मुंबई- यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरेंच्या एकेरी भाषेत उल्लेख करुन भाजपवर केलेल्या टीकेचा वचपा काढला आहे. पत्रकार परिषदेमध्ये राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “म्हणले उद्धव ठाकरे यांनीच सदा सरवणकर यांना मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करायला सांगितलं होतं” आणि मला मारण्यासाठी देखील उद्धव ठाकरे यांनी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती, परंतू मी त्यांना पुरून उरेलो.मी आजही जिवंत आहे. मला कोणीही मारू शकलं नाही, असा घणाघात नारायण राणे यांनी केला आहे. 2019 च्या निवडणूकीत उद्धव ठाकरे यांनी मोदी यांचे नाव आणि फोटो लावून निवडणूक लढली. ती जिंकली. आणि आता मोदींवर टीका सुरु केली आहे असं देखील राणे म्हणाले.
“मला मारण्यासाठी ठाकरेंनी छोटा राजन, शकीलला माझी सुपारी दिली होती. पण नारायण राणे संपला नाही, संपणारही नाही. उद्धव ठाकरे एक नंबरचा खोटा आणि लबाड माणूस आहे. त्यांना फक्त त्यांचं कुटुंब प्रिय आहे. शिवसैनिकासाठी कधी काही केल्याचं माझ्या ऐकिवात नाही. काम करणं येत नाही, फक्त दुसऱ्यावर टीका करणं त्यांना चांगलं जमतं. अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात गेलेला माणूस काय टीका करतो. कालच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना विचारधन देण्याऐवजी त्यांनी भाजप-संघाला शिव्या घातल्या. मी त्यांना सांगू इच्छितो आता जर तोंड बंद केलं नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याची जबाबदारी सर्वस्वी त्यांची असेल”, असं राणे संतापून म्हणाले.
“ज्यांनी शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले, त्यांना ठाकरे आत्ता गद्दार म्हणतात. पण शिवसेना वाढीसाठी उद्धव ठाकरे यांचं योगदान काय? कधी मातोश्री सोडून गेले काय ते? कधी विरोधकांच्या कानफाडीत तरी मारली काय? १९९२ च्या दंगलीत अमुक तमुक केलं असा डंका पिटतो, अरे बाबा पण तू काय केलं… नुसता बढाया मारतो…,”असे एकेरी हल्ले राणेंनी चढवले.