दिव्यशक्ती असणारया दुर्गा देवीचे स्वागत आणि पुजा या गोष्टींनी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते नवरात्रीच्या महोत्सवाला सुरवात झाली. २५ सप्टेंबर २०१४ ला विविध रंगांची उधळण, दिव्यांची सजावट, प्रवचन या सर्व गोष्टींनी युक्त अशा मंगलमय वातावरणाने सारसबागेजवळील बन्सीलाल रामनाथ अग्रवाल ट्रस्टचे महालक्ष्मी मंदिर उजळुन निघाले. हजारोंच्या संख्येने भक्त देवीची, सरस्वतीची,महालक्ष्मीची, कालीची पुजा मनोभावाने, प्रेमाने करण्यासाठी एकत्रित आले होते. पार्वतीची पुजा या उत्सवाचा महत्वाचा भाग मानतात, तसेच माता शैलापुरी उजव्या हातात त्रिशुळ धारण आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैलावर विराजमान असते या देवीची पुजा करणे आणि हा उत्सव साजरा करणे हा प्रत्येक भक्ताला खुप मोठा आनंदाचा क्षण होता .
श्री. जगद्गुरू शंकराचार्य- श्री. विद्यानृसिंह भारती, करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या उपस्थित घटस्थापनेचा विधी करण्यात आला. ते म्हणाले, ‘आपल्या आयुष्यात देवी सरस्वती, महालक्ष्मी आणि काली यांना खूप महत्त्व आहे. घटस्थापनेचा विधी करावयास मिळणे हा मी माझा सन्मान समजतो. पुण्यातील अतिशय महत्त्वाच्या आणि धार्मिक मंदिराची स्थापना केल्याबद्दल मी विश्वकर्मा कुटुंबाचा आभारी आहे.’
संध्याकाळची आरती सरकारी वकील श्री. उज्ज्वल निकम आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आली.श्री. उज्ज्वल निकम म्हणाले, ‘या भक्तीपूर्ण उत्सवात सहभागी होताना मला फार आनंद होत आहे. यादेवळात तीन आदिशक्तींचा वास असून त्या तुम्हाला शांती आणि समृद्धी देतील.’
मंदिराच्या सर्व कर्मचारयानी अविरत घेतलेल्या कष्टामुळे मंदिरामध्ये चैतन्यमय वातावरण होते. तसेच मंदिरात येणारया सर्व भक्तांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी या मंदिराच्या सर्व कर्मचारयानी रात्रंदिवस मेहनत घेतली. या मंदिरात सर्व पंथाचे, जाती धर्माचे, भक्त एकत्रित आले त्यामुळे या मंदिरात विविधतेत एकता दिसली.