Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जितेंद्र आव्हाड हल्लाप्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र …

Date:

मुंबई -भाजप सरकारकडून राष्ट्रवादीचे नेते टार्गेट करण्यात येत आहेत काय ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात असताना  राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते शरद पवार यांनी आज जितेंद्र आव्हाड यांच्यावर सांगली येथे झालेला हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देवून इशारा दिला आहे या पत्रात महाराष्ट्रामध्ये प्रागतिक विचार मांडणाऱ्या डॉ. दाभोलकर व कॉ. गोविन्द पानसरे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली व या हत्येला बराच कालावधी होऊनसुद्धा गुन्हेगारांचा शोध घेण्यात शासकीय यंत्रणेला यश आले नाही. एवढेच नव्हे तर प्रागतिक विचारांवर आधारित भूमिका मांडणाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेल्या पुरस्काराबद्दल विरोधी भूमिका मांडणाऱ्या श्री. जितेंद्र आव्हाड यांना देण्यात येणाऱ्या धमक्या. श्री. आव्हाड यांच्या सांगली सभेमध्ये घुसून झालेला हल्ल्याचा प्रकार व त्या संदर्भात टेलिव्हिजनवर येऊन श्री. आव्हाड यांच्याबद्दल आमच्याकडून अशीच भूमिका घेतली जाईल, अशी जाहीरपणे दिलेली धमकी हे सर्व धक्कादायक आहे. असे सुरुवातीलाच म्हटल्याने यावर आता बरेच राजकीय वातावरण तापणार आहे असे समीक्षकांना वाटू लागले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेल्या पुरस्काराबद्दल विरोधी भूमिका सातात्याने  जितेंद्र आव्हाड यांनी मांडण्याची मोहीम राबविली हे मुळ कारण असल्याने पुढील वातावरण तापवायचे कि कसे ठेवायचे हे आता भाजपच्या अंमल करण्यावर ठरेल असा हि समीक्षकांचा व्होरा आहे

-पाहू यात श्री पवार यांनी नेमके काय म्हटले आहे पत्रात जसेच्या तसे ….

 

 

माननीय श्री. देवेन्द्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र
महोदय,

अलिकडे महाराष्ट्रामध्ये प्रागतिक विचार मांडणाऱ्या डॉ. दाभोलकर व कॉ. गोविन्द पानसरे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली व या हत्येला बराच कालावधी होऊनसुद्धा गुन्हेगारांचा शोध घेण्यात शासकीय यंत्रणेला यश आले नाही. एवढेच नव्हे तर प्रागतिक विचारांवर आधारित भूमिका मांडणाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेल्या पुरस्काराबद्दल विरोधी भूमिका मांडणाऱ्या श्री. जितेंद्र आव्हाड यांना देण्यात येणाऱ्या धमक्या. श्री. आव्हाड यांच्या सांगली सभेमध्ये घुसून झालेला हल्ल्याचा प्रकार व त्या संदर्भात टेलिव्हिजनवर येऊन श्री. आव्हाड यांच्याबद्दल आमच्याकडून अशीच भूमिका घेतली जाईल, अशी जाहीरपणे दिलेली धमकी हे सर्व धक्कादायक आहे.
म. फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचा अभिमान बाळगणाऱ्या महाराष्ट्रात ही असहिष्णूता व झुंडशाही वाढत आहे ही बाब चिंताजनक आहे.
श्री. जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे ओ.बी.सी. समाजाचे लोकप्रिय व सुविद्य नेते आहेत. महाराष्ट्र शासनात मंत्री म्हणून त्यांनी कार्य तर केलेच, त्याचबरोबर महाराष्ट्र विधान सभेतील जागृत सदस्य म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांची नोंद राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून आपण व्यक्तिशः घ्याल असा मला विश्वास आहे.
सार्वजनिक जीवनात काम करताना विविध विचाराचे मान्यवर आपण पाहतो. मतभिन्नता असणाऱ्यांनाही लोकशाहीमध्ये अधिकार आहे हे आपण स्वीकारणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात श्री. जितेंद्र आव्हाड यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांची आपण राज्य प्रमुख म्हणून नोंद घेऊन उचित खबरदारी घ्याल अशी अपेक्षा आहे. आणि श्री. जितेंद्र आव्हाड यांचे संदर्भात काही अघटित घडू नये अशी आपली भूमिका असेल याबद्दल मला विश्वास आहे. त्याबरोबर या संदर्भातील राज्याचा गृह विभागाचा प्रमुख म्हणून आपणास जबाबदारी टाळता येणार नाही.
माझ्या या निवेदनाची आपणाकडून गंभीरपणे नोंद घेतली जाईल अशी अपेक्षा करतो. या पत्राची प्रत मी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या विरोधी पक्षनेत्यांना पाठवित आहे.

कळावे,
आपला,
शरद पवार
दि. २१ जुलै २०१५

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लवकरच जाहीर होणार गट क लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल

https://www.youtube.com/live/fFVATRwAxP4?si=7g1Z8-YHQWZYClCS एमपीएससीच्या कारभारावर आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत लक्षवेधी मुंबई/ पुणे...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन शिक्षेत वाढ:सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या विधेयकाचे झाले काय?

दारूबंदी सुधारणा विधेयक 2025 घेतले मागे... मुंबई-सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून...

दारुबंदी विधेयक सुधारणेसाठी सभागृहात आमदार महेश लांडगे यांनी मांडली आक्रमक भूमिका

कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांचे सर्वंकष उपाययोजनांचे निर्देश मुंबई/ पिंपरी-चिंचवड...

चाकूर च्या माजी नगराध्यक्षांसह शरद पवार गट, ‘प्रहार’ च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई, 11 जुलै...