Home Blog Page 2127

आयुक्त 22 फेब्रुवारी ला सादर करणार अंदाजपत्रक!

0
पुणे : महापालिकेचे वर्ष 2022-23 चे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार 22 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता सादर करणार आहेत. नियमानुसार आयुक्तांनी 15 जानेवारी पर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक असते. मात्र महापालिका निवडणुकीच्या कामकाजामुळे आयुक्तांनी हा अवधी वाढवून मागितला आहे. तसा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समिती समोर ठेवला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ९५ नुसार महानगरपालिकेचे महसूली, भांडवली इ. उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक आराखडा (“अ” व “क’) अंदाजपत्रक १५ जानेवारी अगर तत्पूर्वी स्थायी समितीस सादर करणे आवश्यक आहे. त्यांनतर स्थायी समिती अध्यक्ष त्यात बदल करून बजेट मुख्य सभेला सादर करतात. मुख्य सभेत चर्चा होऊन हे बजेट 31 मार्च पूर्वी मंजूर होणे आवश्यक असते. त्यांनतर त्यावर अंमल करता येतो. दरम्यान महापालिका आयुक्तांनी बजेट सादर करण्याची तयारी सुरु केली होती. सर्व विभागाकडून आयुक्तांनी याबाबतची माहिती मागवली होती. मात्र महापालिका निवडणूक तोंडावर आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करण्याचा अवधी वाढवून मागितला आहे. त्यानुसार वर्ष 2022-23 चे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार 22 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता सादर करणार आहेत. तसा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समिती समोर ठेवला आहे. 

विक्रांतच्या पुढील सागरी चाचण्यांना सुरुवात

0

नवी दिल्ली- भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती – अशा उच्चपदस्थांच्या सलग दोन भेटीनंतर केवळ दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत आयएसी विक्रांतच्या पुढील समुद्री चाचण्या सुरु करण्यात येत आहेत.  दोन्ही मान्यवरांनी तिच्या प्रगतीचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले आणि प्रकल्पाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. नौकेची गती, दिशादर्शक प्रणाली आणि मूलभूत ऑपरेशन्स या कार्याचे परीक्षण करण्यासाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या पहिल्या सागरी चाचण्या यशस्वी झाल्या होत्या, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या  दुसऱ्या सागरी चाचणीमध्ये विविध यंत्रसामग्रीच्या चाचण्या आणि उड्डाण चाचण्यांच्या वेळीही जहाजाच्या गतीच्या चाचण्या करण्यात आल्या.  दुसर्‍या चढाईच्या वेळी जहाजाने 10 दिवस गोदीबाहेर राहून आपल्या कार्यक्षमतेने प्रदर्शन केले.  दुसऱ्या चाचणी दरम्यान नौवहन विषयक विविध सागरी कामगिरी देखील यशस्वीरित्या पूर्ण केल्या.  जहाजाच्या क्षमतेवर पुरेसा आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर, आयएसी विक्रांतची,  आता विविध आव्हानात्मक  परिस्थितींमध्ये जहाज कसे कार्य करते याची चाचपणी  केली जाणार आहे. आहे.  याशिवाय जहाजाच्या विविध सेन्सर सूट्सचेही परीक्षणही होणार आहे.

आयएसी विक्रांत अनेक चाचण्यांमध्ये यशस्वी ठरले आहे.  आत्मनिर्भरता  असो, ज्याअंतर्गत 76% उपकरणे स्वदेशात तयार केली जातात किंवा भारतीय नौदल आणि मेसर्स कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या डिझाईन टीम्समधील समन्वय– आतापर्यंतची देशी बनावटीची ही सर्वात मोठी आणि आणि किचकट युद्धनौका आहे.  भारतीय युद्धनौका बांधणीच्या इतिहासात हे जहाज त्याच्या पहिल्याच चाचणीपासूनच मूलभूत कौशल्याच्या बाबतीत सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.  देशातील कोविडचा वाढता संसर्ग  आणि परिणामी आलेली आव्हाने असतांनाही, प्रकल्पाशी संबंधित अनेक संस्थांचे एकत्रित समूह, कार्य वेळेवर पूर्ण करण्यासाठी उत्साही  आणि वचनबद्ध होते.  सागरी चाचण्यांची मालिका यशस्वीपणे पूर्ण केल्यावर, या वर्षाच्या शेवटी,  स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत, जहाज आयएनएस विक्रांत कार्यान्वित केले जाणार आहे.

जे.जे. रुग्णालयात डॉक्टर आणि ज्येष्ठांना प्रतिबंधात्मक मात्रा

0

मुंबई, दि. 10: आजपासून राज्यातील डॉक्टर, परिचारिका यांच्याबरोबरच आरोग्य कर्मचारी, कोविड काळात आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि साठ वर्षे वयावरील सहव्याधीग्रस्त यांना प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येणार आहे. आज सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत जे.जे. रुग्णालयात या प्रतिबंधात्मक मात्रा देण्याच्या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी जे.जे. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, लसीकरण प्रमुख डॉ.ललित संखे यांच्यासह डॉक्टर आणि जे.जे. रुग्‍णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिबंधात्मक मात्रा दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांच्यासह आरोग्य कर्मचारी याबरोबरच 60 वर्षावरील सहव्याधीग्रस्त यांना प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येणार आहे

4 न्यायाधीश कोरोना पॉझिटिव्ह, 150 कर्मचारीही बाधित

0

नवी दिल्ली-

सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींना कोरोनाची लागण झाल्याची संख्या 4 झाली आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयातील अनेक कर्मचारीही या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे की, निवृत्त होत असलेल्या एका न्यायाधीशाच्या फेयरवेल पार्टीमध्ये हे संक्रमण पसरले आहे.

3000 मधून 150 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट आहे पॉझिटिव्ह
ANI न्यूज एजेंसीच्या रिपोर्टनुसार, सुप्रीम कोर्टात 3000 कर्मचारी आहेत. यामधून 150 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट आतापर्यंत पॉझिटिव्ह आला आहे. CJI एनव्ही रमन्नासह 32 न्यायाधीशांमधून चार न्यायाधिश कोविड पॉझिटिव्ह झाल्याने आता येथे पॉझिटिव्हिटी रेट 12.5% झाला आहे.

3 जानेवारीपासून स्टार्ट केली होती व्हर्चुअल हियरिंग
दिल्लीत कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एनव्ही रामण्णा यांनी 2 जानेवारी रोजी केवळ व्हर्चुअल हियरिंगच्या माध्यमातूनच प्रकरणांची सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते. ही व्यवस्था 3 जानेवारीपासून पुढील दोन आठवड्यांसाठी लागू करण्यात आली होती. यादरम्यान न्यायाधीशांना त्यांच्या घरूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यास सांगण्यात आले होते. ही सर्व कसरत न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी करण्यात आली होती.

दिल्लीमध्ये 60 हजारांपेक्षा जास्त केस
दिल्लीमध्ये सलग नवीन प्रकरणे वाढत आहेत. रविवारी 22,751 नवीन प्रकरणे सापडली. तर शनिवारी 20,181 नवीन प्रकरणे मिळाली होती. नॅशनल कॅपिटलमध्ये रविवारी 10,179 रुग्ण बरे देखील झाले. मात्र कोरोनामुळे 17 लोकांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. आता राज्यात एकूण 60,733अॅक्टिव्ह केस झाल्या आहेत. दिल्लीमध्ये पॉझिटिव्ह रेट देखील वाढून 24% पोहोचला आहे.

देशात नव्या रुग्णांची संख्या पोहोचली 1.80 लाखांवर; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही कोरोनाची लागण

0

नवी दिल्ली -केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. ट्विटमध्ये त्याने असेही लिहिले की, जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनी स्वतःला आयसोलेट करावे आणि ताबडतोब चाचणी करावी.

दरम्यान, देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सलग चौथ्या दिवशी दररोज 1 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तिसऱ्या लाटेत प्रथमच दररोज नवीन रुग्णांची संख्या 1.80 लाखांवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत संसर्गाचे 1 लाख 79 हजार 554 नवीन रुग्ण आढळले असून 146 जणांचा मृत्यू झाला आहे. 46,441 लोक बरे झाले आहेत. सकारात्मकता दर 13.29% वर गेला आहे.

