मुंबई – मतदान न करणारेच नंतर सरावाधिक तक्रारी करतात असे आज सलमान खान ने म्हटले आहे तर अमोल पालेकर यांनी मात्र चांगले उमेदवार दिसत नसल्याने लोक मतदान करण्यास उत्साही नसतात असे विधान केले आहे
पाहू यात मतदान केल्यानंतर कोण काय म्हणाले …
सलमान खान : मतदान करून तुम्ही तुमचा मतदारसंघ, शहर, राज्य आणि देशाविषयी एकप्रकारे प्रेमच व्यक्त करत असता. निव्वळ राजकारण करण्यापेक्षा तुमच्या मतदारसंघामध्ये काम करणाऱ्याला मत द्या. आज मतदान न करता सहलीला गेलेले लोकच नंतर सर्वाधिक तक्रारी करतात.
अमोल पालेकर : मतदानाची टक्केवारी घसरतेय किंवा शंभर टक्के मतदान होत नाही, अशी नाराजी आपण नेहमीच व्यक्त करतो; पण राजकीय पक्ष उमेदवारांच्या रूपाने चांगला पर्याय जनतेसमोर आणतात का? हा खरा प्रश्न आहे. सध्या चांगले उमेदवार नसल्यानेच मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे.
रणबीर कपूर : आपल्या शहराचा कारभार कुणाच्या हाती असावा, हे तुम्हालाच निवडावे लागणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडा आणि मतदान करा.
मतदानाबाबत सलमान खान – अमोल पालेकर यांची भिन्न मते
Date: