Home Blog Page 278

अभिनेता डिनो मोरियाच्या घरावर ED चा छापा

मुंबई-बॉलीवूड अभिनेता डिनो मोरिया पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. मिठी नदी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी महाराष्ट्रातील त्याच्या घरावर छापा टाकला. हा घोटाळा राज्यातील नद्या स्वच्छ करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित आहे. अभिनेत्याव्यतिरिक्त, बीएमसीचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे आणि अनेक कंत्राटदारांच्या जागेवर छापे टाकण्यात आले आहेत.

यापूर्वी, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) डिनो मोरियाची दोनदा चौकशी केली आहे. या प्रकरणात EOW ने सुरुवातीचा एफआयआर दाखल केला होता, त्यानंतर ईडीने आता मनी लाँड्रिंगच्या दृष्टिकोनातून तपास अधिक तीव्र केला आहे.

प्रत्यक्षात, मिठी नदीची स्वच्छता मुंबई महानगरपालिकेने केली होती. यासाठी गाळ पुशर आणि ड्रेजिंग मशीन वापरण्यात आल्या होत्या. कोची येथील कंपनी मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून मोठ्या प्रमाणात मशीन खरेदी करण्यात आल्या होत्या.

या प्रकरणाच्या चौकशीत असे दिसून आले की केतन कदम आणि जय जोशी यांनी मॅटप्रॉप कंपनीचे अधिकारी आणि बीएमसीच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून स्वच्छतेच्या नावाखाली ६५ कोटी रुपयांचा घोटाळा केला.

घोटाळ्यातील मुख्य आरोपी केतन कदम यांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी केली असता, अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाची नावे समोर आली. दोघांनीही केतन कदमशी अनेक वेळा बोलणे केले होते. तपास अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की डिनो मोरिया आणि केतन हे केवळ मित्र नाहीत तर त्यांच्यात पैशाचे व्यवहार देखील असू शकतात. यामुळेच तपासाच्या कक्षेत दिनोची चौकशी केली जात आहे.

नेटफ्लिक्सवरील ‘द रॉयल्स’ या मालिकेत नवाब सलाउद्दीनच्या भूमिकेमुळे डिनो मोरिया चर्चेत आहे. येत्या काळात तो मल्टीस्टारर चित्रपट ‘हाऊसफुल ५’ मध्ये दिसणार आहे. डिनो मोरियाने १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याला खरी ओळख २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राज’ या चित्रपटातून मिळाली.

व्यवस्थेचा बळी ठरलेल्या कुटुंबीयांच्या हस्ते लाल महालात ३५१ वा शिवराजाभिषेक सोहळा साजरा.

पुणे-

कुठल्याही प्रकारच्या सेलिब्रिटी अथवा मान्यवर व्यक्तींना न बोलावता पहलगाम हल्यात शहीद झालेल्या जगदाळे कुटुंबीय, गणबोटे कुटुंबीय, हुंडाबळी प्रकरणातील बळी ठरलेली स्मृतीशेष वैष्णवी हगवने यांच्या कुटुंबातील सदस्य या सर्वांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना अभिषेक करण्यात आला. राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर येथील श्री शिवाजी वैदिक विद्यालयातून अभ्यास करून महंत कैलास वडघुले कुमारी स्वरा धुमाळ यांनी राज्याभिषेक विधी संपन्न झाला. या प्रसंगी शस्त्र पूजन, धान्य पूजन, फळांचे पूजन, जगद्गुरु संत तुकाराम महाराज्यांच्या गाथेचे पूजन, छत्रपती शिवरायांच्या नित्य वापरात वापरत असलेल्या कवड्याच्या माळीचे पूजन, शिवमुद्रेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी शिल्पकार सौ.सुप्रिया शेखर शिंदे, ॲड.प्राजक्ता मोरे, पत्रकार चंद्रकांत फुंदे यांना शिवसन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आखिल भारतीय शिवजन्मोत्सव समितीचे विकास पासलकर यांनी प्रास्ताविक केले पासलकर म्हणाले व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या या कुटुंबातील सदस्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा संदेश शिवराज्याभिषकाच्या निमित्ताने देण्याचा प्रयत्न आम्ही आखिल भारतीय शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून करत आहोत. शिवराजाभिषेकासाठी मोहन जोशी, माधव जगताप, संदीप कदम, राजेंद्र डुबल, संदीप खलाटे, निलेश निकम, मारुतराव सातपुते, रमेश गुजर तसेच मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निलेश इंगवले, अक्षय रणपिसे, सचिन जोशी, मंदार बहिरट, रोहित ढमाले, युवराज ढवळे यांनी परिश्रम घेतले
सूत्र संचालन विराज तावरे यांनी केले तर प्रशांत धुमाळ यांनी आभार मानले.

अमित ठाकरे गोड मुलगा, त्याच्या भूमिकेचे काका म्हणून स्वागत- खासदार संजय राऊत

मुंबई- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत. त्यामुळे युती विषयी चर्चा करायची असेल, तर त्यांनी एकमेकांना फोन करावा, असा सल्ला अमित ठाकरे यांनी दिला होता. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरे हा गोड मुलगा आहे. त्याच्या जन्मापासून मी त्याला पाहतोय. त्याचा काका म्हणून त्यांच्या भूमिकेचे मी स्वागत करत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांच्या युती बाबत नेते सकारात्मक असल्यामुळेच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत आदित्य ठाकरे किंवा अमित ठाकरे काय म्हणताय, त्यापेक्षा या दोघांच्या जन्माच्या आधीपासून ते भाऊ आहेत. त्यामुळे कोण कधी कोणाला फोन करतो? याबाबत बोलण्यापेक्षा थोडी प्रतीक्षा करा, तुम्हाला फळ दिसेल, असा सल्ला देखील राऊत यांनी केला आहे.

