Home Blog Page 16

कर्ज स्वस्त होणार, RBI ने व्याजदर 0.25% कमी केला:20 वर्षांत 20 लाखांच्या कर्जावर सुमारे ₹74 हजारांचा फायदा

आगामी काळात कर्ज स्वस्त होतील. सध्याचे EMI देखील कमी होतील. RBI ने रेपो दर 0.25% ने कमी करून 5.25% केला आहे. हा कपातीचा निर्णय मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान झालेल्या बैठकीत घेण्यात आला. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 5 डिसेंबर रोजी ही माहिती दिली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ज्या दराने बँकांना कर्ज देते, त्याला रेपो दर म्हणतात. जेव्हा RBI रेपो दर कमी करते, तेव्हा बँकांना स्वस्त कर्ज मिळते आणि ते हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. म्हणजेच, आगामी काळात गृह आणि वाहन यांसारखी कर्जे 0.25% पर्यंत स्वस्त होतील.

ताज्या कपातीनंतर 20 वर्षांच्या ₹20 लाखांच्या कर्जावरील EMI 310 रुपयांपर्यंत कमी होईल. त्याचप्रमाणे ₹30 लाखांच्या कर्जावरील EMI 465 रुपयांपर्यंत कमी होईल. नवीन आणि सध्याच्या दोन्ही ग्राहकांना याचा फायदा मिळेल.

यावर्षी 4 वेळा रेपो दरात घट झाली, 1.25% नी कपात झाली
आरबीआयने फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत व्याज दर 6.5% वरून 6.25% पर्यंत कमी केले होते. मॉनेटरी पॉलिसी कमिटीकडून ही कपात सुमारे 5 वर्षांनंतर करण्यात आली होती.

दुसऱ्यांदा एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीतही व्याज दर 0.25% नी कमी करण्यात आला. जूनमध्ये तिसऱ्यांदा दरांमध्ये 0.50% नी कपात झाली. आता पुन्हा एकदा यात 0.25% नी कपात करण्यात आली आहे. म्हणजेच, मॉनेटरी पॉलिसी कमिटीने तीन वेळा व्याज दर 1.25% नी कमी केले.

रिझर्व्ह बँक रेपो दर का वाढवते आणि कमी करते?
कोणत्याही मध्यवर्ती बँकेकडे (सेंट्रल बँक) धोरणात्मक दराच्या (पॉलिसी रेट) स्वरूपात महागाईशी लढण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. जेव्हा महागाई खूप जास्त असते, तेव्हा मध्यवर्ती बँक धोरणात्मक दर वाढवून अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह (मनी फ्लो) कमी करण्याचा प्रयत्न करते.

धोरणात्मक दर जास्त असल्यास, बँकांना मध्यवर्ती बँकेकडून मिळणारे कर्ज महाग होईल. त्या बदल्यात बँका त्यांच्या ग्राहकांसाठी कर्ज महाग करतात. यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कमी होतो. पैशाचा प्रवाह कमी झाल्याने मागणीत घट होते आणि महागाई कमी होते.

त्याचप्रमाणे, जेव्हा अर्थव्यवस्था वाईट टप्प्यातून जाते, तेव्हा पुनर्प्राप्तीसाठी पैशाचा प्रवाह वाढवण्याची गरज असते. अशा परिस्थितीत, मध्यवर्ती बँक धोरणात्मक दर कमी करते. यामुळे बँकांना मध्यवर्ती बँकेकडून मिळणारे कर्ज स्वस्त होते आणि ग्राहकांनाही स्वस्त दरात कर्ज मिळते.

दर दोन महिन्यांनी होते RBI ची बैठक
मॉनेटरी पॉलिसी कमिटीमध्ये 6 सदस्य असतात. यापैकी 3 RBI चे असतात, तर उर्वरित केंद्र सरकारद्वारे नियुक्त केले जातात. RBI ची बैठक दर दोन महिन्यांनी होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकांचे वेळापत्रक जाहीर केले होते. या आर्थिक वर्षात एकूण 6 बैठका होतील. पहिली बैठक 7-9 एप्रिल रोजी झाली होती.

खडकी स्टेशनवरून सेतुबंधन योजनेतून उड्डाणपूलनितीन गडकरी यांचा सुनील माने यांची मागणीला प्रतिसाद

पुणे ता.५ : औंधपासून खडकी पोलिस स्टेशन या रस्त्याच्या अनेक समस्या आहेत. येथे रेल्वेच्या पूलाखालून जात असलेल्या रस्त्यावर नेहमीच अपघात आणि वाहतूक कोंडी होत असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घालून येथे भुयारी मार्ग करावा अथवा उड्डाणपूल करावा अशी मागणी केली आहे. केंद्र
सरकारच्या सेतुबंधन योजनेतून हे काम करता येईल, ही बाब श्री. माने यांनी श्री. गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्याला श्री. गडकरी यांनी मान्यता दिली आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत राज्य सरकारकडून प्रस्ताव देण्याची सूचना श्री. गडकरी यांनी केली आहे. त्यानुसार पुढील काम केले जाईल, अशी माहिती श्री. माने यांनी दिली.

याबाबतचे निवेदन त्यांनी नवी दिल्ली येथे मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे आणि विकास लवांडे यावेळी उपस्थित होते.
श्री. माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यातील खडकी पोलिस स्टेशन जवळ रेल्वेचा ब्रिटिशकालीन पूल आहे. या पुलाच्या खालून जाण्या-येण्यासाठी एकच रस्ता आहे. हा रस्ता औंधरोडसह खडकी रेल्वे स्टेशन तसेच राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी, औंध, औंधरोड, बोपोडी, चिखलवाडी, सांगवी येथून पुणे शहरात जाण्यासाठी तसेच खडकी,कोरेगावपार्क, विमाननगर, येरवडा, नगररस्ता या भागात जाण्यासाठी दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र अंडरब्रिज रस्ता केवळ एक – एक मोटार जाण्या- येण्यासाठी वापरता येतो, इतका अरुंद आहे. त्याचप्रमाणे येथे नेहमी सांडपाणी साठून राहिलेले असते. यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असते. हा रस्ता मुंबई- पुणे महामार्गाशी खडकी पोलिस स्टेशनसमोर जोडला गेला आहे. पुणे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांचा ताण लक्षात घेता खडकी स्टेशन येथे रेल्वे स्टेशन करण्यात आले आहेत. भविष्यात अनेक रेल्वे गाड्या या मार्गावरून सोडण्यात येतील मात्र याच रस्त्यावर या रेल्वे स्टेशनचे प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. भविष्यात यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. या मुळे या रस्त्यावर आणखी वाहतूक कोंडी होणार आहे.
त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल अथवा भूमिगत मार्ग होणे अत्यंत गरजचे आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सेतुबंधन योजनेतून खडकी रेल्वे स्टेशन उड्डाणपुल करण्याची मागणी माने यांनी श्री. गडकरी यांच्याकडे केली. या योजनेतून भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो तो या ठिकाणी उपलब्ध करून द्द्यावा. अशी विनंती सुनील माने यांनी श्री. गडकरी यांना केली आहे.

