Home Blog Page 3009

राष्ट्रवादी व मनसेच्या आघाडीला ४सभापतीपद तर शिवसेनेला १ अवघे सभापतीपद

0
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर नगरपालिकेच्या विषय समिती निवडणूकीत राष्ट्रवादी व मनसेच्या आघाडीला ४सभापतीपद तर शिवसेनेला १सभापतीपद मिळाले. शिवसेनेला विषय समिती सभापती निवडणूकीत  धोबीपछाड करण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते दिनेश दुबे यांनी दिली.
जुन्नर नगरपालिकेचे सभागृहात विषय समितीच्या निवडीकरिता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती.पीठासन अधिकारी म्हणून तहसिलदार हनुमंत कोळेकर यांनी काम पाहिले.यावेळी मुख्याधिकारी जयश्री काटकर याही उपस्थित होत्या.
यावेळी राष्ट्रवादी व मनसेने आघाडी केली.यासभेस राष्ट्रवादीचे गटनेते दिनेश दुबे ,उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार ,फिरोजभाई पठाण,लक्ष्मीकांत कुंभार,अक्षय मांडवे,समिना शेख,अब्दुल माजीद सय्यद असे सहा नगरसेवक उपस्थित होते तर अश्वीनी गवळी ,मोनाली म्हस्के या गैरहजर होत्या. मनसेचे जमीरभाई कागदी,हजरा इनामदार , सना मन्सुरी असे तीन नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेला धोबी पछाड देत राष्ट्रवादी व मनसे आघाडीने चार सभापतीपद मिळविले. पाणीपुरवठा सभापतीपदी दिनेश दुबे,वीज समिती सभापतीपदी उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार ,बांधकाम सभापतीपदी लक्ष्मीकांत कुंभार,तर आरोग्य समिती सभापतीपदी जमीरभाई कागदी अशी निवड झाली तर शिवसेनेला एका सभापतीपदी समाधान मानावे लागले .शिवसेनेच्या सौ.सुवर्णा बनकर यांना महिला व बालकल्याण सभापतीपदी मिळाले.
शिवसेनेचे थेट जनतेतून निवडून आलेले शाम पांडे हे नगराध्यक्ष आहेत.मात्र सभागृहात राष्ट्रवादी पक्षाचे बहुमत आहे.मनसेची साथ राष्ट्रवादीला आहे.
या निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाच्या समिना शेख यांनी पक्षाशी गद्दारी केल्याने शिवसेनेला एक विषय समितीचे सभापतीपदी पद मिळाले.
राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका समिना शेख यांचे  नगरसेवक पद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे असेही गटनेते दिनेश दुबे यांनी सांगितले .
समिना शेख यांच्याबद्दल जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले.

माधुरी दीक्षितला फेव्हरेट अभिनेत्रीचं नामांकन

0

बॉलिवूडची मराठमोळी धकधक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या चाहत्यांच्या मनात आजही तेवढाच मोठं घर करून आहे हे तिने मराठीत केलेल्या ‘बकेट लिस्ट’ या पहिल्याच सिनेमामुळे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी २५ मे रोजी हा सिनेमा हा प्रदर्शित झाला होता. याच सिनेमामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या माधुरीला झी टॉकीज प्रस्तुत ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यात फेव्हरेट अभिनेत्री विभागातनामांकन मिळाले आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या नामांकनाची यादी नुकतीच झी टॉकीजने जाहीर केली. करण जोहरने बनवलेल्या बकेट लिस्ट मध्ये माधुरीने धमाकेदार बाईक रायडींग केली होती. योग्यवयानुसार आलेली तिची हि भूमिका चाहत्यांनाही आवडली होती. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?च्या नामांकनांमध्ये सोनाली कुलकर्णी हिला गुलाबजाम साठी, तेजस्विनी पंडिताला येरे येरे पैसे साठी, कल्याणी मुळे हिला न्यूडसाठी तर मृण्मयीला फर्जंद साठी नामांकनं मिळाली आहेत.

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे पुरस्कार नवव्या वर्षात पदार्पण करत असून, या पुरस्कारांनी नेहमीच नवोदित कलाकार आणि त्याच्या टॅलेंटला वाव दिली आहे. मराठी चित्रपट चाहते या अद्भुत पुरस्कारसोहळ्यात आपल्या लाडक्या कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी आपले मत २५ जानेवारी पर्यंत नोंदवू शकतात.

वन्यजीव छायाचित्रांचे तीन दिवस प्रदर्शन

0
रिवा, कल्ला-मोहल्ला यांच्यातर्फे आयोजन; वनाधिकारी रंगनाथ नाईकडे करणार उद्घाटन
पुणे : रिवा, कल्ला-मोहल्ला आणि ऍडव्हेंचर मंत्रा यांच्या संयुक्त विद्यमाने युवा छायाचित्रकारांनी काढलेल्या वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन दि. २५ ते २७ जानेवारी २०१९ या कालावधीत टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेसमोरील रिवा बिल्डिंगच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन रोज सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन भारतीय वन सेवा अधिकारी रंगनाथ नाईकडे यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. प्रतीक जोशी, विराज सिंग, ईशान बिदये, मंदार मोटे या युवा वन्यजीव छायाचित्रकारांनी ही छायाचित्रे टिपलेली आहेत. या चारही छायाचित्रकारांनी काढलेली जवळपास ३० पेक्षा अधिक छायाचित्रे येथे पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर तनय गुमास्ते या चित्रकाराने रेखाटलेली चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
प्रतीक जोशी पर्यावरणशास्त्राचा विद्यार्थी असून, त्याला वन्यजीव मध्ये रस आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात असताना त्याने वन्यजीवांवर संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम केले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून प्रतीक वन्यजिवांशी संबंधित काम करत आहे. विराज सिंग यानेही पर्यावरणशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. निसर्ग, पक्षी यांच्याशी तो गेल्या चार वर्षांपासून जवळीक साधून आहे. जंगलातील आश्चर्य त्याच्या कॅमेरातून पाहायला मिळणार आहेत.
ईशान बिदये वन्यजीव आणि छायाचित्रण याचे वेड असलेला हा तरुण आहे. नॅशनल जिओग्राफिक, ऍनिमल प्लॅनेट आणि डिस्कव्हरी चॅनेलची त्याला आवड आहे. पंधरा वर्षांचा असल्यापासून तो काकांच्या मदतीने वन्यजीवांचा जवळून अभ्यास करत आहे. त्यानेही पर्यावरणशास्त्रात शिक्षण घेतले आहे. मंदार मोटे पक्षी आणि प्राण्यांची छायाचित्रे काढण्याचा छंद असलेला युवक आहे. गेल्या आठ वर्षांपासून प्राण्यांना कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न मंदार मोटे करत आहे. तनयदेखील वन्यजीव आणि पक्षीनिरीक्षण करणारा युवक आहे, अशी माहिती रिवा स्टाईलचे माधव गोडबोले, मानस गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कलवट ब्रीज विकसित करणे कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न

