SHARAD LONKAR

55151 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा:नसीम खान

राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतच त्यांच्या विचारांना काळीमा फासण्याचा प्रयत्न. मुंबई, दि १६ जूलै २०२४विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली मजापूर गावातील अल्पसंख्याक समाजाच्या घरावर हल्ले करून तोडफोड, जाळपोळ...

वेल्डिंगसाठी फिडर पिलरमधून वायर जोडताना विद्युत अपघात, एक जखमी

पुणे : वेल्डिंग करण्यासाठी जवळच्या फिडर पिलरमधून अनधिकृत वीजवापर करण्यासाठी वेल्डिंग मशीनची वायर जोडताना विद्युत अपघात झाला व यात एक जण जखमी झाल्याची घटना आकुर्डी येथे...

रमणबाग शाळेत आषाढी वारी निमित्त फुलला विद्यार्थी वारकऱ्यांच्या भावभक्तीचा मळा

pune-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत मंगळवार दिनांक १७ जुलै २०२४ रोजी विद्यार्थ्यांनी वारी सोहळा अनुभवला.पंढरीच्या वारीचे धार्मिक पौराणिक,सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व...

फर्ग्युसन मध्ये जिओ-इकॉनॉमिक्स वरील नवीन कोर्स

पुणे - आंतरराष्ट्रीय संबंध व भूअर्थकारणाशी निगडीत विविध घटकांचा समावेश असलेला नवीन अभ्यासक्रम फर्ग्युसन महाविद्यालयात या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येणार आहे. हा नवीन अभ्यासक्रम...

किरण बेदींद्वारे सेफ्टी अलार्मसह एव्हरेडीच्या सायरन टॉर्चचे अनावरण

महिला सुरक्षेला बळकट बनविणारा एक नवोपक्रम- एव्हरेडीचा सायरन टॉर्च हे एक अनोखे आणि क्रांतिकारी उत्पादन आहे. हा टॉर्च सुरू कराल, तेव्हा त्याला जोडून असलेली साखळी खेचल्यावर एक 100dbA क्षमतेच्या सुरक्षा अलार्मचा आवाज होईल, ज्यामुळे संकटकाळात मदत मागण्यासोबतच आसपासच्या लोकांना सावध करता येते. https://www.youtube.com/watch?v=6mRanjeL2n8&t=2s - एव्हरेडीच्या या नवीन सायरन टॉर्चबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी #AwaazUthaneyKaPower ही मोहीम कर्णबधिर आणि मूक महिलांद्वारे चालविली जाते. या मोहिमेचे उद्दिष्ट महिलांना, तसेच अन्य लोकांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा आणि सुरक्षा साधनांसह सक्षम करणे, तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करणे, हे आहे. मुंबई, १६ जुलै २०२४: शक्ती, कामगिरी आणि विश्वासार्हतेचा समानार्थी असलेला भारताचा नंबर 1 बॅटरी ब्रँड एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया लि. (EIIL) यांनी भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी डॉ. किरण बेदी यांच्या हस्ते सुरक्षा अलार्मसह फ्लॅशलाइट - एव्हरेडी सायरन टॉर्चचे उद्घाटन केले. मार्केटमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या या अनोख्या सायरन फ्लॅशलाइटला 100dbA आवाजाचा सुरक्षा अलार्म आहे. याला लागून असलेली चेन खेचली जाते, तेव्हा हा अलार्म वाजतो. महिला आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेल्या या नवीन लाँच केलेल्या सायरन फ्लॅशलाइटचे उद्दिष्ट दैनंदिन जीवनातील सुरक्षा वाढविणे आहे. या नावीन्यपूर्ण उत्पादनाला ब्रँडच्या #AwaazUthaneyKaPower या नवीन मोहिमेचे पाठबळ आहे, ज्याचे नेतृत्व कर्णबधिर आणि मूक लोकांकडून केले जाते. सर्वांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी या उत्पादनाची आवश्यकता अधोरेखित केली जाते.#AwaazUthaneyKaPower मोहिमेसाठी एव्हरेडीने भारतातील कर्णबधिर समुदायाला भेडसावणाऱ्या "ॲक्सेसिबिलिटी"शी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यरत संस्था India Signing...

Breaking

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...
spot_imgspot_img