Home Blog Page 2866

हिराबाई माने यांचे निधन ..

0

पुणे-हिराबाई भिकाजी माने (वय 78) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे चार मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. हिराबाई यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. कॅटॅलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने हे त्यांचे पुत्र होत.
अंत्ययात्रा  सायंकाळी 6 वाजता राहत्या घरापासून (आंबेडकर चौक, पाटील कॉम्प्लेक्स, औंध रोड) निघेल. हिराबाई यांच्या पार्थिवावर औंध गावातील स्मशानभूमीत सायंकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार होतील.

हा गायक पूरग्रस्त भागात बांधून देणार ५० घरे …

0

मुंबई – गायक मिका सिंगने सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना 50 घरे बांधून देणार असल्याची घोषणा केली आहे. मिकाने पाकिस्तानमध्ये परवेज मुशर्रफच्या नातेवाईकांच्या कार्यक्रमात परफॉर्म केल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. यामुळे सोशल मीडिया युझर्सनी त्याला धारेवर धरेल होते. इतकेच नव्हे तर सिनेवकर्स इंडियन असोसिएशनने देखील मिकावर बंदी घातली आहे. या प्रकरणामुळे वादात असलेल्या मिका सिंगने आता जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात सरसावला आहे.

मिका सिंगने पूरग्रस्तांच्या मदतीला पुढे येण्यासाठी देशातील जनतेला केले आवाहन

मिका म्हणाला, “मराठी चित्रपटसृष्टी संबंधित एनजीओ चांगले काम करत आहे. माझ्यातर्फे पूरग्रस्त भागात 50 घरे बांधून देण्याचे मराठी बांधवांना आश्वासन देतो. संपूर्ण देशाने या मदतीसाठी एकत्र यावे. विशेषतः माझ्या बॉलिवूडमधील मित्रांनी हात दिला बरीच मदत होईल. मी 50 घरे बांधणार आहे. तुम्ही जर मदत केली तर ही संख्या हजारांवर पोहचू शकते. संपूर्ण देशाने मदत केली तर पूरग्रस्त भागात हजारो घरे बांधून होतील.

पाकिस्तानातील परफॉर्ममुळे वाद

मिकाने पाकिस्तानात कार्यक्रम सादर केल्यामुळे सोशल मीडियावर लोकांनी त्याच्यावर टीका केली होती. मिकाने गेल्या 8 ऑगस्ट 2019 रोजी कराची येथे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफच्या जवळील नातेवाईकाच्या लग्नात परफॉर्म केला होता. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकने भारतासोबतचे सर्व संबंध तोडले आहे. असे असूनही मिका सिंहने देशाच्या सन्मानापेक्षा पैशाला जास्त महत्व दिले. यामुळे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA)ने बंदी घातली आहे.

पुण्यातल्या पत्रकाराला मिळणार भाजपकडून विधानसभेची उमेदवारी….?

0
पुणे- जुने ,जाणते आणि जीवनप्रवासातील यशस्वी पत्रकार ज्यांना सर्व माध्यमांच्या प्रत्येक प्रतिनिधींची तर माहिती आहेच ,पण पुण्याच्या समस्या आणि त्या सोडवणुकीसाठी करावे लागणाऱ्या उपाय योजना यासाठी ज्यांच्याकडे दिशा देण्याची उर्मी आहे अशा पुण्यातील  एका पत्रकाराला भाजपने शिवाजीनगर मतदार संघातून उमेदवारी द्यायचा निर्णय घेतल्याचे अनेकांना धक्कादायी वाटेल असे वृत्त हाती आले आहे .
भाजपने हडपसर मधून विद्यमान आमदाराचा पत्ता मनसेच्या इच्छुकाने आणि एका आर टी आय कार्यकर्त्याने केलेल्या पोलखोली मुले कापल्याचे आज वर स्पष्ट झाले आहे . त्यामुळे हि जागा भाजपने आता सेनेसाठी सोडल्याचा निर्णय घेतला आहे फक्त त्याची अधिकृत घोषणा बाकी असल्याचे मानले जाते . या शिवाय शिवाजीनगर मतदार संघ देखील भाजप सेनेला सोडणार अशा बातम्या होत्या . या दोन्ही मतदार संघातील विद्यमान आमदारांनी ना पक्षासाठी काही केले ,ना जनते साठी काही केले ,निव्वळ स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला असा आरोप पक्षातील कार्यकर्त्यांनीच चालविला आहे यासह अशीच नाराजी खडकवासला विधानसभा मतदार संघातून देखील भाजपच्या कार्यकर्त्याकडून व्यक्त केली जाते आहे . पण पक्षाच्या सर्वेसार्वो असलेल्या मुख्यमंत्र्यांपुढे याबाबत ची सर्व कथा व्यथा पोहोचलेली नसली तरी खासदार गिरीश बापट आणि भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले हे  पुण्याच्या आठ हि विधानसभा मतदार संघातील आमदारांची कार्यपद्धती ते चांगलेच जाणून आहेत . या पार्श्वभूमीवर या दोहोंची मते मुख्यमंत्री विचारात घेऊनच उमेदवारी देण्याबाबतचा  स्वतःचा निर्णय अमित शहा यांना कळवून जाहीर करतील असे सांगितले जाते आहे .
राष्ट्रावादी च्या बड्या नेत्यांना दबावाखाली ठेवून कॉग्रेस चे पानिपत करण्याचे तंत्र मुख्यमंत्री अवलंबित असताना त्यांना दुसरीकडे राष्ट्रवादी च्या नेत्यांच्या किंवा कॉंग्रेसच्या अधिपत्याखाली राहिलेले चेहरे नको आहेत . शिवाजीनगर मधून सेनेला जागा सोडताना भानुप्रताप बर्गे किंवा  विनायक निम्हण या दोघांपैकी एकाला सेना उमेदवारी देवू शकते असे दिसते आहे . मात्र  निम्हण यांच्या नावासाठी भाजप मध्ये नाराजी आहे तर बर्गे यांच्या साठी फारशी उत्सुकता भाजपमधून दाखविली जात नाही या पार्श्वभूमीवर शिवाजी नगरची जागा राखणे ,कॉंग्रेसच्या हाती जावू न देणे हि जबाबदारी आपली असल्याचे सांगत एका नेत्याने शिवाजीनगर मतदार संघातून आपला घनिष्ठ सहकारी असलेल्या पुण्यातील सामाजिक कामाची नाळ कायम जोडून ठेवलेल्या एका पत्रकाराचे नाव येथील उमेदवारी साठी सुचविल्याचे वृत्त आहे आणि एका फौंडेशन मार्फत सामाजिक कामाशी नाळ कायम ठेवलेल्या या तथाकथित तरुण पत्रकाराने देखील या दृष्टीने कामास प्रारंभ केला आहे. आणि विशेष म्हणजे त्याला भाजपच्या अनेक नगरसेवकांनी साथ द्यायला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये काहींनी आपण शिवाजीनगर मधून इच्छुक असल्याचा  दावा हि केला होता .
एकूणच अनपेक्षित असे नवे किमान २ चेहरे तरी पुण्यातील विधानसभा मतदार संघातून भाजपकडून देण्यात येतील असे सध्या  तरी दिसते आहे.

या 19 खेळाडूंची झाली अर्जुन पुरस्कारासाठी निवड

0

नवी दिल्ली – पॅरालंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी दीपा मलिक आणि कुस्तीपटू बजरंग पूनियाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पूनियाने आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले होते. याशिवाय क्रिकेटपटू रविंद्र जडेजासह 19 खेळाडूंना यावर्षीचा अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे.

बॉक्सर मेरी कोमने स्वतःला सभेपासून केले दूर
48 वर्षीय दीपाने 2016 साली रिओ पॅरालंपिकमध्ये शॉट पुटच्या एफ-53 वर्गात रौप्य पदक पटकावले होते. निवृत्त न्यायमूर्ती एम. शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील 12 सदस्यांच्या समितीने विजेत्यांची नावे जाहीर केली. दरम्यान, सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर मेरी कॉमने वाद टाळण्यासाठी स्वत:ला सभेपासून दूर केले. तिचे प्रशिक्षक छोटेलाल यादव यांना द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते.

