Industrialist
बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियाची स्थापना
टाटा टेक्नॉलॉजीज आणि बीएमडब्ल्यू ग्रुपने केली बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियाची स्थापना - हा भागीदारी उद्यम ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयर आणि बिझनेस आयटी इनोव्हेशनला चालना देईल
· हा भागीदारी उद्योग ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयरमध्ये नावीन्य आणेल, यामध्ये बिझनेस आयटीसाठी सॉफ्टवेयर-डिफाइन्ड वेहिकल्स (SDV) आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्युशन्स यांचा समावेश आहे.
· स्ट्रॅटेजिक इंडियन टॅलेंट सेंटर्स - पुणे, बंगलोर आणि चेन्नई - बीएमडब्ल्यू ग्रुपच्या सॉफ्टवेयर आणि आयटी हबच्या जागतिक नेटवर्कचा भाग बनतील.
· २०२५ च्या अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांच्या संख्येत चार-अंकी वाढ करण्याची योजना आहे.
म्युनिच, जर्मनी आणि पुणे २०२४: उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा प्रदान करणारी जागतिक कंपनी, टाटा टेक्नॉलॉजीज आणि जगातील आघाडीच्या प्रीमियम ऑटोमोटिव्ह उत्पादकांपैकी एक, बीएमडब्ल्यू ग्रुपने मिळून बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया हा भागीदारी व्यवसाय सुरु केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. करारांवर अंतिम स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत आणि अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक मंजुऱ्या मिळाल्या आहेत, आता हा भागीदारी व्यवसाय पुणे, बंगलोर आणि चेन्नईमध्ये प्रमुख तंत्रज्ञान केंद्रांमध्ये १०० कर्मचाऱ्यांसह संचालन सुरु करेल. हा उद्योग वेगाने विस्तार करण्यासाठी सज्ज आहे, २०२५ च्या अखेरपर्यंत चार अंकी कर्मचाऱ्यांसह पुढे जाण्याची योजना आखण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये भारतातील अव्वल अभियांत्रिकी प्रतिभावंतांना आकर्षित करण्यावर विशेष भर दिला गेला आहे. या भागीदारी व्यवसायामध्ये बीएमडब्ल्यू ग्रुप आणि टाटा टेक्नॉलॉजीज या दोघांकडे ५०% शेयर्स आहेत. ही भागीदारी ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान व बिझनेस आयटीमध्ये नावीन्याला प्रोत्साहन देण्याचा सामायिक दृष्टिकोन अधोरेखित करते.
बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया अत्याधुनिक वाहनांसाठी सहजसुलभ, स्केलेबल सॉफ्टवेयर सोल्युशन्स तयार करून आणि अधिक चांगला डिजिटल अनुभव प्रदान करून बीएमडब्ल्यू ग्रुपच्या जागतिक धोरणासाठी पूरक ठरेल. संकल्पना तयार करण्यापासून सर्वसमावेशक अभियांत्रिकी आणि टर्नकी एसडीव्ही विकासापर्यंत, संपूर्ण उत्पादन मूल्य शृंखलेमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या क्षमता बीएमडब्ल्यूच्या भविष्यासाठीच्या मोबिलिटी सोल्युशन्ससाठी प्रमुख सॉफ्टवेयर योजनांमध्ये नावीन्याला प्रोत्साहन देईल आणि भारतातील प्रभावशाली प्रतिभावंतांपर्यंत पोहोचणे सोपे बनवेल.
'भारतातील इंजिनीयर, जगासाठी' हा सिद्धांत या भागीदारी व्यवसायाचा केंद्रबिंदू ठरेल. भारतातील असामान्य अभियांत्रिकी व आयटी प्रतिभावंत एसडीव्ही, ऑटोमेटेड ड्रायव्हिंग, डिजिटल इन्फोटेन्मेन्ट आणि ऑटोमोटिव्ह डिजिटल सेवांसाठी धोरणात्मक सॉफ्टवेयर सोल्युशन्स विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतील. ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयरव्यतिरिक्त, हा भागीदारी व्यवसाय बीएमडब्ल्यू ग्रुपच्या बिझनेस आयटीसाठी डिजिटल नावीन्य प्रदान करेल. परिणामी, बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया या कंपनीच्या जागतिक उत्पादन नेटवर्कच्या डिजिटल परिवर्तनाला वेग मिळवून देईल आणि त्यासोबतच डिजिटल कस्टमर जर्नी व विक्री प्रक्रियांना मजबूत करेल. एआय ऍप्लिकेशन्स आणि प्लॅटफॉर्म्सच्या विकासावर भर दिला जाईल, त्यामुळे सर्व प्रमुख व्यावसायिक प्रक्रियांचा वेग व कार्यक्षमता वाढेल.
