Industrialist
स्पाइस मनीच्या अधिकारी नेटवर्कमध्ये महाराष्ट्रात १०० टक्के वाढ
स्पाइस मनी महाराष्ट्रातील उद्योजकांना सक्षम करत पर्यायाने रोजगाराच्या संधी वाढवणार
पुणे – स्पाइस मनी (डिजीस्पाइस टेक्नॉलॉजीची उपकंपनी) ही भारतातील ग्रामीण फिनटेक क्षेत्रातील पायोनियर आणि नागरिकांच्या बँकिंग...
रेफ्रिजरेटरमध्ये तुमचे अन्न अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी स्मार्ट टिप्स
आजकाल आपल्यापैकी बरेच लोक रेफ्रिजरेटरमध्ये अनेक साहित्य आणि आवडीचे खाद्यपदार्थ ठेवतात. असे केले जाते आपल्या पसंतीचे पदार्थ जास्त काळ ताजे आणि वापरासाठी सुरक्षित राहावेत यासाठी. एक सुव्यवस्थित आणि योग्यरित्या व्यवस्थापित केलेला रेफ्रिजरेटर अन्नाची नासाडी कमी करण्यात खूप मदत करतो.
तुमच्या रेफ्रिजरेटरची कामगिरी जास्तीत जास्त सुधरवण्यासाठी आणि फ्रीजमध्ये साठवलेले खाद्यपदार्थ अधिक काळ टिकण्यासाठी गोदरेज अप्लायन्सेसमधील रेफ्रिजरेटर्सचे उत्पादन गट प्रमुख अनुप भार्गव यांच्या काही झटपट टिपा दिल्या आहेत.
· वर्गीकरण करणे आणि नीट लावून ठेवणे: सुव्यवस्थित फ्रिज असेल तर त्यामधून अन्न शोधणे आणि त्याचा ताजेपणा राखणे यासाठी मदत होते. साधारणपणे एकत्र वापरले जाणारे खाद्यपदार्थ एकत्रितपणे आणि लगेच कळून येण्यासाठी बाहेरून वस्तू दिसू शकणाऱ्या कंटेनरमध्ये साठवता येऊ शकतात. फ्रीजमध्ये नको असलेले पदार्थ भरून ठेवणे टाळा.
· योग्य तापमान सेटिंग्ज ठेवणे: तुमच्या अन्नाचे शेल्फ-लाइफ वाढवण्यासाठी, अन्नपदार्थ योग्य तापमानावर आणि रेफ्रिजरेटरच्या उजव्या विभागात साठवा. काही खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये जास्तीत जास्त ताजेतवाने ठेवण्यासाठी साठवले जाणे आवश्यक आहे, तर काही फ्रीझर विभागात जास्त काळ राहतात. सध्याच्या काळातील आधुनिक फ्रॉस्ट-फ्री आणि 4-डोअर रेफ्रिजरेटर्समध्ये साठवणुकीच्या आवश्यकतांनुसार फ्रीजमधून फ्रीझरमध्ये किंवा उलट अशी विभागांची अदलाबदल करण्यासाठीचे झटपट पर्याय असतात.
· फर्स्ट इन, फर्स्ट आउट पद्धत: अन्न साठवताना फ्रीजमध्ये आधी ठेवलेल्या जुन्या वस्तू आणि कमी शेल्फ-लाइफ असलेल्या वस्तू नवीन वस्तूंपूर्वी वापरण्यास प्राधान्य द्या. असे केल्यास लवकर कालबाह्यता तारखा असलेल्या वस्तू प्रथम वापरल्या जातील आणि अन्नाची नासाडी कमी होण्यास मदत होईल.
· रेफ्रिजरेटरमध्ये काय ठेवावे: फळे, भाज्या, लोणचे, ड्रेसिंग्ज, मसाले, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, चॉकलेट, शिजवलेले अन्न, अंडी फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे, तर आइस्क्रीम, पल्प आणि प्युरी, मांस आणि पोल्ट्री यांसह गोठवलेले पदार्थ फ्रीझर विभागात उत्तम प्रकारे साठवले जातात. पॅकेज फूड सारख्या खाद्यपदार्थांवरील लेबल तपासा आणि वस्तू फ्रिजमध्ये किंवा रेफ्रिजरेटरच्या फ्रीझर विभागात ठेवण्यासाठी योग्य आहेत का हे तपासून घ्या.
· रेफ्रिजरेटरमध्ये काय ठेवू नये: कांद्यासारख्या वस्तू रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका. कारण त्यांची चव आणि गुणवत्ता बदलू शकते. तेल, सौंदर्यप्रसाधने, मध, संत्री किंवा सोललेली केळी यासारखी काही फळे फ्रीजमध्ये ठेवणे टाळा. तसेच शिजवलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवण्याआधी सामान्य तपमानावर येऊ द्यावे.