या 19 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार
निवड समितीने अर्जुन पुरस्कारासाठी 19 खेळाडूंची निवड केली आहे. यांमध्ये क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि पूनम यादव, ट्रॅक मैदानातील तेजिंदर पाल सिंह तूर, मोहम्मद अनस, स्वपना बर्मन, फुटबॉलपटू गुरप्रीत सिंह संधू, हॉकीपटू सी.सिंह कंगुजम आणि नेमबाज अंजुम मुदगिल यांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी खेळ, नेतृत्व क्षमता, शिस्त व खेळाविषयीची भावना यांच्याही चाचपणी केली जाते.

द्रोणाचार्य पुरस्कारसाठी तीन नामांकन

द्रोणाचार्य पुरस्कारासाठी बॅडमिंटन प्रशिक्षक विमल कुमार, टेबल टेनिस प्रशिक्षक संदीप गुप्ता आणि अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक मोहिंदर सिंह ढिल्लो यांच्या नावांची निवड करण्यात आली आहे. तर हॉकीचे यजमान पटेल, रामबीरसिंग खोखर (कबड्डी) आणि संजय भारद्वाज (क्रिकेट) यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

प्रदेश कॉंग्रेसने केली 288 मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या नावांची केंद्रीय मंडळाकडे शिफारस

0

मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघांतील उमेदवार निश्चित केले आहेत. प्रत्येक मतदारसंघातून दोन ते तीन संभाव्य उमेदवारांच्या नावांची शिफारस लवकरच काँग्रेसच्या केंद्रीय निवड मंडळाला करण्यात येणार आहे.

प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवड मंडळात ५४ सदस्य आहेत. मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस टिळक भवनात बैठका झाल्या. त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई-कोकण अशा विभागवार मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेण्यात आला. २९ ते ३१ जुलैदरम्यान विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यापूर्वीच जिल्हावार पार पडल्या होत्या. त्यासाठी राज्यभरातून सुमारे ११०० अर्ज प्राप्त झाले होते. जिल्हा समित्यांनी मुलाखतींचे अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवले होते. त्यावर दोन दिवस चर्चा झाली. प्रत्येक मतदारसंघातून दोन ते चार नावे निश्चित करण्यात आली आहेत.

‘आम्ही सध्या तरी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील संभाव्य उमेदवार निवडले आहेत. मात्र मित्रपक्षांशी आघाडी झाल्यानंतर त्यातील काही मतदारसंघ सोडण्यात येतील,’ असे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

२००९, २०१४ मध्ये असे होते चित्र : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १७४ जागा लढवल्या होत्या. ८२ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादीने ११४ जागा लढवून ६२ जागा मिळवल्या होत्या.

अनेक ठिकाणी पिता-पुत्र उमेदवार इच्छुक
‘प्रत्येक मतदारसंघात ५ ते २० पर्यंत इच्छुकांचे अर्ज आले होते. काँग्रेसला उमेदवारांची चणचण नाही. अनेक ठिकाणी पिता-पुत्र इच्छुकांच्या रांगेत आहेत. यावर केंद्रीय निवड मंडळ अंतिम निर्णय घेईल,’ अशी माहिती विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. उमेदवारांच्या निवडीचा घोळ घालण्याबाबत काँग्रेस बदनाम आहे. मात्र या वेळी पहिल्यांदाच काँग्रेसने उमेदवार निवड प्रक्रियेत तरी बाजी मारली असल्याचे चित्र आहे.

अभिनेत्री दिपाली सय्यद करणार 5 कोटींची मदत आणि घेणार 1 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी

0

सांगली –अभिनेत्री दिपाली सय्यदने शनिवारी सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. सांगलीकरांना अनेकांनी मदत केली आहे पण सांगलीपर्यंत ती पोहोचली नाही. तसेच पुराचे राजकारण करू नये असे त्या यावेळी म्हणाल्या. सांगलीतील 1 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेणार असून सय्यद फाऊंडेशनच्या माध्यमातून सांगली पूरग्रस्तांना 5 कोटींची मदत करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणात यावेळेस भीषण पूरस्थिती निर्माण झाली. यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशात येथील लोकांसमोर संसार उभा करण्यासोबतच मुलींच्या विवाहाची आणि शिक्षणाची मोठी समस्या उभी राहिली आहे. अशा पूरग्रस्त भागातील 1 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेणार असल्याची घोषणा दिपाली सय्यद यांनी केली आहे.

