रोजगारास चालना
देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबतची एक अर्थपूर्ण भागीदारी आहे. मुंबई 3.0 च्या दृष्टीकोनाशी
सुसंगत जागतिक प्रतिभेला आकर्षित करणारी, स्थानिक सर्जनशील लोकांना सक्षम करणारी
आणि पनवेलला सांस्कृतिक आणि व्यावसायिक केंद्र बनवणारी एक गतिशील परिसंस्था
उभारण्याचा आमचा उद्देश आहे.”
गोदरेज सिटी, पनवेल ही 145 एकरमध्ये पसरलेली एक स्वयंपुरक गोल्फ टाउनशिप असून
तिथे 30 एकरच्या 9-होल गोल्फ कोर्सचा समावेश आहे. या विकास प्रकल्पात नामांकित
शाळा, आरोग्य सेवा, व्यावसायिक क्षेत्र आणि लोकप्रिय खाद्यपदार्थांच्या आउटलेट्सचा
समावेश आहे. ही जागा दळणवळणाच्या सोई सुविधा यांच्या अनुषंगाने अत्यंत अनुकूल असून
आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेपासून केवळ काही
मिनिटांच्या अंतरावर आहे. अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) यामुळे दक्षिण मुंबईपर्यंतचा
प्रवासाचा कालावधी आणखी कमी होतो. निसर्गसौंदर्य आणि शहरी पायाभूत सुविधांचा परिपूर्ण
संगम असल्याने ही जागा चित्रपट, संगीत व्हिडिओ आणि विविध व्यावसायिक निर्मितींसाठी
आदर्श स्थळ आहे.

आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटलने ABCD मोबाइलॲपवर सुरू केली डिजिटल गोल्ड एसआयपी

~ ग्राहक केवळ ₹50 पासून डिजिटल गोल्ड एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकतात ~

मुंबई, : भारतातील आघाडीची वित्तीय सेवा कंपनी आदित्य बिर्ला कॅपिटलची डिजिटल-प्रथम D2C शाखा असलेल्या आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटल लिमिटेड (“ABCDL”) ने आज डिजिटल गोल्ड एसआयपी सुरू करण्याची घोषणा केली. ही एक प्रणालीबद्ध गुंतवणूक योजना आहे, ज्याद्वारे वापरकर्ते केवळ ₹50 पासून साप्ताहिक एसआयपी आणि ₹100 पासून मासिक एसआयपीद्वारे डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकतात. ही सुविधा ABCD मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे.

डिजिटल गोल्ड एसआयपी ही भारतात प्रचलित असलेल्या गुंतवणुकीच्या पद्धतीला पारंपरिक मूल्य असलेल्या संपत्तीच्या वर्गासोबत एकत्र आणते. नियमित आणि स्वयंचलित गुंतवणुकीची सुविधा देत, ही योजना गुंतवणूकदारांना वेळोवेळी बाजारातील चढ-उतारांवर मात करण्यासाठी कंपाउंडिंगच्या शक्तीचा आधार देते. ही योजना 24 कॅरेट भौतिक सोन्याने समर्थित आहे, जे सुरक्षित आणि विमा संरक्षित कोठारांमध्ये साठवलेले असते. या कोठारांचे व्यवस्थापन MMTC-PAMP (स्विस बुलियन ब्रँड PAMP आणि भारत सरकारच्या मालकीची मिनरल्स अँड मेटल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातील संयुक्त उपक्रम) द्वारे केले जाते.

ABCD ॲपमधील डिजिटल गोल्ड अंतर्गत गिफ्टिंग आणि एसआयपी या दोन्ही सुविधा एकत्रित करून ग्राहकांना सुव्यवस्थित गुंतवणूक मॉडेलद्वारे सोने नियोजनपूर्वक खरेदी, बचत व गिफ्ट करण्याची सुलभता मिळते, तीही साठवणूक, सुरक्षेचा किंवा मेकिंग चार्जेसचा त्रास न करता.

श्रीपंकज गाडगीळव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीआदित्य बिर्ला हासिंग फायनान्स लिमिटेड, तसेच प्रमुख – डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि पेमेंट्स स्ट्रॅटेजीआदित्य बिर्ला कॅपिटल यांनी सांगितलेसंपत्ती विविधीकरणासाठी सोने हा एक महत्त्वाचा संपत्ती वर्ग आहेजो परंपरा आणि विश्वासाशी घट्टपणे जोडलेला आहेजरी भौतिक सोन्याची पारंपरिक मोहिनी आजही कायम आहेतरी नव्या पिढीतील गुंतवणूकदार अधिक परवडणाऱ्यासुलभ आणि विश्वासार्ह पर्यायांची मागणी करत आहेतआमचे डिजिटल गोल्ड एसआयपी हे सोन्यात गुंतवणुकीसाठी एक सहज आणि प्रणालीबद्ध उपाय आहेजो गुंतवणूकदारांना आत्मविश्वासाने आणि सोप्या पद्धतीने संपत्ती निर्माण करण्यास मदत करतोसोन्याची मागणी वाढत असताना आणि विविधीकरणाला प्राधान्य दिले जात असतानाडिजिटल गोल्ड एसआयपी हा एक स्मार्ट  झंझटमुक्त गुंतवणूक पर्याय म्हणून पुढे येईलअसा आम्हाला विश्वास आहे.”

