Home Blog Page 292

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना एकरी २० हजार व हेक्टरी ५० हजारांचे अनुदान तातडीने द्या: हर्षवर्धन सपकाळ.

खरिपासाठी शेतक-यांना मोफत बियाणे व खते द्या!

अमित शाह महाराष्ट्रात असूनही पावसाच्या नुकसानीवर गप्पच, दिल्लीला जाण्यापूर्वी तरी शेतकरी कर्जमाफी जाहीर करा.

पहिल्याच पावसात भाजप, शिंदे, अजित पवारांच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी मंत्रालयात पोहचली, घोटाळेबाजांची चौकशी कधी?

मुंबई, दि. २७ मे २०२५
राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना एकरी २० हजार रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, बळीराजा संकटात आल्यास त्याला तातडीने मदत करण्याचे काम काँग्रेसचे सरकार असताना अनेकदा केले आहे. पिकावर रोग पडला, लाल्या पडल्या, गारपीट झाली, अवकाळी पावसाने नुकसान झाले की सरकारने कशाचीही पर्वा न करता शेतकऱ्याला मदत दिली आहे. आताचे सरकार मात्र शेतकऱ्याला मदत करण्याच्या विचाराचे नाही. केवळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन, कोरडी आश्वासने देऊन चालणार नाही, शेतक-यांना तातडीने मदत पोहचवली पाहिजे. खरिप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमाफी अद्याप जाहीर केलेली नाही, कर्जाचे पुनर्गठन तरी करून द्यावे. सरकारचे खरिपाचे काहीच नियोजन नाही याकडेही लक्ष वेधून अडचणीत आलेल्या शेतक-यांना खरीप हंगामासाठी मोफत बियाणे व खते द्यावीत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मुसळधार पावसाने भाजपा युती सरकारचे सर्व दावे फोल ठरले आहेत. कालवे फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार तसेच मुंबई तुंबल्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी बाहेर पडली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईत जागोजागी पाणी साचले, सर्व व्यवस्था कोलमडली. भुयारी मेट्रो मुंबईत शक्य नसल्याचा एमएमआरडीएचा अहवाल असतानाही काही लोकांच्या हट्टासाठी हा प्रकल्प राबविला त्याचे परिणाम आज दिसत आहेत. रात्रीच्या अंधारात हजारो वृक्षांची कत्तल करून मेट्रोचा अट्टाहास पूर्ण केला आहे. सत्ताधारी पक्षाचा कथित विकास एका पावसानेच उघडा पाडल्यानंतरही हे लोक आधीच्या सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. २५ वर्ष भाजपा शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेत सत्तेत होती, एकनाथ शिंदे सातत्याने नगर विकास खात्याचे मंत्री आहेत मग याकाळात भाजपा व एकनाथ शिंदे यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून सरकारने आरोप प्रत्यारोपाचा खेळ सोडून आत्मपरिक्षण करावे आणि जनतेला मदत करावी.

महाराष्ट्र नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना राज्याचे मंत्रिमंडळ मात्र अमित शाह यांची खुशामत करण्यात मग्न आहे. आपले मंत्रीपद शाबूत रहावे यासाठी मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री धडपड करत आहेत. अमित शाह यांनी निवडणुकीच्या प्रचारात दोन सिलिंडर मोफत देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणार, अशा वल्गणा केल्या, त्याचा आता त्यांना विसर पडलेला दिसत आहे. अमित शाह महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटावर एक शब्दही बोलले नाहीत. आता दिल्लीला जाण्यापूर्वी तरी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून जावी कारण राज्यातील सरकार अमित शाह यांच्या शब्दाशिवाय कामच करत नाही अशी कोपरखळीही हर्षवर्धन सपकाळ यांनी मारली.

या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी व प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उटगींचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

मुंबई, दि. २७ मे २०२५
बँकींग क्षेत्रातील विविध प्रश्नावर मागील ४० वर्ष सातत्याने सरकारला जाब विचारणारे विश्वास उटगी यांनी आज गांधी भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी विश्वास उटगी यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

“केंद्र व राज्यात भाजपा सरकारचा मनमानी कारभार सुरु असून बँकांच्या कामातही हस्तक्षेप वाढला आहे. काही भांडवलदार बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेले आहेत, भाजपा सरकार त्यांच्यावर काही कारवाई करत नाही. आर्थिक पातळीवरही भाजपा सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. भाजपा सरकारच्या बँकींग व आर्थिक क्षेत्रातील मुद्द्यांवर आवाज उठवून सरकारला जागे करण्याचे काम विश्वास उटगी करतील”, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

य़ावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी व प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

पीएमआरडीएचा आपत्कालीन विभाग अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज

पुणे (दि.२७) : अतिवृष्टीसह उद्भवणाऱ्या इतर आपत्कालीन पर‍िस्थ‍ितीला तोंड देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा आपत्कालीन विभाग अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज आहे. नागर‍िकांनीही अशा आपत्कालीन पर‍िस्थ‍ितीत घराबाहेर पडू नये तसेच धोकादायक ठ‍िकाणी जावू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. आपत्तीच्या काळात संबंध‍ितांना वेळेत मदत पोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पीएमआरडीएचे प्र. महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी यंत्रणेला दिले आहेत.

