कोरोना मुळे अपरिहार्य असलेला ,”लाॕकडाउन” हा सध्याचा परवलीचा शब्द झालेला आहे.काही दिवसांपूर्वी कोणालाच हा शब्द माहित नव्हता.पण आज प्रत्येकाच्या ओठावर हे एकच नाव आहे. आणि का असणार नाही. समस्त जगासाठी भयंकर डोकेदुखी ठरलेल्या या जीवघेण्या आजारावर आत्ता या क्षणाला तरी कसलेही औषध आपल्याकोणाकडे नाहीए.वैश्विक महामारी म्हणून घोषित केलेल्या आजाराने जगाला जागच्या जागी खिळवून ठेवले आहे.भारतात साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली असली तरी चीन मध्ये जानेवारीतच याचा रुग्ण समोर आला होता.त्या पाठोपाठ इटली,अमेरिका रुग्ण सापडत राहिले. या आजाराची माहिती होताच त्याच्या व्याप्तीचा अंदाज घेत असतानाच या रोगाने परदेशात माणसे कायं शहरेच गिळंकृत करायला सुरुवात केली.इतका याचा प्रसार झटकन होत होता. आणि हस्तांदोलनातून,एकमेकांना स्पर्श करण्यातून श्वासवाटे याचा प्रादूर्भाव होत असल्याने गर्दी प्रामुख्याने टाळले जाणे भाग होते. आणि त्यामुळेच ,”लाॕकडाउन” या शब्दाचा वापर करण्यात आला. आज याच लाॕकडाउन ची आपल्यवर टांगती तलवार आहे.
कोविड 19 वर ठोस औषध नसल्यने त्याचा झटपट प्रसार रोखणे हाच उपाय मानून प्रत्येकाला घरी थांबण्यास सांगाण्यात आले.आणि लोकांना याची अंमलबाजावणी करता यावी यासाठी खबरदरी म्हणून सरकारने,”लाॕकडाउन” जाहीर केले.कुठेही,कशासाठीही घराबाहेर जाऊ नका. जेणेकरुन या आजाराच प्रसार होणार नाही. असे पंतप्रधानांनी लोकांना आवाहन केले.जीवनावश्यक जे जे असेल ते लोकांना घराजवळ उपलब्ध करुन देण्यात आले. या दरम्यान संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली.
परंतु एखादी गोष्ट दुसऱ्याने सांगितल्यावर वर आपण समजूच असे नसते.किंवा एखादा निर्णय सरकार दरबारी जाहीर करण सोप असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना त्याचा फज्जा कसा उडतो हे या लाॕकडाउन मुळे जवळून पाहता येतंय. घरी राहणं हे प्रत्येकाच्या खरंतरं हिताचे आहे.शिवाय कुटुंबातील एक व्यक्ती जर बाधित असेल तरः त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा धोका /रिस्क वाढते.त्यादृष्टीने त्याने/तिने घरीच थांबणे आवश्यक आहे. तरीपण लोकांची बाहेर गर्दी का होते आहे?सरकार कडून वारंवार करण्यात येणार्या आवाहनाला लोक का हरताळ फासतं आहेत?याची उत्तरे शोधणे गरजाचे आहे.
लाँकडाउन साठी लोक मनातून तयार नव्हते. कारण आजाराची व्याप्ती लोकांना तितकीशी कळाली नव्हती. रोजगार ही प्रमुख गोष्ट होती आणि राहणार आहे. आपण कामावर गेलो नाही तर नोकरी जाईल या भितीने लोक बाहेर पडत राहिले. यावर सरकारने आवश्यक असा फतवा काढला आणि लाॕकडाउन कडक झाले.पण ज्यांची हातावरची पोट आहेत त्यांचे अतोनात हाल झाले.घरी बसले तर पोटाला
कोण देणार?तेव्हा मला घराबाहेर पडलेच पाहिजे.असे समजून ही लोक बाहेर येऊ लागली.भूक माणसाला बसू देत नाही ना..पण तोवर बाहेर सगळंच ठप्प झाले असल्याने उपासमारीची वेळ या लोकांवर आली. आपल्या इतिहासात प्रथमच सर्व धर्मियांची मंदिरे,प्रार्थना स्थळे लोकांसाठी बंद करण्यात आली. आणि जनतेत असंतोष वाढू लागला.यामध्ये अतोनात नुकसान आपल्या बळीराजाचेही झाले. अतोनात कष्टाने कमावलेल्या पीकाला भाव नसल्याने,वाहतूक बंद असल्याने पीक जागच्या जागी सडून गेलं.समस्त जगाची क्षुधा शांत करणार्यांवर उपासमारीची वेळ आली.
