Home Blog Page 135

पुण्यात २१ आणि २३ जानेवारीला महत्त्वाचे रस्ते १२ ते ४पर्यंत बंद, पर्यायी मार्ग जाणून घ्या

0

‘पुणे ग्रैंड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या स्टेज दोन (२१ जानेवारी) आणि स्टेज चार (२३ जानेवारी) या दोन टप्प्यांचे मार्ग शहरातून जाणार आहेत. या दिवशी शहरातील काही प्रमुख रस्ते टप्प्याटप्प्याने तात्पुरते बंद ठेवले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक बदलाची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी वळविण्यात येईल. अत्यावश्यक रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मागाँवर सेवेतील रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलिस आणि स्पर्धेशी संबंधित वाहनांना वाहतुकीस मुभा देण्यात येणार आहे. नागरिकांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक पोलिस व स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. येथे पाहा लाइव्ह लोकेशन स्पर्धेचा थेट मार्ग आणि रस्ते बंद स्थिती पाहण्यासाठी bpgt2026.punepolice.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

स्टेज २ : २१ जानेवारी
हा टप्पा कॅम्प परिसरातील लेडीज क्लब येथून दुपारी १२ वाजता सुरू होणार असून, पुणे शहरातील प्रमुख भागातून मार्गक्रमण करून, वारजे पूल परिसर येथे पूर्ण होणार आहे. हा टप्पा लेडीज क्लब – ब्लू नाईल हॉटेल परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक – गोळीबार मैदान चौक लुल्लानगर चौक शीतल पेट्रोल पंप चौक खडी मशिन चौक येवलेवाडी बोपदेव घाट खडकवासला किरकटवाडी नांदेड सिटी वारजे पूल असा एकूण सुमारे ६५ किलोमीटरचा आहे.
बंद ठेवले जाणारे प्रमुख रस्ते (ठळक मुद्दे)
बंद ठेवण्यात येणारे रस्ते दुपारी १२ ते सायं. ४
राधा चौक ते पूनम बेकरी (बाणेर – सूस रस्ता)
पाषाण सर्कल ते राजीव गांधी पूल (विद्यापीठ रस्ता)
राजीव गांधी पूल ते सेनापती बापट जंक्शन
सेनापती बापट रस्ते ते बालभारती
लॉ कॉलेज रस्ता ते शेलार मामा चौक
कर्वे पुतळा चौक ते वनाझ-पौड रस्ता
नळस्टॉप ते सेनादत्त पोलिस चौकी
सेनादत्त चौक ते टिळक चौक
टिळक रस्ता
बाजीराव रस्ता
अप्पा बळवंत चौक ते राष्ट्रभूषण चौक
राष्ट्रभूषण चौक ते सावरकर चौक
सावरकर चौक ते महाराष्ट्र मित्र मंडळ
महाराष्ट्र मित्र मंडळ ते सेव्हन लव्हज चौक
सेव्हन लव्हज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक (नेहरू रस्ता)
घोरपडी जंक्शन परिसर
स्टेज ४ : २३ जानेवारी
—हा टप्पा बाणेर येथील राधा चौकातून सुरू होणार असून, शहरातील प्रमुख भागांतून मार्गक्रमण करून, बालगंधर्व चौक येथे पूर्ण होणार आहे. हा टप्पा राधा चौक (बाणेर) – पूनम बेकरी (सूस रस्ता) पाषाण सर्कल पुणे विद्यापीठ चौक – राजीव गांधी पूल सेनापती बापट जंक्शन सेनापती बापत रस्ता (बालभारती पत्रकार भवन) लॉ कॉलेज रस्ता शेलार मामा चौक कर्वे पुतळा चौक वनाझ-पौड रस्ता नळस्टॉप म्हात्रे पूल सेनादत्त पोलिस चौकी टिळक चौक पुरम चौक अप्पा बळवंत चौक राष्ट्रभूषण चौक सावरकर चौक महाराष्ट्र मित्र मंडळ चौक सेव्हन लव्हज चौक पॉवर हाउस चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक इंदिरा गांधी चौक अर्जुन रस्ता घोरपडी जंक्शन – बोल्हाई चौक – लाल महाल चौक स. गो. बर्वे चौक नरवीर तानाजी वाडी चौक गरवारे –चौक बालगंधर्व चौक असा सुमारे ७५ किलोमीटरचा आहे.
बंद ठेवले जाणारे प्रमुख रस्ते (ठळक मुद्दे)
बंद ठेवण्यात येणारे रस्ते दुपारी १२ ते सायं. ४
राधा चौक ते पूनम बेकरी (बाणेर सूस रस्ता) –
पाषाण सर्कल ते राजीव गांधी पूल (विद्यापीठ रस्ता)
राजीव गांधी पूल ते सेनापती बापट जंक्शन
सेनापती बापट रस्ते ते बालभारती
लॉ कॉलेज रस्ता ते शेलार मामा चौक
कर्वे पुतळा चौक ते वनाझ-पौड रस्ता
नळस्टॉप ते सेनादत्त पोलिस चौकी
सेनादत्त चौक ते टिळक चौक
टिळक रस्ता
बाजीराव रस्ता
अप्पा बळवंत चौक ते राष्ट्रभूषण चौक
राष्ट्रभूषण चौक ते सावरकर चौक
सावरकर चौक ते महाराष्ट्र मित्र मंडळ
महाराष्ट्र मित्र मंडळ ते सेव्हन लव्हज चौक
सेव्हन लव्हज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक (नेहरू रस्ता)
घोरपडी जंक्शन परिसर

ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील समस्यांचे निराकरण प्राधान्याने करणार – राघवेंद्र बाप्पू मानकर

पुणे: १३५ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली महात्मा फुले मंडई पुण्याचा मानबिंदू आहे. येथील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विद्युत दिवे आणि स्वच्छतेच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यात येतील. येथील विद्युत दिव्यांच्या समस्या येत्या दोन दिवसात सोडविली जाईल, असे आश्वासन प्रभाग २५ चे नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी दिले. महात्मा फुले मंडई येथील व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या आढावा दौऱ्यात ते बोलत होते.

यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की, मंडईतील जुने झालेले विद्युत दिवे आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे व्यापारी तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच स्वच्छतेच्या समस्येबाबतही व्यापाऱ्यांनी गारऱ्हाणे मांडले. यावर बोलताना राघवेंद्र बाप्पू मानकर म्हणाले की, “व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रकाशव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तातडीने हे दिवे बदलण्याचे काम येतोय दोन दिवसात पूर्ण केले जाईल. तसेच मंडईच्या स्वच्छतेसाठी प्रशासनासोबत यंत्रणा कार्यरत करून कचरा साठणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे बाप्पू मानकर यांनी सांगितले.