डिजिटल गोल्ड व्यतिरिक्त, ABCD ॲपमध्ये डिजिटल सिल्वर देखील उपलब्ध आहे, जे 24 कॅरेट भौतिक चांदीने समर्थित असून, सुरक्षित कोठारांमध्ये साठवले जाते. वापरकर्त्यांना हवे तेव्हा खरेदी, साठवणूक किंवा रिडीम करण्यासाठी लवचिक पर्याय उपलब्ध आहेत. ईव्ही, सौरऊर्जा आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये चांदीच्या वाढत्या वापरामुळे, डिजिटल सिल्वर हे एक स्मार्ट आणि भविष्यातील गुंतवणुकीसाठी तयार असलेले, विविधीकरणासाठी उपयुक्त असे आकर्षक पर्याय बनले आहे.

चीन येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत ‘शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार’ मिळाल्याबद्दल पुण्याचा स्केटिंगपटू जिनेश नानल याचा सत्कार

पुणे: महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कारांचे नुकतेच वितरण झाले. यामध्ये पुण्याच्या जिनेश शीतल सत्यन नानल याने महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. इनलाईन फ्रीस्टाईल स्केटिंग या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिनेशला ‘शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार २०२३-२४’ प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा अतिशय मानाचा व प्रतिष्ठेचा क्रीडा पुरस्कार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिनेशचे कुटुंबीय व स्नेहीजनांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जिनेशची आई डॉ. शीतल सत्यन नानल,  वडील डॉ. सत्यन नानल, डॉ. इकबाल सय्यद, मामा विशाल खटोड (जैन), केतन नानल, क्रिश खटोड, विजय बाजी आदी उपस्थित होते.

जिनेशने गेल्या दहा वर्षांपासून प्रशिक्षक अशुतोष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण सराव व कठोर परिश्रम करत भारतीय स्केटिंग विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच झालेल्या हॉंगकॉंगमधील वर्ल्ड गेम्स सिरीजमध्ये जिनेशने एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या अधिपत्याखाली होणाऱ्या या स्पर्धा जागतिक दर्जाच्या खेळाडूंसाठी गौरवाचे व्यासपीठ मानल्या जातात आणि जिनेशने त्यात आपले कौशल्य सिद्ध केले आहे. चीन येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी जिनेशची निवड झाली आहे.

चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जिनेशने भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे. देशांतर्गत पातळीवर त्याने सलग पाचवेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकविले असून, स्केटिंगमध्ये जिनेश भारतात पहिल्या,  तर जगात सातव्या क्रमांकावर आहे. आई शीतल व वडील सत्यन नानल हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर असून, गेल्या २० वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

आई शीतल म्हणाल्या, ‘मैदानाबरोबरच जिनेशचा शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय सहभाग आहे. सध्या तो एमआयटी विश्वशांती विद्यापीठामध्ये संगणक अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. क्रीडा व अभ्यासात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याने शिष्यवृत्तीही मिळवली आहे. त्याच्यातील कौशल्याला चिकाटीची जोड, योग्य मार्गदर्शन मिळाले. आई-वडील म्हणून त्याच्या कामगिरीचे, यशाचे कौतुक आहे.”

प्रशिक्षक अशुतोष जगताप म्हणाले, “जिनेशच्या यशस्वी प्रवासामागे त्याची अनेक वर्षांची कठोर मेहनत, एकाग्रता, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. नेहमी स्वतःच्या मर्यादा ओलांडत यशाची नवी शिखरे पादाक्रांत करणारा जिनेश युवा स्केटर्ससाठी आदर्श ठरला आहे. हा पुरस्कार केवळ त्याचाच नव्हे, तर संपूर्ण भारतीय स्केटिंग क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.”

बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारणे आनंदाची बाब आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या या प्रवासात आई-वडील, प्रशिक्षक यांचे मोलाचे योगदान आहे. मला सातत्याने प्रोत्साहन दिल्यामुळेच यशस्वी कामगिरी करता आली. येणाऱ्या काळात ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पदक जिंकायचे आहे.

– जिनेश शीतल सत्यन नानल, स्केटिंगपटू

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना दुसरा लकी ड्रॉ ७ मे रोजी

मुंबई, ०२ मे २०२५-

महावितरण लकी डिजिटल ग्राहकांच्या पुढील लकी ड्रॉ . ७ मे २०२५ रोजी काढण्यात येत आहे. यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक प्रमाणे पहिल्या क्रमांकासाठी ६५१ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन बक्षीस म्हणून दिले जाते. तर प्रत्येक उपविभागात प्रत्येक दोन विजेत्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट व प्रत्येक दोन ग्राहकांना फोन नंबरसाठी १३०२ विजेत्या स्मार्ट वॉच बक्षीस म्हणून दिले जाते. लकी ड्रॉ. ७ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात आला असून विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले आहे. याढीली लकी ड्रॉ २०२५ या लढाईत जून आहेत.

महावितरण योजना वीज बिल भरणा ग्राहकांचा टक्का विकास करण्याच्या उद्देशाने लकी डिजिटल ग्राहक सुरू केली आहे. या सर्वांसाठी वीज बिल भरणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३, २०२५ या घटनात भाग मे तीन वा तीनपेक्षा अधिक वीजबिले भरणा ग्राहकांना या व्यक्तीचा फायदा होणार आहे.

ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू ( एल टी-लाईव्ह) वीजग्राहकांसाठी लागू असून , ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी एक वर्ष म्हणजे ०.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या लढाईत एकदा वीज देवकाचा क्षमता भरणा किंवा शक्ती देयक भरणा वापरला नाही. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in भेट द्यावी.

ग्राहक रांगेत राहण्यापेक्षा वेळ , वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पध्दतीने वीज बिलाचा भरणा करता यावा , यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ , महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना देय ग्राहकेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. जनता सध्या ७० टक्के अधिक वीज ग्राहक पध्दतीने वीज बिल भरत आहेत. हे प्रमाण वाढवण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबत आहे.

या प्रत्येकाच्या प्रत्येक ग्राहकाने नेट बँकिंग , डेबिट कार्ड ,  क्रेडिट कार्ड , युरोपीय , वॉलेट , कॅश कार्ड , एनएसीएच , क्यूआर कोड , एनईएफटी , आरटीजीएस इ. विजेचा वीज बिल भरणे पर्याय वापरून लोकांच्या अगोदर दरमहा एकाप्रमाणे तीन किंवा तीनपेक्षा जास्त वीज बिल भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in भेट द्यावी.

एअर इंडियाचा दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मान

विमानप्रवासातील सेवा आणि मनोरंजनात्मक सोयींची दखल

गुरुग्राम, २ मे २०२५ – जागतिक विमानसेवा कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एअर इंडियाला नुकतेच दोन नामांकित पुरस्काराने गौरविण्यात आले.ट्रॅव्हलप्लस एअरलाइन पुरस्कार  आणि पॅक्स रिडरशिप पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट आयएफईसी दक्षिण आशिया २०२५ या दोन प्रतिष्ठित पुरस्कारांसह एअर इंडियाचा सन्मान करण्यात आला. ट्रॅव्हलप्लस एअरलाइन पुरस्कारांमध्ये एअर इंडियाच्या विस्ता व्हर्व्हला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला. बिझनेस क्लासमध्ये ग्राहकांना जेवण देण्यासाठी वापरण्यात येणा-या भांड्यांसाठी हा सुवर्ण पुरस्कार दिला गेला. कंपनीच्या विस्ता या विमानप्रवासातील ग्राहकांच्या मनोरंजन प्रणालीला पॅक्स रिडरशिप पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आयएफईसी दक्षिण आशिया २०२५ हा पुरस्कार मिळाला.

द ट्रॅव्हलप्लस एअरलाइन पुरस्कार २०२५मध्ये बिझनेस क्लासमधील जेवण देण्यासाठी दिल्या जाणा-या भांड्यांसाठी सुवर्ण पुरस्कार प्राप्त

ट्रॅव्हलप्लस एअरलाइन पुरस्कारांमध्ये एअर इंडियाला बिझनेस क्लामधील ग्राहकांना जेवणासाठी दिल्या जाणा-या भांड्यांसाठी यंदाचा सुवर्ण पुरस्कार मिळाला. हॅम्बर्ग येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. एअर इंडिया आपल्या ग्राहकांसाठी खासकरुन विस्ता व्हॅव्ह भोजनची आखणी तयार केली आहे. या भोजनाच्या व्यवस्थापनाचा या पुरस्कारामुळे सन्मान झाल्याचे एअर इंडियाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून सांगण्यात आले. या भोजनाच्या आयोजनात खालील गोष्टींचा समावेश होतो. –

  • भारतीय जेवणासाठी मंडल डिझाइनमधील खास चिनी मातीची भांडी.
  • स्लोव्हाकियामधील शिसे-मुक्त काचेची भांडी.
  • स्टनलेस स्टीलची कटलरी. यातील चाकू-चमचे पोकळ हॅण्डलचे आणि वजनाने हलके असतात.
  • जेवणात मीठ किंवा मिरपूड हवी असल्यास या भोजन साहित्यात सोनेरी रंगाचे भारतीय डिझाइन्सचे आकर्षक सेट उपलब्ध असतात.
  • संपूर्ण मांडणीला पूरक अशी विचारपूर्वक तयार केलेले टेबल क्लॉथ.

द पॅक्स रिडरशीप पुरस्कारांमध्ये विस्ता प्रणालीसाठी सर्वोत्कृष्ट आयएफईसी दक्षिण आशिया २०२५ पुरस्कार

विमानप्रवासात ग्राहकांचे मनोरंजन व्हावे म्हणून एअर इंडियाने मनोरंजन आणि कनेक्टिव्हिटी प्रणाली म्हणून विस्ता ही सेवा पुरवली आहे. या प्रणालीला द पॅक्स रिडरशिप पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट आयएफईसी दक्षिण आशिया पुरस्कार मिळाला आहे. विस्ता या प्रणालील ग्राहकांना खालील सोयींची उपल्बधता केली जाते.

  • १४ जागतिक भाषांमधील प्रसिद्ध सिनेमांचा खजाना. या सिनेमांतून प्रवाशांचे २ हजार २०० तास मनोरंजन होईल एवढा संग्रह उपलब्ध आहे.
  • ८ भारतीय भाषांमधील २५० सिनेमांचा संग्रह.
  • भारतीय, पाश्चिमात्य आणि आंतरराष्ट्रीय टीव्ही मालिकांचे ९०० हून अधिक भाग उपलब्ध.
  • सुमारे १ हजार तासांचे ऑडिओ मनोरंजन

ग्राहकांना या सर्व सोयीसुविधा एअर इंडियाच्या एअरबस ए३५०च्या विमानांमध्ये उपलब्ध आहेत. एअरलाइन्सच्या विस्तारीत ताफ्यातही या सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहेत. या सुविधांमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणा-या ग्राहकांचा विमान प्रवास अधिक सोयीस्कर होईल, असा विश्वास एअर इंडियाने व्यक्त केला.

