Home Blog Page 134

पुणे महापालिका हद्दीतील शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेनंतर बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे, दि.२१ : पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने चौथ्या टप्प्याच्याअनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी व खाजगी शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात; त्यांनतर शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

स्पर्धेचा चौथा टप्पा हा बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर या दरम्यान आयोजित करण्यात आला असून त्याचे एकूण ५८ कि.मी अंतर आहे. त्यामुळे पुणे शहरातील होणारी वाहतूक कोंडी तसेच बहुतेक शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने आदेश जारी करण्यात आल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

देवएक्सने पहिल्यांदाच राबवलेले “लँडओनर फर्स्ट” विकास व्यवस्थापनमॉडेलद्वारे 8.6 लाख चौ. फूट प्रीमियम वर्कस्पेस उपलब्ध

0

या मॉडेलमुळे मुंबई, हैदराबाद तसेच टियर-2 शहरांमध्ये जलद विस्तार शक्य झाला असून, पारंपरिक मॉडेलच्या तुलनेत जमीनमालक भागीदारांना तब्बल 30% अधिक परतावा मिळत आहे.

अहमदाबाद (गुजरात) : भारतामधील एंटरप्राइज-केंद्रित मॅनेज्ड ऑफिस स्पेस क्षेत्रातील आघाडीची कंपनी देव ॲक्सेलरेटर लिमिटेड (NSE: DEVX; BSE: 544513) आपल्या धोरणात्मक डेव्हलपमेंट मॅनेजमेंट (DM) मॉडेलच्या माध्यमातून वेगाने विस्तार करत मूल्यनिर्मिती करत आहे. या अभिनव मॉडेलमुळे कंपनीचा व्यावसायिक विस्तार 28 केंद्रांमध्ये 8.6 लाख चौरस फूटांहून अधिक कार्यरत वर्कस्पेसपर्यंत पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने ₹1,780 दशलक्ष महसूल नोंदवला असून, भारतातील व्यावसायिक रिअल इस्टेट मालमत्तांच्या विकास व उत्पन्ननिर्मितीच्या पद्धतीत हा एक महत्त्वाचा बदल मानला जात आहे.

परंपरागत जॉइंट डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट्स (JDA)पेक्षा वेगळा दृष्टिकोन स्वीकारत, देवएक्सच्या डीएम मॉडेलमध्ये जमीनमालकांना त्यांच्या मालमत्तेचे 100% मालकी हक्क आणि नियंत्रण कायम ठेवण्याची मुभा दिली जाते. याच मॉडेलच्या जोरावर कंपनीने मुंबई, हैदराबादसारख्या मोठ्या महानगरांमध्ये तसेच अहमदाबाद, जयपूर, उदयपूर, इंदूर आणि सुरत या वेगाने वाढणाऱ्या टियर-2 शहरांमध्ये विस्तार केला आहे. झोमॅटो, मनुभाई अ‍ॅण्ड शाह, विफ्ली, पेपरचेस अ‍ॅण्ड कंपनी तसेच पर्सिस्टंट सिस्टिम्स यांसारख्या नामांकित कंपन्यांनी देवएक्ससोबत विविध शहरांमध्ये कार्यालयीन जागा घेतल्या आहेत.

फक्त विकसकाची भूमिका न घेता रणनीतिक भागीदार म्हणून पुढे येत, देवएक्स संपूर्ण प्रकल्पाचा एंड-टू-एंड प्रवास व्यवस्थापित करते. यामध्ये प्रकल्पाची व्यवहार्यता (फिजिबिलिटी) अभ्यास, डिझाइन, शासकीय परवानग्या, बांधकामावर देखरेख तसेच अंतिम भाडेकरार (लीझिंग) यांचा समावेश आहे.

या मॉडेलच्या यशाबाबत बोलताना देव ॲक्सेलरेटर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक उमेश उत्तमचंदानी म्हणाले, “आमच्या रणनीतीचा केंद्रबिंदू म्हणजे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट मॉडेल. हे मॉडेल बिगर-संस्थात्मक जमीनमालक आणि संस्थात्मक दर्जाच्या कार्यालयीन जागेची वाढती मागणी यांमधील दरी भरून काढण्यासाठी तयार करण्यात आले आहे. आज जमीनमालक आपली मालकी न गमावता जमिनीचे संपूर्ण मूल्य उलगडून दाखवू शकणाऱ्या व्यावसायिक भागीदारांचा शोध घेत आहेत, आणि ही स्पष्ट बदलती मानसिकता आम्हाला दिसत आहे. आमचे मॉडेल नेमके तेच साध्य करते—विकास प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर रिअल-टाइम डिजिटल पारदर्शकता आणि यशाशी निगडित फी संरचना देत, पहिल्या दिवसापासून हितसंबंध एकसंध ठेवते. या सहकार्यात्मक दृष्टिकोनामुळे आम्हाला वेगाने विस्तार करता येतो, तसेच आमच्या एंटरप्राइज क्लायंटसाठी प्रीमियम, रेडी-टू-मूव्ह वर्कस्पेस उपलब्ध करून देता येतात.”

डीएम मॉडेलद्वारे भांडवल उपलब्धता आणि गुंतागुंतीच्या नियामक अनुपालनासारख्या महत्त्वाच्या बाजारातील अडचणींवर प्रभावी उपाय केला जातो. देवएक्सच्या संस्थात्मक दर्जाच्या प्रक्रिया आणि मजबूत फंडिंग नेटवर्कचा लाभ घेत, जमीनमालकांना या भागीदारीतून अधिक चांगले आर्थिक परिणाम मिळतात. मुद्रांक शुल्कावरील बचत तसेच अतिरिक्त उत्पन्न स्रोतांमुळे जमीनमालकांना एकूण 20% ते 30% अधिक परतावा मिळतो.

“सप्लाय-लेड” आणि “डिमांड-लेड” या दुहेरी दृष्टिकोनातून देवएक्स स्वतःला वेगळे ठरवते. कंपनीच्या एकूण पोर्टफोलिओपैकी 70% हिस्सा दीर्घकालीन गरजा असलेल्या मोठ्या एंटरप्राइज क्लायंट्ससाठी राखीव आहे. विकास प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यासाठी देवएक्सकडे इन-हाउस तज्ज्ञता आहे. यामध्ये इंटीरियर सोल्यूशन्ससाठी “Phi Designs”, तसेच प्रकल्प व्यवस्थापन आणि लीझिंगसाठी समर्पित टीम्सचा समावेश आहे. या एकात्मिक क्षमतेमुळे प्रकल्प ठराविक कालमर्यादेत पूर्ण होतात आणि अनेकदा 75 ते 90 दिवसांत कल्पना पूर्णपणे सुसज्ज कार्यालयीन जागांमध्ये रूपांतरित केल्या जातात.