· क्रॉस-कॉनटॅमिनेशन होण्यापासून प्रतिबंध करा: ओलावा कमी होणे टाळण्यासाठी, चव टिकवून ठेवण्यासाठी आणि फ्रीजमध्ये कोणताही वास पसरू नये म्हणून उरलेले खाद्यपदार्थ किंवा उग्र वास असणारे पदार्थ साठवण्यासाठी हवाबंद डबे वापरा. कच्चे मांस आणि सीफूड फ्रीजरमध्ये किंवा वेगळ्या शेल्फमध्ये ठेवा जेणेकरून फ्रिजमध्ये इतर पदार्थांना त्यांचा वास लागणार नाही. ज्यूस सारख्या गोष्टींसाठी न गळणारे म्हणजेच लीक-प्रूफ कंटेनर्स वापरा. त्यामुळे इतर पदार्थांशी त्यांचा संबंध येणार नाही.
· नाशवंत पदार्थांसाठी अतिरिक्त काळजी: फळे आणि भाज्यांसारखे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी स्वच्छ करून आणि कोरडे करून ठेवावेत. पदार्थांमध्ये ओलावा राहिल्यास तो पदार्थ जलद खराब होऊ शकतो. तुम्ही तुमच्या हिरव्या भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यापूर्वी वाळवूही शकता.
· अन्न सुरक्षा: सर्वसाधारण रेफ्रिजरेटर मुख्यत्वे तापमान व्यवस्थापनाद्वारे अन्न साठवतात, टिकवून ठेवतात. तर गोदरेजचे प्रगत फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिजरेटर्स याच्या एक पाऊल पुढे आहेत. नॅनो शील्ड तंत्रज्ञान (पेटंट लागू) ने ते सुसज्ज आहेत. ते जंतूंविरूद्ध 95%हून अधिक अन्न पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करतात त्यामुळे अन्न अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षित राहते. आताच्या आधुनिक काळात शेतापासून घरापर्यंत अन्नपदार्थ अनेक हातातून येत असतात आणि त्यामुळे जंतूंचा धोकाही वाढत असतो. यासारख्या तंत्रज्ञानामुळे तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण करण्यात आणि अन्नाची नासाडी कमी करण्यात मदत होते.
· वारंवार दार उघडणे टाळा आणि दारे व्यवस्थित बंद करा: थंड हवा राहण्यासाठी आणि सातत्यपूर्ण तापमान राखण्यासाठी रेफ्रिजरेटरचा दरवाजा उघडण्याची वेळ मर्यादित करा. वापरल्यानंतर लगेचच रेफ्रिजरेटरचा दरवाजा व्यवस्थित बंद केला ना याचीही खात्री करा. यामुळे ऊर्जेचा वापरही कमी होण्यास आणि अन्नाला वारंवार थर्मल शॉक देणे टाळत अन्न अधिक काळ ताजे ठेवण्यास मदत होते
· प्री-हॉलिडे क्लीनआउट: सुट्टीच्या आधी किंवा न वापरण्याच्या विस्तारित कालावधीपूर्वी, तुमच्या अनुपस्थितीत कालबाह्य होऊ शकणाऱ्या नाशवंत वस्तू काढून टाका. यामुळे फ्रीजमध्ये दुर्गंध पसरत नाही आणि अन्न खराब होण्याचा धोका कमी होतो. नवीन काळातील फ्रीज कस्टमाइझ करण्यायोग्य मोडसह येतात. त्यामुळे तुम्ही दूर असताना ऊर्जा वाचवण्यासाठी तुमचा रेफ्रिजरेटर 'हॉलिडे मोड' वर सेट करू शकता.
· नियमित साफसफाई आणि सेवा देखभाल: कोणतेही अन्न फ्रीजमध्ये सांडले असेल तर ते त्वरित साफ करा, शेल्फ् पुसून घ्या आणि कालबाह्य वस्तूंची नियमितपणे तपासणी करा. स्वच्छ रेफ्रिजरेटर केवळ वाईट वास टाळतो असे नाही तर सुरक्षित अन्न साठवण देखील सुनिश्चित करतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा फ्रीज व्यवस्थित थंड होत नाहीय तर अधिकृत सेवा पुरवठादारामार्फत लगेच तपासणी करून घ्या.
