Home Blog Page 117

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महालक्ष्मी मंदिरात विशेष आशिर्वचन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय आयोजन

मुंबई, दि. २ फेब्रुवारी २०२६ :
खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी असून, या निमित्ताने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात विशेष आशिर्वचन प्रार्थना व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भक्तीमय कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य तसेच जनसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभावी, यासाठी देवी महालक्ष्मीच्या चरणी विशेष प्रार्थना करण्यात येणार आहे. त्यानंतर देवीला विशेष महाप्रसाद अर्पण करून उपस्थित भाविक व शिवसैनिकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

हा भक्तीमय सोहळा सायंकाळी ६ वाजता श्री महालक्ष्मी मंदिर, भुलाभाई देसाई रोड, मुंबई येथे पार पडणार आहे.

जिल्हा परिषद–पंचायत समिती मतदार यादी वर्किंग कॉपीच्या कामास वेग; अंतिम मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण

हवेली, पुणे : हवेली जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गट व गणांच्या मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. हवेली येथील मतदार यादी वर्किंग कॉपी कक्षामध्ये अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रशासनाकडून काटेकोर नियोजन व विशेष दक्षता घेण्यात आली आहे.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून अंतिम मतदार यादीची छपाई प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार व प्रतिनिधींना अंतिम मतदार यादी वेळेत उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा विशेष भर राहिला असून, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता अधिक बळकट होणार आहे.
मतदार यादीची वर्किंग व मार्क कॉपी तयार करताना आवश्यक माहितीचे सखोल संकलन व पडताळणी करण्यात आली. नोंदणीकृत मतदारांची नावे, पत्ते तसेच इतर तपशीलांची अचूकता तपासण्यात आली असून मृत, स्थलांतरित तसेच दुहेरी नोंदी असलेल्या मतदारांची छाननी करून यादी त्रुटीमुक्त करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत प्रत्येक टप्प्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेत कोणताही गोंधळ अथवा त्रुटी निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने प्रत्येक बाबीची बारकाईने तपासणी केली आहे. मतदारांना योग्य व वेळेवर सेवा मिळावी तसेच निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी, हा प्रशासनाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार अर्चना निकम व तृप्ती कोलते तसेच नोडल अधिकारी रोहन भोसले, प्रा. सचिन शेळके आणि अविनाश तोरणे यांनी माहिती दिली की, संपूर्ण मतदार यादी प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पारदर्शक व सुव्यवस्थित पद्धतीने राबविण्यात आली असून अंतिम मतदार यादी लवकरच सर्व संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हवेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यालयात आयटी सेल सज्ज

हवेली (पुणे): आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हवेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यालयात संगणक, एसएमएस मॉनिटरिंग व कम्युनिकेशन (आयटी सेल) प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि तंत्रज्ञानस्नेही करण्याच्या उद्देशाने या कक्षामार्फत विविध महत्त्वाची कामे राबवली जात आहेत.
या आयटी सेलमध्ये श्री. शुभम वाबळे, श्री. अभिषेक धुमाळ, अक्षय ओव्हाळ, गणेश शिसोदे, मयुर शेवाळे, विनायक शिंदे आणि श्री. वैभव मोटे यांचा समावेश असून सर्वजण निवडणूक प्रक्रियेसाठी तांत्रिकदृष्ट्या समन्वय साधण्याचे काम करत आहेत.
आयटी सेलमार्फत जिल्हा निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळांचे नियमित अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. त्यासोबतच स्थानिक निवडणूकविषयक बातम्या, छायाचित्रे व आवश्यक माहिती वेळेत अपलोड केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या विविध निवडणूक अॅप्लिकेशन्सची अंमलबजावणी करून त्यांचा वापर सुलभ व्हावा यासाठी संबंधितांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक संगणक, इंटरनेट सुविधा, सॉफ्टवेअर व अन्य तांत्रिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम आयटी सेलकडून केले जात आहे. मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगसाठी मतदान केंद्रांची यादी निश्चित करणे, आवश्यक तांत्रिक नियोजन करणे तसेच मतदानाच्या दिवशी थेट मॉनिटरिंगसाठी स्वतंत्र स्क्रीन, टीव्ही व इंटरॲक्टिव्ह पॅनलची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्री-पोल डे व पोल डे दरम्यान मॉनिटरिंग, कम्युनिकेशन व रिपोर्टिंगसाठी मोबाईल व वेब आधारित अॅप्सचा वापर करण्यात येत असून ईव्हीएम, कायदा व सुव्यवस्था विषयक माहिती संकलन व अहवाल सादर करण्याचे काम सुरू आहे. तसेच ईव्हीएम स्ट्रॉंगरूम व मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफी व फोटोग्राफीची व्यवस्था करून रेकॉर्डिंग व बॅकअप सुरक्षितपणे जतन करण्यात येत आहे.
याशिवाय कम्युनिकेशन रूम स्थापन करून संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली असून मतदार यादी, मतदार नाव शोध सर्च इंजिन व निवडणूकविषयक सर्व सॉफ्टवेअरचे व्यवस्थापन आयटी सेलमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे हवेली तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह ठरण्यास मदत होत आहे.

रस्ता सुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाअंतर्गत ५० टक्के मृत्यू कमी करण्यावर भर

पुणे, दि. २: रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासोबतच नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच सुरक्षित रस्ते वापराची संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने ३७ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने ‘रस्ता सुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण’ कार्यक्रम पुणे येथे नुकतेच संपन्न झाले. सन २०३० पर्यंत शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाअंतर्गत ५० टक्के मृत्यू कमी करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत आयोजित उपक्रम महत्वपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले.