हवामान विभागाकडून वेळोवेळी मान्सूनचा अंदाज वर्तविण्यात येत असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही आहे. अतिवृष्टीसह आपत्कालीन पर‍िस्थ‍ितीचा सामना करण्यासाठी पीएमआरडीए अत्याधुनिक यंत्रणेसह सतर्क आहे. संबंध‍ित अधिकाऱ्यांनी आवशकतेनुसार इतर यंत्रणांच्या संपर्कात राहून आपत्कालीन पर‍िस्थ‍ितीत संबंध‍ितांपर्यंत तातडीने मदतकार्य कसे पोहोचव‍िण्याचे याची काळजी घेण्याचे न‍िर्देश प्र. महानगर आयुक्त यांनी द‍िले आहे. यासह नागर‍िकांनी सुद्धा आपत्कालीन पर‍िस्थ‍ितीत पर्यटनासाठी बाहेर पडू नये, तसेच शासनांच्या सूचनांचे पालन करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संपर्क क्रमांक
पुणे आपत्ती प्रतिसाद पथक (PDRF) : 9545282930
मारुंजी अग्निशमन विभाग : 020 – 67992101, 020 – 67992100, 7066055101
नांदेड सिटी अग्निशमन विभाग : 020 – 67520002, 020 – 67520001
वाघोली अग्निशमन विभाग : 020 – 29518101, 020 – 29519101

शेतजमीन वाटणीपत्राची दस्त नोंदणी फी माफ

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून त्यामध्ये 10 मोठ्या निर्णयावर मोहोर लावण्यात आली आहे. राज्यात यापुढे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. महसूल खात्यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची आपसामध्ये वाटणी करायची असेल तर एकूण रेडीरेकनरच्या एक टक्के किंमत मोजावी लागायची. आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता फक्त 500 रुपयांमध्ये ही वाटणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या आधी शेतीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी मोठी रक्कम मोजावी लागायची.

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
(मंगळवार, दि. २७ मे २०२५)
एकूण निर्णय: १०

• रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्च्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस तसेच,पदांना मान्यता. (दिव्यांग कल्याण विभाग)

•मा. शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकाची पदे निर्माण करण्यास मान्यता.(विधि व न्याय विभाग)

  • इचलकरंजी व जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता. इचलकरंजीला ६५७ कोटी , जालन्याला ३९२ कोटी पाच वर्षांत मिळणार (वित्त विभाग)
  • शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ. (महसूल विभाग)
  • पत्रकार क्लब ऑफ नागपूर, नागपूर यांना देण्यात आलेल्या जमीनीबाबतच्या अटी-शर्तीमध्ये बदल करण्यास मान्यता. (महसूल विभाग)

• फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि. (FDCM Ltd.) मधील १हजार ३५१ पदांच्या सुधारीत आकृतीबंधास मंजूरी (वने विभाग )

• स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारीत धोरणास मान्यता. (शालेय शिक्षण विभाग)

• अशियाई विकास बैंक (ADB) सहाय्यित “महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प” संस्थेवर पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहणार. (पणन विभाग)

• कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक यांच्या पदनामात “उप कृषि अधिकारी” व “सहायक कृषि अधिकारी” असा बदल (कृषि विभाग )

• महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील १९५ कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर (वस्त्रोद्योग विभाग)

देहू-आळंदी रस्त्यावर इंडसइंड बँकेचे ATM फोडण्याचा प्रयत्न:हरियाणा टोळीतील दोन आरोपी ताब्यात, तीन फरार

पुणे-देहू – आळंदी रस्त्यावर देहुगाव मुख्य कमानीच्या पुढे रस्त्यावर थ्री एटीएम नावाने परिचीत असलेल्या इंडसाइंड बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने मंगळवारी मध्यरात्री पावणेदाेन वाजता फाेडण्याचे तयारीत असलेले पाच संशयित गस्त घालणाऱ्या पाेलिसांना दिसून आले हाेते. पाेलिसांनी सदर ठिकाणी जाऊन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, तीन चाेरटे पसार झाले, तर दाेन आराेपींना अटक करण्यात यश आले. पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत संबंधित टाेळी ही हरियाणा राज्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पिंपरी चिंचवड परिमंडळ दाेनचे पाेलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली आहे.

या प्रकरणी मुस्तफा माेबीन खान (वय- ३०),मुस्तकीम माेबीन खान (२५, दाेघे रा. पिनागव्वान, ता.पुन्हाना, जि.नुह, हरियाणा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार सिमा युसूफ खान (४०), वारीस खान (२०) व युसुफचा भाऊ आझाद खान (४५) हे कार मधून पसार झाले. सदर टाेळीचा म्हाेरक्या हा युसुफ खान असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील दाेन महिन्यापूर्वी विठ्ठलवाडी देहूगाव येथील एसबीआय बँकेचे एटीएम फाेडून १६ लाख ८७ हजार रुपये चाेरट्यांनी पळवून नेले हाेते. या एटीएम चाेरी प्रकाराचे अनुषंगाने पाेलिसांनी पुन्हा एटीएम चाेरीचा प्रकार घडू नये याकरिता परिणामकारक रात्रगस्त सुरु केली हाेती.