भारताचा रिअल इस्टेट क्षेत्र अधिक परिपक्व होत असताना, उत्तम सल्लागार व्यवस्था आणि वाढलेली पारदर्शकता यामुळे व्यावसायिक डेव्हलपमेंट मॅनेजमेंटची मागणी वेगाने वाढत आहे. या बदलाचे नेतृत्व करण्यासाठी देवएक्स सज्ज आहे, कारण कंपनीने आधीच 7.2 लाख चौरस फूट क्षेत्रफळासाठी करार केले आहेत. सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करणाऱ्या सक्रिय समुदायांची उभारणी आणि शाश्वत मालमत्तांची निर्मिती करण्यासाठी कंपनीची बांधिलकी कायम आहे.

एकनाथ शिंदेंनी अचानक गाठली दिल्ली:भाजपच्या नेत्यांशी गुप्त भेटीगाठी; मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर चर्चा

मुंबई-मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून सत्ताधारी शिवसेना व भाजपमधील कथित तिढा अजून सुटला नाही. त्यातच शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत. तिथे त्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधल्यामुळे मुंबईतील सत्ता स्थापन करण्याचा तिढा लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा सर्वाधिक 89 जागांवर विजय झाला आहे. तर शिंदे गटाला अवघ्या 29 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपला शिंदे गटाच्या मदतीशिवाय मुंबईत आपला महापौर बसवणे अवघड आहे. त्यामुळे शिंदे गटाने आपले उपद्रवमूल्य दाखवत भाजपपुढे अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. यामुळे निकाल लागू 5 दिवस लोटले तरी मुंबईला अद्याप आपला महापौर मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री अचानक दिल्लीच्या दौऱ्यावर पोहोचलेत.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम व शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे सध्या दिल्लीत आहेत. हे दोन्ही नेते मुंबईच्या महापौर पदावर तोडगा काढण्यासाठी सातत्याने चर्चा करत आहेत. त्यांची चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. तिथे त्यांनी भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांची भेट घेऊन महापौर व इतर समित्यांवर चर्चा केली. त्यांचा हा दौरा अत्यंत गुप्त होता. त्यांनी कुणालाही या दौऱ्याची कल्पना दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यावरील मुंबईतील सत्ता स्थापनेच्या तिढ्यावर बरेच काही घडल्याचा दावा केला जात आहे.

विशेषतः एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे शिंदे गट मुंबई महापालिकेतील सत्तेच्या वाट्यावरील आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम असल्याचेही संकेत मिळत आहेत. दिल्लीतील चर्चेत केवळ मुंबईच्या महापौर पदावरच नव्हे तर इतर महापालिकांमधील सत्तेच्या वाटपावरही खलबते झाल्याची माहिती आहे. यात ठाणे, कल्याण – डोंबिवली आदी महापालिकांचा समावेश असल्याची माहिती आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे शिंदे गटाने मुंबईतील आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 3 दिवस ठेवले होते. संभाव्य फोडाफोडीच्या राजकारणामुळे त्यांनी शिंदे गटाने हे पाऊल उचलले होते. पण मंगळवारी अखेर पक्षाने आपल्या नगरसेवकांचे विजयाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड व इतर दस्तऐवजांच्या मूळ प्रती स्वतःच्या ताब्यात घेतल्या. त्यामुळे या नगरसेवकांना आपल्या घर व मतदारसंघाकडे जाण्याची परवानगी देण्यात आली.

शिवसेना-राष्ट्रवादी पक्षचिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर:सुप्रीम कोर्ट आता शुक्रवारी करणार फैसला!

मुंबई-महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाच्या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आज, 21 जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार होती, मात्र आता ही सुनावणी येत्या शुक्रवारी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील वाद गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहे. 21 जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार असून, त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र, खंडपीठाच्या दैनिक कार्यसूचीत ही याचिका क्रमांक 37 वर असल्याने प्रत्यक्ष सविस्तर सुनावणी होईल की केवळ पुढील तारीख दिली जाईल, याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह वाद गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयापुढे आहे. यात 21 जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र, खंडपीठाच्या दैनिक कार्यसूचीमध्ये या याचिकेचा क्रमांक 37 वा असल्याने प्रत्यक्ष सुनावणी बुधवारी पूर्ण होणार की केवळ तारीख मिळणार, याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाच्या पद्धतीनुसार, सुरुवातीचे क्रमांक ताज्या प्रकरणांसाठी असतात. म्हणून शिवसेना पक्षाविषयीची याचिका दुपारच्या सत्रात कोर्टासमोर येण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, आधीच्या 36 प्रकरणांवर दीर्घ युक्तिवाद झाला, तर शिवसेना याचिकेला पुरेसा वेळ नाही, असे होऊ शकते. तसे झाल्यास सुनावणी पुढील तारखेस ढकलली जाऊ शकते.

तथापि, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, खंडपीठ यावर प्राथमिक टिप्पणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निकालाचा परिणाम राजकीय समीकरणांवर व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होईल. लोकशाहीच्या संरक्षणासाठी ही सुनावणी तातडीने करावी. विधानसभा अध्यक्षांचा निकाल घटनाबाह्य असल्याने कोर्टाने यात हस्तक्षेप करावा, असे ॲड. असीम सरोदेंचे म्हणणे आहे.

आजच्या सुनावणीत प्रामुख्याने दोन शक्यता आहेत. पहिली म्हणजे वेळेअभावी केवळ पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली जाईल. दुसरी शक्यता म्हणजे कोर्टाने सुनावणीसाठी विशेष वेळ दिला, तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर सविस्तर चर्चा सुरू होऊ शकते.

प्रकरणात कोर्टाचा निकाल आल्यास व तो उपमुुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागल्यास उद्धव ठाकरेंसमोर न्यायालयीन लढाई बाजूला ठेवून पक्षबांधणी करताना संभाव्य गळती रोखावी लागेल. तर निकाल उद्धव यांच्या बाजूने लागल्यास शिंदेंना नवा पक्ष स्थापावा लागेल किंवा भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल. तसे झाल्यास त्यांचे राजकीय वजन, प्रभाव घटेल. मुंबईतील शिंदेंचे नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे जातील. मुंबई महापौरपद आणि सत्तेचे गणित शिंदेंच्या हाताबाहेर जाईल, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दावोसला जाताना ट्रम्प यांच्या एअरफोर्स-1 विमानात तांत्रिक बिघाड:प्रवासातून परतले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान दावोसला जात असताना, टेकऑफच्या काही वेळानंतरच वॉशिंग्टनला परतले. व्हाइट हाऊसच्या माहितीनुसार, विमानात तांत्रिक बिघाड झाला होता.प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लिव्हिट यांनी सांगितले की, टेकऑफनंतर क्रूला विमानात किरकोळ इलेक्ट्रिकल बिघाड आढळला. त्यानंतर खबरदारी म्हणून विमान परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र, ट्रम्प थोड्याच वेळात दुसऱ्या विमानाने रवाना झाले. ते आज स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) मध्ये सहभागी होतील.ट्रम्प यांच्या अधिकृत दौऱ्यांसाठी एअर फोर्स वन म्हणून वापरले जाणारे दोन विमानं सुमारे चार दशके जुनी आहेत. अमेरिकन विमान उत्पादक बोइंग त्यांचे नवीन पर्याय तयार करत आहे, परंतु हा प्रकल्प सतत विलंबाचा बळी ठरला आहे.