…म्हणून भरत गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा अभिमान

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार; सामंजस्य करारानंतर वर्षभरात उद्योग उभारणीचे दावोस येथे कौतुक

दावोस (स्वित्झर्लंड): “जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ५०० कोटी रुपयांच्या सामंजस्य कराराची ‘अ‍ॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे उद्योजक भरत गीते यांनी अवघ्या एका वर्षात यशस्वी अंमलबजावणी करून प्रत्यक्ष उत्पादन सुरू केले आहे. वर्षभरात उद्योग उभारणी करणाऱ्या गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा मला अभिमान वाटतो,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

दावोस येथे सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि भरत गीते यांच्यातील संवादावेळी ते बोलत होते. या भेटीदरम्यान उद्योग उभारणीतील नियोजन, वेगवान अंमलबजावणी, प्रशासन आणि उद्योजकांमधील समन्वय तसेच उत्पादन क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील वाढते महत्त्व यावर सविस्तर चर्चा झाली. ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या केंद्र सरकारच्या उपक्रमांना बळ देणाऱ्या या उपक्रमांतून कमी कालावधीत उद्योग उभारणी शक्य असल्याचा प्रेरणादायी संदेश देशभरातील उद्योजकांना मिळाला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी येथे उभारण्यात आलेल्या ‘तौरल इंडिया’च्या अत्याधुनिक अ‍ॅल्युमिनियम कास्टिंग्ज उत्पादन प्रकल्पाने अल्पावधीतच उत्पादन सुरू करत राज्यासमोर आदर्श औद्योगिक मॉडेल उभे केले आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, स्थानिक औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळाली आहे.”

“सामंजस्य करार कागदापुरता न राहता एका वर्षात प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतरित होऊ शकतो, याचे भरत गीते आणि तौरल इंडिया हे उत्तम उदाहरण आहे. मराठी उद्योजकांमध्ये जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता आहे. त्यांना योग्य धोरणात्मक पाठबळ दिल्यास महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नवे शिखर गाठेल,” असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

भरत गीते म्हणाले, “तौरल इंडियाने २०१६ पासून औद्योगिक विस्तार करत ऊर्जा क्षेत्र, संरक्षण उत्पादन, आरोग्य उपकरणे तसेच एरोस्पेस क्षेत्रासाठी आवश्यक अचूक अ‍ॅल्युमिनियम कास्टिंग्ज निर्मितीत भरीव योगदान दिले आहे. विविध क्षेत्रांतील या योगदानामुळे राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बळ मिळत असून, आर्थिक वाढीस हातभार लागत आहे.

“उत्पादन क्षेत्र हे मजबूत अर्थव्यवस्थेचा कणा असून, वाहन उद्योग, अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक मोबिलिटी, संरक्षणपूरक उद्योग, कृषी प्रक्रिया आणि उच्च-मूल्य निर्यातक्षम उत्पादन क्षेत्र मजबूत झाल्यास राज्याचा औद्योगिक पाया अधिक भक्कम होईल,” असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला.

सूस, बाणेर पाषाण मध्ये तब्बल ११५७६ जणांनी वापरला ‘नोटा’ चा अधिकार

पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ‘नोटा’ चा अधिकार म्हणजे या उमेदवारांपैकी कोणीही पसंत नाही हा अधिकार बहुतेक सर्व प्रभागांमध्ये मतदारांनी बजावलेला आहे. किमान २ ते ११ हजार जणांनी आपल्याला एखाद्या किंवा काही उमेदवारांविषयी नापसंती दाखवण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. प्रभाग क्रमांक ९ सूस, बाणेर पाषाण मध्ये तर तब्बल ११५७६ जणांनी ‘नोटा’ चे बटण दाबून नापसंती व्यक्त केली आहे.

काही ठिकाणी रोख नोटा प्रभावी ठरल्या तर नोटा’ चा अधिकार हजारो लोकांनी बजावल्याने काही जण पराभूत झाले. प्रभाग ३८ बालाजीनगर,कात्रज, आंबेगाव मध्येही तब्बल ८९३१ जणांनी ‘नोटा’ चा वापर केला आहे. ७००० पेक्षा अधिक मतदारांनी ३ प्रभागात आपल्याला एखाद्या किंवा काही उमेदवारांविषयी नापसंती दाखवण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.

विविध प्रभागांतील आकडेवारी पाहता किमान ९ प्रभागातील ५ हजार पेक्षा अधिक नोटा वापरला. विविध प्रभागातील नाकारलेल्या उमेदवारांमुळे पडलेली मते अशी :

प्रभाग १ (७९९०) प्रभाग २
(५६६८) प्रभाग ३ (५१८४) प्रभाग ४ (४२९४) प्रभाग ५ (५३१८) प्रभाग ६ (३३१४) प्रभाग ७ ( ४८०४) प्रभाग ८ (७३७१) प्रभाग ९ (११५७६) प्रभाग १० ( ५१८८)

प्रभाग ११ ( ५१८८) प्रभाग १२ (६१४०) प्रभाग १३ (३२६५) प्रभाग १४ (३९७७) प्रभाग १५ (४८४३) प्रभाग १६ प्रभाग (३९७०) १७ (५१८१) प्रभाग १८ (२७४१) प्रभाग १९ (२५५३) प्रभाग २० (५४९३)

प्रभाग २१ (३९२५) प्रभाग २२ (३२४६) प्रभाग २३ (४६९९) प्रभाग २४ (४८४४) २५ (६६३१) प्रभाग २६ (४०४५) प्रभाग २७ (५८३१) प्रभाग २८ (५१५५) प्रभाग २९ (६२१०) प्रभाग ३० (५३१६ )

प्रभाग ३१ (६४०४) प्रभाग ३२ (५३१६) प्रभाग ३३ (७४६१) प्रभाग ३४ (७२१५) प्रभाग ३५ (३८५८)प्रभाग ३६ (५१८८) प्रभाग ३८ (८९३१) प्रभाग ३९ (४१२४) प्रभाग ४० (५४३६) प्रभाग ४१ (४१४७)

१६वी अमनोरा पीवायसी एचटीबीए कप सुपर ५०० रँकिंग जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा

अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा : पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन

पुणे: अनन्या गाडगीळ, जुई जाधव, ओजस जोशी यांनी पीवायसी-एचटीबीए १६व्या अमनोरा कप जिल्हा मानांकन सुपर-५०० बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या गटाचे विजेतेपद पटकावले.

पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजित ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅटमिंटन कोर्टवर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अनन्या गाडगीळने एस. डाखणेवर १५-७, १५-३ अशी सहज मात केली आणि जेतेपद पटकावले. यानंतर १९ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत दुस-या मानांकित जुई जाधवने अग्रमानांकित नाव्या रांकाला १५-८, ६-१५, १५-१३ असा पराभवाचा धक्का दिला आणि जेतेपद पटकावले. स्पर्धेतील ११ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत केयारा साखरेने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. तिने चौथ्या मानांकित काश्वीसिंहला १५-९, १५-१० असे सहज पराभूत केले.

स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अभिज्ञान सिंघाने बाजी मारली. त्याने अंतिम फेरीत माधव कामतला ७-१५, १५-५, १५-५ असे नमविले. १३ वर्षांखालील मुलांच्या गटात अद्वैत फेरेने विजेतेपद पटकावले. त्याने अग्रमानांकित अर्चित खान्देशेला १७-१५, १५-१३ असा पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे अर्चितचे दुहेरी यशही हुकले. स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या गटात अर्जुन श्रीगडीवारने विजेतेपद पटकावले. त्याने अंतिम फेरीत अग्रमानांकित हृदान पाडवेला १५-१२, १५-१० असे नमविले आणि जेतेपद निश्चित केले. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात ओजस जोशीने विजेतेपद पटकावले. त्याने अंतिम फेरीत अग्रमानांकित सार्थक पाटणकरचे आव्हान १५-१२, १५-९ असे परतवून लावले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अविनाश जाधव, सचिव उदय साने, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकिय संचालक अनिरुद्ध देशपांडे, कॉर्पोरेट अॅथलिट्सचे संस्थापक आणि स्पर्धेचे संयोजन सचिव अभिजीत चांदगुडे आणि पीवायी हिंदू जिमखान्याचे सचिव सारंग लागू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

निकाल – अंतिम फेरी – १७ वर्षांखालील मुले दुहेरी – दिव्यान कौशिक-रेहान सय्यद वि. वि. अवनीश-अयांश यारागट्टी १५-१०, १५-११,

१३ वर्षांखालील मिश्र दुहेरी – परस्मय राणे-ऋत्वा पांडे वि. वि. हिमांश हरगुणानी-अनिशा पिंगे १५-१२, १५-९, १५-१३.

१३ वर्षांखालील मुली दुहेरी – अनिशा पिंगे-ऋत्वा पांडे वि. वि. पूर्वा हांडे – तेजस्वी १६-१४, १५-१२.

४० वर्षांवरील गट – हर्षद भागवत वि. वि. आदित्य काळे १५-५, १५-५.

महिला दुहेरी – अदिती काळे – योगिता साळवे वि. वि. अर्पिता अर्डेय-ज्योती रावत १५-१०, १५-८.

३० वर्षांवरील पुरुष एकेरी – अजय कैठ वि. वि. गुरुप्रसाद राऊत १५-६, १५-११.

सायकल अपघात:सायकलिंग शर्यतींमध्ये अशा घटना घडणे सामान्य…

एडवर्ड पार्क (अध्यक्ष, कमिसार पॅनेल – UCI) यांनी बजाज पुणे ग्रँड टूर संदर्भात दिलेले अधिकृत पत्रक:
​अधिकृत निवेदन

​”सायकलस्वारांच्या मुख्य घोळक्यामध्ये (Peloton) एक अपघात झाला. मोठ्या संख्येने सायकलस्वार एकत्र असताना, शर्यतीचे बदलते स्वरूप, मोठे आव्हान आणि वेगवान वातावरण यामुळे रोड सायकलिंग शर्यतींमध्ये अशा घटना घडणे सामान्य आहे.
​ठरलेल्या नियमावलीनुसार (Protocol), शर्यत २३ मिनिटांसाठी थांबवण्यात (Neutralize) आली होती. या घटनेत अडकलेल्या खेळाडूंना ताफ्यातील वैद्यकीय पथकाद्वारे तातडीने प्रथमोपचार देण्यात आले आणि त्यांना त्यांच्या सायकली बदलण्याची परवानगी देण्यात आली.
​या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही आणि कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही.
​शर्यत अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती अत्यंत व्यावसायिक पद्धतीने हाताळली. जास्तीत जास्त सायकलस्वार पुन्हा रस्त्यावर उतरून शर्यत पूर्ण करू शकले, यावरूनच ही परिस्थिती किती वेगाने आणि कार्यक्षमतेने हाताळली गेली हे स्पष्ट होते.
​केवळ मलेशिया राष्ट्रीय संघाचा सायकलस्वार क्रमांक १६१, अब्दुल हलिल मोहम्मद इझत हा शर्यत पूर्ण करू शकला नाही. मात्र, सायकलस्वार क्रमांक १९१ एन्झो फुएन्टेस कॅपरोली आणि क्रमांक १९५ मार्टी रियारा कॅसानोव्हा (दोघेही प्रो सायकलिंग स्टॅट्स संघाचे) यांनी सायकल बदलल्यानंतर आपली शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली.”

अक्षय कुमारची सुरक्षा कार ऑटोला धडकली:अपघातात दोन लोक गंभीर जखमी; अक्षय दुसऱ्या गाडीत पत्नी ट्विंकलसोबत होता

मुंबई- जुहू परिसरात मुक्तेश्वर रोडजवळ सोमवारी रात्री सुमारे 8.30 वाजता एक मोठा रस्ते अपघात झाला, ज्यात अक्षय कुमारच्या सुरक्षा वाहनाने ऑटो रिक्षाला धडक दिली.धडक इतकी जोरदार होती की ऑटो चालक आणि त्यात बसलेला एक प्रवासी गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.जखमी ऑटो-रिक्षा चालकाचा भाऊ मोहम्मद समीरने सांगितले की, रात्री सुमारे 8:30 वाजता त्याचा भाऊ ऑटो चालवत होता. त्याच्या मागे अक्षय कुमारची इनोव्हा कार आणि एक मर्सिडीज धावत होती. तेव्हा मर्सिडीजने इनोव्हाला धडक दिली आणि इनोव्हा पुढे जाऊन ऑटोला धडकली.

त्यानंतर ऑटो उलटला, ज्यामुळे त्याचा भाऊ आणि ऑटोमध्ये बसलेला एक प्रवासी ऑटोखाली अडकले. ऑटो पूर्णपणे तुटला आणि त्याच्या भावाची प्रकृती खूप गंभीर आहे.समीरने सांगितले की, त्यांची फक्त एवढीच मागणी आहे की, त्यांच्या भावावर योग्य उपचार व्हावेत आणि ऑटोचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई मिळावी. त्यांना याशिवाय दुसरे काहीही नको आहे.
अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्नासोबत परदेश प्रवासाहून विमानतळावरून घरी परतत होते, असे सांगितले जात आहे. दोघेही पुढे चाललेल्या दुसऱ्या गाडीत बसले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. जुहू पोलिसांनी मर्सिडीज चालकाविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात अक्षयची गाडी ऑटोवर उलटलेली दिसत आहे. सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या अपघातात कोणाचाही जीव गेला नाही, मात्र अपघातात सहभागी असलेल्या सर्व गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

या संपूर्ण प्रकरणावर अक्षय कुमारच्या टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. सध्या या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते, मात्र परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणण्यात आली. चाहत्यांसाठी दिलासादायक बाब आहे की, अभिनेता आणि त्यांची पत्नी ट्विंकल या अपघातात सुखरूप आहेत.