या दोघांच्या युती बाबत तुम्हाला फळ दिसेल. मी दहा मिनिटांनी फोन करतो, हे सांगून फोन करण्याची आवश्यकता नाही. त्या दोघांमध्ये फोनवर बोलणेही झाले असेल? तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल. काही दिवसात झाडाला फळे देखील येतील. त्यामुळे एवढ्या लवकर फळे कशी आली? असा प्रश्न तुम्ही उपस्थित करतात, असे देखील राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.

राज ठाकरे यांना संजय राऊत यांनी त्यांचे पुस्तक भेट म्हणून पाठवले होते. त्यावर आलेल्या प्रतिक्रियांना देखील राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. मी राज ठाकरे यांच्या घरी देखील जाईल. आमच्यासाठी तो कॅफे नाही तर आमच्यासाठी तर दुसरे घर असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला असेल, तर याची तुम्हाला काय माहिती? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.

भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडण्याची अट उद्धव ठाकरे यांच्या वतीने राज ठाकरे यांना घालण्यात आली होती. यावरुन मनसे नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडणार का? असा प्रश्न ठाकरे गटाला विचारला होता. यावरही राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्राचे शत्रू नाहीत. ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या पाठीवर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी घाव घातले आहेत. तसे घाव काँग्रेस, राष्ट्रवादीने घातलेले आम्हाला दिसले नाहीत. हे राज ठाकरे यांना देखील मान्य असेल. त्यामुळे भविष्यात एका टेबलावर चर्चा होऊ शकते, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारची गाडी खिळखिळी झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी जर गाडी चालवली असेल तर गाडीचा अपघात करुन मी कशी उडी मारून पुढे जाईल, असा विचार त्यांच्या मनात असेल. तर देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मी गाडी ताब्यात कशी घेईल, याचा विचार सुरु असेल. तर दोघेही बाहेर पडल्यानंतर सीट वरती उडू मारून मी ड्रायव्हिंग सीट कसे ताब्यात घेईल, असे पाठीमागे बसलेला नेता म्हणजे अजित पवार यांच्या मनात सुरु असेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी महायुती वर निशाणा साधला आहे.

कर्ज स्वस्त होऊ शकते, EMI देखील कमी होईल:RBI ने व्याजदर 0.50% ने कमी करून 5.50% केला

मुंबई-रिझर्व्ह बँकेने (RBI) व्याजदर ०.५०% ने कमी करून ५.५०% केला आहे. याचा अर्थ असा की येत्या काळात कर्जे स्वस्त होऊ शकतात. तुमचा EMI देखील कमी होईल.आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी आज ६ जून रोजी सकाळी १० वाजता चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या निर्णयांची माहिती दिली. ही बैठक ४ जून रोजी सुरू झाली.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर ६.५% वरून ६.२५% पर्यंत कमी करण्यात आले. ही कपात सुमारे ५ वर्षांनी चलनविषयक धोरण समितीने केली. त्यानंतर एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीतही व्याजदर ०.२५% ने कमी करण्यात आला. आता तिसऱ्यांदा दर कमी करण्यात आला आहे. म्हणजेच, चलनविषयक धोरण समितीने तीन वेळा व्याजदर १% ने कमी केला आहे.

रेपो दरात कपात झाल्यानंतर, बँका गृहनिर्माण आणि वाहन यासारख्या कर्जांवरील व्याजदर देखील कमी करू शकतात. व्याजदर कमी केल्यास घरांची मागणी वाढेल. अधिक लोक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकतील. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळेल.

आरबीआय बँकांना ज्या व्याजदराने कर्ज देते त्याला रेपो रेट म्हणतात. रेपो रेट कमी झाल्यामुळे बँकांना कमी व्याजदराने कर्ज मिळेल. जेव्हा बँकांना स्वस्त दरात कर्ज मिळते तेव्हा ते बहुतेकदा त्याचा फायदा ग्राहकांना देतात. म्हणजेच बँका त्यांचे व्याजदर देखील कमी करतात.

कोणत्याही मध्यवर्ती बँकेकडे महागाईशी लढण्यासाठी पॉलिसी रेटच्या स्वरूपात एक शक्तिशाली साधन असते. जेव्हा महागाई खूप जास्त असते, तेव्हा मध्यवर्ती बँक पॉलिसी रेट वाढवून अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कमी करण्याचा प्रयत्न करते.

जर पॉलिसी रेट जास्त असेल तर बँकांना मध्यवर्ती बँकेकडून मिळणारे कर्ज महाग होईल. त्या बदल्यात बँका त्यांच्या ग्राहकांसाठी कर्जे महाग करतात. यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कमी होतो. जेव्हा पैशाचा प्रवाह कमी होतो तेव्हा मागणी कमी होते आणि चलनवाढ कमी होते.

त्याचप्रमाणे, जेव्हा अर्थव्यवस्था वाईट काळातून जाते, तेव्हा पुनर्प्राप्तीसाठी पैशाचा प्रवाह वाढवणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत, मध्यवर्ती बँक पॉलिसी दर कमी करते. यामुळे बँकांना मध्यवर्ती बँकेकडून मिळणारे कर्ज स्वस्त होते आणि ग्राहकांनाही स्वस्त दराने कर्ज मिळते.

