Home Blog Page 1510

शिरूर:विलास लांडेंचा पत्ता कट,अमोल कोल्हेच लढणार; शरद पवारांचे शिक्कामोर्तब

मी फक्त इच्छा व्यक्त केली-विलास लांडे

पुणे-शिरूर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या उमेदवारी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे कोल्हेंना दिलासा मिळाला आहे.

शिरूर लाेकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमकी उमेदवारी काेणाला मिळणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या हाेत्या. विद्यमान खासदार डाॅ. अमाेल काेल्हे यांनी आपण पुन्हा लाेकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले हाेते. मात्र, भाेसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने सदर दाेघात चुरस निर्माण झाली हाेती.

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातल्या निर्सग मंगल कार्यालय येथे साेमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांचे उपस्थितीत पक्षातील महत्त्वपूर्ण नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी शिरूर लाेकसभा मतदारसंघाचे अनुषंगाने आढावा घेण्यात आला आणि त्यावर मतदारसंघातील प्रमुख नेत्यांशी विचार विनिमय झाला. यावेळी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत पवार यांनी आगामी २०२४ च्या लाेकसभा निवडणुकीसाठी शिरूर मतदारसंघातून डाॅ. अमाेल काेल्हे यांच्या नावावर शिक्कामाेर्तब केले. त्यामुळे काेल्हे यांना दिलासा मिळाला असून, पक्षांर्तगत गटबाजी राेखण्यात त्यांना यश आले आहे.

याबाबत डाॅ. अमोल काेल्हे म्हणाले की, पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक् पार पडली. 2019 मध्ये सर्व कार्यकर्ते, नेत्यांनी ताकदीने निवडणूक लढविण्यास मला मदत केली. माजी आमदार विलास लांडे हे ज्येष्ठ नेते असून त्यांची साथ आमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या निवडणुकीत भाेसरी मतदारसंघात विलास लांडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हाेती. तशाचप्रकारे आगामी निवडणुकीत त्यांची साथ माझ्यासाठी बहुमूल्य आहे. निवडणुक लढविण्यासाठी काेणी इच्छा व्यक्त करणे यात काेणतेही गैर नाही.

विलास लांडे म्हणाले की, शरद पवार यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. संसदपटू व उत्कृष्ट वक्ता, अभिनेता म्हणून डाॅ. काेल्हे हे परिचित आहेत. मला 2009 मध्ये लाेकसभा निवडणुकीचे तिकीट दिले हाेते. 2019 मध्ये मला पुन्हा तिकिट दिले जाणार हाेते. परंतु ऐनवेळी डाॅ. अमोल काेल्हे यांचा प्रवेश झाला आणि त्यांना तिकीट दिले गेले. उमेदवारीसाठी मी केवळ इच्छा व्यक्त केली हाेती. याबाबत पवार यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तिकीट प्रश्नावर पडदा पडलेला आहे.

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे भारतीय बालकल्याण परिषदेचे आवाहन

मुंबई, दि. ५ : भारतीय बालकल्याण परिषद (इंडियन कौन्सिल फॉर चॉइल्ड वेल्फेअर अर्थात आयसीसीडब्ल्यू) नवी दिल्लीतर्फे दरवर्षी मुलांनी बजावलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात येतात. २०२३ च्या पुरस्कारांसाठी १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय बालकल्याण परिषदेतर्फे गेल्या ६६ वर्षांपासून हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी विविध स्त्रोतांकडून शिफारशी प्राप्त होतात. मात्र, ज्या बालकांच्या शौर्याची नोंद घेण्यात आलेली नाही, अशा मुलांचे धाडस आणि पराक्रमाचे कौतुक व्हावे म्हणून अर्ज मागविण्यात आले आहेत. सन २०२३ च्या पुरस्कारांची अधिक माहिती आणि नामांकन अर्जासाठी www.iccw.co.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जीवाला धोका किंवा शारीरिक दुखापत होण्याचा धोका असताना असामाजिक तत्व, गुन्हेगारांविरुद्ध धाडसाने कृती करणाऱ्या बालकांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात येणार आहे. त्यांच्यापासून अन्य बालकांना नि:स्वार्थ सेवेची प्रेरणा मिळावी, म्हणून हे पुरस्कार देण्यात येतात. अर्जदाराने अर्जासमवेत त्याने बजावलेल्या शौर्याची माहिती देणारे वर्णन २५० शब्दांत द्यावयाचे आहे. त्याच्या पुराव्यासाठी वृत्तपत्रीय कात्रण, प्रथम माहिती अहवालाची (एफआयआर) प्रत, घटनेविषयी दोन सक्षम अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेली कागदपत्रे जोडावीत. बालकाचे वय ६ ते १८ वर्षांदरम्यान असावे. बालक ज्या शाळेत शिक्षण घेत आहे, त्या शाळेचे मुख्याध्यापक, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्य बालकल्याण परिषदेचे सरचिटणीस, जिल्हाधिकारी किंवा समपदस्थ अधिकारी, पोलिस अधिकारी यापैकी दोन जणांची शिफारस जोडणे आवश्यक आहे. १ जुलै २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत घटना घडलेली असावी.

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची निवड भारतीय बालकल्याण समितीतर्फे गठित उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून करण्यात येते. अर्ज सादर केला म्हणजे निवड होईलच, असे नाही. कोणत्याही कारणास्तव नाकारलेले अर्ज पुन्हा विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्कारासाठी आलेला अर्ज निवड समितीला योग्य वाटला, तर ते आपल्या विवेक बुद्धीनुसार अटी, नियम शिथिल करण्याचा विचार करू शकतात. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. सुवर्ण, रौप्य पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप राहील. पुरस्कारांची  सविस्तर माहिती अशी (कंसात पुरस्काराची रक्कम) : भारतीय बालकल्याण परिषद भारत पुरस्कार (१ लाख रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद ध्रुव पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद मार्केंडेय पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद श्रावण पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद प्रल्हाद पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद एकलव्य पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद अभिमन्यू पुरस्कार (७५ हजार रुपये), सर्वसाधारण पुरस्कार (४० हजार रुपये). एकूण २५ पुरस्कार देण्यात येतील.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यांना त्यांचे शालेय शिक्षण होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते. तसेच पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्थसाहाय्य केले जाते. अर्जाची प्रत राज्याच्या बालकल्याण समितीकडे पाठविणे आवश्यक आहे. त्याचा पत्ता असा : सचिव, महाराष्ट्र राज्य बालकल्याण परिषद, बाल भवन, चौधरी संकुल नाशिक- पुणे महामार्ग, पळसे, ता. जि. नाशिक” ४२२२१०१ (महाराष्ट्र), ई- मेल आयडी : presidentmsccw@gmial.com, rkjadhav1948@gmail.com येथे पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रिलायन्सच्या सोन्याच्या शोरूमवर भर दिवसा दरोडा,13 कोटीची लुट , १५ किलो सोने,दीडशे विविध रत्ने पोत्यात भरून गोळीबार करत पसार