तुंबाडनंतर राही बर्वेचा प्रयोगशील थ्रिलर ‘मयसभा’

पुणे, : ‘तुम्बाड’ या चित्रपटाने सिनेसृष्टीत वेगळाच ठसा उमटवणारे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा ‘मयसभा’ हा चित्रपट पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. “२००७ साली ‘पिफ’मध्ये प्रेक्षक म्हणून सुरू झालेला माझा प्रवास आज ‘मयसभा’च्या स्क्रीनिंगपर्यंत पोहोचला आहे,” असं बर्वे यांनी सांगितलं.

‘मयसभा’ हा त्यांचा एक वैयक्तिक प्रयोग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “हा चित्रपट कोणत्याही ठराविक चित्रपट रचनेत बसवायचा नव्हता. विशेषतः दुसरा अर्धा भाग अधिक प्रयोगशील आणि वेगळा आहे,” असं बर्वे म्हणाले. त्यामुळे या चित्रपटात पारंपरिक कथानकाची अपेक्षा ठेवणाऱ्यांनाही नवीन अनुभव मिळेल.

चित्रपटाची मुख्य कथा सिने-विश्वातील कलाकार परमेश्वर खन्ना यांच्या भोवती फिरते. बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी यांनी परमेश्वर खन्ना या गुंतागुंतीच्या पात्राची भूमिका साकारली आहे. “तो नायकही नाही, खलनायकही नाही,” असं बर्वे सांगतात. परमेश्वरची पत्नी जयमाला यांच्या एका कृतीमुळे त्याच्यावर आणि मुलगा वासूवर खोल परिणाम होतो, परंतु चूक कोणाची हे शेवटपर्यंत रहस्यच राहते.

ही कथा एक बंद पडलेल्या थिएटरमध्ये घडते. बर्वे यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात चार प्रमुख पात्रं असली तरी सर्वात महत्त्वाचं पात्र हे थिएटरच आहे. धूर, मच्छर आणि अस्ताव्यस्त वातावरणामुळे ते थिएटर जणू एक अडगळीची खोली बनते. या थिएटरमध्ये दडलेला सोन्याचा खजिना हा कथेला रहस्यात्मक वळण देतो.  
फक्त २५ जणांची टीम आणि २३ दिवसांत हा चित्रपट तयार झाला, कोणत्याही मोठ्या औद्योगिक पाठिंब्याशिवाय निर्माता गिरीश यांच्या पाठिंब्यामुळे हा चित्रपट पूर्ण झाला,” असं बर्वे म्हणाले.

नात्यांची कसोटी आणि स्त्रीचा लढा : ‘शॅडो बॉक्स’

कौटुंबिक वास्तव, मानसिक संघर्ष आणि नात्यांतील ताण यांची परिणामकारक मांडणी करणारा ‘शॅडो बॉक्स’ हा बंगाली-हिंदी चित्रपट ‘पिफ’मध्ये प्रदर्शित झाला. कुटुंबासाठी सातत्याने झटणारी स्त्री. तिचा पती, सामाजिक उपेक्षेला सामोरा जाणारा माजी सैनिक आणि एका अनपेक्षित घटनेनंतर कुटुंबातील नात्यांवर येणारा ताण हा चित्रपटाचा मुख्य आशय आहे. चित्रपटाचे अभिनेते चंदन बिष्ट म्हणाले, “या चित्रपटात स्त्रीचा संघर्ष आणि कुटुंबासाठीची तिची ताकद ठळकपणे चित्रित करण्यात आली आहे.

स्त्रीवाद आणि निसर्ग संवर्धन साधणारा ‘स्पायिंग स्टार्स’  

श्रीलंकन दिग्दर्शक विमुक्ति जयसुंदरा यांचा चित्रपट ‘स्पायिंग स्टार्स’ दाखवण्यात आला.
त्यानंतर त्यांनी संवाद साधला
ते म्हणाले, “आपण सध्या अशा वातावरणात जगत आहोत, जिथे निसर्गालाच संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धन महत्वाचे आहे, या हेतूने ‘स्पायिंग स्टार्स’ची निर्मिती केली आहे.”
अभिनेत्री इंदिरा तिवारी म्हणाल्या, “मनुष्य म्हणून आपण निसर्गाचे घटक आहोत आणि मनुष्य म्हणून आपण पुढच्या पिढीला काहीतरी देणं लागतो आणि हा चित्रपट हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.”
या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये श्रीलंका राष्ट्रीय चित्रपट महामंडळ, फ्रान्सचे सीएनसी यांचा सहभाग आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये श्रीलंकेच्या मध्य भागातील डोंगराळ प्रदेशात याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. स्वित्झर्लंडच्या ‘व्हिजन्स सुड एस्ट’ या निधीतूनही या चित्रपटाला पोस्ट-प्रॉडक्शनसाठी आर्थिक मदत मिळाली आहे.

‘अ प्रेग्नंट विडो’ : विधवेच्या आयुष्यातील संघर्ष

“तिच्या पोटात वाढणाऱ्या जीवाला भविष्य हवं होतं, पण व्यवस्थेला तिच्या वेदनेची फाईलही उघडायला वेळ नव्हता,” अशी दारुण परिस्थिती विषद करणारा मल्याळम  चित्रपट ‘अ प्रेग्नंट विडो’ हा केवळ एका स्त्रीची कथा नाही, तर तो समाजव्यवस्थेवर टाकलेला एक संयत पण थेट प्रश्न आहे. दिग्दर्शक उन्नी के. आर. यांनी या चित्रपटातून गर्भवती विधवेच्या आयुष्यातील भावनिक, सामाजिक आणि प्रशासकीय संघर्ष अत्यंत सूक्ष्मतेने मांडला आहे. पतीच्या हत्येनंतर गर्भवती असलेली ही स्त्री न्याय, सुरक्षितता आणि मूलभूत हक्कांसाठी झगडताना दिसते. तिच्या वाट्याला येणारी उदासीनता, संशय आणि असहायता ही भूमिका अधिक वास्तववादी बनवते. अजीश कृष्णा यांची भूमिका या कथेत वेगळा भावनिक संदर्भ निर्माण करते.
दिग्दर्शक उन्नी के. आर. म्हणाले, “हा चित्रपट सहानुभूतीची मागणी करत नाही, तर समजून घेण्याची जबाबदारी प्रेक्षकांवर सोपवतो.”