हा भागीदारी व्यवसाय युवा भारतीय प्रोफेशनल्सना अशा तंत्रांवर काम करण्याची एक अनोखी संधी प्रदान करतो, जो जागतिक स्तरावर मोबिलिटीच्या भविष्याला आकार देईल. स्थानिक प्रतिभांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अत्याधुनिक ऑटोमोटिव्ह नावीन्यांना नवे रूप देण्याप्रती या व्यवसायाची बांधिलकी ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान इकोसिस्टिममध्ये ग्लोबल इनोव्हेशन हब म्हणून भारताची ओळख मजबूत करते. महत्त्वाकांक्षी प्रतिभावंत भागीदारी व्यवसायाचा भाग बनण्यासाठी आणि जागतिक प्रभाव निर्माण करणाऱ्या सोल्युशन्सना नवे रूप देण्यासाठी याठिकाणी अर्ज करू शकतात.
बीएमडब्ल्यू ग्रुपसोबत भागीदारी व्यवसायाच्या स्थापनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना टाटा टेक्नॉलॉजीजचे सीईओ आणि एमडी वॉरेन हॅरिस यांनी सांगितले, "भारतात टाटा टेक्नॉलॉजीज ब्रँडचे स्थान मजबूत आहे, त्याचा लाभ घेत हा भागीदारी व्यवसाय अव्वल प्रतिभावंतांना आकर्षित करेल आणि मोबिलिटीच्या भविष्याची नवी व्याख्या रचणारी दूरदर्शी सोल्युशन्स विकसित करण्यासाठी एक मंच प्रदान करेल. प्रीमियम, सॉफ्टवेयर-संचालित गाड्यांच्या अभियांत्रिकी, डिजिटल अनुभवांना वाढवण्यासाठी आणि त्यांच्या डिजिटल परिवर्तनाच्या यात्रेला वेग देण्यासाठी बीएमडब्ल्यू ग्रुपसोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे."
टाटा टेक्नॉलॉजीजचे ऑटोमोटिव्ह सेल्सचे अध्यक्ष श्री नचिकेत परांजपे यांनी सांगितले, "ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाचा वेगवान विकास वाहनांचा विकास घडवून आणण्याच्या पद्धती बदलत आहे, या बदलामध्ये सॉफ्टवेयर-डिफाइन्ड गाड्या सर्वात पुढे आहेत. टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये आमची सखोल ऑटोमोटिव्ह विशेषज्ञता आणि मूल्य शृंखलेमध्ये एंड-टू-एंड सोल्युशन्स - संकल्पना आणि तपशीलवार अभियांत्रिकीपासून उत्पादन अभियांत्रिकी आणि टर्नकी एसडीव्ही विकासापर्यंत - आम्हाला मोबिलिटीच्या भविष्याला आकार देण्यात बीएमडब्ल्यू ग्रुपचे समर्थन करण्यासाठी पूर्णपणे तयार करतात. या भागीदारी व्यवसायामार्फत आम्ही ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीजच्या सीमा ओलांडून पुढे जाऊ, अशा गाड्या बनवू ज्या आधुनिक असतील, इतकेच नव्हे तर, जगभरातील ग्राहकांना असामान्य ड्रायव्हिंग अनुभव देखील प्रदान करतील."
बीएमडब्ल्यू ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेयरचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट क्रिस्टोफ ग्रोट यांनी सांगितले, "बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया हा आमच्या जागतिक वेहिकल सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट उपक्रमांचा एक लक्षणीय भाग आहे. भारतातील सॉफ्टवेयर प्रतिभावंत आमच्या भविष्यासाठीच्या सॉफ्टवेयर-डिफाइन्ड गाड्यांसाठी खूप मूल्यवान ठरतील. गतिशील प्रक्रिया आणि अत्याधुनिक टूल्स यांच्यासह बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियामधील भारतीय अभियंते नाविन्यपूर्ण ऑटोमोटिव्ह डिजिटल अनुभव जसे की, ऑटोमेटेड ड्रायव्हिंग आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेन्ट सिस्टिम्स इत्यादी निर्माण करतील."