सांगली-मिरज रस्त्यावरील रिलायन्स कंपनीच्या सोन्याच्या शोरूमवर भरदिवसा रविवारी दुपारी ३ वाजता आठ दरोडेखोरांनी गोळीबार करत सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये त्यांनी जवळपास कोटी रुपयांची लूट केली. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक ग्राहक जखमी झाला. सांगली पोलिसांनी जिल्ह्याची तातडीने नाकेबंदी केली आहे. याप्रकरणी पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. सांगली-मिरज हमरस्त्यावरील मार्केट यार्ड चौकात व जिल्हा पोलिस मुख्यालयापासून अवघ्या दोन हजार फुटांवरील रिलायन्सच्या शोरूममध्ये रविवारी दुपारी ३ वाजता दरोडेखोर ग्राहक म्हणून शिरले.

आठ दरोडेखोरांनी आत प्रवेश करून रिलायन्सच्या व्यवस्थापकाला पोलिस असल्याचे सांगत दुकानची तपासणी करायची म्हणत धमकावले. त्यानंतर शोरूममधील ग्राहकांना बाहेर काढले. त्याच वेळी दुकानातील सुमारे २० कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून त्यांना एका खोलीत डांबले. काही कर्मचाऱ्यांनी विरोध करताच त्यांच्यावर गोळीबार केला. यात दुकानातील एक ग्राहक जखमी झाला. दरोडेखोरांनी दुकानातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. तसेच पोलिसांना माग काढता येऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज जमा होणारे ५ पैकी ४ उपकरणेही दरोडेखोरांनी पळवली आहेत.


रिलायन्सच्या शोरूममधील जवळपास १५ किलो सोने दरोडेखोरांनी पोत्यात भरले. तसेच जवळपास दीडशे विविध रत्ने पेटीत टाकून पुन्हा गोळीबार करत पसार झाले. सोने व ३-४ कोटींची रत्ने दरोडेखोरांनी लुटली आहेत. रात्री उशिरापर्यंत दुकानात शिल्लक असलेल्या किरकोळ स्टॉकची मोजणी सुरू होती. दरोड्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेलींसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोर एका स्कॉर्पिओ गाडीतून घटनास्थळी आले होते. दरोडेखोर सोलापूर किंवा कर्नाटकाकडे पळाले असल्याचा अंदाज आहे.

मुंबई विमानतळावर सुमारे 6.2 कोटी रुपये किमतीचे 10 किलो सोने केले जप्त, 2 जण ताब्यात

नवी दिल्‍ली, 4 जून 2023

महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबईने 3 आणि 4  जून 2023 रोजी दोन वेगवेगळ्या कारवाईत 10 किलोग्राम सोने जप्त केले आहे.

पहिल्या प्रकरणात शारजाहून मुंबईत एयर इंडिया एक्स्प्रेस फ्लाईट क्रमांक IX 252 ने आलेल्या दोन प्रवाशांना  विशिष्ट माहितीच्या आधारे, विमानतळावर थांबवण्यात आले. या प्रवाशांची तपासणी केल्यावर अंगाभोवती गुंडाळलेल्या कपड्यांमध्ये  8 किलो वजनाचे 24 कॅरेटचे परदेशी शिक्का  असलेले सोन्याचे 8 बार सापडले. याविषयीच्या अधिक माहितीच्या आधारे तातडीने कारवाई  करत या प्रवाशाच्या आणखी एका साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. 8 किलो वजनाचे 4.94 कोटी रुपयांचे सोने बारच्या स्वरुपात आढळले. पहिल्या प्रकरणात तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या प्रकरणात दुबईवरून येत असलेल्या एका भारतीय नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3 जून 2023 रोजी चौकशीसाठी थांबवण्यात आले आणि त्याच्या सामानाची तपासणी केली असता  56 लेडीज पर्स त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आल्या.  या सर्व लेडीज पर्सच्या धातूच्या पट्ट्यांमध्ये चंदेरी रंगाच्या धातूच्या तारांच्या स्वरुपात 24 कॅरट सोने लपवण्यात आल्याचे आढळले. ताब्यात घेतलेल्या या सोन्याच्या तारांचे निव्वळ वजन 2005 ग्रॅम होते आणि त्यांची अंदाजे किंमत सुमारे रु.1,23,80,875/- इतकी होती. या प्रकरणातील संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या प्रकरणात वरवर पाहता सुशिक्षित व्यक्तींचा सोन्याच्या तस्करीचे नियोजन आणि कृतीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आढळले.

या दोन्ही प्रकरणात गुन्हे करण्याचे पूर्णपणे नवे प्रकार दिसून आले, ज्यातून डीआरआय अधिकाऱ्यांना सोन्याच्या तस्करी करणाऱ्या गटांच्या तपासणीमध्ये नियमितपणे निर्माण होत असलेली आव्हाने समोर आली.  परदेशी शिक्के असलेल्या आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आलेल्या चंदेरी रंगाच्या धातूच्या तारांच्या स्वरुपात लपवलेले 24 कॅरट सोने,  सोन्याच्या तस्करीच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यामधली  ठळक घटना ठरली आहे.

या दोन्ही कारवाईत 6.2 कोटी रुपयांचे एकूण 10 किलो सोने जप्त करण्यात आले आणि संबंधित प्रकरणांमध्ये 4 प्रवाशांना अटक करण्यात आली. या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे.

