621 किलो ई कचरा संकलित करून दिल्या ७९ एलई डी ट्यूब मोफत
सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत महाराणा प्रताप संघ विजयी
पुणे- एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड व पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने ओयोजित सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत खेड विभागात मुलींच्या गटात आंबेगावच्या महाराणा प्रताप संघाने अंबेगावच्या अभिनव कबड्डी संघाचा पराभव करत विभागात विजेतेपद पटकावले.
खेड येथे आजपासून सुरू झालेल्या खेड विभागातील सामन्यांमध्ये मुलींच्या अंतिम फेरीच्या लढतीत आंबेगावच्या महाराणा प्रताप संघाने अंबेगावच्या अभिनव कबड्डी संघाचा 43-36 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
मुलांच्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात खेडच्या वेताळेश्वर क्लब संघाने खेडच्याच ओम कबड्डी क्लब संघाचा 21-19 असा पराभव केला. अंबेगावच्या कमलजादेवी कबड्डी क्लब संघाने खेडच्या महाराजा कबड्डी क्लब संघाचा 29-21 असा तर आंबेगावच्या महाराणा प्रताप संघाने आंबेगावच्या भैरवनाथ संघाचा 35-20 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचे उद्घाटन बारामती जिल्हा परिषद सदस्य रोहीत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अर्जून पुरस्कर विजेते कबड्डी खेळाडू शांताराम जाधव, एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख कौस्तुभ देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील प्रत्येक विभागातील विजेता व उपविजेता संघात(मुले व मुली) 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी बारामती येथे सुपर प्लेऑफ सामने होणार आहेत.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुली- उपांत्य फेरी
अभिनव कबड्डी संघ, आंबेगाव 39 वि.वि शिवराय स्पोर्टस् क्लब, खेड- 19
महाराणा प्रताप, अंबेगाव- 38 वि.वि पंडूरंग महाविद्यालय, जुन्नर- 21
अंतिम फेरी- महाराणा प्रताप, आंबेगाव- 43 वि.वि अभिनव कबड्डी संघ, आंबेगाव- 36
उपांत्यपुर्व फेरी- मुले
वेताळेश्वर क्लब, खेड-21 वि.वि ओम कबड्डी क्लब, खेड-19
कमलजादेवी कबड्डी क्लब, आंबेगाव- 29 वि.वि महाराजा कबड्डी क्लब, खेड- 21
महाराणा प्रताप, अंबेगाव- 35 वि.वि भैरवनाथ संघ, अंबेगाव-20
एमएसएलटीए योनेक्स सनराईज 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे आयोजन * क्रिशन हुडा, सुदिप्ता किमार यांना अग्रमानांकन
दलितांच्या समवेत जेवणाची नौटंकी करण्याऐवजी राहुल गांधीनी दलित मुलीशी विवाह करावा-रामदास आठवले
अन्नसुरक्षा हिच जीवन सुरक्षा हे ध्येय हॉटेलव्यावसायिकांनी बाळगावे- पालकमंत्री गिरीष बापट
पुणे – पुणे विभागातील हॉटेल व्यावसायिकानी त्यांच्या व्यवसायाची वृध्दी करताना अन्न सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन (म.रा) मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी आज येथे केले. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आज अन्न व औषधे प्रशासनाच्या वतीने अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम2006अंतर्गत सुरक्षित अन्नपदार्थ उत्पादन,साठवण,हाताळणी व विक्रीबाबत हॉटेल,रेस्टॉरन्ट,केटरर्स व्यावसायिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होत, त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री बापट यांनी त्यांच्या विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये हॉटेल व्यवसाय करणा-यांकरीता अशा प्रकारच्या जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. हॉटेलमध्ये जेवणाकरीता आल्यावर ग्राहकांकडून तात्काळ जेवणाचा दर्जा ठरविला जातो. व त्याचा व्यवसायवृध्दीवर परिणाम होत असल्याचे सांगितले. त्यामुळे जेवण तयार करताना पदार्थांची गुणवत्ता राखण्याबरोबरच तेथे स्वच्छतेबाबत जे नियम ठरविले आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी स्वयंशिस्त बाळगावी, त्यामुळे ग्राहकांचेही समाधान होईल. व एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपली जाईल. हॉटेल व्यावसायिकांना येणा-या अडी अडचणींचा निपटारा होण्याकरीता त्यांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तसेच इतर वेळीही या विभागामार्फत सहकार्य होणार असल्याचे सांगितले.