यावेळी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखचे उप आयुक्त हिम्मत जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, इतर अधिकारी तसेच महामार्ग प्रकल्पांशी संबंधित कंत्राटदार, अभियंते, सुरक्षा अधिकारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना रस्ता सुरक्षा शपथ देण्यात आली. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे, वेग मर्यादांचे पालन करणे, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करणे, मद्यपान करून वाहन न चालवणे तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याची जबाबदारी स्वीकारणे याबाबत संकल्प केला. या उपक्रमामुळे रस्ता सुरक्षेबाबत वैयक्तिक जबाबदारीची जाणीव निर्माण होत सुरक्षित वाहतुकीचा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचविण्यात मदत होईल असे नमूद करुन सुरक्षित वाहतूक करणेबाबत जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले. त्याच प्रमाणे वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालविण्याबाबत आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमात रस्ता सुरक्षा व सुरक्षा लेखापरीक्षण, रस्त्यालगतच्या धोक्यांचे व्यवस्थापन, वाहन अपघात प्रतिबंधक संरचना तसेच ‘रोडसाईड फर्निचर’ या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था, सेफ्टी फर्स्ट, नवी दिल्ली, 3एम इंडिया लिमिटेड येथील तज्ज्ञांनी सादरीकरणाद्वारे उदाहरणांसह माहिती दिली. “गोल्डन अवर्स इन रोड सेफ्टी” सत्रात ज्यामध्ये अपघातानंतरचे तातडीचे बचावकार्य, प्रथमोपचार व अग्निशमनाबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. अपघातानंतरच्या पहिल्या काही मिनिटांचे महत्त्व यावेळी प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उप मुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २३ हजार मनुष्यबळाची नियुक्ती-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि.२: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या कामकाजाकरिता जिल्ह्यात १३ तालुक्यात एकूण २३ हजार ११४ मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

बारामती तालुक्यात १ हजार ९४५, मावळ १ हजार ६१२, मुळशी १ हजार ४९५, शिरुर २ हजार १९०, हवेली १ हजार ८००, दौंड २ हजार ६० , इंदापूर २ हजार ६३२ , पुरंदर १ हजार ५३८, भोर १ हजार १९०, वेल्हे ४५०, आंबेगाव १ हजार ५७५, जुन्नर २ हजार ४११ आणि खेड २ हजार २१६ तालुक्यात असे एकूण २३ हजार ११४ मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्र
बारामती तालुक्यात २९९, मावळ २४३, मुळशी २२७, शिरुर ३३७, हवेली २६३, दौंड ३१७, इंदापूर ४००, पुरंदर २३५, भोर २३७, वेल्हे १०५, आंबेगाव २३९, जुन्नर ३६६ आणि खेड ३३७ तालुक्यात असे एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्र आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ आदर्श व महिला मतदान केंद्र आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष
निवडणुकीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांनी ०२०-२६१२३३७१ हेल्पलाईन क्रमांक तसेच १०७७ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर ‘बिझीनेस प्रोमोशन’ टॅब उपलब्ध

पुणे, दि.2: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर व्यवसाय वृद्धी (बिझीनेस प्रोमोशन) स्वतंत्र टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. लाभाथ्यांनी या सुविधांचा लाभ घेऊन आपली आवश्यक माहिती संकेतस्थळावर अपलोड करावी, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना आपली सेवा, उत्पादने, त्यांची किंमत तसेच वैशिष्ट्यासह व्यवसायाशी संबंधित सविस्तर माहिती पोर्टलवर अपलोड करता येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना व्यवसायाचे नाव, व्यवसायाचा प्रकार, उत्पादने अथवा सेवा, किमती, वैशिष्टे, संपर्क तपशील व इतर आवश्यक माहिती संकेतस्थळावर नोंदविता येणार आहे. या सुविधामुळे लाभार्थ्यांच्या व्यवसायाला व्यापक प्रचार व प्रसिद्धी मिळणार असून त्यांची उत्पादने व सेवा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या व्यवसायाचा विस्तार होण्यास चालना मिळेल, स्थानिक उत्पादने व सेवा ग्राहकता ह उपलब्ध होतील तसेच महामंडळाच्या लाभार्थ्यांना आर्थिकदृष्टया अधिक सक्षम होण्यास मदत होईल.

अधिक माहितीकरिता सचिन खोजे, जिल्हा समन्वयक (9921755743), ज़िल्हा कौश्यल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे यांच्याशी संपर्क साधावा.

मुंढवा जमीन गैरव्यवहारात शीतल तेजवानीच आरोपी; पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांची नावे गायब

पुणे- मुंढवा परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून या घडामोडीने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात सादर केलेल्या या दोषारोपपत्रात फक्त शीतल तेजवानी यांचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आधी चर्चेत असलेली दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावे आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या दोघांना या टप्प्यावर दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पूर्वी पार्थ पवार यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. मात्र, सादर करण्यात आलेल्या 1886 पानी विस्तृत चार्जशीटमध्ये त्यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दिग्विजय पाटील यांचाही उल्लेख आरोपपत्रात नाही. परिणामी, या दोघांविरोधातील तपासाची दिशा काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कालच केली होती. त्यानंतर लगेचच आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी शीतल तेजवानी हिला या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपी मानत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. या कारवाईमुळे प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया पुढे सरकली असली, तरी अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहिल्याचे दिसते.


अंजली दमानिया यांनी या संदर्भात संताप व्यक्त करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. महाराष्ट्र हा फक्त राजकीय दलालीचा अड्डा झाला आहे का? कायदा फक्त सामान्यांसाठीच आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी नमूद केले की, शीतल तेजवानी यांनी एसपी सिव्हिल सूट 2213/2025 दिग्विजय पाटील यांच्या विरोधात दाखल करत व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे, तर दिग्विजय पाटील यांनी एसपी सिव्हिल सूट 2347/2025 शीतल तेजवानी यांच्या विरोधात दाखल केला आहे.