पिंपरी, भोसरी, चाकणमध्ये दीड तासांपर्यंत भारनियमन

पुणे, दि. ०४ जून २०२३: विजेची मागणी वाढल्यामुळे महापारेषणचे ४०० केव्ही क्षमतेच्या अतिउच्चदाब (EHV) चाकण व लोणीकंद उपकेंद्रामध्ये अतिरिक्त वीजभार निर्माण झाला. परिणामी चाकण व लोणीकंद उपकेंद्र अतिभारित (ओव्हरलोड) होण्याचा धोका टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेद्वारा काही अतिउच्चदाब उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे पिंपरी, चिंचवड गाव, भोसरी एमआयडीसी व गावठाण, मोशी, नाशिक रोड तसेच चाकण एमआयडीसी अंतर्गत काही गावांचा वीजपुरवठा रविवारी (दि. ४) दुपारी २.३० नंतर अर्धा ते दीड तासांपर्यंत बंद ठेवण्यात आला होते.

याबाबत माहिती अशी, की विजेच्या वाढलेल्या मागणीमुळे महापारेषण कंपनीचे चाकण व लोणीकंद ४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रामध्ये विजेचा भार मोठ्या प्रमाणात वाढला. या अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रामधील विजेच्या अतिरिक्त भाराचे व्यवस्थापन शक्य नसल्याने दुपारी २.३० च्या सुमारास स्वयंचलित यंत्रणेद्वारे विजेचे भारनियमन करण्यात आले. यामुळे पिंपरी विभाग अंतर्गत चिंचवड गाव, रावेत, वाल्हेकरवाडी, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, वाकड व पिंपरीच्या काही भागात दीड तास, भोसरी विभाग अंतर्गत भोसरी, नाशिकरोड, मोशी व भोसरी एमआयडीसीमधील भागात सुमारे एक तास तसेच राजगुरुनगर विभाग अंतर्गत चाकम एमआयडीसीमधील नानेकरवाडी, कुरुळी, चिमळी, म्हाळुंगे, निघोजे, खालुंब्रे, सावरदरी, वासुली, शिंदे, बांभोली, वराळे, येलवडी, सांगुर्डी या गावांमधील रहिवासी, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा ३.३० ते ४ वाजेपर्यंत अर्धा तास बंद ठेवावा लागला.

दरम्यान, वादळामुळे केसनंद येथे एका दुकानाचा लोखंडी पत्र्याचा फलक वीजखांबावर पडला. हा खांब वाकल्याने वीजवाहिन्या देखील तुटल्या. त्यामुळे केसनंद गाव व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. या यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. तसेच महापारेषणच्या लोणीकंद ते काटापूर आणि लोणीकंद ते रांजणगाव या २२० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांच्या आवश्यक दुरुस्ती कामामुळे दुपारी ४.३० वाजता वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे वढू खुर्द, तुळापूर, फुलगाव इस्टेट आदी परिसरातील सुमारे दोन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा रात्री ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे. 

नवीन संसद इमारत ही राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून उभे राहिलेले मंदिर – विनायक देशपांडे यांची भावना

पुणे, प्रतिनिधी,

नवी दिल्लीत उभी राहिलेली नवीन संसद इमारत ही स्वतंत्र भारताने स्व:तासाठी उभारलेली पहिली संसद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आणि हजारो मजुरांच्या राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून लोकशाहीचे हे नवे मंदिर उभे राहिले. ही अप्रतिम देखणी वास्तू भावी पिढ्यांना मोठ्या प्रमाणात प्रेरणा व आत्मविश्वास देईल, असे मत नव्या संसद भवन प्रकल्पाचे मुख्य सल्लागार विनायक देशपांडे यांनी रविवारी व्यक्त केले.
स्मार्ट पुणे फाउंडेशनतर्फे पुण्यातील कोथरूडचे सुपुत्र असलेल्या देशपांडे यांच्या स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही देशपांडे यांचा सत्कार केला. स्मार्ट पुणे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांनी प्रास्तविक केले. उत्तरार्धात प्रसिद्ध वास्तुविशारद केतन सुधीर गाडगीळ यांनी देशपांडे यांच्याशी संवाद साधला. नव्या संसद भवनाच्या निर्मितीची कथा जाणून घेतली.
नवी संसद ही केंद्र सरकारने हाती घेतलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील मेरूमणी आहे. टाटा प्रोजेक्ट्सकडे हे काम आल्यानंतर आम्ही राष्ट्रीय कर्तव्य म्हणूनच याकडे पाहिले. भूमीपूजनावेळी पंतप्रधान मोदींच्या मनातील राष्ट्रप्रेमाच्या भावनेची सर्वांना जाणीव झाली. तीच भावना सर्वांच्या मनात उतरली. त्यामुळे देशाच्या विविध भागातून आलेल्या मजुरांपासून ते प्रकल्पात विविध टप्प्यांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काम केले. त्यामुळेच करोना व लॉकडाउनसारख्या आव्हानात्मक काळातही २८ महिन्यांच्या विक्रमी वेळेत हे काम पूर्ण झाले, असे देशपांडे म्हणाले. या काळातील आव्हाने, रात्रंदिवस केलेले काम, कामाचे व्यवस्थापन याचे बारकावेही देशपांडे यांनी उलगडले.
या नव्या इमारतीत भारतीय संस्कृती, भारतीय स्थापत्यकला आणि अत्याधुनिक स्थापत्यशास्त्राचा अनोखा मिलाफ आहे. विमल पटेल यांनी त्याचे आरेखन केले. तर सांस्कृतिक मंत्रालयाने कुठे काय असावे, याचे नियोजन केले. यासाठीच्या विविध वस्तू देशाच्या कानाकोपऱ्यातून आणण्यात आल्या. याशिवाय विविध राज्यातील कलाकारांनी त्याची कलाकुसर केली. त्यामुळे या वास्तूला राष्ट्रीय एकात्मकेचे प्रतीक म्हणता येईल. ही इमारत पर्यावरण पूरक, शाश्वत, भूकंपरोधी असून भविष्याचा विचार करून यात अधिक आसनक्षमता ठेवण्यात आली आहे. लोकसभेची रचना राष्ट्रीय पक्षी मोराप्रमाणे, राज्यसभेची रचना राष्ट्रीय फूल कमळाप्रमाणे आहे. बांधकाम सुरू असताना तीन वेळा पंतप्रधानांनी अचानक प्रकल्पस्थळी येऊन कामगारांशी आपुलकीने संवाद साधला. त्यांना काही अडचण नाही ना, त्यांना या प्रकल्पाविषयी काय वाटते हे जाणून घेतले. त्यामुळे त्यांना नवी ऊर्जा मिळाली. टाटा समूहाने दिलेला संपूर्ण पाठिंबा व देशभावनेतून कामाकडे पाहण्याची शिकवण महत्त्वाची ठरली. या राष्ट्रीय प्रकल्पाची जबाबदारी मला मिळाली, हे मी माझे परमभाग्यच समजतो, असे देशपांडे म्हणाले.
स्वतंत्र भारतासाठी नवी संसद उभारण्याची अनेकदा चर्चा झाली. पण फक्त नरेंद्र मोदीच आपल्या संकल्पनेतून ती साकार करू शकले. पुणेकर देशपांडे यांच्या नेतृत्वात आकाराला आलेली ही भव्यदिव्य इमारत अतिशय सुबक, देखणी आणि थक्क करणारी आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी दिल्ली ही जगातील सर्वात आकर्षक सुबक राजधानी ठरेल असे खासदार प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. अजित वाराणशीवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन

देव आनंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आदी सुपरस्टार अभिनेत्यांच्या आईची तर कधी वहिणी, बहिणीचे ममत्व रुपेरी पडद्यावर जिवंत करणाऱ्या, ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना यांचे आज निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान, सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी, नात- नातजावई असा परिवार आहे. सुलोचना दीदी यांच्या निधनाने मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाची अखेर झाली असल्याचे म्हटले जात आहे. सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर सोमवार, 5 जून रोजी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्रभादेवी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी, 3 जून रोजी सुलोचना दीदी यांची तब्येत बिघडली आणि अशा स्थितीत त्यांना काल रात्रीपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मार्च महिन्यातही सुलोचना यांची तब्येत बिघडली होती आणि त्यानंतरही त्यांना श्वासोच्छवासाच्या आणि वयोमानाशी संबंधित इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, रुग्णालयातील 3 आठवड्यांच्या उपचारानंतर त्या बऱ्या झाल्या. सुलोचना दीदी यांनी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याशिवाय,  2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बेळगावमध्ये 30 जुलै 1928 रोजी जन्म झालेल्या सुलोचना दीदी यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1946 पासून केली. 1946 ते 1961 या काळात सासुरवास (1946), वहिनीच्या बांगड्या (1953), मीठ भाकर, सांगते ऐका (1959), लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली. सुलोचना दीदी यांनी 250 हून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.  

सुलोचना दीदी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका ताकदीने साकारली.  एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी आपली छाप सोडली. देव आनंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आदी सुपरस्टार अभिनेत्यांच्या आईची ऑनस्क्रीन भूमिका साकारली होती. देव आनंद यांची भूमिका असलेल्या बऱ्याच चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये जब प्यार किसीसे होता है, प्यार मोहब्बत, दुनिया, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब. , वॉरंट आणि जोशिला आदी चित्रपटांचा समावेश आहे. राजेश खन्ना यांच्या दिल दौलत दुनिया, बहरों के सपने, डोली, कटी पतंग, मेरे जीवन साथी, प्रेम नगर, आक्रमन, भोला भला यांचा समावेश आहे. त्याग , आशिक हूँ बहरों का आणि अधिकार आदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. तर, हीरा, झुला, एक फूल चार कांटे, सुजाता, मेहरबान, चिराग, भाई बहन, रेश्मा और शेरा आदी चित्रपटांमध्ये त्यांनी सुनिल दत्त यांच्यासोबत भूमिका साकारली.  

महाराष्ट्रातील ९ रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन

महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहिम-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे दि. ४: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महारेल’तर्फे महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या ४४० कोटी रुपयांच्या ९ रेल्वे ओलांडणी उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि नियोजित ७०० कोटी रुपयांच्या ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून गतीने ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली.

शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्री. गडकरी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल कांबळे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, राज्य आणि केंद्र एकत्र आल्याने चांगली कामे उभी रहात आहेत. रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या ठिकाणी फाटक नसले की नागरिकांच्या जीवाला धोका असतो. म्हणून असे प्रकल्प लवकर पूर्ण करून जनतेचा त्रास दूर करण्याचे प्रयत्न आहे. राज्यात रेल्वेसंबंधी प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावेत म्हणून राज्य शासनाने महारेलची स्थापना केली. महारेलतर्फे वेगाने कामे करण्यात येत आहेत. राज्यात ९ उड्डाणपूलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपूलांचे भूमिपूजन प्रथमच होत आहे. उड्डाणपूल आणि भूयारी मार्गाच्या कामांमुळे जनतेचा वेळ वाचणार आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
नागरिकांचा वेळ वाचावा आणि कार्यक्षमता वाढावी यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. देशात पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामे महाराष्ट्रात सुरू आहेत. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ क्षमता आहे, दळवळण सुविधा आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. राज्यातील प्रकल्प उभारणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वेगाने निर्णय घेण्यात येत आहेत. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात राज्यात गुंतवणूक करीत आहेत. समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने विकासाचा महामार्ग होणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्यातील रस्त्यांच्या कामाला चालना
राज्यात केंद्र सरकारच्या सहकार्याने अनेक विकासकामे होत आहे. मडगाव-मुंबईच्या रुपाने चौथी वंदे भारत रेल्वे महाराष्ट्राला मिळाली आहे. मुंबई-पुणे महामार्गाच्या माध्यमातून पुण्याच्या प्रगतीला गती मिळाली आहे. या महामार्गावर प्रवास करताना वेळ वाचावा यासाठी खालापूर ते सिंहगड इन्स्टिट्यूट असा जगातला सर्वाधिक रुंदीचा बोगदा मिसिंग लिंक अंतर्गत तयार करण्यात येत आहे. पुणे मेट्रो, पुण्यातील रिंगरोड, चांदणी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक कामे करण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाद्वारे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा आणि योजनांचा लाभ देण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कात्रज चौक ते खडीमशीन मोठा पूल तयार केल्यास त्याचाही लाभ नागरिकांना होईल. महाबळेश्वर येथील वाई-सुरूर-महाबळेश्वर-पोलादपूर हा मार्ग केंद्राने केल्यास पर्यटन वाढीसाठी त्याचा उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.

