लक्षात घ्या,अजूनही वेळ गेलेली नाही… जलसंवर्धनासाठी पुणेकरांना साद
पुणे
लक्षात घ्या,अजूनही वेळ गेलेली नाही ,पाणी वाचवा ,भविष्यासाठी तरतूद करा… जल हैं तो कल है ,
चला, जल संवर्धनासाठी पुढाकार घेऊ या ,भावी पिढीला दिलासा देऊ या ! या घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन मानवी साखळीद्वारे जागतिक जलदिनाच्या निमित्ताने जलसंवर्धनासाठी पुणेकरांना बुधवारी साद घालण्यात आली.
माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून अमित बागुल आणि सहकार्यांनी अलका टॉकीज चौक येथे सकाळी हा जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. विशेषतः सकाळी कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ रस्त्यावर मोठयाप्रमाणावर असते त्यानुसार सकाळीच जाणाऱ्या – येणाऱ्या नागरिकांना जलसंवर्धनासाठी काय -काय उपाययोजना करणे गरजेच्या आहेत ,यासाठी माहितीपत्रकाचेही वाटप करण्यात आले. राज्यात दरवर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण होत असते. तसेच पुणे शहरामध्ये मोठया प्रमाणावर पाणी गळती होत आहे हि गळती रोखण्यासाठी महानगरपालिकेने विशेष प्रयत्न केले पाहिजेत. त्याच बरोबर नवीन बांधकामांवर सर्सासपणे पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो त्यावर देखील तातडीने कारवाई झाली पाहिजे तसेच पुण्यामध्ये ठिकठिकाणी सिमेंट रोड केले जात आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याकडे देखील पालिका प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे व सोसाट्याना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यासाठी आर्थिक साहाय्य उपलब्द करून दिले पाहिजे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पाण्यासाठी जनतेला दाही दिशा वणवण भटकावे लागते. एकीकडे पर्यावरणाचा होणार ऱ्हास आणि भूगर्भात खालावलेला पाणीसाठा यामुळे भविष्यात पाण्याची मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होणार असल्याने ‘पाणी आहे तर जीवन आहे ; अन्यथा सारे काही व्यर्थ आहे ‘ हे ब्रीदवाक्य घेऊन आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प प्रत्यक्षात अमलात आणू या, यासाठी जागतिक जलदिनाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे संयोजक अमित बागुल यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी …….. हे या उपक्रमात सहभागी झाले होते.
ग्रे -वॉटर प्रकल्प काळाची गरज
भविष्यात लोकसंख्या वाढणार आहे,सिमेंटचे जंगल दिवसेंदिवस विस्तारत आहे ;पण पर्यावरणाचे काय ?, भूगर्भातील पाणीसाठा कसा वाढेल याचा कोणताही विचार होत नाही उलट पाण्याची नासाडीच होत आहे. पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे, असे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे असे स्पष्ट करून अमित बागुल यांनी पाणी बचतीसाठी ग्रे -वॉटर प्रकल्प काळाची गरज असल्याचे नमूद केले. आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील पहिला ग्रे -वॉटर प्रकल्प पुण्यात साकारत आहे, या प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याची मोठी बचत होणार आहे असे प्रकल्प सर्वत्र होणे गरजेचे आहे.