चलनविषयक धोरण समितीमध्ये ६ सदस्य असतात. त्यापैकी ३ सदस्य आरबीआयचे असतात, तर उर्वरित सदस्यांची नियुक्ती केंद्र सरकार करते. आरबीआयची बैठक दर दोन महिन्यांनी होते.

अलीकडेच, रिझर्व्ह बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकांचे वेळापत्रक जाहीर केले होते. या आर्थिक वर्षात एकूण ६ बैठका होतील. पहिली बैठक ७-९ एप्रिल रोजी होत आहे.

ज्युनिपरने महाराष्ट्रातील चपळगाव येथे 145.99 MWp सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला

पूर्ण क्षमतेने प्रकल्प निर्धारित व्यवसायिक कार्यान्वयन तारखेच्या 19 महिन्यांपूर्वी कार्यान्वित करण्यात आला

नवी दिल्ली/मुंबई — ज्युनिपर ग्रीन एनर्जीने चपळगाव, महाराष्ट्र येथील 145.99 MWp / 100 MW क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या वेळेपूर्वी यशस्वी कार्यान्वयनाची घोषणा केली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) ला वीजपुरवठा करणार आहे. प्रकल्पाची कार्यान्वयन तारीख 22 मे 2025 असून, ही निर्धारित व्यवसायिक कार्यान्वयन तारखेच्या 19 महिन्यांपूर्वी आणि विद्युत खरेदी करार (PPA) 7 मार्च 2025 रोजी साइन झाल्यानंतर केवळ 2.5 महिन्यांतच पूर्ण करण्यात आला आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यापासून 145.99 MWp या पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील.

हा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे, ज्युनिपर ग्रीन एनर्जीचा अक्षय ऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने कार्यान्वित करण्याची क्षमता याचे उत्तम उदाहरण आहे. वेळेत प्रकल्प विकसित करण्याची आमची रणनीती आम्हाला निर्धारित वेळेपेक्षा आधी प्रकल्प पूर्ण करून स्वच्छ ऊर्जा ग्रीडमध्ये जोडण्यास सक्षम करते. वेळीच जमीन संपादन आणि साइट डेव्हलपमेंट, तांत्रिक व पर्यावरणीय तपासणी, ग्रीड कनेक्शनसाठी आवश्यक परवाने, ट्रान्समिशन लाइनची तयारी, तसेच पायाभूत सुविधांची उपलब्धता, यामुळे संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडते आणि आमच्या यशामध्ये मोलाची भर घालते,” असे ज्युनिपर ग्रीन एनर्जीचे CEO अंकुश मलिक यांनी सांगितले.

ज्युनिपर ग्रीन एनर्जीच्या पुढाकार घेणाऱ्या दृष्टिकोनामुळे ते निर्धारित वेळेआधी उच्च दर्जाचे प्रकल्प पूर्ण करण्यात यशस्वी ठरतात, ज्यामुळे भारताच्या ग्रीड विश्वसनीयतेला आणि अक्षय ऊर्जा लक्ष्यांना पाठबळ मिळते.

About Juniper Green Energy

Juniper Green Energy is an independent renewable energy power producer in India, focused on the development, construction and operations of utility-scale solar, wind, and hybrid renewable energy projects. It is headquartered in Delhi NCR Since October 2018; the company has grown its operational capacity to [1.3 GWp as of May 31, 2025] With expertise spanning the entire project lifecycle – from initial concept to construction and development across India – Juniper Green Energy provides energy solutions and undertakes large-scale projects, thus playing a role in India’s shift towards clean energy.

Juniper Green Energy is a part of the AT Capital Group, a globally diversified investment group based in Singapore. AT Capital Group focuses on sectors including Renewable Energy, Residential and Commercial Real Estate, and Hospitality, with a presence in India, the GCC, Europe, and the United States. Within India, the group also operates Experion Developers, a real estate company, and Experion Capital, a Non-Banking Financial Company (NBFC) that specialises in financing real estate and infrastructure projects.

पार्किंगच्या वादातून बेदम मारहाण;बालाजीनगरच्या कोठारी बंधुंसह तिघांना अटक

0

पुणे-मोटार पार्किंगच्या वादातून तरूणाला बेदम मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील २५ हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेणार्‍या टोळीला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना धनकवडीतील काशिनाथ पाटील नगरात घडली होती. बबलु विवेक कोठारी (वय ३०, रा. बालाजीनगर, धनकवडी ) लोकेश विवेक कोठारी (वय २१) आणि शाम चांदेकर (वय २१ रा. धनकवडी ) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी थेरगावमध्ये राहणार्‍या तरुणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण थेरगावमधील असून, ३ जूनला रात्री पावणेअकराच्या सुमारास धनकवडीतील बालाजीनगरात आले होते. त्याठिकाणी मोटार पार्क करीत असताना टोळक्याने त्यांच्यासोबत हुज्जत घातली. त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील २५ हजारांची सोन्याची चैन चोरून नेली होती. घटनेची माहिती मिळताच, सहकारनगर पोलिसांनी तातडीने तपासाला गती दिली. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील पुढील तपास करीत आहेत.