यापूर्वी, शनिवारी देशात 1 लाख 59 हजार तर शुक्रवारी 1 लाख 41 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली होती. देशात आतापर्यंत 3.57 कोटी लोकांना या महामारीचा फटका बसला आहे. यापैकी 3.44 कोटींहून अधिक लोक बरे झाले आहेत. सध्या देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाख 84 हजार 580 आहे. या महामारीमुळे आतापर्यंत 4,83,935 लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात 2 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 2 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 3 दिवसांनंतर नवीन प्रकरणांमध्ये 4% ची घट झाली असली तरी, महाराष्ट्रात पॉझिटिव्ह केसेस (44,388 नवीन रुग्ण) अजूनही वाढत आहेत. दिल्ली (22,751 नवीन प्रकरणे) आणि पश्चिम बंगाल (24,287 नवीन प्रकरणे) मध्येही नवीन प्रकरणे वेगाने वाढत आहेत.

कोविड विरोधात लढ्यासाठी पुन्हा एकदा सज्ज:बीव्हीजी इंडिया लिमिटेड

0

·         भारतातील पहिला असा प्रकल्प ज्यामध्ये रुग्णवाहिकेतील रुग्णाला प्रशिक्षित डॉक्टरांकडून देखभाल सेवा मिळते

·         २०१४ मध्ये सुरुवात झाल्यापासून डिसेंबर २०२१ पर्यंत बीव्हीजी एमईएमएसने ६७.७० लाखांहून जास्त रुग्णांना सेवा पुरवल्या आहेत. 

·         महामारी सुरु झाल्यापासून बीव्हीजी एमईएमएसने ५.९० लाखांहून जास्त कोविड-१९ रुग्णांना सेवा पुरवल्या आहेत.

·         ३७६०० पेक्षा जास्त यशस्वी बाळंतपणांमध्ये बीव्हीजी एमईएमएसच्या डॉक्टरांनी रुग्णवाहिकांमध्ये सेवा पुरवल्या आहेत. 

·         बीव्हीजी एमईएमएसकडे तब्बल ९३७ पेक्षा जास्त रुग्णवाहिका आणि ३० बाईक फर्स्ट रिस्पॉन्स वाहनांचा ताफा आहे.

पुणे१० जानेवारी २०२२: महाराष्ट्रामध्ये आणीबाणी वैद्यकीय सेवा (एमईएमएस) व्यवस्थापन करणाऱ्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड या आघाडीच्या कंपनीने महामारी आणि कोविडच्या केसेसमध्ये होत असलेल्या वाढीचा मुकाबला करण्यासाठी जागतिक दर्जाच्या आणीबाणी प्रतिसाद सेवा आणि एमईएमएस १०८ टोल-फ्री रुग्णवाहिका सेवांसह आपण पूर्णपणे सज्ज असल्याची घोषणा केली आहे. महामारीच्या संपूर्ण कालावधीत बीव्हीजीच्या एमईएमएस आणि १०८ टोल-फ्री रुग्णवाहिका सेवांचे लाभ महाराष्ट्रातील लाखो लोकांना मिळाले.  २०१४ मध्ये सुरुवात झाल्यापासून डिसेंबर २०२१ पर्यंत या कंपनीने ६७.७० लाखांहून जास्त रुग्णांना सेवा पुरवल्या आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या सहयोगाने चालवली जाणारी बीव्हीजीची रुग्णवाहिका सेवा हा भारतातील पहिला प्रकल्प आहे ज्यामध्ये रुग्णवाहिकेतील रुग्णाला आवश्यक त्या सर्व योग्यता असलेल्या डॉक्टरकडून देखभाल सेवा पुरवल्या जातात. भारतातील बीव्हीजीव्यतिरिक्त इतर रुग्णवाहिकांमध्ये फक्त पॅरामेडिक कर्मचारी उपलब्ध असतात. रुग्णवाहिकांमध्ये पात्रप्रशिक्षित डॉक्टरांनी रुग्णांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. याच्याच बळावर महामारीच्या काळात बीव्हीजी एमईएमएसने ५.९० लाखांहून जास्त कोविड-१९ रुग्णांना सेवा पुरवल्या आहेत आणि बीव्हीजी एमईएमएस डॉक्टरांनी रुग्णवाहिकांमध्ये कराव्या लागलेल्या ३७६०० पेक्षा जास्त यशस्वी प्रसूतींमध्ये मोलाची मदत पुरवली आहे.

कोविड-१९ महामारीच्या काळात पुरवलेल्या प्रतिसाद सेवा आणि आणिबाणीमध्ये असलेल्या रुग्णांसाठी असलेली आरोग्य यंत्रणेची सुसज्जता यामध्ये बीव्हीजी एमईएमएसने यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्राचे माननीय कॅबिनेट आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. जनता प्रचंड घाबरलेली होती आणि लोक आपापल्या घरांमध्ये सुरक्षित राहण्यालाच सर्वाधिक प्राधान्य देत होते अशा काळात १०८ रुग्णवाहिका सातत्याने धावत होत्या आणि गरजू रुग्णांना अथक सेवा पुरवत होत्या असे कौतुकोद्गार त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहेत.

बीव्हीजी एमईएमएस टीमकडून दिला गेलेला प्रतिसाद कौतुकास्पद आणि तत्पर होता असे खास नमूद करत श्री. टोपे यांनी म्हटले आहेरुग्णवाहिकांमध्ये काम करणारे डॉक्टर्स आणि पायलट्स यांच्यासह ३१० पेक्षा जास्त आणीबाणी प्रोफेशनल्सना कोविड-१९ चा संसर्ग झाला पण तब्येत बरी झाल्यानंतर ही संपूर्ण टीम रुग्णसेवेमध्ये पुन्हा दाखल झाली.  ही बाब अतिशय वाखाणण्याजोगी आहे.  मानवतेच्या जाणिवेतून समाजाची सेवा करण्याच्या व्रताचे पुरेपूर पालन ही टीम करत आहे.”    

बीव्हीजी इंडियाने पुण्यातील औंध चेस्ट हॉस्पिटल येथून २४/७ संचालित केला जाणारा महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षीअत्याधुनिकजागतिक दर्जाचा एमईएमएस उपक्रम हाती घेतला आहे. राज्यभरातील सर्व मोबाईल आणि लँडलाईन क्रमांकांवरून १०८ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येतो. या एमईएमएस सेवा यंत्रणेमध्ये ४२०० पेक्षा जास्त ईएमएस व्यावसायिकांना तैनात करण्यात आले आहे. मानवतेच्या नात्याने लोकांची सेवा करण्याची महान संधी त्यांना लाभत आहे. एमईएमएसमुळे महाराष्ट्रातील ग्रामीणडोंगरी आणि आदिवासी भागांमध्ये आरोग्यसेवा सुविधा पुरवल्या जाण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर (सीएमडी) श्री. हणमंतराव रामदास गायकवाड यांनी सांगितलेरुग्णवाहिकेमध्ये प्रशिक्षित डॉक्टर्स असले पाहिजेत हे धोरण भारतात सर्वात पहिल्यांदा बीव्हीजी इंडियाने अवलंबिले आणि त्यामुळे आम्हाला रुग्णांची अधिक चांगल्या पद्धतीने सेवा करण्यात तसेच प्रशिक्षण व ज्ञान व्यवस्थापनामध्ये उत्कृष्टतेचे नवे मापदंड निर्माण करण्यात मदत मिळाली.  अनेक मौल्यवान जीव वाचवण्याबरोबरीनेचआणीबाणीच्या काळात केल्या जाणाऱ्या देखभालीच्या बाबतीत ईएमएस उपचार नियम ठरवणारे आणि त्यांचे पालन करणारे भारतातील पहिले राज्य ही ओळख महाराष्ट्राला मिळवून देण्यात आणि महाराष्ट्र ईएमएसचे मॅन्युअल तयार करण्यात देखील आम्ही मदत करू शकलो.”  

एकात्मक नॅशनल हेल्थ मिशन (एनएचएम) स्थापन केल्यानंतर आणीबाणीच्या सेवांच्या उद्योगात २०१३ ते २०२१ या आर्थिक वर्षांमध्ये २५.८% सीएजीआरने वाढ झाली आहे आणि आर्थिक वर्ष २०२१ मध्ये याचा मार्केट आकार ३२.८ बिलियन रुपये झाला आहे.