निरागस नजरेत साठलेली भीती — ‘ब्ल्यू हेरॉन’

काही कथा मनाला हळूच स्पर्श करून जातात आणि नंतर बराच काळ शांतपणे मनात रेंगाळत राहतात, ‘ब्ल्यू हेरॉन’ हा असाच एक भावनिक अनुभव देणारा चित्रपट आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, सहा जणांचे एक कुटुंब नव्या आशेने व्हॅनकुव्हर आयलंडवर स्थायिक होते. बाहेरून पाहता सगळं साधं, सुंदर आणि सुरळीत वाटतं. पण या शांततेआड दडलेली अस्वस्थता हळूहळू उघड होत जाते. या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे तिची मांडणी. सगळ्या घडामोडी ‘साशा’ या लहान मुलीच्या नजरेतून मांडण्यात आली आहे.
या चित्रपटाची अभिनेत्री जी इरिंगो रेती यांनी चित्रपटानंतर संवाद साधला. त्या म्हणाल्या, “अनेक प्रसंगांमध्ये मला रडावंसं वाटायचं,पण आईला रडता येत नव्हतं. कॅमेऱ्यासमोर मला रडण्याची परवानगी नव्हती.” त्या म्हणाल्या की त्यात सामाजिक समुपदेशकासोबत सुमारे वीस मिनिटे चालणारा संवाद. हा महत्त्वाचा पण भावनिकदृष्ट्या गुदमरवणारा प्रसंग होता थकवा, असहायता आणि शांत सहनशीलता व्यक्त करताना अश्रू आवरावे लागत हो

नव्या, जुन्या दिग्दर्शकांनी उलगडल्यात्यांच्या चित्रपट निर्मितीच्या कथा

पुणे,: काही नवे, काही जुने दिग्दर्शक एकत्र आले आणि उलगडल्या यावर्षीच्या मराठी चित्रपटांच्या कथा. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज मराठी चित्रपट स्पर्धेतील आदिशेष (रमेश मोरे), तो, ती आणि फुजी (मोहित टाकळकर), तिघी (जिजीविषा काळे), जीव (रविंद्र माणिक जाधव), गोंधळ (संतोष डावखर), गमन (मनोज नाईक साठम) आणि बाप्या (समीर तिवारी) या स्पर्धेतील चित्रपटांच्या दिग्दर्शकांबरोबर आज ‘पिफ‘चे उपसंचालक विशाल शिंदे यांनी संवाद साधला.
‘तिघी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शिका जिजीविषा काळे म्हणाल्या, “माझा प्रवास ‘वजनदार’ या चित्रपटात सहाय्यक म्हणून सुरू झाला. आता १२ वर्षांनी माझा दिग्दर्शक म्हणून चित्रपट येतोय. पॅशन कितीही जोरदार असली तरी योग्य माणसे बरोबर नसतील तर तुमची गोष्ट पुढे जात नाही. त्यादृष्टीने मी भाग्यवान आहे. मला सतत चांगली माणसे मिळाली. त्यामुळे मी इथपर्यंत आले. पालकांची मी एकुलते एक मुल असल्याने मला सतत एकटे वाटत आले आणि तीच गोष्ट मी माझ्या चित्रपटातून मांडली आहे.” त्या म्हणाल्या, “मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या बायका माझ्या चित्रपटात दिसतील.”
‘तो, ती आणि फुजी’, या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणाले, “मी पूर्वीपासून नाटक करत होतो पण चित्रपट तयार करण्याचा विचार मनात सतत घोळत होता. त्यातून मग पुढे चित्रपट कण्याचा निर्णय घेतला. मी शहरात वाढलो. मला गोष्टी मिळालेल्या आहेत. मात्र तरीही शहरी कोलाहलात अनेक प्रश्न भेडसावत आहेत. तेच  विषय हे माझ्या चित्रपटातून येतात. शहरी जीवनात नात्यांमध्ये बदल घडतात, तेच मी माझ्या आताच्या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.”  
‘जीव’चे दिग्दर्शक रवींद्र माणिक जाधव म्हणाले, “धुळ्यात शिक्षक म्हणून मी काम करतो, मात्र चित्रपट करण्याचा विचार मनात होता आणि त्यातून मी २०१३ रोजी पहिला माहितीपट तयार केला.  हॅंडीकॅमवर  ‘शाळाबाह्य’, ‘निरोध’ असे माहितीपट तयार केले. माहितीपट तयार केला. चित्रपट कसा तयार करायचा हे काहीच माहीत नव्हते. पुढे ‘थाळ भांकसर’ हा माहितीपट हजारांमध्ये केला आणि त्याला २ लाखाचे बक्षीस मिळाले. मग त्यातून अजून काम करण्याची प्रेरणा मिळाली. लिखाण करत असताना एका माणसाने शाळेमध्ये नागपंचमीची एक आठवण २०१८ मध्ये सांगितली आणि त्यातून ‘ जीव’ चित्रपटाची कथा पुढे आली. बायको आर्थिकदृष्ट्या मागे उभी राहिली आणि चित्रपट पूर्ण झाला.”
‘गमन’चे दिग्दर्शक मनोज नाईक साटम म्हणाले, “मी फोटोग्राफर होतो. लग्नाचे फोटो काढायचो. तेंव्हा व्हिडिओ शुटिंग पाहत पुढे आलो आणि त्यातून चित्रपट तयार करण्याचा विचार करत होतो. लहानपणापासून अनेक चित्रपटांची दृश्य मनात ठसली. एक कथा डोक्यात होती, ती लिहिली त्याची पुढे कादंबरी झाली. ती २०१५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि उमेद आली. त्याचाच पुढे चित्रपट झाला. हा चित्रपट करताना अर्थातच पैसे नव्हते. हातात होते ते सगळे पणाला लावले. केवळ वेडे होणे किंवा डुबणे, असे दोन पर्याय होते. मी डुबायचे ठरवले. कोकणातूनच पात्रं पुढे आली आणि चित्रपट पूर्ण झाला.”
‘ बाप्या’चे दिग्दर्शक समीर तिवारी म्हणाले, “मी उत्तर प्रदेशमधील आहे. मात्र बायको मराठी आहे आणि मला मराठीमधूनच चित्रपट करायचा होता. ४ वर्ष निर्माता मिळवण्यात गेले. शेवटी बायकोने पैसे उभे केले आणि चित्रपट तयार झाला. गिरीश कुलकर्णी यांनी मदत केली आणि माझ्या मनातील कथा पुढे आली. समाजातील गोष्टी ज्या मी पाहिलेल्या आहेत, त्याच चित्रपटात पुढे आल्या.”
‘ आदिशेष’चे दिग्दर्शक रमेश मोरे म्हणाले, “मी मुबईच्या झोपडपट्टीत वाढलो आहे. मी चित्रपट तयार करण्याचे कोणतेही तंत्र शिकलेलो नाही. चित्रपट करतच शिकत गेलो. मी साहित्याचा विद्यार्थी आहे. साहित्याच्या शिक्षकाने मला आत्मविश्वास दिला. चित्रपट तयार करण्याचा अडखळत हा प्रवास केला. साडेतीन वर्षे निर्माते शोधत होतो. प्रोजेक्ट आणि चित्रपट यात फरक असल्याचे निर्मात्यांच्या लक्षात येत नव्हते. शेवटी एक प्राध्यापक निर्माते म्हणून पुढे आले.” ते म्हणाले की कोविडमध्ये आपण जे अनुभवले. त्यातून आपल्यामधला शेष पुढे आला. तोच डोक्यात होता. आ. ह. साळुंके यांचे बळीवंश हे पुस्तक वाचले आणि कथेतील पात्रं पुढे आली. कोकणातूनच कलाकार चित्रपटात येत गेले आणि चित्रपट तयार झाला.
‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, “मला चित्रपट निर्मितीची काही पार्श्वभूमी नाही. १० वी मध्ये असताना पहिला चित्रपट पाहिला होता. तो डोक्यात घोळत होता. नंतर २०१३ मध्ये पहिली शॉर्टफिल्म तयार केली. ओटीटी मराठी चित्रपट नाकारत होते. मग सगळ्यांना दाखवावे असा विचार मानत होताच. रॉबर्ट मकी यांचे पटकथेवरचे पुस्तक वाचून अनेक चित्रपट पाहिले. त्यातून शिक्षण घेत गेलो. चित्रपटाचा विषय गोंधळ असा होता. मी अनेक गोंधळी मंडळींना बोलावले आणि त्यांची गाणी ऐकली. बँकेकडून कर्ज काढले आणि चित्रपट तयार केला.”