या व्यतिरिक्त एअर इंडियाचा विस्ता स्ट्रीम ही वायरलेस स्ट्रीमिंग सुविधा देशांतर्गत विमानसेवा देणा-या विमानांमध्ये उपलब्ध असते. या सुविधांमध्ये खालील सोयी उपलब्ध असतात. –

·         जागतिक सिनेमांचा संच. या संचाचा वापर करुन ग्राहकांचे ८९० तासांपेक्षा जास्त काळ मनोरंजन होते.

·         ८ भाषांमधील १७० हून अधिक भारतीय चित्रपट.

·         खास मुलांसाठी ३० तासांपेक्षाही जास्त काळाचे मनोरंजनात्मक कार्यक्रम

०  १ हजार तासांपेक्षा जास्त ऑडिओ मनोरंजनाचा खजिना

विस्ता आणि विस्ता स्ट्रीम या दोन्ही प्रणाली एअर इंडियाच्या ग्राहकांचा आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास सुखकर करते.

हे पुरस्कार एअर इंडियाच्या विहान एआय या उपक्रमांतर्गत सुधारित सुविधांची पोहोचपावती आहे. जागकिक मानांकनानुसार एअरलाइनचा ब्रॅण्ड सुधारणे, सेवांमध्ये सुधारणा घडवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

प्राधिकरणाची अवैध होर्डींगवर कारवाई

पुणे (दि.२) : पुणे महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर पथकाच्या माध्‍यमातून कारवाई करण्यात येत आहे. हवेली तालुक्यात लोणी काळभोरमध्‍ये नुकतीच तीन ठिकाणी अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले.

लोणी काळभोरमधील या कारवाईमुळे होर्डींगधारक, ॲडव्हरटायझिंग कंपनी यांनी धसका घेतला असून प्राधिकरणाच्या विकास परवानगीकडे अंतिम चलणे भरत आहे. यासह काही होर्डींग संबंध‍ितांनी स्वत:हून काढून घेतले. अवकाळी पाऊस, वादळी वारे आदीमुळे अशा होर्डींगपासून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंध‍ितांनी वर्दळीच्या व रहदारीच्या ठिकाणाचे धोकादायक, मर्यादेपेक्षा उंचीचे, दुबार संरचना होर्डिंग काढून घ्यावेत. तसेच होर्डींगधारकांनी अनधिकृत होर्डींगला परवानगी घेण्यात यावी, अन्यथा पीएमआरडीएच्या माध्‍यमातून एकतर्फी निष्कासन कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्राधिकरणाच्या सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांनी केले आहे.

संबंधित कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंगला, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. कारवाईवेळी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार रविंद्र रांजणे, तहसीलदार सच‍िन म्हस्के, पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे, शाखा अभियंता विष्णू आवाड, शरद खोमणे, प्रणव डेंगळे, तेजस मदने यांच्यासह स्थानिक बंदोबस्त तैनात होता.

अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा
गेल्या काही द‍िवसापासून पीएमआरडीएच्या माध्‍यमातून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु आहे. यात बुधवारी वाघोलीतील (ता.हवेली) चालू बांधकामावर तसेच बावधनमधील (ता. मुळशी) बकाजी कॉर्नर ते स्मशान भूमीपर्यंत रस्त्याच्या दुर्तफा अतिक्रमणे काढण्यात आली. यात ३९ पत्राशेड, आरसीसी कट्टा, कंपाऊंड वॉल व टपरी आदी स्ट्रक्चर्स जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

अवघ्या तीनशे मीटरच्या रस्त्यासाठी आमदार बापू पठारे यांनी संतप्त होत सुरु केलं आमरण उपोषण

पुण्यातील लोहगाव-खराडी या दोन्ही परिसरांना जोडणाऱ्या अवघ्या तीनशे मीटरच्या रस्त्यासाठी आमदार बापू पठारे यांनी संतप्त होत आमरण उपोषण छेडलं आहे. रस्त्याचे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यत आमरण उपोषण सुरु राहणार असे पठारे यांनी म्हटलं आहे.आज सकाळी दहा वाजल्यापासून बापू पठारे हे त्यांचे काही कार्यकर्ते आणि स्थानिकांसोबत या तीनशे मीटर रस्त्याजवळ आंदोलनाला बसले आहेत. या रस्त्याबाबत तक्रार करायला गेलं की या विभागाचे अधिकारी बघू, करू असं म्हणतात पण आता जोपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण होत नाही, तोपर्यंत मी असाच बसून राहणार असा पावित्र्य पठारे यांनी घेतला आहे. उपोषणासंदर्भात पठारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

लोहगाव-वाघोली रस्त्याला जोडणाऱ्या फॉरेस्ट पार्क, गोठण ओढा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील केवळ ३०० मीटर अंतराचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांना दररोज या रस्त्याच्या अपूर्णतेमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.वारंवार निवेदने, मागण्या आणि पाठपुरावा करूनही पुणे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आता मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आज सकाळी ८.३० वाजता त्याच लोहगाव येथील ३०० मीटर रस्त्यावर आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असं पठारे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