‘शिर्डी के साईबाबा’सुधीर दळवींना उपचारासाठी शिर्डी संस्थानाची 11 लाखांची मदत

मुंबई- लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती सध्या चिंताजनक अवस्थेत असून त्यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. शिर्डी के साईं बाबा, या 1977 मध्ये आलेल्या चित्रपटामुळे ते घराघरात पोहोचले आणि त्यांच्या चेहऱ्यावर तत्कालीन काळात भक्तांचा अपार विश्वासही बसला. आजही चाहत्यांच्या मनात ते साईबाबाच आहेत. मात्र आता हेच साईबाबा साकारणारे अभिनेते जीवघेण्या संसर्गाशी झुंजत असून त्यांना उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज भासू लागली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी मागील काही दिवसांत परिस्थितीची गंभीरता समजावून सांगत चाहत्यांना, तसेच चित्रपटसृष्टीतील लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर अनेक ठिकाणांहून मदतीचे हात पुढे येत आहेत आणि यामध्ये सर्वांत महत्त्वाची मदत आता शिर्डी साईबाबा संस्थान करणार आहे.

सध्या सुधीर दळवी मुंबईतील लीलावती रुग्णालयात 8 ऑक्टोबरपासून दाखल आहेत. सेप्सिस या गंभीर संसर्गाने त्यांची तब्येत ढासळली आहे आणि दीर्घकाळ उपचारांची गरज आहे. त्यांच्या पत्नीने सांगितले की, दळवी आता अंथरुणाला खिळले आहेत आणि दोन केअरटेकर व फिजिओथेरपिस्टच्या मदतीने त्यांची काळजी घेतली जातेय. पूर्ण आरोग्य सुधारण्यास किमान एक वर्षाचा काळ लागू शकतो. कुटुंबाच्या मते, आतापर्यंत त्यांच्या उपचारांवर सुमारे 10 लाख रुपये खर्च झाले आणि त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. म्हणूनच कुटुंबीयांनी 15 लाख रुपयांची मदत मागणी केली होती. त्यावेळी रिद्धिमा कपूर, अभिनयातील दिग्गज अभिनेता रणबीर कपूर यांची बहीण पुढे आल्या आणि मदतीचा हात दिला. त्यानंतर अनेक चाहत्यांनीही योगदान दिले. तरीही अजूनही उपचारासाठी अधिक पैशांची आवश्यकता असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया राबवली गेली.

मुंबई उच्च न्यायालयाने श्री साईबाबा संस्थान ट्रस्टला सुधीर दळवी यांच्या उपचारांसाठी 11 लाख रुपये देण्याची परवानगी दिली आहे. ट्रस्टने ही मदत देण्यासाठी न्यायालयाकडे औपचारिक परवानगी मागितली होती, कारण न्यायालयाच्या मागील आदेशानुसार अशा खर्चासाठी मंजुरी घेणे गरजेचे आहे. न्यायालयाने या मागणीला हिरवा कंदील दाखवत निर्णय दिला. अभिनेत्यांच्या आरोग्यस्थितीचे दस्तऐवज, उपचारांचे बिल, सादर केलेल्या माहितीच्या आधारे न्यायालयाने असे म्हणणे स्पष्ट केले की, हे अभिनेते साईबाबांची भूमिका साकारून जनमानसात भक्तीचा संदेश पसरवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. अशा व्यक्तीच्या उपचारांसाठी मदत दिली जाणे योग्यच आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना, साईबाबांनी लोकांच्या सेवेसाठी जीवन वेचले होते, त्यांची भूमिका साकारलेल्या कलाकाराला मदत करणे ही मानवतेचीच सेवा असल्याचे नमूद केले.

न्यायालयात ट्रस्टच्या वकिलांनी युक्तिवाद करताना असेही नमूद केले की, सुधीर दळवी यांनी साईबाबांच्या भूमिकेमुळे संपूर्ण भारताच्या श्रद्धेला जोडले, तसेच टीव्ही मालिकांमध्येही त्यांच्या कामाची खूप प्रशंसा झाली आहे. त्यांनी रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत महर्षी वशिष्ठ, तसेच बुनियाद, भारत एक खोज, मिर्झा गालिब, चाणक्य, आणि जुनून या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका केल्या. परंतु त्यांना खरी ओळख आणि जनमानसाचे प्रेम मिळाले ते साईबाबांच्या स्वरूपात. आज त्यांच्या त्या भूमिकेची आठवण करतच साईबाबांच्या ट्रस्टने त्यांना मदतीसाठी पुढाकार घेतलेला आहे. न्यायालयानेही ट्रस्टच्या या निर्णयाला अनुमती देताना, मानव कल्याणासाठी धर्मादाय कार्य करण्याचा अधिकार ट्रस्टला 2004 च्या कायद्यानुसार मिळालेला असल्याचा उल्लेख केला.

सुधीर दळवी यांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असलेली असली तरी, त्यांच्या मदतीला पुढे येणारे हात आणि मिळणारी आर्थिक साथ ही त्यांच्या कुटुंबासाठी आशेची नवी किरणे आहे. चाहत्यांनी आणि सिनेसृष्टीतील लोकांनी दाखवलेल्या प्रेमामुळे त्यांना मानसिक आधार मिळत आहे. ही रक्कम उपलब्ध झाल्याने त्यांच्यावर योग्य उपचार अखंड सुरू राहतील आणि ते पुन्हा बरे होतील, अशी सर्वांची इच्छा आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठ- फिलिप्स इंडिया यांच्यात सामंजस्य करार

पुणे: नावीन्य, संवर्धन आणि भावी लोकांसाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्यात आले आहे एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमटीटी) युनिव्हर्सिटी, पुणे आणि फिलिप्स इंडिया यांच्यात एड सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. उद्योग–विद्या पप्पा कराराने ताकद कटकट हा एक मूल्याचा मानला जात आहे.

या करारनामा एमआयटी एडिव्हिटी युनिव्हर्सिटी लीकात ‘प्रोजेक्ट मॅनेमेंट’ हा विषय समाविष्ट समाविष्ट असलेल्या लाभार्थी फिलिप्सच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण संस्थांशी संबंधित उद्योग-अनुभव, विवेचन व्याख्याने, उद्योगभेटांच्या उपलब्धता आणि सीमारेषा.

