पुणे-वाहतुकीची जटील समस्या सोडविण्यासाठी दिवाळीच्या या महिन्यातच पीएमपीएमएल ला सीएनजी वरील १००० बसेस घेऊन देण्यासाठी आग्रही भूमिका खासदार संजय काकडे यांनी घेतली असून महापालिका आणि जलसंपदा यांच्या मधील वाद मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मिटला असून आता पुणेकरांना आवश्यक तेवढा पाणीपुरवठा देखील करता येईल या साठी आम्ही नियोजन तर करूच पण पुणेकरांनी देखील पाणी जपून वापरावे असे येथे खासदार संजय काकडे यांनी सांगितले .
आज त्यांनी ‘मायमराठी ‘ मार्फत पुणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छ्या दिल्या आणि भाजपने दिलेल्या आश्वासनपूर्तीसाठी सदैव कार्यशील राहू अशी ग्वाही देखील दिली .
ते म्हणाले ,पुण्याची वाहतूक समस्या जटील बनली आहे हे खरे आहे . मेट्रो यायला काही अवधी आहे . तोवर पीएमपीएमएल सक्षम करणे गरजेचे आहे . आणि यावर तातडीने कार्यवाही देखील गरजेचीच बनली आहे . या साठी आपण आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील दिले आहे. टाटा आणि महिंद्रा या दोन्ही कंपन्यांनी १००० बसेस डिफरड पेमेंट सिस्टीम वर देण्याची तयारी दर्शविली आहे . या आठवड्यातच याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची आम्ही मान्यता घेवू आणि सीएनजी वरील १००० बसेस पुणेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करवून देऊ . पुण्यात पाणी टंचाईने अचानक डोके वर काढल्याच्या प्रकरणी ते , म्हणाले पाणी पुणेकरांना आवश्यक तेवढे मिळालेच पाहिजे . पुणेकरांनी देखील ते जपून वापरले पाहिजे .या प्रकरणी जो महापालिका प्रशासन आणि जलसंपदा खाते यांच्यात वाद होता तो मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मध्यस्थीने आता मिटला आहे .यापुढे व्यवस्थित नियोजन करून पुणेकरांना आवश्यक तेवढा पाणीपुरवठा करण्याकडे आमचे विशेष लक्ष असणार आहे .