वेदांता रिसोर्सेसने रोखेधारकांना परतफेड करण्याची प्रक्रिया केली पूर्ण
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार रोख्यांमधील ३.२ बिलियन डॉलर्स परिपक्वता २०२९ पर्यंत यशस्वीपणे वाढवण्यात आल्या आहेत.
धातू आणि खाणकाम उद्योगक्षेत्रातील दिग्गज वेदांता रिसोर्सेस लिमिटेडने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार,...
अमिताभ बच्चन आणि टी एस कल्याणरामन यांनी अयोध्येत घेतले श्रीरामाचे दर्शन
अयोध्या – कल्याण ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक – टी एस कल्याणरामन आणि बॉलिवूड मेगास्टार व ब्रँड अॅम्बेसिडरअमिताभ बच्चन यांनी अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतले.कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक राजेश...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर इमर्जन्सी कॉलिंग बूथ उभारणार
एका विशेष करारानुसार वी संपूर्ण मार्गावरील कॉलिंग बूथना नेटवर्क साहाय्य प्रदान करणार असून त्यामुळे आणीबाणीच्या वेळी सार्वजनिक कम्युनिकेशन सुविधा तातडीने उपलब्ध होऊ शकेल.
वी या भारतातील आघाडीच्या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणाऱ्या ९५ किमी लांब एक्स्प्रेसवेवर संचार, कनेक्टिव्हिटी आणि सार्वजनिक सुरक्षा सुविधा सहजपणे आणि तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासोबत एक विशेष करार केला असून त्याअंतर्गत संपूर्ण मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर इमर्जन्सी कॉलिंग बूथ उभारण्यात येणार आहेत. या करारानुसार वी सर्व कॉलिंग बूथ्सना नेटवर्क साहाय्य प्रदान करणार आहे. दर दोन किमी अंतरावर हे इमर्जन्सी कॉलिंग बूथ उभारले जाणार असून त्यामुळे काही आणीबाणी उद्भवल्यास राज्य महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी थेट सहज संपर्क साधणे प्रवाशांना सहजशक्य होईल.
एमएसआरडीसीसोबत करण्यात आलेल्या कराराचा एक भाग म्हणून वी प्रत्येक इमर्जन्सी कॉलिंग बूथवर नेटवर्क सुरळीतपणे राहील याची व्यवस्था करेल आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ग्राहकांना २४X७ सार्वजनिक सुरक्षा व संचार सेवा उपलब्ध करवून देईल. नेटवर्क सर्वत्र एकसमान राहावे आणि त्यामध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी राज्य महामार्ग पोलीस नियंत्रण कक्ष व इमर्जन्सी कॉलिंग बूथ्समध्ये वी सिम असतील. उपकरणांची देखभाल करून तसेच प्रवाशांच्या चौकशी व तक्रारींचे तातडीने निवारण करून एमएसआरडीसी इतर बाबी सांभाळेल.
वोडाफोन आयडियाचे महाराष्ट्र आणि गोव्याचे क्लस्टर बिझनेस हेड श्री रोहित टंडन म्हणाले, "मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे हा राज्यातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक आहे. आघाडीची टेलिकॉम कंपनी म्हणून एमएसआरडीसीसोबत भागीदारी करून जास्तीत जास्त जनतेला अखंडित कनेक्टिव्हिटी उपलब्ध करवून देताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. आज जवळपास सर्वच प्रवाशांकडे मोबाईल फोन असतात, पण काही आणीबाणी उद्भवल्यास कनेक्ट कसे करावे किंवा मदतीसाठी स्वतःचे लोकेशन कसे समजावून सांगावे हे बहुतेकांना माहिती नसते. काही आणीबाणीच्या प्रसंगात या इमर्जन्सी कॉलिंग बूथ्समुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत, वैद्यकीय स्थिती, अपघात आणि वाहने बिघडल्यास तातडीने, थेट संपर्क साधणे शक्य झाले."
एमएसआरडीसी लिमिटेडचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर श्री राजेश पाटील यांनी सांगितले, "अतिशय महत्त्वाच्या अशा या सार्वजनिक सेवेसाठी वी सोबत सहयोग करताना आम्हाला खूप आनंद होत आहे, भविष्यात ही भागीदारी खूप यशस्वी ठरेल याची आम्हाला खात्री आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला एमएसआरडीसीमध्ये आम्ही सर्वात जास्त प्राधान्य देतो. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर सुरक्षित प्रवास अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग हे इमर्जन्सी कॉलिंग बूथ आहेत. संपूर्ण मार्गावर स्थिर व सर्वोत्तम नेटवर्क अनुभव पुरवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आघाडीची टेलिकॉम सेवा पुरवठादार वी कडे आहेत."