या करार स्वाक्षऱ्या करण्यासाठी फिलिप्स इंडियाकडून विस्पी काकारीयल , आशिवर शाह आणि चेतन लोणकर उपस्थित होते. तर विद्यापीठ मात्र कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड , कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. , प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर , डॉ. स्वाती मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.

याचे चेतन लोकर यांनी विद्यापीठ प्रगतीशील दृष्टीकोनाचे आणि प्रभावी समन्वयाचे कौतुक केले. तसेच उद्योग-विद्या आधार वाढीसाठी आयटी एडीटी मॅनेजमेंटने सातत्यपूर्ण ताकद एम कृतज्ञता व्यक्त केली.

या करारासाठी पर्यायी शैक्षणिक शैक्षणिक संस्था होती, संयुक्त संशोधक चालना आणि आरोग्य तंत्रज्ञानाच्या निर्माण भावी विकासात मोलाचे योगदान देता येईल, असे प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले.

4WD ट्रॅक्टर श्रेणीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महिंद्रा ट्रॅक्टर सज्ज

0

·         शेती आणि मालवाहतुकीच्या वापरासाठी 20-70 अश्वशक्ती क्षमतेचे महिंद्राचे 4WD ट्रॅक्टर प्रचंड टिकाऊपणा आणि कार्यक्षमता प्रदान करतात.

·         उत्तम रचनायोग्यरित्या विकसित केलेले आणि काटेकोरपणे चाचणी केलेले महिंद्राचे 4WD ट्रॅक्टर जागतिक दर्जाची वैशिष्ट्ये आणि टिकाऊपणा देतात. महिंद्रा  ट्रॅक्टरच्या विस्तृत डीलर नेटवर्कमध्ये सोप्या वित्तपुरवठा पर्यायांसहसेवा आणि सुटे भागांसह उपलब्ध आहेत. 

पुणे: भारतातील नंबर ट्रॅक्टर ब्रँड आणि जगातील सर्वात मोठ्या महिंद्रा ट्रॅक्टरने त्यांच्या 4WD श्रेणीतील (फोर-व्हील ड्राइव्ह) ट्रॅक्टरची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण पूर्तता केली आहे. महाराष्ट्र मध्ये शेती तसेच मालवाहतूक उपक्रमांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा असल्यानेराज्यातील शेतकरी 4WD ट्रॅक्टरसह अधिक ऊर्जा आणि उत्पादकतेची निवड करत आहेत.

विविध पिकांसाठी खास उपकरणांचा वाढता वापर पाहतामहिंद्रा 4WD ट्रॅक्टर हे लहान आणि मोठ्या अशा दोन्ही प्रकारच्या शेतांसाठीविशेषतः जिथे मातीची परिस्थिती वेगवेगळी आहेअशा प्रदेशांसाठी अगदी योग्य आहेत.

20-70hp श्रेणीतील 4WD ट्रॅक्टरच्या विस्तृत श्रेणीपैकी एकासहअर्जुननोवोयुवोटेक+जिवो आणि ओज ट्रॅक्टर मालिकेतील त्यांच्या लोकप्रिय ट्रॅक्टर ब्रँडमध्ये महिंद्रा 4WD ट्रॅक्टर ऑफर करते. त्यांची कामगिरी सर्वोत्तम आहे आणि मार्केटमधील अशाच प्रकारच्या अन्य ऑफरपेक्षा लक्षणीय ऑपरेशनल फायदे मिळतात.

भारतीय शेतीच्या परिस्थितीनुसार भारतातच डिझाइन आणि विकसित केलेले, महिंद्राचे 4WD ट्रॅक्टर उत्तम डिझाइनसह मजबूत आहेत. टिकाऊपणा आणि मजबूत कामगिरीसाठी तयार केलेल्या या श्रेणीमध्ये हेवी-ड्युटी एक्सलमोठे टायर आणि हायर ग्राउंड क्लिअरन्स अशी वैशिष्ट्ये आहेत. यामुळे ते कठीण कामे सहजपणे हाताळण्यासाठी आदर्श ठरतात.


ट्रॅक्टरच्या चारही चाकांमध्ये इंजिन पॉवर योग्यरित्या असल्यामुळेओल्याअसमान किंवा डोंगराळ प्रदेशात महिंद्रा 4WD ट्रॅक्टर उत्कृष्ट ट्रॅक्शन किंवा पकड देतात. यामुळे ते सर्व प्रकारच्या शेती तसेच बिगर शेती कामांसाठी आदर्श ट्रॅक्टर बनतात. आव्हानात्मक परिस्थितीत सातत्यपूर्ण ऑपरेशनसाठी ट्रॅक्टरची योग्य  कार्यक्षमता आणि इंजिनचे दीर्घ आयुष्यवाढीव इंधन कार्यक्षमताटायरची कमी झीज या गोष्टी जागतिक दर्जाचे इंजिन तंत्रज्ञान निश्चित करते. यामुळे ट्रॅक्टरचा डाउनटाइम कमी होतो आणि महत्त्वाचे म्हणजे देखभालीचा खर्च कमी होतो.

या वैशिष्ट्यांशिवाय, महिंद्राचे 4WD ट्रॅक्टर सुधारित एर्गोनॉमिक्स, सुधारित सस्पेंशन सिस्टम, प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आणि वापरणाऱ्याला सोईस्कर अशी नियंत्रणे देतात – ज्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना आराम तर मिळतोच पण त्यांची कार्यक्षमता वाढते.

महिंद्र 4WD ट्रॅक्टर वापरणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले ऑपरेशनल नियंत्रण, वेगवान हेडलँड टर्न आणि 2–3 टनापर्यंतच्या भारासह जड-ड्युटी कामे करण्याची क्षमता मिळते. यामुळे ऑपरेटर कमी दमतो आणि अपघातांचा धोका कमी होतो.

जागतिक ट्रेंड आता भारतात

महाराष्ट्र व्यतिरिक्तभारताच्या अन्य भागातील शेतकरीसुद्धा 4WD ट्रॅक्टरचे फायदे वाढत्या प्रमाणात पाहात आहेत आणि 4WD ट्रॅक्टर तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. यामुळे जागतिक स्तरावर शेतीच्या कामात बदल होतो आहे. शेती आणि बिगर-शेती ऑपरेशन्स सुलभ करण्यासोबतचवाढती जागरूकता आणि सरकारी अनुदाने देखील शेतकऱ्यांना 4WD मॉडेल्समध्ये अपग्रेड करण्यास प्रोत्साहित करत आहेत.

