अश्विनी कदम यांच्या पाठपुराव्यास आले यश ..!
लाॅकडाऊन च्या काळात उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झालेले असताना दहा हजार रुपये लाख मोलाचे.
पुणे- गेल्यावर्षी 25 सप्टेंबरला आलेल्या आंबील ओढ्याच्या पुरानंतर तेथील पूरग्रस्तांना उर्वरित दहा हजार रुपये मदतीचा चेक नागरिकांना शासनामार्फत वाटण्यास अखेर सुरुवात झालेली आहे.माझ्या सततच्या पाठपुराव्याला यश येऊन झाल्याचे नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी येथे सांगितले.
त्या म्हणाल्या ,’मध्यमवर्गीय चाळी किंवा झोपडपट्टी अशा स्वरूपाच्या घरे असणाऱ्या आंबील ओढ्या लगत राहणाऱ्या नागरिकांना या भयानक पुराचा फटका बसला होता. ज्यामध्ये काही जणांचे प्राण जाऊन जीवितहानी सह घरांचे व मालमत्तेचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले होते.
याबाबत मी सातत्याने पुणे महानगरपालिकेचे सभाग्रह, जिल्हाधिकारी, पुणे शहर तहसीलदार असतील यांच्याकडे या कामांसाठी पाठपुरावा करत होते त्याचाच भाग म्हणून या पूरग्रस्त नागरिकांना त्यांच्या हक्काचे पंधरा हजारा पैकी दहा हजार रक्कम शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून येणे बाकी होते. गेल्या दीड-दोन महिन्यापूर्वी मी हा मुद्दा घेऊन लेखी पत्रव्यवहारसह पुणे शहर तहसीलदार श्रीमती तृप्ती कोलतेमॅडम यांची भेट घेतली होती.त्यानंतर मी पूरग्रस्तांना विनंती केली होती आपले बँक अकाउंट डिटेल्स हे आपण संबंधित तलाठी यांच्याकडे द्यावे. त्या प्रमाणे त्या सर्वांनी प्रतिसाद दिल्यामुळे आज सदर चे चेक तयार झाले असून शासनाच्यावतीने संबंधित कर्मचारी हे आपल्या घरोघरी, वस्तीमध्ये हे येऊन चेक वाटप करीत आहेत. जवळ जवळ 2000 कुटुंबांना याचा लाभ मिळत आहे.