बीएमडब्ल्यू ग्रुप आयटीचे सीईओ आणि सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अलेक्झांडर बुरेश यांनी सांगितले, "बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियासोबत आम्ही आमचे आंतरराष्ट्रीय आयटी-हब धोरण सातत्याने प्रगत करत आहोत आणि आमच्या ग्लोबल बिझनेस आयटीचा विस्तार करत आहोत. टाटा टेक्नॉलॉजीजसोबत आमची भागीदारी धोरणात्मक दृष्ट्या एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि आमच्या मूल्य शृंखलेमध्ये नाविन्यपूर्ण सॉफ्टवेयर सोल्युशन्स विकसित करण्यासाठी अधिक चांगली परिस्थिती प्रस्तुत करते. बीएमडब्ल्यू ग्रुपच्या डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान प्रतिभावंतांचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे."
बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियाचे सीईओ आदित्य खेरा यांनी सांगितले, "बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया सुरु करून आम्ही जागतिक स्तराचे सॉफ्टवेयर हब तयार करत आहोत, जे बीएमडब्ल्यू ग्रुपच्या ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयर आणि बिझनेस आयटी धोरणामध्ये प्रमुख भूमिका बजावेल. सॉफ्टवेयर-डिफाइन्ड गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू ग्रुप आणि टाटा टेक्नॉलॉजीजची लीडरशिप आणि त्यांच्या प्रॉडक्ट इंजिनीयरिंग उत्कृष्टता यांना एकत्र आणून आम्ही इनोव्हेशन आणि वृद्धीसाठी तसेच भारतातील अव्वल प्रतिभावंतांना बीएमडब्ल्यू ग्रुपच्या मोबिलिटी सोल्युशन्सच्या भविष्याला आकार देण्याची संधी देण्यासाठी तयार आहोत."
बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियाच्या मॅनेजमेंट टीममध्ये दोन्ही पार्टनर कंपन्यांचे अनुभव एक्झिक्युटिव्ह आहेत. टाटा टेक्नॉलॉजीजच्या वतीने आदित्य खेरा, सीईओ म्हणून तर स्वेता गिरिनाथम सीएफओ आहेत. बीएमडब्ल्यू ग्रुपकडून स्टेफन फ्लेडर हे एंटरप्राइज आयटीचे सीओओ आणि ऑलिव्हर शेकल ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयरचे सीओओ आहेत.
ॲक्सिस बँक आणि व्हिजाने भारतातील उच्चभ्रूंसाठी केले ‘प्रायमस’ या अल्ट्रा लक्झरी क्रेडिट कार्डचे अनावरण
● अल्ट्रा-हाय नेट वर्थ व्यक्तींसाठी तयार केलेला पहिली क्रेडिट कार्ड योजना
● प्राइमस केवळ आमंत्रणाद्वारे, ॲक्सिस बँकेद्वारे ऑफर केला जाईल
अमिताभ चौधरी, एमडी आणि सीईओ, ॲक्सिस बँक (डावीकडे) आणि संदीप...
अल्ट्राव्हायोलेटने विनायक भट यांची मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून नियुक्तीची घोषणा केली
मुख्य उत्पादन अधिकारी या नात्याने, विनायक भट अल्ट्राव्हायलेटच्या उत्पादनाच्या पोर्टफोलिओच्या विस्तारावर आणि नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रवेशावर देखरेख करतील.F77 Mach 2 आणि F99 रेसिंग प्लॅटफॉर्मच्या...