फौजदार विराज गावडेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे-पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात पोलीस फौजदार विराज गावडेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची हकीकत मोठी रंजक आणि समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरू शकेल अशी असल्याचे सध्या तरी दिसते आहे पीडित तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात या फौजदारा विरोधात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार , पोलिस उपनिरीक्षक विराज गावडे (वय ३२, रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा), त्याचा भाऊ कुणाल गावडे तसेच वडील गजानन गावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहायक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने पुढील तपास करत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिस उपनिरीक्षक विराज गावडे हा पुण्यात पूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. २०२० मध्ये त्याची पीडित तरुणी सोबत ओळख निर्माण होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह देखील केला.परंतु ही बाब त्याने कुटुंबीय, मित्रांपासून लपवली. पीडित तरुणीला पत्नीप्रमाणे दर्जा दिला नाही. तरुणीने याबाबत त्याच्याकडे विचारणा केली त्यावेळी कुटुंबीयांना विवाहाबद्दलची माहिती देतो, असे सांगून विराज याने तरुणीकडून वेळोवेळी विविध कारणे सांगत १० ते १२ लाख रुपये घेतले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

दरम्यान, विराज याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. पीडित तरुणीने त्यानंतर त्याच्याकडे लग्न झाल्याचे घरी सांग अशी विचारणा केली. कुटुंबीयांशी ओळख करुन दे, अशी विनंती तिने केली. त्यावेळी त्याने टाळाटाळ सुरू केली. ‘माझे कुटुंबीय माझ्याशी स्थळ पाहत आहेत. तू खालच्या जातीची आहे. आपला विवाह कुटुंबीय मान्य करणार नाही. माझा विचार सोडून दे’, असे त्याने तिला सांगितले. त्याने तरुणीला भेटण्यास टाळाटाळ सुरू केली. त्याचे वडील गजानन आणि भाऊ कुणाल यांनी देखील यासाठी त्याला साथ दिली. मला वडिलांच्या जागेवर चंद्रपूर येथे नोकरी मिळणार होती. विराजच्या सल्ल्यामुळे मी नोकरी नाकारली. आज मला नोकरीही नाही, तसेच विराजने माझी फसवणूक केली. मला धमकावून गर्भपात केला, असे पीडित तरुणीने तक्रारीत सांगितले आहे.

पुण्यात मास्टर्स कप 2025 क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रातील माजी क्रिकेटपटूंचा सहभाग

पुणे-द पिनॅकल ग्रुप व द नेचर मुकाईवाडी पुरस्कृत मास्टर्स कप 2025क्रिकेट स्पर्धेत 56 माजी अव्वल महाराष्ट्रातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर 3 व 4 मे 2025रोजी रंगणार आहे.

स्पर्धेत संजय कोंढाळकर इलेव्हन, रियाज बागवान इलेव्हन, श्रीकांत जाधव इलेव्हन, श्रीकांत कल्याणी इलेव्हन, शंतनू सुगवेकर इलेव्हन आणि विनायक द्रविड इलेव्हन हे सहा संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

स्पर्धेतील सहभागी संघामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंमध्ये शंतनू सुगवेकर, प्रसाद प्रधान, श्रीकांत कल्याणी, संजय कोंढाळकर, नितीन फडतरे, रणजित खिरीड, कौस्तुभ कदम, मृगांक राठी, करण थापा, सत्येन लांडे, रियाज बागवान, इंद्रजीत कामतेकर, अजय चव्हाण, संजय झरेकर, सुधीर देवदास, जयदीप नरसे, चंदन गंगावणे, विजय संगम, श्रीकांत जाधव, प्रसाद कानडे, कौशिक आफळे, सुनंदन लेले, शाम ओक, अनिल वाल्हेकर, रूपक मुळ्ये, प्रभाकर मोरे, राहुल कानडे, अमेय श्रीखंडे, हेमंत आठले, गिरीश कुलकर्णी, अजय नलावडे, नितीन सामल, नितीन हार्डीकर, रोहित खडकीकर, मंगेश वैद्य, विशाल मेहता, पराग चितळे, सुभाष रांजणे, आनंद दळवी, विनायक द्रविड, निरंजन गोडबोले, प्रशांत खराडे, पराग शहाणे, अपूर्व साने, मंदार दळवी, गजानन राडकर, राजेंद्र मनोहर यांचा समावेश आहे.

स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील सामने प्रत्येकी 10 षटकाचे असणार असून सामन्यात विकेट पडल्यास संघाच्या धावसंख्येतून प्रत्येक विकेट मागे 5धावा वजा करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 50 हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 35 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी 10 हजार रुपये व करंडक आणि मालिकावीर खेळाडूला करंडक व 15 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सामनावीर खेळाडूला करंडक व 5 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये मनीष साबडे, आशुतोष सोमण, विनायक द्रविड व इंद्रजीत कामतेकर यांचा समावेश आहे.

