पुणे, दि. 30 – लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर, आसाम,ओरीसा व पश्चिम बंगाल या राज्यामधील 2 लाख 4 हजार 32 प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून 30 मे 2020 अखेर 153 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 15, उत्तरप्रदेशसाठी 61, उत्तराखंडसाठी 2, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 36, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी 8, छत्तीसगडसाठी 5, जम्मू आणि काश्मिर साठी 1, मणिपूरसाठी 1,आसामसाठी 1, ओरीसासाठी 2 व पश्चिम बंगालसाठी 12 आणि मिझोराम 1 अशा एकूण 153 रेल्वेगाडया 2 लाख 4 हजार 32 प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत.
पुणे विभागात 206 शिवभोजन केंद्रामध्ये
23 हजार 148 गरजूंना लाभ
पुणे विभागातील स्वस्तधान्य दुकानांची संख्या 9 हजार 95 असून आज रोजी 9 हजार 92 सुरूआहेत. (ऑनलाईननुसार) स्वस्तधान्य दुकानांमधून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे माहे मे 2020 साठी धान्यवाटप सुरू झाले असून 93.17 टक्के धान्यवाटप झालेले आहे.
29 मे 2020 रोजी विभागात एकूण 206 शिवभोजन केंद्र असून सर्व सुरू आहेत. त्यामध्ये 23 हजार 148 गरजूंनी लाभ घेतला आहे.