0
पुणे–नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या विकास निधीतून ऐतिहासिक मार्ग तसेच कलवट ब्रीज विकसित करणे या कामाचा भूमिपूजन समारंभ  शिवसेनेचे शहरअध्यक्ष माजी आमदार महादेव  बाबर तसेच नगसेवक आनंद आलकुंटे यांच्या शुभहस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला,हा रस्ता महंमदवाडी रोड ते  हेवन पार्क ला  जोडला जाणारा रस्ता आहे ,यापूर्वी महंमदवाडी रोड ते हेवन पार्क ला जोडला जाणारा रस्ता, हा कृष्णा नगर येथून, अरुंद होता ,या मुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी ला तसेच अनेक समस्याना,सामोरे जावे लागत होते, या रस्त्याचे काम पूर्ण झाल्या नंतर  नुकताच झालेल्या राजकीय आणि सामाजिक यांच्या प्रयत्नातून ससाणे नगर भुयारी मार्गाचे भूमिपूजन पार पडत असताना,  नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला, रेल्वे फाटकाच्या त्रासाला  व पर्यायी मार्गाला वेळ, इंधन ,अश्या प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागणार ,असे निदर्शनास येणार असल्या कारणानें चालक्य नीती ,बुद्धी मतेच्या जोरावर, व परिस्थिती चे गांभिर्य लक्षात घेऊन. ऐताहासिक या रस्ता च्या नियोजन साठी तयारी चालू झाली, या कामासाठी खासदार शिवाजी अढाळराव पाटील ,माजी आमदार महादेव बाबर ,नगरसेवक आनंद आलकुंटे यांनी तसेच स्थानिक  शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या सतत पाठपुरावा,व अधिकाऱ्यांनी, प्रचंड प्रमाणात सहकार्य केल्या बद्दल नाना भानगिरे यांनी आभार व्यक्त केले.
  या वेळी उदोगपती संदीप जरांडे, बाळासाहेब बिबवे,पांडुरंग आंबेकर,लोंढे आण्णा,उदोगपती नारायण तरवडे, शांताराम जाधव, प्रकाश तरवडे,कपिल तरवडे,मयूर तरवडे,पोपट आंबेकर,विनोद आंबेकर, विजय चव्हाण,विकास भुजबळ,सचिन तरवडे,राम तरवडे,अतुल तरवडे,बाळासाहेब तरवडे,उत्तम घुले,नंदू  जाधव, विश्वास पोळ,संदीप राऊत,  सुनील पाटील,विक्रम फुकटे,नाना बारगगुळे,दादा शिंदे ,संदीप शिंदे,तरवडे पपत्रकार बांधव व शिवसैनिक जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

श्री क्षेत्र सम्मेद शिखरजीकडे पुण्यातील सहा जैन युवक सायकलवरून रवाना

0

पुणे -परिसरातील सहा जैन युवक सकाळी 5.30 वाजता सायकल वरून जैन धर्मियांचे झारखंड येथील तिर्थक्षेत्र श्री क्षेत्र सम्मेद शिखरजीकडे रवाना झाले. निगडी येथील जैन मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी सायकल यात्रेस प्रारंभ केला. प्रकाश शेडबाळे, सुदीन खोत, धनंजय शेडबाळे, संजय नाईक, धनंजय चिंचवाडे आणि अजित पाटील या सहा तरूणांनी ‘सद्भावना पर्यावरण सायकल यात्रे’चे आयोजन केले असून सुमारे 2100 किलोमीटरचा सायकल प्रवास करून हे तरूण दिनांक 1 फेब्रुवारी रोजी झारखंड येथील मधुबन – श्री सम्मेद शिखरजी येथे पोहचतील. पुणे येथून निघून अहमदनगर, औरंगाबाद, लोनार, कारंजा, वर्धा, भंडारा, राजनंदनगाव, पाटेवा, बारगड, सुंदरगड, गुमला, गोला आणि मधुबन (श्री सम्मेद शिखरजी) असा त्यांचा प्रवास असणार आहे. रोज सुमारे 150 किलोमीटर सायकल प्रवास करण्याची त्यांची योजना आहे. वाटेत प्रवासात ग्रामस्थांना जांभूळ व पेरूची रोपे ते देणार असून सर्व धर्मिय सद्भावना व अहिंसा यासाठी प्रार्थनाही करणार आहेत. पुणे व परिसरात दिगंबर जैन मुनिश्री पुलकसागर महाराज यांचा चार्तुमास आयोजित करणार्‍या सकल जैन वर्षायोग समितीचे हे तरूण सदस्य आहेत. मागील वर्षी त्यांनी पुणे ते श्रवणबेळगोळ (कर्नाटक) अशी सायकल यात्रा केली होती.

