मुंबई–विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली मारण्याची भाषा केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आली होती. मग आता नाना पटोलेंना अटक का नाही? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे तसेच राज्या सिलेक्टिव्ह काम सुरू असल्याचा आरोप देखील फडणविसांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली असते असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मग आता तर नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबतीत जे विधान केले, त्यापेक्षा हे भयानक विधान नाना पटोलेंनी केले आहे. मग असे असताना केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना रातोरात अटक करणारे पोलिस आता का गप्प आहेत ? कारवाई का केली जात नाही? असा सवाल फडणवीसांनी केला आहे.
…त्या राज्याची अधोगती झाल्याशिवाय राहात नाही
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘राणेंना अटक केली तशी पटोलेंना केली जात नाही. यामुळेच मी म्हणतो सिलेक्टिव्ह काम सुरू आहे. पोलिस विभाग सिलेक्टिव्ह होतो, त्या राज्याची अधोगती झाल्याशिवाय राहात नाही. मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना कोणी जीवे मारण्याची धमकी दिली असेल तर त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे ! हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्यच आहे, उपकार नाहीत. असा टोला देखील देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.
कायदा माणूस बघून चालेल अशी परिस्थिती आलीय
देवेंद्र फडणीसांनी नाना पटोलेंवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. ते म्हणतात की, शारीरिक उंची वाढल्यामुळे बौद्धिक उंची वाढतेच असे नाही. नाना पटोले यांनी हे दाखवून दिले आहे. काँग्रेस नेत्यांच्या मनात मोदींजींबद्दल असूया आहे कारण पंजाबमध्ये देखील पंतप्रधानांचा ताफा अडवण्यात आला होता. आता पटोलेंनी असे विधान केले आहे. मात्र अशा प्रकारचे विधान हे लोकशाहीसाठी घातक आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हटलं तर पोलिस जातात…
पुढे बोलताना देवेंद्र फडणीसांनी रश्मी ठाकरे यांचा उल्लेख देखील केला आहे. ते म्हणाले की, ‘मला एका घटनेचे आश्चर्य वाटते. पण मी या घटनेचे समर्थन करत नाही. आमच्या एका कार्यकर्त्याने मुखमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हटले होते. यावेळी मध्यरात्री त्याच्या घरी पोलिस जातात. मात्र नाना पटोले मी पंतप्रधानांना मारू शकतो अशी थेट धकमी देतात आहेत. असे असताना त्यांच्या विरुद्ध साधा FIR देखील दाखल होत नाही. आता कायदा माणूस बघून चालेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.’ असे देखील फडणवीस म्हणाले.