पुणे- समाविष्ट 23 गावांच्या विकास आराखड्या साठी महाविकास आघाडी सरकारने वेगाने सुरु केलेली कार्यवाही पाहुन 11 गावांचा आराखडा करू न शकलेली वृत्ती असुयेपोटी टिका करू लागली असल्याचा प्रतिवार आज महापालिकेतील विपक्ष नेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केला आहे .
त्या म्हणाल्या, पी एम आर डी ए च्या हद्दीतील गावांचा खऱ्या अर्थाने विकास होण्याची सुरुवात महाविकास आघाडी सरकारने केली आहे
23 गावांच्या विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे , हरकती सूचना याची प्रक्रिया करून विकास आराखडा अंतिम होऊन 23 गावांच्या विकास होईलच, परंतु पुणे महापालिकेतील सत्ताधारी 11 गावांचा अजूनही विकास आराखडा करू शकले नाहीत,पुणे महापालिकेतील सत्ताधारी पक्ष 11 गावांच्या बाबतीत पुर्णपणे हलगर्जीपणा दाखवत असल्याचे आज सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे व पीएमारडीए प्रशासनाचे 23 गावांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अभिनंदन करते