2WD ट्रॅक्टरच्या तुलनेत 4WD ट्रॅक्टरमध्ये सुरुवातीची गुंतवणूक जास्त असली तरी महिंद्रा 4WD ट्रॅक्टरचा टिकाऊपणाइंधन कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढ कालांतराने गुंतवणुकीवर चांगला परतावा (ROI) सुनिश्चित करते. परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणारे महिंद्रा 4WD ट्रॅक्टर किफायतशीर आहेत. तसेच ऑपरेशनचा एकूण खर्च कमी आहे.

गेल्या दशकात महिंद्राने त्यांच्या 4WD ऑफरमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. यातूनच आधुनिक शेतीमध्ये महिंद्राच्या ट्रॅक्टरचे वाढते महत्त्व लक्षात येते. नागपूरमुंबईझहीराबादरुद्रपूरराजकोट आणि जयपूर येथील ट्रॅक्टर उत्पादन सुविधांमधून महिंद्रा ट्रॅक्टर नवीन 4WD उत्पादने आणि व्यापक समाधानासह त्यांचा  4WD विस्तार देखील वाढवत आहे.

या ट्रॅक्टरना महिंद्राच्या विस्तृत डीलरशिप आणि सेवा केंद्रांचे पाठबळ आहेज्यामुळे शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि देखभालीची सोय लवकर उपलब्ध होते. मूळ सुटे भाग सहज आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेतज्यामुळे डाउनटाइम कमी होतो आणि कामकाज सुरळीत चालू राहते. महिंद्र ट्रॅक्टर सर्व्हिस टोल-फ्री संपर्क क्रमांक – 1800 2100 700 – देतो जो 24×7 तास कार्यरत असतो आणि ग्राहकांना सोयीसाठी घरपोच सेवा देतोज्यामुळे त्यांना वाहतूक किंवा लॉजिस्टिक आव्हानांशिवाय वेळेवर मदत मिळते.

तिसरी राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रा १९, २० डिसेंबरला पुण्यात

एमएसएमई मंत्रालय व एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युरशिप फोरमतर्फे आयोजन; ‘आयपी’चे महत्व होणार अधोरेखित 

पुणे : केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरम यांच्यातर्फे दोन दिवसीय तिसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी-आयपी राईट्स) यात्रेचे आयोजन १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी हॉटेल लेमन ट्री प्रीमिअर, पुणे येथे करण्यात आल्याची माहिती ‘एआयसी पिनॅकल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल यांनी दिली आहे. ‘विकसित भारत @२०४७ साठी बौद्धिक संपदा-आधारित अर्थव्यवस्था उभारणी’ अशी या आयपी यात्रेचे मध्यवर्ती संकल्पना आहे.
भारत सरकारने बौद्धिक संपदा कायद्याबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट्स, डिझाईन आणि जीआय आदी बौद्धिक संपदेच्या हक्कांबाबत जागृती, सर्जनशील उपक्रमांना प्रोत्साहन, कल्पना आणि इनोव्हेशनचे संरक्षण, प्रगत तंत्रज्ञान अंतर्भूत करून एमएसएमई सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. सर्वच क्षेत्रातील उद्योगांच्या बौद्धिक संपदेची नोंद करण्यास सहकार्य करण्याचे ध्येय या उपक्रमाचे आहे. एमएसएमईना देशभरातील आयपी फॅसिलिटेशन सेंटरशी जोडण्याचे काम होत असून, इनोव्हेटर्सना क्रिएटिव्ह कामाचे प्रदर्शन करण्यास प्रोत्साहन, मार्गदर्शन, निधी आणि सहाय्य पुरवले जात आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन सेंटरमार्फत (आयपीएफसी) मोफत आयपी सेवा पुरवल्या जात असून, एआयसी पिनॅकल हे अधिकृत ‘आयपीएफसी’ केंद्र आहे.

एमएसएमई, उद्योजक, आयपी तज्ज्ञ, स्टार्टअप्स आणि कायदेशीर व्यावसायिक यांना जागतिक स्तरावर आयपी संरक्षण, मार्केटमधील संधी, तंत्रज्ञान आदानप्रदान आणि आयपीचे व्यावसायिकी धोरण जाणून घेण्यासाठी व्यासपीठ देण्याचा आयपी यात्रेचा उद्देश आहे. एमएसएमई मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, आयपी प्रॅक्टिस करणारे वरिष्ठ व्यासायिक, विधिज्ञ, यशस्वी स्टार्टअप्स, उद्योग क्षेत्रातील लोक सहभागी होणार आहेत. मार्गदर्शन सत्रे, कार्यशाळा, नेटवर्किंग सत्रांतून आयपीचे महत्व अधोरेखित होणार आहे. आयपी क्लिनिकच्या मार्फत यात्रेदरम्यान एमएसएमईना आर्थिक साहाय्य, आयपी नोंदणी याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.पूर्णतः विनामूल्य असलेल्या या आयपी यात्रेत एमएसएमई उद्योजक, आयपीआर प्रोफेशनल्स, डिझाईन प्रोफेशनल्स, स्टार्टअप, विधिज्ञ, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. इच्छूकांनी आपली विनामूल्य नावनोंदणी www.aic-pinnacle.org किंवा https://forms.gle/qwLtCoHuHrpsdkuBA या गुगल फॉर्मद्वारे करावी. अधिक माहितीसाठी ९०४९७९४०३५/९३०७३०५१८१ यावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

यंदाच्या आयपी यात्रेची वैशिष्ट्ये व सत्रे:

– भारत @२०४७ उद्दिष्टपूर्तीच्या राष्ट्रनिर्मितीत बौद्धिक संपदा हक्कांची (आयपी) भूमिका

– एमएसएमईसाठी आयपी प्रोत्साहने, धोरणे आणि शासकीय सहाय्य कार्यक्रमांद्वारे बळकटीकरण

– संशोधन–नवोन्मेषासाठी आयपीची भक्कम पायाभरणी

– उत्पादन क्षेत्र, प्रॉडक्ट डिझाईन आणि मेक-इन-इंडिया वाढीसाठी आयपी धोरणे

– नवोन्मेष-आधारित आयपी विकास आणि संरक्षण

– जागतिक आयपी फायलिंग प्रक्रिया आणि आंतरराष्ट्रीय संरक्षण

– तंत्रज्ञान हस्तांतरण, व्यावसायिकीकरण आणि उद्योग–शैक्षणिक सहयोग

– उद्योग व कायदेविषयक तज्ज्ञांसोबत विशेष मार्गदर्शन आणि पॅनेल चर्चा

लोणीकाळभोरमध्ये बनावट RMD-विमल गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त:एक कोटींचा मुद्देमाल जप्त, चौघांना अटक

पुणे-पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीतील कांबळे वस्ती, थेऊर फाटा येथे मोठी कारवाई केली आहे. येथे बनावट आरएमडी आणि विमल पान मसाला गुटखा तयार करणारा अवैध कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईत सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.

बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सुमित गुप्ता याच्या गोदामावर छापा टाकला. या ठिकाणी बनावट सुगंधित तंबाखू, सुपारी, थंडक पावडर, केमिकल, गुलाबजल, प्रिंटेड पाऊच, बॉक्स आणि पोती असा मोठ्या प्रमाणात कच्चा माल आढळून आला. गोदामाशेजारील शेतातही तयार गुटखा आणि कच्चा माल मोठ्या प्रमाणात सापडला.

जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे १ कोटी रुपये आहे. यात बनावट गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली तीन विशेष बदललेली वाहनेही जप्त करण्यात आली. यामध्ये दोन गोल्डन रंगाच्या टोयोटा इनोव्हा (एमएच-४४-बी-२०२३ आणि एमएच-१२-डीएम-०८८५) आणि एक काळ्या रंगाची टाटा नेक्सॉन (एमएच-१२-क्यूटी-८४६२) यांचा समावेश आहे. या वाहनांची अंदाजे किंमत ५० लाख रुपये असून, १ लाख ३० हजार रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली.

या प्रकरणी कारखान्याचा मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २५, रा. पत्र वस्ती, थेऊर) आणि तीन कामगार रामप्रसाद ऊर्फ बापू बसंता प्रजापती (वय ५०), अप्पू सुशील सोनकर (वय ४६) व दानिश मुसाकीन खान (वय १८) यांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले. गोदामाचा मालक सुमित गुप्ता मात्र फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम २६(२)(i)(iv) व ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. पथकातील राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदीप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर, दिनेश बास्टेवाड यांचाही यात सहभाग होता.

बनावट गुटख्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. फरार आरोपीचा शोध आणि पुढील पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे.

इंडिगोची 550 विमानांची उड्डाणे रद्द:एअरलाइनने माफी मागितली, ठीक होण्यासाठी 3 महिने लागतील

एव्हिएशन क्षेत्रातील नवीन सुरक्षा नियमांमुळे देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो गेल्या तीन दिवसांपासून क्रूच्या कमतरतेचा सामना करत आहे. यामुळे इंडिगोच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. वृत्तसंस्थेनुसार, गुरुवारी दिल्ली-मुंबईसह 10 हून अधिक विमानतळांवर 550 हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाली.

दिल्ली विमानतळावर इंडिगोची 172 उड्डाणे रद्द झाली. तर मुंबईत 118, बंगळुरूमध्ये 100, हैदराबादमध्ये 75, कोलकातामध्ये 35, चेन्नईमध्ये 26, गोव्यात 11, जयपूरमध्ये 4 आणि इंदूरमध्ये 3 उड्डाणे रद्द झाली.

डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने गुरुवारी एअरलाइनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. एअरलाइनने नियमांमध्ये शिथिलता मागितली आणि सांगितले की कामकाज सामान्य होण्यासाठी तीन महिने लागू शकतात. DGCA ने इंडिगोला सुधारणांसाठी काही महत्त्वाच्या पैलूंवर काम करण्यास सांगितले आहे.

DGCA ने इंडिगोला क्रूची भरती, प्रशिक्षण रोडमॅप, रोस्टर पुनर्रचना, सुरक्षा योजना सादर करणे आणि दर 15 दिवसांनी प्रगती अहवाल पाठवण्यास सांगितले. तर गुरुवारी इंडिगोने माफी मागितली आणि सांगितले की ते कामकाज लवकरच पूर्ववत करण्यावर काम करत आहेत.
DGCA ने 1 नोव्हेंबरपासून वैमानिक आणि इतर क्रू मेंबर्सच्या कामाशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. याला फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) असे नाव देण्यात आले आहे. हे दोन टप्प्यांत लागू करण्यात आले. पहिला टप्पा 1 जुलै रोजी लागू झाला.

तर 1 नोव्हेंबरपासून दुसरा टप्पा लागू झाला. नवीन नियमांनुसार प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी पायलट आणि क्रू यांना पुरेसा आराम देण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे एअरलाईन कंपन्यांकडे पायलट आणि क्रू मेंबर्सची अचानक कमतरता निर्माण झाली आहे. DGCA ने सांगितले की, नोव्हेंबरमध्ये इंडिगोच्या एकूण 1,232 उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यात FDTL नियमांमुळे रद्द झालेल्या 755 उड्डाणांचा समावेश आहे.​​​​​​नागरिक उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, नवीन नियमांसाठी तयारीसाठी इतका वेळ होता, तरीही परिस्थिती कशी बिघडली?

नायडूंनी एअरलाईनला निर्देश दिले की, विमानसेवा लवकरात लवकर सामान्य करावी आणि हवाई भाड्यात कोणतीही वाढ करू नये. याव्यतिरिक्त, उशीर किंवा रद्द झाल्यास प्रवाशांना हॉटेल, जेवण आणि इतर सुविधा वेळेवर उपलब्ध करून द्याव्यात.

इंडिगोकडे सर्वाधिक विमाने, त्यामुळे जास्त परिणाम

एअरलाईन दिवसभरात सुमारे 2,300 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवते. ही संख्या एअर इंडियाच्या एका दिवसात चालवल्या जाणाऱ्या उड्डाणांच्या जवळपास दुप्पट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर जर 10-20 टक्के उड्डाणे देखील उशिराने धावली किंवा रद्द झाली, तर याचा अर्थ 200-400 उड्डाणांवर परिणाम होणे. हजारो प्रवाशांसाठी मोठ्या अडचणी निर्माण होणे. बुधवारीही इंडिगोच्या 200 हून अधिक उड्डाणांवर परिणाम झाला होता.

डीजीसीएनुसार, कर्मचाऱ्यांची कमतरता हे याचे मुख्य कारण आहे. इंडिगोमध्ये ही समस्या गेल्या महिन्यापासून सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये त्याची 1232 उड्डाणे रद्द झाली. मंगळवारी 1400 उड्डाणे उशिराने धावली.
मुंबई विमानतळ: मुंबई विमानतळावरील इंडिगो कर्मचाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी एकूण 86 विमाने रद्द झाली आहेत. यापैकी 41 विमाने मुंबईला येणारी आणि 45 मुंबईहून इतर शहरांमध्ये जाणारी होती.

जयपूर आणि जोधपूर विमानतळ ​​​​​​: जयपूरमध्ये गुरुवारी इंडिगोची 3 विमाने रद्द झाली आहेत. जोधपूरहून इंडिगोची 4 विमाने रद्द करण्यात आली आहेत. यापैकी बहुतेक विमाने बेंगळूरु, हैदराबाद, मुंबई आणि कोलकाता येथे ये-जा करणारी होती.