या दरम्यान देहुगाव बीट मार्शल रात्रगस्त घालताना त्यांना देहुगाव येथे एक पांढऱ्या रंगाची कार अभी असल्याचे दिसून आले. पाेलिस अंमलदार समाधान पटावकर व पाेलिस शिपाई किरण पाटील यांनी सदर गाडीकडे जाऊन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, सदरची कार ही तेथून भरधाव वेगाने आळंदीच्या दिशेने निघून गेली. त्यावेळी सदरच्या कारमध्ये पुढील बाजूस दाेन पुरुष व मागे एक महिला बसल्याचे दिसून आले. बीट मार्शलवरील पाेलिसांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ एटीएमकडे धाव घेतल्यावर इंडसइंड बँकेचे एटीएमचे शटर थाेडे उचकटलेले व त्यातून उजेड बाहेर दिसला.

तसेच आतील बाजूस काहीतरी सामान जमिनीवर पडल्यासारखा आवाज आल्याने त्यांना एटीएम चाेरीचा संशय आला. त्यामुळे पाेलिसांनी सहाय्यक पाेलिस निरीक्षक जाेएब शेख यांना फाेन करुन माहिती देत मदतीसाठी बाेलावले. एटीएमचे शटर उघडून आत प्रवेश केल्यावर दाेनजण गॅस कटरच्या सहाय्याने एटीएमची ताेडफाेड करुन दराेडा टाकताना मिळून आले. पाेलिसांना पाहून त्यांनी जाेरजाेरात आरडाओरड करुन शिवीगाळ करत पाेलिसांच्या दिशेने दगडफेक केली. तसेच त्यांच्याशी झटापटही केली. थाेड्याचवेळात आणखी पाेलिस आल्याने सदर दाेन आराेपींना अटक करण्यात आली. आराेपींवर देहु राेड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळ्याचे शुक्रवारी आयोजन

राज्यातील विविध क्षेत्रातील सोळा यशस्वी युवांचा होणार सन्मान

छत्रपती संभाजीनगर (दि. २७): यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मागील सव्वीस वर्षांपासून राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी विविध क्षेत्रात विधायक, भरीव व विशेष कामगिरी करणाऱ्या युवक-युवतींना हे पुरस्कार देण्यात येतात. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येते.
यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार वितरण सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार दि, ३० मे २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम असतील, तर मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२४-२५ सालचे मानकरी पुढीलप्रमाणे: साहित्य – विनायक होगाडे (कोल्हापूर), मृदगंधा दीक्षित (पुणे), सामाजिक – आकाश टाले (नागपूर), ऋतुजा जेवे (बुलढाणा), इनोव्हेटर – सुश्रुत पाटील (पालघर), पद्मजा राजगुरू (परभणी), क्रीडा – ओजस देवतळे, नागपूर (क्रीडा प्रकार : धनुर्विद्या), हृतिका श्रीराम, सोलापूर (डायव्हिंग), पत्रकारिता – प्रथमेश पाटील (पुणे), ज्योती वाय. एल. (मुंबई), उद्योजक जयेश टोपे (नाशिक) शिवानी सोनवणे (पुणे), तसेच रंगमंचीय कलाविष्कार विभागात कृष्णाई उळेकर, धाराशिव (लोककला), तन्वी पालव, सिंधुदुर्ग (शास्त्रीय नृत्य), ऋतुजा सोनवणे, जळगाव (शास्त्रीय संगीत), कल्पेश समेळ, रायगड (नाट्य) असे एकूण सोळा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील युवकांच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे. २१ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटरचे कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव निलेश राऊत, कार्यकारिणी सदस्य डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. श्रीरंग देशपांडे, डॉ. आशिष गाडेकर, डॉ. रेखा शेळके, डॉ. दासू वैद्य, प्रेरणा दळवी, सुबोध जाधव, रुपेश मोरे, राजेंद्र वाळके, वैशाली बावस्कर, संतोष मेकाळे आदींनी केले आहे.

25 वर्षीय तरुणीची 22 व्या मजल्यावरून उडी:खाली पडताच शरीराचे झाले 2 तुकडे

मुंबई-एका 25 वर्षीय तरुणीने 22 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची भयंकर घटना मुंबईच्या विक्रोळी परिसरात घडली आहे. भयंकर म्हणजे सदर मुलगी इमारतीच्या परिसरात पार्क करण्यात आलेल्या एका दुचाकीवर पडली. यामुळे तिच्या शरीराचे 2 तुकडे होऊन घटनास्थळी अक्षरशः रक्तामांसाचा सडा पडला होता.

