पुणे: टीईटी घोटाळा प्रकरणात टीईटी परीक्षेत गौरमार्गाचा अवलंब करीत लाखो रुपये देऊन तब्बल 7 हजार ८00 जणांनी पात्र झाल्याचे प्रमाणपत्र मिळविले आहे.पुणे सायबर पोलिसांनी या 7८00 जणांची पत्यासह यादी तयार केली आहे.अपात्र उमेद्वारांविरुद्ध कारवाईसाठी पुणे सायबर पोलीस तयार असून लवकरच या 7८00 अपात्र उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषद पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
अमिताभ गुप्ता म्हणाले ,टीईटी घोटाळा प्रकरणाचे जाळे हे दिवसंदिवस वाढतच चालले आहे.टीईटी परीक्षेत तब्बल 7८00 अपात्र उमेदवारांनी पैसे देऊन पात्रता मिळविली आहे.या उमेदवारांना ओएमआर शीट मध्ये 28 मार्क असताना चक्क अंतिम निकालात 82 मार्क दिल्याचे उघडकीस आले आहे.तसेच या उमेदवारांना पात्र करण्यासाठी परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडविताना कोडवर्ड देण्यात आला होता.आणि विशेष म्हणजे एजंटला पैसे देणाऱ्यांच उमेदवारांनी उत्तरपत्रिकेवर काहीच प्रश्नांची उत्तरे सोडवायची ठरले होते.
अश्या अनेक धक्कादायक बाब सायबर पोलिसांनी उघडकीस आणले आहे. पुणे सायबर पोलिसांनी जी 7८00 अपात्र उमेदवारांची पत्यासह यादी तयार केली आहे.ती यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली आहे.शिक्षण विभागाकडून खातरजमा केल्यानंतर अपात्र उमेद्वारांविरुद्ध थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. असे अमिताभ गुप्ता म्हणाले.