कृष्णा सुतार ची अमेरिकेतील स्पर्धेसाठी निवड 

0
पुणे :महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी ए इनामदार  कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स,डिझाईन अँड आर्टस्  ‘च्या ४० विद्यार्थ्यांनी   ‘ऍडोब चॅम्पियनशिप ‘स्पर्धेत  भाग घेतला  . फोटोशॉप ट्रेनिंग प्रोग्रॅम अंतर्गत झालेल्या  स्पर्धेत   या विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला  . यातील कु . कृष्णा सुतार या विद्यार्थिनीला सर्वाधिक गुण मिळवून ती आता या चॅम्पियनशिप च्या पुढील टप्प्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे . ही स्पर्धा  २०२० मध्ये अमेरिकेत होणार आहे .
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार,उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,सचिव लतीफ मगदूम आणि  कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स,डिझाईन अँड आर्टस्  चे प्राचार्य डॉ ऋषी आचार्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . यावेळी एस  बी एच इनामदार ,झुबेर शेख ,हर्षद सांगळे इत्यादी उपस्थित होते .

पूरग्रस्तांना मदतीबाबत स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींसोबत सोमवारी बैठक

0

पुणे : पुणे विभागातील प्रामुख्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीच्या अनुषंगाने सोमवार दि. 19 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 वाजता कौन्सिल हॉल, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे.
पूरग्रस्तांना वेगवेगळ्या स्वरुपात मदत करण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच संस्था व व्यक्ती स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभागी होत असून आणखीही मदत करण्यास उत्सुक आहेत. या सर्वांचे योग्य नियोजन व अमलंबजावणी करणे आवश्यक आहे.
यासाठी होणाऱ्या या बैठकीला दानशूर व्यक्ति, संस्था, स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.

“रघु-नंदन” भरतनाट्यम नृत्याविष्कार…

0

पुणे: ज्यांचे सौंदर्य अगणिक कामदेवतेपेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यांचे शरीर निलमेघाप्रमाणे आहे, पितांबर नेसलेले त्यांचे रुप लखलखत्या विजेप्रमाणे दिसत आहे, अशा पावनरुपी श्रीरामाला वंदन करुन या रघुनंदन ह्या कार्यक्रमात रामावरच्या आणि कृष्णावरच्या अनेक रचनांनी रसिक प्रेक्षकांना अक्षरश: भूरळ घातली. नृत्यभक्ती फाउंडेशन तर्फे रघु-नंदन भरतनाट्यम नृत्याविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रामाचा आचार, कृष्णाचा विचार, हरिचा उच्चार या प्रवाहात तल्लीन होण्यासाठी रघुनंदन ही कथा आयोजिली होती. मुकुंदनगर येथील सकल ललित कलाघर येथे या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेशवंदना केली गेली, ठुमक चलत रामचंद्र, राम जन्मला गं सखी राम जन्मला.., श्रीरामचंद्र कृपालू भज हर अशा वेगवेगळ्या रामावरच्या रचना सादर केल्या. कृष्णाबरोबर होळी खेळणा-या गोपिका, राधे बरोबर झालेलं कृष्णाच भांडण आणि विरह, कृष्ण आणि कालियाचं द्वंद्व असे अनेक प्रसंग विविध रचनांद्वारे सादर करण्यात आले. तर कार्यक्रमाची सांगता दशावताराने झाली. यामध्ये कृष्ण आणि रामावरचं सुंदर भजन आणि दोघांचे दहा अवताराचे सुंदर चलचित्र सादर करण्यात आले. कृष्णाच्या नामगजरात कार्यक्रमाची सांगता झाली.