यासंबंधीच्या माहितीनुसार, विक्रोळीतील कन्नमवार नगरात सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. हर्षदा तांदोलकर असे मृत तरुणीचे नाव आहे. मुंबईत सोमवारी मुसळधार पाऊस सुरू असताना तिने 22 व्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे स्पष्ट झाले नाही. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय हर्षदा तांदोलकरने इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर घटनास्थळावरील दृश्य अंगाचा थरकाप उडवणारे होते. कन्नमवार नगरातील इमारत क्रमांक 97 मध्ये ही घटना घडली. एवढ्या उंचीवरून उडी मारल्यामुळे तरुणीच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. यामुळे घटनास्थळी रक्तामांसाचा सडा पडला होता. परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हर्षदा तांदोलकरने 22 व्या मजल्यावरून उडी मारून टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण एका पोलिस अधिकाऱ्याने तिने तणावातून हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे. हर्षदाने बहुजमली इमारतीवरून उडी मारली. त्यानंतर ती खाली उभ्या करण्यात आलेल्या एका दुचाकीवर कोसळली. यामुळे तिच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते, असे ते म्हणाले.

अजित दादांनी कारवाई केली आता एकनाथ शिंदेंनी कारवाई करावी

राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट (Siddhant Shirsat) यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. संबंधित महिलेने आरोप केला आहे की, सिद्धांत शिरसाट यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. या प्रकरणात ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या माध्यमातून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून, सिद्धांत शिरसाट यांच्यावर मानसिक व शारीरिक छळ, फसवणूक, धमकी तसेच हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, मला अतिशय शॉक बसला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, सगळे राजकारणी कुठल्या थराला जातायत. याप्रकरणी मुलीचे स्टेटमेंट आहे की, सिद्धांत शिरसाट यांनी खूप धमक्या दिल्यात. स्वतःच्या डोक्याला बंदूक लावून आत्महत्या करेन, ब्लेडने स्वतःला कापून घेईल, असा मानसिक छळ करून तिला लग्नाला लावले. त्यानंतर माझे वडील कॅबिनेट मंत्री होणार आहेत. त्यामुळे तुला घेऊन जाऊ शकत नाही, असे म्हटले. सोबतच तू आमचे काहीही वाकडे करू शकणार नाहीस, अशी धमकी दिली. हे सगळे खूप गंभीर आणि शॉकिंगय. संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन हा विषय मांडावा, असे आवाहनही त्यांनी केले. शिरसाटांनी स्वतः पुढाकार घेतला नाही, तर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा आम्ही त्यांना कारवाई करायला भाग पाडू. मुलीवर दबाव कसा आणला, तिला नांदवायला संभाजीनगरला घेऊन जाऊ शकत नाही, या सगळ्या विषयावर शिंदे आणि शिरसाट या दोघांनी बोलावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारे गुन्हेगारीला प्रोत्साहन दिले जात असेल किंवा लोकप्रतिनिधी अशा प्रकारे सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर लेकीबाळीवर हात टाकत असतील तर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. भाजपने संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी जी तत्परता दाखवली होती. ती शिरसाट यांच्या राजीनाम्यासाठी दाखवली जाणार का? आपल्या बापाच्या सत्तेचा गैरफायदा घेत हे प्रकरण दाबण्याचा आणि त्या महिलेवर अन्याय करण्याची जी ताकद आहे, ती सत्तेतून आली आहे. त्यामुळे फडणवीस ही सत्ता काढून घेण्याची हिंमत दाखवणार का? हा खरा प्रश्न आहे, असे अंधारे यांनी म्हटले आहे. मी पीडितेची भेट घेऊन हा मुद्दा लावून धरणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. एका महिलेवर अन्याय होत असेल आणि तिने तशी तक्रार केली असेल, तर त्यावर रीतसर कारवाई होणे आवश्यक आहे. राजकीय दबावापोटी तक्रारीकडे दुर्लक्ष करून गुन्हा न दाखल करून घेणे हे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणी थेट महिला आयोगावर टीका केली आहे. जलील म्हणाले की, दुर्दैव याचे वाटते की, एका मंत्राच्या मुलाने तिसरे लग्न केले आणि ज्या मुलीशी लग्न केले त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे. मग सगळे लोक गप्प का आहेत? राज्याचा महिला आयोग का गप्प आहे? आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना आमची हात जोडून विनंती आहे की, ताई ती मुलगी मुंबईमध्येच राहते. तिला जाऊन भेटा आणि तिला न्याय द्या.

अजितदादांच्या पक्षानंतर आता शिंदे गटाच्या मंत्र्याच्या मुलावर विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळाचे आरोप

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने शारीरिक व मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेत. या प्रकरणी पीडितेने सिद्धांत शिरसाट यांना कायदेशीर नोटीस बजावत त्यांच्यावर मानसिक व शारीरिक छळासह हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.दरम्यान,या प्रकरणी सिद्धांत शिरसाट यांनी या नोटीशीची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे सांगत आपले हात वर केले आहेत .

पीडित महिलेचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धांत शिरसाट यांनी चेंबूर येथील त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या फ्लॅटमध्ये पीडित महिलेशी लग्न केले. दोन वर्षे ते चांगले राहिले. पण नंतर तिसऱ्याच मुलीशी त्यांचे अफेअर सुरू झाले. यामुळे त्यांनी पीडितेकडे दुर्लक्ष करत तिचा मानसिक छळ सुरू केला. तिने कुठे तक्रार दाखल करू नये म्हणून सिद्धांत शिरसाटने स्वत:च्या डोक्याला बंदूक लावत तिला धमकावले.