हैदराबाद विमानतळ: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी येथून उड्डाण करणाऱ्या इंडिगोच्या ३३ विमानांची उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. हैदराबादला येणारी ३५ विमानेही रद्द होण्याची शक्यता आहे. इंडिगोने बुधवारी हैदराबादहून १९ विमानांची उड्डाणे रद्द केली होती.​​​​​​

इंदूर विमानतळ: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये इंडिगोची तीन विमाने रद्द करण्यात आली आहेत. बुधवारीही इंडिगोची १८ विमाने रद्द झाली होती. एअरलाइननुसार, रद्द झालेल्या उड्डाणांमध्ये जयपूर, दिल्ली, मुंबई, गोवा, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख मार्गांचा समावेश आहे.

देशातील ६०% देशांतर्गत उड्डाणे इंडिगोकडे

शेवटी इंडिगोमुळे तणाव का: इंडिगोकडे सर्वाधिक 434 विमाने आहेत. एका दिवसात 2300 हून अधिक उड्डाणे आहेत. देशातील 60% पेक्षा जास्त देशांतर्गत उड्डाणे याच कंपनीकडे आहेत.
सध्या किती कर्मचारी आहेत: सध्या तिच्याकडे 5456 पायलट आणि 10212 केबिन क्रू सदस्य आहेत. 41 हजारांहून अधिक कायमस्वरूपी कर्मचारी आहेत.
मग क्रूची कमतरता का आहे: इंडिगोचे म्हणणे आहे की नवीन फ्लाइट टाइम लिमिटेशन नियमांमुळे पायलट आणि क्रूची कमतरता झाली आहे. नवीन नियमांनुसार, पायलटांच्या उड्डाण वेळेचे नियम कमी करून दररोज 8 तास करण्यात आले आहेत. रात्रीच्या लँडिंगची संख्या 6 वरून 2 करण्यात आली आहे. क्रूसाठी 24 तासांत 10 तास विश्रांतीची वेळ ठेवण्यात आली आहे.

महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू

पुणे : महापालिकेच्या इमारतीमध्ये आज दिवसभरात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी पालिकेत रुग्णवाहिका होती, पण त्या रुग्णवाहिकेत डॉक्टर नव्हते. त्यातील एका कर्मचाऱ्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. एका महिला कर्मचाऱ्याला दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत अधिकारी-कर्मचारी असतात. त्याचबरोबर शेकडो नागरिक रोज येत असतात. त्यामुळे पालिकेच्या मुख्य इमारतीत कायमस्वरूपी रुग्णवाहिका असावी, तसेच पालिकेच्या कार्यालयीन वेळेत किमान एक डॉक्टर असावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार पालिकेच्या मुख्य इमारतीत रुग्णवाहिका उभी असते, पण त्यामध्ये डॉक्टर नसतात.

पुणे महापालिकेत सकाळी ११.३० च्या सुमारास पथविभागात काम करणारे शिपाई अशोक दशरथ वाळके (वय ५८) यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना पालिकेतील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. चार तासांनंतर वाळके यांचे निधन झाले. त्यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास लेखा (अकाउंट) विभागातील महिला कर्मचारी छाया सूर्यवंशी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने प्राथमिक उपचार करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पुणे महापालिकेत रुग्णवाहिका असते, पण ती कार्डिअॅक रुग्णवाहिका नसते. या रुग्णवाहिकेत डॉक्टर असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. त्याचबरोबर पालिकेत एक कायमस्वरूपी छोटे आरोग्य केंद्र असावे, अशीही मागणी केली जात आहे.

पुतिन यांची कार चालता-फिरता किल्ला आहे, बसल्या बसल्या करू शकतात अणुबॉम्ब हल्ला,ती सोडून पुतीन बसले मोदींच्या कार मध्ये…

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतात पोहोचताच सुरक्षा प्रोटोकॉल मोडला. त्यांनी रशियातून एअरलिफ्ट करून आणलेली आपली ऑरस सीनेट कार सोडली आणि पंतप्रधान मोदींसोबत एका गाडीत बसून विमानतळावरून निघाले.
पुतिन यांचा सुरक्षा प्रोटोकॉल जगात सर्वात कडक मानला जातो. त्यांच्या जेवणाची तपासणी रशियातून आणलेल्या मोबाईल लॅबमध्ये होते. सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे – पुतिन यांचे मल-मूत्र देखील सीलबंद पिशवीत मॉस्कोला पाठवले जाते.

विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या मुंबई येथील पासिंग असलेली गाडी वापरल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एमएच ०१ पासिंग असलेल्या टोयोटा कंपनीच्या गाडीतून पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी एकत्र प्रवास केला. एएनआय आणि रॉयटर्स या संस्थांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ही गाडी दिसून येत आहे.

पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी विमानतळाहून एका पांढऱ्या टोयोटा फॉर्च्युनरमधून प्रवास केला. या गाडीचा नोंदणी क्रमांक MH 01 असा होता. या गाडीतून ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. गाडीतून एक सेल्फीही घेतला गेला आहे. पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक एक्स हँडलवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

या गाडीची निवड अनेकांना आश्चर्यचकीत करणारी आहे. कारण माध्यमातून समोर आलेल्या वृत्तानुसार, सदर गाडी पंतप्रधानांच्या ताफ्यातील अधिकृत गाडी नव्हती. राष्ट्राध्यक्ष पुतिन त्यांच्या प्रत्येक हालचालीबद्दल विशेष काळजी घेत असतात. याच्या सुरस कथा आंतरराष्ट्रीय माध्यमातून अनेकदा समोर आलेल्या आहेत. दिल्ली विमानतळावरील गाडीच्या निवडीमागे सुरक्षेचे कारण असण्याची शक्यता आहे.

MH 01 पासिंग कुठले?

भारतातील प्रत्येक राज्याच्या इंग्रजी आद्यक्षरानुसार त्या त्या राज्यातील वाहनांची नोंदणी केली जाते. महाराष्ट्रात नोंदणीसाठी MH असे इंग्रजी आद्याक्षर दिले जाते. महाराष्ट्रामध्ये एकूण ५६ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. या प्रत्येक कार्यालयाअंतर्गत नोंदणी होणाऱ्या वाहनांना त्या त्या कार्यालयासाठी देण्यात आलेला नोंदणी क्रमांक देण्यात येतो. त्याप्रमाणे MH 01 हा क्रमांक मुंबई शहरासाठी दिला जातो. त्यानुसार ही गाडी मुंबई पासिंगची असल्याचा अंदाज आहे.