ॲक्सिस बॅंकेने सादर केले ‘निओ फॉर मर्चंट्स’ – व्हिसा आणि मिंटओक यांच्या भागीदारीत व्यापारी समुदायासाठी ‘वन-स्टॉप सोल्युशन’
एक सर्वसमावेशक मोबाइल ॲप्लिकेशन
· व्यापाऱ्यांना या मोबाईल ॲपद्वारे पेमेंट स्वीकारणे, व्यवहारांचा वृत्तांत पाहणे आणि सेवेसाठी विनंती सादर करणे शक्य;
· ओम्नी चॅनेल पेमेंटची सुविधा उपलब्ध;
· पेमेंटची प्रक्रिया आणि सेवेबाबत विनंती या गोष्टी मोबाइल ॲपद्वारे सुरळीत;
· ॲपच्या ऑल-इन-वन कार्यक्षमतेमुळे कमी खर्चात मिळतात विविध उपाय.
मुंबई, २० ऑगस्ट २०२४ : भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने आज व्हिसा आणि मिंटओक यांच्या भागीदारीत व्यापाऱ्यांसाठी ‘निओ फॉर मर्चंट्स’ नावाचे ॲप्लिकेशन सादर केले. अत्याधुनिक बँकिंग सोल्युशन्स उपलब्ध करून व्यवसायांना सक्षम बनवण्याच्या ॲक्सिस बँकेच्या कटिबद्धतेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यूजर-फ्रेंडली इंटरफेस, पेमेंट स्वीकृतीचे अनेकोपयोगी पर्याय आणि व्यवसायासंबंधी महत्त्वाची माहिती मिळण्याची सोय अशी वैशिष्ट्ये असलेले हे ‘निओ फॉर मर्चंट्स’ ॲप भारतभरातील व्यापाऱ्यांसाठी पेमेंटसंबंधीच्या सुविधा पुन्हा परिभाषित करण्यासाठी सज्ज आहे.
‘निओ फॉर मर्चंट्स’ ॲपच्या माध्यमातून व्यापारी पेमेंट स्वीकारण्यास, व्यवहारांचे वृत्तांत पाहण्यास आणि सेवेसंबंधीच्या विनंती सादर करण्यास सक्षम होतात. त्यामुळे त्यांना या कामांसाठी रिलेशनशिप मॅनेजरवर अवलंबून राहण्याची गरज राहात होते. या ॲप्लिकेशनच्या ऑल-इन-वन कार्यक्षमतेमुळे व्यापाऱ्यांना कमी खर्चात अनेक उपाय मिळतात. तसेच ओम्नी चॅनेल स्वरुपात पेमेंटचे अनुभव आणि व्यवहार व सेवा अहवाल यांसारख्या सर्व व्यापारी गरजांसाठी हे ॲप ‘वन-स्टॉप सोल्युशन’ ऑफर करते. व्यवसायात अधिकाधिक सोयी निर्माण करणारे हे ॲप डिजिटलायझेशनच्या वाढत्या ट्रेंडशी अगदी सुसंगत आहे.
व्यापाऱ्यांच्या वाढत्या गरजा आणि त्यांच्यापुढील आव्हाने लक्षात घेऊन, ॲक्सिस बँकेचे ‘निओ फॉर मर्चंट्स’ ॲप अनेक फायदे देते:
· सुविधा : कार्ड, एसएमएस पे आणि यूपीआय यांद्वारे व्यापारी कधीही पेमेंट स्वीकारू शकतात. त्यामुळे त्यांना व त्यांच्या ग्राहकांना उत्तम अनुभव आणि समाधान मिळते.
· कार्यक्षमता : या मोबाइल ॲपद्वारे पेमेंटची प्रक्रिया आणि सेवेसाठीची विनंती सादर करणे या क्रिया सुलभतेने होतात. त्यामुळे व्यापारी व कर्मचारी या दोघांचाही वेळ वाचू शकतो व उत्पादकता वाढते.
· डेटासंबंधीची माहिती : या ॲप्लिकेशनद्वारे व्यवहार आणि सेटलमेंट यांचे वृत्तांत व्यापाऱ्यांना लगेच मिळतात व त्यातून त्यांना तातडीची माहिती उपलब्ध होते.
· यूजर-फ्रेंडली ॲप : पेमेंट आणि सेवा क्षमता यांमुळे या ॲपचे मूल्य वाढून त्यातून सर्व कामे सुरळीत होतात, उत्कृष्ट अनुभव मिळतो आणि व्यवसाय वाढीस चालना मिळते.