पर्यटकांना शनिवारवाड्याचा भव्यदिव्य अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील-केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत

खासदार मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने शनिवारवाड्याची पाहणी, वृक्षारोपण

पुणे: “मध्यकालीन भारताच्या इतिहासात योगदान असलेल्या शनिवारवाड्याचे स्थान महत्वाचे आहे. ही वास्तू पुण्याची, पेशवाईची ओळख आहे. दरवर्षी लाखो पर्यटक शनिवारवाड्याला भेट देतात. इथे येणाऱ्या पर्यटकांना शनिवारवाड्याचा भव्यदिव्य अनुभव देण्यासाठी पुरातत्व विभागाच्या नियमांच्या अधीन राहून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी गुरुवारी केले.

पुण्याचे वैभव, ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या शनिवारवाड्याला गजेंद्रसिंह शेखावत यांनी भेट देऊन पाहणी केली. राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने या भेटीचे आयोजन केले होते. प्रसंगी शेखावत यांच्या हस्ते बहुभाषिक स्मार्ट डिजिटल ऑडिओ गाईड ऍपचे उद्घाटन, तसेच, शनिवारवाड्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पुरातत्व विभागाच्या संचालक श्रीलक्ष्मी, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवा, शनिवारवाडा संवर्धनासाठी कार्यरत किरण कलमदानी, उदय कुलकर्णी, पल्लवी गोखले, इतिहास अभ्यासक डॉ. गणेश राऊत आदी उपस्थित होते.

गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यानंतर पेशवाई आणि पुण्याचे योगदान व त्याचा नावलौकिक देशभरात आहे. त्यामुळे ही केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून, समृद्ध इतिहासाचा अनमोल ठेवा आहे. पर्यटकांना येथील इतिहास सहजपणे समजून घेता यावा, पर्यटन अधिक सुकर व्हावे, यासाठी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यासह इतर इतिहास अभ्यासकांनी व शनिवारवाडा संवर्धन कार्यात योगदान देणाऱ्या लोकांनी माझ्याकडे काही प्रस्ताव दिले आहेत. शनिवारवाड्याचे विविध पैलू, त्याचे महत्व समजून घेतले. त्यावर विचार करून, पुरातत्व विभागाशी समन्वय साधून येथे सोयीसुविधा उभारण्यासाठी प्रयत्न करेन. आज उद्घाटन झालेल्या ऑडिओ गाईडमुळे पर्यटकांना शनिवारवाड्याचा इतिहास ध्वनिस्वरूपात समजून घेता येईल.”

“ही संरक्षित वास्तू असल्याने इथे सुधारणा करण्यावर बरीच बंधने आहेत. मूळ साच्यामध्ये फेरबदल करता येत नाही. यासह अन्य काही अडचणी असल्याने ऐतिहासिक संरक्षित वास्तूंमध्ये पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधा तयार करण्यात अडचणी येतात. तरीही यातून मार्ग काढून या पर्यटनस्थळाचा अनुभव चांगल्या पद्धतीने कसा घेता येईल, यावर उपाययोजना करणार आहोत. संरक्षित वास्तूच्या १०० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करता येत नाही, तर २०० मीटर परिसरात काही काम करायचे असल्यास कायद्याने परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शक्य होईल, त्या सुविधा उपलब्ध करून देऊ,” असेही त्यांनी नमूद केले.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “भारताच्या इतिहासात पुण्याला आणि शनिवारवाड्याला अनन्यसाधारण महत्व आहे. पेशवा बाजीराव यांच्यासह पेशवाईतील इतर अनेकांचा जाज्वल्य इतिहास येथे येणाऱ्या पर्यटकांना माहिती व्हावा, शनिवारवाड्याचे वैभव काय होते, हे प्रतिकृतीच्या माध्यमातून का होईना, पर्यटकांना दाखवण्यासाठी उभारण्याची गरज आहे. त्यासाठी मंत्री महोदय, तसेच पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करत आहे. गणपती महाल, मूळ सात मजली शनिवारवाडा व अन्य प्रसंग, छायाचित्रांचे दालन अशा गोष्टी येथे उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”

ड्रीम वर्क्स रिअल्टर्सकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दीर्घकालीन बांधिलकीसह अनोखी वृक्षारोपण मोहीम

0

पुणे : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, ड्रीम वर्क्स रिअल्टर्सने बालेवाडी येथे एक अनोखी आणि दीर्घकालीन वृक्षारोपण मोहीम राबवली. “रुटींग फॅार ग्रीनर टुमारो” (Rooting for a Greener Tomorrow) या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम केवळ प्रतिकात्मक नसून, पर्यावरणीय शाश्वततेसाठी एक ठोस पाऊल आहे.सदर कार्यक्रम माजी नगरसेवक अमोल बालवडकर, कामगार नेते जालिंदर बालवडकर, दिलीप बालवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व ड्रीम वर्क्स रिअल्टर्स परिवाराच्या सहभागातून संपन्न झाला.

या मोहिमेअंतर्गत १०० हून अधिक झाडांची लागवड करण्यात आली असून, प्रत्येक झाड दोन कर्मचाऱ्यांच्या जोडीकडे सुपूर्त करण्यात आले आहे. प्रत्येक झाडाला एक वैयक्तिक नाव देण्यात आले असून, जलरोधक फलकासह त्याचे दस्ताऐवजीकरणही करण्यात आले आहे. ही अभिनव संकल्पना कर्मचाऱ्यांमध्ये निसर्गाशी नातं निर्माण करते, तसेच दीर्घकालीन जबाबदारीची भावना वाढवते.

ड्रीम वर्क्स रिअल्टर्सने या उपक्रमासाठी कार्यविभागाची स्पष्ट रचना आखली आहे. नियमित पाणीपुरवठा आणि पर्यावरणीय सहाय्य कंपनीकडून करण्यात येणार असून, खत व्यवस्थापन आणि झाडांची आरोग्य तपासणी ही जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर असेल. प्रत्येक रोपाची वाढ आणि जोपासना ही दीर्घकालीन पद्धतीने केली जाणार आहे.

कार्यक्रमात बोलताना ड्रीम वर्क्स रिअल्टर्सचे संचालक श्री. नरेंद्र बालवडकर यांनी सांगितले, “आमची दृष्टी केवळ भौतिक विकासापुरती मर्यादित नाही, तर पर्यावरणीय समतोल राखण्याचीही आमची तितकीच बांधिलकी आहे. हा उपक्रम म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी ड्रीम वर्क्स रिअल्टर्सने घेतलेली सजग आणि दीर्घकालीन जबाबदारी आहे.””

या उपक्रमात कंपनीचे कर्मचारी, पर्यावरणप्रेमी नागरिक आणि स्थानिक रहिवासी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. ड्रीम वर्क्स रिअल्टर्सने याच्या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्राने शाश्वत शहरी विकासात पुढाकार घेण्याचा एक सकारात्मक संदेश दिला आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपळे निलखमध्ये ‘हरित क्रांती’ची सुरुवात

आम आदमी पार्टी चे युवक शहरध्यक्ष रविराज काळे यांच्या पुढाकाराने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्यातून वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार…..

पिंपरी चिंचवड – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपळे निलख परिसरात हरित क्रांतीची प्रेरणादायी सुरुवात करण्यात आली. “वृक्ष रुपी हिरवी ओळख” या संकल्पनेतून आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या पुढाकाराने व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या सहकार्यातून वृक्षारोपण उपक्रम पार पडला.

या उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, उद्यान अधिक्षक योगेश वाळूंज,सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड, उद्यान सहाय्यक अनिल गायकवाड, तसेच पिंपळे निलख व विशालनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या उपक्रमात विविध प्रकारचे स्थानिक वृक्ष लावून परिसराला हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. नागरिकांचा सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता, हा उपक्रम भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

रविराज काळे यांनी यावेळी सांगितले की, “हिरवे पर्यावरण ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावण्याचा आणि त्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला पाहिजे.”

या उपक्रमामुळे पिंपळे निलखमध्ये एक नवे हरित पर्व सुरू झाले असून, हीच झाडं उद्याच्या हरित भविष्यासाठी आधारस्तंभ ठरणार आहेत.

संगमवाडी ते बंडगार्डन पूल ते मुंढवा पूल नदी किनारी स्वदेशी वृक्षांचे रोपण सुरु

पुणे-आज दि. ०५/०६/२०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सदर ठिकाणी पुणे महानगरपालिकेमार्फत वृक्ष रोपणाच्या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अति. महापालिका आयुक्त (इस्टेट) पृथ्वीराज बी.पी. उपस्थित होते.

पुणे शहरातून मुळा, मुठा व मुळा मुठा नदीचा एकात्मिक पद्धतीने विकास करणे करीता पुणे महानगरपालिकेच्या नदी पुनरुज्जीवनप्रकल्प राबविणेत येत आहे. पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा व मुळा-मुठा या नद्यांची एकूण लांबी ४४.४० कि. मी. आहे.
संगमवाडी ते बंडगार्डन पूल (स्ट्रेच-९) या ३.७ कि.मी. लांबीचे काम व बंडगार्डन पूल ते मुंडवा पूल (स्ट्रेच-१० व ११) या ५.३ कि.मी. असे एकूण ९.० कि.मी. पर्यंत काम प्रगती पथावर आहे.
स्ट्रेच -९ मध्ये शादलबाबा दर्गा ते गणेश घाट या दरम्यान ३०० मी. नदीकाठ सुधारणेच्या प्रकल्पाचे काम पुर्ण झाले असून, स्ट्रेच-१० व ११ मध्ये कोरेगांव पार्क येथे ८०० मी. लांबीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
संगमवाडी ते बंडगार्डन पूल (स्ट्रेच-९) व बंडगार्डन पूल ते मुंढवा पूल (स्ट्रेच-१० व ११) मध्ये प्रामुख्याने सुभाबूळ, कुभाबूळ व काटेरीबाभूळ, विलायती चिंच प्रजातीमधील झाडे काढून सदर ठिकाणी विदेशी प्रजाती ऐवजी स्वदेशी रोपे नियोजन बध्द पध्दतीने लावण्यात येणार आहे.
नवीन लागवड करण्यात येणाऱ्या झाडांची नावे पुढील प्रमाणे :-
करंज, मेढसिंगी, कांचन, कदंम्ब, साग, मुचकुंद, रक्तरोहिडा, पिंपळ, कैलासपती, बकुळ, काळाकुडा, पानजांभूळ इ. फुले येणारी झाडे.
आंबा, जांभूळ, गुलार, पुत्रवंति, भोकर, खिरणी, अर्जुन, आसन, चिरंजी इ. फळझाडे जी पक्षांसाठी उपयोगी आहेत.
घोळ, अर्जुन, आंबा, खिरणी इ. पक्षांना घरटी बांधण्यासाठी उपयुक्त अशी झाडे.
लिंब, कदम्ब, जांभूळ, आंबा, बड इ. मोठी झाडे सावलीसाठी लावण्यात येत आहेत .नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा अंतर्गत सुमारे १० ते १५ फुट उंचीची १२५० रोपे लावण्यात आली आहेत. तसेच सदर १२५० रोपांपैकी ८५० रोपे वन विभागाच्या जागेमध्ये, १५० रोपे येरवडा जेल या ठिकाणी व उर्वरीत २५० रोपे संगमवाडी पूल ते कल्याणीनगर पूल दरम्यान नदी सुधार प्रकल्पामधील Promenade, Gabion याठिकाणी लावणेत आलेली आहे.
यापूर्वी देखील पुणे महानगरपालिकेमार्फत स्वदेशी ५००० रोपांची लागवड आजमिती पर्यंत केलेली आहे. यापैकी ४००० झाडे संरक्षण विभागाच्या जागेमध्ये, ५०० आड़े आर्मी स्पोर्ट विभागाच्या जागेमध्ये व उर्वरीत आहे नदी सुधार प्रकल्पामधील Promenade, Gabion याठिकाणी लावणेत आलेली आहेत.