बीव्हीजीने महाराष्ट्रातील ईएमएससाठी अतिशय यशस्वी आणि अनोखे संचालन मॉडेल तयार केले आहे.  जागतिक दर्जाची उपकरणे (डिफिब्रिलेटर आणि ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर – जर्मनीमेडिकल ग्रेड ऑक्सिजन डिलिव्हरी सिस्टिम – स्पेन)मेडिकल ग्रेड ऑक्सिजन डिलिव्हरी यंत्रणा असलेली देशातील पहिली रुग्णवाहिका आणि एआरएआयने प्रमाणित केलेली होमोलोगेटेड रुग्णवाहिका.  

ईआरसीच्या संदर्भात बीव्हीजी एमईएमएसकडे अत्याधुनिक कंट्रोल रूम आहे, इतर विभागांसोबत अखंडित एकात्मीकरण करण्यात आले आहे, प्रत्येक रुग्णवाहिकेसाठी ५ रुग्णवाहिकांचा बॅक-अप आहे, घटना नेमकी कुठे घडली आहे ते अचूक ओळखता यावे यासाठी मॅपवर डायनामिक डिस्प्ले सुविधा आहे आणि एमईएमएस डॅशबोर्डवर सरकारी अधिकाऱ्यांना वास्तविक माहिती सहजपणे मिळू शकते. 

बीव्हीजी इंडिया ही भारतातील एक सर्वात मोठी एकात्मिक सुविधा व्यवस्थापन सेवा कंपनी आहे. या कंपनीत ५४००० पेक्षा जास्त कर्मचारी (जून २०२१ च्या आकडेवारीनुसार) असून आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीने १३० पेक्षा जास्त शहरांमधील ३५ पेक्षा जास्त क्षेत्रांमधील ५८२ ग्राहकांना सेवा पुरवल्या आहेत.  औद्योगिक आणि ग्राहक क्षेत्र, वाहतूक आणि दळणवळण पायाभूत सोयीसुविधा क्षेत्र, रुग्णालये व आरोग्यसेवा क्षेत्र आणि सरकारी आस्थापना अशा विविध क्षेत्रांतील ग्राहकांना बीव्हीजी आपल्या सेवा पुरवते. बीव्हीजी ही भारतातील धार्मिक संस्थांना सेवा पुरवणाऱ्या मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे.  (माहिती स्रोत: एफअँडएस रिपोर्ट) आपल्या एकात्मिक सेवा व्यवसायांतर्गत बीव्हीजीने २०१९ मध्ये रेल्वे स्थानक व्यवस्थापन सेवा पुरवल्या. एकात्मिक सेवा आणि सुविधा व्यवस्थापन सेवांच्या बरोबरीने बीव्हीजी वैद्यकीय आणीबाणी आणि पोलीस आणीबाणीच्या काळात आणीबाणी प्रतिसाद सेवा तसेच कचरा व्यवस्थापन सेवा देखील पुरवते. आणीबाणी पोलीस प्रतिसाद सेवा पुरवण्यासाठी कंत्राट देण्यात आलेली बीव्हीजी ही भारतातील पहिली कंपनी आहे. (माहिती स्रोत: एफअँडएस रिपोर्ट) या सेवांच्या बरोबरीनेच बीव्हीजी सुविधा व्यवस्थापन प्रकल्पांची देखील अंमलबजावणी करते, ज्यामध्ये प्रामुख्याने गार्डनिंग आणि लँडस्केपिंग सेवांचा समावेश आहे. एकात्मिक सेवा उद्योगांतर्गत बीव्हीजीने औद्योगिक आणि ग्राहक क्षेत्रातील प्रमुख ग्राहकांना सेवा पुरवल्या आहेत. वाहतूक व दळणवळण पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रात बीव्हीजीच्या ग्राहकांमध्ये मेट्रो रेल लिमिटेड, महामार्ग व वाहतूक प्राधिकरणे यांचा समावेश होतो. या कंपनीने विविध महानगरांमधील १६ वेगवेगळ्या विमानतळांना देखील सेवा पुरवल्या आहेत. रुग्णालये आणि आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये त्यांच्या ग्राहकांमध्ये विविध शहरांमधील सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे. 

बीव्हीजी ही भारतातील पहिली कंपनी आहे जिला आणीबाणी पोलीस प्रतिसाद सेवा पुरवण्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे, हा देशातील अतिशय अनोखा प्रकल्प आहे. आणीबाणी प्रतिसाद सेवा उद्योगक्षेत्रात सेवा प्रदान करणारी बीव्हीजी ही आघाडीची कंपनी आहे. ३० जून २०२१ च्या आकडेवारीनुसार १४०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका आणि ३० बाईक रुग्णवाहिकांच्या ताफ्यासह ही कंपनी महाराष्ट्र आणि जम्मू व काश्मीरमध्ये कार्यरत आहे. डिफिब्रिलेटर्स, रक्तदाबावर लक्ष ठेवणारे उपकरण, पल्स ऑक्सिमेट्री आणि मेडिकल ग्रेड ऑक्सिजन पुरवणारी यंत्रणा यांच्यासह सुसज्ज असलेली पहिली रुग्णवाहिका बीव्हीजीने सादर केली आणि डॉक्टरांसह रुग्णवाहिका सादर करणारी ही भारतातील पहिली कंपनी आहे. ३० जून २०२१ पर्यंत या कंपनीने ३३.१५ मिलियनपेक्षा जास्त (३.३२ कोटी) कॉल्सना प्रतिसाद दिला असून आणीबाणीत असलेल्या तब्बल ७.५६ मिलियन (७५.६ लाख) रुग्णांना सेवा पुरवल्या आहेत. फेब्रुवारी २०१४ ते जून २०२१ या कालावधीत बीव्हीजीने आणीबाणीमुळे रुग्णवाहिकांमध्ये कराव्या लागलेल्या ३७००० हुन जास्त प्रसूतींमध्ये मदत पुरवली आहे. बीव्हीजीच्या होमोलोगेटेड रुग्णवाहिकांना ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (एआरएआय) प्रमाणित केले आहे. महाराष्ट्रामध्ये बीव्हीजीकडून पुरवल्या जाणाऱ्या रुग्णवाहिका जागतिक दर्जाच्या उपकरणांसह सुसज्ज आहेत आणि प्रत्येक रुग्णवाहिकेसोबत विशेष डॉक्टर्स उपलब्ध असलेले हे देशातील एकमेव राज्य आहे. कंपनी आपल्या स्वतःच्या माहिती तंत्रज्ञान पायाभूत सोयीसुविधांसह कमांड सेंटर सेवा पुरवते. बीव्हीजी ही भारतातील एकमेव अशी कंपनी आहे जी त्यांच्या आणीबाणी वैद्यकीय प्रतिसाद सेवांचा भाग म्हणून मूल्यवर्धित सेवा पुरवते, ज्यामध्ये त्यांच्या रुग्णवाहिकांमध्ये वैद्यकीय कर्मचारी तैनात करण्याचा समावेश होतो तसेच ही कंपनी महाराष्ट्रातील आदिवासी समुदायांना नियतकालिक मूलभूत आरोग्य तपासणी सुविधा प्रदान करते.

महाराष्ट्रात, बीव्हीजी एमईएमएस सेवा अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ याठिकाणी उपलब्ध आहेत.   

मुंबई तसेच पालघर, गडचिरोली, अमरावती आणि सोलापूरमधील ग्रामीण भागांमध्ये प्रशिक्षित ईएमएस कर्मचाऱ्यांसह ३० बाईक आणीबाणी वैद्यकीय प्रथम प्रतिसाद वाहने तैनात करण्यात आली आहेत. १०८ कंट्रोल रूममध्ये कॉल आल्यानंतर सर्वात जवळचा बाईक आणीबाणी वैद्यकीय प्रथम प्रतिसादकर्ता आणि रुग्णवाहिका यांना पाठवले जाते.  बाईक आणीबाणी वैद्यकीय प्रथम प्रतिसादकर्त्याकडे ट्रॉमा किट, मेडिकल किट, एयरवे मॅनेजमेंट किट आणि डिलिव्हरी किट अशी चार किट्स असतात. मेडिकल किटमध्ये अड्रेनलाईन, एट्रॉपाईन, फ्र्युस्माईड, इन्हेलर्स अशी आणीबाणीच्या वेळी वापरली जाणारी औषधे असतात.  स्ट्रोक, हृदयाचा धक्का, अस्थमा अशी कोणतीही वैद्यकीय आणीबाणी उद्भवलेली असल्यास त्यांचा उपयोग होतो. ट्रॉमा किटमध्ये एअर स्प्लिंट्सपासून फ्रॅक्चर झालेले असल्यास त्या भागाला तात्पुरते स्थिर करण्यासाठी लागणारी उपकरणे, विविध प्रकारची बँडेजेस, अँटी-सेप्टिक आणि एनलजेसिक स्प्रे इत्यादी सर्व साधनसामग्री असते. एअरवे किटमध्ये वयस्क व्यक्ती, लहान मुले आणि नवजात बालकांना कृत्रीम श्वासोच्छवास देण्यासाठी एएमबीयू बॅग्स, ऑक्सिजन सिलिंडर, एअरवेज, सक्शन मशीन असतात ज्यामुळे श्वास घेण्यात अडथळा येत असलेल्या आणि बेशुद्ध रुग्णांना मदत पुरवता येते. डिलिव्हरी किटमध्ये हातमोजे, गाऊन, नाळ कापण्यासाठी वापरली जाणारी कैची, चिमटे इत्यादी वस्तू असतात, आणीबाणीच्या परिस्थितीत जर घरीच प्रसूती करावी लागली तर त्यांचा उपयोग होतो. 