दमानिया यांनी पुढे म्हटले की, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी 8/12/2025 रोजी हा व्यवहार अवैध ठरवत तो रद्द करण्यात यावा, यासाठी अर्ज केल्याची नोंद आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मग पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार? कशी देणार? हा व्यवहार गुंडाळून टाकला जाणार का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. न्याय हा शब्द राजकारण्यांना लागूच होत नाही का? अशीही त्यांनी विचारणा केली.
दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी ईओडब्ल्यूच्या कारवाईवर टीका करत म्हटले की, आरोपपत्र फक्त शीतल तेजवानीवरच दाखल झाले आहे. मग दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्यावरील चौकशीचे काय? असा सवाल त्यांनी केला. हा न्याय नाही, ही न्यायाची थट्टा आहे, असेही त्यांनी नमूद केले. या पोस्टमुळे या प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक पातळीवर अधिकच चर्चेचे स्वरूप आले आहे.

एकीकडे पोलिसांनी मोठी कारवाई करत विस्तृत चार्जशीट दाखल केली असली, तरी त्यातील नावांवरून आणि अनुपस्थित नावांवरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील पुढील सुनावणी आणि न्यायालयीन प्रक्रियेत आणखी कोणते तपशील समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा न्यायव्यवस्था, तपास यंत्रणा आणि राजकीय व्यक्तींच्या संदर्भातील चर्चांना उधाण आले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबीयांच्या डोक्यावर मायेचा हात…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली स्वर्गीय विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

फलटण, दि. 2 :- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे,” असा धीर देत त्यांनी कुटुंबीयांना आधार दिला. या भावस्पर्शी भेटीमुळे परिसरात उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.
कर्तव्यपथावर असतानाही अत्यंत संयम व मायेने जाधव कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला.

बेकायदेशीर रसायनांचा वापर केल्यामुळे  ‘कॉम्फर्ट’ अगरबत्तीवर बंदी

Mumbai February 02, 2026: भारतामध्ये घरगुती कीटकनाशकांच्या सुरक्षित वापरास प्रोत्साहन देणाऱ्या ना-नफा तत्वावरील उद्योग मंडळ होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (HICA) तर्फे बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्ती ‘कॉम्फर्ट’ विरोधात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे. ‘कॉम्फर्ट’ ही डास प्रतिबंधक अगरबत्ती महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे विक्रीस उपलब्ध असून ती मेसर्स धूप छांव कंपनी यांचे उत्पादन आहे. खुल्या बाजारातून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांवरून हे उत्पादन अनभिज्ञ ग्राहकांकडून खरेदी केले जात असल्याचे स्पष्ट झाले असून, महाराष्ट्र कृषी विभागाने केलेल्या प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये ‘कॉम्फर्ट’ मध्ये बेकायदेशीर आणि मान्यता नसलेले रसायन डाइमफ्लुथ्रिन आढळून आले आहे. ‘कॉम्फर्ट’ अगरबत्त्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक तसेच उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात विक्रीस असल्याचे सांगितले जाते.

मुंबईमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांना डाइमफ्लुथ्रिन असलेल्या ‘कॉम्फर्ट’ अगरबत्त्यांचे अनेक बॉक्स आढळून आले. धूप छांव कंपनी कडे परवाना तसेच CIBRC मान्यता या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे, कीटकनाशके अधिनियम, 1968 आणि कीटकनाशके नियम, 1971 अंतर्गत या उत्पादनाचे उत्पादन व विक्री बेकायदेशीर ठरते.

हर्बल असल्याचा खोटा दावा करत अनेक बेकायदेशीर अगरबत्त्या विक्रीस आणल्या जात असून, त्यामध्ये बेकायदेशीर आणि शासनमान्य नसलेली रसायने वापरली जात आहेत. ‘कॉम्फर्ट’, ‘स्लीपवेल’ आणि ‘रिलॅक्स’ या नावांनी विक्री होणारी उत्पादने यामध्ये ओळखली गेली आहेत. यामुळे भारतभर मान्यता नसलेली कीटकनाशके असलेल्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्त्यांविरोधात अंमलबजावणी कारवाईत वाढ झाली असून, नियामक सतर्कता आणि सार्वजनिक आरोग्याबाबतची चिंता अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येते.

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या अंतर्गत कार्यरत असलेली केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIBRC) ही वैधानिक संस्था असून, भारतात डास प्रतिबंधकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांना उत्पादन, आयात किंवा विक्रीपूर्वी मंजुरी व नोंदणी देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शासनमान्य CIBRC-मान्यताप्राप्त डास प्रतिबंधक उत्पादनांवर नोंदणी क्रमांक (CIR – Central Insecticide Registration number पासून सुरू होणारा) पॅकवर स्पष्टपणे नमूद केलेला असतो. त्यामुळे ग्राहकांना उत्पादनाची सत्यता तपासता येते आणि सुरक्षित उत्पादने निवडता येतात.