धुळ्यातील माजी खासदार डी. एस. अहिरे आणि कॉंग्रेस, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे – अजित पवार

मुंबई दि. ५ जून – शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर त्यांचे विचार कधी आपण विसरु शकत नाही. हा देश अनेक धर्म, पंथ, भाषांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे एकसंघ राहिलेला आहे हे स्पष्ट करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.

धुळे जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई के. सी. कॉलेज सभागृह झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

महिलांना मोठया प्रमाणात संधी देताना समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आहे. सन २०२९ मध्ये आपल्या महाराष्ट्रातून ९६ महिला या खास आरक्षित जागेतून आमदार होणार आहेत तसेच देशात खासदारांच्या ५४३ जागा असून तिथेही वन थर्ड महिला खासदार होणार आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी दिली त्या संधीचे त्यांनी सोनं केले आहे. ज्या देशाने पुरुषाबरोबर महिलांना वागणूक दिली आणि संधी दिली, मानसन्मान दिला ते देश जगात पुढे आहेत असेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.

आमच्या पक्षात नवा – जुना वाद नाही. ज्याच्यामध्ये कर्तृत्व, नेतृत्व आहे. ज्याच्यामध्ये समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे त्याला संधी मिळाली पाहिजे असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

धुळ्यातील माजी खासदार डी. एस. अहिरे, सिंदखेडचे काँग्रेस तालुकाध्यक्ष शामकांत सनेर, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनिल नेरकर, काँग्रेस किसान सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत भामरे, धुळे महानगरपालिकेचे माजी सभापती हरिश्चंद्र वाघ, धुळे जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत सैंदाणे, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अबीद पठाण आदी प्रमुख नेत्यांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी माजी मंत्री अनिल पाटील, पक्षाचे कोषाध्यक्ष आणि आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, माजी आमदार शरद पाटील, नाशिक म्हाडाचे माजी अध्यक्ष किरण शिंदे, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया उपस्थित होते.

इंडियनऑइल यूटीटी सीझन ६: पीबीजी पुणे जॅग्वार्सचा दणदणीत विजय; कोलकाता थंडरब्लेड्सवर १०-५ अशी मात

या हंगामातील सर्व २३ सामने स्टार स्पोर्ट्स खेल आणि स्टार स्पोर्ट्स २ तमिळवर प्रसारित केल्या जातील आणि जिओहॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केल्या जातील.

अहमदाबाद: पीबीजी पुणे जॅग्वार्सने इंडियनऑइल यूटीटी सीझन ६ च्या लढतीत कोलकाता थंडरब्लेड्सचा १०-५ असा पराभव केला. यूटीटीच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स खेल आणि स्टार स्पोर्ट्स २ तमिळवर प्रसारित केले जातील आणि देशभरातील चाहत्यांसाठी जिओहॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केले जातील.

टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (टीटीएफआय) च्या नेतृत्वाखाली आयोजित आणि निरज बजाज व विटा दानी यांनी प्रमोट केलेले, इंडियनऑइल यूटीटी एक प्रमुख व्यावसायिक लीग म्हणून वाढत आहे. १६ दिवसांत, सर्व २३ सामने अहमदाबादच्या EKA Arena येथे होतील आणि तिकिटे फक्त बुकमायशोवर उपलब्ध असतील.

अल्वारो रोबल्सने आंतरराष्ट्रीय हेवीवेट्स आणि इंडियनऑइल यूटीटीच्या दिग्गज खेळाडूंमधील एका रोमांचक लढतीत क्वाद्री अरुणाला हरवून पीबीजी पुणे जॅग्वार्सला आदर्श सुरुवात करून दिली. त्याने तीनही गेम गोल्डन पॉइंट्सवर जिंकून हंगामातील त्याचा पहिला एकेरी विजय मिळवला. एकाच इंडियनऑइल यूटीटी मोहिमेत दोनदा असा दुर्मिळ पराक्रम पहिल्यांदाच घडला. त्यानंतर दिना मेश्रेफने अॅड्रियाना डियाझवर २-१ असा जोरदार विजय मिळवला आणि तिचा पहिल्या लीग विजयाची नोंद केली. अनिर्बान घोषसोबत जोडीने मिश्र दुहेरीत २-१ असा विजय मिळवून पुण्याला सामन्यावर लवकर नियंत्रण मिळवून दिले.