डिसेंबर 2021 मध्ये न्यूज ऑन एअर च्या श्रोतृवर्गात 2 दशलक्षने वाढ

0

नवी दिल्‍ली, 10 जानेवारी 2022

प्रसार भारती श्रोता संशोधन चमूद्वारे रेडिओच्या जगात प्रथमच श्रोत्यांची संख्या पूर्णपणे मोजली जात आहे. न्यूज ऑन एअर अॅपवरील आकाशवाणीच्या थेट प्रसारण सेवा श्रोतृवर्गात एका महिन्याच्या कालावधीत 2 दशलक्ष ची वाढ झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये 18 दशलक्ष श्रोत्यांनी NewsOnAir अॅपमध्ये ट्यून केले, तर नोव्हेंबरमध्ये ही संख्या 16 दशलक्ष होती.

न्यूज ऑन एअर अॅपवरील आकाशवाणीच्या थेट प्रसारण सेवा श्रोतृवर्गात शहरानुसार वर्गवारी करायची झाल्यास पुणे, बेंगळुरू, इंदूर आणि नागपूरमध्ये श्रोतेसंख्या प्रतिमाह दशलक्षांमध्ये आहे, तर पाटणा, लखनौ आणि दिल्ली एनसीआरमध्ये ती एक दशलक्ष पर्यंत आहे.

भारतातील शीर्ष शहरांच्या नवीनतम क्रमवारीत जेथे न्यूज ऑन एअर अॅपवरील आकाशवाणीची थेट प्रसारण सेवा सर्वाधिक लोकप्रिय आहे, तिथे जयपूरने एर्नाकुलमला मागे टाकून प्रथम स्थानी पुनरागमन केले आहे.

भारतातील शीर्ष आकाशवाणी वाहिनींच्या क्रमवारीत झालेल्या मोठ्या बदलांमध्ये, एफएम रेनबो मुंबई ने पहिल्या 10 मध्ये स्थान पटकावले आहे, तर सातही दिवस अहोरात्र सेवा देणाऱ्या आकाशवाणीच्या  वृत्त वाहिनीने यादीतील स्थान गमावले आहे. आकाशवाणी पुणे 9 व्या स्थानावरून 3 ऱ्या स्थानावर पोहोचली आहे, तर AIR मल्याळम 3 व्या क्रमांकावरून 7 व्या स्थानावर घसरली आहे.

आकाशवाणीच्या 240 हून अधिक रेडिओ सेवा प्रसार भारतीच्या अधिकृत अॅप, न्यूजऑनएअर अॅपवर थेट-प्रसारित केल्या जातात. न्यूज ऑन एअर अॅपवरील आकाशवाणीच्या थेट प्रसारण सेवेचे श्रोते भारतातच नव्हे तर जगभरातील 85 हून अधिक देशांमध्ये मोठ्या संख्येने आहेत.

भारतातील शीर्ष शहरांवर एक नजर टाकली तर न्यूजऑनएअर अॅपवरील आकाशवाणीची थेट प्रसारण सेवा सर्वात लोकप्रिय आहे आणि शीर्ष 10 शहरांमध्ये मासिक श्रोतृवर्गाची संख्याही तुम्हाला पाहता येईल. तुम्ही भारतातील न्यूजऑनएअर अॅपवरील शीर्ष आकाशवाणीची थेट प्रसारण सेवा आणि त्याचे शहरानुसार विभाजन देखील पाहू शकता. ही क्रमवारी 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे.

NewsOnAir Monthly Listenership

MonthListenership
November 202116 Million
December 202118 Million

NewsOnAir Monthly Listenership in top 10 cities for December 2021

RankCityMonthly Listenership
1Pune1.4 Million
2Bengaluru1.2 Million
3Indore1.1 Million
4Nagpur1.1 Million
5Lucknow922.0 K
6Patna899.2 K
7Delhi NCR896.8 K
8Hyderabad801.3 K
9Jaipur715.2 K
10Mumbai709.2 K

NewsOnAir Top 10 Cities

RankCity
1Pune
2Bengaluru
3Hyderabad
4Delhi NCR
5Mumbai
6Chennai
7Lucknow
8Kolkata
9Ahmedabad
10Jaipur

NewsOnAir Top Streams in India

RankTop Stream
1Vividh Bharati National
2FM Gold Delhi
3AIR Pune
4Asmita Mumbai
5Rainbow Kannada Kaamanbilu
6FM Rainbow Mumbai
7AIR Malayalam
8FM Rainbow Delhi
9AIR Kochi FM Rainbow
10FM Gold Mumbai




NewsOnAir Top 10 AIR Streams – City-wise (India)

#PuneBengaluruHyderabadDelhi NCRMumbai
1Vividh Bharati NationalVividh Bharati NationalVividh Bharati NationalVividh Bharati NationalVividh Bharati National
2AIR PuneRainbow Kannada KaamanbiluFM Rainbow VijayawadaFM Gold DelhiAsmita Mumbai
3Asmita MumbaiVividh Bharati BengaluruAIR Hyderabad FM RainbowAIR News 24×7FM Rainbow Mumbai
4AIR Pune FMAIR MysuruAIR Hyderabad VBSFM Rainbow LucknowFM Gold Delhi
5FM Rainbow MumbaiAIR KannadaAIR TeluguAIR RaagamFM Gold Mumbai
6AIR JalgaonAIR DharwadAIR VijayawadaFM Rainbow DelhiAIR Pune
7AIR SangliAIR BengaluruAIR Visakhapatnam RainbowAIR LucknowAIR Pune FM
8AIR SolapurAIR KalburgiVBS VijayawadaAIR MathuraAIR Ahmednagar
9FM Gold MumbaiAIR HassanAIR Visakhapatnam PCFM Gold MumbaiAIR Mumbai VBS
10AIR AhmednagarFM Gold DelhiAIR Hyderabad AAIR ThrissurFM Rainbow Delhi
#ChennaiLucknowKolkataAhmedabadJaipur
1Vividh Bharati NationalVividh Bharati NationalVividh Bharati NationalVividh Bharati NationalVividh Bharati National
2AIR Chennai RainbowFM Gold DelhiAIR Kolkata GeetanjaliAIR GujratiFM Gold Delhi
3AIR KaraikalFM Rainbow LucknowAIR Kolkata RainbowAIR Rajkot PCAIR Jodhpur PC
4AIR KodaikanalAIR LucknowFM Gold DelhiFM Gold DelhiAIR Kota
5AIR TamilAIR News 24×7AIR Kolkata GoldAIR BhujAIR Jaipur PC
6Rainbow Kannada KaamanbiluAIR RaagamAIR SasaramVBS AhmedabadAIR Suratgarh
7AIR Chennai PCAIR VaranasiAIR BanglaAIR SuratAIR Bikaner
8AIR Chennai VBSAIR GorakhpurAIR BhaderwahAIR Rajkot VBSAIR Jodhpur Rainbow
9AIR Chennai FM GoldAIR PatnaFM Rainbow DelhiAIR VadodaraAIR Churu
10AIR MaduraiAIR FaizabadAIR News 24×7FM Rainbow DelhiAIR Udaipur PC


