माफी मागा – महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी
पुणे-‘निधींसाठी सरकारवर अवलंबून का राहता? या देशात शाळा कुणी सुरू केल्या. महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. या सर्व शाळा सुरू करताना शासनाने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात केले. त्यामुळे वाद निर्माण झालाय.चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”इमारतींना निधी कसा द्यायचा हे रस्तोगी आम्हाला शिकवतील. परंतु चांगल्या कामासाठी मी आणि संदीपान भुमरे चांगल्या कामांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मिळून गेलो तर पैशांना अडचण येणार नाही. सरकारवर अवलंबून का राहता? या देशात शाळा कुणी सुरू केल्या. महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. या सर्व शाळा सुरू करताना शासनाने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली शाळा चालवतोय मला मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते, दहा – दहा कोटी रुपये देणारेही आहेत.”
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याने वाद
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी म्हणाल्या की, गेले कित्येक दिवस आपल्या महाराष्ट्रात राज्यपाल कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, प्रसाद लाड ,रावसाहेब दानवे सगळे भाजपाचे नेते आपल्या देशाच्या महापुरुषांबाबत वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्य करीत आहेत. हा छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा देश आहे आणि तिथेच हे भाजपाचे नेते जाणून बुजून त्यांचा अपमान करीत आहेत. परंतु आम्ही आता हे सहन करणार नाही.संगीता तिवारी म्हणाल्या की, भाजपच्या नेत्यांना खरंच काही उरलीच नाहीय किंवा ते हे अपमान मुद्दामून करत आहेत. आम्ही महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस चंदकांत पाटील ह्यांचा जाहीर निषेध करतो. चंद्रकांत पाटील ह्यांनी ताबडतोब आपले शब्द माघारी घेवून राष्ट्रपुरुषांची आणि महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांच्या घरा समोर आंदोलन करून त्यांचा समाचार घेवू .