कबुतरांचा उच्छाद थांबवा

दशक्रिया विधी च्या “काक स्पर्शात” ही “कबुतरांचे” अतिक्रमण…
वनविभाग व पक्षी तज्ञाशी बोलून कबुतरांच्या “कलिंग” बाबत निर्णय घ्यावा

पुणे-महापालिकेने पुढाकार घेऊन कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई चे आदेश दिलेत पण पुण्यात वाढलेला कबुतरांचा उच्छाद मात्र थांबविण्यासाठी नजीकच्या काळात गांभीर्याने विचार करावा असे भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी म्हटले आहे

खर्डेकर म्हणाले कि,’वैकुंठ स्मशानभूमीत परिचितांच्या दशक्रिया विधी साठी गेलो असता एक अत्यंत अस्वस्थ करणारे दृश्य बघावयास मिळाले.
दहाव्या च्या वेळी मयत व्यक्ती चे नातेवाईक विधी केल्यानंतर पिंडदान करतात व त्या व्यक्तीस प्रिय असे खाद्य पदार्थ तेथे ठेवले जातात. येथे पिंडीला काकस्पर्श झाल्यास मयत व्यक्ती ने अथवा पितृपक्षात पूर्वजांनी अन्नाचे ग्रहण केले असे मानले जाते.कावळा हा पूर्वजांचे प्रतीक मानला जातो.
मात्र मानवी जीवनात सर्वत्र अतिक्रमण केलेल्या कबुतरांच्या झुंडी या ठिकाणी दिसून आल्या व ज्याप्रमाणे विविध सोसायटीत किंवा सार्वजनिक ठिकाणी कबुतरांनी उच्छाद मांडलाय व त्यांनी चिमणी सारखे पक्षी हुसकावून लावलेत त्याचप्रमाणे येथे ही त्यांनी झुंडीने आक्रमण केले असून कावळ्याच्या हक्कावर अतिक्रमण केल्याचे दिसून येते.येथे कावळ्यांना हुसकावून कबुतर पिंडासह खाद्य पदार्थावर ताव मारताना दिसून आले.
ज्याप्रमाणे पुणे मनपाने पुढाकार घेऊन कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई चे आदेश दिलेत त्याच धर्तीवर आता वनविभाग व पक्षी तज्ञ यांच्याशी चर्चा करून कबुतरांच्या कलिंग बाबत निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी करत आहे.
“कलिंग” म्हणजे जनावरांच्या एखाद्या कळपातील तो कळप फार मोठा होऊ नये म्हणून काही जनावरे मारणे.कबुतर हा संरक्षित पक्षी / प्राणी नसल्याने याबाबत गांभीर्याने विचार करावा अन्यथा नजिकच्या काळात सर्वत्र कबुतरांचा उच्छाद दिसून येईल.

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रारंभ कोथरूड विधानसभेतून…

पुणे-‘खासदार जनसंपर्क सेवा अभियाना’च्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ आज कोथरूड विधानसभा मतदारसंघातून करण्यात आला. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या या अभियानाच्या प्रारंभी पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एरंडवणे येथील पंडित दीनदयाल उपाध्याय विद्या मंदिर येथे झालेल्या या अभियानाला कोथरूडकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या उपक्रमात पूर्णवेळ उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला.

वैयक्तिक प्रश्न, नागरी समस्या, सोसायट्यांचे विषय, अपेक्षित विकासकामे आणि विविध प्रलंबित विषय या संदर्भात नागरिकांनी भेटी घेतल्या. नागरिकांकडून आलेले प्रश्न सोडवण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित करत तातडीने कामे मार्गी लावण्याच्या निर्देशही दिले.

‘आपले काम होईल’, या भावनेने येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने निश्चितच या उपक्रमाचे समाधानही मोठे आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून थेट सामान्य नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न मार्गी लावल्यानंतर नागरिकांचा येणारा प्रतिसादही निश्चितच तितकाच आनंद देतो असे मत केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार आपल्या समस्यांचे नक्की निराकरण करेल या विश्वासातूनच मोठ्या प्रमाणावर नागरिक अशा अभियानात सहभागी होत आहेत आणि त्यांच्या अडचणींचे निराकरण करून घेत आहेत असे मत उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त के

यावेळी विविध शासकीय योजनांचे तसेच कागदपत्रे-दाखल्यांसंदर्भातील स्टॉलची उभारण्यात आले होते. महसूल, पोलीस प्रशासन, महापालिका, महावितरण यांसह शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यात सहभागी झाले होते.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्यासह शहर पदाधिकारी, कोथरुड विधानसभा मतदारसंघातील तिन्ही मंडलांचे पदाधिकारी, माजीनगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या छोट्या छोट्या समस्या असतात परंतु त्या सोडवायच्या कशा हा त्यांच्यासमोर प्रश्न असतो.
या वेळी कोथरूड भागातील १५०० नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. सदर समस्यांचे निराकरण त्वरित करण्यात येणार असून त्यासाठी सर्व प्रकारच्या सरकारी यंत्रणांचे सहकार्य घेण्यात आले.जे प्रश्न तातडीने सोडवणे शक्य होते ते या अभियानात लगेच सोडवले जाऊन तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या.इतर प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून लवकरात लवकर त्यांचे निराकरण करावे यासाठी देखील संबंधित सर्व विभागांना व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या

पुणे रेल्वे स्टेशन आणि खडकी परिसरातून 64 किलो गांजा जप्त; पाच जणांना अटक

पुणे-गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विराेधी पथकाचे पाेलिस निरीक्षक सुर्दशन गायकवाड, सहाय्यक पाेलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पथक हे शहरात गस्त घालत असताना, पुणे रेल्वे स्टेशन गेटसमाेर त्यांना दाेन संशयित व्यक्ती मिळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन सखाेल चाैकशी करत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ सहा लाख २४ हजार रुपये किंमतीचा ३० किलाे गांजा हा अंमली पदार्थ मिळून अाला अाहे.

