मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांनी भूमिपूजन केलेल्या नदीकाठ सुधार योजनेच्या कामाला ब्रेक लावला आहे.पुण्यात 6 मार्चला नदी सुधार योजनेचे भू्मिपूजन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. या प्रकल्पावरील विविध आक्षेपांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मोदींच्या समवेत या उद्घाटन प्रकल्पाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते आणि या प्रकल्पांच्या होणार्या जाहिरातीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी हि प्रश्न उपस्थित केले होते. या प्रकल्पासाठी महापालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकारी यांनी मोठ्या गोपनीय पद्धतीने कोरोनाची लाट वेगात असताना गुजरात दौरा केला होता. या सर्व प्रकारची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन कार्ण्यात्येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्य सरकारकडून या प्रकल्पावर असणाऱ्या आक्षेपांबाबत एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीद्वारे येत्या आठ ते दहा दिवसात अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे शरद पवारांशी चर्चा करणार आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. भाजपची पुणे मनपात सत्ता असल्याने ठाकरे सरकाकडून भाजपला मोठा धक्का देण्यात आला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे
राज्य सरकार समिती स्थापन करणार
पुण्यातील नदी सुधार योजनेला ठाकरे सरकारकडून ब्रेक लावण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यातच या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. आता ठाकरे सरकार नदीकाठ सुधार योजनेवरील आक्षेप, योजनेतील कामे, परिणाम या बाबींचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करणार आहे. यासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पर्यावरण खात्यातील सचिवांची समिती नेमण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्याकडून विकास कामांचा धडाका सुरू आहे. आगामी निवडणूक अवघड जाऊ नये, यासाठी तर हे सगळं सुरू नाहीये ना. असा प्रश्न अनेकांना पडला आहे.तर प्रकल्पाच्या अहवालानंतर मुख्यमंत्री शरद पवारांची भेट घेणार असल्याने यांच्यात काय चर्चा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.