पुणे-श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने श्री स्वामी समर्थांची महाराष्ट्रातील मानाची पहिली पुणे ते अक्कलकोट पायी पालखीचे वानवडीमधील भैरोबानाला येथील श्री काळभैरवनाथ मंदिरातून उत्साहात प्रस्थान झाले . पहाटे महापूजा विक्रांत चौगुले व काजल चौगुले यांच्याहस्ते करण्यात आली . त्यानंतर महाआरती सूर्यकांत चौगुले व विजया चौगुले यांच्याहस्ते करण्यात आली . त्यानंतर प्रसादाचे वाटप गणेश हेगडे व दिनेश हेगडे यांच्याहस्ते करण्यात आले . मंदिरात स्वामींच्या पादुकांच्या दर्शनासाठी स्वामी भक्तांनी गर्दी केली होती .
यावेळी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख , सचिव प्रकाश कनोज , बिपीन नाईक गुरुजी , रमेश चौगुले , राजेंद्र चौगुले , आदित्य चौगुले , सुभाष जांभुळकर , सोपानराव गवळी , शाम जांभुळकर , पुंडलिक गवळी ,अनिल गवळी , नईम मलिक , मकसूद सय्यद , स्वप्नील जगताप , सर्वेश चौगुले ,ओंकार बनकर , साई बनकर व संतोष बंड व अन्य मान्यवर उपस्थित होते
हि पालखी मंगळवार , दिनांक १२ नोव्हेंबर २०१९ रोजी अक्कलकोट येथे पोहचणार आहे .