वकील चंद्रकांत ठोंबरे म्हणाले की, सिद्धांत शिरसाट यांनी पीडितेला छत्रपती संभाजीनगरलाही येऊ दिले नाही. तू तिकडे आलीस तर तुझे तंगडे तोडू अशी धमकी त्यांनी तिला दिली. त्यामुळे आम्ही त्यांना यासंबंधी नोटीस पाठवून पीडितेला 7 दिवसांच्या आत नांदण्यास घेऊन जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी पीडितेला नांदण्यास नेले नाही तर आम्ही महिला अत्याचार प्रतिबंधक काद्यांतर्गत त्यांच्यावर 3 केस दाखल करणार आहोत.

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. सदर महिलेने सिद्धांत यांना कायदेशीर नोटीस बजावून त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची 2018 मध्ये सोशल मीडियावरून सिद्धांत शिरसाट यांच्याशी ओळख झाली. काही दिवसांतच हे नाते चेंबूर येथील एका फ्लॅटमध्ये शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचले. या संबंधानंतर सिद्धांतने आत्महत्येच्या धमक्या देत तिला भावनिक ब्लॅकमेल केले. त्याचबरोबर लग्नासाठी दबाव आणला.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, सिद्धांतच्या सततच्या भावनिक आश्वासनांवर विश्वास ठेवून तिने त्याच्याशी विवाह केला. मात्र या नात्याचा शेवटही वेदनादायक ठरला. महिलेला गर्भधारणाही झाली होती, पण सिद्धांतने जबरदस्तीने तिचा गर्भपात करवून घेतल्याचा उल्लेख तिने नोटीसीमध्ये केला आहे. संजय शिरसाट हे राज्याचे सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यामुळे पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई न करता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

इस्कॉन पुणेद्वारे जगातील सर्वात मोठी मूल्य शिक्षण स्पर्धा संपन्न 

इस्रो येथे राष्ट्रीय बक्षिस वितरण समारंभ :  इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक

पुणे : विज्ञान आणि अध्यात्म याचे प्रगटीकरण करीत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) बेंगळुरू येथील मुख्यालयात इस्कॉन पुणे द्वारे दरवर्षी आयोजित केली जाणारी जगातील सर्वात मोठी मूल्य शिक्षण स्पर्धेचा राष्ट्रीय बक्षिस वितरण समारंभ पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद इस्रोचे माजी अध्यक्ष आणि चांद्रयान-३ मोहिमेचे प्रमुख व्यक्ती डॉ. एस. सोमनाथ यांनी भूषवले. डॉ. सोमनाथ यांनी देशभरातील ६० राष्ट्रीय अव्वल दर्जाच्या विद्यार्थ्यांचा वैयक्तिकरित्या सत्कार केला, त्यांना मेडल, भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या तरुण यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना इस्कॉनच्या या उपक्रमातून शिकलेल्या शाश्वत नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचे पालन करण्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

दरवर्षी डिसेंबरमध्ये आयोजित केली जाणारी ही मूल्यशिक्षण स्पर्धा संपूर्ण भारतातील २० जिल्ह्यांतील १.५ लाखांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते, ज्यांच्या परीक्षा ऑनलाइन घेतल्या जातात. जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना फेब्रुवारीमध्ये स्थानिक पातळीवर बक्षीस दिले जातात, तर राष्ट्रीय विजेते एप्रिल – मे मध्ये होणाऱ्या ग्रँड फिनालेसाठी बेंगलोरमध्ये एकत्रित होतात. गेल्या काही वर्षांत, १२ लाखांहून अधिक मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. ज्यामुळे हा जगातील सर्वात मोठा मूल्यशिक्षण उपक्रम बनला आहे.

डॉ. एस. सोमनाथ म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्ये रुजवण्याचा दूरदर्शी प्रयत्न इस्काॅन करत आहे. तंत्रज्ञान मानवी सुख सुविधा वाढवण्याचे काम करत असताना आत्मचिंतन आणि चारित्र्य मजबूत करण्यास देखील प्रेरित केले पाहिजे. भगवद्गीता आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यात इस्कॉनचे संस्थापक श्री़ प्रभुपाद यांचे योगदान असामान्य आहे असे गौरवोउद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमात डॉ. सोमनाथ यांच्या हस्ते त्यांच्या आगामी महाभारत पुस्तकाचे उद्घाटन करण्यात आले. या समारंभात फिनोलेक्स, मोटो व्होल्ट, अॅव्हॉन सायकल्स, फ्लेअर पेन्स, न्यूट्रिशियस चिक्की, बोरोसिल, ड्यूक टी-शर्ट्स आणि अँम्ब्रेन वॉचेस यासारख्या महत्त्वपूर्ण कॉर्पोरेट प्रायोजकांच्या प्रतिनिधींनीही हजेरी लावली. 