कोलकाता थंडरब्लेड्सने युवा स्टार अंकुर भट्टाचार्जीच्या सहाय्याने प्रत्युत्तर दिले, ज्याने दुसऱ्या पुरुष एकेरीत अनिर्बानला पराभूत केले. अनिर्बनने अंतिम गेम जिंकून अंकुरला पूर्ण स्वीप देण्यापासून रोखले. हा एक महत्त्वाचा गुण होता ज्यामुळे पुणे पुढे राहिले आणि कोलकाताला बरोबरी साधण्यापासून रोखले. त्यानंतर रीथ रिश्याने सेलेना सेल्वाकुमारला ३-० असे हरवून बरोबरी साधली.

अंतिम स्कोअर

पीबीजी पुणे जॅग्वार्स वि. वि. १०-५ कोलकाता थंडरब्लेड्स

अल्वारो रोबल्स वि. वि. क्वाद्री अरुणा २-१ ( १०-११, ११-१०, ११-१०)

दिना मेश्रीफ वि. वि. ॲड्रियाना डायझ २-१ (११-८, १-११, ११-१०)

अनिर्बन घोष/दीना मेश्रेफ वि. वि. अंकुर भट्टाचार्जी/एड्रियाना डायझ २-१ ( ११-९, ११-९ , ७-११)

अनिर्बन घोष पराभूत वि. अंकुर भट्टाचार्जी १-२ ( ८-११, ७-११, ११-८ )

रीठ रिश्या वि. वि. सेलेना सेल्वाकुमार ३-० (११-९, ११-८, ११-८)

अल्टिमेट टेबल टेनिस (UTT) बद्दल

२०१७ मध्ये अल्टिमेट टेबल टेनिस (UTT) ही भारतातील प्रमुख फ्रँचायझी-आधारित टेबल टेनिस लीग सुरू झाली. ही लीग नीरज बजाज आणि विटा दानी यांनी टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या संयुक्त विद्यमाने प्रमोट केली आहे. आज, UTT ही आठ संघांची स्पर्धा आहे ज्यामध्ये ४८ जागतिक दर्जाचे खेळाडू प्रतिष्ठित जेतेपदासाठी लढत आहेत. ही लीग भारत आणि जगभरातील अव्वल खेळाडू आणि प्रशिक्षकांना आकर्षित करत आहे. या खेळाडूंमध्ये ऑलिंपिक, आशियाई आणि राष्ट्रकुल खेळातील पदक विजेते आहेत. UTT राष्ट्रीय रँकिंग स्पर्धा, टेबल टेनिस सुपर लीग प्रायोजित करून आणि देशातील WTT स्पर्धांचे सह-आयोजित करून देखील या खेळाला प्रोत्साहन देते. प्रत्येक आवृत्तीसह, UTT जागतिक टेबल टेनिसमधील प्रमुख स्पर्धा म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे, खेळाची प्रतिष्ठा उंचावत आहे आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत आहे.

अजूनही स्वप्नीच असे ते … शिवाजीनगर बस स्टॅन्ड

पीपीपी मॉडेलपोटी रखडले शिवाजीनगर बस स्टॅन्ड, यात कुणाचे हितसंबंध?पुण्यातील शिवाजीनगर बस स्टॅन्ड अद्यापही हवेतच!अजून साधा करारही नाही.

पुणे-मेट्रो स्टेशन बांधण्याच्या कारणास्तव शिवाजीनगर बस स्टॅन्ड पाडण्यात आले आणि तात्पुरते स्टॅन्ड जुन्या पुणे मुंबई हायवे वर हलवण्यात आले आता त्याला तब्बल पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. या मेट्रो स्टेशन संदर्भात महा मेट्रो आणि एसटी महामंडळ यांच्यामधील करारा सुद्धा सहा वर्ष झाली आहे. ही सर्व दिरंगाई केवळ व्यापारी संकुलावर डोळा ठेवणाऱ्या काही हितसंबंधी लोकांमुळेच होते आहे असा आरोप आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

पूर्वीच्या शिवाजीनगर बस स्थानकाची जमीन मेट्रो ने वापरली त्या बदल्यात नवीन बस स्थानक बांधून देण्याचे पूर्वीच्या करारात ठरले होते. परंतु मध्यवर्ती भागातील मोक्याची जागा व्यापारी उद्देशासाठी वापरता येईल या कारणास्तव याचे बांधकाम पुढे झाले नाही. याबाबतही नव्याने करार करणे अपेक्षित होते. 2023 मध्ये शशी प्रभू आर्किटेक्ट यांचे कडून एसटी स्थापत्य विभागाने नकाशे मागवले व त्यानुसार बांधकाम केले जाईल असे एसटी महामंडळाच्या विद्या बिलारकर यांनी सांगितले होते. परंतु त्यात पुन्हा अडकाठी केली गेली व आता मेट्रो हे बांधकाम करेल असे ठरवण्यात आले. या संदर्भात स्थानिक आमदार शिरोळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अनेकदा मोठ्या घोषणा केल्या.

परंतु आजअखेर यासंदर्भात कुठलाही करार झालेला नाही तसेच कुठलाही अधिकृत बांधकाम नकाशा तयार केला नाही अशी स्पष्ट माहिती पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी भेटीत दिल्याचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
या जागेवरती व्यापारी संकुल बांधण्यात अनेकांना रस असल्यामुळेच पुणेकरांचे, बाहेरगावच्या प्रवाशांचे हाल झाले तरी चालतील , विलंब झाला तरी चालेल असे धोरण राबवले जात आहे असा आरोप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खुलासा करावा अशी मागणी आम आदमी पार्टी ने केली आहे.