दरवर्षी ११ उड्डाणपूल याप्रमाणे १६ हजार कोटींची कामे करणार-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यावेळी श्री.गडकरी म्हणाले, सेतू बंधन योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ११ उड्डाणपूलांसाठी १०० टक्के निधी भारत सरकारने मंजूर केला आहे. महाराष्ट्र प्रगतीशील आणि संपन्न राज्य आहे. राज्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे फाटकांचे रुपांतर उड्डाणपुलात करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन आणि रेल्वेने मिळून ९ उ्डाणपूल पूर्ण केले आणि ११ पूलांचे भूमिपूजन होत आहे. दरवर्षी ११ पूल याप्रमाणे १६ हजार कोटींची ही कामे करण्यात येणार आहेत. येत्या काळात फाटकमुक्तीसाठी उ्डाणपूल बांधून जनतेला चांगली सुरक्षा देण्यात येईल.

पालखी मार्गाचे काम राज्याच्या वैभवात भर घालणारे होईल
महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे. महामार्ग आणि रस्त्यांची कामे वेगाने होत आहे. पुण्यात पालखी मार्गाचे काम वेगाने होत आहे. पालखी तळाच्या विकासाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी चांगला आराखडा करून ही कामे पूर्ण करण्यात येतील. पालखी मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल आणि महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे हे काम होईल.

’महारेल’ गुणवत्तापूर्ण काम करेल
‘महारेल’ने रेल्वेचे नियम लक्षात घेऊन चांगले काम केले आहे. योजनेअंतर्गत एकूण ९१ पूल उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात २५ आणि दुसऱ्या टप्प्यात ६६ पूल प्रस्तावित आहेत. यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना महारेलला देण्यात आल्या असून त्यांच्याकडेच ही जबाबदारी देण्यात येणार आहे. महारेल गुणवत्तापूर्ण कामे करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वेच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारने रेल्वेसह स्थापन केलेल्या महारेलने चांगले काम केले आहे. या सर्व प्रकल्पात रेल्वेच्या नियमांचे पालन करतानाच वेळेत काम पूर्ण करण्यात आले आहे, असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

४४० कोटी रुपयांच्या ९ उड्डाणपुलांचे लोकार्पण
महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे उभारण्यात आलेल्या ४४० कोटी रुपयांच्या राज्यातील ९ उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले. यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे मंत्रालयाच्या यांच्या भागीतदारीतून उभारण्यात आलेल्या ८ पुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर केंद्रीय रस्ते निधीतून सेतूबंधन योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या एका पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. यात मध्य रेल्वेच्या पाटण-पंढरपूर राज्य महामार्गावरील मसूर ते शिरवडे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक क्र. ९२ येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या अतिग्रे-इचलकरंजी राज्य महामार्गावरील रुकडी ते हातकणंगले रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. २० येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या रहिमतपूर-सातारा रोडवरील रहिमतपूर ते तारगाव रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र.८१ येथील दोन पदरी उड्डाणपूल, पश्चिम रेल्वेच्या अमळनेर-चोपडा राज्य महामार्गावरील अमळनेर ते टाकरखेडे रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. १३६ येथील दोन पदरी उड्डाणपूल, पश्चिम रेल्वेच्या सिंदखेडा-चिमठाणा राज्य महामार्गावरील सोनशेलू ते शिंदखेडा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ११२-ए येथील दोन पदरी उड्डाणपूल, दक्षिण मध्य रेल्वेच्या हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावरील हिंगोली ते धामणी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. १४४बी येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या डोंगरगाव-गुमगाव रोडवरील बुटीबोरी ते अजनी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ११६ येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या उमरेड- बुटीबोरी रोडवरील बुटीबोरी ते सिदी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. १११ येथील दोन पदरी उड्डाणपूलाचा आणि सेतूबंधन योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या उमरेड बस स्टॅन्ड जवळील उमरेड ते भिवापूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र.३४ येथील दोन पदरी उड्डाणपूलाचा समावेश आहे.

७०० कोटी रुपयांच्या ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन
केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते यावेळी सेतू बंधन योजनेअंतर्गत महारेलतर्फे उभारण्यात येणाऱ्या ७०० कोटी रुपयांच्या ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजनदेखील करण्यात आले. यात पालघर जिल्ह्यातील तेवडीरोडवरील दिवा ते वसई रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. १० येथील दोन पदरी उड्डाणपूल, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा-वडगाव रोडवरील श्रीगोंदा रोड ते बेलवंडी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ८ येथील दोन पदरी उड्डाणपूल, सांगली जिल्ह्यातील बुधगाव-सांगली रोडवरील सांगली ते माधवनगर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. १२९ येथील दोन पदरी उड्डाणपूल, सातारा जिल्ह्यातील कोळवडी रेवडी रोडवरील पळशी ते जरंडेश्वर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ५२ येथील दोन पदरी उड्डाणपूल, सोलापूर जिल्ह्यातील आसरा चौक पुलाजवळील सोलापूर ते वाडी रेल्वे स्थानकांदरम्यान सीएच ४५८/५ येथील दोन पदरी उड्डाणपूल, धाराशिव जिल्ह्यातील ढोकी ते धाराशिव रोडवरील पालसप ते कळंबरोड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ३४ येथील दोन पदरी उड्डाणपूल, लातूर जिल्ह्यातील लातूर शहर रस्त्यावरील कुर्डुवाडी ते लातूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. २ येथील दोन पदरी उड्डाणपूल, जळगाव जिल्ह्यातील शिरसोली ते जळगाव रेल्वे स्थानकांदरम्यान जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील दोन पदरी उड्डाणपूल आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-सांगोला रोडवरील कुर्डुवाडी ते मिरज रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. २४ येथील दोन पदरी उड्डाणपूलांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव टाऊन रोडवरील जळंब ते खामगाव रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ६ येथील भुयारी मार्ग, ठाणे जिल्ह्यातील कळमगाव जवळील आटगाव ते तानशेत रेल्वे स्थानकांदरम्यान सीएच ९८ /२ येथील भुयारी मार्गाच्या कामाचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