पुणे पीपल्स बँके च्या अमृतमहोत्सवानिमित्त बोधचिन्ह अनावरण आणि पुणे पीपल्स पुरस्कार प्रदान सोहळा

सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजेंद्र धामणे व डॉ.सुचेता धामणे मानकरी 

पुणे : वसंतपंचमीच्या दिवशी सन १९५२ साली स्थापन झालेल्या पुणे पीपल्स को-आॅप बँक लि., पुणे अमृतमहोत्सवी वर्षात (७५) पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच येथे विषेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अमृतमहोत्सवानिमित्त बोधचिन्ह अनावरण आणि पुणे पीपल्स पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला बॅकेचे उपाध्यक्ष बिपीनकुमार शहा, व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष मोहिते, संचालक सीए जनार्दन रणदिवे, बबनराव भेगडे, सुभाष नडे, डॉ. रमेश सोनवणे, सुभाष गांधी, मिलिंद वाणी, वैशाली छाजेड, निशा करपे, संजीव असवले, डॉ.विश्वनाथ जाधव, स्वीकृत तज्ञ संचालिका श्वेता ढमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भोंडवे, व्यवस्थापकीय मंडळ सदस्य सीए अजिंक्य रणदिवे, कौस्तुभ भेगडे, उदय जग्ताप, राजेंद्र गांगर्डे, अरुण डहाके आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात अमृत महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार असून मनोरुग्ण महिलांसाठी अजोड कार्य करणा-या माऊली सेवा प्रतिष्ठान, अहिल्यानगरचे संस्थापक डॉ.राजेंद्र धामणे व डॉ.सुचेता धामणे यांना पुणे पीपल्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रुपले १ लाख १ हजाराचा धनादेश, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्याचे सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक दीपक तावरे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.पराग काळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष मोहिते म्हणाले, छोटे उद्योजक, छोटे व्यापारी व ठेवीदार यांना हक्काचे ठिकाणे वाटावे, आधार वाटावा, याकरीता ३१ जानेवारी १९५२, वसंत पंचमी च्या दिवशी पुणे पीपल्स बँकेची स्थापना झाली. ही केवळ बँक न राहता समाजसेवेचे व्रत व्हावे, जनसामान्यांचा तो एक विश्वस्त न्यास असावा या भूमिकेतून बँक सुरु झाली. तसेच आज अखंड ७४ वर्षे व्रतस्थपणे खातेदारांच्या सेवेत कार्यरत आहे. यंदा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना उपस्थितांसाठी खास मनोरंजनपर संकर्षण व्हाया स्पृहा या विशेष कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.  आजपर्यंत स्वत:च्या मालकीचे बँकेचे मुख्य कार्यालय नव्हते, आता या संचालक मंडळाच्या प्रयत्नातून अमृतमहोत्सवी वर्षात स्वत:च्या मालकीच्या वास्तूत मुख्य कार्यालय स्थलांतरीत होणार आहे. हे मुख्य कार्यालय तब्बल २६ हजार चौरस फूटांच्या वास्तूत असणार आहे.

बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड म्हणाले, संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली गेल्या १७ वर्षात एकूण व्यवसाय ४०० कोटीवरुन रु.२७५० कोटी इतकी प्रगती केली आहे. ०% एनपीए, सभासदांना १२ ते १५ टक्के दराने लाभांश ही बँकेची वैशिष्टे आहेत. यंदा बँक अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. तज्ञ संचालक सदस्यांच्या मार्गदर्शनाने व निष्ठावंत अधिकारी- सेवकांच्या सहकार्य बँक आर्थिक दृष्टया अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. मार्च २०२६ अखेर किमान ५०० कोटी व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तर आगामी २/३ वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय रु.५००० कोटी करण्याचा संकल्प आहे. लवकरच बँकेला डायरेक्ट मेंबरशीप व शेडयुल्ड दर्जा मिळविण्यात आम्ही यशस्वी होऊ, असेही त्यांनी सांगितले.

मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात स्वागत

ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ; शेकडो वर्षांची परंपरा आजही अव्याहतपणे सुरू

पुणे : चिंचवड मधून श्री मोरया गोसावी पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पालखी सोहळा पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेला श्री जयति गजाननाच्या दर्शनासाठी थांबण्याची गेल्या शेकडो वर्षांची परंपरा आहे. श्रीमन्महासाधू मोरया गोसावी पालखी सोहळा यावर्षी देखील ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात विसावला.