पुणे ते मधुबन (श्री सम्मेद शिखरजी – झारखंड) असा सायकल प्रवास करणार्‍या या सहा तरूणांना आदल्या दिवशी मॉडेल कॉलनीतील एचएनडी जैन बोर्डिंग येथे समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. सकल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा धर्मानुरागी शोभा धारीवाल यांच्या शुभहस्ते हा निरोप समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी जैन सहयोगचे अध्यक्ष व सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ‘या सर्व तरूणांनी आपला व्यवसाय व संसार सांभाळत जैन तिर्थक्षेत्रांना सायकलवरून जाण्याचा केलेला हा संकल्प अनुकरणीय आहे.’ असे ते म्हणाले.

याप्रसंगी सर्वांना शुभेच्छा देताना शोभा धारिवाल म्हणाल्या की, सर्व सुखसोयी उपलब्ध असताना ही सायकल वरून जैन तिर्थक्षेत्रांकडे जाण्याचा या तरूणांचा हा संकल्प निश्चितच प्रेरणादायी आहे. याबरोबरच सद्भावना आणि पर्यावरण याचा संदेशही ते प्रवासात देणार आहेत ही आनंदाची बाब आहे. धर्मश्रद्धा आणि साहस याचा आदर्श मिलाफ असणार्‍या या सायकल यात्रेपासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी सुजाता शहा, जितेंद्र शहा, अतुल शहा, विरकुमार शहा, सुरेंद्र गांधी, डॉ. कल्याण गंगवाल आदी उपस्थित होते. तसेच एचएनडी जैन बोर्डिंगचे सुमारे 100 विद्यार्थी उपस्थित होते.

दत्तगुरुंची आराधना – माझे अध्यात्म आणि बालसंस्कार

0

रोज होणारी सकाळ ही प्रत्येकासाठी खुप महत्त्वाची, आशादायी आणि प्रसन्न असावी लागते. रोज सकाळी उठल्यावर प्रथम आपल्या दोन्ही हातांचे दर्शन घ्यावे,  म्हणजे दोन्ही हात जोडून त्यांना विनम्र अभिवादन करावे. हे आपल्या आजी- आजोबांनी लहाणपणी शिकवलेले संस्कार. त्यावेळी त्याचे महत्त्व तितकेसे कळत नव्हते पण आज मोठं झाल्यावर मात्र त्याची जाणीव होते आहे. आज आपण जे काही आहोत ते या संस्कार आणि दत्तगुरुंच्या कृपेमुळेचं.

रोज सकाळची सुरवात होते ती दोन्ही हातांचे दर्शन घेत आणि त्याचवेळी …

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती।

करमूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम्॥  … हा श्‍लोक म्हणतच.

या श्‍लोकाचा अर्थही खूप परिपूर्ण आहे. आपल्या बोटांच्या अग्रामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो म्हणजेच त्या बोटांचा उपयोग करुन आपण आपली रोजची कामे करतो, याच बोटांमधल्या ताकदीने आपण लेखणी हातात धरतो आणि बोटे एकमेकांना जुळवून आपण अन्नाचा घास घेतो. खरंच आपल्या ह्या हातांना खूप महत्त्व आहे आणि त्यांना वंदन हे रोज करायला हवे.

देवाजवळ मग प्रार्थना केली जाते हा आजचा दिवस माझ्यासाठी खूप सुंदर असणार आहे. मी योजलेली कामे आज पूर्ण होणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी पार पाडण्यासाठी लागणारे बळ, शक्ती आणि चांगले विचार करण्याची बुद्धी मला दे. गुरुमाऊली तू सदा माझ्या पाठीशी रहा, मग मला कशाचीही भीती वाटणार नाही, अशी प्रार्थना मी देवाजवळ करते आणि माझा दिवस सुरु होतो.

माझ्या कम्प्युटर टेबल वर तीन फोटो आहेत – 1. ज्ञानेश्‍वर महाराज, 2. सिद्धीविनायक, 3. सूर्याची प्रतिमा

मी माझ्या मनाने या तिघांची सांगड घातली आहे, हे माझे विचार आहेत.

ज्ञानेश्‍वर महाराज म्हणजे सरस्वती देवीचे उपासक. मनोभावे त्यांनी सरस्वती देवीची उपासना केली त्यातील एक कणभर तरी मला समजू दे. गणपती म्हणजे विद्येचे आराध्य दैवत. मला जे समजले आहे ते माझ्या कृतीतून आणि विचारातून लोकांपर्यंत पोहचू दे आणि सूर्याची किरणे ज्या प्रमाणे सगळीकडे पसरतात त्याप्रमाणे त्याचप्रमाणे चांगल्या विचारांच्या लहरी सगळीकडे पसरु दे आणि आजूबाजूचे वातावरण मंगलमय होऊ दे.

आजच्या सारखं माझ्या लहाणपणी कॉम्प्युटर, टीव्‍ही  किंवा फेसबुक नव्हतं. शाळेतून आल्यावर थोडावेळ खेळून झालं की दिवेलागणीला हातपाय धुवून देवासमोर प्रार्थना आणि परवचा म्हणण्याचा नित्यनेम होता. त्यात शुभं करोती बरोबर रामरक्षाही म्हटली जाई. त्यानंतर पाढे.  दर गुरुवारी एकमुखी दत्ताच्या तसबिरीला हार व नैवेद्य. दत्तगुरुंच्या आराधनेचे संस्कार लहानपणापासूनच मनावर झालेत.  पण खरच या सर्व नित्यनेमाचा म्हणा किंवा नकळत झालेल्या संस्काराचे महत्‍त्‍व आणि त्यामागील शक्ती अद्भूत आहे याचा आता वेळोवेळी प्रत्यय येत आहे.