शुभ विलास प्रभू यांनी आधुनिक काळात मूल्य-आधारित शिक्षणाची गरज, प्रभाव आणि परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. इस्रोचे वरिष्ठ अधिकारी हरे कृष्णन , गणेश पिल्लई यांनी या उपक्रमाबद्दल कौतुक व्यक्त केले. राष्ट्रीय विजेते विद्यार्थी आणि इस्रो अध्यक्ष यांच्यातील व्यक्तिगत संवादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

पुणे इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष श्रीमान राधेश्याम प्रभू यांचे मार्गदर्शन मिळाले. पुणे इस्कॉन मंदिराचे वरिष्ठ प्रचारक श्रीमान वरदराज प्रभू या कार्यक्रमाचे समन्वयक आहेत.

‘ऑपरेशन सिंदूर’वर निवृत्त ले. जनरल राजेंद्र निंभोरकर आणि ले. जनरल विनायक पाटणकर यांची प्रकट मुलाखत

कोथरुडकर अनुभवणार ‘नव्या भारताचा सामर्थ्यविष्कार’

पुणे:ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची सर्व देशवासियांना माहिती व्हावी, यासाठी असीम फाऊंडेशन आणि युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या संयोजनातून ‘ऑपरेशन सिंदूर- नव्या भारताचा सामर्थ्यविष्कार’ हा कार्यक्रम कोथरूडमध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ले. जनरल राजेंद्र निंभोरकर (नि.) आणि ले. जनरल विनायक पाटणकर (नि.) यांची प्रकट मुलाखत होणार आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने दिनांक ६ आणि ७ मे २०२५ रोजी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून आपल्या अचाट सामर्थ्याचे दर्शन संपूर्ण जगाला घडवत, दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्धवस्त केले. अन् दहशतवादाला मातीत मिळविण्याची भारताची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये प्रचंड आनंद व्यक्त करण्यात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ‘जशास तसे’ उत्तर मिळाले. तसेच, यामुळे भारतीय सैन्य दलाच्या अचाट आणि अचंबित करणाऱ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला झाले.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्विततेची माहिती सर्वांना व्हावी; यासाठी असीम फाऊंडेशन आणि युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या संयोजनातून ‘ऑपरेशन सिंदूर- नव्या भारताचा सामर्थ्यविष्कार’ हा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात ले. जनरल राजेंद्र निंभोरकर (नि.) आणि ले. जनरल विनायक पाटणकर यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार डॉ . उदय निरगुडकर संवाद साधणार आहेत. दिनांक ३० मे २०२५ रोजी सायं. ६.०० ते ८.३० वेळेत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कार्यक्रमहोणार आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ हे देखील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

अभिनेता सोनूसूदने हिमाचलमध्ये-हेल्मेटविना चालवली बाईक :नालाही ओलांडला

हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती येथे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हेल्मेटविना कपडे काढून बाईक चालवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत अनेक बाईकर्स दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सोनू सूद दुचाकीवरून धोकादायक नाला ओलांडताना दिसत आहे. यानंतर तो समोर उभ्या असलेल्या चाहत्यांजवळ थांबतो आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करतो.

व्हिडिओ २०२३ सालचा

सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी या व्हिडिओमध्ये हिमाचल प्रदेश पोलिसांना टॅग केले आहे आणि वाहतूक नियमांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, लाहौल-स्पिती पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास डीएसपीकडे सोपवला आहे. पोलिसांनी त्यांच्या प्रेस नोटमध्ये असेही म्हटले आहे की, प्राथमिक माहितीनुसार, हा व्हिडिओ २०२३ सालचा असल्याचे दिसते. उर्वरित तपास सुरू आहे आणि नियमांनुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
५२ सेकंदांचा व्हिडिओ: सुमारे ५२ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, बॉलिवूड स्टार सोनू सूद हेल्मेटविना बाईक चालवताना दिसत आहे. त्याने चड्डी आणि गडद चष्मा घातला आहे. त्याच्या मागे अनेक दुचाकीस्वार आहेत, ज्यांनी हेल्मेट घातले आहे.
उभे राहून बाईक चालवली: व्हिडिओमध्ये सोनू चालत्या बाईकवर उभा राहतो असे दिसते. यानंतर, तो कपडे आणि हेल्मेट दोन्ही घालून बाईक चालवताना दिसतो.
बाईक नाल्यात अडकली: सोनू इतर बाईकस्वारांसह धोकादायक नाला ओलांडतो. रस्त्याच्या खराब स्थितीमुळे त्याची बाईक नाल्याच्या मध्यभागी अडकते. मग इतर बाईकस्वार त्याला मदत करतात.
चाहत्यांसोबत फोटोशूट: नाला ओलांडल्यानंतर, सोनू थोडे अंतर चालतो आणि त्याचे हेल्मेट काढतो आणि थांबतो. तिथे उभे असलेले लोक त्यांचे फोटो काढण्यासाठी त्याच्या जवळ जातात. सोनू एक एक करून सर्वांशी हस्तांदोलन करतो आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतो. मग तो सर्वांसोबत फोटो काढतो.वाहतूक नियमांचे उल्लंघन: लाहौल-स्पितीच्या एसपी कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे की सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक बॉलिवूड अभिनेता लाहौल-स्पिती जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा व्हिडिओ २०२३ सालचा असल्याचे दिसून येत आहे.
केलाँग डीएसपीकडे तपास सोपवण्यात आला: निवेदनात म्हटले आहे की, व्हिडिओची सत्यता शोधण्यासाठी, तपास केलाँग डीएसपी रश्मी शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल.
पर्यटकांना आवाहन: या प्रेस नोटद्वारे, लाहौल-स्पिती पोलिस सर्व लोकांना आणि पर्यटकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि शिस्तबद्ध आणि जबाबदार वर्तन स्वीकारण्याचे आवाहन करतात.