ॲक्सिस बॅंकेने व्हिसा आणि मिंटओक यांच्याशी केलेल्या भागीदारीमुळे बॅंकेच्या व्यापाऱ्यांसंबंधीच्या सेवांचा पोर्टफोलिओ बळकट झाला आहे. डिजिटल पेमेंटमध्ये व्हिसा दिग्गज आहे, तर ‘मिंटओक’चे खास व्यापाऱ्यांसाठीचे सास सोल्यूशन भारतीय लघुउद्योगांसाठी आर्थिक समावेशकता वाढवते. व्हिसा आणि मिंटओक यांच्या सहकार्यामुळे बॅंकेला देशभरातील लघु व मध्यम उद्योगांसोबत चांगले संबंध निर्माण करता येतील, असलेले संबंध दृढ करता येतील आणि या उद्योगांच्या वाढीला चालना देण्यात सहाय्य करता येईल.
‘निओ फॉर मर्चंट्स’ ॲप्लिकेशन सादर करताना ‘ॲक्सिस बँकेचे प्रेसिडेंट & हेड - कार्ड्स आणि पेमेंट्स विभागाचे प्रमुख संजीव मोघे म्हणाले, “व्यापारी समुदायासाठी सतत सर्वसमावेशक डिजिटल सोल्युशन्स आणण्याकरीता आम्ही प्रयत्नशील असतो. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायातील खर्च कमी करता यावेत आणि डिजिटल पेमेंट्स परवडणाऱ्या दरात स्वीकारता यावेत, हा आमचा उद्देश आहे. ‘निओ फॉर मर्चंट्स’ हे व्यापारी समुदायाच्या सर्व व्यावसायिक गरजांसाठीचे वन-स्टॉप सोल्युशन आहे. त्यांचा व्यवसाय सुरळीतपणे चालवण्यासाठी, त्यांना अधिक सुविधा मिळण्यासाठी आणि एक मजबूत डिजिटल इकोसिस्टम तयार करून त्यांना मदत करण्यासाठी हे ॲप्लिकेशन आम्हाला उत्तम संधी मिळवून देते.”
ॲक्सिस बँकेसोबतच्या भागीदारीबद्दल बोलताना ‘मिंटओक’चे को-फाऊंडर & सीईओ रमण खंडुजा म्हणाले, "व्यवसायांमध्ये अधिकाधिक डिजिटायझेशन येत असताना, ॲक्सिस बँकेसोबतच्या सहकार्यातून आजच्या एसएमईना उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सोल्युशन्स देणे आम्हाला सहज शक्य होईल. बॅंकेवर असणारा ग्राहकांचा विश्वास आणि त्यांचे सर्व ठिकाणी असलेले वितरण यांच्या जोडीला आमचे तांत्रिक कौशल्य असल्याने, ‘निओ फॉर मर्चंट्स’ ॲप हे पेमेंट, वित्तसाह्य आणि व्यवहार यांसंबंधीच्या गरजा निश्चितच पूर्ण करेल."
"निओ फॉर मर्चंट्स सादर करण्यासाठी ॲक्सिस बँक आणि मिंटओक यांच्याशी सहकार्य करण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. हे एक परिवर्तनशील मोबाइल ॲप आहे. व्यापारी आणि लहान व्यवसायांना डिजिटल युगात भरभराटीस आणून स्पर्धेत उतरण्यास ते मदत करते. सुविधा, कार्यक्षमता आणि वाढीसाठी मौल्यवान माहिती या बाबी उपलब्ध करून उद्योगशील, उत्साही अशा भारतीय व्यापाऱ्यांच्या आकांक्षांना समर्थन देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. ‘व्हिसा’च्या सामर्थ्याने, आम्ही आमच्या ग्राहकांना आणि एकूणच वाणिज्य क्षेत्राच्या भवितव्याला आकार देतो आणि सर्वत्र सुरक्षित व अखंड पेमेंटचा अनुभव मिळवून देतो,” असे प्रतिपादन ‘व्हिसा’चे भारत व दक्षिण आशिया क्षेत्राचे व्यापारी विक्री विभागाचे प्रमुख ऋषी छाबरा यांनी केले.
