बाबासाहेबांनी धर्मांध शक्तीना विरोध केला आणि तुम्ही त्यांच्याशी आघाडी करता ..सुशीलकुमार शिंदेंचा वंचित ला सवाल

Date:

आंबेडकर -नेहरू मैत्री पुरस्काराने रमेश बागवे सन्मानित

पुणे-‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या नावावर चालणाऱ्या शक्तींना आयुष्यभर विरोध केला, त्यांच्यासोबत तुम्ही आघाडी करता आणि धर्मांध शक्तीला मते मिळवून निवडून देता… तुम्ही कुणाला साथ दिली,’ असा खडा सवाल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना केला. उत्तर प्रदेशात एका तरुणाला कॉटवर बांधून जाळले जाते, बेंगळुरूत भाजपच्या मागासवर्गीय खासदाराला गावात प्रवेश करू दिला जात नाही, मग लोकशाही कुठेय.. या सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’ असे ताशेरेही त्यांनी ओढले.
पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्रतर्फे काँग्रेसचे नेते रमेश बागवे यांना आंबेडकर-नेहरू मैत्री पुरस्कार प्रदान करताना ते बोलत होते. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, आयोजक राहुल डंबाळे आदी उपस्थित होते. जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान करा असे सरदार पटेल यांनीच सांगितल्याचा इतिहास लपवून ठेवला जात असल्याची खंत व्यक्त करून सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली. ‘सोलापूर येथे अमित शहांच्या सभेपूर्वी दुसरे सरदार पटेल जन्माला आल्याचे बोर्ड लावण्यात आले. मात्र, कलम ३७० रद्द केल्याने कोणालाही सरदार पटेल होता येत नाही. काश्मीरमध्ये महिनाभरानंतरही शाळा, संपर्क यंत्रणा सुरू नाही. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाला घ्यावी लागते. मोदींना पुतीन यांच्यासारखे हुकूमशहा व्हायचे आहे. मात्र, ते देश सांभाळू शकणार नाही’ असा टोलाही त्यांनी लगावला. सुवर्णा डंबाळे यांनी प्रास्ताविक केले
.देशाला आरएसएस-भाजपचे ग्रहण

‘आरक्षणामुळेच मागासवर्गीयांना प्रगतीची संधी प्राप्त होते, तसेच आधी धर्म, जात, समाज व्यवस्थेची समीक्षा करा, मग आरक्षणाची समीक्षा करा’, अशी टीका करून जोगेंद्र कवाडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानाचा समाचार घेतला. ‘या देशाच्या संविधान, समता, बंधुतेला आरएसएस-भाजपरूपी ग्रहण लागले आहे. त्यातून सुटण्यासाठी आघाडीला मतांचे दान द्या,’ असे आवाहन त्यांनी केले. तर ‘सर्व तूप तुमच्या वाट्याला घेऊन घटक पक्षाला विसरू नका,’ अशी टिप्पणीही त्यांनी आघाडीतील जागावाटपावर केली.

पक्षांतर म्हणजे राजकारणाचे भणंगीकरण

‘सिद्धांत, तत्त्वांसाठी पक्ष बदलणे समजू शकतो, पण सध्याचे पक्षांतर म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचे भणंगीकरण आहे. पन्नास वर्षे साखर कारखाने, सूतगिरण्यांद्वारे साम्राज्य निर्माण करणारे, आता तिकीट मिळणार नाही किंवा ‘ईडी’ची नोटीस येऊन तुरुंगात जावे लागेल, या भीतीपोटी पक्ष बदलत आहेत,’ असा उद्वेग भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केला

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण अजिंक्यपदाकडे; खो-खोमध्ये (महिला) विजेतेपद