पुतिन यांचा दौरा कसा असेल?

पुतिन यांचा अधिकृत कार्यक्रम शुक्रवारी म्हणजे ५ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेऊन पुतिन यांचा दौरा सुरू होईल. राष्ट्रपती भवनातून, राष्ट्राध्यक्ष पुतिन राजघाट येथे स्मृतिस्थळावर श्रद्धांजली वाहण्यासाठी जातील. त्यानंतर ते हैदराबाद हाऊसला भेट देतील. यानंतर रशिया-भारत शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पुतिन हे विविध विषयांवर चर्चा करतील. तेलाची आयात, एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी आणि मुक्त व्यापार करार (FTA) यावर चर्चा होईल, असे सांगितले जाते.

पुतिन भारतात पोहोचताच PM मोदींनी घेतली गळाभेट


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली. मोदी आणि पुतिन यांनी विमानतळावरून पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत एकाच गाडीने प्रवास केला.
पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्या सन्मानार्थ येथे एका खासगी डिनरचे आयोजन केले आहे. ते सध्या सुरू आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

पंतप्रधान मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांसोबतच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनी म्हटले आहे की, त्यांचे मित्र पुतिन यांचे स्वागत करताना त्यांना खूप आनंद झाला. भारत आणि रशियामधील मैत्री कठीण काळात काळाच्या कसोटीवर उतरली आहे.

शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग!

दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात

पुणे – पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना पूर्ण ताकद, उत्साह आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर मैदानात उतरत आहे. दत्त जयंतीचा शुभमुहूर्त साधत आज पत्रकार भवन येथे प्रतीकात्मक स्वरूपात २ महिला आणि २ पुरुष इच्छुकांना उमेदवारी अर्ज देण्यात आले आणि एकप्रकारे निवडणुकीची औपचारिक सुरूवात झाली.
शिवसेनेने गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिला आहे. भ्रष्टाचार, अनियमित कारभार, सत्ताधाऱ्यांची जनविरोधी भूमिका याविरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठविणारे एकमेव पक्ष म्हणून शिवसेनेने आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रत्येक प्रभागात मोठ्या संख्येने इच्छुक पुढे येत असून जनतेची सेवा करण्यासाठी शिवसेना सज्ज आहे.
उमेदवारी अर्ज वाटप
दिनांक : 4 डिसेंबर 2025 पासून पुढील 7 दिवस शिवसेना पुणे शहर कार्यालय, डेक्कन जिमखाना, पुणे येथे दुपारी 3 ते सायं 6 वेळेत अर्ज उपलब्ध होणार आहेत, अर्ज किंमत ₹500 असून अर्ज दाखल करतानाचे शुल्क : ₹10,000 सर्वांसाठी असणार आहे.
उमेदवारी अर्जात इच्छुकांचे शिक्षण, सामाजिक काम, शैक्षणिक योगदान, पक्षाच्या आंदोलनातील सहभाग, बैठकींतील उपस्थिती, प्रभागातील उपक्रम अशी सविस्तर माहिती आवश्यक आहे. अर्ज प्राप्तीनंतर सात दिवसांनी मुलाखतींची प्रक्रिया सुरू होणार आहे.
पत्रकार परिषदेत युतीबाबत शिवसेनेची भूमिका मांडताना संजय मोरे म्हणाले
महाविकास आघाडी किंवा युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होईल. पुणे शहर शिवसेना मिळालेल्या आदेशाचे पालन करेल, भाजपने भूतकाळात शिवसेनेसोबतची युती तुटवून विश्वासघात केला असल्याने, शिवसेना पुणे शहर पूर्ण तयारीत असून युती असो वा नसो, लढण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने तयार आहे.
महाविकास आघाडी झाल्यासही निवडणूक मजबूतपणे एकत्रित लढवली जाईल.
यावेळी कार्यक्रमास वसंत मोरे – निवडणूक समन्वयक, संजय मोरे पुणे शहरप्रमुख, गजानन थरकुडे, अनंत घरत प्रसिद्धी प्रमुख, पुणे उपस्थित होते.शिवसेनेच्या नेतृत्वाखालील पुणे शहर आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करीत असून
महानगरपालिकेत पुन्हा एकदा जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेना सज्ज आहे! असे मत गजानन थरकुडे यांनी व्यक्त केले.

हिंदू देवतांच्या डीपफेक, अश्लील प्रतिमा आणि साईट्स पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

  • जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्याचा राज्यसभेत विशेष उल्लेखाद्वारे आरोप

नवी दिल्ली/पुणे: हिंदू देव-देवतांचे एआय-आधारित डीपफेक आणि अश्लील स्वरूपातील चित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. ही गोष्ट अतिशय संतापजनक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे जाणीवपूर्वक अशा गोष्टी पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी राज्यसभेत केली.

खासदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी विशेष उल्लेखाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि मनस्ताप देणारे असल्याचे सांगत त्यांनी यामागे जाणीवपूर्वक धार्मिक भावना भडकवण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हेतू असल्याचा आरोप केला.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, अलीकडच्या काही महिन्यांत अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्सवर एआय-जनरेटेड, मॉर्फ्ड आणि डीपफेक अश्लील चित्रांचा मोठा प्रसार होताना दिसून येत आहे. हिंदू देवतांचे चित्रण खास करून लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रगत एआय-तंत्रज्ञान, डीपफेक टूल्स आणि इमेज मॅनिप्युलेशनच्या दुरुपयोगामुळे सायबर गुन्ह्याचा नवा धोका निर्माण झाला असून, पवित्र प्रतिमा विकृत करून मुक्तपणे प्रसारित केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याच्या कायदेशीर चौकटीत या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी कडक व्यवस्था नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. या कृत्यांच्या पद्धतशीर आणि हेतुपुरस्सर स्वरूपावरून हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.

केंद्र सरकारने या प्रकारातील दोषींवर कठोर आणि आदर्श कारवाई करावी, सोशल मीडिया कंपन्यांना एआय-आधारित शोधयंत्रणा, तत्काळ ‘टेकडाऊन’ प्रणाली आणि संवेदनशील सामग्रीसाठी कठोर पडताळणी प्रक्रिया अनिवार्य कराव्यात, अशी मागणी केली. यासोबतच, ‘हिंदू फेथ प्रोटेक्शन लॉ’ किंवा ‘अँटी-ब्लास्फेमी लॉ’ सारखा सर्वंकष कायदा करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली, ज्याद्वारे एआय-आधारित धार्मिक बदनामी थांबवता येईल.