कुहू, ऐश्वर्या, सायली, नेहा, अंकिता,तेजोमयि, हर्षिता, ईश्वरी, जान्हवी, मेघा, सिमरन, तन्वी, देवयानी या कलाकारांनी भरतनाट्यम नृत्याविष्कार सादरीकरण केले.

नृत्य कार्यक्रमाद्वारे रामाच्या आणि कृष्णाच्या आचार विचारांची देवाण घेवाण करत नामस्मरणामधून परमेश्वर रुपी शक्ती सदैव आपल्याला साथ देईल आणि आपला मार्ग आनंददायी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे मत नृत्यभक्ती फाउंडेशनच्या सई परांजपे यांनी व्यक्त केले.

पूरग्रस्त भागातील ‘ चुली ‘ पुन्हा पेटणार!-महसूलमंत्री यांना विश्वास

0
पेट्रोलियम कंपन्यांच्या माध्यमातून उभारली मोहीम- महसुलमंत्री 
पुणे-
पुरामध्ये सर्वस्व वाहून गेलेल्या हजारो कुटुंबियांच्या घरांमधील चुली आता पुन्हा भेटणार आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या सहकाऱ्याने ६० हजारांहून अधिक गॅस-शेगडी पूरग्रस्त कुटुंबीयांना वितरित केल्या जाणार आहेत. तसेच गॅस दुरुस्तीसाठी दोनशेहून अधिक कुशल मेकॅनिक पूरग्रस्त भागांमधील घराघरांमधून दुरुस्ती मोहीम हाती घेत आहेत.
पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करून त्यांचे संसार पुन्हा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.असे येथे 
महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतेच या संदर्भात पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीत सांगितले.. यावेळी पूरग्रस्त नागरिकांसाठी मदतीचे आवाहन पाटील यांनी केले. 
भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम, महाराष्ट्र नॅचरल ऑइल अँड गॅस आदी कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 
नागरिकांच्या घरांमध्ये पुन्हा गॅस आणि शेगडी च्या माध्यमातून चूल पेटवण्यासाठी त्रिस्तरीय आराखडा यावेळी आखण्यात आला. एक म्हणजे छोटा गॅस सिलेंडर आणि शेगडी असे दोन्ही उपलब्ध करून देणे, किंवा फक्त शेगडी उपलब्ध करून देणे. तसेच पूरग्रस्त भागांमध्ये तातडीने गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करणे, याला प्राधान्य देण्यात आले आहे.
हजारो घरांमधील गॅस आणि शेगड्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यकाळात अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत या पेट्रोलियम कंपन्यांच्या माध्यमातून कुशल मेकॅनिक पूरग्रस्त भागांमधील प्रत्येक घरांमध्ये जाऊन गॅस आणि शेगडीच्या सुरक्षेबाबत खातरजमा करणार आहेत. तसेच नादुरुस्त शेगड्या व गॅस सिलेंडर संदर्भातील समस्या दूर करून नागरिकांचा संसार पुन्हा उभा करण्यात मोलाचा वाटा उचलणार आहेत.
एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे यांनी बैठकीसाठी आणि या उपक्रमासाठी समन्वय करीत आहेत.

तरुणांनी सैन्याकडून देशसेवेचा आदर्श घ्यावा – छिब्बर

0

पिंपरी येथील गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पुणे :- पिंपरी येथील गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लेफ्टनंट कर्नल गौरव छिब्बर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.नाटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी’चाणाक्य’ यांची अखंड भारत ही संकल्पना सर्वांसमोर मांडली. याचसोबत सातवी मध्ये शिकणाऱ्या मुलांनी देशभक्तीपर गाण्यांवर सुंदर नृत्याविष्कार सादर केले.

यावेळी प्रमुख पाहुणे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरींग येथे इन्स्ट्रक्टर म्हणून काम पाहणारे लेफ्टनंट कर्नल गौरव छिब्बर, मुख्याध्यापिका भारती भागवाणी,इतर शिक्षकही उपस्थित होते.

