पुणे- देशभरात अलीकडे काही काळात कॉंग्रेसची अवस्था मोठी बिकट झाल्याचे चित्र आहे ,या परिस्थितीत महापालिका निवडणुकीसाठी शहर काँग्रेस चे नेतृत्व विश्वजित कदम आणि हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आहे , अशा स्थितीत अनेकजण काँग्रेस सोडून केंद्रात आणि राज्यातील सत्ताधारी भाजप मध्ये प्रवेश करीत आहेत . सत्तेच्या हव्यासापोटी आणि सत्तेच्या बडग्याने कॉंग्रेसचे काहीजण भाजप मध्ये जात असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील आणि विश्वजित कदम यांनी केला आहे. पण अनेक वर्षे काँग्रेस मध्ये घालविलेले आणि अजूनही काँग्रेस ज्यांनी सोडली नाही त्या नाना वाबळे यांचे सुपुत्र असलेले नेहमी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात दिसणारे महेश वाबळे यांनी देखील काल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला . भाजपा मध्ये गेल्यानंतर महेश वाबळे यांच्याशी साधलेला हा संवाद …..