वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प गुजरातला गेल्याचं समोर आलं होते. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आणखी एक आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग पार्कचा प्रकल्पही राज्याबाहेर गेला आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. “रायगडमध्ये बल्क ड्रग पार्क प्रकल्प येणार होता. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र लिहलं होते. सुभाष देसाई यांनी त्याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला होता. मात्र, केंद्र सरकाराने गुजरात, आंध्रप्रदेश आणि हिमाचलला बल्क ड्रग पार्कबाबात विचारणा केली आहे. त्यात आता गुजरातमधील भरूचमध्ये हा बल्क ड्रग पार्क सुरु होणार आहे,” अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.“महाराष्ट्राची शरमेनं मान खाली घालण्याचा प्रकार सूरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांताचा एकेरी उल्लेख करत विधानसभेत सांगितलं की, चार लाख कोटींचा प्रस्ताव ते घेऊन आले. २ लाख कोटींच्या प्रकल्पाला चार लाख कोटी सांगणं, हे कोणत्या सरकारला शोभणारं आहे. २ लाख कोटी आणि १ लाख रोजगार उपलब्ध करून देणार प्रकल्प गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता,” असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
आदित्य म्हणाले, गुजरातला गेलेल्या प्रकल्प स्पष्टपणे सेमीकंडक्टरशी संबंधित होता. केंद्राने यावर 76 हजार कोटींची सबसीडी केंद्राने दिला होता. आम्ही जानेवारीत अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा करून बैठक घेतली होती आणि पाठपुरावा केला. डावोसमध्येही एमओयू करायचा होता, कागदपत्रे तयार होती. केंद्र- राज्यसरकारच्या सबसीडीसह वेदांता आणि फाॅक्सकाॅनच्या गुंतवणुकीची सांगड घालणे आवश्यक होते. त्यानंतर जूनमध्ये आम्ही भेटही घेतली पण चाळीस गद्दारांनी आपले सरकार पाडले त्यानंतर हा विषय मागे राहीला.हे नुकसान त्यांच्यामुळे आणि त्यांनीच केल्याचे म्हटले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, बल्क ड्रग्ज पार्क रायगडमध्ये आपण आणणार होतो. महाराष्ट्राने मागणी पहिले केली, पण आता ती गुजरातेतील भरूचमध्ये जाणार आहे. या व्यवस्थेतील मुख्यमंत्री महोदय गणेश मंडळांना भेटी देत होते. त्यांना हा विषय माहित नसेल, पण महाराष्ट्राचा पहिला हक्क अशा प्रकल्पावर होता, पण तो आपल्या हातून, राज्यातून गेला हे पूर्णपणे किती खरे आणि खोटे हे मुख्यमंत्री सांगतील.