यावेळी छिब्बर म्हणाले कि, शत्रूचे आक्रमण असो व देशावर आलेली नैसर्गिक संपत्ती कोणत्याही आपत्तीशी लढण्यासाठी देशाची सेना कायमच तत्पर असते.तरुणांनी देखील हा आदर्श घेऊन देशसेवेसाठी तत्पर असले पाहिजे. वर्णभेद,जातिभेद, स्त्री- पुरुष असमानता असे प्रश्न जेव्हा खऱ्या अर्थाने समाजातून नष्ट होतील त्यानंतरच देश खऱ्या अर्थाने प्रगती करू शकेल.

भारती भागवाणी म्हणाल्या कि,भारताला जगातील सर्वात यशस्वी देश बनविण्यासाठी देशाच्या नेतृत्वासोबत देशाच्या युवा पिढीने एकत्र येवून देशाची सर्वसमावेशक प्रगती साधण्यात सक्रियतेने प्रयत्न केले पाहिजेत.

येणाऱ्या पिढ्यांच्या स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढ्यांनी नेमकी काय किंमत मोजली याची माहितीही या निमित्ताने त्यांनी सांगितली. याशिवाय दिवसरात्र आपले संरक्षण करणारे आपले जवान आणि अनेक कष्ट सोसून आपल्यासाठी पीक काढणारे शेतकरी यांच्या कष्टाची जाणीव होणे किती आवश्यक आहे. याची माहिती देखील त्यांनी सांगितली.

सुर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार गुरुदेव राकेशभाई यांना प्रदान

0
पुणे : सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारा ‘सुर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ पूज्य गुरुदेव श्री राकेशभाई यांना प्रदान करण्यात आला. ‘द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया’ने योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका, स्ट्रटेजिक फोरसाईट ग्रुपचे वरिष्ठ सल्लागार सचिन इटकर, संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, नगरसेवक प्रवीण चोरबेले आदी उपस्थित होते. महात्मा गांधी, भगवान महावीर आणि श्रीमद राजचंद्र यांच्या प्रतिमांच्या फ्रेमचे अनावरण करण्यात आले.
दरवर्षी हा पुरस्कार ७ फेब्रुवारी रोजी सुर्यदत्ता संस्थेच्या वर्धापनदिनी दिला जातो. मात्र, गुरुदेव श्री राकेशभाईंच्या व्यग्र कार्यक्रमांमुळे त्यांना त्यावेळी उपस्थित राहता आले नव्हते. नुकतेच सत्संगाच्या कार्यक्रमासाठी पूज्य राकेशभाई सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात आले होते. त्यावेळी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.
विविध क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या प्रभावशाली व्यक्तींना सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. याआधी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, अण्णा हजारे, माजी पोलिस अधिकारी डॉ. किरण बेदी, योगगुरु बाबा रामदेव, ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर, अभिनेत्री डॉ. वैजयंतीमाला, उदित नारायण, शंकर महादेवन आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याला अनेक सन्माननीय व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात, असेही डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.

‘एक सूर एक ताल’ सांगीतिक कार्यक्रम ‘युवक बिरादरी’तर्फे १९ ते २१ ऑगस्टला

0
पुणे : युवक बिरादरी आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ ते २१ ऑगस्ट रोजी ‘एक सूर एक ताल’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोथरूड येथील एमआयाटी कॅम्पसमधील स्वामी विवेकानंद सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात १९ आणि २० ऑगस्ट या दोन दिवशी विद्यार्थ्यांना आसामी, पंजाबी, कन्नड, मराठी, तामिळ, बंगाली, गुजराती, हिंदी आदी भाषांतील गाणी गाण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. २१ ऑगस्ट रोजी सहभागी विद्यार्थ्यांची रंगीत तालीम व अंतिम सादरीकरण होईल. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, भूपेन हजारिका आणि केशवसुत या प्रसिद्ध व्यक्तींनी लिहिलेल्या गाण्यांचा यात समावेश असणार आहे, असे माहिती प्रा. कल्याणी बेलसरे यांनी दिली.
अशा सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करणारी युवक बिरादरी ही भारतातली एकमेव संस्था आहे. गुवाहाटी, दिल्ली, लखनौ आणि भारतातील इतर अनेक ठिकाणी ‘एक सूर एक ताल’चे सादरीकरण होते. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेकांनी याचे कौतुक केले आहे. या सांगीतिक कार्यक्रमातून मानवी मूल्ये जपणे, बंधुत्वाची भावना जागृत करणे, सामाजिक-सांस्कृतिक संहितेचे पालन करणे, तरुणांमध्ये नैतिक जबाबदारीची जाणीव करून देणे अशा गोष्टींचा समावेश आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध भाषांतील गायन शिकवले जाते. सुसंवाद, बंधुता, शांती, सेवा यांची भावना त्यात निर्माण होऊन सामाजिक विषयांवर जागरूकता वाढते, असे बेलसरे यांनी सांगितले.