NewsOnAir Stream-wise City Rankings in India

#Vividh Bharati NationalFM Gold DelhiAIR PuneAsmita MumbaiRainbow Kannada Kaamanbilu
1PuneDelhi NCRPunePuneBengaluru
2Delhi NCRLucknowMumbaiMumbaiMysore
3BengaluruPuneBengaluruBhopalChennai
4LucknowBengaluruDelhi NCRAhmedabadMangalore
5AhmedabadMumbaiNagpurBengaluruErnakulam
6MumbaiKolkataAhmedabadThanePune
7HyderabadJaipurIndoreDombivliHyderabad
8KolkataAhmedabadThaneNagpurShimoga
9IndoreHyderabadDombivliDelhi NCRHubli
10JaipurShimlaKolhapurKalyanKochi
#FM Rainbow MumbaiAIR MalayalamFM Rainbow DelhiAIR Kochi FM RainbowFM Gold Mumbai
1PuneErnakulamDelhi NCRErnakulamPune
2MumbaiKochiPuneKochiMumbai
3BengaluruBengaluruMumbaiMalappuramDelhi NCR
4Delhi NCRTrivandrumKolkataBengaluruBengaluru
5ThaneThrissurBengaluruChennaiLucknow
6KolkataKollamAhmedabadThrissurAhmedabad
7LucknowChennaiAkolaKottayamJaipur
8AhmedabadKozhikodeHyderabadTrivandrumKolkata
9NagpurKottayamDehradunKozhikodeHyderabad
10JaipurMumbaiLucknowKollamIndore

मुंबईच्या “छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे” शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण

0

मुंबई, 10 जानेवारी 2022

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने 10 जानेवारी 2021 रोजी म्हणजेच आजच्या दिवशी  100व्या वर्षात पदार्पण केले आहे. ही फक्त वस्तुसंग्रहालयाच्या इतिहासातीलच नव्हे तर देशाच्या सांस्कृतिक चळवळीच्या दृष्टीने महत्वाची घटना आहे. या सर्व कालावधीत वस्तुसंग्रहालयाने देशाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याची जबाबदारी पार पाडण्यासंदर्भात प्रमुख भुमिका निभावली.

वस्तुसंग्रहालयाची निर्मिती ही जनतेची कल्पना

10 जानेवारी 1922 रोजी या वस्तुसंग्रहालाची दारे जनतेसाठी खुली झाली. या कल्पनेची रुजवात काही उत्साही नागरिकांनी केली ज्यांना त्यावेळच्या आर्थिक आघाडीवरील मुंबईला सांस्कृतिक ठेव्याचा नजराणा देण्याची इच्छा होती.

1904 या वर्षी मुंबई प्रांताच्या सरकारने अश्या तऱ्हेचा ठराव मंजूर केला  आणि मुंबईमध्ये सार्वजनिक वस्तुसंग्रहालय उभारण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यासाठी समिती स्थापन झाली.  सर फिरोजशा मेहता, सर इब्राहिम रहिमतुल्ला, आणि सर विठ्ठलदास ठाकरसी  या मुंबईतील मान्यवरांचा या समितीमध्ये समावेश होता.

कला आणि पुरातत्वशास्त्राचे वस्तुसंग्रहालय आणि विज्ञान तसेच निसर्गविज्ञान यांचे एकत्रित वस्तुसंग्रहालय असावे असा प्रस्ताव होता. हे वस्तुसंग्रहालय, त्याला भेट देणाऱ्यांसाठी विशेषतः मुले व युवकांना स्फुर्ती देणारे साधन ठरावे असा मानस समितीतील सदस्यांचा होता, म्हणूनच वस्तुसंग्रहालयाचे मुख्य उद्दिष्ट शैक्षणिक असावे असा उद्देश त्यांनी बाळगला.

संग्रह

ख्यातनाम पुरातत्वशास्त्रज्ञ हेन्री क्युझेन्स यांनी 1909 मध्ये उत्खनन केलेल्या मिरपुर्खस या बुद्धधर्माशी संबधित स्थळावरील मौल्यवान कलावस्तु या संग्रहालयातील महत्वाच्या संग्रहाचा भाग आहेत. शेठ पुरुषोत्तमदास मावजी यांचा पुराणवस्तुंचा व  चित्रांचा संग्रह विश्वस्तांनी 1915 साली खरेदी केला, याशिवाय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने मिळवलेल्या पुराणवस्तुंनी या संग्रहालयांच्या संग्रहाचे मोल वाढवले आहे. 1922 हे वर्ष सर रतन टाटा याच्या मृत्यूपत्राद्वारे मिळालेल्या संग्रहाने संस्मरणीय झाले. सर रतन टाटा यांनी केलेल्या विश्वकोषांचा संग्रह त्यांच्या यॉर्क, लंडन येथील घरामध्ये होता तो त्यांच्या मृत्यूपत्रातील इच्छेनुसार संग्रहालयाला प्रदान करण्यात आला. त्यानंतर 1933मध्ये दोराब टाटा यांचा संग्रहसुद्धा त्यांच्या मृत्यूपत्रानुसार संग्रहालयाला देण्यात आला. वस्त्रेप्रावरणे, शस्त्रे, पुतळे, चित्रे अश्या बेहतरीन भारतीय पुराणवस्तुंसोबतच युरोपियन, इस्टइंडियन आणि आग्नेय आशियाई कलांसंबधित वस्तुसुद्धा या अनमोल ठेव्याचा भाग होत्या.

गेल्या शतकात, संग्रहालयाच्या विस्तृत संग्रहात सुमारे 70,000 वस्तूंचा समावेश झाला आहे, ज्यात विशेषत: भारतीय उपखंडातील, अगदी प्रागैतिहासिक काळापासून ते वर्तमानापर्यंतच्या मानवी कथा सांगितल्या आहेत. खासगी संग्राहकांद्वारे संग्रहालयाला दिलेल्या अनेक संग्रहांनी संग्रहालयाचे भांडार मोठ्या प्रमाणात समृद्ध केले आहे. या संग्रहामध्ये सर अकबर हैदरी, अल्मा लतीफी, अमरावती गुप्ता, कार्ल खंडालावाला, वीणा श्रॉफ, डॉ. फेरोजा गोदरेज आणि पॉलीन रोहतगी, अर्न्स्ट आणि मिशा जेनकेल आणि कुलदीप सिंग यांच्याकडून मिळालेल्या सुंदर भेटवस्तूंचा समावेश आहे. समकालीन कलाप्रेमींच्या गरजा पूर्ण करत, जहांगीर निकोल्सन यांचा भारतातील आधुनिक आणि समकालीन कलांचा संग्रह देखील संग्रहालय परिसरात ठेवण्यात आला आहे. हा संग्रह सध्या संग्रहालयाकडे  15 वर्षांच्या कर्जावर आहे आणि त्याने संग्रहालयाच्या संग्रहात आधुनिक आणि समकालीन मिलाफ घडवून आणला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाचे महासंचालक सब्यसाची मुखर्जी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय (CSMVS) हे एक सांस्कृतिक, तसेच एक सामाजिक स्थान आहे आणि लोकांमध्ये संवाद आणि विचारांची देवाणघेवाण करण्याचे एक ठिकाण आहे. ज्या समाजामध्ये तो टिकून आहे त्याचे जतन आणि समृद्ध करण्यात संग्रहालय थेट भूमिका बजावते. संग्रहालयाचा जसजसा विकास होत आहे आणि लोकप्रियता वाढत आहे, तसतसे ते शहरात राहणा-या विविध समुदायांना अधिक उत्तरदायी बनत आहे.”

1923 मध्ये, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि संग्रहालयाच्या विश्वस्तांनी संयुक्तपणे नैसर्गिक इतिहास विभागाची स्थापना केली. श्री जेमे रिबेरो यांनी गोळा केलेला बॉम्बे बेटावरील खनिजांचा आकर्षक संग्रहही संग्रहालयाला दान करण्यात आला. या विभागाचे पहिले मार्गदर्शक व्याख्याते म्हणून प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ.सलीम अली हे होते. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या बॉम्बे शाखेने पुरातन वस्तूंचा महत्त्वपूर्ण संग्रह संग्रहालयाला दिला होता. सन 1928 मध्ये विश्वस्तांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट कडून सजावटीच्या कलांचा संग्रह मिळवला. 

छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाने वस्तू गोळा करणे सुरूच ठेवले आहे आणि संग्रहालय प्रशासक या संग्रहांचे संशोधन करण्यात सक्रियपणे गुंतलेले आहेत. जगभरातील कला इतिहासकारांनी संशोधन कार्यासाठी संग्रहालयाला भेट दिली आहे. कला इतिहास आणि पुरातत्व क्षेत्रातील ज्येष्ठ आणि तरुण विद्वानांमध्ये मूळ संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी संग्रहालय दरवर्षी एक संशोधन जर्नल प्रकाशित करते. 2019 मध्ये, संग्रहालयाने मुंबईतील पहिले बालसंग्रहालय उघडले. संग्रहालयाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम म्हणजे – म्युझियम ऑन व्हील्स, अर्थात फिरते संग्रहालय जे महाराष्ट्र आणि गुजरातमधील शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये बसमधून प्रदर्शन घेऊन जाते.

अन्नधान्य वितरणात अग्रेसर…

0

          गेल्या दोन वर्षात अन्न नागरीपुरवठा विभागाने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे राज्य अन्न धान्य वितरणात अग्रेसर राहिले आहे. महाविकास आघाडी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘शिवभोजनथाळी’ च्या माध्यमातून आतापर्यंत सात कोटी चौदा लाख गरजूंनी लाभ घेतला आहे, तर टाळेबंदीच्या कालावधीत पावनेदोन कोटी शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे.

छगन भुजबळ

मंत्री, अन्न, नागरीपुरवठा व ग्राहकसंरक्षण

          महाविकास आघाडी सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणून शिवभोजन थाळीकडे पाहिले जाते. गरीब व गरजू नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवभोजन थाळी योजना 26 जानेवारी 2020 पासून राज्यात सुरू करण्यात आली आहे. योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत या योजनेच्या माध्यमातून सात कोटी चौदा लाख गरजू जनतेने लाभ घेतला आहे. ही योजना ‘कोरोना कालावधी’ तसेच ‘पूरग्रस्तांसाठी’ देखील दिलासा देणारी ठरली आहे. यापूर्वी शिवभोजन थाळी प्रति दहा रुपयांप्रमाणे वितरित करण्यात येत होती. कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत शिवभोजन थाळीची किंमत पाच रुपये करण्यात आली. या योजनेला जिल्हास्तरावर मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून तसेच तालुका स्तरावरही शिवभोजन थाळींचे वितरण केंद्र सुरू करण्यात आले. टाळेबंदीच्या कालावधीत असलेल्या कडक निर्बंधामुळे गरीब व गरजू जनतेचे हाल होऊ नये म्हणून 15 एप्रिल 2021 पासून राज्यात शिवभोजन थाळीचे वितरण मोफत करण्यात येत होते. टाळेबंदीच्या कालावधीत पावनेदोन कोटी शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे.

          महापुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांमध्ये शिवभोजन थाळीचा इष्टांक दुप्पट करण्यात आला होता. आपत्तिग्रस्त भागातील शिवभोजन केंद्रावर दुप्पट क्षमतेने शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र वाहून गेले आहे किंवा पाण्यात आहेते ते इतर ठिकाणावरून शिवभोजनाची पाकिटे वितरित करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.

शिवभोजन ॲपसाठी कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी शिवभोजन थाळीच्या नोंदणीसाठी स्थानिक पातळीवर तहसीलदारांनी त्यांच्या यंत्रणेचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. शिवभोजन थाळीचे वितरण यापूर्वी दुपारी 12 ते दुपारी तीन असे करण्यात येत होते. मात्र आता ही वेळ वाढवून सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे. राज्यात सध्या 1406 शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. सद्य:स्थितीत शिवभोजन योजनेचा इष्टांक प्रतिदिन 2.00 लक्ष एवढा आहे.

धान  भरड धान्याची विक्रमी खरेदी

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्यात विक्रमी धान आणि भरड धान्याची खरेदी करण्यात आली आहे. केंद्र शासनाचे अनुदान व राज्यशासनाचे प्रोत्साहन अनुदान असे मिळूण एकूण मदत धानखरेदीसाठी करण्यात येते. 2019-20 मध्ये खरीप व रब्बीहंगाममध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत 4 लाख 04 हजार 684 शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या धान भरड धान्याची 860 कोटी रुपये, तसेच 2019-20 मध्ये 941.59 कोटी एवढ्या रुपयांचे धान व भरड धान्य खरेदी केले.

धान (तांदूळ), ज्वारी, बाजरी, मका व गहू यांच्या खरेदी केंद्रांबाबत अनेक जिल्ह्यातून वाढती मागणी लक्षात घेता आवश्यकतेनुसार खरेदी केंद्रे सुरू करण्याबाबतही कार्यवाही करण्यात आली आहे.

सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ

देशात कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या परंतु ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न एक लाख रुपयापर्यंत आहे, अशा एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारकांना माहेमे 2021 तेऑगस्ट 2021 या कालावधीत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 71 लाख 54 हजार 738 एपीएल (केशरी) शिधापत्रिकांवरील 3 कोटी 08 लाख 44 हजार 076 एवढ्या लाभार्थ्यांना 3 किलो गहू (8 रुपये प्रतिकिलो) व 2 किलो तांदूळ (12 रुपये प्रतिकिलो) या प्रमाणे अन्नधान्य उपलब्ध करू न देण्यात आले आहे.

जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह कोल्हापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यांमध्ये बाधित कुटुंबांना प्रति कुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लिटर केरोसीन तसेच 5 किलो तूर डाळ हे धान्य मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अनाथांसाठी बीपीएल शिधापत्रिका

          अनाथांना वयाच्या 28 वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरित करण्याबाबतचा निर्णय प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. 28 वर्षावरील अनाथांना उत्पन्नाप्रमाणे अनुज्ञेय शिधा पत्रिका व त्यावरील लाभ देण्यात येणार असून संस्थेमध्ये असलेल्या अनाथांना कल्याणकारी संस्था व वसतिगृहे योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ देण्यात येतो. त्यामुळे हे लाभ संस्थेमध्ये असणाऱ्या अनाथांना लागू असणार नाहीत. अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला व बालविकास विभागाने वितरित केलेले अनाथ प्रमाणपत्र किंवा आई व वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

शहरीभागात रास्तभाव धान्य दुकाने

          राज्यातील कोरोना या आजारामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच जुलै व ऑगस्टमध्ये राज्यात झालेली अतिवृष्टी लक्षात घेता शहरीभागातही नवीन स्वस्त रास्त भाव धान्य दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यशासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता रास्तभाव दुकानांची पुनर्रचना करण्याबाबतची कार्यवाही बाबत या पूवी करण्यात आली होती मात्र या कार्यवाहीला लागणारा कालावधी लक्षात घेता 2018 मध्ये शहरी भागात नवीन दुकाने वितरणाच्या जाहीर नाम्यास स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती आता उठवली आहे त्यामुळे शहरी भागातही आता स्वस्त भाव धान्यदुकाने सुरू होणार आहेत.

          सद्य:स्थितीत कोरोना विषाणू संसर्गाने राज्यात गरीब व गरजू लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरी भागातील अशी लोकसंख्या अधिक आहे. रास्तभाव दुकानांमार्फत राज्यातील गोरगरीब जनतेला अन्नधान्य तसेच केरोसीन वाटपाचे महत्त्वपूर्ण कार्य चालू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच राज्यात जुलै व ऑगस्टमध्ये पावसामुळे अनेक शहरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शहरी भागातील अनेक ठिकाणी नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत तेथे सरकारी मदत अन्न धान्याच्या स्वरूपात रास्तभाव दुकानदारांच्या माध्यमातून देणे अनिवार्य असून शहराची मूळ परिस्थिती पूर्वपदावर आणणे ही शासनाची जबाबदारी ठरते.

राज्याचे बायोडिझेल धोरण

          राज्यामध्ये बायोडिझेलच्या अवैध विक्रीस प्रतिबंध बसावा व बायोडिझेल उत्पादक, साठवणूकदार, पुरवठादार व विक्रेता यांना व्यवसाय करणे सुलभ होऊन राज्यात बायोडिझेल उपलब्ध व्हावे, यास्तव राज्याचे बायोडिझेल (उत्पादन, साठवणूक, पुरवठा व विक्री) धोरण-2021 निश्चित करण्यात आले आहे. किरकोळ, हॉकर्स, अर्ध घाऊक केरोसीन परवानाधारकांच्या तसेच रास्तभाव दुकानदारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात असलेल्या वारसांच्या व्याख्येत कुटुंबाच्या सदस्यांची देखील निश्चिती करण्यात आली आहे.