डाइमफ्लुथ्रिन आणि मेपरफ्लुथ्रिन यांसारखी रसायने CIBRC कडून मंजूर नसल्यामुळे, त्यांचा डास प्रतिबंधक अगरबत्त्यांमध्ये वापर करणे हा बेकायदेशीर प्रकार आहे. तसेच, कोणतेही शासनमान्य डास प्रतिबंधक उत्पादन CIBRC कडून मंजुरी मिळण्यापूर्वी कठोर चाचणी प्रक्रियेतून जाते.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (HICA)चे मानद सचिव जयंत देशपांडे म्हणाले, “कॉम्फर्टसारख्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्त्यांविरोधात महाराष्ट्र सरकारने वेळेवर केलेल्या ठोस कारवाईचे आम्ही मनापासून कौतुक करतो. अगरबत्ती स्वरूपातील प्रतिबंधकांमध्ये डाइमफ्लुथ्रिनसारख्या बेकायदेशीर व मान्यता नसलेल्या रसायनांचा गैरवापर होणे अत्यंत चिंताजनक असून यामुळे सार्वजनिक आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. अशा उत्पादनांची जाणीवपूर्वक कोणतीही नियामक मंजुरी न घेता विक्री केली जाते आणि ग्राहकांमध्ये ती उत्पादने सुरक्षित असल्याचा गैरसमज निर्माण केला जातो. ही कारवाई नकळत बनावट डास प्रतिबंधक अगरबत्त्या खरेदी करणाऱ्या लोकांच्या हितासाठी आहे. या सरकारी कारवाईमुळे बेकायदेशीर उत्पादक आणि त्यांच्या वितरणास मदत करणाऱ्यांना सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश मिळतो. आम्ही सर्व राज्यांमध्ये सातत्यपूर्ण कारवाईची मागणी करतो आणि ग्राहकांना केवळ वैध CIBRC नोंदणी क्रमांक असलेली डास प्रतिबंधक उत्पादनेच खरेदी करण्याचा सल्ला देतो.”

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी ‘स्लीपवेल’ या ब्रँड नावाखाली विक्री होणाऱ्या 69 लाख रु. किमतीच्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्त्या जप्त केल्या होत्या. या अगरबत्त्यांमध्ये मेपरफ्लुथ्रिन आढळून आले होते. हे केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIBRC) कडून मंजूरी नसलेले कीटकनाशक आहे.

होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (HICA) नियामक संस्था आणि अंमलबजावणी यंत्रणांसोबत निकट सहकार्य सुरू ठेवेल. त्यायोगे  बेकायदेशीर उत्पादनांविरोधात कारवाईला पाठबळ देता येईल आणि ग्राहकांना सुरक्षित व नियमांचे पालन करणाऱ्या घरगुती कीटक नियंत्रण उपायांची ओळख करून देता येईल.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच पक्षाध्यक्ष हव्यात,चित्रपट व सांस्कृतिक विभागाची आग्रही मागणी

पुणे-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच पक्षाध्यक्ष हव्यात अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात त्यांनी या दोन्ही नेत्यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आधारस्तंभअजितदादा पवार यांच्या निधनाने पक्षावर मोठे दुःखद सावट आले आहे. या कठीण काळात पक्षाला सशक्त, संयमी आणि सर्वांना एकत्र ठेवणारे नेतृत्व अत्यंत आवश्यक आहे. सुनेत्रा अजित पवार वहिनी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारून पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी आपली बांधिलकी सिद्ध केली आहे. त्यांचा अनुभव, पक्षाशी असलेली निष्ठा आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी त्या सर्वार्थाने योग्य आहेत,असा आमचा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलच्या प्रदेश अध्यक्षांचा ठाम विश्वास आहे..म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी, एकमुखाने सुनेत्रा अजित पवार वहिनी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी नम्र पण ठाम मागणी करीत आहोत.आपण या मागणीचा सकारात्मक विचार कराल, ही अपेक्षा.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना दिली नेतृत्वाची संधी

महिलांसाठी महापौरपद आरक्षित नसताना ‘लाडक्या बहिणीं’कडे जबाबदारी; हा शिवसेनेचा विश्वासाचा निर्णय– डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. २ फेब्रुवारी २०२६ :
महिलांच्या सक्षमीकरणाबाबत शिवसेनेची भूमिका केवळ घोषणापुरती न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरलेली आहे, याचे ठळक उदाहरण म्हणजे ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये महिलांची महापौरपदी निवड. महिलांसाठी महापौरपद आरक्षित नसतानाही शिवसेनेने ‘लाडक्या बहिणीं’वर विश्वास दाखवत हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

ठाणे महापालिकेत शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड, कल्याण-डोंबिवली महापालिकेत हर्षाली थविल चौधरी आणि उल्हासनगर महापालिकेत अश्विनी निकम यांची महापौरपदी वर्णी लागणार आहे. महापौरपदासाठी महिला आरक्षण नसतानाही शिवसेनेचे पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ राजकीय नसून महिलांच्या कर्तृत्वाला दिलेली दाद आहे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “महिलांनी शिवसेनेला भरभरून पाठिंबा दिला आहे. त्यांच्या कुवतीवर, नेतृत्वक्षमतेवर आणि कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत त्यांना संधी देणे, हीच खरी समानतेची भावना आहे. आरक्षणाची वाट न पाहता महिलांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्याचा शिवसेनेचा हा निर्णय प्रेरणादायी आहे.”

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापौरपदासाठी महिलांनाच प्राधान्य द्यावे, अशी आग्रही भूमिका मांडली होती आणि त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये प्रथमच महिलाराज प्रस्थापित होत आहे.

मुंबई महापालिकेतही शिवसेनेच्या महिलांचा वरचष्मा स्पष्टपणे दिसून येतो. शिवसेनेच्या २९ नगरसेवकांपैकी १९ महिला नगरसेविका आहेत. तसेच युतीअंतर्गत मिळालेल्या ९० जागांपैकी ६३ जागांवर शिवसेनेने महिला उमेदवार दिले होते, हे पक्षाच्या महिला-केंद्रित धोरणाचे द्योतक आहे.

नगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही शिवसेनेचे ६० नगराध्यक्ष निवडून आले असून त्यापैकी ३३ महिला आहेत. त्यामुळे महापालिका असोत वा नगरपालिका, सर्वच स्तरांवर ‘लाडक्या बहिणींचे’ नेतृत्व अधिक भक्कम होत आहे.