गेल्या वर्षी कतारच्या शाही कुटुंबाने ट्रम्प यांना एक लक्झरी बोइंग 747-8 जंबो जेट दिले होते, जे एअर फोर्स वन ताफ्यात समाविष्ट केले जाणार आहे. या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. सध्या ते विमान सुरक्षा मानकांनुसार तयार केले जात आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आज ग्रीनलंडचे भविष्य ठरवण्याच्या अजेंड्यासह बुधवारी संध्याकाळी सुमारे 7 वाजता जगाला संबोधित करतील.माध्यमांच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांचे हे भाषण अशा वेळी होत आहे, जेव्हा जगभरात राजकीय तणाव, व्यापार युद्ध आणि सुरक्षेशी संबंधित प्रश्न वेगाने वाढत आहेत. यामुळेच दावोसमध्ये ट्रम्प यांची उपस्थिती आणि त्यांच्या प्रत्येक विधानावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प WEF मध्ये भाषण दिल्यानंतर एका विशेष उच्चस्तरीय कार्यक्रमाचे आयोजनही करतील. या कार्यक्रमात भारतातील 7 मोठ्या व्यावसायिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 ची खास वैशिष्ट्ये…

डोनाल्ड ट्रम्प त्यांच्यासोबत अमेरिकेची आतापर्यंतची सर्वात मोठी टीम घेऊन येत आहेत, ज्यात पाच कॅबिनेट मंत्री समाविष्ट आहेत.
दावोसमध्ये पहिल्यांदाच अमेरिकेसाठी एक वेगळे ‘USA हाऊस’ तयार करण्यात आले आहे.
वर्ल्ड इकोनॉमिक फोरमनुसार, किमान 64 देशांचे राष्ट्राध्यक्ष किंवा सरकार प्रमुख या बैठकीत सहभागी होतील.
पाकिस्तान पहिल्यांदाच दावोसमध्ये ‘सूफी नाईट’चे आयोजन करेल, ज्यात सिंधू संस्कृतीचे पारंपरिक पदार्थ वाढले जातील.
या वर्षी 130 हून अधिक देशांचे 3,000 हून अधिक प्रतिनिधी बैठकीत भाग घेत आहेत. यात 1,700 हून अधिक व्यावसायिक आहेत, ज्यापैकी अर्ध्याहून अधिक CEO किंवा चेअरमन आहेत.
सुमारे 400 मोठे राजकीय नेतेही या बैठकीत उपस्थित राहतील. यात 30 हून अधिक परराष्ट्र मंत्री, 60 हून अधिक अर्थमंत्री आणि 30 हून अधिक व्यापार मंत्री आहेत.
भारतातून चार केंद्रीय मंत्री आणि सहा राज्यांचे मुख्यमंत्रीही बैठकीत भाग घेतील. 100 हून अधिक भारतीय व्यावसायिकही दावोसमध्ये उपस्थित राहतील.
ट्रम्प 6 वर्षांनंतर दावोसमध्ये भाषण देतील

जगातील सरकारे आणि कंपन्या पुरवठा साखळी, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीवर नव्याने निर्णय घेत आहेत. याच दरम्यान अमेरिका-भारत यांच्यातील नवीन व्यापार करारावर चर्चा सुरू आहे, त्यामुळे ट्रम्प यांच्या कार्यक्रमांमध्ये भारतीय कंपन्यांच्या उपस्थितीवर सर्वांचे लक्ष आहे.

डोनाल्ड ट्रम्प सुमारे सहा वर्षांनंतर दावोसला परतले आहेत. यापूर्वी त्यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात 21 जानेवारी 2020 रोजी दावोसमध्ये भाषण दिले होते. यावेळी त्यांचा दौरा अधिक महत्त्वाचा मानला जात आहे, कारण अमेरिकेच्या परराष्ट्र आणि व्यापार धोरणात आक्रमक बदल स्पष्टपणे दिसत आहेत.

ट्रम्प यांच्या सल्लागारांचे म्हणणे आहे की ते दावोसमध्ये हे स्पष्ट करतील की अमेरिका आता जुन्या जागतिक प्रणाली आणि नियमांच्या पुढे गेले आहे.

ग्रीनलँडला घेऊन ट्रम्प आक्रमक भूमिका दाखवत आहेत

ग्रीनलँडबाबत ट्रम्प यांची भूमिका सातत्याने कठोर होत आहे. ट्रम्प याला अमेरिकेच्या सुरक्षा आणि सामरिक ताकदीशी जोडून पाहत आहेत. त्यांचे मत आहे की आर्कटिक प्रदेशात वाढत्या घडामोडी, खनिज संसाधने आणि लष्करी महत्त्वामुळे ग्रीनलँडवर अमेरिकेचा प्रभाव असणे आवश्यक आहे.

ट्रम्प यांनी मंगळवारी सोशल मीडियावर एक नकाशा शेअर केला होता, ज्यात ग्रीनलँड, कॅनडा आणि व्हेनेझुएलाला अमेरिकेचा भाग दाखवण्यात आले होते.

ग्रीनलँड वादासोबतच ट्रम्प यांनी युरोप आणि उर्वरित जगाला टॅरिफबाबतही स्पष्ट इशारा दिला आहे. अमेरिकेने डेन्मार्क, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीसह आठ युरोपीय देशांवर 10% टॅरिफ लावला आहे.

अमेरिकन प्रशासनाने संकेत दिले आहेत की, जर विरोध सुरू राहिला तर हा टॅरिफ 25% पर्यंत वाढवला जाऊ शकतो. ट्रम्प यांचे धोरण स्पष्ट आहे की, व्यापाराचा आता मुत्सद्देगिरी आणि दबाव निर्माण करण्याचे शस्त्र म्हणून वापर केला जाईल.

114 शिवायही… महापौर शक्य

मुंबई – मुंबईचा महापौर बसवायचा असेल तर 114 नगरसेवक हवेत. ही धारणा पूर्णपणे अचूक नाही, असा ठाम दावा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. त्यांच्या मते, महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आणि कारभार चालवण्यासाठी 114 हा आकडा महत्त्वाचा असू शकतो; पण केवळ महापौर निवडीसाठी 114 हा जादुई आकडा बंधनकारक नाही. कायदा आणि महानगरपालिका अधिनियम वेगळंच चित्र दाखवतो, असं गलगली यांनी सविस्तर स्पष्ट केलं आहे.

मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 नगरसेवक असतात. बहुमत म्हणजे निम्म्यापेक्षा एक अधिक, त्यामुळे 114 हा आकडा लोकांच्या मनात ठसलेला आहे. त्यामुळेच 114 शिवाय महापौर होऊ शकत नाही असा ठाम समज वर्षानुवर्षे पसरत गेला. मात्र अनिल गलगली यांच्या म्हणण्यानुसार, हा समज अर्धवट माहितीवर आधारित आहे. मुंबई महापालिका अधिनियमानुसार महापौराची निवड ही महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत होते. या सभेसाठी कोरम पूर्ण असणं आवश्यक असतं. त्यानंतर उपस्थित आणि मतदान करणाऱ्या नगरसेवकांपैकी ज्याला जास्त मते मिळतात, तो उमेदवार महापौर म्हणून निवडला जातो. याचा अर्थ असा की संपूर्ण 227 पैकी 114 मतं मिळायलाच हवीत, अशी कुठलीही सक्ती कायद्यात नाही.

अनिल गलगली यांनी याबाबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. राजकीय वास्तव पाहता अनेकदा विरोधी पक्ष निवडणुकीदरम्यान सभागृहातून बाहेर पडतात, बहिष्कार टाकतात किंवा रणनीती म्हणून मतदान करत नाहीत. काही नगरसेवक अनुपस्थितही राहू शकतात. अशा परिस्थितीत सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांच्या साध्या बहुमतावर महापौर निवडला जातो. त्यामुळे 90, 85 किंवा कधी कधी त्याहून कमी मतांच्या आधारेही महापौर निवड होऊ शकते. याआधीही देशातील विविध महानगरपालिकांमध्ये अशा प्रकारची उदाहरणे घडलेली आहेत, असं गलगली यांनी सांगितलं.

मग प्रश्न असा उरतो की 114 या आकड्याचा इतका गाजावाजा का केला जातो? याचं उत्तर देताना अनिल गलगली म्हणाले की, 114 हा आकडा महापालिकेतील सत्तेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. स्थायी समिती, विषय समित्या, अर्थसंकल्प, धोरणात्मक ठराव आणि प्रशासनावर नियंत्रण मिळवण्यासाठी बहुमत आवश्यक असतं. त्या ठिकाणी 114 किंवा त्यापेक्षा जास्त संख्येचं महत्त्व असतं. मात्र महापौर निवड आणि महापालिकेचा दैनंदिन कारभार चालवणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या फरकाकडे जाणीवपूर्वक किंवा अज्ञानातून दुर्लक्ष केलं जातं, असं गलगली यांनी स्पष्ट केलं.

सध्याच्या मुंबई महापालिका निकालाकडे पाहिलं, तर भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसकडे 24, मनसेकडे 6, एमआयएमकडे 8, एनसीपीकडे 3, समाजवादी पक्षाकडे 2 आणि एनसीपी (शरद पवार गट)कडे 1 जागा आहे. अशा तुटपुंज्या बहुमताच्या परिस्थितीत कोणालाही एकहाती सत्ता नाही. त्यामुळे युती, बाह्य पाठिंबा आणि रणनीती यांच्या आधारे महापौर निवड होण्याची शक्यता अधिक आहे.

अनिल गलगली यांच्या मते, मुंबई महापौरपदाची लढाई ही केवळ आकड्यांची गणितं नाहीत, तर कायदा, राजकीय डावपेच आणि वेळेचं भान यावर ती ठरते. कोणत्या दिवशी सभा बोलावली जाते, कोण उपस्थित राहतो, कोण बहिष्कार टाकतो, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे 114 शिवाय महापौर होऊ शकत नाही, हा दावा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारा आहे. वास्तव समजून घेतलं, तर कमी संख्येच्या जोरावरही महापौर निवडणूक जिंकणं शक्य आहे, हे स्पष्ट होतं.

एकूणच, मुंबई महापालिकेतील सध्याच्या राजकीय स्थितीत महापौरपदासाठी संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 114 चा आकडा वारंवार चर्चेत असला, तरी कायदेशीरदृष्ट्या तो अंतिम अट नाही, हे अनिल गलगली यांच्या स्पष्टीकरणातून स्पष्ट होतं. त्यामुळे येत्या काही दिवसांत आकड्यांपेक्षा राजकीय रणनीती, उपस्थिती आणि युती यांचा खेळ अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईचा महापौर कोण होणार, याचा फैसला केवळ गणितावर नाही, तर सभागृहातील प्रत्यक्ष चित्रावर होणार आहे.

महापालिका भवनाच्या पार्किंग मध्ये आता रोज दिसणार टँकर

पुणे -२४ तास पाणी पुरवठ्याचे गेली १२ वर्षे स्वप्ने दाखविणाऱ्या महापालिका भवनात आता रोज पार्किंग मध्येच ‘टँकर’ दिसणार असल्याचे सांगितले जाते आहे. महापालिकेत असलेली प्रचंड मोठी पार्किंग व्यवस्था अपुरी पडत असताना यात आता रोज एका टँकर ची भर पडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता हा टँकर लावायला जागा महापालिका कुठे उपलब्ध करून देणार हे पाहण्याची उत्सुकता देखील आहेच.त्याचे असे झालेय,एका नगरसेवकाने जोपर्यंत माझ्या भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागतेय तोपर्यंत मी रोज महापालिकेत टँकर नेच येणार असल्याच घोषणा केली आहे.
नऱ्हेगाव परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक कुटुंबांना पैसे देऊन टँकरने पाणी खरेदी करावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित नगरसेवक हरिदास चरवड यांनी ठाम भूमिका जाहीर केली आहे.“जोपर्यंत नऱ्हेगावचा पाण्याचा टँकर बंद होत नाही, म्हणजेच पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही, तोपर्यंत मी पुणे महानगरपालिकेत स्वतःच्या गाडीने जाणार नाही; मी पाण्याचा टँकर घेऊनच महापालिकेत जाणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या वतीने नऱ्हेगावासाठी अधिक क्षमतेचा व नियमित पाणीपुरवठा तातडीने उपलब्ध करून द्यावा, नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली. जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आंदोलनात्मक भूमिका सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नऱ्हे ग्रामस्थांच्या वतीने सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेविका जयश्रीताई भूमकर, नगरसेविका कोमलताई नवले तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

पुणे उत्तर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार

शिरुरच्या माजी आमदारांच्या कुटुंबियांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले असून, शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीच्या सभापती सुनीताताई गावडे, शिरुरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी उत्तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद, आ. राहुल कुल, दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे माजी आमदार संजय जगताप प्रवीण माने, जयश्रीताई पलांडे, धर्मेंद्र खांडरे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी बोलताना ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांच्या झंझावातामुळे आज संपूर्ण देश माननीय मोदीजींवर प्रचंड प्रेम करत आहेत. त्याशिवाय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान सरकार मुळे आज महाराष्ट्रात भाजपाला भरभरुन प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत आहे.

ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचा नेहमीच योग्य सन्मान राखला जातो. आमदार राजेंद्र गावडे यांनाही पक्षात योग्य सन्मान मिळेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी बालकल्याण समितीच्या सभापती सुनीताताई गावडे यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेशाबाबत भूमिका व्यक्त केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गावडे कुटुंबांनी अतिशय कठोर परिश्रम घेतले. मात्र पक्ष नेतृत्वाने नेहमीच साप्त्न वागणूक दिली. त्यामुळे भाजपाचा विकासाचा अजेंडा आणि कार्यकर्त्यांना मिळणारा सन्मान यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

९९व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विनोद कुलकर्णी यांचा सन्मान

मराठी भाषा, संस्कृतीचा सेवक म्हणून विनोद कुलकर्णी यांचे संमेलनात कार्य : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : सांस्कृतिक लोकशाही जपण्यासाठी साहित्य संमेलनांची आवश्यकता असून राजकीय लोकशाही सदृढ करण्यासाठी आधी सांस्कृतिक लोकशाही बळकट करणे गरजेचे आहे. मराठी साहित्य संमेलनांच्या माध्यमातून संस्कृती व साहित्य क्षेत्रात संवादाचे वातावरण घडते. अशा साहित्य संमेलनात कार्याध्यक्षाची भूमिका बजाविताना विनोद कुलकर्णी यांनी मराठी भाषा, संस्कृतीचा सेवक म्हणून कार्य केले हे अभिनंदनीय आहे, असे गौरवोद्‌गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.

सातारा येथील ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मराठी अभ्यास मंडळ व अक्षर भारती आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा आज (दि. २०) नागरी सत्कार करण्यात आला. त्या वेळी डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ विचारवंत प्रा. जे. पी. देसाई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे, मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, अविनाश सांगोलेकर मंचावर होते. शाल, ग्रंथ आणि भेटवस्तू असे सन्मानाचे स्वरूप होते.

मराठी भाषेसाठी सर्व जातीधर्मातील साहित्यिकांचे अनमोल योगदान लाभले आहे. विनोद कुलकर्णी यांनी कार्यकुशलतेने साहित्य संमेलनांच्या माध्यमातून सामान्य जनतेसह सर्व जातीधर्माच्या साहित्यिक, साहित्यप्रेमी व्यक्तींना एकत्रित केले, असे सांगून डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, आपले व्यवस्थापन कौशल्य पणाला लावत कार्यकर्ता ते नेता अशा भूमिका निभावत विनोद कुलकर्णी महाराष्ट्रातील बारा कोटी मराठी जनतेच्या विश्वासास पात्र ठरले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून विनोद कुलकर्णी यांनी हिंदी भाषा सक्तीला राजकीय व्यक्तींसमोर ठामपणे विरोध करत आपली भूमिका विनम्रपणे मांडली हे कौतुकास्पद आहे. 

मराठी भाषा ही भाकरीची आणि ज्ञानाची व्हावी या दोन टोकांच्या अपेक्षांमध्ये साहित्य संमेलने अडकलेली आहेत. असे असतानाही प्राणापेक्षा भाषेला मान देण्याचे कार्य साहित्य संमेलनांच्या माध्यमातून घडत आहे, असेही डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आवर्जून नमूद केले.

साहित्य क्षेत्रातील एव्हरेस्ट सर केल्याचा आनंद : विनोद कुलकर्णी..

साताऱ्यात साहित्य संमेलन व्हावे ही मागणी ते संमेलनाच्या यशस्वी आयोजनापर्यंतचा प्रवास उलगडताना विनोद कुलकर्णी म्हणाले, साहित्य संमेलन आयोजनाच्या स्वप्नाचा पाठलाग करत त्या करीता अखंडितपणे कृती करत वाटचाल सुरू ठेवली. सातारा येथील साहित्य चळवळीला पुन्हा एकदा सक्रिय करत साहित्य परिषदेशी एकरूप होऊन विरोधी पक्षाला सामावून घेत अखंडितपणे कार्य करत राहिलो. यातूनच पाहिलेल्या एका स्वप्नामुळे न पाहिलेली अनेक स्वप्ने देखील साकार झाली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरिता केलेले प्रयत्न, आंदोलने यांसह शतकपूर्व संमेलन साकारताना आधीच्या संमेलनांमधील त्रुटी व उणीवा दूर करण्यासाठी केलेला अट्टाहास याविषयीही त्यांनी अवगत केले. साताऱ्यातील संमेलन सर्वच बाबतीत विक्रमी ठरावे यासाठी सहकाऱ्यांसह केलेले अविरत प्ररिश्रम, साहित्यिकांना व मान्यवरांना चांदीच्या ताटात दिलेले भोजन, माजी संमेलनाध्यक्षांचा यथोचित सन्मान, ग्रंथविक्रेत्यांच्या अपेक्षांची पूर्तता, अभूतपूर्व ग्रंथदिंडी, चित्ररथ, शंभरी पार केलेल्या शि. द. फडणीस यांनी साकारलेले बोधचिन्ह, निधी संकलन, सुरक्षा व्यवस्था आदी बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला.  नकारात्मक घटनेतून विरोधक,  द्वेष करणाऱ्यांनाही आनंद दिला, असे सांगत साहित्य संमेलन यशस्वी केले हा साहित्य क्षेत्रातील एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा आनंद आहे, असेही ते आवर्जून म्हणाले.

मराठी भाषेसाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक : डॉ. पराग काळकर

डॉ. पराग काळकर म्हणाले, विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वातून ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजन उत्तम झाले. प्रत्येक व्यवस्था चोख ठेवण्याचा निर्धार पूर्ण करण्यात आला. साताऱ्याची कीर्ती जगभरात वाढविण्याचे कार्य या संमेलनाद्वारे झाले आहे. ते पुढे म्हणाले, मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाल्यानंतर अनेक उत्सव, समारंभ झाले. परंतु मराठी भाषा जनमानसापर्यंत जाण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक असून संशोधनाव्यतिरिक्तही मराठी भाषेसाठी कार्य व्हावे, याकरिता विद्यापीठ स्तरावर भविष्यात विविध उपक्रम राबवू.

प्रा. जे. पी. देसाई म्हणाले, विनोद कुलकर्णी हे आदर्श प्रशासक असून त्यांनी संमेलनाच्या यशस्वीतेतून त्यांची कार्यक्षमता, कर्तव्यदक्षता आणि सृजनशीलता दर्शविली आहे. पुढील संमेलनांसाठी नवीन वाटा निर्माण करण्याचे कार्य केले असून आपले साध्य पूर्ण करण्यासाठी पवित्र साधनांचा वापर केलेल दिसतो. प्रा. संदीप सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची भूमिका शिरीष चिटणीस यांनी मांडली तर प्रास्ताविक स्वप्नील पोरे यांनी केले. आभार अविनाश सांगोलेकर यांनी मानले.

पीएमआरडीए– २९ नागरी सेवा आता ऑनलाइन; प्रगत ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे महानगराचे अचूक नियोजन

पुणे महानगराच्या नियोजनाला ‘हायटेक’ स्पर्श; ‘पीएमआरडीए’ प्रशासनात ‘ब्लॉकचेन’ आणि ‘जीआयएस’ प्रणालीचा यशस्वी वापर!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नागरी सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि तत्पर करण्यासाठी २९ सेवा पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता राहिलेली नाही. शहरी नियोजन अधिक अचूक व प्रभावी करण्यासाठी ‘जीआयएस पोर्टल’ सुरू करण्यात आले असून, उपग्रह प्रतिमा व प्रगत जीआयएस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास आराखडा, पूररेषा, जागांची सद्यस्थिती तसेच विविध विभागांची माहिती एकत्रित करण्यात आली आहे. यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान व शास्त्रीय झाली आहे. ब्लॉकचेन प्रणालीमुळे माहिती सुरक्षित, अपरिवर्तनीय ठेवली जात असून, पारदर्शकता वाढली आहे आणि माहितीची पडताळणी सुलभ झाली आहे.