मिठी नदी घोटाळ्यात डिनो मोरियाची चौकशी

‘द रॉयल्स’ या मालिकेमुळे सध्या चर्चेत असलेल्या डिनो मोरियाची अलीकडेच EOW (इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग) ने चौकशी केली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता ते आपले म्हणणे नोंदवण्यासाठी कार्यालयात पोहोचले. मिठी नदी घोटाळ्यातील मुख्य आरोपी केतन कदमच्या कॉल रेकॉर्डमधून डिनो मोरियाचे नाव समोर आले आहे.

फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, ईओडब्ल्यूमधील सूत्रांनी सांगितले की, डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टीनो यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मिठी नदी घोटाळ्यातील आरोपी केतनशी डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो यांचे अनेक फोन कॉल्स झाल्याचे आरोप आहेत. चौकशीदरम्यान, तपास अधिकाऱ्याने त्याच्या संपर्क तपशीलांशी संबंधित प्रश्न विचारले.

खरंतर, मिठी नदीची स्वच्छता मुंबई महानगरपालिकेने केली होती. यासाठी, गाळ पुशर्स आणि ड्रेजिंग मशीन वापरण्यात आल्या आहेत. कोची येथील कंपनी मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून मोठ्या रकमेला ही मशीन्स खरेदी करण्यात आली होती.

या प्रकरणाच्या चौकशीत असे दिसून आले की केतन कदम आणि जय जोशी यांनी मॅटप्रॉप कंपनीचे अधिकारी आणि बीएमसीच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून स्वच्छतेच्या नावाखाली ६५ कोटी रुपयांचा घोटाळा केला.

घोटाळ्यातील मुख्य आरोपी केतन कदम यांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी केली असता, अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाची नावे समोर आली. त्या दोघांनीही केतन कदमशी अनेक वेळा बोलले होते. तपास अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, डिनो मोरिया आणि केतन हे केवळ मित्र नाहीत तर त्यांच्यात आर्थिक व्यवहार देखील असू शकतात. यामुळेच तपासाच्या कक्षेत डिनोची चौकशी केली जात आहे.

नेटफ्लिक्सवरील ‘द रॉयल्स’ या मालिकेत नवाब सलाउद्दीनच्या भूमिकेमुळे डिनो मोरिया चर्चेत आहे. येत्या काळात तो मल्टीस्टारर चित्रपट ‘हाऊसफुल ५’ मध्ये दिसणार आहे. डिनो मोरियाने १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, जरी त्याला २००० मध्ये आलेल्या ‘राज’ या चित्रपटातून ओळख मिळाली.

आज पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

0

आज दिनांक 27/05/2025 रोजी पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून अहमदनगर, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, परभणी, पुणे , सांगली, सातारा, ठाणे या जिल्ह्यातपुढील ३ तासांत जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे.

पाऊस ; दि.27/05/2025
आजचा पाऊस / एकुण
यवत. 25•00 / 331.00
केडगाव.35•00/ 345.00
पाटस. 38•00/ 336.00
दौड. = 49•00/ 371•00
रावण गांव =50•00 / 286•00
बोरीबेल = 32.00 / 265.00
भिगवण = 20•00 / 288•00
पळसदेव=49•00/ 256.00
शेटफळ=48•00/ 736.00
इदापूर =46•00/ 356.00

पाऊस
दिनांक 27/5/25

(1जुन 24 पासुन)*
भाटघर :———-02.(1600)
निरादेवघर:——26.(2946)
विर:——————19.(870)
गुंजवणी :——–65.(3250)
पिंपरा (निरा) :–32.(1110)
वडगाव:———–04.(1106)
मानप्पा वस्ती:—00.(1023)
पणदरे बंगला:—–20.(908)
मळेगाव कॉलनी:-15.(933)
बारामती:———28.(1779)
सनसर:———–23.(1058)
अंथुर्णे:————–39.(670)
निमगाव :———-57.(821)
बावडा:————-45.(610)

यंदा अवकाळी पावसाने मान्सूनच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेस मोठा दिलासा मिळणार असून पाणीकपातीचे संकट टळणार आहे. पहिल्याच दिवशी या चारही धरणांमध्ये २८ एमएलडी पाण्याची वाढ झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

पाणलोट क्षेत्रात रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. खडकवासला १६ मिमी, पानशेत ९९ मिमी, वरसगाव ९२ मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पुढील काही दिवस पावसाचा जोरही वाढणार आहे. शहराला खडकवासला धरणासाखळी प्रकल्पातील वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला धरणातून पाणी पुरवठा केला जातो.