“महिला सक्षमीकरण हे शिवसेनेचे घोषवाक्य नसून सातत्यपूर्ण कृती आहे. भविष्यातही महिलांना नेतृत्वाच्या संधी देत शिवसेना त्यांचा सन्मान आणि विश्वास अधिक दृढ करेल,” असा विश्वास डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

चंचल मनाला स्थिर ठेवण्याची ताकद कलेत : पुष्कराज पाठक

पुणे : कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रकाश गुंफेकर यांचा भारतीय कला प्रसारिणी सभा न्यासाच्या वतीने आज (दि. २) अभिनव जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण भारतीय कलाप्रसारिणी सभा न्यासाचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक यांच्या हस्ते झाले.

अभिनव कला महाविद्यालयातर्फे सावित्रीबाई फुले स्मारक येथे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ‘अभिनव कला व्यूह २०२६’प्रदर्शन आणि संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी प्रा. प्रकाश गुंफेकर यांना गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

न्यासाचे दिवंगत सचिव बी. एम. पाठक यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने कला क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्राचार्य विलास चोरमले, संजय भारती, माजी प्राचार्य राहुल बळवंत, संमेलन प्रमुख अर्पिता कोल्हटकर, सतिश काळे, प्रा. गाडेकर, प्रा. बोरावके उपस्थित होते. सुरुवातीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

अभिवन कला महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देत जीवन गौरव पुरस्कार नम्रपणे स्वीकारत असल्याचे प्रा. प्रकाश गुंफेकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

प्रकाश गुंफेकर यांच्या कार्याचा पुष्कराज पाठक यांनी गौरव केला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुष्कराज पाठक म्हणाले, निरक्षरांना देखील वाचता येते अशी भाषा कला आहे. चंचल मनाला स्थिर ठेवण्याची ताकद कलेत असते. आपण सर्वजण कलेचे उपासक आहात. कलेचा आनंद घेताना इतरांनाही आपल्या कलेत सामवून घेतल्यास त्याचे समाजातील स्थान वेगळे असते.

अभिनव कला महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक कलाकार उदयाला आले असल्याचे प्राचार्य विलास चोरमले यांनी गौरवाने नमूद केले. तर अभिनव महाविद्यालय एक कुटुंब असल्याचे सांगून संजय भारती म्हणाले, महाविद्यालयाचा वारसा प्रत्येक विद्यार्थ्यांने जपावा.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता देशपांडे यांनी केले.

स्टार हेल्थ:तिस-या तिमाहित निव्वळ नफ्यात ४१४ टक्क्यांनी वाढ, ४४९ कोटींचा नफा

दाव्यांच्या प्रमाणात घट झाल्यामुळे स्टार हेल्थच्या कंम्बाइण्ड रेशिओमध्ये ३१७ बेसिसस पॉइंट्सची सुधारणातिस-या तिमाहित ९८.९ टक्क्यांवर झेप

चेन्नई, : देशातील आरोग्य विमा कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या स्टार हेल्थ एण्ड अलाइड इन्शुअरन्स कंपनी लिमिटेडने आज आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या तिस-या तिमाहीपर्यंतचे आर्थिक निकाल जाहीर केले. आयएनडी एएस (आएफआरएस-आर्थिक अहवाल सादरीकरणाचे जागतिक मानक) या लेखा मानांकनानुसार, कंपनीने ४४९ कोटींचा करानंतरचा नफा नोंदवला आहे. हा नफा मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ४१४ टक्क्यांनी वाढलेला आहे. प्रीमियममधील वाढ, दाव्यांच्या प्रमाणात झालेली घट आणि कामकाजातील सुधारित कार्यक्षमता यांमुळे हे घवघवीत यश साधता आल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. जागतिक स्तरावरील पारदर्शक अहवाल पद्धती आणि आर्थिक तत्त्वांचे पालन करण्यासाठी स्टार हेल्थ कटिबद्ध असल्याचे कंपनीने यावेळी अधोरेखित केले.

कंपनीने आपल्या मजबूत व्यावसायिक गतीचा लाभ घेत आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या तिस-या तिमाही अखेर ५ हजार ४७ कोटींचा ग्रॉस रिटर्न प्रीमियम नोंदवला असून, यात मागील वर्षाच्या तुलनेत २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिटेल विभागातील प्रीमियम २७ टक्क्यांनी वाढल्याने ४ हजार ८३८ कोटी रुपयांवर पोहोचला आगे. रिटेल क्षेत्रातील या यशाचे कारण म्हणजे नवीन ग्राहकांकडून मिळणा-या प्रीमियममध्ये झालेली ६० टक्क्यांची प्रचंड वाढ. या वाढीमुळे कंपनीच्या आर्थिक भरभराहटीला मोठा हातभार लावला आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६च्या पहिल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीने १३ हजार ८५६ कोटींचा ग्रॉस रिटन प्रीमियम नोंदवला. यात मागील वर्षाच्या तुलनेत १६ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने या कालावधीत रिटेल आरोग्य विमा क्षेत्रात  २० टक्क्यांनी वाढ नोंदवत १३ हजार १७० कोटींचा टप्पा गाठला आहे; यामध्ये नवीन पॉलिसीधारकांकडून मिळणा-या प्रीमियममध्ये झालेली ३७ टक्क्यांची वाढ फार महत्त्वाची ठरली. स्टार हेल्थ कंपनी देशाच्या रिटेल आरोग्य विमा क्षेत्रात आघाडीची कंपनी म्हणून आपले नेतृत्व कायम ठेवत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

आर्थिक वर्ष २०२६च्या तिसया तिमाहीतील कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये –

          व्यवसाय वृद्धी कंपनीने जमा केलेला एकूण प्रीमियम २३ टक्क्यांनी वाढून  हजार ४७ कोटींवर पोहोचला आहे.