हॉटेल व्यवसाय करताना कच्चा माल खरेदी ते पदार्थ तयार होईपर्यंत पाळावावयाचे नियम याबाबत माहिती देण्याकरीता अन्न व औषधे प्रशासनाच्या तसेच पुणे रेस्टॉरन्ट ॲन्ड हॉटेलियर्स असोशिएन यांच्या संयुक्त विद्यमाने आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार हॉटेल व रस्त्यांवरील व्यवसाय करणा-यांकरीता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे या उद्देशाने करण्यात आलेल्या या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अन्न व औषधे प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी पुणे विभागामार्फत मागील महिन्यापासून सुरु करण्यात आलेल्या या जनजागृती मोहिमेबाबत माहिती दिली. पुणे विभागाच्या 300 मंदिरामधील साधारणत 3500 विश्वस्तांना त्यांच्या मंदिरामार्फत वाटण्यात येणारा प्रसाद तयार करताना घ्यावयाच्या काळजी बाबत प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले. तर पुढील 3 महिन्यात 40 ते 50 हजार हॉटेल व्यावसायिकांना याबाबत प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. हॉटेल व्यवसायामध्ये 12 लाख रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणा-यांकरीता लायसन्सची तर त्याखालील उलाढाल असणा-या व्यावसायिकांना नोंदणीची आवश्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेच्या आयोजनावेळी श्री.गणेश शेट्टी, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन व श्री.किशोर सरपोतदार, सचिव, हॉटेल असोशिएशन यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजनाकरीता सह आयुक्त (पुणे विभाग) शिवाजी देसाई, सं.मा.देशमुख व इतर अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न केले. यावेळी मोठया संख्येने हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.
ऋतिक रोशन ने दी “छट पूजा” की शुभकामनाएं |
मुम्बई की उपनगरी जुहू में रहने वाले ऋतिक अक्सर हर साल इस तिथि पर जुहू बीच पर छट पूजा करने आए श्रद्धालुओं की भीड़ देखते थे लेकिन इस वर्ष की छट पूजा की बात ही ओर थी क्योंकि इस साल असल मायने में अभिनेता को छट पूजा का महत्व समझा और ऐसे में ऋतिक ने पहली बार ट्वीटर के माध्यम से सभी को छट पूजा की बधाई दी।
देशवासियों को छट पूजा की शुभकामना देते हुए अभिनेता ने लिखा,“मैं हर साल बीच पर श्रद्धालुओं की भीड़ देखता था। लेकिन इस वर्ष मुझे छट पूजा का असल महत्व समझा। सभी को छट पूजा की शुभकामनाएं |”
ऋतिक रोशन, गणितज्ञ आनंद कुमार की जीवनी पर बनने वाली बायोपिक फिल्म में काम करेंगे, जिसमे ऋतिक मुख्य भूमिका में नज़र आएंगे। इस फ़िल्म में पहली बार अभिनेता पटना जैसे छोटे से कस्बे से तालुख रखने वाले व्यक्ति की भूमिका निभाएंगे और यह पहली दफ़ा होगा कि ऋतिक इस तरह का किरदार अदा करेंगे।
अपने इस किरदार के लिए ऋतिक बारीकी से बिहार की चाल-चलन और रीति रिवाज़ को समझ रहे है और इसी दौरान उन्हें छट पूजा के बारे में जानने का मौका मिला जिस वजह से वो इस त्योहार को बारीकी से समझ पाए और सही समय आने पर अभिनेता ने सभी को छट पर्व की बधाई दे दी।
विकास बहल के निर्देशन में बनने वाली यह फ़िल्म अपने आप में काफी अनोखी होगी और ऋतिक के प्रशंसक पहली बार उन्हें इस तरह के किरदार में देखें
सई ताम्हणकरने स्वीकारला तिचा पहिला फिल्मफेर अवार्ड फॅमिली कट्टासाठी
नेसको आयटी पार्क येथे २७ ऑक्टोबर २०१७ रोजी जिओ फिल्मफेअर अवॉर्ड्स २०१७ हा सोहळा अगदी दिमाखात पार पडला. विविध प्रकारचे परफॉर्मन्स हा सोहळ्याचा नेहमीचा प्लस पॉईंट असला तरी देखील, ह्या वेळेसचे रेडकार्पेट हि जोरदार होते.
