पुणे- मागील महिन्यात उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी पुणे शहरातील कचरा तेथील डेपोमध्ये टाकण्यास विरोध दर्शवला होता. पालिका प्रशासन आणि महापौर यांच्या ग्रामस्थांसोबतच्या चर्चा अपयशी ठरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुण्यात येऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला एक महिन्याच्या आत राज्य सरकारला कचरा प्रश्न मार्गी लावण्यासंबंधी आराखडा सादर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार, प्रशासनाने मागील आठवड्यात महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे आराखडा सादर केला. त्यानंतर आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार अनिल शिरोळे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय काकडे, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ,आमदार मेधा कुलकर्णी आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी उरुळीदेवाची आणि फुरसुंगी गावातील ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार कचरा प्रश्नावर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यावर आता नागरिक आणि लोकप्रतिनिधी ,सामाजिक संस्था यांच्या सूचना मागविण्यात येणार आहेत . उरळी आणि फुरसुंगीचा कचरा डेपो टप्प्या टप्प्याने बंद करण्यासाठी हा कृती आराखडा प्रभावीपणे काम करेल आणि शहरातील विविध जागा संपादन करून तिथे कचरा प्रकल्प राबविण्यात येतील . रोज घरोघरी कचरा गोळा करणे, कचरा वेचकांना मासिक वेतन देणे ,सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारणे, पुणे शहरात सद्यस्थितीत जे प्रकल्प चालू आहेत त्या प्रकल्पाची क्षमता वाढविणे आणि शहरातील पंन्नास, शंभर आणि दोनशे टण कचरा जिरवण्याची क्षमता असलेले इतर प्रकल्प कार्यान्वित करणे, अशा अनेक बाबींचा यात समावेश असून ७२ पानांचा हा कृती आराखडा
http://www.punecorporation.org/sites/default/files/swm_appeal_marathi.pdf
किंवा
http://www.punecorporation.org/mr/appeal-citizens-media
या लिंकवर क्लिक केल्यास महापालिकेच्या थेट वेबसाईटवर लोड केलेल्या कृती आराखड्याची ७२ पाने नागरिक पाहू शकतील . त्यातील हि पहा काही पाने इथे ….