आजच्या या धकाधकीच्या जीवनात थोडावेळ तरी मनापासून देवाची आराधना करावी. चांगलं काम करण्‍याचीभावना मनात ठेवावी. शेवटी आपण जे काही काम मनात स्वार्थी भाव न ठेवता करतो त्याचे आपल्याला कधी तरी चांगले फळ मिळतेच आणि आपल्याला मिळालेले आशीर्वाद, शुभेच्छा हे आपल्यासाठी कवचकुंडल्याचे काम करतात. या विश्‍वात ज्या चांगल्या लहरी संचारत असतात तशा वाईट लहरीपण संचारत असतात त्यांच्यापासून ही कवच कुंडले आपले रक्षण करतात. म्हणून नेहमी जेवढं होईल तेवढं चांगल घडेल ही भावना ठेवावी.

शेवटी संपूर्ण ब्रह्मांड म्हणजेच दत्तगुरु. आणि दत्तगुरुंच्या आराधनेमुळेच यश प्राप्त होते. हे संस्कार मला बालपणी मिळाले आणि या बालसंस्कारात प्रचंड शक्ती आहे याची प्रचिती आता मोठं झाल्यावर होते आहे. आज जे काही यश, प्रसिद्धी मिळते आहे ती दत्तगुरुंच्या आशीर्वादाने. या दत्तगुरुंच्या चरणी माझा मनोभावे साष्टांग प्रणिपात.

॥ श्री गुरु दत्त गुरु॥

॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥

– पुर्णिमा नार्वेकर, दहिसर

स्मार्ट शहराच्या संकल्पनेत पादचाऱ्यांसाठी प्रशस्त आणि मोकळे पदपथ निर्मिती – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.

0

पुणे-नागरिकांना अनेक प्रश्न भेडसावत असतात मात्र या सर्व नागरी प्रश्नांची सोडवणूक ही नागरिक व लोकप्रतिनिधींमधील सुसंवादानेच होवु शकते असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी शहर संघचालक बापूसाहेब घाटपांडे यांनी व्यक्त केले.

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकासनिधीतून ताथवडे उद्यान मार्गावर करण्यात येणाऱ्या पदपथाच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,प्रभाग १३ चे सरचिटणीस बाळासाहेब धनवे व भाजपचे पदाधिकारी मयुर देशपांडे,विकी धडफळे,जगदीश डिंगरे,सुयश गोडबोले,प्रवीण जोशी,सुलभा जगताप,रुपालीताई मगर,सुवर्णाताई काकडे,समीर ताडे इत्यादीनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या समजून घेतल्या.

इमारतींच्या फ्रॅंट मार्जिन/साईड मार्जिन मधील अतिक्रमण,बेवारस वाहने,रस्त्यावर थाटलेले गॅरेज व इतर व्यवसायाबाबत नागरिकांमधे प्रचंड संताप असल्याचे दिसून आले तर बागेच्या परिसरात मुलामुलींचे अश्लील चाळे,सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान,मद्यपान – यावर कारवाई न करणारे प्रशासन याबाबतीत नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
यावर बोलताना बापूसाहेबांनी वरील मत व्यक्त केले तसेच आपल्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व भाजपचे कार्यकर्ते समस्यांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच ” नागरिकांनी केवळ प्रश्न मांडू नयेत तर त्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा व सक्रिय सहभाग नोंदवावा असे ही ते म्हणाले.
मी प्रभागातील प्रत्येक काम नागरिकांच्या मागणीनुसार करत असून हा पदपथ करताना त्यावरील बंद पडलेले विजेचे खांब काढणे,वाळून गेलेली झाडे व फांद्या कापणे,ड्रेनेज ची झाकणे समपातळीवर करणे,ही कामे प्राधान्याने केली जातील असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.तसेच आत्ता नागरिकांनी मांडलेल्या समस्यांबाबत मी संवेदनशील असून प्रशासनाने याची दखल घेउन कारवाई करावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन असे ही त्यांनी सांगितले.स्मार्ट शहराच्या संकल्पनेत नागरिकांना चालण्यासाठी प्रशस्त व अतिक्रमणविरहित पदपथ असावेत,उत्तम सायकल ट्रॅक असावेत तसेच नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा हा आधार ठेवूनच मी उत्तम पदपथांची निर्मिती करत आहे असे ही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
यावेळी श्री.दांडेकर,नीताताई तळवलीकर,अश्विनीताई साठे,बी प्रकाश,स्वातीताई जोशी,प्रशांत हर्डीकर,सुरेश दीडमिशे,देशमुखताई,मिहिर केळकर,श्री करंदीकर इ स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून समस्या मांडल्या व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केलेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले.
संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन,रुपालीताई मगर यांनी स्वागत तर बाळासाहेब धनवे यांनी आभार प्रदर्शन केले.

गुरुद्वारा गुरुनानक दरबारास मदत करणार-खासदार सुप्रिया सुळे

0

पुणे -लष्कर भागातील रेसकोर्स जवळील गुरुद्वारा गुरुनानक दरबार या गुरुद्वारास खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली . या भेटीमध्ये त्यांनी गुरुद्वारा गुरुनानक दरबारमध्ये दर्शन घेतले . त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचा  गुरुद्वाराचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी हरमिंदरसिंग घई व संतसिंग मोखा यांच्याहस्ते सरोफा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देउन सन्मानित करण्यात आले . यावेळी त्यांनी प्रसाद घेतला . त्यानंतर त्यांनी गुरुद्वाराची सर्व माहिती घेतली . गुरुद्वाराचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी यांनी गुरुद्वारामार्फत चालणाऱ्या  शाळा दवाखाना गुरुद्वाराच्या कामकाजाची माहिती घेतली . यावेळी इंदरजितसिंग सहानी चार्टर्ड अकौंटंट एल. आर. भोजवानी रामेदरसिंग राणा चरणजितसिंग चंढोक ,कालमजितसिंग आनंद नेपाळसिंग कल्याणी मोहिंदरसिंग कंधारी आदी मान्यवर उपस्थित होते . 

