पुणे-प्रवासातले किस्से ,बायकांच्या गप्पा,आडनावांच्या गमती,दररोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना
रंगतदारपणे सादर करत बंडा जोशी,मकरंद टिल्लू,चैताली भंडारी,श्रीप्रकाश सप्रे,धनंजय जोशी,दिलीप हल्याळ
या एकपात्री कलाकारांनी मैफिल रंगवली. ३० व्या पुणे फेस्टिवलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘हास्योत्सव
एकपात्रींचा’ हा एकपात्री कलाकारांचा बहारदार कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाला.’हसायदान
फाउंडेशन’ने याचे आयोजन केले होते. ‘हसायदान फाउंडेशन’चे प्रमुख मकरंद टिल्लू यांनी
सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमात जेष्ठ एकपात्री कलावंत बंडा जोशी, दिलीप हल्ल्याळ, चैताली
माजगावकर-भंडारी, श्रीप्रकाश सप्रे,धनंजय जोशी हे सहभागी झाले होते. प्रख्यात एकपात्री कलावंत
बंडा जोशी यांचे 5000 जाहीर कार्यक्रम पूर्ण झाल्याबद्दल पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक
कृष्णकांत कुदळे आणि सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव
याप्रसंगी केला गेला.यावेळी कृष्णकांत कुदळे म्हणाले,'एकपात्री ही काळाची गरज आहे.गेली १५
वर्षे ५०हून अधिक कलावंतानी या व्यासपीठावरून कला सादर केली. अप्रतिम सादरीकरणाने
एकपात्री हा पुणे फेस्टिव्हलचा अविभाज्य घटक बनला आहे.सत्काराला उत्तर देताना प्रख्यात
एकपात्री कलावंत बंडा जोशी म्हणाले’पुणेकरांच्या वतीने होणारा हा सन्मान मनाला उभारी
देतो.रसिकांच्या चेहऱ्यावरचे हास्य आम्हा कलाकारांना खरा सत्कार असतो.पुणे फेस्टिव्हलमध्ये
दर्जेदार प्रेक्षक मिळतो याचा आनंद वाटतो.’हसायदान फाउंडेशन’चे प्रमुख व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मकरंद टिल्लू आपल्या स्वागत व
प्रास्ताविकात ,रसिकता आणि कला यांचा परस्पर समन्वय कसा आहे याबद्दल बोलताना
म्हणाले,’श्वास संपल्यावर रहाते त्याला म्हणतात ‘कलेवर’अमर होतात ते जे प्रेम करतात’कले’वर
!!! या त्यांच्या वाक्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.या कार्यक्रमास प्रेक्षकांची मोठी गर्दी
होती.