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएमआरडीएने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासन लोकाभिमुख, पारदर्शक आणि वेळेत सेवा देणारे बनवले आहे. या उपक्रमांमुळे नागरिकांचा वेळ व खर्च वाचला असून, अनावश्यक कार्यालयीन फेऱ्यांना आळा बसला आहे.

टीडीआर ब्लॉकचेन प्रणाली : पीएमआरडीएने टीडीआर नोंदी सुरक्षित ठेवण्यासाठी ब्लॉकचेन प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली बनावट कागदपत्रे व फसवणूक रोखण्यास मदत करते. सर्व नोंदी पारदर्शक, अपरिवर्तनीय आणि सुरक्षित स्वरूपात उपलब्ध आहेत.
TDR Blockchain: https://tdr-main.pmrda.gov.in

सुविधा भूखंड ब्लॉकचेन : ॲमेनिटी प्लॉट्सच्या निर्मिती, विक्री व विकास प्रक्रियेत ब्लॉकचेन प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना जमिनीच्या वास्तविक मालकीचा तपशील, सार्वजनिक सुविधांचा अंतिम विकास तसेच लिलाव करण्यात आलेल्या जमिनीशी संबंधित संपूर्ण माहिती पारदर्शकपणे उपलब्ध होते. ‘आरटीआय’शिवायही माहिती पडताळता येत असल्याने प्रशासनावरील विश्वास वाढला आहे.
Amenity Plot Development Blockchain: https://amenity-main.pmrda.gov.in

जीआयएस पोर्टल : महानगराचे नियोजन अधिक अचूक व परिणामकारक करण्यासाठी जीआयएस पोर्टल विकसित करण्यात आले आहे. हे पोर्टल प्रगत जीआयएस तंत्रज्ञान व उपग्रह प्रतिमांवर आधारित असून, विकास आराखडा, पूररेषा, जागांची सद्यस्थिती तसेच विविध विभागांची माहिती एकत्रित करते. नागरिकांना जमीन, सार्वजनिक सुविधा, नैसर्गिक आपत्तींचे धोके आणि विकास प्रकल्पांबाबत माहिती सहज उपलब्ध होते.
GIS Portal: https://gis.pmrda.gov.in/

पीएमआरडीए आरटीएस पोर्टल : झोन दाखला, भाग नकाशा, बांधकाम परवाने आदींसह जमीन व मालमत्ता, अग्निशमन तसेच विकास परवानगी विभागाशी संबंधित दाखले, यांसारख्या महत्त्वाच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे सेवा वितरण अधिक पारदर्शक व गतिमान झाले आहे.
RTS Portal: https://rts.pmrda.gov.in

डिजिटल तंत्रज्ञानाचा नियोजनबद्ध वापर करून पीएमआरडीएने प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर लक्षणीयरीत्या कमी केले आहे. ‘घरबसल्या सेवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात यशस्वीपणे राबवण्यात आल्याबद्दल नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६: मुळशी–मावळ टप्प्यात ल्यूक मडग्वेचे वर्चस्व; भारताचा हर्षवीर सिंग ठरला सर्वोत्तम भारतीय सायकलपटू

▪️ खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप यांच्या हस्ते खेळाडुंचा गौरव

पुणे : भारतातील पहिल्यावहिल्या ‘UCI २.२’ श्रेणीतील आंतरराष्ट्रीय बहु-स्तरीय सायकलिंग स्पर्धा ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ च्या मुळशी–मावळ टप्प्यात चीनच्या ‘ली निंग स्टार’ संघाच्या ल्यूक मडग्वे याने दमदार कामगिरी करत निर्विवाद वर्चस्व गाजवले, तर भारतीय राष्ट्रीय संघाच्या हर्षवीर सिंग सेखॉन याने सर्वोत्तम भारतीय सायकलपटू ठरण्याचा मान पटकावला.
हिंजवडी येथील टी.सी.एस. (TCS) सर्कल येथून सुरू झालेल्या ८७.२ किलोमीटरच्या ‘मुळशी–मावळ माईल्स’ या पहिल्या टप्प्यात ल्यूक मडग्वे याने अवघ्या २ तास २१ सेकंदात शर्यत पूर्ण करत विजेतेपद मिळवले. सुरुवातीपासूनच वेगवान आणि तांत्रिक खेळाचे दर्शन घडवणाऱ्या या टप्प्यात शेवटच्या काही क्षणांत मडग्वे याने निर्णायक आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
एस्टोनियाच्या ‘क्विक प्रो टीम’चा अँड्रियास मॅटिल्डास (०२:००:२७) दुसऱ्या, तर बेल्जियमच्या ‘टार्टलेटो–इसोरेक्स’ संघाचा योर्बेन लॉरीसन (०२:००:३०) तिसऱ्या क्रमांकावर राहिला. UCI नियमांनुसार पहिल्या तीन क्रमांकाच्या खेळाडूंना अनुक्रमे १०, ६ आणि ४ सेकंदांचा टाइम बोनस देण्यात आला असून, तो पुढील टप्प्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, शर्यत सुरू झाल्यानंतर पहिल्या चेकपॉईंटनंतर दुसऱ्या गटातील काही सायकलपटूंमध्ये अपघात झाला. सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि UCI च्या सुरक्षा प्रोटोकॉलनुसार स्पर्धा सुमारे २३ मिनिटे थांबवण्यात आली होती. वैद्यकीय आणि तांत्रिक पथकाने तातडीने मदत केल्यानंतर शर्यत पुन्हा सुरू करण्यात आली.
पहिल्या टप्प्यानंतर विविध श्रेणींतील आघाडीवर असलेल्या खेळाडूंना जर्सी प्रदान करण्यात आल्या. सर्वसाधारण वर्गीकरण आणि पॉइंट्स वर्गीकरणात ल्यूक मडग्वे याने यलो आणि ग्रीन जर्सी मिळवली. बेस्ट क्लायंबर म्हणून क्रिस्टियन रायलेनु (चीन) याला पोलका डॉट जर्सी, सर्वोत्तम आशियाई खेळाडू म्हणून जंबालजाम्ट्स सैनबयार (मंगोलिया) याला ऑरेंज जर्सी, सर्वोत्तम युवा खेळाडू म्हणून तामर स्पिएरो (नेदरलँड) याला व्हाईट जर्सी, तर सर्वोत्तम भारतीय खेळाडू म्हणून हर्षवीर सिंग सेखॉन याला ब्लू जर्सी प्रदान करण्यात आली.
या टप्प्यातील विजेत्या खेळाडूंचा गौरव खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह आदी मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला.
आता सर्वांचे लक्ष उद्या, २१ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘मराठा हेरिटेज सर्किट’ या दुसऱ्या टप्प्याकडे लागले आहे. १०५.३ किलोमीटरच्या या खडतर मार्गात सायकलपटूंना १,०५१ मीटरची उंची सर करावी लागणार असून, पुरंदर किल्ला, सिंहगड आणि खडकवासला तलाव परिसरातून जाणारा हा टप्पा खेळाडूंच्या सहनशक्तीची कसोटी पाहणारा ठरणार आहे.
पुणे जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र शासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पाच दिवसांच्या स्पर्धेत ३५ देशांतील १७१ आंतरराष्ट्रीय सायकलपटू सहभागी झाले असून, एकूण ४३७ किलोमीटरच्या या स्पर्धेमुळे पुण्याच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचे जागतिक स्तरावर दर्शन घडत आहे.
पुढील टप्प्यांचे वेळापत्रक :
▪️ २१ जानेवारी : टप्पा २ – मराठा हेरिटेज सर्किट (१०५.३ किमी)
▪️ २२ जानेवारी : टप्पा ३ – पश्चिम घाट प्रवेशद्वार (१३४ किमी)
▪️ २३ जानेवारी : टप्पा ४ – पुणे प्राईड लूप (९५ किमी)