ॲक्सिस बँक ही देशातील व्यापारी-संपादन व्यवसायातील सर्वात मोठी संस्था आहे. जून २०२४ रोजीच्या आकडेवारीनुसार, ‘पीओएस टर्मिनल’च्या क्षेत्रात तिचा बाजारपेठेत २० टक्के हिस्सा होता. तिने आतापर्यंत देशभरात १८.६७ लाख इतके टर्मिनल्स बसविले आहेत आणि मेट्रो शहरे, इतर शहरे आणि ग्रामीण भागात सर्व श्रेणीतील व्यापाऱ्यांना सेवा पुरविली आहे. बँकेने गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीत (जून २३ ते जून २४) बाजारपेठेत ४३ टक्के इतका वाढीव हिस्सा मिळवला आहे.
‘निओ फॉर मर्चंट्स’विषयी अधिक माहितीसाठी कृपया पुढील लिंक पाहा : https://www.axisbank.com/business-banking/in-store-payment-acceptance
व्यापाऱ्यांसाठीची वैशिष्ट्ये आणि फायदे पाहण्यासाठी; कृपया पुढील लिंकवर क्लिक करा : https://youtu.be/0c5UBbKvaHM?feature=shared
गोदरेज ॲग्रोव्हेट त्रिपुरामध्ये स्थापन करणार ऑइल पाम प्रोसेसिंग मिल
~ स्थानिकहवामानासाठीयोग्यबियाणेविकसितकरणारेसंशोधनआणिविकासकेंद्रस्थापनकरणार
~ पामतेलउत्पादकांना सर्वसमावेशक साहाय्यदे ण्यासाठी समाधान हे सोल्युशन सेंटर उघडणार
धलाई, त्रिपुरा – गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडने (GAVL) आज घोषणा केली की, त्यांच्या पाम ऑइल प्लांटेशन व्यवसाय (OPP) त्रिपुरामध्ये पाम ऑइल प्रोसेसिंग मिलिंगची स्थापना करणार आहे. राज्यातील धलाई जिल्ह्यात हा प्रकल्प असेल. त्यासाठी कंपनी सध्या वर्षाला ३ लाख क्षमतेची रोपवाटिका चालविते आणि ती प्रतिवर्षी ५ लाखांपर्यंत वाढविण्याची योजना आहे. पामसाठी परिसरात प्रगत संशोधन आणि विकास केंद्रही स्थापित करण्याबरोबच कंपनी पाम शेतकऱ्यांना सर्वसमावेशक साहाय्य प्रदान करण्याच्या उद्देशाने समाधान केंद्र हे एक-स्टॉप सोल्युशन सेंटर सुरू करण्यात येईल.
त्रिपुराचे माननीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री रतन लाल नाथ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तसेचमिल आणि आर अँड डी सेंटरच्या भूमिपूजन समारंभाला एसडी गुथरी प्लांटेशन्स, मलेशियाचे संशोधन आणि विकासप्रमुख डॉ. हरिकृष्ण कुलवीरासिंगम उपस्थित होते. पाम ऑइल क्षेत्राचा अभ्यास आणि डीकोडिंग करण्याच्या दोन दशकांहून अधिक अनुभवासह, ते उच्च उत्पन्न देणारे शाश्वत पाम तेल विकसित करण्यासाठी कंपनीला मार्गदर्शन करतील.
ऑगस्ट 2021 मध्ये खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन - ऑइल पाम (NMEO-OP) सुरू केल्यानंतर त्रिपुरा सरकारने किमान 7,000 हेक्टर जमीन पाम लागवडीखाली आणण्याची योजना सुरू केली आहे.
यावेळीभाष्यकरतानात्रिपुराचेमाननीयकृषीआणिशेतकरीकल्याणमंत्रीआ, रतनलालनाथम्हणाले, "खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन - ऑइल पाम (NMEO-OP) च्या यशस्वितेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत त्रिपुरा सरकार एक अशी इको-सीस्टम तयार करण्यासाठी कटिबद्ध आहे, जी राज्यातील पाम तेल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे आणि जमिनीचा वापर करून राज्यात पाम ऑइल प्रोसेसिंग मिल सुरू झाल्यामुळे आमचे शेतकरी आता गोदरेज ॲग्रोव्हेटसारख्या विश्वासू आणि विश्वासार्ह भागीदारांसोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहेत. त्यांच्या कौशल्याचा फायदा यात होईल. राज्यातील पाम तेल शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी समाधान केंद्र स्थापन करण्याचा त्यांचा निर्णय केवळ सध्याच्या पाम तेललाच नव्हे, तर पाम तेल उत्पादकांनाही मदत करेल, ज्यामुळे राज्याच्या क्षमतेवर त्यांचा दृढ विश्वास दिसून येईल.”