१९ वर्षाखालील मुलींच्या गटातील पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा संपन्न

पुणे:जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे; पुणे शहर बॉक्सिंग संघटना तसेच पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे भव्य उद्घाटन दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी १९ वर्षाखालील मुलींच्या गटासाठी माजी गृहराज्यमंत्री व पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे आजीवन अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धेचा शेवटचा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात आणि खेळाडूवृत्तीने साजरा झाला.

या प्रसंगी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव भरतकुमार व्हावळ, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष सुरेशकुमार गायकवाड, जीवनलाल निंदाणे, राष्ट्रीय पंच ऋषिकेश वचकळ, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष क्षीरसागर साहेब, महाराष्ट्र बॉक्सिंग रेफ्रीज कमिशनचे सचिव अभिमन्यू सूर्यवंशी, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर, रिंग ऑफिशियल सनी परदेसी, प्रदीप वाघे, कुणाल पालकर, संजय यादव, मनोज जाधव, अमन शर्मा, आसिफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा 2025

१९ वर्षाखालील मुलींचा गट – अंतिम निकाल

(किलो वजन गटानुसार)

Below 45 किलो वजन गट
विजेती: सृष्टी संतोष चोरगे – पुणे शहर

45–48 किलो वजन गट
विजेती: वैष्णवी संग्राम कदम – पुणे शहर
उपविजेती: भुकन वैष्णवी नितीन – सोलापूर जिल्हा

48–51 किलो वजन गट
विजेती: सृष्टी विजय जाधव – पुणे जिल्हा
उपविजेती: वैष्णवी संजय बोऱ्हाडे – अहिल्यानगर जिल्हा

51–54 किलो वजन गट
विजेती: भूमिका राकेश लखन – पीसीएमसी
उपविजेती: सायली अशोक जाधव – पुणे शहर

54–57 किलो वजन गट
विजेती: हिना ताजुद्दीन शेख – पुणे जिल्हा
उपविजेती: पवार वैष्णवी बाबासाहेब – सोलापूर जिल्हा

57–60 किलो वजन गट
विजेती: राजगुरू रिया रमेश–पुणे शहर
उपविजेती: लक्ष्मी सतीश जाधव – सोलापूर जिल्हा

60–64 किलो वजन गट
विजेती: साक्षी संतोष केदार – सोलापूर जिल्हा
उपविजेती: कासिमा सुहेल पाटनवाला – पुणे शहर

64–66 किलो वजन गट
विजेती: श्रेया अमृतराव जाधव – सोलापूर जिल्हा
उपविजेती: बोंबले त्रिशा निलेश – पीसीएमसी

66–69 किलो वजन गट
विजेती: माने धिरा यशवंत – पुणे जिल्हा

69–75 किलो वजन गट
विजेती: समीक्षा भारत औसरमल –पुणे शहर
उपविजेती: चैत्राली सचिन लांडगे – पीसीएमसी

75–81 किलो वजन गट
विजेती: शेलके सायली चंद्रकांत – सोलापूर जिल्हा
उपविजेती: मुग्धा सचिन कापिले – पीसीएमसी

Above 81 किलो वजन गट
विजेती: महिमा दीपक वर्मा – पुणे जिल्हा
उपविजेती: सिमरन पवन चौगुले – पुणे शहर

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

गौरीच्या आई-वडिलांसह घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

“महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यव्यापी उपाययोजना राबवा; विवाहपूर्व समुपदेशन अनिवार्य करण्याची डॉ. गोऱ्हे यांची मागणी”

मुंबई, दि. ४ डिसेंबर :
डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीस पीडितेचे आई-वडील तसेच प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उपस्थित होत्या. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणात गंभीर विसंगती असून त्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले. तपासावर कोणताही दबाव नसल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले असून, कोणताही हस्तक्षेप सहन करणार नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, कुटुंबीयांनी मांडलेल्या मुद्द्यांनुसार ही आत्महत्या नसून खून असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. संबंधित प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम ८५ (IPC कलम ४९८अ )अंतर्गतही गुन्हा दाखल असून, छळ आणि मानसिक अत्याचाराचा स्पष्ट उल्लेख आहे. डॉ. गोऱ्हे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर केले असून, तपासाची देखरेख एक महिला आयपीएस अधिकारी यांनी करावी, अशीही विनंती करण्यात आली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले की, “डॉ. गौरीसारख्या सुशिक्षित, विद्वान मुलींचे अशाप्रकारे मृत्यू होणे ही केवळ व्यक्तिगत शोकांतिका नसून सामाजिक वेदना आहे. मी उपसभापती, स्त्री आधार केंद्राची अध्यक्षा आणि एक आई म्हणून अत्यंत संतप्त आहे.” एक डिसेंबर रोजी त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती, त्यानंतर पुन्हा मुंबईत परतून त्यांनी याबाबत शासन पातळीवर पाठपुरावा केला.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातील महत्त्वाचा आशय :

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यूमुळे राज्यभर तीव्र दुःख व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कुटुंबीयांच्या आरोपांनुसार दीर्घकाळ मानसिक छळ, तणाव आणि कौटुंबिक अत्याचारामुळे हा मृत्यू घडल्याची शक्यता आहे. त्यामुळे तपास दबावमुक्त, पारदर्शक आणि निष्पक्ष राहणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी प्रकरणात स्वतंत्र उच्चस्तरीय विशेष चौकशी समिती (एसआयटी) नियुक्त करण्याची मागणी केली आहे. या समितीत वरिष्ठ पोलीस अधिकारी, महिला संवेदनशील संस्था, मनोवैज्ञानिक आणि कायदेतज्ज्ञांचा समावेश करावा अशी मागणी आहे. चौकशीत कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये, यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

तसेच, पीडित कुटुंबावर कोणताही दबाव येऊ नये यासाठी विशेष संरक्षण, तातडीची कायदेशीर मदत, मानसिक समुपदेशन, तसेच गरजेनुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.

प्रकरणाचा तपास कालबद्ध पद्धतीने, म्हणजे तीस दिवसांत प्राथमिक आणि दहा दिवसांत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

याशिवाय, महिलांच्या सुरक्षिततेसह मानसिक आरोग्याच्या दृष्टीने राज्यातील तरुण मुलींसाठी महाविद्यालयीन स्तरावर विवाहपूर्व समुपदेशनाची अनिवार्यता लागू करावी, व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, प्रशिक्षित समुपदेशकांची नियुक्ती, गोपनीय तक्रार नोंद प्रणाली आणि भावनिक सक्षमीकरण सत्रे सुरु करावीत, अशा ठोस उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, “हा केवळ एका कुटुंबाचा शोक नाही, तर राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न आहे. म्हणून त्वरित आणि ठोस कार्यवाही अत्यावश्यक आहे.”