पुणे, दि. ७ मे २०२४: अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने सलग दुसऱ्या दिवशीही दबदबा ठेवत अजिंक्यपदाकडे वाटचाल सुरु केली आहे. यामध्ये महावितरणच्या खो-खोच्या महिला संघाने विजेतेपद मिळवले आहे. तर कबड्डीमध्ये उपांत्य फेरीत तर खो-खो व बास्केटबॉलमध्ये पूर्वउपांत्य फेरीत महावितरणच्या संघाने प्रवेश केला आहे. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत गुरुवारी (दि. ७) खो-खोच्या महिला गटात महावितरण विरुद्ध राजस्थान असा अंतिम फेरीचा सामना झाला. यात महावितरणच्या कर्णधार भाग्यश्री फडतरे, सारिका जाधव, श्रेया जाधव, मोनिका भोसले यांनी आक्रमण व संरक्षणामध्ये दमदार कामगिरी करीत सामन्यावरील वर्चस्व कायम ठेवले. पहिल्या डावात १२ विरुद्ध ५ गुणांची आघाडी घेत दुसऱ्या डावात महावितरण संघाने सहा मिनिटे राखून खो-खोचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. तर राजस्थानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. खो-खोच्या पुरुष गटामध्ये महावितरण संघाने (१५) हरियाणा संघाचा (४) ११ गुणांनी सहज पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र राजस्थान (६) विरुद्ध महापारेषण (५) संघात तुल्यबळ लढत झाली व राजस्थानने एक गुणाने निसटता विजय मिळवला. आता महावितरण विरुद्ध महापारेषण आणि हरियाणा विरुद्ध राजस्थान अशी अंतिम फेरीसाठी लढत होणार आहे. भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह निशिकांत शिंदे, विराज कोटमकर, महेंद्र पाटील यांनी आक्रमण व संरक्षणामध्ये सातत्य कायम ठेवले असून सर्व साखळी सामन्यांत वर्चस्व मिळवले आहे. महापारेषणचा उत्कृष्ट खेळाडू विशाल सावंत व इतर सहकाऱ्यांवर आता बलाढ्य महावितरण संघाचा पराभव करण्याचे आव्हान आहे. कबड्डीच्या पुरुष गटामध्ये पूर्वउपांत्य फेरीत बीएसईएस राजधानी दिल्ली संघ (४९) विरुद्ध महापारेषण (३९) यांच्या अतिशय अटीतटीची लढत झाली. केवळ तीन गुणांनी महापारेषणला पराभव पत्कारावा लागला. दिल्लीच्या संजीव छिकारा, हरदेव शर्मा, रवी प्रकाश व अनिल यांनी आक्रमक पवित्रा घेत महापारेषणचे शेवट्या मिनिटापर्यंत सुरु असलेले आक्रमण थोपवून धरले. यानंतर हिमाचल प्रदेश संघाने (३२) मध्यप्रदेश पॉवर मॅनेजमेंट संघाचा (७) सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तर महावितरण संघातील (३०) दीपक माने, अमित जाधव, नीलेश ठाकूर, अभिषेक नर, अजय शिंदे यांच्या आक्रमक पवित्र्याने तेलंगणा ट्रान्समिशन संघाचा (११) १९ गुणांनी आणि हरियाणा संघाने (४८) टाटा पॉवर मुंबई संघाचा (१७) पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. बास्केटबॉलच्या साखळी सामन्यांनी या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी रंगत वाढली. यात महावितरण (३४) विरुद्ध तेलंगणा (२४) लढतीत महावितरणच्या पंकज गेडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेता शत्रुघ्न गोखले, आशिष खानापुरे यांनी सामन्यावर नियंत्रण ठेवत विजय मिळवला. यासोबतच सुरजितसिंग, हरप्रितसिंग, सतेंदरसिंग यांच्या आक्रमणामुळे पंजाब संघाने (२१) उत्तराखंड संघाचा (८) पराभव केला. तर हरियाणा संघ (५४) विरुद्ध महापारेषण (६) लढतीत हरियाणाने एकतर्फी विजय मिळवला.

‘प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या प्रसारासाठी महावितरणचा पुढाकार,शुक्रवारी पुणे परिमंडलात एकाच दिवशी मेळावे

पुणे,दि. ७ मे, २०२६:- केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी 'प्रधानमंत्री...