टीआरपीसोबतच लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या ;तुझ्यात जीव रंगला; या झी मराठीवरील रसिक प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने नुकतंच ५०० भागांचा टप्पा पार केला. राणा आणि अंजली तसेच या मालिकेतील प्रत्येक पात्र मग ती अगदी
नकारात्मक व्यक्तीरेखा असलेली नंदिता वहिनी असो, ते सर्व महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचा एक भाग बनले आहेत. नुकतंच आपण मालिकेत पाहिलं कि गायकवाडांना त्यांचा वाडा परत मिळतो. हा
आनंद साजरा करण्यासाठी वाड्यात मोठा समारंभ आयोजित केला जातो. गावकऱ्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आबा गावातल्या ज्या लोकांनी मदत केली त्यांचे आभार मानतात आणि त्यांचे पैसे देखील परत करतात. सगळीकडे
आनंदीआनंद वातावरण आहे. वाडा तर परत मिळाला पण आता जमीन परत मिळवण्याचे अतोनात प्रयत्न घरातील सदस्य करत आहेत.
सगळं सुरळीत पार पडतातआहेत, गोष्टी आधीसारख्या रुळावर येतात आहे त्यामुळे आबा आता राणा अंजलीला मुलाचा विचार करा असं सुचवतात. आबांनी अचानकपणे मुलाचा विषय काढल्याने राणा अंजली बावरतात. आपण या
नव्या जबाबदारीसाठी तयार आहोत का हे दोघांनाही आत्ता कळत नाहीये. पण त्यांच्याकडे लवकरच एका नव्यापाहुण्याचे आगमन होणार आहे. अंबानी सांगितल्याप्रमाणे राणा आणि अंजली खरंच बाळाचा विचार करणार आहेत
का? हा नवा पाहुणा कोण असणार आहे? त्याच्या आगमनाने राणा आणि अंजलीच आयुष्य कशाप्रकारे बदलणार आहे?हे पाहणे रंजक ठरेल.