केजे ट्रिनिटी शिक्षण संस्थेतर्फे पूरग्रस्तांना मदत

0

पुणे : कोल्हापूर, सांगलीतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी येवलेवाडी येथील केजेज ट्रिनिटी शिक्षण संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू, कपडे, शालेय साहित्य आदी मदत पाठविण्यात आली. संस्थेच्या सर्वच महाविद्यालयातील आणि शाळेतील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाकडून ही मदत गोळा करण्यात आली होती. कायम सामाजिक बांधिलकीची भावना जपणाऱ्या केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी, प्राचार्य, विभागप्रमुख, विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मदत साहित्य गोळा करण्यात पुढाकार घेतला.

भारतीय विद्या भवनमध्ये रंगली मराठी -हिंदी लोकसंगीताची मैफल !

0
गवळण, कव्वाली, जोगवा, कोळीगीत आणि सुरेल शिवार गीतांची बरसात
 
पुणे ः‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत     ‘सुरभी  ‘ या मराठी -हिंदी लोकसंगीताच्या  मैफलीचे आयोजन करण्यात आले होते  .   हा कार्यक्रम दि. १६ ऑगस्ट २०१९ रोजी , शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, (सेनापती बापट रस्ता) येथे रसिकांच्या जोरदार प्रतिसादात पार पडला . 
 
‘अरुणिमा’ प्रस्तुत या कार्यक्रमात  लोकसंगीतावर आधारित मराठी -हिंदी चित्रपट गीतांच्या विविध   रचना सादर करण्यात आल्या .शेफाली साकुरीकर ,केतन गोडबोले ,अरुणा अनगळ यांनी त्या गायल्या. तर राजेंद्र हसबनीस ,नरेंद्र काळे ,ओंकार पाटणकर यांनी साथसंगत केली .‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले 
 
‘ अरे संसार संसार ‘ या बहिणाबाईंच्या काव्याने मैफलीला सुरवात झाली. ‘ जाऊ देवाचिया गावा ‘ या अभंगाने रसिकांची मने जिंकली. ‘ मी डोलकर ‘ या कोळीगीताने वाहवा मिळवली.
‘ केसरिया बालमा ‘, ‘मोरनी बागा मां बोले ‘ ही लोकसंगीतावर आधारित हिंदी गीतेही साजरी करण्यात आली.
 
  ‘ गोऱ्या गोऱ्या गालावरी ‘ हे नवराई गीत ,’ आभाळाच्या मांडवाला भुईची रं आण, भेगाळल्या काळजाचं दान’ ही मनाला भिडणारी  स्वरचित रचना,   ‘ देवा तू पाठीराखा ‘ अशासारखी शिवार गीतेही  अरुणा अनगळ यांनी सादर केली.
 त्यांनी सादर केली.
 
‘ अरे कान्हा ‘ ही गवळण,
पंजाबी ढंगाच्या देशभक्तीपर गीत ‘ रंग दे बसंती चोला ‘ च्या तालावर उपस्थितांनी ठेका धरला. भोजपुरीतील ‘ पान खाये सैंय्या हमारो ‘ ही नौटंकी गीत, ‘ चढता सुरज धीरे धीरे ‘ ही कव्वाली  , ‘ जाळीमंदी पिकली करवंदं ‘  , ‘ गं साजणी ‘  या लावण्या तसेच’आईचा जोगवा ‘ही    दाद मिळवून गेले. ‘ मिले सूर मेरा तुम्हारा ‘ ने सांगता झाली
 
 . ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ८२ वा हा कार्यक्रम विनामूल्य होता.