गुणसंवर्धित तांदूळ वितरणाचा प्रकल्प

ॲनिमिया या आजाराचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात टाटा ट्रस्ट व बीपीसीएल यांच्या साहाय्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पोषणतत्व गुणसंवर्धित तांदूळ वितरित करण्याचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात डिसेंबर 2020 पर्यंत 3,43,325 क्विंटल गुणसंवर्धित तांदूळ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे. केंद्र व राज्यशासन यांच्या समन्वयातून 2020-21, 2021-22 या कालावधीत हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

शब्दांकन :संध्या गरवारे,

विभागीय संपर्क अधिकारी

सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

0

पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करा;आर्थिक शिस्त पाळण्याच्या सूचना

मुंबई, दि. १० :- अण्णासाहेब पाटील आर्थिक‍ मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना, काटेकोरपणे आर्थिक शिस्त पाळा. महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविताना समाजातल्या पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. त्याचबरोबर सर्व महामंडळांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती कक्षात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नामदेव भोसले, नियोजन विभागाचे उपसचिव श्री. देसाई, नियोजन विभागाचे अवर सचिव श्री. बोरकर, वित्त विभागाचे सहसचिव श्री. दहीफळे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील सर्व समाज घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसह समतोल सामाजिक प्रगती साधण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने वेगवेगळ्या प्रवर्गासाठी विविध विकास महामंडळाच्या माध्यमातून योजना राबविण्यात येतात. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना शेतीपूरक व्यवसाय, विपणन, प्रक्रिया, उद्योग, पुरवठा आणि साठवणुकीबरोबरच लघू उद्योग, वाहतूक, अन्य व्यवसायिक उद्योगासाठी आर्थिक मदत करताना राज्यातील सर्व भागातील जास्ती-जास्त तरुणांना या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबरोबरच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळासह इतर सर्व महामंडळासाठी तरतुद केलेल्या निधीचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

88व्या बिलियर्डस अँड स्नूकर राष्ट्रीय आणि 10व्या सिक्स रेड स्नूकर स्पर्धेत महाराष्ट्राच्या ईशप्रीत चड्डा, रयान राझमी, सुमेर मागो यांना विजेतेपद

0

  पुणे, 10 जानेवारी 2022: – मध्यप्रदेश बिलियर्ड्स अँड स्नूकर संघटनेच्या वतीने आयोजित व बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली आयोजित 88व्या बिलियर्डस अँड स्नूकर राष्ट्रीय आणि 10व्या सिक्स रेड स्नूकर स्पर्धेत महाराष्ट्राच्या ईशप्रीत चड्डा, रयान राझमी, सुमेर मागो या खेळाडूंनी विजेतेपद संपादन केले. हि स्पर्धा एसएजीइ युनिव्हर्सिटी, भोपाळ येथे पार पडली.  
या स्पर्धेत देशभरातून 14 गटातील स्पर्धांमध्ये 11 ते 72 वयोगटातील 970 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्राच्या रयान राझमी याने कुमार स्नूकर आणि बिलियर्ड्स स्पर्धेत विजेतेपद पटकावले.  तर, सब-ज्युनियर बिलियर्ड्स स्पर्धेत सुमेर मागो याने विजेतेपद पटकावले. पुरुष स्नूकर स्पर्धेत ईशप्रीत चड्डाने लक्षवेधी कामगिरी करत विजेतेपदाचा मान पटकावला. 
88व्या वरिष्ठ बिलियर्ड्स स्पर्धेत वरिष्ठ गटात अनेकवेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकवणाऱ्या व जागतिक विजेता पीएसपीबीच्या पंकज अडवाणी याने विजेतेपद पटकावत आणखी एक राष्ट्रीय विजेतेपदाचा मान पटकावला.  तर, कर्नाटकाच्या पीएसपीबीच्या एस श्रीकृष्णाने सिक्स रेड स्नूकर स्पर्धेत विजेतेपद मिळवले. महिला गटात कर्नाटकाच्या महिला राष्ट्रीय विजेती विद्या पिल्लई हिने विजेतेपद पटकावले.  बिलियर्ड्स प्रकारात वर्षा संजीवने तर स्नूकर प्रकारात मध्यप्रदेशच्या अमी कमानीने विजेतेपद मिळवले. 
 यावेळी बीएसएफआयचे अध्यक्ष राजन खिंवसरा म्हणाले की, कोविड महामारीमुळे आमच्यासाठी हे वर्ष खूप आव्हानात्मक होते. पण असे असतानादेखील या काळात 36 दिवसीय ही अजिंक्यपद स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करून आम्ही 2021 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या स्पर्धेमुळे देशातील क्यू स्पोर्ट्स खेळाला नक्कीच हातभार लागेल अशी खात्री आहे. तसेच, पुढील वर्षी अधिकाधिक आंतराष्ट्रीय स्पर्धा आणि सांघिक स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा मानस आहे.  
अन्य राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे: कुमार बिलियर्ड्स स्पर्धा(मुली): अनुपमा आर.(तामिळनाडू), कुमार स्नूकर स्पर्धा(मुली): अनुपमा आर.(तामिळनाडू), सब-ज्युनियर स्नूकर(मुले): रणवीर दुग्गल(चंदीगढ), सब-ज्युनियर बिलियर्ड्स स्पर्धा(मुली): स्नेथारा बाबू(तामिळनाडू), सब-ज्युनियर स्नूकर स्पर्धा(मुली): कनिशा जूरानी(मध्यप्रदेश). 

महाराष्ट्राच्या संघाला ब्राँझ

0

पुणे – महाराष्ट्राने ३९वी वरिष्ठ आणि २३वी खुली स्प्रिंट राष्ट्रीय रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत दोन हजार मीटरमध्ये आठ जणांच्या कॉक्सलेसमध्ये ब्राँझपदकाची कमाई केली.
रोइंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आणि आर्मी रोइंग नोड व महाराष्ट्र रोइंग असोसिशनच्या सहयोगाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या संघाने ६ मिनिटे १२.१ सेकंद वेळ नोंदवली. महाराष्ट्राच्या संघात विपूल घुरडे, सागर घुगे, ओंकार म्हस्के, विकास, अखिल चंद्रन, संतोष उमप, आर. राजकुमार, लेकराम, धनंजय पांडे यांचा समावेश आहे. सर्व्हिसेसच्या संघाने ६ मिनिटे ०९.६ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक, तर आर्मीच्या संघाने ६ मिनिटे ११.३ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक मिळवले. याआधी महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकरने सिंगल स्कल्समध्ये ब्राँझपदकाची कमाई केली आहे.

ओडिसाला तीन सुवर्णपदके
ओडिसाच्या ५०० मीटरमध्ये वर्चस्व राखून सर्व्हिसेसच्या खेळाडूंसमोर आव्हान निर्माण केले. ओडिसाने मिश्र दुहेरी सिंगल स्कल्स, महिला दुहेरी कॉक्सलेस आणि महिला फोर कॉक्सलेसमध्ये सुवर्णयश मिळवले. पुरुष दुहेरी सिंगल स्कल्समध्ये ओडिसाने एका ब्राँझपदकाची कमाई केली.

निकाल – ५०० मीटर – पुरुष एकेरी सिंगल स्कल्स – के. नारायण (१ मि. ५६.४७ से., सर्व्हिसेस), विजित व्ही. (१ मि. ५७.५४ से., केरळ), कुलदीपसिंग (२ मि.,०३.३२ से., हरियाणा).

पुरुष दुहेरी सिंगल स्कल्स – दुष्यंत – सुखमीतसिंग (१ मि. ३२.४२ से., आर्मी), अर्जुन लाल जाट – रवी (१ मि. ३३.१७ से., सर्व्हिसेस), करनबीरसिंग – भिंदर (१ मि. ३३.२९ से., ओडिसा).

पुरुष दुहेरी कॉक्सलेस – पुनीतकुमार – गुरमीतसिंग (१ मि. ३२.०८ से, सर्व्हिसेस), अक्षत -चरणजितसिंग (१ मि. ३४.२१ से., आर्मी), मनमोहन – विकास यादव (१ मि. ३५.८४ से., मध्य प्रदेश).

मिश्र सिंगल स्कल्स – शागणदीप सिंग – संजुक्ता डुंग (१ मि. ४०.९५ से., ओडिसा), निजील पी.एम. – जी. गीतांजली (१ मि. ४३.८५ से., तेलंगण), मंगल सिंग – मोनिका भदोरिया (१ मि. ४३.९५ से., मध्य प्रदेश).