रामजी … परमनंटच्या समस्या परमनंट नाहीश्या कराल काय ? महापौर संघटनेकडून अपेक्षा

0

पुणे- पुण्याच्या माजी महापौरांच्या संघटनेने महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त नवल किशोर राम यांना मोठं कठीण कोडं घातलं आहे. महापौर संघटनेच्या वतीने आज आयुक्त नवल किशोर राम यांचे अभिनंदन तर करण्यात आलेच पण त्यांना असेही म्हटले आहेकी, शहराच्या कायम असलेल्या समस्या तुम्हालाही ठाऊक आहेतच तुम्ही त्यांचा कायमचा बंदोबस्त कसा कार्ल हे जरा स्पष्ट कराल काय ?आणि कायमचा बंदोबस्त करू शकाल काय ?

माजी महापौर संघटनेचे राजलक्ष्मी भोसले,कमल व्यवहारे,अंकुश काकडे,मुरलीधर मोहोळ,बंदना चव्हाण,बाळासाहेब शिवरकर
,शांतीलाल सुरतवाला,दत्तात्रय गायकवाड,दिप्ती चवधरी, दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप असे मान्यवर सभासद आणि पदाधिकारी आहेत . यांच्या वतीने आज काही माजी महापौरांनी आयुक्तांची भेट घेतली .त्यांनी यावेळी आयुक्तांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे कि,’

सर्व प्रथम आपले आमच्या संघटनेतर्फे मनःपूर्वक अभिनंदन. या पूर्वी पुणे जिल्हाधिकारी म्हणून आपण काम केले आहे. त्यामुळे पुणे शहराची आपणांस ओळख आहेच,
आम्ही आपणांस शहरातील काही महत्वाचे प्रश्नांकडे लक्ष वेधू इच्छितो.
१) पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत, त्यावर तात्पुरती कारवाई होते, यासाठी कायम स्वरूपी योजना तयार करणे,
२) अनधिकृत स्टॉल्स, फेरीवाले हे मोठ्या संख्येने झाले आहेत, त्या संदर्भात कारवाई करणे,
३) पुणे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, याकडे गांभीयनि लक्ष द्यावे.
४) पावसाचे पाणी अनेक ठिकाणी तुंबते त्याचा निचरा होत नाही, त्यासाठी उपाय योजना करणे,
५) पुणे शहरातील वाहतूक समस्या अतिशय गंभीर झाली आहे, त्यासाठी वाहतूक नियोजन या पदावर तज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी.
६) शहरात लावले जाणारे अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर या संदर्भात कडक कारवाई करावी, ज्यांचे नावाने बोर्ड असतील त्यांचेवर फौजदारी कारवाई करावी.
या काही महत्वाच्या बाबी आम्ही आपल्या नजरेस आणू इच्छितो. सविस्तर चर्चा निश्चित
करू. आमच्या संघटनेचे आपणांस सदैव सहकार्य राहील.

मोदी सरकारमध्ये नव्या पाणबुड्यांना अजूनही मंजुरी का नाही ?

काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा घणाघात
   
पुणे- काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ म्हणाले ,’ धक्कादायक बाब म्हणजे भारतीय नौदलाकडे असलेल्या एकूण पाणबुड्यांपैकी जवळपास १५  पाणबुड्यांचे आयुष्य हे आता केवळ ७ ते ८ वर्षापर्यंतच मर्यादित आहे. याशिवाय ३ ते ४ पाणबुड्या पुढील ५ वर्षात निवृत्त कराव्या लागतील अशा अवस्थेपर्यंत पोहोचल्या आहेत. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून एकही पाणबुडी निर्मिती वा खरेदीचा निर्णय घेतलेला नाही, हे खरे
आहे का? याचा खुलासा मोदी सरकार का करीत नाही असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.
 
 
भयानक म्हणजे, २०२३ च्या जुलैमध्ये पंतप्रधान मोदींच्या फ्रांसभेटीनंतर ३ स्कॉर्पीन प्रकारच्या पाणबुड्यांचा करार झाल्याचे मोदी सरकारतर्फे घोषितही केले गेले होते. ३० हजार कोटीच्या माझगाव डॉक सोबत झालेल्या करारास वर्ष उलटले तरीही  केंद्रीय अर्थ खात्याने अजूनही मंजुरी
दिलेली नाही, हे ही खरे की खोटे ? याचा खुलासा मोदी सरकारने करावा अशी मागणीही गाडगीळ यांनी केली आहे.

 
प्रचाराचा भपका करण्यात तरबेज असलेल्या मोदींच्या थाळी सरकारमध्ये सीमेचे रक्षण करणाऱ्या सैन्याच्या युद्धसामुग्रीसाठी वर्षानुवर्षे मंजुरीच मिळत नाही हे वरीलबाबीतून सिद्ध होते अशी खरमरीत टीका गाडगीळ यांनी केली आहे.
 
स्व. इंदिराजींच्या सरकारच्या काळात बॅ. विठ्ठलराव गाडगीळ संरक्षण उत्पादन मंत्री असताना अवघ्या २ वर्षात माझगाव डॉकने ३ फ्रिगेट्स व १ पाणबुडीचे जलावतरण केले होते याकडेही अनंत गाडगीळ यांनी लक्ष वेधले आहे.