ग्रामीण भागातील शासकीय भूखंडावरील झोपड्या नियमानुसार करण्याची मागणी
झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केली मागणी
पुणे : बारामती तालुक्यातील मालेगावमधील शासकीय गायरान भूखंडावर गेली 25 ते 30 वर्षांपासूनवसलेल्या झोपडपट्टी वासीयांचा ग्रामीण निवारा अतिक्रमण नियमानुकूल करण्याची मागणीचे निवेदन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राम किशोर नवल यांना दिले. बारामती उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांच्या मार्फत नव्वद अनुसूचित जाती प्रवर्गातील झोपड्यांना अतिक्रमणातून काढून नियमानुकूल प्रस्तवास मान्यता देण्याचा आग्रह संघटनेने धरला असून मान्यता देण्याची प्राथमिकता जिल्हाधिकारी यांना दिली आहे.
या शिष्टमंडळात उमेश भोंडवे, बापू शेंडगे, महंमद शेख, प्रदीप पवार, सुरेखा भालेराव, वंदना पवार, दत्ता बाबर, हर्षद पवार, नारायण मोहिते, शारदा पवार, अलका वाबळे, सिंधू पानसरे, वाल्मिक कुचेकर, आदी उपस्थित होते.