प्रथेनुसार ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराचे सांप्रत ठकार, महिला, वहिवाटदार, पुजारी पालखीचे औक्षण करतात. त्यानुसार यंदा सांप्रत ठकार पुजारी, पल्लवी आल्हाद ठकार यांनी पालखीचे औक्षण केले. शेकडो वर्षांची ही परंपर आजही अव्याहतपणे चालू आहे.

यावेळी मंदिराचे प्रमुख विश्वस्त  विनायक बाजीराव ठकार, विश्वस्त स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मंदिराच्या विश्वस्त  संगीता ठकार, मधुरा ठकार, सीमा ठकार, सुधा ठकार, गायत्री ठकार उपस्थित होत्या. चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंदार महाराज देव यांनी ग्रामदैवत श्री कसबा गणपती चे  दर्शन घेतल्यानंतर सध्याचे पुजारी वहिवाटदार आल्हाद ठकार यांनी मंदार महाराज देव यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. मंदिरात मंदार महाराज देव यांचे औक्षण पल्लवी आल्हाद ठकार यांनी केले. 

दरवर्षी माघ आणि भाद्रपद महिन्यच्या शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध चतुर्थी दरम्यान श्रीमन्महासाधू मोरया गोसावी यांची चिंचवड ते मोरगाव अशी पायी पालखी यात्रा संपन्न होते. यंदाच्या वर्षी दिनांक १९ जानेवारी रोजी माघ शु. प्रतिपदेला या पालखी सोहळ्याने चिंचवड येथून मोरगावकडे प्रस्थान केले.  यानंतर पालखी सोहळा मुक्कामी मार्गस्थ झाला. चिंचवड देवस्थान आयोजित या पालखी यात्रेतील ग्रामदैवत श्री कसबा गणपती दर्शन हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.

ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने माघ गणेश जन्मोत्सवाला डॉ. पं. प्रमोद प्रभाशंकर गायकवाड आणि शिष्यांनी सनई वादनाने सुरुवात केली. त्यानंतर महाडकर गुरुजी यांचे गणेश पुराण झाले. सायंकाळी उस्ताद बिस्मिल्ला खा यांचे पट्ट शिष्य पंडित शैलेश भागवत यांचे शहनाई वादन झाले. त्यांना तबल्यावर महेश केंगार यांनी तर हार्मोनियम वर सुधीर टेकाळे यांनी साथ दिली.

विजयाचा गुलाल उधळला, आता विकासकामांची घौडदौड सुरू! गणेश बिडकरांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट

विजयानंतर आता विकास अजेंड्यावर, गणेश बिडकरांची महापालिका आयुक्तांशी विकासकामांवर चर्चा

पुणे: महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच प्रभाग क्रमांक २४ मधून विजयी झालेले भाजप नगरसेवक व माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी कोणताही विलंब न करता कामाला सुरुवात केली आहे. विजयाचा जल्लोष बाजूला ठेवत बिडकर यांनी प्रभागातील विकासकामांना प्राधान्य देत थेट पुणे महापालिकेचे आयुक्त कार्यालय गाठले.

प्रभाग २४ मधील प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांची सविस्तर यादी घेऊन गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. यावेळी प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांबरोबरच महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला प्रभागातून विजयी झालेले भाजपचे नगरसेवक देवेंद्र उर्फ छोटू वडके, उज्वला यादव आणि कल्पना बहिरट हे देखील उपस्थित होते. प्रभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्यावर भर देण्यात आला.

यावेळी बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “निवडणुकीत मिळालेला विजय हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असला तरी खरी जबाबदारी आता सुरू झाली आहे. नागरिकांचा विश्वास सार्थ ठरण्यासाठी प्रभागासह पुणेकरांच्या मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि पायाभूत विकासकामांना प्राधान्य देणार आहे. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प आहे.”

अवांते स्पेसेस लिमिटेडच्या प्रकल्पाला आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र प्राप्त

0

पुणे: किर्लोस्कर समूहाची कंपनी असलेल्या अवांते स्पेसेस लिमिटेडला पुण्यातील कोथरूड येथे असलेल्या त्यांच्या प्रमुख रिअल इस्टेट प्रकल्प ‘वन अवांते’साठी इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) कडून सर्वोच्च मानांकन असलेले आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
‘वन अवांते’ या प्रकल्पात सध्या किर्लोस्कर समूहातील अनेक कंपन्या कार्यरत असून, तो शाश्वत आणि आधुनिक कार्यस्थळ पायाभूत सुविधांचा आदर्श नमुना मानला जात आहे. या प्रमाणपत्रामुळे पर्यावरणपूरक विकास, कार्यक्षम संचालन आणि भविष्यासाठी सज्ज रचनेबाबत अवांते स्पेसेसची ठाम बांधिलकी अधोरेखित होते.
आयजीबीसीकडून करण्यात आलेल्या मूल्यांकनामध्ये पाच प्रमुख पर्यावरणीय घटकांचा समावेश होता. यामध्ये स्थळ निवड व नियोजन, जलसंधारण, ऊर्जा संवर्धन, साहित्य संवर्धन, तसेच अंतर्गत पर्यावरण गुणवत्ता आणि कार्यस्थळ आरोग्य यांचा समावेश आहे. याशिवाय डिझाइनमधील नाविन्यपूर्णतेवर आधारित स्वतंत्र घटकाचाही विचार करण्यात आला.
प्रारंभिक नियोजन टप्प्यापासून ते दैनंदिन कार्यपद्धतीपर्यंत ‘वन अवांते’ या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी शाश्वततेचा विचार ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पात ऊर्जा कार्यक्षम प्रकाशयोजना व एचव्हीएसी प्रणाली, नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर, प्रगत जलसंधारण तंत्रज्ञान, तसेच पुनर्वापर आणि संसाधनांचा कार्यक्षम उपयोग प्रोत्साहित करणारी सक्षम कचरा व्यवस्थापन प्रणाली अशा विविध हरित वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व उपक्रमांमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम कमी होण्यास मदत होत असून, वापरकर्त्यांच्या आरोग्य आणि कल्याणातही वाढ होते.
या यशाबाबत प्रतिक्रिया देताना अवांते स्पेसेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पोरायथ म्हणाले, “‘वन अवांते’साठी मिळालेले आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र हे अवांते स्पेसेससाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, शाश्वतता ही रिअल इस्टेट विकासाच्या डीएनएमध्येच असली पाहिजे, या आमच्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे. डिझाइन आणि बांधकामापासून ते दैनंदिन संचालनापर्यंत ‘वन अवांते’ची संकल्पना पर्यावरणपूरक कार्यस्थळ म्हणूनच साकारण्यात आली आहे. आमचा पहिलाच रिअल इस्टेट प्रकल्प असलेल्या या उपक्रमाला मिळालेली ही मान्यता, किर्लोस्कर समूहाच्या मूल्यांशी आणि दीर्घकालीन दृष्टीकोनाशी सुसंगत, ऊर्जा कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज अशा जागा सातत्याने उभारण्याचा आमचा निर्धार अधिक दृढ करते.”
आयजीबीसी प्लॅटिनम मानांकन केवळ अवांते स्पेसेसच्या शाश्वततेला प्राधान्य देणाऱ्या दृष्टिकोनाची पुष्टी करत नाही, तर ब्रँडअंतर्गत भविष्यात होणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी एक मजबूत आदर्शही निर्माण करते. आयजीबीसी प्रमाणित ठरणारा पहिला प्रकल्प म्हणून ‘वन अवांते’ अवांते स्पेसेसच्या ऊर्जा-जाणीवसंपन्न, पर्यावरणपूरक आणि जागतिक निकषांनुसार विकसित बांधकाम पर्यावरण निर्माण करण्याच्या ध्येयाला अधिक बळ देतो.
या यशाच्या माध्यमातून अवांते स्पेसेसने हरित, सुरक्षित आणि अधिक शाश्वत कार्यस्थळांची निर्मिती करण्याबाबतची आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली असून, भारताच्या विकसित होत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रात सकारात्मक आणि अर्थपूर्ण योगदान देण्याचा आपला निर्धार व्यक्त केला आहे.

लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ !!!

नवनिर्वाचित नगरसेवक सनी निम्हण यांनी घेतली विरोधकांची भेट

पुणे : निवडणूक म्हटलं की प्रतिस्पर्धी उमेदवावर टीका करायची, मात्र त्या पलीकडे जाऊन निवडणूक संपल्यावर दोन परस्पर विरोधी निवडणूक लढवलेले उमेदवार एकमेकांना भेटतात हे अलीकडे दुर्मिळ झाले आहे.  मात्र लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ , असे म्हणत औंध – बोपोडी प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी घेतली विरोधकांची भेट घेतली. 

या विषयी बोलताना सनी निम्हण म्हणाले, निवडणूका येतात जातात. निवडणुकीची लढाई हि व्यक्तीशी नसून विचारांची लढाई असते असे मी मानतो. हाच विचार पुढे नेत आज निवडणुकीच्या धामधुमीनंतर  प्रकाश ढोरे यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी  विनायक रणपिसे उपस्थित होते.

येत्या काळात औंध बोपोडी परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी विचारांची देवाणघेवाण झाली. या परिसराविषयी त्यांचा ध्यास आणि कार्य पाहता पुढील काळात औंध बोपोडीच्या विकासासाठी त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. शेवटी वैचारिक भूमिका जरी वेगळी असली तरी औंध बोपीडीच्या विकासासाठी आपण सर्व मतभेद बाजूला ठेऊन एकत्र यायला पाहिजे असे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे.

सगळ्यांना सोबत घेऊन सर्वांच्या सहभागातून विकास हि स्वर्गीय कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांची शिकवण अशाच संस्कारांची नित्य प्रेरणा देत असते असेही सनी निम्हण यांनी नमूद केले.

नरेंद्र मोदींकडून राजमाता अहिल्याबाई होळकर व धनगर समाजाचा अपमान; काशीतील पवित्र मणिकर्णिका घाट उद्ध्वस्थ: नाना पटोले

हिंदुंचे रक्षणकर्ते म्हणवणाऱ्या मोदी-योगींकडूनच काशीतील हिंदुंची शेकडो मंदिरे उद्वस्थ; हिंदुच्या अस्मितेवर घाला घालणारे हे कसले हिंदुत्वत्वादी ?

मुंबई, दि. २० जानेवारी २०२६
राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी न्याय, धर्म आणि लोककल्याणासाठी राज्य केले, हिंदु धर्मासाठी पवित्र अशा काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिरांसह अनेक मंदिरांची पुनर्बांधणी केली. स्वतःला हिंदु धर्माचे रक्षक समजणाऱ्या नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांनी मात्र आज अहिल्याबाईंनी काशीत बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट उद्धवस्थ केला, हा तमाम हिंदू तसेच धनगर समाजाचा अपमान आहे. मोदी-योगी यांनी हिंदुंच्या अस्मितेवर घाला घातला आहे. विकासाच्या नावाखाली हिंदुंच्या अस्मितेशी खेळण्याचा भाजपा, नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांना काही अधिकार नाही, त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, काशी हे केवळ एक शहर नसून हिंदु समाजासाठी अत्यंत मानाचे व पवित्र अध्यात्मिक केंद्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच काशीतून तीनवेळा निवडून आले आहेत. काशीच्या विकासाच्या नावाखाली नरेंद्र मोदी यांनी शेकडो मंदिरे तोडली आणि आता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला मणिकर्णिका घाट उद्ध्वस्थ केला आहे, अहिल्यादेवींची प्रतिमाही तोडली. मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार केल्याने आत्म्याला थेट मोक्ष मिळतो, अशी हिंदु धर्मात धारणा आहे, हे ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. हिंदु धर्मासाठी पवित्र अशा घाटावर बुलडोझर चालवून मोदी व योगी यांनी हिंदु समाजाचा घोर अपमान केला आहे. तर असे काही घडलेच नाही, जे दाखवले जाते ते एआय (AI) दृश्य आहे असा कांगावा स्वतःला संत म्हणवणारे, भगवे कपडे घालणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगत आहेत. होळकर कुटुंबातील काही लोकांनी काशीला जावून वस्तुस्थिती पाहिली व सरकारला पत्र पाठवले आहे. मी उद्या काशीला जाऊन वस्तुस्थिती पाहणार आहे व मोदी – योगी सरकारचा निषेध करणार आहे, असे नाना पटोले म्हणाले.

‘दावोस’मधील करारांचे पुढे काय होते?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी यावर्षीही दावोसला गेले आहेत पण ही फक्त इव्हेंटबाजी आहे. याआधीही लाखो कोटी रुपयांचे करार झाल्याचा दावा केला. एवढी मोठी गुतंवणूक राज्यात आली तर मग बेरोजगारी का वाढली, याचे उत्तर द्यावे. राज्यात मोठ्या प्रामणात उद्योग यावेत, ही अपेक्षा आहे पण सरकार करत असलेले दावे आणि वस्तुस्थिती यात मोठी तफावत आहे. राज्य कर्जबाजारी झाले आहे, सरकारकडे पगार करण्यासाठी पैसे नाहीत, कंत्राटदारांची बिले थकली आहेत. विकासकामासाठी पैसे नाहीत आणि मुख्यमंत्री दावोसमध्ये कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत, असे नाना पटोले म्हणाले.