याप्रकरणी पप्पु चक्रधर देवरी (वय- ३२,रा. कलंड, ता.रसलपुर, जि.जसपुर, अाेरिसा) व चंदन सुभाष कुंवर (१९,रा. जगतपुर, जि.कटक, अाेरिसा) यांना अटक करण्यात अाली अाहे. त्यांच्या विराेधात बंडगार्डन पालीस ठाण्यात एनडीपीसी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. चाैकशीत त्यांचा तिसरा साथीदाराचे नाव निष्पन्न झाल्याने दिपक बहिरा ऊर्फ बलिया (रा. भुवनेश्वर, अाेडिसा) याचे विराेधात देखील गुन्हा दाखल करण्यात अाला असून त्याच्याकडून अाराेपींनी गांजा विक्रीस अाणला अाहे. ते नेमके पुण्यात काेणास अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी अाले हाेते. त्यांचे अन्य साथीदार काेण अाहे याबाबत पाेलीस पुढील चाैकशी करत अाहे.

दुसऱ्या घटनेत अंमली पदार्थ पथक दाेनचे पथक खडकी पाेलीस स्टेशनचे हद्दीत पेट्राेलिंग करत असताना, त्यांना नॅशनल टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स वाकडवेडी , एसटी स्टॅण्ड जवळ खडकी याठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर एक संशयित व्यक्ती अल्पवयीन मुलासाेबत मिळून अाला. त्याच्या जवळील सामानाची चाैकशी करुन तपासणी केली ैसता त्यात सात लाख चार हजार रुपये किंमतीचे ३४ किलाे गांजा मिळून अाला अाहे. याप्रकरणी राकेश रुपसिंग पावरा (वय- २५,रा. शिरपुर, दापचेपाडा, धुळे ) याला अटक करण्यात अाली असून त्याच्या साेबतचा १७ वर्षीय धुळे येथील विधीसंघर्षिीत मुलास ताब्यात घेण्यात अाले. त्यांच्या विराेधात खडकी पाेलीस ठाण्यात अंमली पदार्थ विराेधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

वाकड परिसरातील कावेरीनगर भाजी मंडई जवळ वाकड पाेलीसांनी एक संशयित तरुणाला ताब्यात घेतले अाहे. त्याच्या ताब्यातून एक लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ११०० ग्रॅम गांंजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात अाला अाहे. सदर अंमली पदार्थ हा अनाधिकाराने, बेकायदेशीररित्या विक्री करिता कब्जात बाळगल्याने अाराेपी अभिषेक सिध्दराम माैसलगी (वय- २१,रा. लक्ष्मणनगर, थेरगाव,पुणे, मु.रा. तिरुमालनिवास, गुलबर्गा, कर्नाटक) याला अटक करण्यात अाली अाहे. त्याच्या विराेधात पाेलीस शिपाई समाधान तुकाराम कांबळे (वय- २९) यांनी वाकड पाेलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला अाहे.

गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र शासन कटिबद्ध – केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील

0

गावातील पाणी गावातच आडवा

शिर्डी, दि.२ :- पुढील चार वर्षांत देशातील कोणतेही गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये व देश दुष्काळमुक्त व्हावा, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी केले. शासन तर आपले काम करणारच आहे, मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे, गावातील पाणी गावातच अडवून साठवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम टप्पा १ अंतर्गत गोदावरी उजवा तट कालव्यावरील मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरण कामाचे भूमिपूजन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, आमदार आशुतोष काळे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपूर, माजी मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित होते.

केंद्रीय जलशक्ती मंत्री पाटील म्हणाले की, संपूर्ण जगाच्या १८ टक्के लोकसंख्या आणि १८ टक्के पशुधन भारतात आहे. मात्र संपूर्ण जगाच्या केवळ चार टक्के पाणी भारतात आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्याची नितांत गरज आहे.
देशात दरवर्षी सुमारे ४ हजार बीसीएम पावसाचे पाणी मिळते, मात्र आपल्याला त्यापैकी केवळ १ हजार १२० बीसीएम पाण्याची गरज असते. आपण ७५० बीसीएम जलसंचय करतो आणि धरणांमध्ये २५० बीसीएम पाणी साठवतो. तरीही पाण्याची कमतरता आहे. एक धरण उभारण्यासाठी २५ वर्षे लागतात. मात्र तेवढा वेळ आपल्या हातात नाही, म्हणून पाण्याच्या बचतीची अत्यंत गरज आहे.

यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या गावात व शेतात चार बाय चारचा सहा फूट खोल खड्डा खोदून त्यात दगड-धोंडे टाकून नैसर्गिकरित्या जलसंचय करण्याची गरज आहे. अशा एका शोषखड्ड्याच्या माध्यमातून सुमारे पाच लाख लिटर पाणी जमिनीत मुरवता येते.

देशात तेरा लाख स्ट्रक्चर खड्यांच्या माध्यमातून पाणी संचय करण्याची चळवळ राबविण्यात आली. यातून लाखो लीटर पाण्याची बचत झाली, असेही त्यांनी सांगितले.

तुमच्या भागात जर एक हजार शेतकरी तयार झाल्यास केंद्राच्या एजन्सीमार्फत याभागात पाणी संचय करणारे शोषखड्डे खोदून देण्यात येतील. या शोषखड्ड्यांद्वारे पाणी संचय झाल्यास पुढील वर्षी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही चळवळ राबवावी, अशी अपेक्षा श्री. पाटील यांनी व्यक्त केली.