सई ताम्हणकरचा ब्लु गाऊन विथ डायमंड नेकलेस विशेष लक्षवेधी ठरला हे नक्कीच! या व्यतिरिक्त सईसाठी फिल्मफेअरच हे तिसरं वर्ष विशेष ठरलं आहे!
ह्या वेळेस चा जिओ फिल्मफेअर अवॉर्ड्स सई ताम्हणकर साठी नक्कीच विशेष होता. कारण जिओ फिल्मफेअर २०१७ मध्ये सईला दोन चित्रपटांसाठी नामांकन होती – उत्कृष्ट अभिनेत्री, वजनदार आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, फॅमिली कट्टा!
सई ताम्हणकरला फॅमिली कट्टासाठी उत्कृष्ट सहाय्यकअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला . सईच्या सिनेमातील वाटचालीमधला हा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड आहे. फिल्मफेअरचे हे तिसरे वर्ष आहे आणि त्यामुळे तिच्यासाठी हा विशेष होता. हा अवॉर्ड स्वीकारताना सई खूप भारावून गेली होती. ह्या बाबत सई म्हणाली, ‘हो हा माझा पहिला फिल्मफेर आहे आणि मला खरंच खूप छान वाटतंय. हा फिल्मफेर आणखी खास आहे कारण मला हा अवॉर्ड फॅमिली कट्टासाठी मिळाला आहे. हा चित्रपट माझ्यासाठी अनेक पर्सनल कारणांसाठी खास होता, खूप जवळचा होता, आणि त्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळणं आणि ते हि पहिला फिल्मफेर मिळणं हे तर नक्कीच फार आनंददायी आहे. पण मी ह्या सेलेब्रेशनवर जास्त वेळ रमणार नाहीये, पुढच्या कामासाठी लगेच तयार होणार आहे. इनफॅक्ट माझा डेली रुटीन सुरु झालंय.’
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या फॅमिली कट्टा ह्या चित्रपटात सईने ‘मंजू’ नावाची भूमिका साकारली होती. चित्रपटातला तिचा वावर अवघा काही मिनिटांचा असला तरी तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने कायम लक्षात राहिलं असा प्रभाव प्रेक्षकांवर नक्कीच पाडला होता. आणि या तिच्या भूमिकेसाठी तिला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
बापूसाहेब गानला यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त सत्कार
टेनिस स्पर्धेत गिरीश चौगुले, रोहन फुले, कामया परब, आर्या पाटील यांची आगेकूच
इंद्रकुमार की आखरी फिल्म क्रिना जल्द ही सिनेमाघरों में
पुणे : 90 के दशक में महशूर हुए बॉलिवूड अभिनेता इंद्रकुमार के देहांत के बाद नवम्बर में उनकी आखिरी फिल्म क्रिना रिलीज होने जा रही है। इस फिल्म में इंद्रकुमार के ही कई साथी और उनकी 90 बें की दशको फिल्मों के अभिनेता और अभिनेत्री भी दिखाई देगे। इस फिल्म में शाहबाज खान, दिपसिखा, सुदेश बेरी, सुधाचंद्रन जैसे मंजे हुए कलाकारों ने काम किया हुआ है। इस फिल्म द्वारा बालकलाकार पार्थ सिंह चौहान को लाँच किया जाएगा।
आदिवासियों पर आधारित इस फिल्म में मनोरंजन अॅक्शन सभी कुछ मिलेगा। फिल्म की निर्मिती पार्थ के पिता हरविंद सिंह चौहान ने की है। आयोजित एक पत्रकार परिषद में निर्माता हरविंद चौहान ने कहा कि, हमने एक छोटी बजट की फिल्म बनाने का प्रयास किया है। उनकी यह पहली फिल्म है वे आशा करते है कि, दर्शकों को यह फिल्म पसंद आएगी। फिल्म की कहानी :क्रिना कहानी है जंगल में रह रहे उन आदिवासियों के जीवन पर आधारित, जो किसी भी तरह से अपना जीवीकापार्जन करते है। उसी जंगल के