महिला दुहेरी कॉक्सलेस – सोनाली स्वैन – रितू कुडी (१ मि. ५५.०२ से., ओडिसा), ज्योती कुश्वाहा -रुक्मणी डांगी (१ मि. ५९.३२ से., मध्य प्रदेश), फातीशुभा के. -ज्योतिका बी. (२ मि. १२.४० से., तमिळनाडू).

कॉक्सलेस फोर – ओडिसा (१ मि. ४३.२१ से.), केरळ (१ मि. ४७.३९ से.), हरियाणा (१ मि. ४८.४५ से.).

श्री क्षेत्र औदुंबर येथील झुलता पूल सर्वांचे आकर्षण ठरेल – सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम

0

औदुंबर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

सांगली   : श्री क्षेत्र औदुंबर येथे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. या परिसराला पुराच्या काळात मोठ्या प्रमाणावर फटका बसतो, या अनुषंगाने याठिकाणी केलेले बांधकाम भक्कम असले पाहिजे. महापुरात वाढणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन पुलाची उंची जास्त असणे आवश्यक आहे,असे सांगून प्रादेशिक पर्यटन  विकास योजनेतून औदुंबर येथे कृष्णा नदीवर उभारण्यात येणारा झुलता पूल हा या प्रकारचा जिल्ह्यातील पहिलाच पूल आहे. त्यामुळे हा पूल सर्वांचे आकर्षण ठरेल. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून पुलाचे डिझाईन तयार करावे , असे निर्देश सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिले .

सन 2017-18मधील प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत पलूस तालुक्यातील औदुंबर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते आणि खासदार संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समारंभात झाले . यावेळी तहसीलदार निवास ढाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, गट विकास अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले, सुरेंद्र वाळवेकर, सरपंच अनिल विभुते, उपसरपंच स्वाती पाटील, जेके जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. भूमिपूजन झालेल्या विकास कामांमध्ये श्री क्षेत्र दत्त देवालय औदुंबर येथे कृष्णा नदीवर झुलता पूल , मंदिर परिसरात वाहन स्थळ या कामांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले,  श्री क्षेत्र औदुंबर येथे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. त्यादृष्टीने येथील रस्ते मोठे व रुंद असणे आवश्यक आहे . तसेच या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची चांगली सोय व्हावी , यासाठी येथील जुने गेस्ट हाऊस निर्लेखित करून अद्ययावत नवीन गेस्ट हाऊस  बांधण्याचा संकल्प त्यांनी या वेळी व्यक्त केला. अंकलखोप मुख्य चौकापासून औदुंबर देवस्थाना पर्यंत नागरिकांना येण्यासाठी देवस्थान ट्रस्ट व नागरिकांच्या मागणी नुसार भारती विद्यापीठातर्फे दोन इलेक्ट्रिक गाड्या लवकरच प्रदान करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

खासदार संजय पाटील म्हणाले, श्रीक्षेत्र औदुंबर या ठिकाणी आलेल्या भक्तांची सोय करणे हे आपले लक्ष आहे. भक्तांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधणे सोयीचे होईल. आज ज्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे ती कामे एक वर्षाच्या आत पूर्ण करावी. हे काम चांगले होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रारंभी स्वर्गीय डॉ.पतंगराव कदम यांच्या 78 व्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक सरपंच अनिल विभूते यांनी केले. सूत्रसंचालन आप्पासो पाटील यांनी केले तर आभार विजय पाटील यांनी मानले.

नागरी सहकारी बॅंका सक्षम करण्यासाठी केंद्र सकारकडून प्रयत्न केले जातील – केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड

0

पुणे-नागरी सहकारी बॅंका महत्त्वपूर्ण काम करीत असून ग्रामीण आणि शहरी स्तरावर या बॅंका सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या आहेत त्यामुळे त्यांना सक्षम करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज केले.  त्यासाठी केंद्र सरकाराच्या पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

संवाद पुणे या  संस्थेतर्फे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.  भागवत कराड यांच्या उपस्थितीत बॅंकींग वार्तालापाचे  आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. कराड बोलत होते. पुणे जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुभाष मोहिते, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष श्री  विद्याधर अनासकर आणि इतर मान्यवर  उपस्थित होते.

डॉ. कराड म्हणाले की, सहकार क्षेत्राविषयी केंद्र सरकार कटिबद्ध असल्यानेच केंद्रीय स्तरावर सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे आणि त्याची धुरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आहे. सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे आहे . नामवंत अर्थतज्ञ धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, पद्म्श्री विखे पाटील, आदि धुरीणांनी त्याची मुहुर्तमेढ रोवलेली आहे. देशात नागरी सहकारी बँकांचा विस्तार महाराष्ट्रात चांगला झालेला आहे. 

देशातील बॅक व्यवहाराचे स्वरूप बदलत चालले आहे. नवीन पिढी डिजीटलायझेशन मुळे आॅन लाईन व्यवहाराला प्राधान्य देत आहे. बॅंकांचे जेवढे  डिजीटलायझेशन होईल तेवढे व्यवहार पारदर्शक होतील आणि बॅंकिग क्षेत्रातील भ्रष्ट्राचालाराला आळा बसेल. एकिकडे बॅंकांचे होणारे डिजीटलायझेशन आणि तळागाळा पर्यंंत बॅंकिग सेवा पोहचविण्यासाठी केंद्र सरकारची कटिबद्धता या दोन्हींचा सुवर्णमध्य साधत धोरण आखावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सरकारी परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात रिर्झव्ह बॅंकेकडून असलेल्या अपेक्षा आणि सहकारी बॅकांच्या अडचणींवर विस्ताराने उहापोह केला. यावेऴी व्यासपीठावर संवाद पुणे चे सुनील महाजन, सचिन ईटकर आणि भरत गीते उपस्थित होते. तसेच पुणे परिसरातील आणि जिल्ह्यातील विविध सहकारी बॅंकांचे पदाधिकारी, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वादानंतर अखेर जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे, 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

0
मुंबई-राज्य सरकारच्या सुधारीत नवीन नियमावलीनुसार जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. 50 टक्के क्षमतेने जीम आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे नवे आदेश रविवारी जारी करण्यात आले आहेत. 10 जानेवारीपासून हे आदेश लागू होणार आहेत.
दरम्यान, यामध्ये नवीन नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे. यामध्ये जीम आणि ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्यांसह ग्राहकांनी लस घेणे गरजेचे आहे. या दोघांनी लसीचे दोन डोस घेतले असतील तरच त्यांना परवानगी मिळणार असल्याचे नवीन आदेशात सांगण्यात आले आहे.
आधीच्या आदेशात काय?
स्वीमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्यूटी सलून्स बंद राहतील, असे आधीच्या आदेशात म्हटले होते. मात्र, या निर्णयाला मोठा विरोध करण्यात आला होता. जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये थोडा बदल करून ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनकडून करण्यात आली होती. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये सलून व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र जीम आणि ब्युटी पार्लरला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे विरोध होत होता. तसेच आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र अखेर काही नियम घालून परवानगी देण्यात आली आहे.
नियमावली : सर्व शाळा-महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी
दिवसा जमावबंदी लागू. पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव
अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध
शासकीय कार्यालयात प्रवेश बंद आवश्यकता असल्यास मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक
खासगी कार्यालये ५० टक्के कर्मचारी मर्यादा, दोन्ही डोस घेतलेल्यांना हजेरीस परवानगी, इतरांना वर्क फ्रॉम होम
लग्न समारंभासाठी ५० जणांना परवानगी
अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी २० जणांना परवानगी
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी ५० जणांना परवानगी
शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
हेअर कटिंगची दुकाने ५० टक्के क्षमतेने सुरू, रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत बंद राहणार
पर्यटनस्थळे बंद, पार्क, प्राणिसंग्रहालय, गड-किल्ले, म्युझियम, एंटरटेनमेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे
शॉपिंग मॉल आणि बाजारपेठा, बाजार संकुले ५० टक्के क्षमतेने सुरू
रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू, पण रात्री १० पर्यंत परवानगी. होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे
नाट्यगृहे, सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी.
नाट्यगृहे, सिनेमागृहांत संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी, मात्र रात्री १० ते सकाळी ८ नाट्यगृहे-सिनेमागृहे बंद
सार्वजनिक वाहतुकीसाठी लसीचे दोन डोस आवश्यक.