पुणे- केवळ वेदना पाहून आणि खंत-व्यक्त करून उपयोग नसतो संवेदना ते सहवेदना असा प्रवास गेल्या ६७ वर्षात आनंदवनाचा राहिला आहे हाच प्रवास कॉंग्रेसने पक्ष स्थापनेपासून जोपासला आहे आनंदवन आणि काँग्रेस मध्ये हेच साम्य आहे महात्मा गांधी यांच्यापासूनच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बाबा आमटेंनी पुढे आपल्या कार्याची वाटचाल सुरु ठेवली कॉंग्रेसच्या प्रत्येक पिढीशी आनंदवनाचा दृढ संबंध आहे असे सांगत आज कौस्तुभ प्रकाश आमटे यांनी पुणे शहर कॉंग्रेस आणि युवक कॉंग्रेसच्या दुष्काळग्रस्त भागात धान्य पाठविण्याच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले .
आज कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जमविलेले १० ट्रक धान्य आष्टी या दुष्काळग्रस्त भागात पाठविण्यात आले. यावेळी ते बोलत होते ….
रमेश बागवे , अभय छाजेड , आमदार दीप्ती चवधरी , विश्वजित कदम, उल्हास पवार , रजनी त्रिभुवन, नीता परदेशी ,अजित दरेकर ,विलास जैन ,महेश वाबळे, दत्ता गायकवाड,हर्षा शाह, अजित आपटे, सुधीर जानज्योत, चंद्रशेखर कपोते ,सुनंदा गदाळे आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले .