फडणवीस म्हणाले,’आम्ही नाही,मविआच बेईमान; जनाधार लाथाडून सत्ता काबीज केली ‘ ; तर शिंदेंचा अजित पवारांना उलटा सवाल ,तुम्ही काय केले ? खोट्या केसेस करून शिवसैनिकांना आपल्या पक्षात या म्हणत .
“उद्धव ठाकरेंनी राजीनाम्यानंतरही आदेश जारी केले” CM एकनाथ शिंदेंचा दावा
मुंबई- ”एकत्रित मते मागितली असे दोन पक्ष शिवसेना आणि भाजप सरकार सत्तेत आले आहे. मविआचे सरकार बेईमानीचे सरकार होते. जनाधाराला लाथाडून ते सरकार आले होते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या सरकारला गझनीची लागण झाली आहे. त्याही सरकारमध्ये 30 डिसेंबर 2019 ला विस्तार झाल्यानंतर 5 जानेवारी 2020 ला झाले. आमच्या सरकारची चिंता न करता विरोधकांनी त्यांच्या एकजूटीचा विचार करावा असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
”राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे आम्ही विरोधकांना चहापाणाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रीत केले होते. मात्र, त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तसेच आम्हाल सातपानी पत्र दिले. मात्र, या पत्रातले मधले चार पानं आम्ही विरोधात असताना दिलेल्या पत्राचेच आहेत. हे पत्र देताना विरोधकांना विसर पडला की, ते दीड महिन्यापूर्वी सत्तेत होते. मात्र, आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे मंत्रीमंडळ कार्यरत आहे, त्यावर विरोधकांचाही विशेष विश्वास आहे. कारण जी कामं त्यांनी केली नाहीत, ती सर्व कामं त्यांना आमच्याकडून अपेक्षित आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.विरोधक आमचं सरकार बेईमानीने आल्याचे म्हणत आहेत. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत ज्या लोकांनी एकत्रीत येऊन मतं मागितली होती. असे भाजपा आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येऊन हे सरकार स्थापन झाले आहे. खरं तर महाविकास आघाडीचे सरकार हे बेईमानीचे सरकार होते. जनमताचा अनादर करून हे सरकार आले होते. तसेच महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही ३२ दिवस खातेवाटप झालेले नव्हते. त्यामुळे या विरोधकांना गजनीची लागणं झाली आहे, असे दिसते, अशी टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला
जनतेच्या खात्यात थेट पैसे जातील
आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आल्याचे वाटत आहे. आधी मंत्रालय, सह्याद्री, मंत्र्यांचे सरकारी बंगले रिकामे होते. मुख्यमंत्री आणि मी राज्याचा दौरा केला. आम्ही कोणत्याही निर्णयाला स्थगिती दिली नाही. आम्ही त्या निर्णयाची पुनरावलोकन करीत आहोत.
एकनाथ कुठे आहे?
एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांनी धर्मवीर चित्रपटाचा उल्लेख करीत एकनाथ कुठे आहेत असे विचारले तर मी त्यांना म्हणेल की, मी जागेवरच आहे. आम्ही जे निर्णय घेतले त्यासाठी खंबीरपणे उभे राहावे लागते. निर्णयाची आधीच्या सरकारमध्ये अंमलबजावणी होत नव्हती.
विरोधकांचा आरोप चुकीचा
एकनाथ शिंदे म्हणाले, नुकसान झाले, अतिवृष्टी झाली तेव्हा मी आणि उपमुख्यमंत्री गडचिरोलीपर्यंत गेलो. हेलिकाॅप्टरच्या पायलटने सांगितले की, हवामानामुळे प्रवास करु शकत नाही तर आम्ही रस्तामार्गाने पाहणीसाठी गेलो. विरोधक म्हणतात की, आम्ही पाहणी केली नाही ते साफ चुकीचे आहे.
शेतकऱ्यांना भरीव मदत
एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले. मविआच्या सरकारपेक्षा भरीव मदत शेती आणि शेतकऱ्यांना दिली आहे. दुपटीपेक्षा जास्तीची मदत अतिवृष्टीची झळ बसलेल्या शेतकऱ्यांना दिली जात आहे याचे वाटप लवकरच होईल. सरकार म्हणून कर्तव्य म्हणून आम्ही कार्य करीत आहोत.
कामांना स्थगिती नाही
एकनाथ शिंदे म्हणाले, केंद्रीय पथक एक ते चार ऑगस्टला पाहणी करुन गेले पण विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. कोणत्याही कामाला स्थगिती दिली नाही. जे निर्णय सरकार अल्पमतात आल्यानंतर मविआने घेतले. सुमारे तीनशे-चारशे जीआर काढले होते म्हणून आम्ही जी कामे सुरु नाहीत ती रद्द न केली नाही. त्याचे पुनरावलोकन करीत आहोत. आम्ही त्याचा साधा आढावाही घेऊ नये का? जे आवश्यक आहे त्याला प्राधान्य दिले जाईल. पुर्वीच्या सरकारने आकसापोटी निर्णय घेतले, आम्ही धडाधड निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक सेवेत स्थगिती नाही. औषध खरेदी, आमदारांच्या कामांना स्थगिती नाही. अनावश्यक कामांबाबत आढावा घेऊ.
आमदारांच्या गैर कृत्याचे समर्थन नाही पण तुम्ही सरकार मध्ये असताना काय केले, शिवसैनिकांवर खोट्या केसेस केल्या आमच्या पक्षात ये म्हणत … मुख्यमंत्र्यांचा प्रतिवार
मुख्यमंत्री म्हणाले, आमच्यावर आरोप केले की, आम्ही विश्वासघातकी आहोत पण जेथे आमचे आमदार, मंत्री जात आहेत तेथे जनता त्यांच्यावर अपेक्षा ठेवत आहेत. विरोधीपक्षाने चांगल्याला चांगले म्हणायला काहीच हरकत नाही.शिंदे गटाच्या एका आमदाराने सरकारी कर्मचाऱ्याच्या कानशिलात पेटवली. तुम्हाला सत्तेची मस्ती आली का? असा परखड प्रश्नअजितदादांनी उपस्थित केला.यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले आम्ही आमदारांच्या बेकायदा कृत्याचे अजिबात समर्थन करत नाही ,पण मस्ती आली का विचारणारे हे सत्तेवर असताना यांनी काय केले ? शिवसैनिकांवर खोट्या केसेस करून त्यांना आपल्या पक्षात या असे म्हणत होते ..
“उद्धव ठाकरेंनी राजीनाम्यानंतरही आदेश जारी केले” CM एकनाथ शिंदेंचा दावा
“माझ्या माहितीप्रमाणे, उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या दोन मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३०० ते ४०० निर्णय घेतले. जिथे एक रुपयाची तरतूद करायला हवी, तिथे १० रुपयांची तरतूद करण्यासारखे काही निर्णय घेतले. त्यामुळे आम्ही काही निर्णयांना स्थगिती दिली. संबंधित निर्णय आम्ही रद्द केले नाहीत, संबंधित निर्णयांचा सविस्तर आढावा घेऊन ते अमलात आणले जातील. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतरही घाई-गडबडीत काही निर्णय (ऑर्डर्स) घेतले होते” असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.