प्रत्येकाचा रोजगार ठप्प झाल्याने परिणामी देशाचे आर्थिक गणित ठप्प झाले.म्हणजे च देशाची इकाॕनामी अघोषित काळांसाठी बंद पडली. आर्थिक चक्र जागच्या जागी थांबले.याचा परिपाक म्हणजे आर्थिक मंदी तोंडासमोर स्पष्ट दिसते आहे.
रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य क्षेत्रावर ही कमालीचा ताण आलायं. पुरेसे व्हेटिंलिटर्स,बेडस आणि बाकीच्या वैद्यकीय सोयी सुविधा आपल्याकडे इतक्या संख्येने उपलब्ध नसल्याने उपचारात अडचणी येत आहेत. या दुर्धर आजाराशी प्रत्यक्ष सामना करायला डाॕक्टर,नर्स याची संख्या कमी पडते आहे.
आणि या सगळ्याच्या सततच्या विचाराने नैराश्य,नकारात्मकता वाढली. याला लागून मानसिक आजार वाढले. त्यामुळे अस किती दिवस चालणार? पुढे कायं होणार हाच प्रत्येकाच्या प्रश्न आहे.. …
वाईटातून चांगले घडतच असते गरज असते तसे पाहण्यची.. या आजाराने माणसाला सर्वप्रथम त्याच्या मर्यादा कळल्या. त्याच्या अहंकाराला आळा बसला. माणुसकी हेच वैश्विक सत्य आहे हे पुन्हा एकदा पटले. जीवनाश्यक दुसरे काही नाही. जान आहे तो जहाँ हे,हे लोक समजून चुकले. आणि माणूस “ध्याना “च्या मार्गाला लागला. स्वच्छतेचे महत्व प्रत्तेकाला पटले. सतत घरात राहिल्लाने एकमेकां मधले अंतर संपुष्टात आले. घरात एकत्र राहत असून ही मनाने लांब गेलेल्यांसाठी ही पर्वणीच ठरली. धकाधकीच्या जीवनाची सवय झाल्याने साध ,सोपं ,हलक – फुलके जगण आपण विसरलो होते त्याची गरज आणि जाणीव झाली. हळूहळू का होईना लोक या वातावरणाला अंगवळणी पडले. आणि घरी राहूनही लोकं आपआपला आनंद शोधू लागले.
गर्दी जवळजवळ नाहीशी झाल्याने पर्यावरणात कमालीचा सुखद बदल स्पष्ट ‘ दिसतो आहे. सकाळ संध्याकाळी पक्षांचा किलबिलाट कानांना सुखावतो आहे. चिमणी व इतर दुर्मिळ पक्षी यांचा मुक्त वावर आपल्याला दिसतो आहे तो यामुळेंच. नद्यांचे प्रदूषण थांबले असून त्या स्वच्छ दिसत आहेत. हजारो कोटी रुपये खर्चून सुध्दा नद्यांचे प्रदूषण कमी होत नव्हते ते या केवळ लाॕकडाउन ने झाले. हे मान्य करावेच लागेल.घरात येणारा कामगार वर्ग येऊ शकणार नसल्याने सर्वानी घराची जबाबदारी वाटून घेतल्याने एकट्या स्त्री वर येणारी कामे कमी झाली. एकत्र कुटुंब पध्दती आपण विसरलो होतो त्याचाच आज एकमेकांना आधार होतो आहे. आपण युध्दजन्य परिस्थिती फक्त ऐकली होती. पण आज प्रत्यक्ष अनुभवतो आहोत. पुरवून खाणे या चा अर्थ् आणि महती आज कळते आहे.एकूणच भारतीय परंपरेची महती या आजाराने पुढे आली. मग ती हात जोडून नमस्कार करणे असो की हव्यास न करता पुरवून खाणे असो किंवा बाहेरुन आले की हातपाय धूवून घेणं असो.भारतीय असल्याचा अभिमान प्रत्येकाच्या मनात जागा झाला. यापूर्वी कुटुंबामध्ये जितकी डोकी तितकी मते असे होते आता मात्र एकाच्या निर्णयवर कुटुंब हमी भरतयं. असंख्य सल्लागार आणि कोर्सेस यांच्या प्रयत्नातून ही साध्य न होणारा घराचे घरपणं,एकोपा हा या लाॕकडाउनमुळेच वाढला हे मान्य करावेच लागेल. आणि आपण माणूस आहोत याच प्रत्येकाला भान आले.
© विद्या घटवाई