§  निव्वळ नफा: कंपनीने ४४९ कोटींचानिव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहित हा नफा ८७ कोटींवर होता. यंदा ४१४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  

§  कंम्बाइन्ड रेशिओ : कंपनीचा कंम्बाइन्ड रेशो ९८.९ टक्क्यांनी सुधारला आहे. गेल्या वर्षीच्या १०२.१ च्या तुलनेत यात ३१७ बेसिक पॉईंट्सची लक्षणीय सुधारणा झाली आहे.

o   दाव्यांचे प्रमाण (लॉस रेशिओ) ३०१ बेसिस पॉईंट्सनी सुधारुन ६८.८ टक्क्यांवर आला आहे.

o   कंपनीच्या खर्चाचे प्रमाण १६ बेसिस पॉइंटनी सुधारुन ३०.१ टक्क्यांवर आले आहे. ही टक्केवारी कंपनीची उत्तम कार्यक्षमता दर्शवते.

आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यातील कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये –

§  व्यवसाय वृद्धीकंपनीने एकूण १३ हजार ८५६ कोटी रुपयांचा प्रीमियम जमा केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील कामगिरी पाहता यात १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  

§  निव्वळ नफाकंपनीच्या निव्वळ नफ्यात ८७ टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. या नऊ महिन्यांत कंपनीने ९६६ कोटींचा नफा कमावला आहे. हा नफा गेल्या वर्षी याच काळात ५१६ कोटी एवढाच नफा झाला होता.

§  कंम्बाइन्ड रेशिओकंपनीचा कंम्बाइंड रेशिओ सुधारुन ९९.८ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या १०२.१ टक्क्यांच्या तुलनेत यात २२२ बेसिस पॉईंट्सची लक्षणीय सुधारणा झाली असूनहे कंपनीच्या फायदेशीर कामकाजाचे द्योतक आहे.

o   दाव्यांचे प्रमाण ७० टक्क्यांवर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात १२४ बेसिस पॉइंट्सची सुधारणा झाली आहे.

o   कंपनीच्या एकूण खर्चाचे प्रमाण ९९ बेसिस पॉईंट्सनी सुधारत २१.८ टक्क्यांनी झाले आहे. यातून कंपनीची कार्यक्षमता वाढल्याचे स्पष्ट होते.

दाव्यांची पूर्तता आणि ग्राहकांचा विश्वास

§  आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यांत स्टार हेल्थने १३.६ लाख दाव्यांची यशस्वीरित्या पूर्तता केली आहे. यासाठी कंपनीने ८ हजार ९०० कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे दावे मंजूर करुन ग्राहकांना मोठा आधार दिला आहे.

§  कंपनीच्या सेवांवर ग्राहकांचा प्रचंड विश्वास असल्याचे यावरुन दिसून येते की, पॉलिसी नूतनीकरणाचे प्रमाण ९९.२ टक्के इतके मजबूत राहिले आहे.  

§  कंपनीच्या एकूण सेवांबद्दलचा ग्राहकांचा समाधान निर्देशांक डिसेंबर २०२४ मधील ५५ वरुन सुधारुन डिसेंबर २०२५ मध्ये ६४ वर पोहोचला आहे.

§  विमा दावे निकाली काढण्याच्या प्रक्रियेतील समाधान निर्देशांकदेखील डिसेंबर २०२४ मधील ६३ च्या तुलनेत सुधारुन ६४ इतका झाला आहे.

डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर

स्टार हेल्थने आपल्या कार्यप्रणालीत डिजिटल तंत्रज्ञान अंमलात आणले आहे. डिजीटल तंत्रज्ञानाच्या वापराने ग्राहकांसोबतच्या नाते चांगल्यारितीने विकसित झाले आहे. या आर्थिक वर्षात नवीन रिटेल विक्रीमध्ये डिजीटल माध्यमाचा वाटा २० टक्क्यांवर दिसून आला. सर्व माध्यमातून जमा होणा-या एकूण प्रीमियमपैकी ७६ टक्के वाटा डिजीटल स्वरुपात गोळा झाला आहे. कंपनीच्या अटम या वितरण एप्लिकेशनद्वारे तिस-या तिमाहित ८५ टक्के नवीन पॉलिसींची विक्री झाली. ही विक्री तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराच्या बळाने वाढल्याचे निदर्शनास आले. दाव्यांच्या व्यवस्थापनासाठी कंपनीच्या एआय आधारित इंजिनचा वापर ५७ टक्क्यांपर्यत वाढला असून, यामुळे कामाचा वेग आणि ग्राहकांचे समाधान दोन्ही उंचावले आहे. डिसेंबर २०२५पर्यंत कंपनीच्या ग्राहक एप्लिकेशनचे १ कोटी ३० लाखांहून अधिक डाऊनलोड झाल्याची नोंद आहे. या अपद्वारे ६० हजारांहून अधिक दावे सादर करण्यात आले असून, ३ लाखांहून अधिक पॉलिसींचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या आकडेवारीवरुन ग्राहकांचा डिजीटल सेवांवरील विश्वास वाढत असल्याचे दिसून येते.

विमा दाव्यांच्या व्यवस्थापमामध्ये स्टार हेल्थने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवला असून, आता ५७ टक्के दावे या आधुनिक प्रणालीद्वारे हाताळले जात आहेत. यामुळे कामकाजाची उत्पादकता वाढली असून, ग्राहकांकडूनही अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कंपनीचे ग्राहक एप्लिकेशनदेखील वेगाने लोकप्रिया होऊ लागले आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत या एलिकेशनच्या डाऊनलोड्सची संख्या १ कोटी ३० लाखांपर्यंत गेली आहे. दरमहा १५ लाखांहून अधिक युजर्स याचा सक्रिय वापर करत आहेत. ग्राहकांचा सेल्फ सर्व्हिस या संकल्पनेवर आता दृढ विश्वास बसल्याने या एप्लिकेशनवर ३ लाखांहून अधिक दावे सादर करण्यात आले आहेत. या दाव्यांची संख्या गेल्या नऊ महिन्याच्या तुलनेत दुप्पट असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. ३ लाखांहून अधिक ग्राहकांनी या एप्लिकेशनच्या माध्यमातून पॉलिसींचे नूतनीकरण केले आहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद हे कंपनीच्या डिजीटल क्रांतीचे यश आहे.  . 

कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांची भूमिका –

यावर स्टार हेल्थ एण्ड अलाइड इन्शुअरन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. आनंद रॉय यांनी आपली भूमिका मांडली. त्यांची प्रतिक्रिया खालीलप्रमाणे –

“स्टार हेल्थने रिटेल आरोग्यविमा क्षेत्रात आपले अव्वल स्थान टिकवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि भविष्यात अधिक मूल्य निर्माण करणा-या शाश्वत व्यवसायाची उभारणी करण्यावर कंपनीचा भर आहे. केवळ व्यवसाय वाढवणेच नव्हे तर भागधारकांसाठी फायदेशीर ठरेल अशा रिटर्न ऑन इक्विटी आधारित परिणामांना प्राधान्य दिले जात आहे. कंपनी एक मजबूत आणि विश्वासार्ह विमा संस्था म्हणून आपली वाटचाल करण्यात कटिबद्ध आहे. 

पोर्टफोलिओची पुनर्रचना, विम्याच्या अटींचे शिस्तबद्ध पालन, खर्चाचे चोख नियोजन आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवा यांमुळे कंपनीची कार्यक्षमता अधिक मजबूत झाली आहे. याचे प्रतिबिंब दाव्यांचे सुधारते प्रमाण, खर्चाच्या प्रमाणात झालेली घट आणि ग्राहकांना मिळणारा उत्तम अनुभव यांतून स्पष्टपणे दिसून येत आहे. या मुख्य घटकांसोबतच कंपनीने गुंतवणूकीवर ९.६ टक्के इतरा समाधानकारक परतावा मिळवला असून, हे कंपनीच्या मूल्यवर्धनासाठीच्या सक्रिय आणि दूरदृष्टीपूर्ण धोरणाचे प्रतीक आहे.

आम्ही आमची आर्थिक अहवाल पद्धत आता आयएफआरएस या जागतिक मानांकनानुसार तयार करत आहोत. यामुळे कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येईल. जागतिक स्तारावरील इतर कंपन्यांशी आमची तुलना करणे अधिक सोपे होईल. २०२७ पासून संपूर्ण विमा क्षेत्रासाठी हे जागतिक नियम लागू होणार आहेत. आम्ही या बदलासाठी आत्तापासूनच पूर्णपणे सज्ज झालो आहोत. या बदलामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचा विश्वास अधिक वृद्धिंगत होईल.

सध्या देशात आर्थिक घडामोडींतील पोषक वावर तसेच सरकारी धोरणे पाहता या सर्व बाबी आमच्यासाठी अतिशय उत्साहवर्धक आहेत. भारतातील सर्वात मोठी आरोग्य विमा कंपनी म्हणून, २०४७ पर्यंत विमा सर्वांसाठी हे राष्ट्रीय उद्दिष्ट आम्ही ध्यानात ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. याद्वारे देशातील प्रत्येक नागरिकाला विम्याचे संरक्षण मिळवून देऊन, त्यांच्या भविष्याला सुरक्षितात प्रदान करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.”

उद्या दुपारी निश्चित होतील पुण्याचे महापौर आणि उपमहापौर ..

पुणे- महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवक एवढे बळ असल्याने हा पक्ष ठरवेल तोच महापौर ,उपमहापौर होईल आणि स्थायी समिती अध्यक्ष देखील होईल हे स्पष्ट झालेले आहे. या पैकी महापौर आणि उपमहापौर पदाची नावे उद्या ११ ते २ यावेळेत निश्चित होतील . आणि या नावांची घोषणा महापालिकेतील गटनेते अर्थात सभागृहनेते गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत होईल असे चित्र आहे. उद्याच स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नावे देखील जाहीर होतील . महापालिका निवडणूक झाली, पक्षांचे गटनेते निवडले गेले तरी अद्याप महापालिकेच्या लोक नियुक्त कारभाराला प्रारंभ झालेला नाही तो उद्यापासून होईल असे दिसते आहे.

नगरसचिव योगिता भोसले यांनी या महत्वाच्या पदांवरील निवडीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारणे बाबत काढलेल्या परिपत्रकातून स्पष्ट होईल नेमके काय काय आहे उद्या ते … पहा काय म्हटले आहे परिपत्रकात …

विषय :- मा. महापौर व मा. उपमहापौर या पदांच्या निवडणूका व स्थायी समिती व विशेष समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अनुसार मा महापौर, मा उपमहापौर या पदांच्या निवडणूका घेणेबाबत महाराष्ट्र शासनाने केलेले मुं. प्रां. मनपा (महापौर व उपमहापौर पदांसाठी निवडणुका घेणे) नियम २००५ व सुधारित नियम २००६ व २०१० मधील दुरुस्त नियम क्र. ३(२) अन्वये पुणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूकीनंतरची पहिली सभा (विशेष बैठक) सोमवार, दिनांक ९/२/२०२६ रोजी सकाळी ११.०० (अकरा) वाजता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात (पुणे महानगरपालिकेच्या नविन विस्तारीतः इमारतीतील सभागृहात) मा. विभागीय आयुक्त यांचे आदेशानुसार मा. श्री. जितेंद्र हुडी, जिल्हाधिकारी, पुणे यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेची कार्यपत्रिका स्वतंत्रपणे पाठविण्यात येईल.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १९ (१) अन्वये मा. महापौर व मा. उपमहापौर या पदांची निवडणूक या सभेत होईल
महाराष्ट्र महानगरपालिका (महापौर पदाचे आरक्षण) नियम २००६, अन्वये पुणे महानगरपालिकेचे महापौर पद -महिला या प्रवर्गासाठी राखीच आहे.
महाराष्ट्र महानगरपलिका अधिनियम १९४९ चे कलम २० अन्चये स्थायी समितीबर व कलम ३० (१) अन्वये सहा विशेष समित्यांवर पालिका सदस्यांचे नामनिर्देशन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ३१अ अन्वये महानगरपालिका मान्यताप्राप्त पक्षांचे अथवा नोंदणीकृत पक्षांचे किंवा गटांचे तौलनिक संख्याबळ विचारात घेईल आणि सभागृहनेता, विरोधी पक्षनेता व अशा प्रत्येक पक्षाचा किंवा गटाचा नेता यांच्याशी विचारविनियम करुन शक्यतोवर महानगरपालिकेतील अशा पकरांच्या किंवा गटांच्या संख्याबळाच्या प्रमाणात सदस्यांचे नामनिर्देशन करता येईल
मा. महापौर व मा उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यक्रम निश्चित केला आहे.
पदाचे नाव-मा. महापौर व मा. उपमहापौर