नेत्यांनी गद्दारांना ताकद देण्यापेक्षा सच्च्या कार्यकर्त्यांना ताकद दिली तरच कॉंग्रेसची निर्विवाद सत्ता

कॉंग्रेसचे उमेदवार पाडणारे पक्षातील गद्दार नेत्यांच्या समवेत मिरवत राहतील तोवर कॉंग्रेसचे खरे नाही -माजी मंत्र्यांनी व्यक्त केली खदखद

पुणे- कॉंग्रेसचा पराभव करण्याची ताकद भाजपात नाहीच, पण तरीही पराभव होत आला त्याला कारण कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत गद्दारी आणि गद्दारांना नेत्यांकडून मिळणारी ताकद हेच असल्याचे स्पष्ट भाषेत एका माजी मंत्र्यांनी सुनावले आहे. मुंबई टिळक भवन येथे पुणे लोकसभा २०२४ निवडणुकीबाबत बाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी माजी मंत्री असलेल्या एका नेत्याने पुणे शहरात काँग्रेस पक्षाचे गटबाजी मुळे प्रचंड नुकसान झाले कॅन्टोन्मेंट,शिवाजीनगर विधानसभा संघात १०० टक्के निवडून येणार्‍या काँग्रेस उमेदवारांचा शहरातील अंतर्गत गटबाजीमुळे थोड्या मतांनी पराभव करवून पक्षाचे फार मोठे नुकसान करण्यात आले, तरीही अशा गद्दारांची दखल नेत्यांनी घेतली नाही अशी पोटतिडकीने खंत प्रदेशाध्यक्ष व प्रदेश वरिष्ठां पुढे मांडली अश्या तऱ्हेने निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गद्दारी व धोका देणाऱ्या व्यक्तींवर पक्षाच्या नियमानुसार कारवाई करावी आणि काँग्रेस पक्षाच्या प्रामाणिक सच्चा कार्यकर्त्याला ताकद द्यावी अशी भूमिका पोटतिडकीने यावेळी मांडली.

एक नेते तर निवडणूक हारण्यासाठीच उमेदवारी मिळवितात कारण त्यातच त्यांचा फायदा दडलेला असतो असाही आरोप यावेळी काही कार्यकर्त्यांनी माध्यम प्रतीनिधी यांच्याशी खाजगीत बोलताना केला.ते म्हणाले ते कायम दिल्ली आणि मुंबईत बड्या बड्या नेत्यांच्या मागे पुढे जी जी करत असतात मात्र त्यांचा पुण्यातील कोणत्याही पालिकेच्या वार्डात देखील प्रभाव नसतो किंवा संपर्क नसतो,जे महापालिकेच्या निवडणुकीला कधी निवडून येऊ शकत नाहीत अशांना बडी बडी पदे देऊन उमेदवारी देखील ते मिळवितात पण हि उमेदवारी त्यांनी जिंकण्यासाठी नाही तर हारण्यासाठी मिळविलेली असते आणि त्यातच त्यांचा मोठा आर्थिक फायदा दडलेला असतो असाही दावा काल टिळक भवनाबाहेर काही मान्यवर कार्यकर्त्यांनी केला होता एक नगरसेवक गेली ३५ वर्षे नगरसेवकच आहेत कधीच त्यांना आमदारकीचे तिकीट दिले गेले नाही,ते निवडून येऊ नये यासाठी राष्ट्रवादीशी सौदेबाजी केली गेली.असाही आरोप केल गेला.

दरम्यान कॉंग्रेसमध्ये निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार असताना केवळ अशी संधिसाधू आणि पक्षाचे नुकसान करून तुंबडी भरू मंडळीच्या भीतीने क्षमता असतानाही काही जण निवडणूक लढविण्यास कचरत असतात असेही बोलले जाते.

विश्वजित कदम यांच्यावर देखील आता टीका होऊ लागली आहे त्यांनी सुद्धा पुण्यात निवडणूक लढविली तेव्हा मनापासून लढविली नसल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. कदम आता बहुतेक वेळा भाजपच्या नेत्यांसमवेत रमलेले असतात,बहुधा त्यांना भाजपा ची भीती वाटत असावी पण त्यांनी कॉंग्रेस मध्ये राहून भाजपाचे काम करण्यापेक्षा थेट भाजपात जावे असेही कार्यकर्ते बोलू लागले आहेत.निवडणूक समयी झालेल्या राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यात त्यांनी राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना गांधीच्या समोर बसवून पुण्यात फिरकू दिले नव्हते आणि पुणेकरांशी त्यांचा संबध येणार नाही याची दक्षता घेतली होती असा आरोप त्यांच्यावर केला जातो आहे.

ज्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांचा मोठ्ठा समूह आहे,त्यांना बाजूला सारणारे एकटे दुकटे असतात, त्यांच्या बरोबर ना कार्यकर्त्यांचा समूह असतो ना जनसंपर्क त्यांचा असतो पण नेत्यांच्या आगे मागे फिरून त्यांनी आपले स्थान बळकट केलेले असते अशा बहुरूप्यांना नेत्यांनी ओळखले पाहिजे असा एकूण सूर आहे.

कात्रजमध्ये कोल्हापूरकर प्रवाश्याला लुटले

पुणे- शहरातील कात्रज भागात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणावर कोयत्याने वार करुन चोरट्यांनी रोकड लुटल्याची घटना घडली.