पुण्यात २१ आणि २३ जानेवारीला महत्त्वाचे रस्ते १२ ते ४पर्यंत बंद, पर्यायी मार्ग जाणून घ्या

0

‘पुणे ग्रैंड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या स्टेज दोन (२१ जानेवारी) आणि स्टेज चार (२३ जानेवारी) या दोन टप्प्यांचे मार्ग शहरातून जाणार आहेत. या दिवशी शहरातील काही प्रमुख रस्ते टप्प्याटप्प्याने तात्पुरते बंद ठेवले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक बदलाची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी वळविण्यात येईल. अत्यावश्यक रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मागाँवर सेवेतील रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलिस आणि स्पर्धेशी संबंधित वाहनांना वाहतुकीस मुभा देण्यात येणार आहे. नागरिकांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक पोलिस व स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. येथे पाहा लाइव्ह लोकेशन स्पर्धेचा थेट मार्ग आणि रस्ते बंद स्थिती पाहण्यासाठी bpgt2026.punepolice.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

स्टेज २ : २१ जानेवारी
हा टप्पा कॅम्प परिसरातील लेडीज क्लब येथून दुपारी १२ वाजता सुरू होणार असून, पुणे शहरातील प्रमुख भागातून मार्गक्रमण करून, वारजे पूल परिसर येथे पूर्ण होणार आहे. हा टप्पा लेडीज क्लब – ब्लू नाईल हॉटेल परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक – गोळीबार मैदान चौक लुल्लानगर चौक शीतल पेट्रोल पंप चौक खडी मशिन चौक येवलेवाडी बोपदेव घाट खडकवासला किरकटवाडी नांदेड सिटी वारजे पूल असा एकूण सुमारे ६५ किलोमीटरचा आहे.
बंद ठेवले जाणारे प्रमुख रस्ते (ठळक मुद्दे)
बंद ठेवण्यात येणारे रस्ते दुपारी १२ ते सायं. ४
राधा चौक ते पूनम बेकरी (बाणेर – सूस रस्ता)
पाषाण सर्कल ते राजीव गांधी पूल (विद्यापीठ रस्ता)
राजीव गांधी पूल ते सेनापती बापट जंक्शन
सेनापती बापट रस्ते ते बालभारती
लॉ कॉलेज रस्ता ते शेलार मामा चौक
कर्वे पुतळा चौक ते वनाझ-पौड रस्ता
नळस्टॉप ते सेनादत्त पोलिस चौकी
सेनादत्त चौक ते टिळक चौक
टिळक रस्ता
बाजीराव रस्ता
अप्पा बळवंत चौक ते राष्ट्रभूषण चौक
राष्ट्रभूषण चौक ते सावरकर चौक
सावरकर चौक ते महाराष्ट्र मित्र मंडळ
महाराष्ट्र मित्र मंडळ ते सेव्हन लव्हज चौक
सेव्हन लव्हज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक (नेहरू रस्ता)
घोरपडी जंक्शन परिसर
स्टेज ४ : २३ जानेवारी
—हा टप्पा बाणेर येथील राधा चौकातून सुरू होणार असून, शहरातील प्रमुख भागांतून मार्गक्रमण करून, बालगंधर्व चौक येथे पूर्ण होणार आहे. हा टप्पा राधा चौक (बाणेर) – पूनम बेकरी (सूस रस्ता) पाषाण सर्कल पुणे विद्यापीठ चौक – राजीव गांधी पूल सेनापती बापट जंक्शन सेनापती बापत रस्ता (बालभारती पत्रकार भवन) लॉ कॉलेज रस्ता शेलार मामा चौक कर्वे पुतळा चौक वनाझ-पौड रस्ता नळस्टॉप म्हात्रे पूल सेनादत्त पोलिस चौकी टिळक चौक पुरम चौक अप्पा बळवंत चौक राष्ट्रभूषण चौक सावरकर चौक महाराष्ट्र मित्र मंडळ चौक सेव्हन लव्हज चौक पॉवर हाउस चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक इंदिरा गांधी चौक अर्जुन रस्ता घोरपडी जंक्शन – बोल्हाई चौक – लाल महाल चौक स. गो. बर्वे चौक नरवीर तानाजी वाडी चौक गरवारे –चौक बालगंधर्व चौक असा सुमारे ७५ किलोमीटरचा आहे.
बंद ठेवले जाणारे प्रमुख रस्ते (ठळक मुद्दे)
बंद ठेवण्यात येणारे रस्ते दुपारी १२ ते सायं. ४
राधा चौक ते पूनम बेकरी (बाणेर सूस रस्ता) –
पाषाण सर्कल ते राजीव गांधी पूल (विद्यापीठ रस्ता)
राजीव गांधी पूल ते सेनापती बापट जंक्शन
सेनापती बापट रस्ते ते बालभारती
लॉ कॉलेज रस्ता ते शेलार मामा चौक
कर्वे पुतळा चौक ते वनाझ-पौड रस्ता
नळस्टॉप ते सेनादत्त पोलिस चौकी
सेनादत्त चौक ते टिळक चौक
टिळक रस्ता
बाजीराव रस्ता
अप्पा बळवंत चौक ते राष्ट्रभूषण चौक
राष्ट्रभूषण चौक ते सावरकर चौक
सावरकर चौक ते महाराष्ट्र मित्र मंडळ
महाराष्ट्र मित्र मंडळ ते सेव्हन लव्हज चौक
सेव्हन लव्हज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक (नेहरू रस्ता)
घोरपडी जंक्शन परिसर

ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील समस्यांचे निराकरण प्राधान्याने करणार – राघवेंद्र बाप्पू मानकर

पुणे: १३५ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली महात्मा फुले मंडई पुण्याचा मानबिंदू आहे. येथील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विद्युत दिवे आणि स्वच्छतेच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यात येतील. येथील विद्युत दिव्यांच्या समस्या येत्या दोन दिवसात सोडविली जाईल, असे आश्वासन प्रभाग २५ चे नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी दिले. महात्मा फुले मंडई येथील व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या आढावा दौऱ्यात ते बोलत होते.

यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की, मंडईतील जुने झालेले विद्युत दिवे आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे व्यापारी तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच स्वच्छतेच्या समस्येबाबतही व्यापाऱ्यांनी गारऱ्हाणे मांडले. यावर बोलताना राघवेंद्र बाप्पू मानकर म्हणाले की, “व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रकाशव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तातडीने हे दिवे बदलण्याचे काम येतोय दोन दिवसात पूर्ण केले जाईल. तसेच मंडईच्या स्वच्छतेसाठी प्रशासनासोबत यंत्रणा कार्यरत करून कचरा साठणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे बाप्पू मानकर यांनी सांगितले.

…म्हणून भरत गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा अभिमान

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार; सामंजस्य करारानंतर वर्षभरात उद्योग उभारणीचे दावोस येथे कौतुक

दावोस (स्वित्झर्लंड): “जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ५०० कोटी रुपयांच्या सामंजस्य कराराची ‘अ‍ॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे उद्योजक भरत गीते यांनी अवघ्या एका वर्षात यशस्वी अंमलबजावणी करून प्रत्यक्ष उत्पादन सुरू केले आहे. वर्षभरात उद्योग उभारणी करणाऱ्या गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा मला अभिमान वाटतो,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

दावोस येथे सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि भरत गीते यांच्यातील संवादावेळी ते बोलत होते. या भेटीदरम्यान उद्योग उभारणीतील नियोजन, वेगवान अंमलबजावणी, प्रशासन आणि उद्योजकांमधील समन्वय तसेच उत्पादन क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील वाढते महत्त्व यावर सविस्तर चर्चा झाली. ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या केंद्र सरकारच्या उपक्रमांना बळ देणाऱ्या या उपक्रमांतून कमी कालावधीत उद्योग उभारणी शक्य असल्याचा प्रेरणादायी संदेश देशभरातील उद्योजकांना मिळाला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी येथे उभारण्यात आलेल्या ‘तौरल इंडिया’च्या अत्याधुनिक अ‍ॅल्युमिनियम कास्टिंग्ज उत्पादन प्रकल्पाने अल्पावधीतच उत्पादन सुरू करत राज्यासमोर आदर्श औद्योगिक मॉडेल उभे केले आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, स्थानिक औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळाली आहे.”

“सामंजस्य करार कागदापुरता न राहता एका वर्षात प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतरित होऊ शकतो, याचे भरत गीते आणि तौरल इंडिया हे उत्तम उदाहरण आहे. मराठी उद्योजकांमध्ये जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता आहे. त्यांना योग्य धोरणात्मक पाठबळ दिल्यास महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नवे शिखर गाठेल,” असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

भरत गीते म्हणाले, “तौरल इंडियाने २०१६ पासून औद्योगिक विस्तार करत ऊर्जा क्षेत्र, संरक्षण उत्पादन, आरोग्य उपकरणे तसेच एरोस्पेस क्षेत्रासाठी आवश्यक अचूक अ‍ॅल्युमिनियम कास्टिंग्ज निर्मितीत भरीव योगदान दिले आहे. विविध क्षेत्रांतील या योगदानामुळे राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बळ मिळत असून, आर्थिक वाढीस हातभार लागत आहे.

“उत्पादन क्षेत्र हे मजबूत अर्थव्यवस्थेचा कणा असून, वाहन उद्योग, अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक मोबिलिटी, संरक्षणपूरक उद्योग, कृषी प्रक्रिया आणि उच्च-मूल्य निर्यातक्षम उत्पादन क्षेत्र मजबूत झाल्यास राज्याचा औद्योगिक पाया अधिक भक्कम होईल,” असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला.

सूस, बाणेर पाषाण मध्ये तब्बल ११५७६ जणांनी वापरला ‘नोटा’ चा अधिकार

पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ‘नोटा’ चा अधिकार म्हणजे या उमेदवारांपैकी कोणीही पसंत नाही हा अधिकार बहुतेक सर्व प्रभागांमध्ये मतदारांनी बजावलेला आहे. किमान २ ते ११ हजार जणांनी आपल्याला एखाद्या किंवा काही उमेदवारांविषयी नापसंती दाखवण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. प्रभाग क्रमांक ९ सूस, बाणेर पाषाण मध्ये तर तब्बल ११५७६ जणांनी ‘नोटा’ चे बटण दाबून नापसंती व्यक्त केली आहे.

काही ठिकाणी रोख नोटा प्रभावी ठरल्या तर नोटा’ चा अधिकार हजारो लोकांनी बजावल्याने काही जण पराभूत झाले. प्रभाग ३८ बालाजीनगर,कात्रज, आंबेगाव मध्येही तब्बल ८९३१ जणांनी ‘नोटा’ चा वापर केला आहे. ७००० पेक्षा अधिक मतदारांनी ३ प्रभागात आपल्याला एखाद्या किंवा काही उमेदवारांविषयी नापसंती दाखवण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.

विविध प्रभागांतील आकडेवारी पाहता किमान ९ प्रभागातील ५ हजार पेक्षा अधिक नोटा वापरला. विविध प्रभागातील नाकारलेल्या उमेदवारांमुळे पडलेली मते अशी :

प्रभाग १ (७९९०) प्रभाग २
(५६६८) प्रभाग ३ (५१८४) प्रभाग ४ (४२९४) प्रभाग ५ (५३१८) प्रभाग ६ (३३१४) प्रभाग ७ ( ४८०४) प्रभाग ८ (७३७१) प्रभाग ९ (११५७६) प्रभाग १० ( ५१८८)

प्रभाग ११ ( ५१८८) प्रभाग १२ (६१४०) प्रभाग १३ (३२६५) प्रभाग १४ (३९७७) प्रभाग १५ (४८४३) प्रभाग १६ प्रभाग (३९७०) १७ (५१८१) प्रभाग १८ (२७४१) प्रभाग १९ (२५५३) प्रभाग २० (५४९३)

प्रभाग २१ (३९२५) प्रभाग २२ (३२४६) प्रभाग २३ (४६९९) प्रभाग २४ (४८४४) २५ (६६३१) प्रभाग २६ (४०४५) प्रभाग २७ (५८३१) प्रभाग २८ (५१५५) प्रभाग २९ (६२१०) प्रभाग ३० (५३१६ )

प्रभाग ३१ (६४०४) प्रभाग ३२ (५३१६) प्रभाग ३३ (७४६१) प्रभाग ३४ (७२१५) प्रभाग ३५ (३८५८)प्रभाग ३६ (५१८८) प्रभाग ३८ (८९३१) प्रभाग ३९ (४१२४) प्रभाग ४० (५४३६) प्रभाग ४१ (४१४७)