मुंबई – विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी,”तुम्ही विचारता बाबरी पाडताना कुठे होता, मी अभिमानाने सांगतो मी तिथेच होतो, शिवसेनेचा एकही नेता नव्हता! असे म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तर मुंबई महाराष्ट्राची आहे, आणि राहणार त्यामुळे त्यांनी त्यावर भावनिक राजकारण करू नये असे म्हणत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.ते मुंबईतील सोमय्या मैदानात भाजपातर्फे आयोजित सभेत बोलत होते.
“मी त्याला मशिद मानत नाही, तो परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा ढाचा होता. तो ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता तेथे हजर नव्हता,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. तसेच आम्ही अभिमानाने सांगतो की तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलं, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “परवा म्हणाले बाबरी मशिद पाडली तेव्हा कुठल्या बिळात होते. हे सांगतात आम्ही बाबरी मशिद पाडली. मी त्याला मशिद मानत नाही, तो परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा ढाचा होता. कोणी हिंदू मशिद पाडूच शकत नाही. तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलं हे अभिमानाने सांगतो. माझा शिवसेनेला सवाल आहे की तो ढाचा पडला तेव्हा तुम्ही कोठे होता? मी अभिमानाने सांगतो, होय मी तो ढाचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो. हा देवेंद्र फडणवीस तो ढाचा पाडण्यासाठी त्या ठिकाणी होता.”
“एवढंच नाही, तर त्याआधीच्या कारसेवेत याच राम मंदिरासाठी १८ दिवस बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसने घालवले. आम्ही लाठी गोळी खाण्याचं काम केलं आणि तुम्ही आम्हाला विचारता, बाबरी पाडली तेव्हा कुठं होतात? खरं म्हणजे बाबरी पडली तेव्हा महाराष्ट्रातील कोणता नेते गेला होता. एकही शिवसेनेचा नेता त्या ठिकाणी उपस्थित नव्हता,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
या सभेला भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, सहप्रभारी जयभान सिंह पवैया, चंद्रकांत दादा पाटील, प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आशीष शेलार, अतुल भातखळकर आणि सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत.
तुम्ही रावणांकडून की रामाच्या बाजुने?
राज्यात हनुमान चालिसा म्हटले तर सरकार उलटून टाकण्याचा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. शिवसेनेनी एकदा सांगावे की तुम्ही रामाच्रूा बाजुने आहे, की रावणाच्या बाजूने आहे. असा प्रश्न विचारत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही – देवेंद्र फडणवीस
तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, ही जीवन पद्धतीने प्रत्येक व्यक्तिला जगण्याचा आधार दिला हे लक्षात ठेवा. की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
वर्क फॉर्म होम माहिती मात्र वर्क फॉर्म जेल ?
संजय राऊत रोज सकाळी घराबाहेर येतात आणि नौटंकी करतात, रोजगाराचे प्रश्न सोडवायचे असतील तर इफ्तार पार्ट्या झोडून होणार नाही असे, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दारूच्या किंमती कमी होऊ शकतात, मात्र पेट्रोलचा दर कमी होऊ शकत नाही. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरें सरकारवर केली आहे. हे सरकार केवेळ दारुड्यासाठी, बिल्डर यांच्या साठी काम करते असेही त्यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्र्यांचे वर्क फॉर्म होम माहिती होते, मात्र आता नवाब मलिक यांचे वर्क फॉर्म जेल हे आताच समजले असे म्हणत ठाकरे सरकारवर आरोप केला आहे.
आमच्यावर तुटून पडाल तर तुटाल – फडणवीस
आम्ही इंदिराजींना घाबरलो नाही, तुम्हाला काय घाबणार, आमच्यावर तुटून पडाल तर तुम्ही तुटाल आणि पडाल देखील असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.