सचिन वसंत तळवार (वय -३१, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, कोल्हापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सचिन यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदर तक्रारीनुसार तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सचिन तळवार पुण्यात कामानिमित्त आले होते. ते कात्रज भागातून निघाले होते. त्या वेळी तीन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि पत्ता विचारण्याचा बहाणा केला.चोरट्यांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखविला. त्यांच्याकडील असलेली ४५०० रुपयांची रोकड हिसकावूनपसार झाले सचिन यांनी चोरट्यांना विरोध केला. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यांच्याकडील रोकड हिसकावून चोरटे पसार झाले. जखमी झालेले सचिन यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. कोल्हापूरमधील शाहुपुरी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. शाहुपुरी पोलिसांनी गुन्हा तपासासाठी भारती विद्यापीठ पोलिसांकडे सोपविला असून सहायक पोलीस निरीक्षक रसाळ तपास करत आहेत.

रक्तदान शिबीराच्या मध्यमातून नागरिकांचे प्राण वाचवावे: पालकमंत्री चंद्रकांत पाटील

एक हजारहून अधिक नागरिकांचे रक्तदान , आयोजक सनी निम्हण यांचे पालकमंत्र्यांकडून विशेष कौतुक

पुणे,ता.४: ” छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःचे रक्त सांडले, आपण रक्तदान शिबिराच्या माध्यमातून लोकांचे प्राण वाचवले पाहिजेत.
पुणे शहर व जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याने अनेकांचे प्राण वाचतील” अशी कौतुकाची थाप पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निम्हण यांना दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोमेश्वर देवस्थान, सोमेश्वर फाउंडेशन, विठ्ठल सेवा मंडळ यांच्या माध्यमातून सोमेश्वर मंदिर, सोमेश्वरवाडी, पाषाण (पेठ जिजापुर) या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी रविवार (ता.४) जून केले होते. शिबीराचे उदघाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, “शासनाच्या वतीने तिथीप्रमाणे रायगडावर दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. वर्षभरात प्रत्येक जिल्ह्यात ‘जाणता राजा’ कार्यक्रम शासनाच्या वतीने घेतला जाईल, ज्यामधून प्रत्येक घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहचेल. प्रत्येक जिल्ह्यातील हजारो तरुणांना मोफत रायगडाचे दर्शन दिले जाणार आहे.शिबिरासाठी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांचे विशेष सहकार्य लाभले. १०४१ रक्तदात्यांचे रक्तसंकलन अक्षय रक्त पेढी यांनी केले.

यावेळी सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष पोपटराव जाधव, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे राहुल कोकाटे, खंडू अरगडे, तानाजी काकडे, शंकर घोलप, सुनील खुळे, भरत जोरे , भारतीय जनता पक्ष कोथरुड विधानसभा माजी अध्यक्ष प्रकाश बालवडकर, उमेश वाघ, प्रमोद कांबळे, स्विकृत माजी नगरसेवक सचिन पाषाणकर, गोवर्धन बांदल, सरपंच नांदेगाव सुनील जाधव,
शिवसेना समन्वय कोथरूड विधानसभा संजय निम्हण, अध्यक्ष सोमेश्वरवाडी ग्रामस्थ शाम काकडे, दक्षिण अभिनेता देव गील ,
औंध गाव देवस्थान विश्वस्त मंडळ योगेश जुनवणे, महेंद्र जुनवणे, हेरंब कलापुरे आदी उपस्थित होते.

भारत आणि युरोपीय देशांत व्यापारासोबतच प्रेम आणि स्नेह देखील घट्ट व्हावा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 4 : भारत आणि युरोपीय देशातील सांस्कृतिक संबंध, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देत असतानाच “इन्वेन्शन आणि इनोवेशन” चा प्राधान्याने विचार करावा व वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धनाचे कार्य वाढावे; यासाठी महाराष्ट्र सतत सोबत राहील, दोन्ही देशांत व्यापार वाढावा पण प्रेम व स्नेह देखील घट्ट व्हावा, अशी अपेक्षा वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

“द कौन्सिल ऑफ युरोपीयन चेंबर इन इंडिया” च्या वतीने मुंबईतील ताज हॉटेल येथे आयोजित “युरोपियन डे” समारंभात ते बोलत होते. मंचावर मध्य प्रदेशचे सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग तथा विज्ञान व तंत्र विज्ञान मंत्री श्री ओमप्रकाश सकलेचा, स्वीडन च्या कौन्सिल जनरल ॲना लेकवॉल, द कौन्सिल ऑफ युरोपीयन चेंबर इन इंडियाच्या डायरेक्टर डॉ. रेणू शोम, अध्यक्ष पियुष कौशिक, उपाध्यक्ष राजीव शर्मा उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, भारत आणि युरोपीय देशांचे संबंध व्यापारिक आणि आर्थिक क्षेत्रात अधिक दृढ व्हायला हवे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जागतिक स्तरावर प्रगती करीत आहे. “वसुधैव कुटुंबकम” ही भावना आणि हे विचार जगात पोहोचावे यासाठी मोदीजींनी पुढाकार घेतला आहे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान च्या पुढे “जय अनुसंधान” चा नारा देत नवीनतम आणि संशोधन (इनोवेशन आणि इन्वेन्शन) याकडे आता भारत लक्ष देत आहे. आपणही यासाठी पुढे यावे; फक्त संशोधन करताना नव्या समस्या निर्माण होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.

जागतिक पर्यावरण बदलाचा प्रश्न संपूर्ण जगाला सतावत असून पर्यावरण व वन  संरक्षण ही आपण आपली जबाबदारी समजून “ग्लोबल वॉर्मिंग” नावाच्या दानवाचा संहार करु, अशी भावना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन उपस्थितांना करुन मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, तुम्ही विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास पुढे या. महाराष्ट्र स्वागताला तयार आहे, यावेळी त्यांनी उपस्थित सर्व देशांच्या अधिकाऱ्यांना व उद्योगपतींना  ताडोबा व्याघ्र सफारीला येण्याचे निमंत्रण देखील दिले.

