पुणे- पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आल्यानंतर आज महापालिकेत ..कधी काळी सर्व पीएमटी च्या चाव्या हातात असलेले अजित आपटे यांच्यासह बडतर्फ कर्मचारी आणि अस्तास गेलेले कामगार नेते यांनी आज महापालिकेत गर्दी केली होती . काहीजण पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत होते तर काही जन अधिकाऱ्यांच्या भेटीस सज्ज होते .दरम्यान मुंडे जातील आणि गुंडे मॅडम येतील …पुन्हा मॅडम ना या प्रश्नांना सामोरे जायचे आहे . पालिकेतील लॉबी,पीएमपीएमएल मधील लॉबी यांचा सामना पूर्ण न करताच मुंडे यांना गाशा गुंडाळावा लागला आहे ,तर प्रेरणा देशभ्रतार या हि लॉबी च्या बाहेर होत्या आता त्या हि गेल्या आहेत .या पार्श्वभूमीवर आता ‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा ‘ असा अनुभव येतो कि लोण्याच्या गोळ्या साठी भांडणे होतात .. ते येणाऱ्या काळात दिसणारच आहे .
मुंढे यांनी दहा महिन्यांपूर्वी ‘पीएमपी’चा कारभार स्वीकारला होता. मुंढे यांनी मागील दहा महिन्यांत घेतलेल्या विविध निर्णयांमुळे तसेच कर्मचाऱ्यांवरील कारवाईच्या धडाक्यामुळे पीएमपीच्या सर्व कामगार संघटना त्यांच्याविरोधात गेल्या होत्या. मुंढे यांची बदली होताच पीएमपीच्या कर्मचा-यांकडून जल्लोष करण्यात आला आहे .
काय केले होते मुंडे यांनी …
– सतत गैरहजर राहणा-या पीएमपीमएलच्या 158 बसचालकांना पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सेवेतून बडतर्फ केले होते.
– बदली हंगामी कर्मचारी म्हणून या बसचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतू ऑगस्ट 2017 ते डिसेंबर 2017 या कालावधीत हे बसचालक सतत गैरहजर राहिल्यामुळे त्यांची सेवा संपुष्टात आणली होती.
– बडतर्फ केलेले कर्मचारी बदली, हंगामी आणि रोजंदारीवर काम करणारे होते. या कर्मचा-यांनी सुटीचे दिवस सोडून एका महिन्यात 21 दिवस काम करणे गरजेचे होते.
– परंतू ही अट ते पूर्ण करू शकले नाहीत त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. शिवाय कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत 13 वाहतूक निरीक्षकांना निलंबित केले होते.
– पीएमपीएमएलचा पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढेंनी कामात हलगर्जीपणा करणा-या 200 पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिका-यांना निलंबित केले होते. त्यामुळे बदली होताच त्यांनी जल्लोष केला.
11 वर्षात तब्बल 10 वेळा बदली-
2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या मुंढेंची 11 वर्षात तब्बल 10 वेळा बदली करण्यात आली आहे. अरुण भाटीया गेल्यानंतर आपल्या कामाच्या धडाकेबाज कारवाईने गाजणारे म्हणून पुण्यात आलेले ते पहिलेच अधिकारी म्हणून ओळखले जातील .हेकेखोर ,लोकप्रतिनिधींना किंमत न देणारे ,त्यांना अवमानास्पद वागणूक देणारे , कामगारांवर हुकुमशाही पद्धतीने दहशत बसविणारे म्हणून त्यांच्यावर राजकीय क्षेत्रातून आरोप केले गेले .मुंडे यांनी लोकप्रतिनिधींच्या आक्षेपांना उत्तरे देण्यासाठी कायम पालिकेच्या मुख्य सभेत जाणे टाळले , गेले तेव्हा स्वतःचे निवेदन करून लोकप्रतिनिधींचे म्हणणे न ऐकता मधूनच निघून गेल्याचा आरोप त्यांच्यावर झाला .पीएमपीएमएल साठी पैसे देणे महापालिकेचे कर्तव्य आहे त्यासाठी मी भिक मागण्याची गरज नाही अशा स्वभावाचे मुंडे आणि लोकप्रतिनिधी यांच्यात कधीही सुसंवाद झाला नाही. ते आमचा अवमान करतात अशी भावना लोक्प्रतीन्धींची कायम असताना पुण्याचे खासदार अनिल शिरोळे आणि त्यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांचे मात्र त्यांच्याशी चांगले संबध होते .मोडेल पण वाकणार नाही अशा स्वभावाने भाटीया यांनी सर्वच राजकीय पक्षातील लोकांशी आणि कामगारांशी देखील एकाच वेळी परिणामांची तमा न बाळगता वाईट पणा घेतला आणि त्यांच्या वारंवार बदल्या होत गेल्या . तसाच काहीसा प्रकार मुंडे यांच्या बाबत हि होता असल्याचे दिसून आले आहे .भाटीया हे मीडियाशी फटकून राहत पण त्यांना झोपडपट्टीतील आणि आम जनतेचा माथ्य स्वरूपात पाठींबा काही काल लाभला होता . मुंडे यांच्या बाजूला मात्र मोठ्या मीडियाशी सलगी आणि बड्या विद्यार्थ्यांचा पाठींबा अशा दोन गोष्टी दिसून आल्या आहेत. पीएमपीएमएल च्या प्रवाश्यांचा त्यांना पाठींबा कधी मिळाल्याचे फारसे जाणवले नाही .मी एकटाच प्रामाणिक अशी त्यांची भावना असल्याचा आरोप होत गेला … पण केवळ प्रामाणिक असून प्रत्यक्षात जनतेच्या पदरी काय ?उपयोग काय ? असे हि प्रश्न उपस्थित झाले .