कबीले का क्रूर सरदार चित्रा (शाहबाज खान) उन गरीब कबीलायी पर तरह-तरह का जुल्म करता रहता है, लेकिन कोई भी आवाज उठाने की हिम्मत नहीं करता, ऐसे में उसके जुल्म से त्रस्त होकर गांव की ही एक वृद्ध महिला मंगला (सुधा चंद्रन) उसके खिलाफ आवाज उठाती है। चित्रा उसे भी मौत की सजा दे देता है, लेकिन मंगला की चुनौती खाली नहीं जाती, और कुछ दिन ही बाद उसी कबीलले के एक गरीब दम्पति कृहांष (इंद्रकुमार) और नारीवा (दीपशिखा) के काफी मिन्नतो के बाद वनदेवी के आशिर्वाद से एक पुत्र का जन्म होता है जिसका नाम होता है क्रिना)
क्रिना (पार्थ सिंह चौहान) एक वीर बालक है, जो कि अन्तत: उस चित्रा नामक सरदार से उन गरीब कबीलायी को मुक्ति दिलाता है और इस तरह द्वन्द खुद्ध में उसका साथ देता है, दूसरे कबीले का सरदार (सुदेश बेरी)। रूद्रा की एक सुंदर सी प्यारी बेटी भी है जिसका नाम है रूमानी। रूमानी (तनिशा शर्मा) जो कि क्रिना को मन ही मन प्यार करने लगती है।
धर्म आणि जाती-पातीच्या व्यवस्थेवर देशाची विभागणी नको-मीरा कुमार
देवेंद्र फडणवीस इतिहासातील सर्वात बालीश मुख्यमंत्री- शरद पवारांची टिका
मुंबई- महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात मी इतका बालीश मुख्यमंत्री पाहिला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.5 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी न झाल्यास शेतकऱ्यांची असहकार चळवळ सुरू करण्याचा विचार असल्याचा गर्भित इशारा शरद पवार यांनी दिला आहे .
इंग्रजी वेबसाइटवर ‘फर्स्ट पोस्ट’वर शरद पवार यांची विशेष मुलाखत प्रकाशित झाली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये झालेला घोळ हा मुख्यमंत्र्यांमुळेच असल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे.
पवार यांनी म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःची एक वेगळी यंत्रणा उभी करत आहेत. ही यंत्रणा राज्यासाठी नव्हे, तर केवळ मुख्यमंत्र्यांसाठी काम करते. कारण, मुख्यमंत्र्याचा स्वतःच्याच खात्यांवर आणि त्या खात्यामधील सनदी अधिकाऱ्यांवर विश्वास नाही.

पवार म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याने केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखालील बँका आणि सहकारी बँकांना फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांना वाटते. परंतु हा आरोप पूर्णपणे निराधार आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमाफीसाठी पात्र खात्यांचे आकडे फुगवून सांगितल्याचा आरोप केला आहे. मग आता राष्ट्रीयीकृत बँकाही काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष चालवतात का? असा सवालही पवार यांनी केला आहे.
5 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी न झाल्यास शेतकऱ्यांची असहकार चळवळ सुरू करण्याचा विचार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा अंतिम उपाय असू शकत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के नफा देण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
लीला पुनावाला फाउंडेशनने केला शूर जवानांचा सन्मान!
भाऊराव कऱ्हाडे यांच्या आगामी ‘बबन’ मधील ‘साज ह्यो तुझा, जीव माझा गुंतला…’ गाणे प्रदर्शित
‘साज ह्यो तुझा, जीव माझा गुंतला…’ या सोप्या शब्दाआधी येणारी व्हायोलिन ची कर्णमधुर सुरावट, त्यावर बासरीचा सुंदर साज अशा या अवीट गाण्यावर हळुवारपणे ठेका धरायला लावणारा ताल आणि स्क्रीनवर दिसणारे सुंदर खेडेगाव, हिरवीगार शिवारे, याच गावातले कॉलेज आणि एका सुंदर मुलीवर भाळलेला, शेती आणि दुग्धव्यवसाय करणारा, चांदरातीला उशाखाली तिचा फोटो ठेवून प्रेम व्यक्त करणारा आजच्या काळातला शेतकरी तरुण.
ही दृश्ये आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांच्या आगामी ‘ बबन‘ या रोमँटिक चित्रपटातल्या गाण्यातील.
समाजाला अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या “ख्वाडा” या अनेक मानाचे पुरस्कारप्राप्त चित्रपटाच्या यशानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे, एका तरुण शेतकऱ्याची प्रेमकथा बबन या चित्रपटातून घेऊन येत आहेत. या चित्रपटाची कथा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचीच आहे. या चित्रपटाच्या टीजर ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्यानंतर नुकतेच या चित्रपटातील ‘साज ह्यो तुझा’ हे रोमँटिक गाणे प्रसिद्ध करण्यात आले आणि अल्पावधीतच हे गाणे व्हायरल झाले आहे. सुहास मुंडे यांनी लिहिलेल्या या गीताचे संगीतकार आणि गायक आहेत ओंकारस्वरूप.
हळुवार प्रेमभावना व्यक्त करणारे अतिशय श्रवणीय असे हे गाणे भाऊसाहेब शिंदे आणि या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जाधव यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. सुंदर लोकेशन्स, सतत गुणगुणावी वाटेल अशी सोपी चाल यामुळे ‘साज ह्यो तुझा’ हे गाणे तरुण पिढीचे पुढचे ‘लव्ह अँथम’ ठरले तर आश्चर्य वाटायला नको.
‘चित्रक्षा फिल्म्स’ प्रस्तुत ‘बबन’ या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट २९ डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
खा.अनिल शिरोळेंच्या न्यूयॉर्क दौऱ्यानंतर खा. वंदना चव्हाण शिकागो दौऱ्यावर
पुणे : . २२ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०१७ ह्या कालावधीत संयुक्त राष्ट्रसंघ आम सभेच्या ७२ व्या अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचा दौरा पूर्ण होत असतानादुसरीकडे पर्यावरणविषयक बदलांच्या अभ्यासासाठी आयोजित अमेरिकेेतील शिकागो विद्यापीठ येथील ‘क्लायमेट पार्लमेंट’ अभ्यास दौऱ्यामध्ये संसद सदस्य म्हणून खासदार वंदना चव्हाण यांचा भारतीय शिष्टमंडळात समावेश झाला आहे.दिनांक ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१७ या कालावधीमध्ये संसदेतील सदस्य आणि सहकारी यांच्या शिष्टमंडळासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.शिकागो विद्यापीठातील तज्ज्ञांबरोबर उर्जा आणि पर्यावरणविषयक विविध प्रकारच्या समस्या विषयक चर्चासत्रांचा समावेश या परिषदेत आहे.
खासदार वंदना चव्हाण यांच्या समवेत विन्सेंट पाला (लोकसभा सदस्य), डॉ. संजय जैसवाल (खासदार, राज्यसभा), कालीकेश सिंग देव (लोकसभा सदस्य), राकेश सिंग (लोकसभा सदस्य), रिती पाठक (लोकसभा सदस्य), प्रभास कुमार सिंग (लोकसभा सदस्य), विवेक गुप्त (खासदार, राज्यसभा) यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे.या परिषदेच्या माध्यमातून शिकागो आणि वॉशिंग्टन (डीसी) या दोन्ही क्षेत्रातील संशोधक आणि सरकारी नेत्यांसोबत ‘संशोधन आणि धोरणविषयक भागीदारी’ विषयावर संवाद साधण्याची आणि त्याबद्दल सल्ला देण्याची एक महत्त्वपूर्ण संधीदेखील उपलब्ध होणार आहे.