तळजाई टेकडीवर गोळा झाला एक पोते पतंग-मांजा

0
पुणे : “पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा अनेकांसाठी गळफास ठरत आहे. त्यामुळे शालेय मुलांसह तरुणांनी ‘मांजा हटाव जान बचाव’ ही मोहीम शाळाशाळांत राबवली पाहिजे. या उपक्रमात माझा संपूर्ण सहभाग राहील. मांजामुळे जखमी होणाऱ्या प्राण्यांसाठी आणि माणसांसाठी सर्वजीव मंगल प्रतिष्ठान, गुरुवर विद्या परम रेसक्यु ऑपरेशनतर्फे बचावकार्य राबवले जाते. तरुणांनी या बचावकार्यात सहभागी व्हावे,” असे सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे डॉ. कल्याण गंगवाल यांनी सांगितले.
‘मांजा हटाव जान बचाव’ या उपक्रमाअंतर्गत तळजाई टेकडीवरील कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम सहकारनगर पुणे येथे टेलर्स ऑर्गनायझेशन, समग्र नदी परिवार (महाराष्ट्र), माय अर्थ फाऊंडेशन, ध्यास प्रतिष्ठान व जाणीव जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात डॉ. कल्याण गंगवाल बोलत होते. जेष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ पत्रकार सुनिल जी माळी. लिज्जत पापडचे सुरेश कोते, लोकेश बापट, मुकुंद शिंदे, सोमनाथ पाटील , अनंत घरात, ईश्वर कसबे, अजय खरात, गोखले काका, सौ जान्हवी बापट आदी उपस्थित होते.
तुम्ही पर्यावरण वाचवले, तर पर्यावरण तुम्हाला वाचवेल. त्यामुळे नदी स्वच्छता आणि पतंगाचा चिनी मांजा हटाव या मोहिमा राबवाव्यात, असे डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले. या उपक्रमांतर्गत चिनी मांजा न वापरणे, जखमी पक्ष्यांवर प्राथमिक उपचार करणे, झाडावर लटकणारा मांजा काढणे यासाठी नागरिकांना आव्हान करण्यात आले. कार्यकर्त्यांनी तळजाई टेकडी परिसरातील झाडांवर लटकणारे पतंग आणि मांजा गोळा केले. रोज फिरायला येणार्‍या लहान मुलांनीही यात सहभाग घेतला. तीनशेपेक्षा जास्त पुणेकरांनी या उपक्रमास पाठींबा दर्शविला.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न

0

पुणे-युवा माळी संघटना व तुकाई माता ट्रस्ट यांच्या सयुंक्त विद्यमाने महात्मा फुले पेठ  येथील सावित्रीबाई फुले स्मारकमध्ये मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले . यावेळी युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनीता भगत तुकाई माता ट्रस्टचे अध्यक्ष नितीन बोराटे वृषाली शिंदे सचिन कचरे मृणाल ढोलेपाटील ऍड. मंगेश ससाणे राकेश नामेकर पंकज दर्शिले श्वेताली नवले  संतोष जगताप . नाना गार्डे आदी मान्यवर उपस्थित होते . या शिबिरात माजी असिस्टंट कमांडर डॉ. प्रशांत जगताप मिलिंद सोसे यांनी विशेष मार्गदर्शन केले .

विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षेस सामोरे जावे . त्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घ्यावे . महाविद्यालयीन जीवनापासून स्पर्धा परीक्षेच्या तयारीस लागावे . यु पी एस सी साठी दिल्ली येथे कोचिंग क्लासेसमध्ये शिकण्याची विद्यार्थ्यांनी तयारीत राहावे .असे माजी असिस्टंट कमांडर डॉ. प्रशांत जगताप यांनी सांगितले . 

मोहिनी घालणाऱ्या गायन-वादन-नृत्याचा मिलाफ

0
पुणे : वाचस्पतीसारखा फार ऐकायला न मिळणाऱ्या रागातून, बागेश्रीमधल्या तराण्यातून आणि संत कबीरांच्या ‘चादरिया जीनी जीनी रे’ भजनातून अमोल निसळ यांच्या सुरावटींनी मोहिनी घातली. या मनमोहक गायन मैफिलीनंतर उत्तरार्धात पंडित विजय घाटे, कथ्थक नृत्यांगना शीतल कोलवालकर यांच्या गायन-वादन-नृत्य मिलाफाच्या बरसातीने रसिक श्रोते न्हाऊन निघाले.
स्वरनिनादतर्फे सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्रात आयोजित ‘गंगाधर स्वरोत्सवा’च्या दुसऱ्या दिवशी अमोल निसळ यांच्या गायनाने आणि पंडित विजय घाटे, श्रीधर पार्थसारथी व शीतल कोलवालकर यांच्या तालवाद्य कचेरीने श्रोत्यांना स्वरसंध्येची अनुभूती दिली. याप्रसंगी स्वरनिनाद संस्थेच्या संचालिका वृषाली निसळ, ऍना कंस्ट्रक्शनचे अल्पना व अर्चिस अन्नछत्रे, प्रीतम इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रीतम मंडलेचा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पंडित गंगाधर बुवा पिंपळखरे यांचे शिष्य युवा गायक अमोल निसळ यांनी वाचस्पती रागातील ‘साचो तेरो नाम’ आणि ‘चतुर सुगर बलमा’ या दोन बंदिशी सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. रागाची शुद्धता राखून गायनात सौंदर्य कसे आणता येईल, याचा उत्तम नमुना अमोल निसळ यांनी वाचस्पती रागातून दाखवला. बागेश्री रंगात खास पतियाळा  घराण्याची साक्ष देणारा एक तराणा गात रसिकांची वाहवा मिळवली. राग संगीत आणि भजन गाताना आवाजातील सूक्ष्म बदल कसे असावेत, याचे दर्शन अमोल निसळ यांच्या गायतनातून अनुभवायला मिळाले. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, संवादिनीवर राहुल गोळे, तानपुऱ्यावर ऋषिकेश सोमण व विनय चित्राव यांनी साथसंगत केली.
उत्तरार्धात, पंडित विजय घाटे यांच्या कल्पनेतून साकारलेली तालवाद्य कचेरी सादर झाली. त्यात पंडित घाटे यांच्या तबलावादनासह शीतल कोलवलकरांचे मोहक नृत्य, सुरंजन खंडाळकरांचे गायन आणि श्रीधर पार्थीसारथी यांचे मधुर मृदूंगवादन सादर झाले. बंदिशी, कायदे आणि ताल याला श्रोत्यांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांना मिलिंद कुलकर्णी यांनी संवादिनीवर, तर सागर पाटोळे यांनी पढनवर तितकीच अनुरूप साथसंगत केली.
स्वरनिनाद ही संस्था भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन आणि प्रसारासाठी कार्यरत असून, पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ‘गंगाधर स्वरोत्सवा’चे आयोजन केले जाते. यंदा हा स्वरोत्सवाचे चौथे वर्ष आहे, असे स्वरनिनाद संस्थेच्या वृषाली निसळ यांनी नमूद केले. निवेदन मधुरा ओक-गद्रे यांनी केले.

हुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ.कुमार सप्तर्षी

0
पुणे :’ इंग्रजांना घालवण्याइतकाच  मोदीरूपी हुकूमशाही  विरुद्धचा   लढा महत्वाचा असून लोकसभा निवडणुकीद्वारे  ही  हुकूमशाही घालवताना आपण जराही चूक करता कामा नये ‘, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ कुमार सप्तर्षी यांनी केले . 
‘मतदार जागृती परिषद’या मंचातर्फे  २० जानेवारी रोजी मतदार जागृतीसाठी पुण्यात सभेचे आयोजन   करण्यात आले होते .
 ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान ‘ विषयावर ही सभा झाली. सामाजिक कार्यकर्ते ,विचारवंत ,लेखक ,धर्मगुरू  त्यात सहभागी झाले .
 डॉ. कुमार सप्तर्षी (संस्थापक-अध्यक्ष युवक क्रांती दल) यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दिनांक २० जानेवारी २०१९,सकाळी ११  ते ३ यावेळेत  एस. एम. जोशी सोशालिस्ट फौंडेशन, पत्रकार भवन शेजारी,नवी पेठ, पुणे येथे ही सभा झाली .
डॉ. विश्वंभर चौधरी (सामाजिक कार्यकर्ते),श्रीरंजन आवटे (युवा लेखक-कार्यकर्ते ),मौलाना निजामुद्दीन (धर्मगुरू),संजय सोनवणी (लेखक ),सुरेश खोपडे (निवृत्त पोलीस महानिरीक्षक),प्रशांत कोठडीया (मतदार जागृती परिषद) हे वक्ते सहभागी झाले .                                                                                                                     अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ . कुमार सप्तर्षी म्हणाले ,’मोदींचे हात रक्ताने रंगलेले असल्याने त्यांना आमचा गुजरात दंगलीपासून विरोध आहे. त्यांनी हुकूमशाही कारभार करून अघोषित आणिबाणीचाच कारभार केला . आगामी लोकसभा निवडणुकीत  भाजप, काँग्रेस, महागठबंधन अशी त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येणार आहे.अशा वेळी काँग्रेस ला भाजपपेक्षा किमान एक जागा जास्त मिळावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत . आणीबाणीत सुरुवातीला जनतेला सुशासन आल्यासारखे  वाटले होते ,मात्र ,शेवटी जुलूमाची जाणीव होऊन जनतेनेच निवडणूक हाती घेतली . आताही जनता हळूहळू का होईना ,पण मोदींना घालविण्यास सज्ज होत आहे . ‘
डॉ .सप्तर्षी  पुढे म्हणाले ,’गांधींना विरोध करण्यासाठीच ब्रिटिश गुप्तहेर खात्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती केली. म्हणूनच संघाने स्वातंत्र्यलढयात भाग घेतला नाही. खरे हिंदुत्व सहिष्णू आहे,सत्य -अहिंसेला मानणारे आहे , म्हणून संघ -भाजपाने नकारात्मक हिंदुत्वाची प्रयोगशाळा उभारली आहे. इतर धर्मांचा द्वेष शिकवला जात आहे. हा सारा आटापिटा सत्तेसाठी आहे.तो यशस्वी होऊ देता कामा नये . यासाठी प्रत्येकाने जनजागृती चळवळीत भाग घ्यावा . 
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या ‘ राष्ट्रवाद: शोध आणि संवाद ‘ या पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले.
डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले, ‘संघाकडे वैचारिक वारसा काही नाही. त्यामुळे त्यांना घाबरण्यासारखे काही नाही. शेतात उगवलेले तण काढायचे असेल तर ‘ पर्याय काय ? ‘ हा प्रश्न निरर्थक ठरतो. तिसरा पर्याय उभा राहिला नसल्याने काँग्रेस हाच पर्याय आहे. काँग्रेसबरोबर उभे राहिलेच पाहिजे. काँग्रेसमध्ये सुधारणा करण्याच्या विचारासह हाच पर्याय स्वीकारावा लागणार आहे.संघाचा अजेंडा हा ब्राहमणीकरणाचा अजेंडा आहे, हे भाजप -संघामागे जाणाऱ्या बहुजनांना पटवून देता आले पाहिजे.


इतकी वर्षे राष्ट्रपिता, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज न मानणाऱ्याना देशद्रोही मानायचे नाही तर काय मानायचे ? असा सवाल डॉ चौधरी यांनी  केला.

निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे म्हणाले, ‘संघाला बेकायदा शस्त्रसाठा उत्सवात बाळगायला आवडते. हा गुन्हा असून मी त्या विरोधात लढत आहे. संघाने असूर शक्तीचा विनाश करायचा निश्चय केला आहे. पण, ‘ असूर ‘ म्हणजे कोण ? हे त्यांना विचारले पाहिजे. चेहरे न बदलता व्यवस्था बदलली पाहिजे.  
लेखक संजय सोनवणी म्हणाले, ‘सत्तेनंतर संघ अधिक सांस्कृतिक विध्वंसास प्रोत्साहन देत आहे. स्वतंत्रपणे विचार करण्याची परंपरा नष्ट केली जात आहे. त्यांना हिंदू धर्माला नव्हे तर वैदिक वर्चस्ववादी विचार जपणाऱ्या समूहाला त्यांना जपायचे आहे. भूतकाळाचा खोटा अभिमान बाळगायला लावून ते भविष्याचा वाटा बंद करीत आहेत ‘ .  
‘ तीन तलाक म्हणून तलाक् देणाऱ्यांना ३ वर्षाची शिक्षा होते. पण, तलाक न देता पत्नीला न सांभाळणाऱ्याला किती शिक्षा झाली पाहिजे, ‘ असा सवाल मौलाना निझामुदिन यांनी आपल्या भाषणात  विचारला. गुलीस्तान उजाडणाऱ्या उल्लूपेक्षा उल्लूचे समर्थन करणाऱ्या पट्ठयांपासून देशाला जास्त धोका आहे,असेही ते म्हणाले
युवा लेखक श्रीरंजन आवटे म्हणाले, ‘ खरे -खोटे बेमालूम मिसळून फसवी वातावरण निर्मिती केली जाते आहे. सामान्यजन त्याला बळी पडत आहेत.मॉब लींचिंग,मतदार यादीतून नावे मोठ्या प्रमाणावर गायब होणे,वाढते एन्काऊंटर, व्यापममधील मृत्यू, पत्रकारांवरील दबाव, लोया यांच्यासारख्या न्यायमूर्तींचे मृत्यू अशा अनेक गोष्टी माध्यमांमध्ये छापून येत नाहीत, चर्चा होत नाही.
‘ ही मतदार जागृती राज्यभर केली जाणार आहे.पक्षीय राजकारणात न जाता , सकारात्मक विरोध करणारे राजकिय व्यासपीठ म्हणून ‘ मतदार जागृती परिषद ‘ हे व्यासपीठ काम करेल,’ असे डॉ. प्रशांत कोठडिया यांनी प्रास्ताविकात सांगितले.
त्रिवेणी प्रशांत, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे या युवकांनीही  मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेला अभिवादन केले. मयूरी शिंदे यांनी उद्देशिकेचे वाचन केले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
सभागृहात डॉ. रत्नाकर महाजन, महावीर जोंधळे, अॅड. म.वि. अकोलकर, डॉ. उर्मिला सप्तर्षी ,अन्वर राजन  तसेच पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

… तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल -डॉ. नरेंद्र जाधव

0
पुणे : “गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित होत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या रिझर्व्ह बँकेची स्वायतत्ता काढली, तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर एखाद्या राज्याच्या राज्यपालाप्रमाणे नामधारी होईल. त्यामुळे ही स्वायत्तता कायम राहायला हवी,” असे प्रतिपादन केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.
दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्स डिस्ट्रिक्ट 3234 डी 2, लायन्स इनोव्हेशन फोरम, आकुर्डी येथील सूर्या ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘देणे लायनीझमचे-लेणे व्याख्यानमालेचे’ या लायन्स व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात डॉ. जाधव ‘भारतीय अर्थव्यवस्था : आजची व उद्याची’ यावर बोलत होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन ज्येष्ठ संपादक पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते झाले. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे शाखा, जितो पुणे व विश्वकर्मा विद्यापीठ या संस्था या उपक्रमासाठी सहयोगी आहेत.
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या व्याख्यानमालेवेळी अक्षरधाम, स्वामीनारायण मंदिर ट्रस्टचे परमपूज्य स्वामी ज्ञानवत्सल, लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, उपप्रांतपाल अभय शास्त्री, व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक लायन प्रकाश नारके, लायन शरद पवार, लायन राजेंद्र गोयल, लायन दिलीप निकम, लायन शाम खंडेलवाल, सूर्या ग्रुपचे योगेश वाके उपस्थित होते. यावेळी सीए आनंद जाखोटिया व सीए यशवंत कासार यांचा ‘आयसीएआय’च्या रिजनल कौन्सिल मेम्बरपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
डॉ. जाधव म्हणाले, “गेल्या दोन दशकात चीन आणि भारत जगाच्या आर्थिक पटलावर चांगली कामगिरी करत आहे. अमेरिका, युरोप, जपान यांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या होत्या. अशा स्थितीतही भारत आणि चीनने आपली परिस्थिती सावरली. जीएसटी, नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का बसला. परंतु, त्यातून ती सावरत आहे. येत्या काळात अमेरिका, युरोप, जपानची अर्थव्यवस्था पुन्हा मांडण्याची चिन्हे आहेत. चीनला आपण मागे टाकले, हे खोटे असून, १९९० पर्यंत चीन-भारत समांतर होते. आज चीन पाच पटीने पुढे आहे. तेल व्यापारात अमेरिका, रशियाच्या प्रवेशामुळे प्रस्थापितांना धक्का बसला आहे. शिवाय, अमेरिकेने इराणवर आणलेल्या निर्बंधामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो आहे. याचा परिणाम म्हणजे येत्या काळात तेलाच्या किमती चढ्या राहणार आहेत.”
“वस्तू व सेवा कर (जीएसटी) क्रांतिकारी निर्णय आहे. त्याच्या अंमलबजावणीत गडबड झाल्याने त्यावर टीका झाली. येत्या काळात त्याची रचना दोन स्लॅबवर आणली जाणार असून त्यामुळे कररचना व्यवस्थित होईल. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. शेती क्षेत्र कोलमडले असून, आर्थिक संस्था डबघाईला आल्या आहेत. मुद्रा लॉनमधून अनेकांना रोजगार मिळाल्याचा दावा साशंक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत नोकऱ्या महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी एखादी घोषणा होण्याची शक्यता आहे. आगामी काळात विकासदर ८ ते ९ टक्के यामध्ये राहिला, तर भारताचे आर्थिक भविष्य उज्ज्वल आहे,” असे डॉ. नरेंद्र जाधव यांनी नमूद केले.
‘सुखाची परिभाषा आणि जीवनाची श्रीमंती’ या विषयावर बोलताना स्वामी ज्ञानवत्सल म्हणाले, “नैतिकतेने केलेले अर्थार्जन, वितरण, विनियोग, सेवा-दान आणि वारस या पाच गोष्टी योग्य रीतीने झाल्या, तर आयुष्य सुखाचे होते. आज एकविसाव्या शतकात सुखाची परिभाषा भौतिक गोष्टींवर अवलंबली आहे. मोह, आकांक्षा वाढत असल्याने जीवनात दुःखे येत आहेत. धन, वैभव, समृद्धी कमी-जास्त झाले, तरी आपले सुख कमी होणार नाही, अशी विचारधारा आपण जोपासली पाहिजे. नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणे कमावलेले धन सुख देणारे असते. चुकीच्या मार्गाने धन जोडू नये. शासनाच्या धोरणामुळे आपण आपला व्यवसाय, अर्थार्जन प्रगत होतो. त्यामुळे प्रामाणिकपणे कर भरायला हवा. आपण ‘जीएसटी’ भरला, तर ‘गॉड सेव्ह टेन्शन’ हा दिलासा आपल्याला मिळेल. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीचे योगदान आपल्या यशात असते. त्यांच्याप्रती कृतज्ञ असावे. वाईट गोष्टींवर खर्च टाळणे, कमाईतील काही भाग अध्यात्म आणि समाजासाठी देणे, चांगल्या वारसाच्या हाती आपली संपत्ती देणे आपले जीवन सुखी बनवेल.”
विजय कुवळेकर म्हणाले, “वैचारिक खुलेपणा असण्याची आज गरज आहे. मतभेद असावेत, पण मतद्वेष असू नयेत. समाजात अनेक प्रश्न आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी वैचारिक मंथन होणे आवश्यक असून, व्याख्यानमालेतून ते शक्य आहे. भाषा-संस्कृतीचे आदानप्रदान कमी होत आहे. इतरांचे विचार ऐकण्याची सहिष्णुता विकसित व्हायला हवी. सद्यस्थितीत व्याख्यानांना श्रोतावर्ग मिळण्याची चिंता असताना व्याख्यानमाला सुरु करणे हे धाडसाचे काम आहे.”
रमेश शहा म्हणाले, “इंटरनेट-सोशल मीडियाच्या जाळ्यात समाज अडकला आहे. त्यातून बाहेर काढण्यासाठी आणि विचारांना दिशा मिळण्यासाठी व्याख्यानमाला उपयुक्त ठरेल. प्रत्यक्ष वक्त्यांचे विचार ऐकण्याची अनुभूती आपल्याला या व्याख्यानमालेतून मिळणार आहे.”

भारती विद्यापीठ येथे ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ‘

0
पुणे :
भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर ‘ आणि भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन च्या वतीने ‘ स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ‘या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . भारती विद्यापीठ धनकवडी कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम नुकताच पार पडला . १०७ कर्मचारी सहभागी झाले . भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर च्या संचालक डॉ अस्मिता जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले . व्यवस्थापन शास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी )चे संचालक  डॉ सचिन वेर्णेकर ,डॉ प्रमोद पवार  ,गौतम सांबरे यांनी मार्गदर्शन केले . अर्चना सावंत यांनी आभार मानले

पंतप्रधान मोदी बारामतीतील भाजप कार्यकर्त्यांशी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलणार

0

शरद पवार यांना आव्हान

पुणे–राजकारणातले गुरु ..शरद पवार असल्याचे सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी आता थेट बारामतीवरदेखील चाल करण्यासाठी व्यूहरचना केली आहे .  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी (दि.23) बारामती लोकसभा मतदार संघातील बूथ प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार असल्याचे भाजपाचे बारामती लोकसभा मतदार संघाचे विस्तारक शिवाजीराव भुजबळ यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून शरद पवारांना त्यांच्याच होमपीचमध्ये बाद करण्याचा डाव आखला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला थेट आव्हान दिले असल्याचे यावरून दिसून येत आहे.
यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस तानाजीराव दिवेकर, भाजपा सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष धीरज भळगट, तालुकाध्यक्ष गणेश आखाडे उपस्थित होते. भुजबळ म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदी हे राज्यात बारामती लोकसभा मतदार संघातील बूथ प्रमुखांशी प्रथमतः व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सवांद साधत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा व्हिडिओ कॉन्फरन्सचा कार्यक्रम बारामती येथे बुधवारी (दि.23) दुपारी 03:00 वाजता होणार असून या कार्यक्रमाला लोकसभा मतदार संघातील जवळपास 2070 बूथ प्रमुख उपस्थित राहणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
लोकसभा 2014च्या निवडणुकीत बारामती मतदारसंघ भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या रासपला देण्यात आला होता. त्यावेळी रासपच्या महादेव जानकर यांनी ही निवडणूक लढवली होती. जानकर यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यापुढे कडवे आव्हान दिले होते. मात्र, त्यावेळी महादेव जानकर यांचा पराभव झाला होता. त्यावेळी जानकर यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढली असती तर त्यावेळचे चित्र वेगळे असते. त्यामुळे आताच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपाचे कमळ चिन्ह असलेला उमेदवार देण्यात येणार आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव निश्चित असून भाजपाच्या वतीने सुळे विरोधात कोण उमेदवार असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.