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा वार व दिनांक-मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी २०२६

वेळ-सकाळी ११.०० ते दुपारी २.००

नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचे ठिकाण-नगरसचिव,नगरसचिव कार्यालय

नामनिर्देशन पत्राचे छापील फॉर्म नगरसचिव कार्यालयात कार्यालयीन वेळेत मिळतील,
टीप:-
१) स्थायी समितीवर एकूण १६ सदस्य नियुक्त करावयाचे आहेत.
२) प्रत्येक विशेष समितीवर एकूण १३ सदस्य नियुक्त करावयाचे आहेत.
३) महिला व बाल कल्याण समितीवर एकूण १३ सदस्य नियुक्त करावयाचे असून त्यापैकी ७५% सदस्य महिला सदस्या नियुक्त करावयाच्या आहेत.
४) विशेष समित्यांच्या कामकाज नियमावली नियम क्र. ६८ अन्वये एका सभासदास दोन पेक्षा अधिक समित्यांवर नियुक्त करता येणार नाही.

महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे निवृत्त,आता अनिरुद्ध पावसकर नवे नगर अभियंता ..

पुणे : पुणे महापालिकेच्या लोकप्रिय अधिकाऱ्यांत ज्यांची गणना होत आली असे , नगर अभियंता पदावर तब्बल तेवीस वर्षांहून अधिक काळ सेवा दिलेले प्रशांत वाघमारे महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले. एकूण ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी शहर अभियंता म्हणून कामकाजाचा निरोप घेतला. त्यांच्या सेवामुक्तीनिमित्त महापालिकेतील शेकडो अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दीर्घकाळ एकत्र काम केलेल्या सहकाऱ्यांनी वाघमारे यांना निरोप देताना त्यांच्या कार्यकुशलतेचा आणि नेतृत्वाचा विशेष उल्लेख केला. प्रत्यक्षात ते ३१ जानेवारी रोजी निवृत्त झाले , शनिवारी सुट्टी असल्याने शुक्रवारीच त्यांनी महापालिकेतील कामकाजाचा निरोप घेतला. त्यांच्या जागी पथ विभागप्रमुख म्हणून काम केलेले अनिरुद्ध पावसकर यांची नगर अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सीईओपी महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या प्रशांत वाघमारे यांनी १९९० मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये सेवेला सुरुवात केली. १९९३ मध्ये पुणे महापालिकेत उपअभियंता पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी पथ विभाग आणि भवन रचना विभागात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. कालांतराने शहर अभियंता पदावर त्यांची नियुक्ती झाली आणि त्या भूमिकेत त्यांनी शहराच्या पायाभूत विकासाला दिशा देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे नेतृत्व केले.
वाघमारे यांच्या कार्यकाळात पुणे शहरात उभ्या राहिलेल्या अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक इमारती आणि सांस्कृतिक केंद्रे त्यांच्या कामाची साक्ष देतात. कोरेगाव पार्कमधील मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, गणेश कला क्रीडा केंद्र, नेहरू स्टेडियमचे नूतनीकरण, कमला नेहरू रुग्णालयाची विस्तारित इमारत, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन, चिखलवाडी येथील हॉकी स्टेडियम, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, महापौर बंगला आणि महापालिका भवनाची नवी इमारत हे प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली साकारले गेले. सध्या सुरू असलेली भिडे वाडा पुनर्विकास योजना आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभारणीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे गेली.

सीवायजीच्या निमित्ताने शहरातील काँक्रीट रस्ते, बाणेर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण, बालेवाडी उड्डाणपुलाचे विक्रमी ६० दिवसांत पूर्ण झालेले काम, तसेच वारजे, वडगाव आणि होळकर पूल येथील अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्रे, मुंढवा जॅकवेल आणि भामा आसखेड धरणातून २०० एमएलडी पाणीपुरवठ्याचा प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना, नदीकाठ सुधार प्रकल्प आणि जायका अंतर्गत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प या सर्व कामांमध्ये त्यांचे नेतृत्व निर्णायक ठरले.
कोरोनाच्या काळात बाणेर येथे अवघ्या २१ दिवसांत तीनशे खाटांची दोन रुग्णालये उभारण्याचे आव्हानात्मक काम वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले. महापालिकेचे उत्पन्न स्रोत ठप्प असतानाही सीएसआरच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लांटसह ही रुग्णालये उभारण्यात आल्यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचू शकले. त्याच काळात अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या विद्युत दाहिन्यांची संख्या वाढविण्याचाही निर्णय वेगाने राबविण्यात आला.

प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून बांधकाम परवानग्यांसह विविध विभागांची कामे ऑनलाइन केल्यामुळे महापालिकेच्या कारभारात गती आणि पारदर्शकता आली. ई-गव्हर्नन्सच्या क्षेत्रात पुणे महापालिकेला देशपातळीवर अग्रस्थानी नेण्यात त्यांच्या प्रयत्नांचा मोठा वाटा राहिला.