नदी-नाल्यांतील पुराच्या पाण्यापासून कॅनमध्ये पाणी आणण्याची वेळ येऊ नये, यासाठी आजच आपण पाणी बचतीची चळवळ गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना असलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण देश दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आहे. उपलब्ध पाण्यात शेतीला सिंचन झाले पाहिजे यासाठी जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे. नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याचे स्वप्न पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांचे होते, ते स्वप्न माझ्या हातून होत आहे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. गोदावरी उजवा व डावा अशा दोन्ही कालव्यांचे काम पूर्ण करण्यात येईल. आज भूमिपूजन करण्यात आलेल्या कालव्याचे डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल.

राज्यशासन सुमारे एक लाख कोटींच्या खर्चातून चार नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात ८३ टीएमसी पाणी आणणार असून यातून गोदावरी खोरे कायमचे दुष्काळमुक्त होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

आमदार आशुतोष काळे, आण्णासाहेब म्हस्के पाटील यांचेही भाषण झाले.

शासनाने मागील काही वर्षांत राज्यातील १८२ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यातून २५ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले, असे प्रास्ताविकात दिपक कपूर यांनी सांगितले.

आताचा काळ द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांसाठी परवडणारे चित्रपट तयार करण्याचा : शाहरुख खान

0

मुंबई, 1 मे 2025

वेव्हज या शिखर परिषदेची संकल्पना मांडल्याबद्दल आणि ती प्रत्यक्षात आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे  अभिनेता आणि चित्रपट निर्माते शाहरुख खान यांनी चित्रपट उद्योगाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे.  या परिषदेमध्ये मनोरंजन उद्योगाला अधिक मजबूत करण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले. हे व्यासपीठ उद्योगासाठी किती समर्पक आहे आणि ते विविध आघाड्यांवर सरकारकडून अत्यंत आवश्यक समन्वय आणि पाठबळ उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी भारत हे एक  अमर्याद  शक्यता असलेले स्थान असल्याचे सांगून,  शाहरुख खान यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी भारत ‘शूट इन इंडिया’  कसे बनू शकते,  याकडे लक्ष वेधले. याशिवाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्था आणि उद्योगांशी विविध प्रकारचे करार भारताच्या मनोरंजन उद्योगाला आकार देण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी किती महत्त्वाचे ठरू शकतात यावर त्यांनी भर दिला.

शाहरूख खान यांनी द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांतील प्रेक्षकांसाठी भारतीय सिनेमा अधिक परवडणारा बनवण्यावरही भर दिला. या शहरांमध्ये एकल पडदा असलेल्या  चित्रपटगृहांमध्‍ये  सिनेमा पाहण्‍याचा  अनुभव निर्माण करण्याची संकल्पना त्यांनी मांडली, ज्यामुळे चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनीही वेव्हजचे महत्त्व आपल्या शब्दात मांडले. माध्‍यम आणि मनोरंजन उद्योगातील विविध माध्यमांना एकत्र आणण्याची ही अचूक वेळ असल्याचे त्या म्हणाल्या. दीपिका पदुकोण यांनी सांगितले, की या क्षेत्रातील विविध विभागांमध्ये आतापर्यंत माहितीचे आदान- प्रदान किंवा सहकार्य मर्यादित स्वरूपात केले जात होते, पण वेव्हजचे स्वरूप व्यापक आहे आणि त्यात चित्रपट, ओटीटी, ॲनिमेशन, कृत्रिम प्रज्ञा आणि इतर भासमान तंत्रज्ञाने एकत्र आणण्याची क्षमता आहे.

वेव्हज शिखर परिषदेच्या पहिल्या दिवसानिमित्त आयोजित ‘द जर्नी: फ्रॉम आउटसाइडर टू रुलर’ या सत्रात अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपट निर्माते करण जोहर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी चित्रपट उद्योगातील त्यांच्या प्रवासावर आणि स्वतःचे वेगळे स्थान कसे निर्माण केले यावर चर्चा केली. शाहरुख खान यांनी ‘आउटसाइडर-इनसाइडर’ टॅग्जबद्दल आपले विचार मांडले आणि तरुणांनी इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच चित्रपट उद्योगाकडे पाहण्याचे आवाहन केले. इथेही कठोर परिश्रम आणि चिकाटीला पर्याय नाही असे त्यांनी सांगितले.

समाज माध्‍यमे  आणि प्रतिमा व्यवस्थापनाच्या आजच्या काळात मनोरंजन उद्योगाच्या बदलत्या परिमाणांबद्दल बोलताना, खान यांनी नवीन कलाकारांना केवळ त्यांच्या विशिष्‍ट प्रतिमा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्यातील  कौशल्यांकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यांच्यातील अद्वितीय गूण आणि क्षमतांद्वारे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे,  असे दीपिका पदुकोण यांनी पुढे नमूद केले.

आपल्या समारोपाच्या भाषणात, चित्रपट निर्माते करण जोहर यांनी भारताला ‘सॉफ्ट पॉवर’ असे संबोधित केले. आपला देश येत्या काळात ‘वेव्हज’सह उत्तुंग झेप घेण्यास सर्व सामर्थ्‍यानिशी सज्ज आहे असे जोहर यांनी अभिमानाने सांगितले.