मध्य प्रदेशचे मंत्री श्री ओमप्रकाश सकलेचा यांनी भारत आणि युरोपीय देशांनी आपल्या गरजा ओळखून शैक्षणिक, औद्योगिक आणि विशेष करुन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देवाण घेवाण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजच्या वतीने ५ डायलिसीस मशीन

लोकमान्य मेडीकल रिसर्च सेंटरच्या सहकार्याने मदत : लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड येथे ‘वरदान’ या डायलिसीस सेंटरची सुविधा 
पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज व लोकमान्य मेडीकल रिसर्च सेंटरच्या विद्यमाने चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल येथे ‘वरदान’ या डायलिसीस सेंटरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.  या प्रकल्पामध्ये ५ मशीन्स उपलब्ध करून दिल्या असून आणखीन ७ मशीन्स रूग्णांच्या सोयीसाठी वाढवायच्या आहेत. सरकारी योजनेमध्ये अल्प उत्पन्न रूग्णांसाठी उपलब्ध असलेल्या योजनेचा लाभ येथे रुग्णांना मिळणार आहे.
‘वरदान’ या डायलिसीस सेंटरचे उद्घाटन चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल येथे झाले. यावेळी रोटरीचे प्रांतपाल डॉ. अनिल परमार, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजच्या अध्यक्षा नमिता नाईक, सचिव अतुल दुर्वे, सेवा प्रकल्प संचालक विवेक कुलकर्णी, विशेष सेवा संचालक नितीन नाईक, लोकमान्यचे डॉ. व्ही. एस. घोले, संचालक श्रीनिवास पत्तर, सीईओ डॉ. विशाल क्षीरसागर या प्रकल्पासाठी आर्थिक मदत करणारे सिध्दार्थ इंजिनिअरींगचे दिलीप पंडीत, कोव्हेनशिया इंडीया प्रा.लि. चे काशीनाथ कुलकर्णी उपस्थित होते.
चिंचवड परिसरात गरजूंना ‘वरदान डायलिसीस सेंटर’ हे आरोग्याच्या दृष्टीने वरदान ठरेल. अधिकाधिक चांगली सुविधा सेवा देण्याचे काम होईल अशी ग्वाही रोटरीचे प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांनी दिली.

विवेक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मिलींद कुलकर्णी यांनी आभार मानले.

टेकड्या, जैवविविधतेच्या संवर्धनात पुणेकरांचे योगदान-उपवनसंरक्षक राहुल पाटील


टेकडी संवर्धन, पर्यावरण रक्षण यावर जनजागृती व प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे : “वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक रचनेमुळे टेकड्या पुण्याचा श्वास असून, त्या शहराच्या नैसर्गिक वैभवात भर घालतात. पुणेकरांचे आणि टेकड्यांचे जिव्हाळ्याचे नाते असून, टेकड्या आणि येथील जैवविविधतेचे संवर्धन करण्यात पुणेकर प्रेरक शक्ती म्हणून आघाडीवर असतात,” असे प्रतिपादन उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजिलेल्या टेकडी संवर्धन, पर्यावरण रक्षणाचे उपाय याबाबत जनजागृती व प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी राहुल पाटील बोलत होते. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या पुण्यातील विविध संस्थांच्या वतीने मंगळवारपर्यंत (दि. ६ जून) सकाळी ९ ते रात्री ८ यावेळेत या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
प्रसंगी घनकचरा विभागाच्या आयुक्त आशा राऊत, ग्रीन हिल्स ग्रुपचे संजय सूर्यवंशी, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीच्या अध्यक्षा शामला देसाई, अतुल वाघ, रूट स्किल्सच्या भाविशा बुद्धदेव, लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्स व वन उद्यान संवर्धन व सेवा संस्थेचे किशोर मोहोळकर, पर्यावरण अभ्यासक कपिला सोनी आदी उपस्थित होते. 
ग्रीन हिल्स ग्रुप, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी, लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्स, वन उद्यान संवर्धन व सेवा संस्था, अंघोळीची गोळी, रूट स्किल्स, आनंदवन फाउंडेशन, ५१ए संस्था, वेताळ टेकडी बचाव कृती, समिती पंचवटी उत्कर्ष सेवा संस्था, सर्व्ह विथ इम्पॅक्ट, यूएन एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅम, डू सेव्ह फाउंडेशन, ग्रीन सनराईस हिल वाघोली या संस्थांचा या प्रदर्शनात सहभाग आहे. मान्यवरांच्या हस्ते संस्थांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
राहुल पाटील म्हणाले, “ही नैसर्गिक संपत्ती आपण भावी पिढीला सुरक्षितपणे हस्तांतरित करायला हवी. त्यासाठी माझी टेकडी समजून प्रत्येकाने त्यांचे संरक्षण करावे. त्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत टेकड्या वाचवल्या पाहिजेत. विकास हवाच आहे, परंतु निसर्गावर आघात घालून तो होता कामा नये. निसर्गाला हानी पोहोचू न देता विकासकामे व्हावीत. पर्यावरणाच्या बाबतीत पुणेकर जागरूक असून, येथे अनेक संस्था स्वयंस्फूर्तीने उल्लेखनीय काम करत आहेत.”
आशा राऊत म्हणाल्या, “स्वच्छ व सुंदर पर्यावरण ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. घनकचरा विभागांतर्गत १० ते १५ हजार कर्मचारी काम करत आहेत. लोकांचा सहभाग, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढला, तर पर्यावरण संवर्धनाचे आणखी चांगले काम होईल. पुण्यात अनेक पर्यावरणप्रेमी संस्था कार्यरत असून, त्यांचे सहकार्य व मार्गदर्शन मोलाचे ठरते.

तासवडे आणि आनेवाडी या दोन्ही टोल नाक्यांवर  MH11 आणि MH50 ला टोलमुक्ती नाही – शंभूराजे देसाई

सातारा,  दि. ४ –  पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे टोल माफी बाबतची फिरत असलेली पोस्ट खोटी व चुकीची असल्याचा खुलासा पालकमंत्री श्री. देसाई यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

      सध्या सातारा जिल्ह्यातील तासवडे आणि आनेवाडी या दोन्ही टोल नाक्यांवर  MH11 आणि MH50 या दोन्ही क्रमांकाच्या वाहनांना राज्य उत्पादन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे टोल मुक्ती दिल्याची पोस्ट फिरत आहे.

   तथापि, अशा प्रकारचा कोणताही निर्णय झालेला नाही.  तसेच सदर पोस्ट चुकीची व खोटी असून कोणीतरी खोडसाळपणे टाकली आहे. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असेही खुलाश्यात म्हटले आहे.