या चारही धरणांची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता २९.५० टीएमसी आहे. या धरणातून शहरासह, जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना आणि सिंचना योजनांसाठी पाणी दिले जाते. मागील वर्षी ही चारही धरणे १०० टक्के भरली असली तरी यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात उन्हाचा कडका वाढल्याने शहरात पाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे हा पाणीसाठा साडेपाच टीएमसीपर्यंत खाली आला होता. त्यामुळे मागील काही वर्षांप्रमाणेच जून महिन्यातच कपात ओढावण्याची शक्यता होती. मात्र, यंदा मे महिन्यातच पाणी वाढण्यास सुरुवात झाली.

शहरात तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी मे महिन्यात पूर्वमोसमी पाऊस होत असला तरी, उन्हाळ्यामुळे जमीन तापल्याने तसेच पावसाचे प्रमाण कमी असल्याने प्रत्यक्षात मान्सूनच्या आगमनानंतरच धरणांमधे पाणीसाठ्यास सुरुवात होते. सर्वसाधरणपणे जूनच्या अखेरीस पाणीसाठा वाढण्यास सुरुवात होते.

मात्र, यंदा मे महिन्यातच या चारही धरणांत १५० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने २६ मे पासूनच पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी सायंकाळी या चारही धरणांचा पाणीसाठा ५.६६ टीएमसी होता. तर दिवसभरात महापालिकेचा शहराचा पाणी पुरवठा तसेच कालव्यातून दिवसभर पाणी सोडण्यात आल्यानंतरही हा पाणीसाठा ५.७० टीएमसी झाला आहे. त्यामुळे आता या पुढे धरणात येणारे पाणी वाढतच जाणार आहे.

पुण्यात मराठा समाजाच्या नेत्यांचा मोठ्ठा निर्णय:हुंडा घेणाऱ्या आणि महिलांचा छळ करणाऱ्या कुटुंबांवर बहिष्कारबाबत आचारसंहिता ठरवणार

पुणे- वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे मराठा समाजाच्या नेत्यांनी मोठी चळवळ सुरु केली आहे . या प्रकरणाने खळबळ माजली आहे. यानिमित्ताने लग्नात ज्या अनिष्ट प्रथा सुरु झाल्या, त्या बंद करण्याबाबतची चर्चा आणि काही निर्णय सोमवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या एका बैठकीत झाले आहे. आगामी काळात पुणे शहरापुरती एक कार्यकारिणी निर्माण करुन व्यासपीठ तयार करण्याचे बैठकीत ठरवले गेले आहे.

शांताई हॉटेल मध्ये झालेल्या बैठकीत शहरातील प्रमुख लोकांनी कोणत्या अनिष्ट प्रथा दूर करण्याचे ठरवले आहे. हुंडासारखे प्रकार दिसले आणि महिलेचा छळ झाला तर संबंधित कुटुंबासोबत रोटी-बेटी व्यवहार बंद केला जावा .ज्या घरात अशा पध्दतीने लग्न होतात व मुलींना त्रास होतो त्याठिकाणी लग्न न करण्याचे ठरवण्यात येणार आहे. वेळेत लग्न लावणे, मान्यवर सत्कार रद्द करणे, लग्नात मान्यवर हे नवरदेव किंवा इतर पाहुणे यांना सोन्याची चैन, अंगठी, वाहनाच्या चाव्या देणार नाही. मर्यादीत लोकात, कमी खर्चात आणि वेळेत लग्न समारंभ पुढील काळात पार पाडणे आदी गोष्टीवर भर दिला जाणार आहे.यावेळी आमदार चेतन तुपे,अंकुश काकडे,राजलक्ष्मी भोसले,दत्ता धनकवडे, अरविंद शिंदे,माजी आमदार सुनील टिंगरे, प्रशांत जगताप, श्रीकांत शिरोळे, दत्ता बहिरट, कमल व्यवहारे,संजय बालगुडे ,विकास पासलकर ,राजेंद्र कोंढरे शाम मानकर उपस्थित होते.
बैठकीत अनेक वक्त्यांनी मते व्यक्त केली. शहरातील अनेक मातब्बर घराणी आहे त्यांना सोबत घेऊन समाजातील ज्या अनिष्ट प्रथा आहे त्या दूर करणे प्रयत्न करण्यात येतील. पुणे शहराला ऐतिहासिक वारसा आहे. पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. पुणे शहराने नेतृत्व करुन मराठा समाजासोबत इतर समाजातील अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी अनेक दिवस पुढील काळात प्रयत्न करण्यात येतील.

समाजाच्या भितीपोटी लोक लग्न झालेल्या मुलींना पुन्हा माहेरी आणत नाही, परंतु आता समाज लग्न झालेल्या मुलींच्या पाठीशी राहील. मराठा समाजावर ज्याप्रकारे चिखलफेक केली जात आहे, ती चुकीची आहे. लग्नात जो बडेजावपणा केला जात आहे, तो बंद करण्यासाठी आज समाजाने पुढाकार घेतला आहे. राजेंद्र हगवणे कुटुंबात जे घडले त्याचे समर्थन कधी केले जाणार नाही. सुसंस्कृत समाजाला दिशा देण्याचे काम करुन चुकीच्या रुढी, परंपरा यांना छेद दिला जाईल. यापुढील काळात देखील वारंवार बैठका घेऊन नवीन आचारसंहिता तयार केली जाईल.