गोदरेजॲग्रोव्हेटलिमिटेडचेव्यवस्थापकीयसंचालकबलरामसिंहयादवम्हणाले, “पाम तेल शेतकऱ्यांच्या उत्थानाच्या आमच्या सामाईक मिशनसाठी त्रिपुराच्या मनापासून पाठिंब्यासाठी आम्ही शासनाचे आभारी आहोत. त्यांच्याद्वारे निर्माण होत असलेली अनुकूल इको-सीस्टम खरोखरच उत्साहवर्धक आहे.”
“आम्हाला खात्री आहे की, आजच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन थेट आमच्याकडे विकण्यास मदत होईलच, शिवाय रोजगार निर्मिती आणि व्यवसायाच्या संपूर्ण मूल्य शृंखलेशी संलग्न व्यवसायांना चालना मिळण्यास मदत होईल. आम्हाला विश्वास आहे की, आमच्या तीन दशकांहून अधिक काळातील कौशल्याचा लाभ घेऊन, राज्याचा पाठिंबा आणि विश्वास या क्षमतेमुळे आम्हाला पाम तेलच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या देशाच्या प्रवासात योगदान देण्याची संधी नक्कीच मिळेल,” असेही ते पुढे म्हणाले.
संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्याच्या निर्णयावर भाष्य करताना, गोदरेजॲग्रोव्हेटलिमिटेडच्यापाम ऑइलप्लांटेशनबिझनेसच्यासीईओसौगतनियोगीम्हणाले, “नफ्यापूर्वी शाश्वतता कायम ठेवणारी संस्था म्हणून, पाम तेल लागवडीच्या शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने आम्ही या भागात प्रगत संशोधन आणि विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे आमची शास्त्रज्ञांची टीम स्थानिक हवामान आणि राज्याच्या हवामानासाठी योग्य बियाणे विकसित करण्यासाठी जीनोमिक्स करत आहेत. या केंद्रातून देशाच्या इतर भागांमध्ये नवनवीन शोध घेऊन जाण्याची आम्हाला आशा आहे.”
यावेळी त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषदेच्या कृषीचे कार्यकारी सदस्य भाभा रंजन रेआंग; करमचेराचे विधानसभा सदस्य पॉल डंगशू; चावमानूचे विधानसभा सदस्य संभूलाल चकमा; त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषदचे एमडीसी बिमल कांती चकमा; त्रिपुरा सरकारीमधील कृषी सचिव अपूर्वा रॉय; एसडी गुथरी प्लांटेशन्स, मलेशियाचे डॉ. हरिकृष्ण कुलवीरासिंगम; मनु ब्लॉकचे उपाध्यक्ष प्रणॉय देबबर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड (GAVL) ही भारतातील सर्वात मोठ्या वैविध्यपूर्ण अन्न आणि कृषी व्यवसाय समूहांपैकी एक आहे, तसेच भारतातील पाम ऑइल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. 2027 पर्यंत पाम लागवडीचा विस्तार 1.2 लाख हेक्टरपर्यंत करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. दीर्घकालीन शाश्वत विकासास समर्थन देण्यासाठी भारतातील कंपनीने गेल्या वर्षी समाधान, एक-स्टॉप सोल्युशन सेंटर सुरू केले. प्रत्येक समाधान केंद्राच्या माध्यमातून ~2,000 हेक्टर पामच्या लागवडीस पाठिंबा देण्याचा मानस आहे आणि अत्याधुनिक कृषी पद्धतींचा लाभ घेऊन व उद्योग तज्ज्ञांकडून विशेष मार्गदर्शन प्रदान करून परिपक्व लागवडीतून जास्तीतजास्त उत्पादन मिळविण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीची स्टेट बँक ऑफ इंडियासोबतची भागीदारी लागवडीच्या काळात पाम लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत करेल.
आज जाहीर केलेल्या उपक्रमांद्वारे, कंपनी 2027 पर्यंत त्रिपुरामध्ये पाम लागवडीखालील क्षेत्र 10,000 हेक्टरपर्यंत वाढविण्याचा मानस आहे.
